Skip to main content

हिंदु अंत्यसंस्कार आणि दफन

लेखक उद्दाम यांनी शुक्रवार, 06/12/2013 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदु अंत्यसंस्कार आणि दफन हिंदु धर्मात दहन केले जाते. पण एक माणूस जाळायला लाकूड फार लागते. विजेवरची दहन सोय सगळीकडे उपलब्ध नसते. त्यामुळे हिंदु लोकानाही दफनाची सोय करता येईल काय? ( सध्या लिंगायत समाजात अशी पद्धत आहे. ) दफनाला लाकूड लागत नाही. शिवाय ठराविक काळ ८-१० वर्षे वगैरे गेला की त्याच जागेत पुन्हा पुन्हा दफन होऊ शकते. दफन करायचे असेल तर हिंदु धर्मातही एक सोय आहे. मोठा संत होणे आणि समाधी घेणे, पण सामान्याना ते जमणारे नाही. मग सामान्याना अशी सोय आपल्या धर्माने किंवा शासनाने का केली नाही? तसेच एखादी व्यक्ती स्वतःला निधर्मी समजत असेल ( पण जन्माने हिंदु असेल ) तर तिचीही सोय होईल. हिंदुनी पुढाकार घेऊन हिंदुंसाठी दफनभूमी करावी, अशा विचाराचे कुणी आहे का? अशी दफनभूमी सध्या कुठे आहे का? ( याबाबत धर्म काय सांगतो, हे संबंधितानी जरुर पहावे. पण आपण मेल्यावर एक झाड मरु नये अशी तळमळ असलेल्यानी याबाबत चिंता करायची गरज नाही. ) , एका पंचक्रोशीत तरी अशी सोय हवी. मेडिकल कॉलेजात देणे, हाही सर्वाना जमणारा पर्याय नाही. ( आणि तसेही, मेडिकल कॉलेजात विद्यार्थी होऊन एका मढ्याला त्रास देऊन झालेला आहे. :) आता पुन्हा स्वतः मढे होऊन अजून पाच विद्यार्थ्याना त्रास द्यायची इच्छा नाही. :) ) हिंदु धर्मात सरसकटपणे दहन आणि दफन असे दोन ऑप्शन उपलब्ध होऊ शकतील का? याची चर्चा अपेक्षित आहे. दहन : सत्य की थोतांड हा विषय इथे अपेक्षित नाही. ( पण तरीही कुणी चर्चा करत असल्यास त्याला प्रतिबंध केला जाणार नाही. :) ) शाहण्याने आपुले थडगे खणावे आणि खणताना गाणे म्हणावे. :)

वाचने 37760
प्रतिक्रिया 143

प्रतिक्रिया

In reply to by म्हैस

म्हशे, अजुन एक डब्बल अभद्र शंका उचमळली बघ. एकाच्या शरीरात दुसर्‍याचा अवयव दान करुन बसवला आहे. काही वर्षे जगून तोही मेला. तर त्याच्या शरीराभोवती दोन आत्मे घुटमळतील का? :) :)

मग असे जर कुणी केलं तर मग त्यांचा आत्मा सात ठिकाणी घुटमळणार का?एकाच्या शरीरात दुसर्‍याचा अवयव दान करुन बसवला आहे. काही वर्षे जगून तोही मेला. तर त्याच्या शरीराभोवती दोन आत्मे घुटमळतील का?
हे त्या आत्म्यावर depend आहे त्याने किती ठिकाणी घुटमळायच . घुटमळनं काही compulsary नहिये. कसं असतं, बराच वेळ मेलेल्या माणसाला कळतच नाही तो मेलाय म्हणून . आणि कळल्यावर मग त्याला दुख होत. आयुष्यभर माझ माझ म्हणून ज्या गोष्टींवर आपल फार प्रेम असतं ती गोष्ट तुटली , फुटली , हरवली कि आपल्याला दु:ख होता न. मग इतकी वर्ष ज्या शरीराने साथ दिली त्या शरीराला सहज सोडायला आत्मा तयार नसतो. म्हणून तो तिथे घुटमळतो. म्हणून ते शरीर लवकर नष्ट करून टाकणं आवश्यक असत म्हणजे त्याला जास्त त्रास होत नाही . एखादी गोष्ट तुटली कि आपण त्याला पुन्हा जोडून वापरण्याचा प्रयत्न करतो . पण ती खूपच damage झाली तर तिला फेकून देवून आपण विसरून जतो. साधारण तसच