Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग २५

लेखक गामा पैलवान यांनी रविवार, 11/03/2018 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, अखेरीस ट्रंपूबाबांनी उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किममामा यांच्यासोबर चर्चा करायचं ठरवलं. संदर्भ : http://www.bbc.co.uk/news/world-us-canada-43353274 याआधी शड्डू ठोकून युद्धाच्या डरकाळ्या फोडणारे ट्रंपूपापा अचानक म्यावम्याव का बरं करू घातले? याचं कारण अगदी उघड आहे. दिनांक ०१ मार्च रोजी पुतीननानांनी रशियाकडील ६ नवी अस्त्रे विशद केली. संदर्भ : http://theduran.com/6-new-weapons-putin-revealed-state-nation-address/ मग मात्र निरुपायाने ट्रंपूबाबांना वाटाघाटींच्या टेबलावर चढावं लागलं. एकंदरीत आंतरराष्ट्रीय राजकारणांत मर्कटचेष्टा फार वाढल्या आहेत. त्यांना तात्पुरता का होईना पायबंद घातल्याबद्दल पुतीननानांना अभिवादन. जाताजाता : अणुशक्तीप्रेरित क्षेपणास्त्र म्हणजे उडणारी अणुभट्टी. साली ही संकल्पनाच खतरनाक आहे. उडणाऱ्या अस्त्रावर अणुध्वम बसवणं फार सोपं आहे. पण त्याच्या बुडाशी अणुभट्टी बसवून ती कार्यरत ठेवणं म्हणजे कर्मकटकट आहे. भारताने या दिशेने गांभीर्याने विचार करायला हवा. कोणास ठाऊक, चालू असेलही. आ.न., -गा.पै.

वाचने 51422
प्रतिक्रिया 265

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

देशी पारंपारिक उपचारांबद्दल इतका नकारात्मक विचार ! बायदिवे , रामदेवबाबा डॉक्टर आहेत की फार्मासिस्ट ?

In reply to by श्रीगुरुजी

धनगर उपचारावरुन धनगर आरक्षण आठवले. तुमचे लाडके आपल्या सुपीक डोक्यातून आरक्षण लगेच देण्याची हमी दिली होती. अभ्यास झाला का? की ह्या टर्मला गॅप घेणार?

In reply to by विशुमित

आरक्षण, अनुदान, कर्जमाफी, वीजबिलमाफी, सवलती, मोफत गोष्टी, नुकसानभरपाई इ. च्या पलिकडे कधी तरी जायचा प्रयत्न करा.

In reply to by विशुमित

आरक्षण, आंदोलन, अनुदान, कर्जमाफी, वीजबिलमाफी, सवलती, मोफत गोष्टी, नुकसानभरपाई . . . फक्त याच गोष्टी कशा आठवतात?

In reply to by सालदार

चव्हाण मुहूर्तावर करायचे शस्त्रक्रिया मृत संध्या सोनवणे यांच्यावर छातीतील गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यासाठी 20 फेब्रुवारी रोजी रात्री आठची वेळ दिली होती; परंतु सध्या ग्रह चांगले नसून "यमाची घंटा' असल्याचे सांगत नऊ किंवा दहा वाजण्याचा मुहूर्त चांगला असल्याचे सांगितले व रुग्णाला त्रास होत असतानादेखील त्यांनी उशिराने शस्त्रक्रिया केली. त्यानंतर अतिरक्तस्राव झाल्यानंतर तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये हलविण्यास सांगितले. त्यानंतर डॉ. सतीश चव्हाण यांनी सोनवणे कुटुंबीय व जगताप कुटुंबीयांना "देवावर विश्‍वास ठेवा सर्व काही ठीक होईल' असे सांगत दीनानाथ रुग्णालयात मांत्रिकाद्वारे मंत्रोच्चार केले. डॉ. चव्हाण पंचांग पाहून मुहूर्तावर सर्व शस्त्रक्रिया करीत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणानंतर मंगळवारी स्वारगेट येथील चव्हाण नर्सिंग होम दिवसभर बंद ठेवण्यात आले होते. रुग्णालयाच्या मुख्य दरवाजावर कोहळा, घोड्याचा नाल आणि देवतांच्या तसबिरी असल्याचे निदर्शनास आले.

मांत्रिकाकडून उपचार करून घेणे आणि एखाद्या धनगराकडून उपचार करून घेणे यात फरक नाही. हा हा हा , एका डॉ ने धनगराच्या औषधाची सांगीतलेली गोष्ट आठवली !!

In reply to by डँबिस००७

सामान्य माणसाने धनगराकडून उपचार घेणे आणि एका आधुनिक वैद्यकशास्त्राच्या पदवीधराने (स्वतःच्या शास्त्रात ठोस आणि पुराव्याने सिद्ध झालेले उपचार उपलब्ध असताना) धनगराकडून स्वतःला चुना लावून घेणे यात काय फरक आहे तो लोकांनीं स्वतः जाणून घ्यावा.

In reply to by विशुमित

कोणाच्या तरी राजकीय फायद्यासाठी कितीही आंदोलने करा. आंदोलन पेटविणा-यांना व करणा-यांना काहीही फायदा होणार नाही.

In reply to by विशुमित

आता काकासाहेब कोणती नवी खेळी करायची याचा विचार करत असतील. जितके बार काढत आहेत सगळेच फुसके निघाले.

In reply to by सुबोध खरे

म्हणजे शेतकर्यानी लाल झेंडे घेऊन मोर्चा काढला ते 'यांच्या' मुळे?? एक म्हण वापरली असती पण ह्या फोरमवर नको.

In reply to by विशुमित

नाही आमचे काकासाहेब मुख्यमंत्री असताना ५०,००० चा गोवारी आदिवासींचा मोर्चा नागपूरला (२३ नोव्हेंबर १९९४) आला होता तेंव्हा त्यांना भेटण्याची साधी तसदी सुद्धा (सौजन्य हा शब्द मोठा वाटतो) साहेबानी घेतली नव्हती त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ लोकांचा बळी गेला होता आणि ५०० जण जखमी झाले होते. पण साहेबाना प्रगतीची आणि कल्याणाची जास्त काळजी होती. याची आठवण झाली

In reply to by श्रीगुरुजी

मला तर शंका ( संशय ) आहे की ही अंदोलनं सरकार पुरस्कृत तर नाहीत ना. बंद दरवाज्यातून लगेच तोडगा निघतो आहे आणि प्रश्न सोडवले म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतली जाते सरकार ने मोर्चा सुरू झाला तेव्हा पासूनच रुग्णवाहिका आणि ईतर सोयी पुरविल्या होत्या. दाल मे जरूर कुछ काला है.

In reply to by श्रीगुरुजी

काकासाहेब मुख्यमंत्री असतात गोवारी आदिवासींचा ५०,००० चा मोर्चा नागपूरला गेला होता (२३ नोव्हेंबर १९९४). काकासाहेबांनी त्यांना भेटण्याची तसदी सुद्धा घ्यावीशी वाटली नव्हती.ते तातडीने मुंबईला परतले होते. तेथे झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ जणांचा बळी गेला आणि ५०० च्या वर जखमी झाले होते. पण "कल्याण आणि प्रगती" जास्त महत्त्वाची होती.

In reply to by सुबोध खरे

गोवारी अंदोलनातील चेंगराचेंगरी एक दुर्दैवी घटना होती यात माझ्या मनात काही दुमत नाही. गोवारी अंदोलनातील चेंगराचेंगरी मध्ये दाणी आयोगाने तात्कालिन सरकारला क्लीनचीट दिली होती ती सुद्धा युती सरकारच्या काळात. बाकी या संदर्भातील सगळे धागेदोरे माझ्या पेक्षा तुमच्या पिढीला जास्त माहिती आहे. तरी देखील आजोबांना विचारून आणखी मुद्दे मांडतो.

In reply to by विशुमित

गोवारी आदिवासींचा ५०,००० चा मोर्चा नागपूरला गेला होता (२३ नोव्हेंबर १९९४). काकासाहेबांनी त्यांना भेटण्याची तसदी सुद्धा घ्यावीशी वाटली नव्हती साहेबाना क्लीन चिट मिळेल यात कोणता मोठा मुद्दा आहे. त्यांनी काही आदिवासींचे हत्याकांड केले असे कुणाचेही म्हणणे नाही. एवढे सगळे आदिवासी तेथे येऊन त्यांना साधे भेटण्याचे किंवा मागण्या ऐकून घेण्याचे "सौजन्य" साहेबाना नव्हते एवढेच मला म्हणायचे आहे. पुढे काय काय झाले हे सर्वाना माहित आहेच

In reply to by माहितगार

प्रतिसाद हि चर्चा मुख्यत्वे कम्यूनिस्ट मोर्चाविषयी झाली तेवढ्याच अर्थाने घेण्यात यावा हे. वे.सांनल

सुरु करायची वेळ आली आहे, या धाग्यावर २०० + प्रतिसाद झालेत.

गोरखपूर आणि फुलपुर मध्ये झटका बसण्याची दाट शक्यता दिसतेय! ========================== स्वतःला राष्ट्रीय राजकारणात (खासकरून पंतप्रधानपदाच्या दावेदारीत) प्रस्थापित करण्याची घाई तोंडावर पडण्यास (पडल्यास) कारणीभूत असेल काय? ========================== जातीय गणिते घालून भाजपला रोखले जाऊ शकते हे परत एकदा सिद्ध होण्याच्या मार्गावर, माझे वैयक्तिक मत!

In reply to by बिटाकाका

3 साठी- काही महिन्यांमधेच विकासाला मतदान करणारा मतदार (राजा) अचानक जातीपातीचा विचार कसा काय करायला लागला? मला तर बाबा EVM चा प्रताप वाटतोय.

In reply to by बिटाकाका

3 साठी- काही महिन्यांमधेच विकासाला मतदान करणारा मतदार (राजा) अचानक जातीपातीचा विचार कसा काय करायला लागला? मला तर बाबा EVM चा प्रताप वाटतोय.

In reply to by विशुमित

तीनदा लिहिले तरी मी लिहिलेल्या वाक्याचा अर्थ तुम्हाला कळला नाही हेच लक्षात येते. विकासाला मतदान करणाऱ्यांच्या संख्येपेक्षा जातीला मतदान करणारे (सर्वच पक्षांचे) जास्त आहेत. यातील फुटून प्रत्येकाची वोट बँक बनलेले एकत्र आणले तर भाजपाची वोटबँक आणि विकासावर मतदान करण्यासाठी त्यांच्याकडे वळलेला मतदार यांना धोबीपछाड दिला जाऊ शकतो असा त्याचा अर्थ आहे. ============================== अगदी विरोधी विचारधारा असणारे पक्ष (निदान) मोदीविरीधासाठी तरी एकत्र ये आहेत हेही नसे थोडके. ============================== फडणवीस मध्ये म्हणाले होते कि विरोधी पक्ष पोटनिवडणुकांपुरतेच राहिले आहेत. संपूर्ण भारतातच पोटनिवडणूक लावता येते कि कसं ते बघायला पाहिजे :).

In reply to by बिटाकाका

विकासाला मतदान करणाऱ्यांच्या संख्येपेक्षा जातीला मतदान करणारे (सर्वच पक्षांचे) जास्त आहेत. तसे असते तर आधीच मतदान त्याप्रमाणे केले असते की. कोल्ह्याला द्राक्षे आंबट , तसे भाजपे हरले की लोकाना विकास नको , जात हवी असते , असे बोलतात.

In reply to by manguu@mail.com

मध्ये ते भाजप जिंकला की ख्रिश्चनांनी मते दिली वगैरे म्हणणारे कोण होते हो? ====================== पण मी काय म्हणतो, जर भाजपच्या विकासलाच लोकांना नाकारायचे आहे तर ते बुआ-बबूआ कशाला? लोकांनी तसंही हरवलंच असतं की! ====================== बादवे, ते भाजप एव्हीममध्ये घोळ घालून जिंकतंय वगैरे झालं का सेटल?

In reply to by बिटाकाका

3 साठी- काही महिन्यांमधेच विकासाला मतदान करणारा मतदार (राजा) अचानक जातीपातीचा विचार कसा काय करायला लागला? मला तर बाबा EVM चा प्रताप वाटतोय.

राम मंदिर आंदोलनाशी निगडीत भाजपाचे पाच वेळचे खासदार विनय कटियार यांचे राज्यसभेचे तिकीट यंदा कापण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिरप्रश्नी आंदोलन जिवंत ठेवण्यात कटियार यांची महत्वाची भूमिका आहे. सन १९८४ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपा दोन लोकसभा मतदारसंघावरून १९८९ मध्ये ८५ जागांवर पोहोचवण्यामध्ये त्यांचेही मोलाचे योगदान आहे. पण यंदा उत्तर प्रदेशमधून रिकाम्या झालेल्या राज्यसभेच्या १० जागांसाठी भाजपाने त्यांना उमेदवारी दिली नाही. कटियार यांच्यापेक्षा कनिष्ठ सहकाऱ्यांना यावेळी प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे कटियार समर्थकांमध्ये आता चर्चा रंगली आहे. राम मंदिर निर्मितीसाठी नरेंद्र मोदींवर दबाव आणणे आणि अडवाणी यांना पाठिंबा देण्याची किंमत कटियार यांना चुकवावी लागल्याचे त्यांचे निकटवर्तीय दबक्या आवाजात म्हणत आहेत. ज्या आठ नेत्यांना भाजपा उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर पाठवत आहे, ते सर्व कटियार यांच्यापेक्षा कनिष्ठ आहेत. यामध्ये अरूण जेटली, विजयपालसिंह तोमर, सकलदीप राजभर, कांता कर्दम, अनिल जैन, जीव्हीएल नरसिम्हा राव, हरनाथसिंह यादव, अशोक वाजपेयी. जेटली आणि राव हे राष्ट्रीय स्तरावरील चर्चित नेते आहेत. तर अशोक वाजपेयी हे समाजवादी पक्ष सोडून भाजपात आले आहेत. उर्वरित पाच नेते हे उत्तर प्रदेशमध्येच जास्त परिचित नाहीत.

In reply to by manguu@mail.com

या केसचे माहित नाही पण मोदी टप्प्या टप्प्याने कोणाच्या डोळ्यात येणार नाही असे बरेच लोक बदलत असावेत असा माझा व्यक्तिगत कयास आहे.

. बारमध्ये लवकरच एमआरपीमध्ये दारु विकत घेणं शक्य होणार आहे. राज्य सरकार याबाबतचा परवाना देण्याच्या विचारात आहे. राज्यातील बारना FL 2 परवाना जारी करण्याचा विचार फडणवीस सरकार करत आहे. महसूल वाढवण्याच्या दृष्टीने ही पावलं उचलण्याची तयारी आहे. यामुळे उत्पादन शुल्कात दहा टक्के वाढ होण्याचा सरकारचा अंदाज आहे. एफएल 2 परवाना मद्य विक्रीची परवानगी देतो, मात्र परिसरात मद्यपान करता येत नाही. सध्या बार आणि परमिट रुम्सना एफएल 3 परवाना दिला जातो. म्हणजेच फक्त अल्कोहोल सर्व्ह करण्याचं लायसन्स. 'आता मद्यप्रेमी बारमधून दारु एमआरपीमध्ये विकत घेऊ शकतात. त्यानंतर हवं त्या ठिकाणी मद्यपान करु शकतात.' असं महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. वाईन शॉपमालकांना मात्र या निर्णयाची धास्ती वाटत आहे. आपल्या व्यवसायावर परिणाम होण्याची भीती वाईन शॉपधारकांनी व्यक्त केली आहे. वाईन शॉप संघटनांनी याविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे. चालू आर्थिक वर्षात राज्य सरकारने एक्साईज ड्युटीतून 15 हजार कोटी रुपये मिळवण्याचं लक्ष ठरवलं होतं. जानेवारी अखरेपर्यंत 23 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. 'प्रस्ताव विचाराधीन असून अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. अवैध मद्यविक्री कमी करुन राज्य सरकारचं महसूल वाढवण्याचं उद्दिष्ट आहे' अशी माहिती उत्पादन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सध्या बार दारुवर 5 टक्के व्हॅट आकारतात. एफएल 2 परवाना दिल्यावर व्हॅट नाहीसा होईल, असं बावनकुळे म्हणाले.

फुलपूर व गोरखपूर मतदार संघात भाजपाचा ओव्हर कॉंन्फिडन्स त्यांना नडला. देशात आजपर्यंत झालेल्या सर्व पोटनिवडणुकात भाजपाचा सातत्याने पराभव होत आहे. २०१९च्या निवडणुकीत समजा एनडीएने निवडणुक जि़कलीच तरिही नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायची आशा आता अंधूक होत आहे. सातत्याने सर्वसामन्य व मध्यम वर्गातील जनतेच्या विरोधी घेतलेले निर्णय (मग ते कितीही लोकउपयोगी असले तरी) भाजपाला खूप महाग पडणार आहेत.

In reply to by प्रसाद_१९८२

कर चुकवू पाहणारा व्यापारी वर्ग,उच्च-मध्यमवर्ग मोदींवर नाराज आहे असे दिसते आहे. नोटाबंदींनंतर सोन्या-चांदीचे व्यापारी बरेच नाराज झाले होते असे वाचले होते. २०१९ मध्ये भाजपाला ह्या वर्गाचा मोठा फटका बसायची शक्यता वाटते. त्यात राम-मंदीर वगैरे मुद्दे भाजपावाल्यांनी ताणले तर बघायलाच नको.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

फुलपुरचे माहीत नाही पण गोरखपूर मध्ये योगी आदित्यनाथांनी दिलेले उमेदवार डावलून शहांनी स्वतःचा उमेदवार दिला होता. ही नाराजी भोवली असण्याची शक्यता आहे, अर्थात योगी यांना ही नाराजी हाताळता आली नसेल तर तोही त्यांचाच पराभव आहे म्हणा!!