संघ आणि सिमी सारखेच : भावी पंतप्रधान राहुलजी यांच्रे परखड बोल
भारताच्या एकमेव राजघराण्यातील एकमेव राजपुत्र, युवराज माननीय श्री. राहुलजी गांधी यांनी असे म्हटले आहे की रा. स्व संघ आणि सिमी यात फार फरक नाही.
http://72.78.249.125/esakal/20101006/4905023441473910304.htm
हे विचार मननीय आहेत. उद्या नाहीतर परवा सध्याची जुनी खोडे हटवून नव्या रक्ताचे, सळसळत्या उत्साहाचे, गोरेपान उमदे, तरणेबांड राजपुत्र ज्यांनी मातेच्या गर्भात असल्यापासून राजकारणाचे बाळकडू प्यायले आहे असे अभिमन्यू देशाचे सुकाणू आपल्या हाती घेऊन ह्या देशाचे भरकटलेले तारू इप्सित स्थळी नेऊन पोचवणारच.
सिमी ही बेकायदा संघटना आहे. तिच्यावर कायद्याने बंदी आहे. युवराज राहुलजी रा, स्व, संघावर लगेचच बंदी घालतील का देशाचा लगाम हातात घेतल्यावर तो विचार करतील? आपणास काय वाटते? सोनियाजी आणि राहुलजी यांनी मिळून देशाला, त्यातही हिंदूंना एक अमूल्य भेट दिलेली आहे ती म्हणजे अयोध्येच्या वादग्रस्त स्थळी काही भागावर राममंदीर बांधायची अनुमती. इतकी मोलाची भेट दिल्यावर त्या बदल्यात अन्य विरोधी गटांचे समाधान करण्याकरता संघावर बंदी घातली तर काय हरकत आहे?
त्यामुळे जगभर भारताचे नाव पुरोगामी, निधर्मी म्हणून प्रसिद्ध पावेल.
आपणास काय वाटते?
ह्या बातमीच्या प्रतिक्रिया वाचून धक्का बसला. युवराजांविरुद्ध जे गरळ ओकले गेले आहे ते बघता सकाळच्या संपादकांनी अशा प्रकारच्या बातम्यांवर प्रतिक्रिया लिहायला बंदी घालावी अस वाटते.
राहुलजी हे लवकरच पंतप्रधानपदावर आरूढ होणार आहेत एवढेही ह्या लोकांना कळत कसे नाही? असो.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हाहा!
हाण्ण
नाही
हाहाहाहा
तो काय हो
छ्या...
ते खरेच
उदाहरणार्थ
राहूल का राउल ?
हाहाहाहा
मार
हो का?
ओ!
काळजी करू नका
चला ट्विस्ट करू!!!
मागे एकदा सेवादलाबद्दल तिथे तरुणांची लग्ने जुळत असे ऐकले होते.
फालतू
भावी
अरेरे
भावी
उद्या भावी संपादक म्हणतील,
सध्या
+१००
योग्य
एक वेळ सिमी चालेल ?
चालेल
अरे
जाणतो
माझ्या कडून
जैसी मर्जी
खरे बोल आल्यावर त्रास होतो
+१
हा मॅन्युफॅक्चर्ड डिफेक्ट आहे का?
एका मोठ्या शांततावादी
एका मोठ्या शांततावादी
आमच्या तुकाराम महाराजांनी म्हणले आहे...
एक वेळ सिमी चालेल पण आरएसएस नको असला पाहिजे
>इस्लामी भारताचा गौरवशाली
हसुन हसुन ठार झालो...
हॅ हॅ हॅ
अटळ संघर्ष !!
होय यथा यथा च
आंसमा शख्स, आहो बाई की बापू,
सिमि
+१
एकटे मुघल शासक समृद्ध
आम्हि तर नरेन भाई मोदी पंत
नॉय बा.... सुरेश जी कलमाडी च
आम्हाला तर अबु आझमीच हवा
वेगळीच