Skip to main content

*पद्मावतीच्या भ्रमाचा भोपळा अन् वर"करणी" धुडगूस*

लेखक ss_sameer यांनी रविवार, 28/01/2018 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
अखेरीस सर्व (तथाकथित) संस्कृती रक्षकांच्या विरोधास न जुमानता "पद्मावती" चे थेटरात आगमन झालेच. माफ करा, टंकलेखनाच्या चुकांकडे कानाडोळा करावा, संपूर्ण लेखात "पद्मावती" छापण्यात आले असले तरीही (तथाकथित) संस्कृती रक्षकांनी आणि मा. श्री. श्री. संजय लीळा भन्साळी यांनी ते "पद्मावत"(च) आहे असे समजून लेख वाचण्याची विनंती. (विनाकारण) उत्सुकता वाढवणारा क्षण आल्यासरशी तमाम रसिकजनांनी त्यावरती उड्या हाणल्या. चित्रपटाच्या प्रदर्शनपूर्व (जास्तीचे) पैसे भरून चित्रपट पाहण्याची संधी पूर्ण करता आली. या सर्व घटनांबद्दल सर्व (तथाकथित) संस्कृती रक्षकांचे मा. श्री. श्री. संजय लीळा भन्साळी यांचेकडून आभार. या सकल घटनांचे रुपरंग पाहता, आम्हास १९३० ते १९४७ दरम्यान च्या निवडणुकांचे दिवस आठवले. "मुस्लिम लीग" नामक एक पक्ष ज्यांच्याकडे लोकसभा वा राज्यसभेत पूर्ण राहू द्या परंतु अर्धे देखील बहुमत नव्हते, त्या ठिकाणी त्यांची मंत्रिमंडळात पन्नास टक्के मंत्रिपदाची मागणी होती. अर्थातच या मागणीस सभ्य भाषेत "हेकटपणा" म्हटले जाऊ शकते किंवा शेलक्या शब्दात "बिनडोक" म्हणता येईल. करणी सेनेच्या मागणीस काय म्हणायचे ते वाचक आपसूक ठरवतीलच. भ्रमाचा भोपळा अन भ्रमाचा फुगा दोन्ही फार काळ टिकाव धरू शकत नाहीतच. (जोवर त्यास झाकपाक संस्कृतीची लागण होत नाही.) सत्य हे आज नाही तर उद्या बाहेर येतेच. कोट्यवधी रुपयांच्या नाक आणि डोक्याची मूल्ये आजपासून कवडीमोल झालीत याचे आम्हास दुःख वाटत आहे. (आमच्या पेक्षा अधिक दुःख मा. श्री. श्री. संजय लीळा भन्साळी अन कु. दिपीकेस वाटत असावे.) खिलजीच्या ज्या प्रणय प्रसंगाबाबत चर्वितचर्वण केले जात होते, अन ज्या प्रसंगाच्या बळावर (तथाकथित) संस्कृतीरक्षकांची धुडगूस चालू होता असा कोणताही प्रसंग संपूर्ण चित्रपटात नाहीच आहे हे वर"करणी" तरी प्रेक्षकांना समजलेच आहे. (परन्तु प्रणयप्रसंग चित्रपटात नसल्याने तमाम "शौकीन" निराश झालेत. तेव्हा भो संजया - पुढील चित्रपटात प्रणय प्रसंग असूच द्या अशी अपेक्षेवजा मागणी.) आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने झाकलेलीं कु. दीपिकाची कंबर यामुळे पुनःश्च आपण आपल्या संस्कृतीचे रक्षण केल्याचा कोण अभिमान त्या चित्रपट गृहात ओसंडून वाहत होता याचे वर्णन आम्ही कोणत्या शब्दात करू! (येथे पुन्हा एकदा "शौकीन" निराश झालेत हे आम्ही नमूद करू इच्छितो.) भारतीय संस्कृती ही केवळ सहनशील नाही तर वेळप्रसंगी त्यात शस्त्र हाती धरून संस्कृती नाश करणाऱ्या गोष्टींस मुळापासून उपटून टाकण्याचे सामर्थ्य देखील आहे आणि अशाही प्रकारे आपण संस्कृतीतील हिंसेचे प्रदर्शन या निमित्ताने भरवू शकलो, घडवू शकलो, ही या संजयाची "करणी". वाघाने एकदा सावज हेरले की तो ते मारण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. सावजास एकदा माहीत पडले की आपली शिकार होणार, तेव्हा सावज चौखूर उधळत धावते म्हणून वाघास (बडेजाव माजविणेकरिता तरी ) सावजाचा पाठलाग करावा लागतो. तैसेच झाले असावे. प्रथम (तथाकथित) संस्कृतीरक्षकांनी सावज हेरले पण गवसत नाही असे लक्षात आले. चित्रपटात आक्षेपार्ह काही नाही याची जाणीव झाली तसे हेकटपणे चित्रपट पाहणे नाकारले. आता मात्र भन्साळींनी चौखूर उधळले म्हणून हे (तथाकथित) संस्कृतीरक्षक बडेजाव माजविणे करीता हिंसाचार करतांना दिसत आहेत. मुदलात आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे सापच नाही परंतु काठ्या आपटणे सुरुच ठेवावे लागले करण एका असत्यास लपविणे करिता असत्याची माळ उघडावी लागते. भोके असणाऱ्या वस्त्रांतून हवा लागून थंडी वाजतेच तशीच यांना हुडहुडी भरली. त्या थंडीवर उपचार म्हणून यांनी हिंसाचाराच्या शेकोट्या पेटवल्या. नुकताच यांच्यातील परमपुरुष नरवीरांनी भविष्यात अत्यंत धोकादायक असणाऱ्या लहान अजाण बालकांच्या गाडीवर लक्ष्यभेदी हल्ला केलाय. प्रसिद्धधी साठी अमाप खर्च करूनही जे शक्य झाले नसते त्याची सिद्धता झाली. याबद्दल संजयाचे अंतः"करणी" आनंदाचे धुमारे फुटले आहेतच. खाजगीत एक गोष्ट म्हणजे, या घटनेनंतर संजयाच्या भ्रमणध्वनीवर 'किती सांगू मी सांगू कुणाला...!' चे गाणेही वाजते आहे. सकल गोष्टी अंती..... सुज्ञांच्या मनास एक प्रश्न विचारावासा वाटतो की हे जे संस्कृती नामक अगम्य गोष्टीवरती चतुरस्त्र आणि हिणकस प्रदर्शन चालले आहे ते पटते आहे का? नवसाकरिता असो वा खाण्याकरिता - हिंसा ही अखेरीस हिंसाच असते. ती गाय वा बकरी वा घोडा अशी वेगवेगळी वाटण्यात आणि त्यावरून धार्मिक राजकारण करण्यात कितपत तथ्य आहे? धार्मिक किनार वाढवण्याच्या प्रयत्नात माणुसकीचा दृष्टिकोण संकुचित होतो आहे यावर कुणी विचार का करत नाही?असल्याच संकुचित दृष्टीकोनातून बेगडी सामाजिक रचना अस्तित्वात येते आणि मानवीय सह-संबंधांचे धागे उसवत जातात. धार्मिकतेच्या नावावर पोळी भाजणारी मंडळी - मग ती लाल हिरव्या भगव्या निळ्या काळ्या कोणत्या का झेंड्या खाली असेना, त्यांना पाठिंबा तुम्हा आम्हा सारख्या सामान्यांतूनच मिळतो. जोवर आपण ही लक्तरे झुगारणार नाही तोवर आपले अस्तित्व चमकून दिसणार नाही. आणि आम्हास सध्यातर "हर शाख पर उल्लू बैठा" दिसतोय. त्यामुळे भविष्यातही असेच पद्मावतीचे भ्रमाचे भोपळे फुटत राहणार आणि वर"करणी" धुडगूस वाढत राहणार.

वाचने 35881
प्रतिक्रिया 125

प्रतिक्रिया

In reply to by manguu@mail.com

मोगा खान नाक कापल्यावर तेथे दोन भोकं दिसली की झालं. कुणाला नाक दाखवायची गरजच काय? बाकी 52 वर्षाच्या प्रेषित महंमद यांच्या 8 वर्षाच्या 13 व्या बायकोबरोबर नाच असलेला चित्रपट सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून हे पुरोगामी लोक मान्य करतील काय?

In reply to by सुबोध खरे

असा चित्रपट तयार केला तर जमात-ए-पुरोगामी त्यावर बंदी आणण्यासाठी आकाशपाताळ एक करतील. जमात-ए-पुरोगामी हे जमात-ए-इस्लामी इतकेच (कदाचित जास्तच) जमात-ए-हरामी आहेत.

In reply to by सुबोध खरे

करणी सेनेकडे नाक नेले , तर ते बोलणार तिचेच आहे कशावरुन ? तिचा फोटो नेला , तर ते बोलणार - फोटो फोटोशॉप् असेल त्यामुळे नाकाबरोबर दीपीकेलाही न्यावे लागेल , तिचा आयडी म्हणून आधारकार्डही लागेल !

In reply to by सुबोध खरे

त्यांची सर्वच अवतारात "नाक" खुपसण्याची परंपरा आहे, ती त्यागून कसे चालेल त्यांना!!!!!!! अखिल मिपा गाजर गवत निर्मूलन समितीचे फुटकळ सदस्य नाखु

https://en.m.wikipedia.org/wiki/Padmavat मूळ पद्मावतमध्ये पद्मावतीच्या प्राप्तीसाठी दोन राजपूत राजे लढतात , मरतात आणि पद्मावती सती जाते . ( जोहर नव्हे ). तो दुसरा राजपूत राजा किती शहाणा ! पद्मावतीचा त्या पहिल्याबरोबर विवाह झालेला असताना तिच्या प्राप्तीसाठी युद्ध करतो. खिल्जीचा कथेमध्ये प्रवेश हा अगदी शेवटी आहे. मूळ कथा सुरस आणि चमत्कारिक पद्धतीची आहे.

https://m.timesofindia.com/entertainment/hindi/bollywood/entertainment/… Malaysia reportedly became the first country to ban the screening of ‘Padmaavat’ citing communal uneasiness. Malaysia, a Muslim-majority country, has banned the film over concerns regarding ‘sensitivities of Islam’. Malaysia's Film Censorship Board (LPF) put the movie in its 'not approved' list and signed its age rating section as 'not relevant'. According to reports, a movie producer familiar with LPF's ratings told a leading Malaysian news portal that 'not relevant' remark signifies banned movies which are likely to incite communal uneasiness and hatred. Unlike in India, Malaysia's censor board has the ultimate power in terms of allowing or disallowing a film from screening. Their verdict cannot be questioned or upheld by any court of law.

जालावर गप्पा मारल्यावर मला असे लक्षात आले कि माझ्या सारखे बरेच लोक असे आहेत ज्यांना त्या पद्मावतीच्या इतिहासाची काही पडली नाही कि संजय लीला भन्साळी बद्दल काहीहि वाटत नाही. राग वाटतो तो केवळ या पुरोगामी सुडो सेक्युलर लोकांच्या दांभिकपणाचा. बाकी बॉलिवूड किंवा संजय लीला भन्साळी धंद्यात "बुडाला" तर दुःख होण्याऐवजी आनंदच होईल. स्वतःच्या आईलाही पैशासाठी दावणीला बांधणारे विधिनिषेधशून्य लोक आहेत ते. सिनेमा बघण्याचा प्रश्नच येत नाही. खिशातील पैसे टाकून स्वतःच्या अमूल्य वेळेचा अपव्यय करणे नाहीच. बाकी करणी सेना, खाप पंचायत, आणि एम आय एम सारखे लोक यांच्या विचारसरणीत फारसा फरक नाही. दहाव्या किंवा पाचव्या शतकातील विचारसरणीचे लोक आहेत. संताप फक्त फुरोगामी, सुडोसेक्युलर आणि डाव्या लोकांच्या "निवडक" बाजू घेण्याच्या हलकटपणाचा येतो.

In reply to by सुबोध खरे

अगदी माझ्या मनातलं बोललात.. सवंग प्रसिद्धीसाठी अश्या प्रकारच्या स्टोरी मुद्दाम घेण्याच्या त्याच्या वृत्तीला चाप लागला पाहिजे.

In reply to by सुबोध खरे

पद्मावतीच्या इतिहासाचं काय घेऊन करायचं ? पद्मावतीच्या प्राप्तीसाठी दोन राजपूत आपापसात लढून मेले .. पद्मावती व तिची सवत नागमती नवर्याबरोबर सती गेल्या. या संहारानंतर खिल्जीचे सैन्य तिथे पोचले . उरलेले लोक व खिल्जीचे सैनिक यांच्यात पुन्हा लढाई झाली. खिल्जीची गडावर सत्ता प्रस्थापित झाली पण त्याला पद्मावतीच्या चितेची राखच मिळाली. http://kavitakosh.org/kk/पद्मावती-नागमती-सती-खंड_/_मलिक_मोहम्मद_जायसी http://kavitakosh.org/kk/पद्मावत_/_मलिक_मोहम्मद_जायसी अख्खे काव्य उपलब्ध आहे. करणीसेनेला कदाचित भीती असावी की भन्साळीने दोन राजपूत लढून मेले हे दाखविले की काय ! पण भन्साळीच्या सिनेमात तो दुसरा राजा नाही . पद्मावतीचा नवरा व खिल्जी यांची लढाई होते. पण् त्यात खिल्जीचा परममित्र ( चरममित्र ! ) मलिक गफूर कपटाने बाण मारून पद्मावतीच्या नवर्याला ठार करतो, असे भन्साळीने दाखवलेले आहे. गफूर झालेला तो नट त्याचा चेहरा आणि आवाज त्याचा पहिला सिनेमा 'राबता' मध्ये अगदीच विचित्र वाटला होता. यात मात्र त्याचा रोल चांगला जमलाय.

In reply to by manguu@mail.com


In reply to by manguu@mail.com

हे सर्व तुम्ही वाचलं का? का असंच जालावरच्या दुवे? स्वतः वाचायचे नाहीत पण पुढे ढकलायचे>

In reply to by सुबोध खरे

दुवे मी स्वत: शोधले आहेत. शेवटची दोन प्रकरणे वाचलीत.. प्रत्येक खंडाच्या टायटलवरून त्यात असलेले प्रसंग लक्षात येतील .

In reply to by manguu@mail.com

सदर इतिहास वादातीत आहे. आम्ही स्वतः 2008-9 मध्ये चितोडगडावर गेलो, same गोष्ट सांगितली तिथल्या guide ने. त्यामुळे सवंग लोकप्रियता आणि भन्साळी असे आपण म्हणू शकत नाही. इतिहासाला अनेक पदर असतात, प्रत्येक जण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. सर्व चूक नसते आणि सर्वच बरोबर नसतात, शिवाजी महाराष्ट्रात राजे असतात आणि सुरत गुजरात मध्ये चोर दरोडेखोर...

In reply to by ss_sameer

शिवाजी महाराष्ट्रात राजे असतात आणि सुरत गुजरात मध्ये चोर दरोडेखोर...
सुरत छापा घटना ते आजच्या घडीला.... गुजरातमध्ये अजून असा मायचा पुत आलेला नाही, जो राजेंविषयी असं काही बरंळंल....

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महाराज शब्द तर अलीकडचा आहे आणि तोही सगळेच वापरत नाही. इतिहासकार तर अजूनही एकेरी शिवाजी च लिहितात. पुन्हा सांगावेसे वाटते, इतिहासाला भावना नसतात, भावना या प्रांतीय असतात. इतिहास तटस्थ आणि त्रयस्थ राहून वाचला तर जास्त कंगोरे मोकळे होतात, भावनिक झालात तर काय होते याची उदाहरणे रोज दिसतातच.

In reply to by ss_sameer

तो अनुवादाचा दोष् असतो. म्हणजे Shivaji was a king . He was very brave. हे मराठीत .... तो खूप शूर होता ... ( ते खूप् शूर होते , असे करायला हवे ) असे होते.

In reply to by ss_sameer

सदर इतिहास वादातीत आहे.
* वादातीत म्हणजे काय वाद असलेले की नसलेले ? * मिथक आणि इतिहास यातील फरक काय ?
......आम्ही स्वतः 2008-9 मध्ये चितोडगडावर गेलो, same गोष्ट सांगितली तिथल्या guide ने.
गाईडने सांगीतलेल्या माहिती निवीवाद असतात हे गृहीत धरता येते का ?
इतिहासाला अनेक पदर असतात, प्रत्येक जण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. सर्व चूक नसते आणि सर्वच बरोबर नसतात,
इतिहासाच्या प्रमाणसाधनाच्या बळावर केवळ खिलजीने एक युद्ध केले आणि जिंकला एवढेच सिद्ध करता येते. उर्वरीत मिथके आहेत; 'मिथकांना अनेक पदर असतात, प्रत्येक जण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. सर्व चूक नसते आणि सर्वच बरोबर नसतात' अशी वाज्य रचना अधिक समतोल आणि सयुक्तीक वाटते. मिपावरील धागा लेख चर्चातून असेल अथवा वृत्त माध्य्माम्नी असेल राजपूत समाजाच्या आक्षेपांची अद्याप दखल घेत्लेली नसल्यामुळे पहाणे मुख्यत्वे भंसाळीच्याच दृष्टीकोणातून होत आहे आणि आपला दृष्ष्टीकोण थोपवण्यात भंन्साळी सध्यातरी यशस्वी दिसतो आहे.

राजा राजस्तानचा. विवाहित होता. त्याला एक पोपट बोलतो .. पद्मावती सुंदर आहे. म्हणून तो सिंहलनगरीला जातो , म्हणजे सीलोन / श्रीलंका !! तिच्यासाठी. एका पोपटावर भरोसा ठेवून राज्य सोडून हजारो मैल , शिवाय समुद्रप्रवास ( नो सेतू , नो पुष्पकविमान ) करुन तो जातो. महिनोनमहिने लागले असणार. मग लोक खिल्जीच्या अय्याशीला का नावे ठेवतात ? आणि राजाच महिनेमहिने दूर जात असेल तर परदेशी मंगोल आणि खिल्जी राज्य गिळायला येणारच ना ?

In reply to by manguu@mail.com

आणि राजाच महिनेमहिने दूर जात असेल तर परदेशी मंगोल आणि खिल्जी राज्य गिळायला येणारच ना ?
खिलजी राजा गावात नसताना आला नाही हे क्षणभर बाजूस ठेऊ. पण घराचा मालक घरी महिनेच नाही वर्षघरातर्षे नसला तरी बाहेरच्यांना घर लुटण्या जोगी परिस्थिती निर्माण होत असेल पण असे घर लुटण्याचा नैतीक किंवा कायदेशीर परवाना मिळत नसतो. राम- लक्ष्मण घरात नाही म्हणून इतरांसाठी सीतेच्या अपहरणाचा परवाना तयार होत नसतो.
म्हणून तो सिंहलनगरीला जातो , म्हणजे सीलोन / श्रीलंका !! तिच्यासाठी.
श्रीलंका एवजी सिंहल शब्दाचा उल्लेख श्री लंकेत सिंहल लोक रहातात याची कल्पना रचणार्‍यास माहिती असण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी. या मिथकांमध्ये दिलेली तत्कालीन श्रीलंकन राजांची नावे जुळत नाहीत. राजस्थान आणि श्रीलंका दोन्हीकडे घटना नोंदींची पुरेशी व्यवस्था असतानाही -विवाह- घटनेच्या अधिकृत नोंदी आतापावेतो उपलब्ध नाहीत . अनेक कवींनी अंषतः पुर्वाश्रमींच्या काव्यांवरून वेगवेगळ्या पद्धतीने उचलेगिरी आणि अंशतः स्वतःच्या कल्पनेचे पतंग सरमिसळ या मिथकांमध्ये झालेली असणार. पद्मावतीच्या बाब्तीत हे एकमेव कथानक नाहीत बर्‍याच लेखक - कविंनी वेगवेगळ्या कल्पना केलेल्या आहे. यातील अनेक काव्यांचा तौलनीक अभ्यास प्रबंध जिज्ञासूंना शोधगंगा डॉटकॉम वर अभ्यासता येऊ शकतील.

घुमर घुमर हे गाणं बघायला आणि साऊंड सिष्टीमवर ऐकायला लैच भारी आहे. ''आवो जी आवो घूमर खेलबा आवो'' '' आपण साथ साथ घूमर सगळा खेलबा आवो'' ''देवरानी, जेठानी खेले सासू जी घूमर खेले ननद भोजाई खेले बैसा घूमर खेले'' तसंच मिपाकरांचा खेळ पाहता ''मिपाकर घूमर खेले'' असं पाहिजे होतं. -दिलीप बिरुटे (घुमर घुमर खेळून थकलेला) :)

https://youtu.be/ObJeKhrwbhs हा जुना पद्मावती सिनेमा. यात अल्लाउद्दीन खिल्जी त्याच्या पत्नीने केलेल्या कान उघाडणीनंतर पद्मिनीला आपली बहीण मानतो , असे दाखवले आहे !! तेंव्हा करणी सेना नव्हती का ?

भन्साळी डिवचत नसून तो अस्मितांची टोके बोथट करतो आहे. मनोरंजनासाठी तशाही पुराणकथा वापरत्तात.खरा इतिहास कोणाला माहीत अस्तो? वादग्रस्त झाला कि गल्ला चौपट. न पहाण्याचा पर्याय खुला असला तरी लोक कुतुहलशमनासाठी पहातातच.

राजपूतांच्या शौर्याचंच कौतुक चित्रपटात असल्याने करणीसेनेनं आपलं आंदोलन मागे घेतले आहे. सांगा काय करायचं या लोकांचं....? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉ आपण आधीच सुचवलेला उपचार, राजकीय इच्छा शक्ती असेल, तर ज्यांनी धुडगूस घातला, लहान मुलांच्या बसवर दगडफेक केली, त्यांना शोधून पकडून, निबर ठोकून काढलं पाहिजे, नाही तर चालू राहू दे जुमलेबाजी.....

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खालील घटनाक्रम पहा. - राजस्थानमधील २ लोकसभा व १ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी २९ जानेवारी २०१८ मध्ये मतदान होणार होते. - 'पद्मावती' चित्रपट डिसेंबर २०१७ मध्ये प्रदर्शित होणार होता. - या चित्रपटाविरूद्ध रजपूतांच्या करणी सेनेने डिसेंबर २०१७ मध्ये आंदोलन सुरू करून चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलायला लावले. - चित्रपटाविरूद्ध राजस्थान व काही इतर राज्यांमध्ये करणी सेनेने हिंसक आंदोलन केले. - न्यायालयाने व सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या सुधारीत आवृत्तीला मान्यता दिल्यानंतर २५ जानेवारीला चित्रपट प्रदर्शित केला. - करणी सेनेने चित्रपटाला विरोध व आंदोलन सुरूच ठेवले. - पोटनिवडणुकीसाठी करणी सेनेने काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. - मतदान २९ जानेवारीला पार पडून १ फेब्रुवारीला मतमोजणी झाली व तीनही मतदारसंघात भाजपचा दारूण पराभव होऊन काँग्रेसचा विजय झाला. - चित्रपट रजपूतांचा सन्माना करणारा आहे असे जाहीर करून करणी सेनेने ३ फेब्रुवारीला आंदोलन मागे घेऊन चित्रपटाला पाठिंबा दिला. हे सर्व बिंदू जोडले तर या आंदोलनाचा हेतू काय होता व त्यामागे कोण होते हे लक्षात येईल.

In reply to by श्रीगुरुजी

आंदोलनाचा हेतू काय होता व त्यामागे कोण होते हे लक्षात घेणे अथवा आणून देणारी जुमलेबाजी होण्यापेक्षा, जर राजकीय इच्छा शक्ती असेल, तर ज्यांनी धुडगूस घातला, लहान मुलांच्या बसवर दगडफेक केली, त्यांना शोधून पकडून, निबर ठोकून काढलं पाहिजे.....

In reply to by पगला गजोधर

निश्चितच. मुलांच्या बसवर दगडफेक करणार्‍यांना व हिंसक आंदोलन करणार्‍यांना शिक्षा व्हायलाच हवी. पण त्याबरोबरीने आंदोलनाच्या मागे नेमके कोण होते व कशासाठी आंदोलन पेटविले गेले हेसुद्धा शोधणे आवश्यक आहे. या आंदोलनामुळे निवडणुकीत मिळालेले यश पाहून भविष्यात अशी अनेक जातीयवादी आंदोलने वेगवेगळ्या राज्यात पेटविली जातील. महाराष्ट्रात शिवाजी महाराज किंवा आंबेडकरांना पुढे करून जातीय भावना भडकावल्या जातील. कोरेगाव-भीमा मध्ये व गुजरातमध्ये याचा अनुभव आलाच आहे. इतर राज्यात स्थानिक नेत्यांचे निमित्त करून स्थानिक अस्मिता भडकावल्या जातील.

In reply to by श्रीगुरुजी

नोटाबन्दी केली आणि कदाचित पैसे देऊन मत मिळवण्याचा मार्ग बंद झाला. काही हरकत नाही, जातीपातीच्या राजकारणाने मते मिळवू. कुठूनतरी सत्तेवर येऊ. देश जाऊदे खड्डय़ात. समाज राहुदे जातीत विभागलेला. आणि किती सोप्प आहे परत भाजपा सत्तेवर आहे म्हणुन जातीयता वाढली आहे म्हणत शिमगा करायला सगळे मोकळे. पण मला जाम आवडली आहे ही राजकीय खेळी. भाजपला पण चांगला धडा आहे. तुमच हिन्दु मुस्लिम राजकारण तर आम्ही हिन्दु धर्म खिळखिळा करून टाकतो. परत मान वर काढता आली नाही पाहिजे.

In reply to by सुखीमाणूस

भाजपने नोटाबन्दी केली आणि कदाचित पैसे देऊन मत मिळवण्याचा मार्ग बंद झाला. काही हरकत नाही, जातीपातीच्या राजकारणाने मते मिळवू. कुठूनतरी सत्तेवर येऊ. देश जाऊदे खड्डय़ात. समाज राहुदे जातीत विभागलेला. आणि किती सोप्प आहे परत भाजपा सत्तेवर आहे म्हणुन जातीयता वाढली आहे म्हणत शिमगा करायला सगळे मोकळे. संपूर्ण सहमत पण मला जाम आवडली आहे ही राजकीय खेळी. भाजपला पण चांगला धडा आहे. तुमच हिन्दु मुस्लिम राजकारण तर आम्ही हिन्दु धर्म खिळखिळा करून टाकतो. परत मान वर काढता आली नाही पाहिजे. काँग्रेसने देशहिताला तिलांजली देऊन मुस्लिम अनुनय केला नसता तर भाजपला मुस्लिम अनुययाविरूद्ध आंदोलन करण्याची वेळच आली नसती. हाज यात्रा अनुदान, वेगळे व्यक्तिगत कायदे इ. काँग्रेसची देणगी. मोदींनी हाज अनुदान बंद केले तर लगेच काँग्रेसवाले गळा काढायला सुरूवात करतात. तोंडी तलाक रद्द करायला काँग्रेसचा अजूनही विरोध आहे. "तोंडी तलाक हा कुराणचा आदेश आहे व सरकारने त्यात ढवळाढवळ करू नये" असे कालच "पुरोगामी" पवारांनी सुद्धा जाहीरपणे सांगितले आहे. मुल्लामौलवींची दाढी कुरवाळूनच आपण सत्तेत येऊ शकतो या भ्रमात खांग्रेसी अजूनही आहेत.

In reply to by सुखीमाणूस

नोटाबन्दी केली आणि कदाचित पैसे देऊन मत मिळवण्याचा मार्ग बंद झाला.
. आताच्या राजस्थान उपचुनाव व गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, तुम्हाला तुमचे हे विधान कायम ठेवायचे आहें नं ? का पुनर्विचार करून परत तुम्हाला वरील वाक्य चेंज करायला आवडेल... पहा हं, नीट शांतपणे विचार करून सांगा...

In reply to by पगला गजोधर

आमच ठाम मत आहे भाजपला पैसे वाटायची गरज नाही. ते वाटत पण नसावेत. अहो एवढे मोठे धर्माचे राजकारण करतायत ते... भाजपात कुठे गर्भश्रीमंत शिक्षण सम्राट किवा साखर कारखानदार आहेत? हा आता सत्तेची चटक लागली की काय होईल सांगता येत नाही. त्यातुन बाहेरून पक्षात आलेले आहेतच घाण करायला..... बाकी पद्मावतच्या प्रदर्शनाच्या वेळेस खूप आशा वाट्त होती की कॉन्ग्रेस भन्साळी ला पाठिंबा देईल. नथुराम गोडसे चे प्रयोग बंद पाडायला जसे लोक पाठवले तसेच आता पद्मावती चालू ठेवायला फुल्ल मदत करतील. पुरोगामी काँग्रेस पण गप्प राहीली या सगळ्या लोकांचे आवाज पण फक्त 3 टक्के वाला विरुद्ध मोठे असतात. बघा कोणी कौतुक केल का बाजीराव मस्तानी ला किती शांततामय विरोध केला ३ टक्क्यानी

In reply to by सुखीमाणूस

आमच ठाम मत आहे भाजपला पैसे वाटायची गरज नाही. ते वाटत पण नसावेत. अहो एवढे मोठे धर्माचे राजकारण करतायत ते... भाजपात कुठे गर्भश्रीमंत शिक्षण सम्राट किवा साखर कारखानदार आहेत?
एकदमच लॉळ.... आवल्डी हा, तुमची विनोदबुद्धी....

In reply to by सुखीमाणूस

ते पैसे कोण अन कुठे वाटतात म्हणे ? वयात येऊन वीस वर्षे झाली , इतक्या निवडणुका झाल्या , , पण कुणी आम्हाला दोन रुपयेही दिले नाहीत.

In reply to by manguu@mail.com

तुम्ही मुळात काँग्रेसवालेच आहात तेंव्हा तुमचे मत गृहीत धरलेले आहे शिवाय तुम्ही पांढरपेशे. झोपडपट्टीत राहायला जा. एका मतासाठी १००० रुपये पर्यंत मिळतील. माझ्या भावाच्या मोलकरणीला काँग्रेस उमेदवाराने महापालिका निवडणुकी साठी माणशी ५०० रुपये दिले होते. राष्ट्रवादीच्या उमेदवाराने सगळ्यांना खूण केलेल्या १० रुपयाच्या नोटा(४० A सिरीज च्या) वाटल्या होत्या. निवडून आल्यावर नोट घेऊन यायचं आणि १००० रुपये घेऊन जायचं. पडले ती गोष्ट वेगळी. पण मोठा खर्च वाचला. आहे कि नाही शकुनीचे डोके.

In reply to by सुबोध खरे

गंमतच की. आणि इतके असून भाजपाने काँग्रेस , राष्ट्रवादीचे उमेदवार आयात करुन त्याना तिकिटेही दिली.. आता हे लोक नव्या नोटा वाटतात की जुन्या ? अशा लोकानी आता पैसे वाटले तर ते पाप क्वानग्रेसच्या खात्यात की भाजपाच्या ?

In reply to by manguu@mail.com

नव्या नोटा तुम्हाला कोणी देणार नाही आणि जुन्या नोटांचा तुम्हाला काही उपयोग नाही बसा ठणाणा करत भाजप च्या नावाने

In reply to by सुबोध खरे

तळेगाव दाभाडे इथे नगर पालिकेच्या निवडणुकीत प्रत्येक मताला ४००० रू ते देखिल डिमॉनेटायझेशन फुल्ल स्विंगमध्ये असताना नव्या नोटात दिले गेले डॉक. ते पण झोपडपट्टीत राहणार्‍यांना नव्हे, सोसायटीत राहणार्‍या मध्यमवर्गिय मतदारांना. सदर उमेदवार भाजपाचा होता. ही घटना पूर्णपणे खरी आहे.

In reply to by पुंबा

पंचक्रोशीत झालेल्या ४ ग्रामपंचायत निवडणुकीत ३.५ -४ कोटी वाटले/खर्च झाल्याची माहिती आहे. ते सुद्धा नोटबंदी नंतर. सगळे वाटप गुलाबी नोटेत होत होते.

In reply to by पुंबा

सोसायटीत राहणारे मध्यमवर्गिय झोपडपट्टी वाल्यांपेक्षा जास्त लुच्चे झाले आहेत हे माझे निरीक्षण आहे. अपवाद वगळू शकता.

In reply to by पुंबा

बरेच मिपाकर तळेगावात रहातात. कोण उमेदवार सांगा की ! कुठल्या सोसायटीत वाटल्या तिचे नाव सांगा ? पुढच्या वेळी मागता येतील =))

In reply to by श्रीगुरुजी

एक सिनेमा आणि एक लोकल जातीय संघटना यांच्यापुढे भाजपा नांगी टाकत असेल तर मग पाकिस्तानसमोर भाजपा कसा काय टिकणार ओ गुर्जी ?

In reply to by manguu@mail.com

गप केल्या ना की पाकिस्तान विरुद्ध कारवाई करण जास्त सोप्प जाईल. कारण अशाच काही संघटना आहेत ज्या मुस्लिम अतिरेकी लोकांचे उदात्तीकरण करत आहेत. आता तर खात्री वाटते आहे की धर्मांधता आणि जातीयता ही कोन्ग्रेस लाच हवी आहे कारण त्यामुळेच ते सत्तेवर येऊ शकतात. मुस्लिम जितके मागास राहतील तितके राजकारणास चांगले. या सगळ्या राजकारण्यांची फे फे उडेल जर ओवेसी व प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर.

In reply to by श्रीगुरुजी

छान! म्हणजे घटनाक्रम चांगला आहे पण मग मला सांगा भाजपचे साक्षात मुख्यमंत्री इतके आटापिटा का करत होते चित्रपटावर बंदी घालण्याचा? ते पण करणी सेनेमध्ये होते कि काय? इथे मिपावर पण काही "संस्कृतीरक्षक" भलतेच खुश झालेले करणी सेनेचे आंदोलन बघून! "भन्साळ्याला" (आवडता शब्द संस्कृती जपणाऱ्यांचा) कशी अद्दल घडवली चित्रपट पुढे ढकलावा लागला वगैरे... जर खरंच चित्रपट प्रदर्शित झाला नसता तर वर तोंड करून बोलले असते "बघा आमच्यामुळे संस्कृती वाचली" पण श्या! कोर्टाने कोणाचं ऐकलं नाही. आता चित्रपटात आक्षेपार्ह काही दिसत नाही कळल्यावर हवाच गेली! कोण कुठली करणी सेना, तिला आवरायला किंवा प्रमुख लोकांवर कारवाई करायला जमत नसेल तर काय उपयोग इतक्या ठिकाणी शासन असून? आणि आता निवडणुकीत अपयश आले कि इतर ठिकाणी खापर फोडून रिकामे! जणू काही फक्त आम्हीच सज्जन...

In reply to by माहितगार

हि माझी मते नाहीत, केवळ वेगळ्या बाजूचीही माहिती असावी म्हणून वरील २ युट्यूब जोडले आहेत.

पद्मावत आला तेंव्हा मोदीजी का गाव , असा एक पिक्चर आला होता ना ? त्याचे काय झाले ?

In reply to by manguu@mail.com

पद्मावत आला तेंव्हा मोदीजी का गाव , असा एक पिक्चर आला होता ना ? त्याचे काय झाले ?