मित्रा कधी जळू नकोस कुणावर इतका कि
स्वतःच्या बुडाचीच आग होईल
अस्साच जळत राहिलास तर
जाताना पाणी पण महाग होईल
काव्यातडाग नव्हे हे अथांग समुद्र तो
दुर्दैवी तोच जो रसिकांना पामर समजतो
वंदनीय मज सारे, तुही त्यात दुजा नसे
नित्य नवी कल्पना काव्यदेवी देत असे
हताश होऊ नको इतक्यात
कि पाठीला बाक येईल
कवन जरा नीट कर
नाहीतर प्रतिभेला डाग येईल
विझलेयत निखारे कधीच ,
लाव्हाहि निद्रिस्त तो
नको फुंकर मारू आता
जळून सारे राख होईल
मारू नको टिचकी कधी
इशाराही नको मजला
मी सुखात या जागी
जरी असे मी एकला
आशा करतो काव्यदेवते
आता तरी त्याला जाग येईल
मित्रा हे नाही समजलं जर तुला
तर पुढे दुर्दैव तुझा भाग होईल
दुर्दैव तुझा भाग होईल...........
-}--> " खिलजी " उर्फ सिद्धेश्वर विलास पाटणकर -}-->
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5581
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
लगेच अनन्त प्रतिसाद?
"अस्सच चरत राहिलास तर ,
तुमचे
कधी कधी वाईट वाटतं
मस्त मुक्तक !
In reply to कधी कधी वाईट वाटतं by खिलजि
धन्यवाद साहेब .. मैत्री करून
In reply to मस्त मुक्तक ! by अनन्त्_यात्री
धन्यवाद सर्व वाचकांचे आणि ???
पाडली वाटत एक नविन कविता
:D:D:D:D