Skip to main content

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

लेखक विकास यांनी गुरुवार, 29/04/2010 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेस ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच्या पूर्वसंध्येस महाराष्ट्र स्थापनेच्या मुहुर्तापासून आज हयात असलेल्या/नसलेल्या कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीन स्फुर्तिदायी मराठी व्यक्तींची नावे येथे प्रतिसादांमधे लिहीत हा धागा मोठा करूया. त्या व्यक्ती महाराष्ट्रस्थापनेच्या आधी जन्माला आल्या असल्या तरी हरकत नाही. फक्त त्यांचा ठसा मराठी मनावर राहीलेला असला पाहीजे. शक्यतो या कुठल्याच व्यक्तीचे नाव एकापेक्षा अधिक वेळेस (प्रतिसादात) नको. व्यक्ती स्फुर्तिदायी असणे महत्वाचे, ती खूपच प्रसिद्ध नसली पण काम स्थानिक पातळीपासून अगदी आंतर्राष्ट्रीय पातळीवर कुठेही असले ज्याने समाजात फरक पडला असेल तर हवी. सगळ्या क्षेत्रातील व्यक्ती याव्यात अशी इच्छा. त्या मधे कुठेही क्रमांक लावायचा नाही, तर जे मनापासून स्फुर्तीदायी वाटले त्यांची यादी करायची इतकाच उद्देश. धन्यवाद

वाचने 21606
प्रतिक्रिया 73

प्रतिक्रिया

मदत करणारे ,लोकाना सदमार्ग दाखवणारे थोर महापुरुष,संन्यास मार्गाचा अवलंब करणारे,कशाचाही मोह न बाळगणारे,सतत लोककल्याणात व्यग्र असणारे श्री श्री प्.पु नरेंद्र महराज श्री श्री प्.पु. अनिरुध्द बापु श्री स्वामी शिवानंद हे हि तितकेच महत्वाचे आहे असे मला वाटते. वेताळ

कर्नल प्रसाद पुरोहित --------------------- हे शेतकर्‍यांचे राज्य व्हावे.

अभय बंग राणी बंग अनिल अवचट