आख्यायिका
भारत हा आख्यायिकांचा देश आहे. इथे हरघडी, हरवक्त, हरयुगी नवनवीन आख्यायिका जन्माला आल्या.
**
आख्यायिका सर्रियल भासतात. लाईफलाईक असतात. 'हे खरं आहे' असं वाटता वाटता एकदम भानावर येऊन लक्षात येतं अरे ही तर आख्यायिका आहे. पण आख्यायिका आभासी मात्र नसतात. किंबहुना त्या वास्तवाची जुळी प्रतिमा असतात. वास्तवाचं प्रतिबिंब असतात. त्यामुळे, आख्यायिका अमर आहेत. कारण वास्तव अमर आहे, अचल आहे.
**
भक्तीमार्गात नवविधा भक्ती सांगितल्या आहेत. श्रवण, किर्तन, स्मरण, वंदन, अर्चन, पादसंवाहन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन असे ते भक्तीचे प्रकार. सांगणारे सांगून गेले. पण भक्तीमार्ग जनमानसात रूजला आणि लोकांनी त्यात भर टाकली. त्यातून एक आख्यायिका जन्माला आली.
**
रावणाने रामाशी शत्रुत्व पत्करले. लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले, विटंबना केली. त्यामुळे रावण संतापला आणि त्याने सूड घ्यायचा चंग बांधला. रामाचा मत्सर, द्वेष करू लागला. सीतामाईला पळवून आणले. पुढे त्याचे शत्रुत्व इतके वाढत गेले की तो त्यामुळे पार आंधळा झाला. त्याने सतत रामाचा विचार चालवला, त्याचाच ध्यास घेतला, येता जाता त्याचे नाव घेऊ लागला. राममुक्त भारत करायचा चंगच बांधला म्हणा ना. पण भगवान विष्णू कसले लै भारी दयाळू. द्वेषामुळे का होईना पण तो आपले नाव घेतोय सतत हे त्यांना समजले आणि त्यामुळे त्यांनी रावणाचे कल्याण केले. शेवट आला तेंव्हा इतर कुणाच्याही हातून रावणाचा मृत्यू घडवून आणणे सहज शक्य असूनही त्यांनी स्वतः त्याला मारले. साक्षात भगवंताच्या हातून मृत्यू आला, मरतेसमयी भगवंताचे दर्शन झाले म्हणून रावण वैकुंठगतीला प्राप्त झाला.
**
याला विरोधभक्ती असं म्हणलं गेलं.
**
विरोध करताना डोळसपणा जपला पाहिजे. आंधळेपणा आला, तर आपण प्राणपणाने ज्याचा विरोध करतो, त्याच्यासारखेच आपण बनण्याचा जंगी संभव असतो. पण डोळसपणा जपणं फार कठीण.
**
ही झाली सत्यबित्ययुगातली कथा. काळ पुढे सरकला. युगं आली गेली. पार कलियुग आलं. मानवी वृत्ती मात्र सनातन तशीच राहिली. आंधळेपणाचे धोके तसेच राहिले. डोळसपणा जपणं कठीणच राहिलं.
**
भारत हा आख्यायिकांचा देश आहे. इथे हरघडी, हरवक्त, हरयुगी नवनवीन आख्यायिका जन्माला येत आहेत.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
फलित काय?
+१
+1
+१
समयोचित रुपककथा आवडली.
+१
अजून एक आख्यायिका आठवली सहजच.
रोख समजला.
सत्तेचं गाढव गेलं आणि
मी तर डोळसपणालाच प्राणपणाने