Skip to main content

संघ आणि सिमी सारखेच : भावी पंतप्रधान राहुलजी यांच्रे परखड बोल

लेखक हुप्प्या यांनी बुधवार, 06/10/2010 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या एकमेव राजघराण्यातील एकमेव राजपुत्र, युवराज माननीय श्री. राहुलजी गांधी यांनी असे म्हटले आहे की रा. स्व संघ आणि सिमी यात फार फरक नाही. http://72.78.249.125/esakal/20101006/4905023441473910304.htm हे विचार मननीय आहेत. उद्या नाहीतर परवा सध्याची जुनी खोडे हटवून नव्या रक्ताचे, सळसळत्या उत्साहाचे, गोरेपान उमदे, तरणेबांड राजपुत्र ज्यांनी मातेच्या गर्भात असल्यापासून राजकारणाचे बाळकडू प्यायले आहे असे अभिमन्यू देशाचे सुकाणू आपल्या हाती घेऊन ह्या देशाचे भरकटलेले तारू इप्सित स्थळी नेऊन पोचवणारच. सिमी ही बेकायदा संघटना आहे. तिच्यावर कायद्याने बंदी आहे. युवराज राहुलजी रा, स्व, संघावर लगेचच बंदी घालतील का देशाचा लगाम हातात घेतल्यावर तो विचार करतील? आपणास काय वाटते? सोनियाजी आणि राहुलजी यांनी मिळून देशाला, त्यातही हिंदूंना एक अमूल्य भेट दिलेली आहे ती म्हणजे अयोध्येच्या वादग्रस्त स्थळी काही भागावर राममंदीर बांधायची अनुमती. इतकी मोलाची भेट दिल्यावर त्या बदल्यात अन्य विरोधी गटांचे समाधान करण्याकरता संघावर बंदी घातली तर काय हरकत आहे? त्यामुळे जगभर भारताचे नाव पुरोगामी, निधर्मी म्हणून प्रसिद्ध पावेल. आपणास काय वाटते? ह्या बातमीच्या प्रतिक्रिया वाचून धक्का बसला. युवराजांविरुद्ध जे गरळ ओकले गेले आहे ते बघता सकाळच्या संपादकांनी अशा प्रकारच्या बातम्यांवर प्रतिक्रिया लिहायला बंदी घालावी अस वाटते. राहुलजी हे लवकरच पंतप्रधानपदावर आरूढ होणार आहेत एवढेही ह्या लोकांना कळत कसे नाही? असो.

वाचने 42998
प्रतिक्रिया 126

प्रतिक्रिया

In reply to by गुंडोपंत

उद्या भावी संपादक म्हणतील, मिसळभोक्ता आणि गुंडोपंत सारखेच! ते तसे म्हणणे अवघड आहे. मिभो अभ्यासू आहेत. मिभोना लिहिण्याची जाण आहे ;)

In reply to by मिसळभोक्ता

सध्या भारताला केवळ "भावी" पंतप्रधानच आहेत. बाकी देश "अभावी" पंतप्रधानावर चालतोय असे वाटते. (असे म्हणताना मनमोहनसिंग यांच्या कार्यक्षमतेबद्दल तिळमात्र शंका नाही. फक्त जे पंतप्रधान म्हणतात की पक्षश्रेष्ठी/सोनीयाजी म्हणतील तेंव्हा पद मोकळे सोडेन तेंव्हा ते नक्की किती पंतप्रधान आहेत यावर शंका निश्चित येते).

माननीय श्री. राहुलजी गांधी जीसाहेब बरोबर बोलले आहेत. एक वेळ सिमी चालेल पण आरएसएस नको असला पाहिजे. लक्षात घ्या सिमी मूलता: जवान लोकांना एकत्र आणण्यासाठी स्थापन झालेली संघटना होती. पण पुढे सगळे चुकत गेले. आणि आता आरएसएस व सिमी यात फार फरक नाही हे सत्यच आहे. आरएसएसला इस्लामी भारताचा गौरवशाली इतिहास कितीही प्रयत्न केला तरी पुसता येणार नाही आणि सिमीला किती प्रयत्न केला तरी आजचा भारत बदलता येणार नाही हे सत्य आहे! फक्त राहुलजीसाहेब च ही बात समजले आहेत. ते जे बोलले ते बरोबर आहे.

In reply to by गुंडोपंत

एक वेळ चालेल असे म्हंटले मी. आधी वाचा काय लिहिले ते. खुदा करम करे दिल का मैल धुलाये!

In reply to by आंसमा शख्स

संघाचे काय कार्य आहे, ते तरी माहिती आहे का रे तुम्हाला? उगाच कशाला काहीही बरळता? मैल म्हणे! कोणता मैल रे? तुमचा देशद्रोही मैल काढा म्हणा आधी मग बोला.

In reply to by गुंडोपंत

रास एस एस चे काम कोणाला माहिती नाही? चुकिचा इतिहास लिहायचा. तो खरा म्हणून खपवायचा. एका मोठ्या शांततावादी समुदायाला शत्रु म्हणून दाखवण्याचे चांगले काम केले ना? त्याच्या इतकी दुफळी माजवायचे काम कुणी केले आहे का भारतात?

In reply to by आंसमा शख्स

खरे बोल आल्यावर त्रास होतो हेच खरे. तुम्ही लक्ष देउ नका हो आसमा तै. भारत हा दहशतवादी देश आहे असे पाकिस्तान नावाचा एक शांतताप्रिय देश म्हणतो तेव्हा त्यांना अश्याच मिरच्या झोंबतात. हे असले दुटप्पी लोक संघात भरपुर भरले आहेत आणि. लहान लहान मुलांना मैदानावर बोलावुन संस्कृती, धर्म, आचरण अश्या गोष्टी शिकवतात हे नालायके संघी लोक. आणी केवढे हिंसक तरी लाठ्यांचा पुरस्कार करतात. सगळे साले एकजात दहशतवादी. आणी तोंड वर करुन सिमीला नावे ठेवतात. आणि संघापेक्षा सिमी खरोखर चांगले. लोक याहुन वेगळा विचार करत असतील तर मुर्ख आहेत देशद्रोही आहेत. संघी साले देशाच्या जीवावर उठले, सार्वभौमत्वावर हल्ल करु पाहत आहेत. सिमीवाले गरीब बिचारे कोलेजिअन्स आहेत. देशासाठी काहितरी करु पाहणारे सळसळणारे रक्त आहि. निरपराध, सोज्ज्वळ, सज्जन, निरागस लोक आहेत ते. संपादक मंडळ उगाच अश्या साध्या सरळ संघटनेवर टीकेची राळ उडवणार्‍या लोकांवर कारवाई करेल अशी आशा आहे

In reply to by आंसमा शख्स

मुस्लीम हा शांततावादी समुदाय असू शकतो, पण सिमी नाही.. बाकी मनुष्यावर जसे संस्कार होतात तशीच त्याची मते बनतात हे तुमचे प्रतिसाद पाहिल्यास लक्षात येते.. दोष तुमचा नाही.. बाकी चालू द्या..

In reply to by आंसमा शख्स

एका मोठ्या शांततावादी समुदायाला शत्रु म्हणून दाखवण्याचे चांगले काम केले ना? या सारखा मोठा विनोद दुसरा असुच शकत नाहि......मिपा धन्य झाली म्हणा!

In reply to by आंसमा शख्स

आरएसएस ने गेल्या ६० वर्षांत भारतासाठी काय केलं किंवा नाही हा मुद्दा बाजुला ठेवुन तुम्ही सांगा ना कि सिमी ने काय दिवे लावलेत.

In reply to by आंसमा शख्स

इस्लामी भारताचा गौरवशाली इतिहास मिपा वर सर्वोत्क्रूष्ट विनाओदाचे पारितोषीक असेल तर देऊन टाका ह्यांना...

In reply to by आंसमा शख्स

आरएसएसला इस्लामी भारताचा गौरवशाली इतिहास कितीही प्रयत्न केला तरी पुसता येणार नाही आणि सिमीला किती प्रयत्न केला तरी आजचा भारत बदलता येणार नाही हे सत्य आहे! खुप हसलो..इस्लामी भारत वाचून डोळे पाणावले (हसण्याचा अतिरेक)..

In reply to by आंसमा शख्स

तुमच्या सारख्या मुस्लीमांचे आणि मिपावरच्या बराचश्या हिंदुंचे अविवेकी विचार ऐकुन/वाचुन खेद वाटतो. हा धार्मीक संघर्ष खरच अटळ आहे का? सध्या तरी परिस्थिती फार आशादायक नाहिये... काँग्रेसने मुस्लीमांना अनेक दशके केवळ वापरुन घेतले... पण अजुन देखील त्यांचा कावा ओळखायला मुस्लीम लोक तयार नाहित. खैर... बघु... (आशावादी) अर्धवटराव

अहो यदा यदा ही गीतेतील श्लोक झाला. मी कुठे म्हणले आहे की हा गीतेतील श्लोक आहे म्हणून? आणि शेवटी आम्ही एका सुजाण राजकारण्या बद्दल बोलत असताना शुध्द लेखन कडे कसले लक्ष देता?

आंसमा शख्स, आहो बाई की बापू, आपले अकलेचे तारे तोडू नका. तुम्ही कधी आरएसएस च्या शाखेवर गेला आहात का. जा आणि तासाभराच्या शाखेतच आपल्याला कळून येईल की सिमि आणि आरएसएस मधे काय फरक आहे तो.

In reply to by हंस

माझ्या लेखनाने गैरसमज झाला आहे. सिमि ही संघटना वाईट आहेच. मला त्या देशद्रोही लोकांची भलामण करायची नाहीच! जे कुणी माझ्या भारताच्या विरुद्ध ते माझेही दुष्मन आहेत. त्यात टेररिस्ट तर सर्वात वाईट जमात आहे. या जमातीने कोणत्याही कौमचा आव आण्ला तरी ते शेवट वाईटच - कारण ते सामन्य माणसाच्या जीवावर उठले आहेत. मग हा अतिरेकीवाद छुपा किंवा उघड कसाही असला तरी अर्थ तोच असतो. छुपा दहशतवाद कधी तरी गुजरात मध्ये उघड होतो. आणि उघड टेररिस्म सी एसटीवर. कसाबला कसला धर्म आहे? तो फक्त कसाई आहे. त्याने सीएसटीवर जे केले त्याचे समर्थन होऊ शकत नाही. त्यात सर्व धर्मांचे लोक मरण पावले आहेत. मुस्लीम भारत हा गौरवशाली होताच. नाकारता का? या प्रदेशावर कुणी हमला करायची हिम्मतही करू शकत नव्ह्ता. इतका मोठा प्रदेश एका अंमलाखाली होता, त्याला एक प्रकारची शासन व्यवस्था होती. यामुळे सामान्य लोकांनाच हे हवे होते. जर ही व्यवस्था चालत नसती तर भारत इतका काळ कशाला यात राहता? सगळ्या भारतातून मुघल सल्तनतीला बळ मिळत होते म्हणून तर हे शासन टिकले. जेंव्हा शासक मुजोर झाले रयतेच्या विरुद्ध गेले तेव्हा राज्य संपले.

In reply to by आंसमा शख्स

आंसमा तै/दादा/काका/मौशी (काय जे काही असेल ते) मुस्लीम भारत हा गौरवशाली होताच. नाकारता का? या प्रदेशावर कुणी हमला करायची हिम्मतही करू शकत नव्ह्ता. इतका मोठा प्रदेश एका अंमलाखाली होता, त्याला एक प्रकारची शासन व्यवस्था होती. यामुळे सामान्य लोकांनाच हे हवे होते. जर ही व्यवस्था चालत नसती तर भारत इतका काळ कशाला यात राहता? सगळ्या भारतातून मुघल सल्तनतीला बळ मिळत होते म्हणून तर हे शासन टिकले. आपला वरील परिच्छेद अंमळ चुकीचा आहे. (बरेचसे / काहीसे बरोबर आले तरी.) भारत (किंवा कोणताही देश) नेहमीच गौरवशाली होता/आहे. गौरव करणारे नेहमीच असतात. दुसरे वाक्य चुकीचेच. मुसलमानी अंमलात भारतावर अनेक हमले झाले, आतून आणि बाहेरून. म्हणजेच, हिम्मत अनेकांनी केली, शक्य झाले नाही, हे निराळे. पूर्ण प्रदेश एका अंमलाखाली नव्हता. एका महाराष्ट्रातच ३-४ वेगवेगळे अंमल होते. मुघल सुल्तानीचे बळ मिळाले, पण वेगळ्या कारणासाठी. सरकार हे लोकांपेक्षा वेगळे राहू शकते, हे लोकांना कळले.

In reply to by आंसमा शख्स

एकटे मुघल शासक समृद्ध हिंदुस्थानवर शासन होते तर मग कुतुबशहा,आदिलशहा,निजामशहा हे मोगलांची धुणी धुत होते का आंसमाजी?

संघ आणि अतिरेकी ? आम्ही तर लहानपणापासून एकच घोषवाक्य ऐकून आहोत, 'संघ दक्ष भलतीकडे लक्ष!

In reply to by तिमा

'संघ दक्ष भलतीकडे लक्ष! फारच मोघम बॉ तुम्ही! आम्ही, 'संघ दक्ष पोरींकडे लक्ष!, असे वाक्य ऐकले होते! बाकी चालू द्या! (पुन्हा झाडावर) सुनील

In reply to by सुनील

७०-८० च्या दशकात केव्हातरी एकदा, स्वातंत्र्याच्या २५/३०/३५ वर्षांच्या निमीत्ताने पु. लंनी एक लेख लिहीला होता, त्यात स्वातंत्रपूर्व काळ, गांधीजींची 'चले जाव' चळचळ, त्यावेळचे भारून गेलेले वातावरण ह्यांविषयी त्यांच्या स्वतःच्या आठवणी त्यांनी लिहील्या होत्या. त्यातील एक मला लख्खपणे आठवते, ती इथे लिहीत आहे (आठवणींतून, लेख आता माझ्या समोर नाही). ४२ साली मुंबईत हिंदू-मुस्लिमांचे दंगे होत होते, ते खरे तर दक्षिण मुंबईत, उपनगरात नव्हे. पण संघाची दक्ष ब्रिगेड सगळीकडे कामाला लागली. पु. ल. रहायचे पूर्व पार्ल्यात. एका रात्री काँग्रेसने पार्ले- पश्चिम येथे आयोजित केलेल्या सभेस हजर राहून ते आपल्या मित्रांसकट घरी परतत होते. पूर्वेस मुख्य रस्ता सोडून ते आपल्या गल्लीत वळले, तेव्हा पहिल्याच छोट्या बंगल्याच्या गच्चीवरून, अंधारातून लाठ्या आपटण्याचा आवाज आला, नंतर कुणीतरी अंधारातच विचारले "कोण आहे? शत्रू की मित्र?" हे कोण असावे हे पु.लंनी तात्काळ ओळखले, आणी इथे थोडी गंमत करायची त्यांना हुक्की आली. "शत्रू" ते उत्तरले. मग... काळोखात दोन-तीन क्षण शांतता, आणि त्यानंतर गच्चीवरून उत्तर आले " जा SSSSSSSSS" !

भा.पं. राहुल आणि स्वं. इंदिराजी ह्यांच्यातच असं साम्य आहे कि ह्या दोघांनाही प्रत्येक गोष्टीत संघाचा हात आहे असंच दिसतं. संजय झाला तेव्हाही असंच काहीतरी वक्तव्य केलं होतं म्हणे बाईंनी.

In reply to by नाना बेरके

संजय झाला आता संजयच्या होण्यातही संघाचा हात होता की काय? आणि हात ही तर काँग्रेसची निशाणी. संघाच्या हाताने कशी काय अशी कामे व्हायला लागले ब्वॉ?

In reply to by नितिन थत्ते

आपण जेष्ठ आणि अभ्यासु व्यक्ती आहात. पण या देशात आपल्या सारखे विचार करु शकणारे लोक देखील केवळ भारतीय म्हणुन पक्ष-निरपेक्ष दृष्टीकोन बाळगण्यापेक्षा रंगीत चश्मे लावुन हवे तेच आणि त्याच रंगात बघायला जाता... मग बाकी अडाण्यांनी तसं केलं तर काय चुकलं... (अडाणी) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

मग बाकी अडाण्यांनी तसं केलं तर काय चुकलं... या प्रतिसादातून राहूल गांधींना अडाणी म्हणले गेले आहे. त्याचा मी निषेध करू इच्छितो. ;)

In reply to by अर्धवटराव

संघाच्या वर्तुळात अशा पातळीवरची चर्चा दुसर्‍या स्वातंत्र्याच्या आधीच्या आणीबाणीच्या आधीपासून ऐकली आहे. :( उलट ७० प्रतिसादापर्यंत चर्चा बरीच सोबर राहिल्याने बरे वाटले होते. :) तोपर्यंत मी काही म्हटलेही नव्हते.

In reply to by नितिन थत्ते

चर्चा संघाला साजेशा पातळीवर जाऊ लागली आहे. संघाने नक्की अशी पातळी कधी दाखवली ते माहीत नाही, पण बातमी आणि त्यातील राहूल गांधींचे वक्तव्य मात्र काँग्रेसच्या पातळीचे पहील्यापासूनच आहे, असे दिसतयं. :-)

In reply to by नितिन थत्ते

संजय गांधींच्या जन्मामागे संघाचा हात असण्याचा विनोद हा काही लोकांना आवडेल तर काहींना तो अभिरुचीहीन वाटेल. इंदिरा गांधी काही काळ प्रत्येक गोष्टीकरता संघाला दोष देत होती त्यावर हा अतिरंजीत विनोद/भाष्य आहे. परंतु ह्या विनोदावरुन थेट संघावर घसरणे कितपत योग्य आहे? संघाच्या मूलभूत विचारात विरोधकांच्या संततीच्या जन्माविषयी शंका उत्पन्न करा असा काही आदेश आहे का? माझ्या माहितीत तरी तसे काही नाही. जेम्स लेनने शिवाजीच्या जन्मावरुन एक अभिरुचीहीन विनोद केला होता. त्यावरुन ब्रिगेड वगैरे गावगुंड संघटनांनी तमाम ब्राह्मण जातीला वेठीस धरले होते. त्यात आणि वरील विधानामागे तीच वृत्ती दिसून येते. कुण्या एकाच्या वा काही मूठभर लोकांच्या विनोदामुळे सगळ्या संघटनेला जबाबदार ठरवणे.

In reply to by हुप्प्या

जेव्हा संघात मूठभरच लोक होते तेव्हा मूठभर लोक असे विनोद करीत असतील तर काय समजायचे? [एका किंवा काहींच्या कृत्याबद्दल संपूर्ण गटाला जवाबदार धरायचे नाही हे संघीय कधीपासून मानू लागले?] असो. बाकी तुम्चे जे चालू आहे ते चालू द्या. मी फक्त पातळीकडे निर्देश केला.

In reply to by नितिन थत्ते

जेव्हा संघात मूठभरच लोक होते तेव्हा मूठभर लोक असे विनोद करीत असतील तर काय समजायचे? संघ आणि मुठीचे फार पूर्वीपासून नाते आहे, असेच समजायचे. असो, जिला एका संघिष्ठानेच दुर्गा असे संबोधले, तिच्यावर असे हीन पातळीवरून विनोद करणे, हा हिंदु धर्माचा अपमान आहे, असे कुणाला वाटले नाही का ? की फक्त देवी/स्त्री आहे म्हणून फेअर टार्गेट ?

In reply to by मिसळभोक्ता

केवळ कुण्या एका संघिष्टाने त्या स्त्रीला दुर्गा म्हटले म्हणून तमाम संघ स्वयंसेवकांनीही तिला दुर्गेइतकेच देवतुल्य मानावे हे तर्कट कसे बनवले? त्याच पद्धतीने विचार केला तर, इंदिरा गांधीने १९७७ च्या सुमारास आंध्रमधे मोठे चक्रीवादळ आले होते तेव्हा संघाने केलेल्या कामाची स्तुती केली होती याचा अर्थ तमाम काँग्रेसवाले (ज्यात आजचे युवराज राहुलजीही येतात) संघाची स्तुती करतात असा होतो का?

In reply to by हुप्प्या

हा "केवळ कुणी" संघिष्ठ नंतर पंतप्रधान बनला. आणि, हो. संघवाले सारखे मोरवी-मोरवी जपत असतात, ह्याचे कारण तुम्हाला कळले तर शेवटी.

In reply to by मिसळभोक्ता

हा माणूस पंतप्रधान झाला म्हणून काय आटोम्याटिकली याचे सगळे विचार हे संघिष्टांचे विचार झाले? हे काय त्रांगडे आहे? म्हणजे संसदेवर हल्ला झाल्यावर षंढासारखी भाषणे देणे, विमान अपहरण केल्यावर त्याबदल्यात अतिरेकी सोडून देणे आणि त्याविरुद्ध काहीही कारवाई न करणे, हाजच्या यात्रेची सबसिडी घसघशीत रकमेने वाढवणे हे सगळे संघाचे विचार प्रदर्शित करतात का? वाजपेयी हा पंतप्रधान बनला हे भाजपचे आणि देशाचे दुर्दैव. तो संघाची पताका खांद्यावर मिरवतो असा लोकांचा समज असेल तर ते संघाचे मोठेच दुर्दैव. मलातरी तसे वाटत नाही.

In reply to by हुप्प्या

वाजपेयी हा पंतप्रधान बनला हे भाजपचे आणि देशाचे दुर्दैव. तो संघाची पताका खांद्यावर मिरवतो असा लोकांचा समज असेल तर ते संघाचे मोठेच दुर्दैव. मलातरी तसे वाटत नाही. रेशीमबागेत बाजपेयी पंतप्रधान झाल्यावर फटाके फुटले होते. तुम्ही कदाचित संघिष्ठांना दुरून पहात असाल. मी जवळून पाहतो.

In reply to by नितिन थत्ते

>>[एका किंवा काहींच्या कृत्याबद्दल संपूर्ण गटाला जवाबदार धरायचे नाही हे संघीय कधीपासून मानू लागले?] संघीय लोक पूर्वी तसे मानत नव्हते आणि आताच मानू लागले असे आपण का आणि कसे ठरवले?

In reply to by नितिन थत्ते

जेव्हा संघात मूठभरच लोक होते तेव्हा मूठभर लोक असे विनोद करीत असतील तर काय समजायचे? जरा विस्ताराने लिहीलेत तर बरे होईल समजायला. (संभ्रमीत) चिंतामणी

In reply to by हुप्प्या

केवळ संजयच नव्हे तर, इतरही काहींच्या जन्माबद्द्लच्या अभिरुचीहीन "कुजबुजा" मी पूर्वीपासून ऐकल्या आहेत. त्यामुळे, चर्चा ह्या वळणावर आली, याचे आश्चर्य वाटत नाही!

संजय झाला तेव्हाही असंच काहीतरी वक्तव्य केलं होतं म्हणे बाईंनी

शतक झाले आहे. आता याची जरूरी आहे. From Drop Box" alt="" /> ज्यांना पाहीजे असेल त्यांनी ऑर्डर नोंदवा.

हे त्याचे स्वःताचे असतीलच असे नाही. कारण त्याना भाषण लिहुन देणारे इतर लोक असतात.पण जी तुलना त्याने केली आहे ती खुपशी चुकीची आहे. आंसमाबाई/बाप्या हे मगदुम साहेबाचा दुसरा आयडी वाटतो. त्याना संघशाखेत पाठवण्यापेक्षा इतर क्षेत्रातल्या तज्ञांची खुप गरज आहे.

मुस्लिम आणि उच्चवर्णीय असे राजकीय समीकरण जुळवून उत्तर प्रदेश व बिहारमध्ये कॉंग्रेसला शक्ती मिळवून देण्याचे राहुल गांधी यांचे प्रयत्न सुरू आहेत. भावी पंतप्रधान सध्या बिझी आहेत. तर मुलांनो, कॉंग्रेसला शक्ती कुठून मिळते सांगा बरे ? ज्याला माहित आहे त्याने हात वर करा.

बालिश विधान की रणनीती? .......""संघ आणि सिमी एकाच नाण्याच्या दोन बाजू असतील, तर केंद्र सरकारने सिमीवर बंदी घालून नऊ वर्षे झाली, तशी संघावर बंदी का घातली जात नाही,'' .......आम्हाला पोट महत्त्वाचे... संघ आणि सिमी यांची तुलना हा राजकीय नेत्यांसाठी नवा वादाचा विषय असेल. आम्हाला मात्र त्यात काहीच रस नाही. आज सामान्यांसाठी जगणे महत्त्वाचे आहे. आम्हाला त्याच्याशी काही देणे घेणे नाही. असे वाद उकरण्यापेक्षा गरिबांचा विचार केला तर बरे. - सुरेश देवरे, सामान्य गांधीवादी