Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग ३२

लेखक वामन देशमुख यांनी गुरुवार, 03/05/2018 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
बातमीत यंदा व्यग्र कारभारामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीवर प्रश्न चिन्ह उभे राहिले असं म्हटलंय. राष्ट्रपतींच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याचा समावेश नसतो का? आधी नकार देत अखेर मराठी कलाकारांनी स्वीकारला राष्ट्रीय पुरस्कार यंदा व्यग्र कारभारामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीवर प्रश्न चिन्ह उभे राहिले. ते संपूर्ण सोहळ्यात जरी उपस्थित राहू शकणार नसले तरी ११ पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे. पण नेमकी कोणते पुरस्कार ते देणार हे अजून गुलदस्त्यातच आहे.

वाचने 67353
प्रतिक्रिया 309

प्रतिक्रिया

बीटा, बर झाल, कॉंग्रेसच्या गलिच्छ राजकारणाचे पुरावेच सापडलेत !! ऐकदाचा भारत कॉंग्रेस मुक्त व्हावाच !!

Out on bail, 26/11 Mumbai attacks mastermind Zaki-ur Rehman Lakhvi raising funds According to intelligence inputs with the Indian agencies, Lakhvi - a most-wanted terrorist in India - continues to head the outfit's operations despite being away from the public eye since his release from Rawalpindi's Adiala jail in April 2015. He resurfaced in February 2018 and is actively organising collection of donations in Punjab coinciding with the wheat harvesting season, sources told TOI . LeT continues to raise finances through various charities, with new names lately being added to the list, despite the sword of Financial Action Task Force (FATF) hanging over Pakistan. In February this year, FATF had said it would put Pakistan back on its watch-list or "greylist" from June 2018 over its failure to crack down on terrorist outfits.

राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी आपल्या दीर्घ आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. कॅन्सर या आपल्या दुर्धर आजाराला कंटाळून त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. त्यानंतर त्यांना तातडीने बॉम्बे रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. सह पोलीस आयुक्त म्हणून त्यांची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. दोन वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सर अर्थात कर्करोगाने ग्रासले. त्यातून ते बरे होत होते मात्र नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते आहे. १९८८ च्या बॅचचे ते आयपीएस अधिकारी होते. सेंट झेविअर्स या महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतले. ते मूळ राजपूत होते. २०१३ मधील आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरणी त्यांच्या तपासामुळेच विंदू दारा सिंगला अटक झाली होती. नंतर त्याची जामीनावर सुटका झाली.

कर्नाटकात देशविरोधी घोषणा दिल्या असे भाजपाने व्हिडिओ / ऑडिओ दिले आहेत म्हणे. आता हे व्हिडिओही खोटे कधी ठरतील ? हे पूर्वीही झाले आहे म्हणे. https://www.thenewsminute.com/article/k-taka-bjp-leaders-video-showing-… Raju Topannanavar, BJP’s general secretary for Mahanagara block in Belagavi in Karnataka, was left embarrassed when a video clip he released to the media on Saturday was dismissed as a fake by the police. The video purportedly showed Congress members belonging to the Belagavi City Corporation (BCC) ‘dancing to the tune of the Pakistani national anthem’, during Id Milad celebrations on Saturday but the police dismissed the video as a fake.

In reply to by manguu@mail.com

अहो त्यांचे प्रधान एवढी फेकाफेकी करतात ते बिचारे कसे मागे राहणार... यांचे भाषण म्हणजे मागणीपर प्रकरणातील किर्तन वाटते. बायस्ड पत्रकार राविश कुमार ने बरीच चिरफाड केली आहे. https://youtu.be/cqly9RBq-xM

chidambaram: पी. चिदंबरम यांची पत्नी, पुत्र कार्ती, सुनेविरुद्ध आरोपपत्र आयकर विभागाने माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी, पुत्र कार्ती आणि सून श्रीनिधी यांच्या विरुद्ध ब्लॅक मनी कायद्याखाली चार आरोपपत्र दाखल केले आहेत. त्यांच्यावर परदेशातील मालमत्तेची माहिती दडवून ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. चेन्नईतील एका विशेष न्यायालयात ब्लॅक मनी कायद्याच्या कलम ५० नुसार (परदेशातील उत्पन्न आणि मालमत्ता), तसेच कर अधिनियम, २०१५ अंतर्गत आरोपपत्र किंवा फिर्यादीबाबतच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. नलिनी चिदंबरम, कार्ती आणि श्रीनिधी यांच्यावर परदेशातील संपत्ती अंशत: किंवा पूर्णत: उघड न करण्याबाबतचे आरोप ठेवण्यात आले आहेत. ब्रिटनमधीस केंब्रिज येथील ५ कोटी ३७ लाखांची संपती, त्याच प्रमाणे ब्रिटनमधीलच ८० लाख रुपयांची इतर संपत्ती आणि अमेरिकेत असलेली ३ कोटी २८ लाख रुपयांच्या संपत्तींची माहिती या तिघांनी लपवून ठेवल्याचा त्यांच्यावर थेट आरोप ठेवण्यात आला आहे. चिदंबरम कुटुंबीयांनी या संपत्तीबाबत आयकर विभागाला कोणतीही माहिती दिलेली नसल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. शिवाय कार्ती चिदंबरम हे चेस ग्लोबल अॅडव्हायझरी या कंपनीचे सह-मालक असल्याचेही लपवण्यात आले असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. हा ब्लॅक मनी कायद्याचा भंग असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.

वॉलमार्टने फ्लिपकार्टचे ७७% मालकी हक्क मिळवले. वॉलमार्टकडून यावर्षी भारतात हक्कांसाठी दिलेले १६ बिलिअन डॉलर्स पकडून एकूण २० बिलिअन डॉलर्सची गुंतवणूक अपेक्षित. गुगलची पेरेंट कंपनी अल्फाबेटसुद्धा फ्लिपकार्टचे काही हक्क मिळवण्याच्या चर्चेत आहे. ट्वीस्ट इन टेलः सॉफ्टबँकचेसुद्धा फ्लिपकार्टमधे काही स्टेक्स आहेत, आधी हक्क विकायला तयार असलेल्या सॉफ्टबँकने आता आम्ही अजून त्यावर विचार करतोय असे म्हणायला सुरू केले आहे.

In reply to by सुखीमाणूस

हल्ली शांतता आहे असे वाटत असताना आज ही बातमी वाचली. काळजी करु नका !!! आताच सरकार Proactive आहे त्या मुळे अतिरेक्यांना अगोदरच गाठतात !! ऐखादी दुर्घटना होतही असेल पण ईतक्या मोठ्या देशात आम जनतेचा सोडुन कोणाचाही पाठींबा नसताना देशाला सुरक्षित ठेवणे कौतुकास्पद आहे! ज्या देशाचा प्रमुख विरोधी पक्ष दुश्मन देशाकडे जाऊन ईथले सरकार पाडायला मदत मागते, ओसामा बिन लादेन सारख्या अतिरेक्याला आदरार्थी बहुवचना ने संबोधते त्यांच्या कडुन काय अपेक्षा ठेवणार ?

In reply to by डँबिस००७

बिर्याणी खायला, साडी द्यायला कोण जाते ? ज्या देशाचा प्रमुख विरोधी पक्ष दुश्मन देशाकडे जाऊन ईथले सरकार पाडायला मदत मागते, असे आहे तर विद्यमान सरकार त्यांच्यावर अ‍ॅक्शन का घेत नाही?

In reply to by डँबिस००७

आताच सरकार Proactive आहे त्या मुळे अतिरेक्यांना अगोदरच गाठतात !! ऐखादी दुर्घटना होतही असेल पण ईतक्या मोठ्या देशात आम जनतेचा सोडुन कोणाचाही पाठींबा नसताना देशाला सुरक्षित ठेवणे कौतुकास्पद आहे!
अक्षरशः कैच्याकै विधान, कारण, आम जनता सोडून ह्या देशात १. प्रशासन आहे २. भूदल आहे ३. नौदल आहे ४. वायुसेना आहे ५. इतर अर्धसैनिक बळे आहेत ६. अगदी होमगार्ड पण आहेत ७. गुप्तचर खाती आहेत ह्यांच्यापैकी कोणाचाच पाठिंबा नाहीये का सरकारला? अन जनता सोडून म्हणजे काय हो? जनताच सगळे काही आहे की, मग कश्याला सरकार ट्रेजेडी किंग दिलीपकुमार असल्यागत कढ काढताय? म्हणजे जनता सोडून कोणाचा पाठिंबा नाहीये. अन तरीही इतकी अचाट कामे होतायत? सर्जिकल स्ट्राईक होतायत, अजून राजकीय एजंडे रेटणार?

In reply to by डँबिस००७

ऐखादी दुर्घटना होतही असेल पण ईतक्या मोठ्या देशात आम जनतेचा सोडुन कोणाचाही पाठींबा नसताना देशाला सुरक्षित ठेवणे कौतुकास्पद आहे! अजून कोणाचा पाठींबा अपेक्षीत आहे?

In reply to by सुखीमाणूस

Nawaz Sharif Admits that Pakistan played a role in 26/11 Mumbai attack. मोदींची महीमा !! नाही तर पुर्वीचे सरकार बसले होते हात चोळत कित्येक वर्ष !

श्रीगुरुजी, लवकर इथे या आणि ता.घ.चा पुढील भाग खोला. माझ्यासारखे आळशी इथे भरलेत. २००+ संदेश झाले तरी याच भागात लिहिणं चालू आहे. आ.न., -गा.पै.

यंदा आणि मागच्या वर्षी पाउस चांगला झाल्याने साखरेचे उत्पादन वाढले आहे तरी सरकार ने पाकिस्तानहून साखर आयात केली आहे , ह्याने इथल्या शेतकर्‍यानी पिकवलेल्या साखरेचे भाव पडणार आहेत . या निर्णयामागची कारणीमीमांसा कोणाला सांगता येइल का ?

In reply to by कपिलमुनी

यंदा आणि मागच्या वर्षी पाउस चांगला झाल्याने साखरेचे उत्पादन वाढले आहे तरी सरकार ने पाकिस्तानहून साखर आयात केली आहे , ह्याने इथल्या शेतकर्‍यानी पिकवलेल्या साखरेचे भाव पडणार आहेत . या निर्णयामागची कारणीमीमांसा कोणाला सांगता येइल का
? साखर शेतात पिकते ? नवीनच माहीती ! राहुल गांधींच्या "आलू कि फॅक्ट्री" टाईप काही प्रकार आहे का, हा ?

In reply to by प्रसाद_१९८२

पांचट जोक मारू नका. 3 आठवडे झाले 150 टनाचे बिल अडकले आहे. एकतर मायबाप सरकारमुळे कारखाने एक दीड महिना उशीरा चालू होते. वरून पैसै अडकले आहेत. कृपया उगाच असंवेदन टिपण्णी करू नका.

In reply to by प्रसाद_१९८२

काड्या करू नका ! सरळ लिहायचे असल्यास लिहा . साखर शेतात पिकते >> उस शेतात येतो आणि त्यापासून साखर ! तुमच्याकडे वेगळी फॅ़क्टरी असेल तर सांगा . उगा इथे रागां वगैरे अजेंडे आणू नका . @संपादकः या अजेंडावाल्या आयडी कडे आता पासून लक्ष द्या स्वच्छ मिपा सुंदर मिपा

In reply to by कपिलमुनी

पाकिस्तानी साखर आत्ता आयात केल्याची कुठली बातमी आहे का? किती साखर आयात केली आणि का केली याचे काही दुवे आहेत का? या बातमी प्रमाणे नोव्हेंबर २०१७ मध्ये ५०० टन साखर पंजाब मध्ये आयात केली गेली. याचे कारण फक्त तेथील लोकल मार्केट मधील टंचाई आहे असे सांगितले गेले. जानेवारी २०१८ मधील या बातमी प्रमाणे, जर साखर स्वस्त मिळते आहे म्हणून आयात केली गेली तर त्यावर आयात कर लावण्यात येईल असे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. बादवे, साखर आयात बऱ्याच आधीपासून चालू आहे असे दिसते.

In reply to by ट्रेड मार्क

प्रश्न हा आहे की आपल्या साखरेला बाहेर उठाव नसताना बाहेरून कशाला आयात केली. ती पण आपण मानलेल्या नंबर एक शत्रू राष्ट्रा कडून. मी म्हणतो चार पैसे आगाऊ आपल्या शेतकरी लोकांना मिळाले असते तर ग्रामीण उद्योग धंद्यात तेजी आली असते. ग्रामीण अर्थकारण बदलेले असते. नमके इथे देशप्रेम कुठे पेंड खायला जाते त्याचं हसायला येते. बाकी चालू द्यात.

In reply to by विशुमित

प्रश्न हा आहे की सन २०१८ मध्ये "केंद्र" सरकारने आपण मानलेल्या नंबर एक शत्रू राष्ट्रा कडून किती साखर आयात केली? याची काही अधिकृत आकडेवारी आहे का? अगदी फक्त सध्याच्या केंद्र सरकारवर टीका करायची म्हणली तर गेल्या १५-२० वर्षात पाकिस्तानकडून किती साखर आयात केली गेली याचे तुलनात्मक आकडे द्या आणि जर २०१४ नंतर जास्त आयात असेल तर मग हे सरकार पाकिस्तान धार्जिणे असून भारतीय शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले आहे हे सिद्धच होईल ना? माझं तरी मत असं आहे की कुठली तरी काही महिन्यांपूर्वीची बातमी आता उकरून काढून त्यावर गदारोळ चाललेला आहे. हे माझं मत चुकीचं असेल तर सिद्ध करा.

In reply to by ट्रेड मार्क

१४ मे २०१८ ची बातमी आहे. ही साखर उद्योग समूहाने आयात केली आहे. अर्थात या आयातीला केंद्र सरकारची मंजुरी असल्याशिवाय ही आयात करता येत नाही. पुर्वी किंवा आता , २०१४ काही इ.स पूर्व वगैरे नाहीये त्यमुळे त्याला पास. सरकार कोणतेही असो त्याने लोकांच्या हिताचे निर्णय घ्यावेत ही अपेक्षा आहे.

In reply to by अनुप ढेरे

भारतात साखरेचा घरगुती उपयोगापेक्षा साखर मिठाई (शुगर कॉन्फेक्शनरी) मध्ये जास्त आहे असे मागे कुठे तरी वाचले होते. पण साखरेचे भाव पडल्याने त्यापटीत शुगर कॉन्फेक्शनरी वाले भाव कमी करणार आहेत का, का कळीचा मुद्दा आहे.

In reply to by अनुप ढेरे

आपण जर बाहेरून साखर आणली तर आपल्या देशातील उत्पादन कमी होइल , त्यावर आधारीत जॉब कमी होतील त्यामुळे लोकाची क्रयशक्ती कमी होइल आणि बाजारातील उलाढाल कमी होईल . देशांर्तगत उप्तादन वाढले तर उत्पादन , वितरण वगैरे वाढेल

In reply to by कपिलमुनी

काहीही, उलट मुठभर साखर कारखानदारांच्या फायद्यासाठी लोकांच्या गळ्यात महाग साखर मारणे हे जास्तं वाईट. साखर कारखानदारांनी आपलं उत्पादन एफिशियंट करावं की कोणी आडवलय. लोक कशाला बघतील आयात साखरेकडे मग? देशात उस पिकवणारे/साखर बनवणारे लोक जास्तं का साखर कंझ्युम करणारे जास्तं आहेत? माझ्या मते साखर कंझुम करणारे लोक जास्तं आहेत. त्यामुळे त्यांच्या फायद्याचा निर्णय हा जनतेच्या अहिताचा निर्णय असू शकत नाही.

In reply to by अनुप ढेरे

हे प्रत्येक वस्तूच्या बाबतीत लागू होते का? आपल्या पेक्षा बांग्लादेश मधे कपडे स्वस्त आहेत , ते आणावे , चायनाच्या तर हजारो गोष्ती स्वस्त आहेत त्या सुद्धा आणाव्यात . तेव्हा सरकार टॅक्स लावते . इथे वस्तू महाग झाल्या तर मग निर्यातबंदीचे नाटक का ? आपल्या उत्पादकांना सुद्धा बाहेर जिथे चांगला दर असेल तिथे विकण्याची परवानगी हवी.

In reply to by कपिलमुनी

चायनाच्या हजारो गोष्टी येतातच आपल्या इथे. खाली सोलर पॅनेल्सचे उदाहरण दिले आहे.
आपल्या उत्पादकांना सुद्धा बाहेर जिथे चांगला दर असेल तिथे विकण्याची परवानगी हवी.
याच्याशी सहमत आहेच.

In reply to by अनुप ढेरे

राजकारण वगळता आयात निर्यात त्याचा उत्पादकते वर होणारा परीणाम आणि ग्राहकांची क्रयशक्ती , देशाचे परकीय चलन अशा बर्‍यच गोष्टीचा यावर फऱ पडत असेल . विकांतास यावर अर्थ शास्त्रीय धागा काढेन

In reply to by कपिलमुनी

+१ आयात निर्यातीवर अगदी किमान निर्बंध असावे. (बाकी एका बाजूने मनमोहन सिंगांच्या उदारीकरणाचा जयघोष करत आयात का करता हा प्रश्न विचारणे बालिश वाटते)

In reply to by अनुप ढेरे

नेमका कोणाला फायदा होतो/होणार आहे, हे खाली दिलेली लिंक पाहून बरेच चित्र क्लीयर होईल. ७० % साखर शीत पेये, बेकरी, मिठाई , फार्मा आणि इतर कंपनीसाठी वापरली जाते. ही लोकं त्यांच्या प्रॉडक्ट्स च्या किमती कमी करणार आहेत का ? आणि तो फायदा सामान्य जनतेला पासऑन करणार का? माझा एवढा साधा सोपा प्रश्न आहे. === बाकी तुमच्या व्युक्तीवादात माझी विशेष असहमती नाही आहे. फक्त साखरेची पडलेली किंमत भविष्यात वाढू देखील शकते, जे उपभोक्त्याला देणे भागच असणार आहे पण आता खचलेले कारखाने जर बंद पडले तर ते पुन्हा उभे करणे अवघड असणार आहे.

In reply to by विशुमित

वर मुनिवर म्हणतात की जर आयात साखर आणली तर साखर व्यवसायामधली उलाढाल कमी होईल. उलट विचार करा. साखर कंझ्युम करणार्‍या लोकांना स्वस्त साखर मिळाली तर त्या व्यवसायातला फायदा वाढेल आणि आर्थिक उलाढाल वाढेल जे चांगलं आहे की! सरकारने केवळ साखर बनवणार्‍या कारखान्यांचा/लोकांचाच विचार का करावा? साखर वापरणार्‍या इंडस्ट्रींचा/लोकांचा विचार का करू नये?

In reply to by अनुप ढेरे

आता पाकिस्तानातून आयात केलेल्या साखरेमुळे घरगुती उपभोक्त्यांसाठी स्वस्त साखर होणार नाही. === http://www.esakal.com/maharashtra/sugar-can-be-done-gaat-agreement-1167…

In reply to by कपिलमुनी

अहो त्या बातमीमध्ये साखर कोणी आणि कधी आयात केली हे लिहिलेलेच नाहीये. मला आयात निर्यातीचे नियम माहित नाहीत. पण प्रत्येक वेळेला आयात करताना सरकारकडून परवानगी घ्यावी लागते का? का एकदा लायसन्स असलं की त्याचा वापर करता येतो? २०१४ काही इ.स पूर्व वगैरे नाहीये म्हणून तर तसा डेटा मिळवणं फारसं अवघड नसावं! सरकार कोणतेही असो त्याने लोकांच्या हिताचे निर्णय घ्यावेत ही अपेक्षा आहे. हित हे सापेक्ष आहे. अगदी ज्वलंत उदाहरण द्यायचं तर ट्रिपल तलाकवर बंदी मुस्लिम स्त्रियांना हितकारक आहे पण पुरुषांना अहितकारक वाटतेय. आरक्षण हे ज्यांना मिळतंय त्यांना हितकारक वाटतंय पण ज्यांना नाही मिळत त्यांना.... तर या केस मध्ये एका उद्योगसमूहानं साखर आयात केली आहे. ती कधी आणि कोणत्या परिस्थितीत केली, तसेच स्थानिक साखर न घेता आयात खर्च करून बाहेरून, त्यातून पाकिस्तान कडूनच, का घेतली याची कारणमीमांसा करण्याइतका डेटाच उपलब्ध नाहीये. पण आरडाओरडा मात्र सरकारने आयात केली असा होतोय. हा तुमचाच प्रतिसाद बघा.

In reply to by ट्रेड मार्क

१३ मे रोजी आलेली बातमी http://epaper.esakal.com/FlashClient/Show_Story_IPad.aspx?storySrc=http… अणि आजच्या पेपर मध्ये http://www.esakal.com/maharashtra/pakistan-sugar-bjp-mns-agitation-1163… या बातमी मधील किरण यांची प्रतिक्रिया जरूर वाचा. साखरेवरुन राजकारण करण्याचा प्रयत्न चालू आहे.

In reply to by सुखीमाणूस

हेच लिहण्याकरिता आलो होतो. ज्या व्यापाऱ्याने चॉकलेट घेण्याच्या बदल्यात साखर आयात केली हे GAT कराराच्या तरतुदीनुसारच होती. त्यात काही वावगे नव्हते. फक्त काय आहे हे राजकारण करण्याचा प्रयत्न यासाठी की पाकिस्तान हे नाव! === बाकी टोमॅटोची दारे उघड राव मायबाप भारत सरकार. इकडे म्हसराना (म्हशींना) घालण्यापेक्षा खाऊ द्यात त्या पाकिस्तानवाल्याना ! (उघडली असतील/ असणार तर कळवा बरका. इकडे व्यापारी गंडवतील शेतकयांना खोटेनाटे सांगून )

In reply to by कपिलमुनी

चांगलय चांगलय... 2016 ला मोझांबिक बरोबर करार झाला होता ना? मग बरोबरय... आपल्या देशाला एक राजा हरिश्चंद्र भेटलाय !

In reply to by कपिलमुनी

अशी एकतर्फी बातमी का बरं देताय? २०१६ मध्ये हा करार का आणि कोणत्या परिस्थितीत झाला होता ते या आणि या बातमीमध्ये कळेल. या परिस्थितीत काय करायला पाहिजे ते तुम्ही किंवा दुसरं कोणीही सांगा बघू.

In reply to by ट्रेड मार्क

MSP नुसार मोबदला देतो म्हणून शेतकऱ्यांना कडधान्याचे अधिक उत्पादन काढण्यासाठी मन की बात मध्ये कोणी प्रोत्साहित केले होते ? आणि जी काय परिस्थिती निर्माण झाली होती याची योग्य कारणे महाराष्ट्रात आमचे लाडके बापट साहेब देऊ शकतात. -- http://www.thehindu.com/news/national/minimum-support-price-hike-can-bo…

In reply to by ट्रेड मार्क

शेतकर्‍याने काय करायचे ? वस्तूंची मागणी कमी झालि तर भाव वाढणार . भाव वाढले कि हे बाहेरून आयात करणार आणि निर्यात बंदी करणार . सामान्य माणूस म्हणजे फक्त नोकरदार नाही. शेतकरी पण आहे. त्याला वाढलेल्या भावाचा कधी मिळणार ?

In reply to by कपिलमुनी

निर्यात बंदी करणार
शेतकरी नेते याविरुद्ध आंदोलनं करत नाहीत. आंदोलनं कर्जमाफी/वीजबिलमाफीसाठीच दिसतात.

In reply to by विशुमित

चार पैसे आगाऊ आपल्या शेतकरी लोकांना मिळाले असते तर ग्रामीण उद्योग धंद्यात तेजी आली असते. ग्रामीण अर्थकारण बदलेले असते.
हा लेख वाचा. ग्रामीण अर्थकारण बदलेलं आहेच. ग्रामीण अर्थव्यवस्था ही फक्त शेतीआधारीत राहिलेली नाही. ग्रामीण अर्थव्यवस्थेत बिगर-शेती व्यवसायांचा देखील भरपूर मोठा हात आता आहे. https://www.thehindubusinessline.com/opinion/columns/aarati-krishnan/cr…

In reply to by अनुप ढेरे

एखाद्या तिमाहीमध्ये ट्रॅक्टर- मोटारसायकली जास्त विकल्या गेल्या म्हणजे गावाकडचे अर्थकारण शेतीवर अवलंबून नाही हे म्हणणे जरा धारिष्ट्याचे ठरेल. त्यात ट्रॅक्टर- मोटारसायकली गावात मिळत नाहीत, एकतर जिल्हा-तालुका-किंवा एखादे खूप मोठे कमर्शियल गाव येथे मिळतात. ==== गावच अर्थकारण मोजायची आमचे पॅरामीटर आणि पद्धत वेगळी आहे. १. मासिक/आठवडी घरटी किराणा घेण्याचा ट्रेंड कसा आहे. त्या रिपोर्ट मध्ये गावाकडे FMCG खप वाढला हे दाखवत आहे. तो खप नाही आहे, स्टोकिंग आहे. २. दिवाळी, इतर नातेवाईकांच्या लग्नसराईला घेतला जाणारा कपडा. शाळेत जाणाऱ्या पोरांना एकच गणवेश २ वर्ष वापरायला सांगणे आणि दिवाळीत फटाके कॅन्सल म्हणजे उसाचं टनेज कमी बसलं म्हणून समजून घायचा. ३. धाब्या/हॉटेलवर सर्व सामान्य शेतकऱ्यांची होणारी घट, म्हणजे टोमॅटोचे मार्केट ढासळले हे ओळखून जायचे. ४. खटकाच्या दुकानावर रविवारी अर्धच बोकड खपले की समजायचं लोकांची कटवती चालू आहे. ५. चप्पल दुकानवाले दिवस दिवस माशा मारत पेपर वाचत बसू लागला की समजायचं, म्हणजे अर्थकारण बिघडले असे समजायचं. ६. पम्पावर ३०-५० रुपायचंच पेट्रोल टाकाय लागलं की समजायचं, पतपेढी थकली आहे. ७. क्लासिक हेर सलून मध्ये २ महिन्यातून एकदा केस दाढी करायला यायला लागला की समजायचं, हे पुरतं डरगांगळ! अजून लय आहेत पण तुम्हाला वाटेल विशुमित ने आमची चेष्टा चालवली आहे की काय, म्हणून थांबतो. === आता टोमॅटोचं मार्केट पडलंय, एक सुद्धा चौकात दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

In reply to by विशुमित

ते सोनार राहिलं की...! मंडळी तापली तर पॅरासिटामोल वर भागवतंय. डॉक्टरकड नेईना ते सोनाराकडे कसलं नेतंय!

In reply to by विशुमित

फक्त पहिला परिच्छेद वाचु नका. हा निष्कर्ष अनेक वर्षांवरून काढला आहे.
Between FY05 and FY12, the number of rural folk employed in agriculture fell from 249 million to 216 million, while those employed in factories, construction or services rose from 94 to 121 million.
लोकसंख्या वाढत असताना शेती काम करणारे कमी होत आहेत.
So, once you know that agriculture is no longer the primary employer in rural areas, it becomes easier to understand why rural consumption is no longer joined at the hip with monsoon rains or crop prices.

In reply to by अनुप ढेरे

हे विश्लेषण कमरशियल गावांना लागू होते. बहुतांशी गावे शेती आणि शेतीपुरक उद्योगावरच अजून ही अवलंबून आहेत.

In reply to by विशुमित

वरील लेखात त्यांनी त्यांचा निष्कर्ष कसा आला ते लिहिलं आहे.
बहुतांशी गावे शेती आणि शेतीपुरक उद्योगावरच अजून ही अवलंबून आहेत.
हा निष्कर्ष कशावरून काढलात तुम्ही?

शेतकर्‍यांच्या जीवावर हत्तीवरुन साखर वाटायची स्वप्न बघतेय हे बिनडोक सरकार.

In reply to by मार्मिक गोडसे

अशी टिपणी सुधा आक्षेपार्ह आहे. सरकार शेतकर्‍याला दुखावून सत्तेत कसे राहु शकेल? आधीच्या सरकारला तरी कुठे शेतकर्‍यांच्या भल्याचे जमले होते. उलट याच काळात शेतकरी देशोधडीला लागले.

In reply to by सुखीमाणूस

शेतकरी या नात्याने मी खूप जवाबदारीने सांगू शकतो की आधीच्या सरकारच्या काळात शेतकरी खूप वर आला होता. भाजीपाला फळफळाव, ऊस, सोयाबीन, धान्य आणि दुधाला खूप चांगला भाव होता. ज्यांनी त्या संधीचे सोने करण्यासाठी अविरत कष्ट केले ते आज देखील यशस्वी शेतकरी आहेत. पण आज सारखी परिस्थिती कायम राहिली तर अवघड आहे. त्यामुळे गावात जाऊन थोडा ग्राउंड रिपोर्ट पाहिला तर फरक समजेल.

In reply to by विशुमित

आम्ही पण आहोत. काही काळ सुगीचा अनुभवला आहे. त्यामुळे कोण किती जबाबदार हे नक्की कळते आहे. आजच्या शेतकर्‍यांच्या स्थितीला पुर्वीचे सरकार सर्वात जास्त जबाबदार आहे. नाहितर त्यानी 60 वर्ष केलेले कार्य ह्या सरकारमुळे 4 वर्षात बिघडले नसते. आडात नाही तर पोहोर्यात कुठून येणार अशी स्थिती आहे.

In reply to by सुखीमाणूस

६० वर्ष्यात काय झाले हे थोडे बाजूला ठेवू. फक्त आजच्या घडीला भाजीपाला, धान्य, सोयाबीन, ऊस (उसाला FRP चांगली आहे ), फळे आणि महत्वाचे दूध यांचे पडलेले भाव कसे सुधारले जातील यावर लक्ष देणे महत्वाचे आहे. ते आता आहेत का एवढे सांगा. === नाहितर त्यानी 60 वर्ष केलेले कार्य ह्या सरकारमुळे 4 वर्षात बिघडले नसते.>>> ==>> कंपनींना एक-दोन वर्ष जर झटके बसले तर टाळे ठोकायची पाळी येते. हे अनुभवायला मिळाले असेलच. ----- "किती लाख्या असला तरी २ वर्ष्यात होत्याच नव्हतं होयला वेळ लागत नाही"- इति आमचे नाना..!!

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गौप्य स्फोट करत " २६ / ११ च्या मुंबई हल्ल्या मागे पाकिस्तानातले अतिरेकीच ज वाब दार होते " ही बातमी उघड केली ! या पुढेही अश्या सत्य गोष्टी जनते समोर आणत राहीन असही ते म्हणाले. ह्या गोष्टीमुळे पाकिस्तानातली मिडीया मात्र चवताळलेली आहे. नवाज शरीफ वर अमेरिका, ईज्राईल व मोदी यांचे हस्तक असल्याचे म्हणत आहे. जाणवण्यासारखी गोष्ट म्हणजे ऐरवी राहुल गांधींचे गुण गान करणार्या पाकिस्तानच्या मिडीयाला जेंव्हा नवाज शरीफने पाकिस्तान विरुद्ध भारताच्या बाजुने ही बातमी उघड केली त्या वेळेला नेमकी श्री मोदीजींचीच आठवण आलेली आहे. देशातले पुरोगामी, अधर्मवादी काहीही म्हणोत, ह्यावरुन भारताच्या दुश्मन देशातल्या मिडीयाला मोदीजी देशभक्त आहेत ह्या बद्दल खात्री असल्याच दिसुन आलेल आहे. २६ / ११ नंतर भारताच्या ईतक्या प्रयत्नांनंतर नवाज शरीफ यांनी केलेल्या गौप्य स्फोटांमुळे भारताची केस आता भर भक्कम झालेली आहे. https://timesofindia.indiatimes.com/world/pakistan/nawaz-sharif-defends… https://www.youtube.com/watch?v=gSLRQK_YAfI https://www.youtube.com/watch?v=Mxnr0FjYoLY https://www.youtube.com/watch?v=4pH7oKNgX78

In reply to by डँबिस००७

देशात मुबलक साठा असताना पाकिस्तानातून साखर का मागवली तेवढं सांगा. बाकी गोष्टींना लोक वैतागले आहेत.

In reply to by विशुमित

जर पकिस्तनि साखर स्वस्त पडत असेल भारतीय कारखान्यातल्या साखरेपेक्षा तर सामान्य माणसाला महाग भारतीय साखर खरेदी करायची सक्ती का म्हणुन करायची?