Skip to main content

लोकसभा निवडणूक विरोधीपक्ष जागावाटपाचा फार्मुला कसा असावा ?

लेखक माहितगार यांनी शनिवार, 17/03/2018 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
समजा पुढच्या लोक्सभा निवडणूकीत (२०१९) भारतातील विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षास एकत्रित आव्हान (निवडणूक पूर्व गठबंधन) देण्याचे ठरवले आणि सल्लागार म्हणून जागावाटपाबाबत विरोधीपक्ष नेतृत्वाने तुम्हाला फार्म्युला सुचवण्यास सांगितले तर तुम्ही कशा स्वरुपाचे फार्मुले सुचवाल ? पर्याय पहिला १.१) सत्ताधारी पक्ष गठबंधन वि. मुख्य विरोधी पक्ष समावेश असलेले गठबंधन १.२) पंतप्रधानपद निवडीसाठी काय पर्याय सुचवाल पर्याय दुसरा समजा कॉंग्रेसेतर तिसरी आघाडी उर्वरीत पक्षांचा एका महत्वपूर्ण गट बनवण्यात यश आले २.१) सत्ताधारी पक्ष गठबंधन वि. मुख्य विरोधी पक्ष समावेश नसलेले गठबंधन २.२) पंतप्रधानपद निवडीसाठी काय पर्याय सुचवाल

वाचने 36490
प्रतिक्रिया 154

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

नाही म्हंटले ना. अंदाज लावलाय फक्त. मैत्रीखातर सांगून टाका पण दक्षिणा मिळणार नाही. (हा. घ्या )

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही फसवताय असे वाटते. शब्द शब्दाचा अर्थ सांगता का ? "गीता जशी आहे तशी" सारखे वाच्यार्थ. भावार्थ मी समजून घेतो.

In reply to by धर्मराजमुटके

सध्या इथले विविध पक्ष समर्धक तळागाळात (की नुसत्याच गाळात) जाऊन कार्य करत आहेत :) चपखल निरिक्षण !

सर्वांना __ /\__

In reply to by माहितगार

प्रतिसादावर प्रतिसाद देत धाग्याची धुळवड करण्यात सहभागी झाल्याबद्दल, धागालेखकाची माफी मागतो. ======================= माझ्यामते भाजपेतर पक्ष एकत्र येणे खूप अवघड आहे. आले तरी त्यांच्या संख्याबळातला फरक उन्नीस बीसचाच असेल असे वाटते. त्यामुळे कोण पंतप्रधान होणार हा मुद्दा क्षमतेपेक्षा संख्याबळावर अवलंबून असेल असेच वाटते. जर भाजपेतर सरकार यायचे असेल तर ते काँग्रेसचेच यावे असे वाटते. ======================= जर तिसऱ्या आघाडीचे आले तर नितीशकुमारांपेक्षा बरा पर्याय नाही, पण त्यासाठी त्यांना बिहारमधून कमीत कमी २० जागा जिंकाव्या लागतील जे खूप अवघड वाटते. चंद्राबाबू नायडू हाही त्यातल्या त्यात बरा पर्याय आहे पण सर्वसंमती मिळणे अवघड आहे. तिसरी आघाडी एकत्रितरित्या सगळ्या राज्यात लढत नसल्यामुळे सर्व पक्षांमध्ये एकोपा हा महाअवघड प्रकार आहे असे मला वाटते. जे पक्ष एखाद्या राज्यात एकत्र लढतील ते एकोप्याने राहण्याची शक्यता आहे पण इतर हे फक्त किती मंत्रीपदे यावर एकत्र राहतील असे दिसते. ====================== माझ्यामते तरी पुढची आदर्श निवडणूक हि काँग्रेस + सगळे विरोधी पक्ष एकत्र विरुद्ध भाजप + सगळे एनडीए घटक पक्ष अशी सरळसरळ द्वि-पक्षी निवडणूक व्हावी. म्हणजे सरकार स्थापनेचे आणि स्थिरतेचे घोळ होणार नाहीत.

In reply to by बिटाकाका

माझ्यामते तरी पुढची आदर्श निवडणूक हि काँग्रेस + सगळे विरोधी पक्ष एकत्र विरुद्ध भाजप + सगळे एनडीए घटक पक्ष अशी सरळसरळ द्वि-पक्षी निवडणूक व्हावी. म्हणजे सरकार स्थापनेचे आणि स्थिरतेचे घोळ होणार नाहीत.>>> ==>> सहमत

In reply to by बिटाकाका

माझ्यामते तरी पुढची आदर्श निवडणूक हि काँग्रेस + सगळे विरोधी पक्ष एकत्र विरुद्ध भाजप + सगळे एनडीए घटक पक्ष अशी सरळसरळ द्वि-पक्षी निवडणूक व्हावी. म्हणजे सरकार स्थापनेचे आणि स्थिरतेचे घोळ होणार नाहीत.
. आजिबात सहमत नाही आपल्या मताशी (पण आदर आहे) मत व्यक्त करणे हा लोकशाहीचा आत्मा. लोकांना फक्त दोन चॉईस देणे हे एकप्रकारे लोकशाहीच गळा घोटाल्या सारखे वाटते.

In reply to by पगला गजोधर

गल्लत होतेय, दोनच पक्ष म्हणत नाहीयेत आपण. व्दिपक्षी म्हणजे दोन विचारसरण्या या अर्थाने. मग तसे पहायला गेले तर सगळ्या युत्या आघाड्या लोकशाहीचा गळा घोटणेच म्हणावे लागेल.

In reply to by बिटाकाका

ओके, मला काय म्हणायचंय, जगात "काळं" आणि "पांढरं" असे फक्त दोनच ध्रुवीकरण होणं पटत नाहीये..