बेबी डोल मै सोने दी
काल "एबीपी माझा"वर एक बातमी पाहिली. त्यात सुरुची त्रिवेदी या मुलीने एका गतीमंद मुलाशी लग्न केले आणि त्यांचा संसार कसा सुखाचा आहे वैगेरे दाखवत होते. त्यांना एक मुलगी देखील आहे वैगेरे दाखवत होते. त्या बातमीला “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, दिस येतील दिस जातील”, हे गाणे पार्श्वसंगीत म्हणुन वापरले होते. त्यात त्या मुलीच्या सासू सासऱ्यांची, गतीमंद नवऱ्याची मुलाखत दाखवली , तो माणूस फक्त ती खूप प्रेम करते एवढेच बोलू शकला पण बाकी ती कशी खुश आहे, कुटुंब कसे सावरलेय वैगेरे वर भाष्य चालले होते.
घरातल्यांचा तिच्या कौतुकाचा पाढा चालू झाला, प्रेम असे असावे वैगेरे. त्या मुलीने म्हणे त्याला पूर्वी कधीच पहिले नव्हते आणि ती त्याला पहिल्यांदा भेटायला गेली तेंव्हा म्हणे तो म्हणाला, “तू अजून पर्यंत कोठे होतीस?”, या एवढ्या वाक्यावर ती भाळली आणि तिने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिने हा निर्णय स्वतः घेतला , पण तिचे आई वडील यांची काय प्रतिक्रिया दाखवली नाही. त्या मुलीच्या निवडीचा आदर आहेच पण घरच्यांनी तिचे केलेले कौतुक डोक्यात गेले.
व्हिडीओ पाहून मला माझ्या मैत्रिणीच्या वहिनीचा भाऊ आठवला, तो ही गतिमंद होता. त्याचे कसे होणार ही चिंता खानदान, पै- पाहुण्यांना लागली होती. मुलाचे वडील मात्र शांत होते. त्यांनी अत्यंत गरीब घरातली अतिशय सुंदर मुलगी पहिली आणि मुलाचे तिच्याशी लग्न लावून दिले. त्यांनाही आता एक मुलगा झाल्याचे कळले. आता मुलाचे आईवडील वारले, आता ती मुलगी अशा नवऱ्याला आणि मुलांना कशी सांभाळते कोणास ठावूक? पण ते विचारण्याचे धाडस काही मला झाले नाही.
पहिला व्हिडीओ पाहिल्यानंतर अजून एक सांगोल्याचा कुठलातरी व्हिडीओ युट्युब दाखवत होते. त्यात मुलाला एड्स झाला होता तरीही त्या मुलीला त्याच्याजवळ राहायचा निर्णय घेतला होता आणि tagline होती, “ I accept your HIV “.
गावी माझी एक चुलत आत्त्या आहे, उच्चशिक्षित, दिसायला सुंदर पण परिस्थिती गरीब. चुलत आजोबा वारले आणि तिला स्थळ आणणारे लोक सर्व स्थळे बिजवरच आणत होते. शेवटी आजींनी तिला कमीत दिली तर उभ्या भावकीने त्यांच्यावर डूक धरला. भावकीला ना त्या पोरीची चांगले करण्याची हिम्मत होती ना तिच्या आईने घेतलेला निर्णय मान्य होता. आम्हाला कमीचे लोक पाहुणे म्हणतील याचा त्यांना राग होता.
हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे पहिल्या दुसऱ्या उदाहरणात मुलाच्या ऐवजी मुलगी गतीमंद असती तर असे कोणी लग्न केले असते का? त्याच्याही पुढे जावून समाजाने त्याचे कौतुक केले असते का? आणि केलेही असते तरी तो मुलगा तिच्याशी प्रामाणिक असता का?
किती दिवस मुलींवर जबरदस्ती करून समाज मुलींवर आपली मते लादणार आणि एखादे वृत्तवाहिनी तिचे गोडवे गात त्याची न्यूज बनवणार? किती दिवस गरीब मुलींचा असा बळी जाणार?
हे सर्व वाचून, ऐकून, प्रत्यक्षात पाहून “बेबी डोल मै सोने दि, ये दुनिया पित्तल दि” असेच वाटले.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
प्रश्नांचे स्वरूप गंभीर आहे
किती दिवस मुलींवर जबरदस्ती
एस भाऊ, आहेत की समाजात अशी
>>>ह्याच धर्तीवरची पण जरा
"ह्याच धर्तीवरची पण जरा वेगळी
तुम्ही बातमी पहा, त्या मुलीला
पिराताई, हो आहेत अशी उदाहरणे
अनेक मुद्दे एकत्र येत आहेत.
लेख मनापासून पटला आणि या
मुलगी आणि समाज
गतिमंद या शब्दाचा अर्थ काय?
मतिमंद आणि सामान्य बुध्दीचा
खरंय
जबरदस्ती ?