Skip to main content

थप्पड-शरद पवारांना की मुजोर झालेल्या लोकशाहीला?

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 24/11/2011 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण आज दुपारी १ते२ च्या दरम्यान घडलेली ही घटना आहे. दिल्लीमधे मा.शरद पवार एका कार्यक्रमाहुन निघत असताना,एका तरुणाने (हरविंदरसींग) पवारांच्या दिशेनी चाल करत ''ये सब चोर है'' अशा आशयाची काही वाक्य उच्चारत पवारांना एक थप्पड लगावली.तो तरुण महागाइच्या कारणावरुन भडकुन तस वागला असं अता व्रुत्तवाहीनीवाले सगळेच सांगत आहेत. तो मनोरुग्ण आहे हेही याच व्रुत्तांतात ऐकायला मिळत आहे.अजुन आज रात्री/उद्या पर्वापर्यंत याचे अजुनही वेगवेगळे 'अर्थ' आपल्यासमोर येतिल. त्यात अण्णा हजारे यांनी एका कार्यक्रमातुन निघता निघता तिथल्या लोकांनी 'ही' माहीती दिल्यावर ,त्यावर आश्चर्य व्यक्त केल्याच्या आर्विभावात-''अरे चाटा मारा...!, एकही मारा...!? असे उद्गार काढले... उपस्थित लोकं हसली आणी अण्णा निघुन गेले.नंतर मिडिया अण्णांपर्यंत पोहोचली व विचारले की असे आपण का बोललात? तेंव्हा अण्णा सुरवातीला मी या घटनेचा निषेधच केलाय,मी अहिंसावादी आहे,असं बोलले.पण मिडियानी त्यांना उपरोक्त वाक्यांची अठवण करुन दिल्यावर अण्णांनी ''थप्पड मारली की अणखी काही केले?'' असे मी विचारले. अशी सारवासारव केली. पवारांपासुन सर्व पक्षांचे नेते लोकांना व आपल्या कार्यकर्त्यांना ''शांत'' रहाण्याचे आवाहन केले आहे.पण अनेक ठिकाणी बंद जाळपोळ तोडफोड ह्या घटना सुरु झाल्या आहेत... माझा प्रश्न असा की आपण ह्ल्ली ह्या असल्या होणाय्रा वाढत्या घटनांचा अन्वयार्थ लोकशाहीच्या संदर्भात कसा आणी काय लावायचा? या घटना स्वागतार्ह/ निषेधार्ह /चिंताजनक मानायच्या आणी गप्प बसायचे...की कोलमडु पहात असलेल्या किंवा अजुनही नीट न स्थिरावलेल्या भारतीय लोकशाहीला बळकट करण्यासाठी पुन्हा एकवार अभ्यास करुन नवे उपाय शोधायचे...कारण क्रांत्या हिंसेनी घडोत वा अहिंसेनी...त्यांच्या पाठचे हेतु न्याय्य असोत वा अन्याय्य... नंतर मिळालेलं स्वातंत्र्य चांगल्या पद्धतीनी अव्याहतपणे टिकवण हेच तर अवघड असतं ना...?अन्याय दुर करणाय्रांनाही न्यायाची कल्पना असतेच अस नाही...त्यामुळे अश्या घटनांच नक्की फलीत काय?...

वाचने 33484
प्रतिक्रिया 131

प्रतिक्रिया

बर्‍याच दिवसांनी चांगली बातमी वाचली. त्या तरुणाने सुखराम ह्यांनाही थप्पड मारली होती.
माझा प्रश्न असा की आपण ह्ल्ली ह्या असल्या होणाय्रा वाढत्या घटनांचा अन्वयार्थ लोकशाहीच्या संदर्भात कसा आणी काय लावायचा?
संशोधन संस्थेवर हल्ला, तोंडाला काळे फासणे,कार्यालयात जावून धुडगुस घालणे,जातीचे राजकारण करून पुतळे हलवणे ह्या घटनांचा पवार/त्यांचा पक्ष लोकशाहीत कसा अर्थ लावतो? तसाच लावायचा अर्थ.!

In reply to by चिरोटा

संशोधन संस्थेवर हल्ला, तोंडाला काळे फासणे,कार्यालयात जावून धुडगुस घालणे,जातीचे राजकारण करून पुतळे हलवणे ह्या घटनांचा पवार/त्यांचा पक्ष लोकशाहीत कसा अर्थ लावतो? तसाच लावायचा अर्थ.! चिरोट्या तुझ्याशी सहमत हाय रे... :) त्यावर आश्चर्य व्यक्त केल्याच्या आर्विभावात-''अरे चाटा मारा...!, एकही मारा...!? असे उद्गार काढले... उपस्थित लोकं हसली हे वाचुन मी पण गदागदा हासतोय ! ;) विशेष :--- संपादकांना विशेष लक्ष द्यावा लावणारा धागा ! ;)

In reply to by मदनबाण

विशेष :--- संपादकांना विशेष लक्ष द्यावा लावणारा धागा ! >>> मदन-बाणा थांब की जरा... :-) कशाला देतोस धनुष्य फुका संपादकांच्या खांद्यावर। आंम्ही शोधतो ती मुळे सापडव्,नी मग लक्ष दे फांद्यांवर॥ ;-)

In reply to by मदनबाण

संशोधन संस्थेवर हल्ला, तोंडाला काळे फासणे,कार्यालयात जावून धुडगुस घालणे,जातीचे राजकारण करून पुतळे हलवणे ह्या घटनांचा पवार/त्यांचा पक्ष लोकशाहीत कसा अर्थ लावतो? तसाच लावायचा अर्थ.! =)) =)) =)) =)) =)) या सगळ्यामुळेच शरद पवाराना थोबाडीत मारल्याच्या घटनेचे समर्थन करावेसे वाटते... कारण "पेरावे तसे उगवते".. अर्थात शरद पवार'ऐवजी तिथे "अजित पवार" असते... तर नक्कीच फटाके फोडले असते..... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) परवा शरद पवारान्ना माननीय शिवसैनिक "मनोहर जोशी साहेबां"च्या वाढदिवस सोहळ्याला उपस्थित पाहून ...( तेही माननीय शिवचरित्रकार- ज्येष्ठ इतिहासकार श्री. बाबासाहेब पुरन्दरे यान्च्याबरोबर एकाच्च स्टेजवर ;) :) ) अम्मळ मौज वाटली..... ;) ;) ;) बाकी अण्णांची खरी प्रतिक्रिया खूपच बोलकी होती.... ;) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) आवडली.... :) _________________ "प्रकरण" कोणतेही असो...पण भ्रष्टाचाराच्या सोप्या मार्गाने आपला फायदा करून त्यातून सहीसलामतपणे शरद पवार आजपर्यन्त सुटत आलेले आहेत... "सत्य" समोर दिसत असतानाही पुराव्याअभावी कुणीही त्यान्चे काहीही बिघडवू शकलेले नाही... अगदी शरद पवारान्चे दाऊद इब्राहिम'बरोबर असलेले सम्बन्ध देखील सर्वज्ञात आहेत... काल कुठल्याश्या समारम्भात शरद पवारान्च्या डोक्यावर सीलिन्ग फॅन पडता पडता राहिला... एक फूट पलिकडे पडल्याने पवार साहेब वाचले..... बहुधा आत्माहत्या केलेल्या शेतकर्यान्चे शिव्याशाप त्यान्ना तितकेसे लागलेले नसावेत..... असो.... पण निसर्गाचे हे "दैवी" इशारे वेळीच ओळखून पवार काका-पुतण्यानी देशद्रोही कारस्थानान्ना वेळीच आवर घालावा... :)

In reply to by चिरोटा

चांगली बातमी.:) अशा घटणा घडणारच. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच जागं व्हावं!

In reply to by चिरोटा

@-पवार/त्यांचा पक्ष लोकशाहीत कसा अर्थ लावतो? तसाच लावायचा अर्थ.!... >>>चिरोटा साहेब मारणारा माणुस महागाइची कारणं आणी निव्वळ भाषणबाजी करत असल्याची कारणं सांगत होता हो...आपण लावलेला अन्वयार्थ विसंगत आहे.

काय पण 'राष्ट्रवादि' कार्यकर्ते आहेत, आता त्या हरविंदर ला फाशी च्या शिक्षेची मागनी करा म्हणाव..हाय काय नाय काय

पवारांचे नाव आले कि ह्ट्कुन एक ऐतिहासीक चरीत्र आठवते..- मिर्झा राजे जयसींग.. स्वकीय आणी स्वधर्माची धुळ्धाण करणारी व्यक्ती....

चांगलेच झाले एका अर्थी!! अवांतर- एक विनोद जालावरुन साभार- सोनिया - राहुल ,दिग्विजय ,सिब्बू ,लुंगी कुठे निघालात एकदम एव्हढ्या घाईघाईने . . . . ... . . सगळे एका सुरात - हेल्मेट आणायला ....!!!!

अजितदादा एका पत्रकार परिषदेत सांगत होते की, साहेबांना 'जसा जाता जाता एखाद्याला लागतो तसा' धक्का लागला असं साहेबांनी त्यांना सांगितलं आहे. ;;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

TOI वर या बातमीला एव्हाना १८०० कमेंट आल्या आहेत.>>>हा धागा कॉमेंट्री साठी काढला नाहीये... ;-)

प्रतिक्रिया पाहून आश्चर्य वाटले. शरद पवारांविषयी तुमचे मत काही असू दे. अशा तर्‍हेने हल्ला करणे हे चुकीचे आहे आणि त्याचा निषेधच केला पाहिजे. अण्णांची प्रतिक्रिया मीही टी.व्ही. वर पाहिली. ती त्यांना अजिबात शोभणारी नाही. अशा वागणुकीला प्रोत्साहन देऊन आपण अराजकालाच आमंत्रण देत आहोत.

In reply to by तिमा

शरद पवारांनी अण्णांना बराच त्रास दिला आहे. त्यांच्यातले वैर उघड आहे. त्यामुळे अण्णांचा उद्वेग बाहेर पडला असेल.

In reply to by तिमा

प्रतिक्रिया पाहून आश्चर्य वाटले
लोकांमध्ये प्रचंड असंतोष भरलाय. तो असा बाहेर पडणारच.
अशा तर्‍हेने हल्ला करणे हे चुकीचे आहे आणि त्याचा निषेधच केला पाहिजे
हम्म. वेनसडे मधल्या "स्ट्युपिड कॉमन मॅन"चं, "आज मे तरीके के बारेमे नही नतीजे के बारेमे सोच रहा हुं", "लोगों मे गुस्सा बहोत है, उन्हे आजमाना बंद किजिये", वगैरे आठवलं.
अशा वागणुकीला प्रोत्साहन देऊन आपण अराजकालाच आमंत्रण देत आहोत
एक झापड म्हणजे अराजक? मग मावळ गोळीबार, शेतकर्‍यांच्या आत्महत्या काय आहेत? एक राष्टीय नेता आणि गरीब शेतकरी म्हणून एव्हडी पार्श्यालिटी? :)

In reply to by दादा कोंडके

१०१% सहमत

In reply to by दादा कोंडके

ह्येच म्हणतो....

हा युवक माथेफिरू आहे हे प्रुव्ह झालेले आहेच. १) अण्णांनी मैन सोडू नये तेच योग्य आहे. नडले होते का बोलायचे? -''काय ? एकच मारली?'' २) आता घ्या ! एकापाठोपाठ शहरे बंद होत आहेत. आता कुणाचा पुतळा हटवणार? ३) रशीद साहेबाना यात बिजेपी चा हात आहे अशी शंका आहेच 'परिवारा'' वर आता कडक नजर ठेवावी लागेल.

एक सामान्य माणुस म्हणुन अण्णांची उस्फुर्तपणे येणारी प्रतिक्रिया आवडली . माझी प्रतिक्रिया : " हाण्ण तुझ्या ****** "

आम आदमी का हात एन.सी.पी. के साथ ;-) slp

माझ्या मते ही तर फक्त एक तीव्र प्रतिक्रिया आहे वाढत्या महागाईची. सरकारच्या महागाईच्या निर्ल्लज्य आकड्यांना दिलेले common man चे अगतिक उत्तर. आता फक्त एक करा.... निवडून देताना विचार करा!

झापडा मारण्यासाठी नेतेच हवे असणारा मनोरूग्ण पहिल्यांदाच पाहिला. पण शरद पवारांच्या वयाकडे पाहता त्यांना झापड खावी लागली याचा खूप खेद वाटतो. अण्णांची प्रतिक्रिया वाचुन भस्सकन हसू आले..! कशाचा अर्थ काय वगैरे चर्चा करण्यात मजा नाही. एवढी ढळढळीत झापड पाहूनही कुणाला चर्चा करायच्याच असतील तर करा बुवा.. आम्ही त्यापण वाचूच.

In reply to by यकु

च्यायला... आज काही लिहावं म्हणेपर्यंत तुम्ही सगळच आधी लिहून मोकळेही झालत. पण हो, प्रतिसादातला टोन, वगैरे वगैरे अगदि जुळलं. अण्णांची प्रतिक्रिया ऐकून(तीही त्यांनी त्यांच्या ष्टायलीत्,उच्चारात कशी म्हटली असेल ह्याचा विआचार करुन हापिसात चहा सांडून बसलोय.)

अण्णांच्या प्रतिक्रियेवर टिका होतेय , पण ति प्रत्येक सामान्य माणसाची उस्फुर्त प्रतिक्रिया आहे. मध्ये इथेच एक योग्य प्रितिक्रिया वाचलि होति ति म्हणजे अशा गुन्हेगारांची लवकरात लवकर तिहार मधे रवानगी व्हावी नाहीतर अशा अर्धवट घटनानि उगीच प्रसिध्दि आणि अनाठाई मोठेपणा मिळण्याची शक्यता वाढते. (उदा:कार्यकरत्यांनी संयम पाळावा, मि त्याला माफ केले आहे वगैरे)

या थप्पड मारण्याच्या घटनेचा जितका निषेध करू तितका कमीच आहे. लोकांमध्ये जी आनंदाची लहर उमटली आहे ती पाहून तर उद्वेग वाटतो. जणू काही फक्त राजकारणीच अकार्यक्षम, भ्रष्टाचारी वगैरे आहेत. बाकी ज्याची त्याची समज अक्कल वगैरे. चालू द्या.

In reply to by नगरीनिरंजन

शाब्दिक विरोध,आरोप एका बाजूला आणि हा लाजीरवाणा प्रकार दुसऱ्या बाजूला.परिस्थिती कशीही असली तरी या असल्या हल्ल्याचे समर्थन होत नाही. या घटनेमुळे आता अशा अनेक माथेफिरूंना खुमखुमी येऊन या प्रकारे हल्ल्यांचे प्रमाण वाढेल.(COPY CAT !) अवांतर : पवार साहेबांच्या राजकारणाचा एकंदर इतिहास पाहता, तो हरमिंदर दिल्ली/पंजाब जिथला कुठला रहिवासी असेल त्या ठिकाणच्या "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा " येणाऱ्या १-२ वर्षात अध्यक्ष झाला तर आश्चर्य वाटून घेऊ नये

In reply to by नगरीनिरंजन

ह्या बातमी वरून हरविंदरला न्यायालयाच्या आवारातच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलिये!

In reply to by दादा कोंडके

दोन्हीही हल्ल्यांचा किंबहुना कोणत्याही हल्ल्याचा निषेधच. एका हल्ल्याची बाजू घेणार्‍याचा दुसर्‍या हल्ल्याचा निषेध करण्याचा अधिकार आपोआप नष्ट होतो.

In reply to by दादा कोंडके

साहेबांचं राजकारण बघता कदाचित अजून १-२ वर्षांनी हरविंदर नावाच्या माणसाचं अस्तित्व दिल्लीतून नाहीसं होईल आणि सरकारी रेकॉर्ड्स वरून पण ;) -मालोजीराव

In reply to by मालोजीराव

आणि भर न्यायालयाच्या आवारातच मारहाण करणार्‍या त्या कार्यकर्त्यांवर कोणती कारवाई करणार? हे निष्ठावंत आणि तो माथेफिरू?

In reply to by दादा कोंडके

हे निष्ठावंत आणि तो माथेफिरू? हॅहॅहॅ... नाही नाही... हे गांधीवादी आणि तो नथुराम भक्त !

आत्ताच सकाळ वर जावून ती बातमी पहिली.बातमीखालील सगळ्या प्रतिक्रिया विकत घेवून छापल्या सारख्या वाटत आहेत.एक प्रतिक्रिया पवारांच्या विरोधात नाहीये.हेच जेव्हा लुंगीवर झाले होते तेव्हा सगळे लुंगीला दोष देत होते.(चप्पल फेक ) असो आता पवार टीवी वर म्हणत आहेत "कोई एक इन्सान ने पीछेसे मुझपर हमला किया मैने एक स्टेप आगे बढाया तो उनका हाथ यहासे ऐसे निकाल गया !(म्हणजे गालाला स्पर्श न होता) छान. थांबा थांबा .....आजतक वर जितेंद्र आव्हाड मिठाला जागत आहे (दिग्विजयची फाटली आहे)

७० वर्षांच्या माणसाला थप्पड खाताना पाहणं खूप अस्वस्थ करणारं आहे हे खरंच. पण तरीही हे बघून बहुतेक लोकांना आनंद झालेला दिसतोय. हे माननीय श्री शरच्चंद्ररावजी पवार साहेबांनी स्वत। कमावलं आहे...

झालेली घटना पटली आणि आवडली नाही. महागाई आणि तत्सम गोष्टींबद्दल सरकार, संस्था आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तींवर राग आहे, जनता वैतागली आहे वगैरे सगळे मान्य आहे आणि पटतेही आहे. पण त्याचा निषेध करण्याचा हा मार्ग नव्हे असे वाटते. एका संपुर्ण संस्थेच्या कारभाराबद्दल किंवा त्याच्या अपयशाबद्दल एखाद्या व्यक्तीवर असा हात उचलणे पटले नाही. पवारांना त्यांची चूक दाखवुन द्यायची असेल तर आता निवडणुका आहेतच, त्यावेळी त्याची चुणुक मतदानातुन दाखवता आली असती. ह्यातुन 'अराजक' आले आहे की काय असा निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही परंतु जे काही घडते आहे ते नक्कीच योग्य नाही. अवांतर १ : पवारांचे वय पाहता ह्या घटनेचे जास्तच वाईट वाटले. अवांतर २ : ह्या घटनेवर आण्णा हजारेंचे 'खरी' प्रतिक्रिया पाहुन तर अजुनच वाईट वाटले. 'गोरे इंग्रज जाऊन काळे इंग्रज आले' असे म्हणणार्‍या एका गांधीवाद्याची अशा 'हिंसक' प्रकरणावरची 'एकच मारली का?' अशी कुत्सित प्रतिक्रिया देखजनक आहे. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

अवांतर २ : ह्या घटनेवर आण्णा हजारेंचे 'खरी' प्रतिक्रिया पाहुन तर अजुनच वाईट वाटले. 'खरी' , ह्या शब्दातच सगळे आले.

In reply to by मराठी_माणूस

'खरी' ह्या शब्दातच सगळे येत नाही, तो शब्द कुठे येतो त्यात बरेच काही येते. 'खरी' याचा माझ्या वाक्यातील अर्थ 'आण्णा हजारे यांच्या मनात असलेली प्रतिक्रिया' असा आहे, ती बाकीच्यांना किती खरी अथवा किती खोटी वाटते ह्याच्याबद्दल मला बोलायचे नाही. मात्र आण्णा पटकन त्यांना जे बोलायचे आहे ते बोलुन बसले आणि नंतर मग सारवासारव चालु केली/आहे. नंतर मग जे आण्णांचे मारहाणीला समर्थन नाही हे सिद्ध करण्यासाठी जे 'शब्दांचे खेळ' चालु आहेत ते पाहुनच आम्ही पहिल्या प्रतिक्रियेला 'खरी' असे संबोधतो, असो. -छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

'एकच मारली का?' एक थप्पड आणि शेकडो शेत्कर्‍यांच्या आत्महत्या आणि त्यांची उध्वस्त कुटूंबे हे समिकरण अण्णांना पटले नसेल

बाय द वे, एखाद्या शहराचा महापौरच शहर बंद चे आवाहन करतो, तेही आपल्या पक्षाच्या मालकानी थप्पड खाल्ली म्हणून!! हद्द आहे लाळघोटेपणाची. मोहनसिंघ राजपाल अत्यंत टुक्कार महापौर आहे.

In reply to by श्रीरंग

उलट मी तर म्हणतो की उत्तम संधी आहे पुणेकरांना. असंतोष आहे ना पवार गटाबद्दल? तर मग हाणुन पाडा त्यांचा बंद. हा मार्ग जास्त संयुक्तिक नाही का?

In reply to by गणपा

बंद हाणून पाडलाच पाहिजे. पण आपण कोणत्या पदावर आहोत हे विसरून फक्त पवारांची चमचेगिरी करणारा ट दर्जाचा माणूस आज आमचा महापौर आहे याची लाज वाटते.

In reply to by श्रीरंग

तुमच्यात दम नाही काही करायचा. इथे टंकणार फक्त. जा पाहू उद्या कामावर किंवा उघडा आपले दुकान?

In reply to by यकु

आण्णा गांधीवादी आहेत.. गांधीवाद्यानी एका गालावर मारलं की दुसरा गाल पुढे करायचा असतो.. म्हणून त्यानी एकच गाल का असे विचारले असणार.

In reply to by यकु

हास्यास्पद आहे खरे! पण मला वाटते हे हिंदी बोलता येत नसल्याचा परीणाम आहे. त्यांनी नंतर केलेला खुलासा या संदर्भात सारवासारव वाटत नाही.

In reply to by विकास

हास्यास्पद आहे खरे! पण मला वाटते हे हिंदी बोलता येत नसल्याचा परीणाम आहे.
नाही, नाही.. हा हिंदी न येण्याचा प्रकार नाही... ही सारवासारव अण्णांनी पश्चातबुद्धीनं केली आहे; कारण फक्त तेवढीच प्रतिक्रिया देऊन, लोकांचं हसू वसूल करुन अण्णा कॅमेर्‍यासमोरुन उठून आत निघून गेले. दुसरी प्रतिक्रिया नंतरची. बाकी अण्णाचं हिंदी किती पक्कं आहे याचा दाखला इथे दिलेल्या दुसर्‍या व्हिडिओमध्येच मिळतो. ते म्हणतात 'मै समझ सकता हूं.. आज भ्रष्टाचार से लोक बाज आ गये है..' http://ibnlokmat.tv/showvideo.php?id=205622

In reply to by वसईचे किल्लेदार

महागाईने सामान्य माणसाचा प्रक्षोभ झाला तर त्याला मानसिक रुग्ण ठरवायला पण तुम्ही लोकं कमी नाही करत. तरिही वयस्कर व्यक्तीवर हाथ उगारणे अयोग्य पण आता सामान्य माणसाच्या पेशन्स हा स्टेक वर आहे

In reply to by वाहीदा

अगदी अगदी जे झाले त्याच्या परीणामांचे काय ... ह्याचा परीणाम काय होईल (कुणावर होईल) एव्ह्ढाच काय तो प्रश्न!

मावळ मधे शेतकर्यांवर गोळीबार करताना यांना अहिंसा आठवली नाही.. आणि तेव्हा रास्ता रोको करणर्या वर कारवाइ केलि आता चुप चाप बसले... हा उद्रेक अहे. ... भाषण देणे सोपे असते परंतु व्यवस्थे विरुद्ध लढने अवघड...कारण सत्ता नितीमता पाळत नहिये.. लोकांचे कसे असते ना, लवासा , मावळ झाले कि यांचा निषेध आणी यांना हाणले कि त्यांचा निषेध... प्रतेक जण संयमी विवेकी नसतो.. आणि असला तरी् "डोंबिवली फास्ट" होतो हो कधी तरी

या घटनेचे वेगवेगळे अन्वयार्थ निघू शकतील. वर यशवंत एकनाथांनी म्हणल्याप्रमाणे खेद वाटला. मात्र असा खेद आणण्यासारखी परीस्थिती आणण्याचे पितृत्व हे पवार आणि तत्सम राजकारण्यांकडे आहे असेच वाटते. आज भारतात "मध्यम वर्ग आणि वर" अशा जनतेचे सुदैवाने चांगले चालले असले तरी बाकी परिस्थिती भिषण आहे असे वाटते. (अमेरीकेत पण असेच आहे). जर याकडे सामायीक दॄष्टीने पाहीले नाही तर भडका कधीही उडू शकेल...आणि त्यात केवळ राजकारणीच पोळणार नाहीत. मराठीत म्हण आहे: "सुक्या बरोबर ओलेही जळते..." या संदर्भात आयबीएन वरील चित्रफीत बराच इतिहास सांगते. कदाचीत एखादी थप्पड-चप्पल ही राजकीय नेतृत्वाच्या बायोडेटाचा भाग झाला तरी आश्चर्य वाटणार नाही.

महागाई आणि तत्सम गोष्टींबद्दल सरकार, संस्था आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तींवर राग आहे, जनता वैतागली आहे वगैरे सगळे मान्य आहे आणि पटतेही आहे, परन्तु हे थप्पड प्रकरण म्हणजे नाटक जास्त वाटते.ज्याने ती मारली,त्याने असा पराक्रम अगोदरपण केला आहे. म्हणजे तो सरावलेला राजकिय कार्यकर्ता असावा. जेव्हापासुन जार्ज बुश याना बुट फेकुन मारला,तेव्हापासुन सवग लोकप्रियतेची जणु लाट्च आली आहे. ह्या घटनेवर आण्णा हजारेंची प्रतिक्रिया पाहुन त्यानच्या प्रतीमेशी विसन्ग्त असे वाटत आहे. त्यानची लोकप्रियता जशी अचानक वर गेली तशी कमीही होवु शकते. खर मुद्दा वाढती महागाइचा , वाढती लोकसन्ख्या, कमी होणारे शेती क्षेत्र ( शहरीकरण), वाढते प्रदुषण( वाढ्ती कार्/बाइक इ.वाहणे) मा़झ्या मते आहेत. त्याला जबाबदार आतापर्यतची सरकारे व आपण सुद्धा आहोत. पुर्वी चन्गळपणा कमी होता. तो आता वाढलाय.२०-२५ आगामी वर्षात जेव्हा कोळसा,पेट्रोल, गॅस इ कमी होतील्,तेव्हा वाढती ट्चाइ, महागाई कोणाला जबाबदार धराल ? आणी ती कोण रोखु शकेल. लक्षात घ्या, आगामी काळात धनधान्याच्या किमती ह्या कमी होणार नाहीत ( वाढती लोकसन्ख्या, कमी होणारे शेती क्षेत्र ), आणी याचे नियोजन कोणी करावे. १०००० ते २००० वर्षापुर्वी पर्यत जगाची लोकसन्ख्या हि प्रमाणात होती. त्याला दुष्काळ, रोगराइ,लढाया ही ( काही प्रमाणात निसर्ग निर्मीत ) कारणे होती. आता मानवाच्या प्रगती मुळे ही कारणे कमी झाली, परन्तु जेव्हा याचा विस्फोट होइल तेव्हा निसर्गाची थप्पड कोणा एकाला पडणार काय?

टॉपिक काढणारा आणि इतर एकच मत नोंदवतो टी वी च्या चॅनेलमुळे बरीच माहिती कानावर आदळते पण त्या माहितीच्या रद्दीला ज्ञान समजू नये आपण कोणत्या विषयावर विचार करायचा, कोणत्या विषयावर गप्पा मारायच्या दुपारच्या टायमाला डबा खाताना कोणत्या विषयाची चर्चा करायची हेही टीवीच ठरवतो आपलं डोकं टीव्हीकडे देऊ नका, टीव्हीचे व्यसन सोडा

In reply to by आशु जोग

आपलं डोकं टीव्हीकडे देऊ नका, टीव्हीचे व्यसन सोडा.... >>> अनाहुत सल्ल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे... माहीतीच्या रद्दीतुन नेमका प्रश्न काय विचारलाय हेच आपणास कळ्लेले नाही....त्यामुळे अता आणखी स्पष्टीकरण काय देणार...तुमच्यापुढे आमचा णाविलाज

काही पत्रकारांना अशा वेळी काय बोलावे खरच सुचत नाही. मनातलं बोलता येत नाही मग गोलमाल गोलमाल बोलत बसतात. इतर वेळी पोटासाठी जिसका खंबा उसकी लाल याप्रकारे पाल्हाळीक व न पटणारी बाजू घेउन बोलत बसतात

एक गंमत वाटते...निवडणुका आल्यावर अशा थपडा खाण्याच्या लायकीच्या लोकांनाच का निवडुन देतात?