७०-८० च्या दशकात केव्हातरी एकदा, स्वातंत्र्याच्या २५/३०/३५ वर्षांच्या निमीत्ताने पु. लंनी एक लेख लिहीला होता, त्यात स्वातंत्रपूर्व काळ, गांधीजींची 'चले जाव' चळचळ, त्यावेळचे भारून गेलेले वातावरण ह्यांविषयी त्यांच्या स्वतःच्या आठवणी त्यांनी लिहील्या होत्या. त्यातील एक मला लख्खपणे आठवते, ती इथे लिहीत आहे (आठवणींतून, लेख आता माझ्या समोर नाही).
४२ साली मुंबईत हिंदू-मुस्लिमांचे दंगे होत होते, ते खरे तर दक्षिण मुंबईत, उपनगरात नव्हे. पण संघाची दक्ष ब्रिगेड सगळीकडे कामाला लागली. पु. ल. रहायचे पूर्व पार्ल्यात. एका रात्री काँग्रेसने पार्ले- पश्चिम येथे आयोजित केलेल्या सभेस हजर राहून ते आपल्या मित्रांसकट घरी परतत होते. पूर्वेस मुख्य रस्ता सोडून ते आपल्या गल्लीत वळले, तेव्हा पहिल्याच छोट्या बंगल्याच्या गच्चीवरून, अंधारातून लाठ्या आपटण्याचा आवाज आला, नंतर कुणीतरी अंधारातच विचारले "कोण आहे? शत्रू की मित्र?" हे कोण असावे हे पु.लंनी तात्काळ ओळखले, आणी इथे थोडी गंमत करायची त्यांना हुक्की आली. "शत्रू" ते उत्तरले. मग... काळोखात दोन-तीन क्षण शांतता, आणि त्यानंतर गच्चीवरून उत्तर आले " जा SSSSSSSSS" !
भा.पं. राहुल आणि स्वं. इंदिराजी ह्यांच्यातच असं साम्य आहे कि ह्या दोघांनाही प्रत्येक गोष्टीत संघाचा हात आहे असंच दिसतं. संजय झाला तेव्हाही असंच काहीतरी वक्तव्य केलं होतं म्हणे बाईंनी.
आपण जेष्ठ आणि अभ्यासु व्यक्ती आहात. पण या देशात आपल्या सारखे विचार करु शकणारे लोक देखील केवळ भारतीय म्हणुन पक्ष-निरपेक्ष दृष्टीकोन बाळगण्यापेक्षा रंगीत चश्मे लावुन हवे तेच आणि त्याच रंगात बघायला जाता... मग बाकी अडाण्यांनी तसं केलं तर काय चुकलं...
(अडाणी) अर्धवटराव
संघाच्या वर्तुळात अशा पातळीवरची चर्चा दुसर्या स्वातंत्र्याच्या आधीच्या आणीबाणीच्या आधीपासून ऐकली आहे. :(
उलट ७० प्रतिसादापर्यंत चर्चा बरीच सोबर राहिल्याने बरे वाटले होते. :)
तोपर्यंत मी काही म्हटलेही नव्हते.
चर्चा संघाला साजेशा पातळीवर जाऊ लागली आहे.
संघाने नक्की अशी पातळी कधी दाखवली ते माहीत नाही, पण बातमी आणि त्यातील राहूल गांधींचे वक्तव्य मात्र काँग्रेसच्या पातळीचे पहील्यापासूनच आहे, असे दिसतयं. :-)
संजय गांधींच्या जन्मामागे संघाचा हात असण्याचा विनोद हा काही लोकांना आवडेल तर काहींना तो अभिरुचीहीन वाटेल. इंदिरा गांधी काही काळ प्रत्येक गोष्टीकरता संघाला दोष देत होती त्यावर हा अतिरंजीत विनोद/भाष्य आहे. परंतु ह्या विनोदावरुन थेट संघावर घसरणे कितपत योग्य आहे? संघाच्या मूलभूत विचारात विरोधकांच्या संततीच्या जन्माविषयी शंका उत्पन्न करा असा काही आदेश आहे का? माझ्या माहितीत तरी तसे काही नाही.
जेम्स लेनने शिवाजीच्या जन्मावरुन एक अभिरुचीहीन विनोद केला होता. त्यावरुन ब्रिगेड वगैरे गावगुंड संघटनांनी तमाम ब्राह्मण जातीला वेठीस धरले होते. त्यात आणि वरील विधानामागे तीच वृत्ती दिसून येते. कुण्या एकाच्या वा काही मूठभर लोकांच्या विनोदामुळे सगळ्या संघटनेला जबाबदार ठरवणे.
जेव्हा संघात मूठभरच लोक होते तेव्हा मूठभर लोक असे विनोद करीत असतील तर काय समजायचे?
[एका किंवा काहींच्या कृत्याबद्दल संपूर्ण गटाला जवाबदार धरायचे नाही हे संघीय कधीपासून मानू लागले?]
असो. बाकी तुम्चे जे चालू आहे ते चालू द्या.
मी फक्त पातळीकडे निर्देश केला.
जेव्हा संघात मूठभरच लोक होते तेव्हा मूठभर लोक असे विनोद करीत असतील तर काय समजायचे?
संघ आणि मुठीचे फार पूर्वीपासून नाते आहे, असेच समजायचे.
असो, जिला एका संघिष्ठानेच दुर्गा असे संबोधले, तिच्यावर असे हीन पातळीवरून विनोद करणे, हा हिंदु धर्माचा अपमान आहे, असे कुणाला वाटले नाही का ? की फक्त देवी/स्त्री आहे म्हणून फेअर टार्गेट ?
केवळ कुण्या एका संघिष्टाने त्या स्त्रीला दुर्गा म्हटले म्हणून तमाम संघ स्वयंसेवकांनीही तिला दुर्गेइतकेच देवतुल्य मानावे हे तर्कट कसे बनवले?
त्याच पद्धतीने विचार केला तर, इंदिरा गांधीने १९७७ च्या सुमारास आंध्रमधे मोठे चक्रीवादळ आले होते तेव्हा संघाने केलेल्या कामाची स्तुती केली होती याचा अर्थ तमाम काँग्रेसवाले (ज्यात आजचे युवराज राहुलजीही येतात) संघाची स्तुती करतात असा होतो का?
हा माणूस पंतप्रधान झाला म्हणून काय आटोम्याटिकली याचे सगळे विचार हे संघिष्टांचे विचार झाले?
हे काय त्रांगडे आहे? म्हणजे संसदेवर हल्ला झाल्यावर षंढासारखी भाषणे देणे, विमान अपहरण केल्यावर त्याबदल्यात अतिरेकी सोडून देणे आणि त्याविरुद्ध काहीही कारवाई न करणे, हाजच्या यात्रेची सबसिडी घसघशीत रकमेने वाढवणे हे सगळे संघाचे विचार प्रदर्शित करतात का?
वाजपेयी हा पंतप्रधान बनला हे भाजपचे आणि देशाचे दुर्दैव. तो संघाची पताका खांद्यावर मिरवतो असा लोकांचा समज असेल तर ते संघाचे मोठेच दुर्दैव. मलातरी तसे वाटत नाही.
वाजपेयी हा पंतप्रधान बनला हे भाजपचे आणि देशाचे दुर्दैव. तो संघाची पताका खांद्यावर मिरवतो असा लोकांचा समज असेल तर ते संघाचे मोठेच दुर्दैव. मलातरी तसे वाटत नाही.
रेशीमबागेत बाजपेयी पंतप्रधान झाल्यावर फटाके फुटले होते. तुम्ही कदाचित संघिष्ठांना दुरून पहात असाल. मी जवळून पाहतो.
>>[एका किंवा काहींच्या कृत्याबद्दल संपूर्ण गटाला जवाबदार धरायचे नाही हे संघीय कधीपासून मानू लागले?]
<<
संघीय लोक पूर्वी तसे मानत नव्हते आणि आताच मानू लागले असे आपण का आणि कसे ठरवले?
केवळ संजयच नव्हे तर, इतरही काहींच्या जन्माबद्द्लच्या अभिरुचीहीन "कुजबुजा" मी पूर्वीपासून ऐकल्या आहेत. त्यामुळे, चर्चा ह्या वळणावर आली, याचे आश्चर्य वाटत नाही!
हे त्याचे स्वःताचे असतीलच असे नाही. कारण त्याना भाषण लिहुन देणारे इतर लोक असतात.पण जी तुलना त्याने केली आहे ती खुपशी चुकीची आहे.
आंसमाबाई/बाप्या हे मगदुम साहेबाचा दुसरा आयडी वाटतो. त्याना संघशाखेत पाठवण्यापेक्षा इतर क्षेत्रातल्या तज्ञांची खुप गरज आहे.
बालिश विधान की रणनीती?
.......""संघ आणि सिमी एकाच नाण्याच्या दोन बाजू असतील, तर केंद्र सरकारने सिमीवर बंदी घालून नऊ वर्षे झाली, तशी संघावर बंदी का घातली जात नाही,''
.......आम्हाला पोट महत्त्वाचे...
संघ आणि सिमी यांची तुलना हा राजकीय नेत्यांसाठी नवा वादाचा विषय असेल. आम्हाला मात्र त्यात काहीच रस नाही. आज सामान्यांसाठी जगणे महत्त्वाचे आहे. आम्हाला त्याच्याशी काही देणे घेणे नाही. असे वाद उकरण्यापेक्षा गरिबांचा विचार केला तर बरे.
- सुरेश देवरे, सामान्य गांधीवादी
प्रतिक्रिया
मोघम
अवांतरः संघाची एक आठवण
वाचत आहे, हळूहळू चर्चा गंभीर
सिमी आणि संघ ह्यांच्या साम्यापेक्षा
संजय झाला आता संजयच्या
:)
संघाची पातळी !!
निषेध!
ह्म्म्म
बातमी
असेच म्हणतो, पण
घाऊक द्वेष
मूठभर
मूठ
केवळ..
केवळ
मग?
+१
पुन्हा तेच
नितिन थत्ते
कुजबूज
आँ??
टाईम प्लीज.
राहुल गांधीचे विचार
मुस्लिम आणि उच्चवर्णीय असे
बालिश विधान की