Skip to main content

भिमा कोरेगाव- स्वतःकडे बघा

लेखक अंतरा आनंद यांनी शनिवार, 06/01/2018 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
"या जय भीमवाल्यांचं काहितरी आहे", "उगाच दंगे करतात, काम करा म्हणावं त्यापेक्षा", " काहि नाही, फडणविसाची खुर्ची यांच्या डोळ्यात खुपतेय" अश्याच सुरातल्या पण संभावित प्रतिक्रिया इथे बघायला मिळत आहेत. आपल्याला कोणत्याही प्रश्नाचा विचार फक्त आपल्या जागेवरूनच करायचा आहे हे खास आहे. (१) भिमा कोरेगाव हा अभिमानाचा विषयच नाही. : मुळात चारपाच वर्षांपूर्वी हे स्मारक आणि त्याबद्द्ल कोणालाही जास्त महित नव्हते परंतू महार रेजिमेंट याला आपल्या अभिमानाचा विषय मानत होती. कोणत्याही समूहाला मग तो रेजिमेंट सारखा ऑफिशियल लढवय्या समूह असो वा जात, सार्वजनिक अभिमानाचा विषय शोधणं हे आपल्या सु-संस्कृतीचा भाग आहे, नाही का? तसंही भावनिक कढ काढण्याखेरीज काही करावं हे आपल्या सुसंस्कृत मनांना नको वाटतं. गेल्या काही वर्षात प्रत्येक समूहाने आपलं असं सार्वजनिक अभिमानस्थळ शोधून त्याचा उदो उदो करणं हे सुरू केलेलं आहे. आधुनिक विचारसरणीशी तुलना करायला गेल्यास प्रत्येक अभिमान स्थळावर प्रश्नचिन्ह उठवता येतील, पण तसं कोणी करत नाही कारण प्रत्येकामागे आंधळी झुंड असते. त्यामुळे प्रत्येक समूह, जातीगट आपल्या अभिमानस्थळाला जास्तीत जास्त ’टीआरपी" मिळ्वण्याच्या प्रयत्नात असतो, त्यातूनच मग त्या त्या गटाचं नेतृत्व उदयाला येतं. आपण एकंदरीतच समाज म्हणून विवेकी असण्यापेक्षा भावनेच्या लाटेवर हेलकावे खाणं स्वाकारतो. (१ अ) मुळात भिमा कोरेगावचं युद्ध इंग्रजांनी जिंकलंच नव्हतं: नसेलही. पण महारांना ते आपल्या पूर्वजांच्या लढवय्येपणाचचं प्रतिक वाटतंय तर वाटू द्या नं. तिथे ते शांतपणे इतके वर्षं जातायत तर काय बिघडलं? या संदर्भात तिथे जमलेल्या लोकांना विरोध म्हणून दुकानं बंद केली गेली, त्यांच्यावर दगडफेक झाली अश्या प्रकारच्या बातम्या आहेत, त्याचं काय? जमलेले लोकं काही आता जाऊन इंग्रजांना आवताण देणार नव्हते. मग अश्या प्रकारे त्यांच्या विरूद्ध जनमत तयार करणं कोणत्या संस्कृतीत बसतं? ब्राम्हण-मराठा सारख्या प्रस्थापित आणि गावपातळीवर मान असणार्‍या जातींना आपापली प्रतिकं लख्ख कराविशी वाटतात, तिथे झुंडीनं जावं वाटतं तर अजूनही मागास असलेल्या गावकुसाबाहेरच्या लोकांनी एवढा विचार करावा ही सक्ती का? (२) राजकिय अपरिहार्यता: प्रत्येक गोष्टीत राजकारण्यांना दोष देणं ही फॅशन बनली आहे. कारण ते सोप्पय. आपणही आपल्या व्यक्तीगत पातळीवर हे राजकारण पुरेपूर खेळत असतो. अश्या जाती विभागणीला, उतरंडीला समाजात मान्यता असते, प्रत्येक व्यक्तीच्या मनात ती उतरंड जागी असते म्हणूनच त्याचा फायदा राजकारणी उठवू शकतात. प्रत्येकाने व्यक्ती म्हणून आपण ही उतरंड पाळतो की नाही (मानतो की नाही असं मी म्हटलेलं नाही. कारण ’मी मानत नाही पण नाती तोडून चालत नाहीत, सवय ’, वैगेरे सुटकेचे मार्ग असतात ) हे मनाला विचारावं. खालच्याला वर येण्यासाठी व्यक्तीगत पातळीवर आपण किती आधार दिलाय हे शोधून पहावं. तसं होत नाही. मागासांच्या वागण्यातल्या विसंगती शोधून, त्यांची आधुनिकता किती बेगडी आहे ह्याकडे बोट दाखवणारे आणि त्यांना वेगळे पाडणारेच मोठ्या संख्येने असतात. (इथे या विषयावर ज्या हिरीरीने लिहीलं गेलंय त्यावरून सिद्धच होत.) "जातीने महापुरुष वाटून घेतले आहेत", असं तोंडाने म्हणायचं आणि फक्त आपल्याच जातीतल्या महापुरुषाचा उदो उदो करायचा ही दांभिकता बहुसंख्यांमध्ये असते, म्हणून तर असे अभिमानी गट तयार होतात आणि राजकारण्यांना आयतं खाद्य मिळतं. जातींनी महापुरुष वाटून घेतलेत म्हणणार्‍यांपैकी किती जणं आंबेडकर जयंती साजरी करतात? नाहीपेक्षा ती आपल्या सोसायटीत साजरी व्हावी असं किती जणांना वाटतं? उलटपक्षी कोणी करत असेल तर "ते जय भीम वाले" म्हणत आपण त्यातले नाही हे प्रकर्षाने दाखवलं जातं. मग वरील तक्रार करताना आपण दांभिकपणे वागत नाही का? किती जणांनी मुलांना राम-कृष्णासोबत बुद्धाच्या गोष्टी सांगीतल्या? किमान स्वत:तरी जाणून घेतल्या? "ही कसली मिरवणूक आहे?" असं विचारणार्‍या पहिलीतल्या मुलाला आंबेडकर- जयंतीच्या मिरवणुकीबद्द्ल "ज्यांच्यामुळे मला प्रमोशन मिळत नाहीय ना त्यांची मिरवणूक आहे" असं उत्तर माझ्या एका कलीगनं दिलं होतं. अर्धवट माहिती देऊन पुढील पिढीच्या मनात अशी विषाची पेरणी केली जाते. (३) पेशवाईत महारांना कमरेला झाडू आणि गळ्यात मडकं बांधून वावरावं लागत होतं हे खरं नाही तसा कागदोपत्री पुरावा नाही:- पलीकडल्या संस्थळावरच्या विद्वान (हे उपहासाने म्हटलेलं नाही, आदर खरा आहे) इतिहाससंशोधकांनी तिथे "याला कागदोपत्री पुरावा कुठेय?" असं विचारलं आणि अर्धवट शहाणे पैलवान इथेही ते विचारत सुटलेत. महार इतके महत्वाचे होते का की त्यासाठी एक कागदी फर्मान सुटेल? कोतवालाला तोंडी आदेश दिले असणं ही शक्य आहे ना? हे ही शक्य आहे की सैन्यात मानाच्या ठिकाणी असलेल्यांना यातून सूट असेल पण सर्वसामान्य महारांना हे लागू असेल. मग ते फक्त सामान्य महारांना लागू होतं म्हणत त्याचं समर्थन करता का? झाडू-गाडगं नसेलही पण "बाजू हो शिवशील, सावली पडली तर विटाळ होईल" हे उद्गार तरी महारांसाठी निघत होतेच ना? मग त्याचं समर्थन करताय का? किती वर्षं हे ऐकावं लागत होतं? अजूनही कुठेतरी लागत असेल. कोपर्‍यातल्या कपात वरून पडलेला चा पिणारी म्हारीण तर आता आतापर्यंत साहित्याचा भाग होतीच ना. ती काय सर्वस्वी काल्पनिक होती? बरं धरून चालू की हे झाडू-गाडगं प्रकरण खोटं होतं. पण महारांना किती गावात मानाचं स्थान होतं? इथे आपण किती गावच्या मातीतले आहोत हे दाखवण्याची होड लागलेली असते, त्यांना हे गावाचं वास्तव माहित नाही का? आताही त्यांना दिला जाणारा मान किती मनापासून येतो? वेळ येताच "गेले आपल्या जातीवर", "हे असंच अन्कल्चर्ड वागणार", "माजलेत" अशी मुक्ताफळं उधळली जात नाहीत का? आणि "माजलेत, पायरी सोडताय" म्हणत हत्याही घडवल्या जातातच ना? (४) आरक्षण म्हणजे फुकटचंबूपणा : आरक्षण लागू केल्यावर द्णादण सगळ्या महारांनी आरक्षणाचा लाभ घ्यावा एवढं शिक्षण त्यांच्याकडे होतं का? आरक्षण घेतलेली पहिली पिढी आता कुठे रिटायर होतेय. पिढ्यापिढ्या शिक्षण, मानाचं जगणं नाकारलं गेलेली, स्वत:ची जमीन नसलेली अशी जमात आता कुठे प्रवाहात येऊ लागलीय तर फुकटचंबूपणा दिसतो. मग ब्राम्हणांनाही आरक्षण हवं म्हणत ब्राम्हण मेळावे का भरवता? आमचे पूर्वज कसे वेदशास्त्रसंपन्न होते म्हणत अभिमान मिरवता त्याच पूर्वजांचा (त्यावेळची जनरीत म्हणून का होईना) काहीजणांना जन्मावर आधारीत उपेक्षेची वागणूक देण्यात सहभाग होताच म्हणून लाजही वाटून घ्यावी का वाटत नाही? यालाच दांभिकपणा म्हणतात. (५) दलितांच्या आंदोलनात नासधूस जाळपोळ होतेच:- इतर आंदोलनात होत नाही का?. स्वघोषित सैनिक काय पुष्पवृष्टी करत आंदोलनं करतात का? जाळपोळीचं समर्थन नाही पण ठराविक समाजाला दोष का देता? रिकामटेकडे आणि समाजकंटक ही नासधूस करतात आणि प्रत्येक आंदोलनात थोडफार होतंच. ते होऊ नये तर ठाम कायद्याचं राज्य हवं (मग त्या राज्यात झुंडीने प्रार्थनास्थळ पाडता येईल का हो? ती सूट द्यायला हवी नाही का? किमान गोमाताचोरांना देहदंड देण्याची गोमातेच्या सुपुत्रांची गुंडगिरी क्षम्य मानायला हवी नाही का? ) (६) प्रकाश आंबेडकरांनी याचा राजकीय लाभ उठवला / त्यांनी चिघळवलं: इथे एवढ्या लिंका फेकल्या गेल्या आहेत. त्यात ही एक ही वाचून पहावी. प्रकाश आंबेडकरांचा ३१ डिसेंबरला प्रकाशित झालेला लेख आहे. त्यात त्यांनी ह्या विजयस्तंभाबद्द्लची मांडणी भावनिक आहे असं म्हटलय. त्यांची मांडणी पोलोटिकली करेक्ट असण्यापेक्शा लॉजिकली करेक्ट असते म्हणूनच निवडणुकीच्या राजकारणात त्यांना स्थान निर्माण करता येत नाही. प्रकाश आंबेडकरांची राजकीय ताकद ती काय आणि अशी आंदोलनं ते करतातच कशी काय? असा एक सुज्ञ प्रश्न आहे. म्हणजे? जे निवडून येऊ शकतात त्यांना अशी हिंसक आंदोलनं करण्याचा फुकट परवाना मिळतो? जे निवडून येत नाहीत त्यांची अशी काही बाजू नसतेच? आंबेडकरांनी हिंसक आंदोलन करा असं म्हटलं होतं का? कोणाला जमवलेल्या जमावावर नियंत्रण ठेवता येतं? (ठेवता आलं असतं तर बाबरी मशीद पाडली गेली नसती. का ती नियंत्रणाखाली जाणून बुजून घडवलेली घटना होती?) (७) दरवर्षी एवढे लोक येत नाहीत यावेळेला मुदाम जमवून दंगल माजवली : एवढी माणसं काय एकदम आकाशातून अवतरली का? ही माणसं एवढ्या मोठ्या संख्येनं येणार याची गृहखात्याला खबर लागत नाही का? [२०० वर्षापूर्वीच्या लढाई बद्द्ल : (१) पेशवे हरले नाहीत त्यांनी गनिमी कावा वापरला (२) इंग्रज हरले पण त्यांनी स्तंभ उभारला (३) इंग्रज जिंकले पण त्यांचं खूप नुकसान झालं इतके किमान पर्याय संभवतात तेवढ्याच जुन्या झाडू गाडगं प्रथेबद्द्ल (१) ती होती (२) नव्ह्ती इतके किमान पर्याय संभवतात मात्र राम होताच आणि तो अयोध्येत विवक्षित ठिकाणीच जन्मला हे ठामपणे सांगीतलं जातं, जणू रामजन्मानंतर घुगर्‍या वाटायचं काम कौसल्यामातेनं यांच्याकडेच सोपवलेलं होतं. ] एखादं उभ असलेलं स्ट्र्क्चर झुंडशाहीने पाडून आर्थिक विकासाकडे वाटचाल करणार्‍या भारतीय समाजाला थेट पुराणकाळात नेऊन दोन दंगलखोर बनविणार्‍या, "खतरेमें" ची हूल देत हिंदू समाजाला गेल्या दशकांपर्यंत आणि अजूनही वेठीला धरणार्‍यांबद्द्ल प्रेम असणार्‍यांनी दोन दिवसातल्या आर्थिक नुकसानीबद्द्ल गळे काढावे हा शुद्ध दांभिकपणा नाही का? हे सर्व या संस्थळावर आलेल्या प्रतिक्रियांबद्द्ल आहे. त्या प्रतिक्रिया बघताना एक लक्षात आलं की मुळात एखाद्या ठिकाणी जमाव मोठ्या संख्येनं येतो त्यावर दगडफेक होते, दुकानं बंद ठेवली जातात, त्यांच्याविरोधात वातावरण तयार केलं जातं, या मूळ मुद्द्यावर कोणीही बोलत नाहीय. जणू काही ते चुकीचं स्मारक पुजताहेत म्हणोन त्यांनी दगड खायलाच हवेत. खरंतर "याच लोकांनी दगड आणून आजूबाजूच्या घरातून साठवून ठेवले असतील आम्हाला मारा म्ह्णून", एवढंच सरळसोट म्हणायचं बाकी राहिलं आहे. हे असतं आपल्याला हवं तेच बघण्याचं आणि सांगण्याचं टेक्निक. पिढ्यानपिढ्याच्या सुसंस्कृतपणाचा अभिमान आणि नव्या युगाचं शिक्षण हे यासाठी छानपैकी वापरता येतं. ’बाबासाहेबांना आम्ही मानतो पण हे आहेत का कोणी तसे?" असं सर्रास म्हणणार्‍या किती जणांमध्ये त्यांच्या त्यांच्या जातीच्या महापुरुषाचे गुण १०% तरी आहेत? अरे ही गावकुसाबाहेर ठेवलेली माणसं आता प्रवाहात येतायत. आता जगणं शिकलेली ही नवीन पिढी ही आधीच्या पिढीचा अशिक्षित वा अर्धशिक्षितपणा, एकंदरीत जगण्यात वाढलेली स्पर्धा, स्त्री-पुरूष समानता, गावाकड्ची आपली माणसं आणि नवीन सुशिक्षित समाजात वावरताना आजूबाजूला गोळा केलेली माणसं यांच्यात वावरण्याचा तोल सावरणे, आपल्या पूर्वज-काळात फारसं अभिमानास्पद काही नाही किंवा जे आहे असं आपण मानतो त्याला समाज मान देत नाही अश्या अनेक पातळ्यांवर लढत असते. संपन्नतेची सुखं उपभोगतानाही स्वप्निल सोनावणे, नितीन आगे सारखी प्रकरण त्यांना आपण आजूनही गावकुसाबाहेरच आहोत याचं वेदनादायक भान आणून देतात, सैरभैर करून सोडतात. व्यक्तिगत पातळीवर छोटे मोठे संभावित अपमान आणि "तुम्ही ते काय!" च्या नजरा असतातच. मास्लोच्या पहिल्या पायरीवरून आताच वर चढलेल्या या लोकांनी थेट चौथ्यापातळीवरचा विचार करावा अशी अपेक्षा बाळगत समाज यांच्याकडे (१) आरक्षणाच्या कुबड्या घेतलेले हे लोक (२) संस्कार आहेत का यांच्याकडे (३) मी म्हटलं बाकी कोणीही आण नवरा/नवरी म्हणून पण जय भीमवाला/वाली नको बाई (४) अच्छा तू *** आहेस? वाटत नाही हे असे अनेक खडे येता जाता फेकत असतो आणि त्यांचेच दगड होऊन अश्या आंदोलनातून समाजाकडे भिरकावले जातात. तेव्हा हे असे खडे आपल्याकडून भिरकावले जाणार नाही याची प्रत्येकाने वैयक्तिकरित्या दक्षता घेतली तरी हे असे भडके उडण्याला थोडाबहुत आळा बसेल. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापटांनी या स्मारकाला भेट देऊन तिथल्या व्यवस्थेसाठी बैठक घेतली एवढंच फेबुवर पोस्ट केलं. त्या पोस्टवर एवढ्या विखारी प्रतिक्रिया आल्यात की हेच का ते सामान्य मध्यमवर्गीय आणि हाच काय तो ब्राम्हणी सुसंकृतपणा, अशी शंका येते. ( कुंभमेळ्यासाठी दुष्काळातही गोदावरीत पाणी ओतलं तेव्हा ते नाही खटकलं या लोकांना.) हाच मानभावी सुसंस्कृतपणा या मागासवर्गीय शहरी लोकांना पदोपदी भेटत असतो (गावच्यांचे प्रश्न आजून वेगळे.) आणि त्या घाणीत पाय बरबटू न देता त्यांना स्वतःचं जगणं अजून चांगलं करायचं असतं. इथे दणादण प्रतिक्रिया देण्याएवढं सोपे नसतं ते एवढ भान तरी ठेवावं. आपल्याला समाजात मान आहे, आपलया प्रतिकांना ही अखील समाजाची प्रतिकं म्हणून मान मिळतो पर्यायाने आपल्याला मान मिळतो तरिही लहानपणी आपल्याला "बामण भट कढी आंबट" म्हणून चिडवत होते हे शल्य जाणवतं तर आपल्याला मानच नाही आपले आई वडील केवळ जन्माने वरच्या जातीतला म्हणून छोट्या वयाच्या व्यक्तीलाही मान देतात, हात जोडतात (हे आता आता पर्यंत उत्तर, मध्यप्रदेशात होतं की नाही? अजूनही असेल) हे बघताना त्या जातीच्या मुलांना वेदना होत नसतील का? जिथे तिथे आपली लायकी काढली जाते आपल्याला कमी लेखलं जातं हे स्वीकारून आत्मसन्मान कसा जपत असतील ते? पूर्वंजांच्या चार कथा उचलून निरूपणं करत बसण्याएवढं साधं नाही ते. सफाईकामात अजूनही ठराविक जातीला अघोषित आरक्षण आहे, जाता का हिरीरीने तिथे आरक्षण नको म्हणत? सवर्णांना चांगलं बोलण, वाचणं बाळकडू घरात मिळालेलं असतं. ५० च्या दशकातल्या बहुसंख्य आरक्षितांना ते मिळालं होतं का? पण उच्चारावरून लिहीण्यावरून , वागण्या बोलण्यातल्या रांगडेपणावरून त्यांना खुसूखुसू हसताना ते हे कुठून शिकतील हे भान असतं का? कुणी उच्च्पदस्थ वा परदेशस्थ नातेवाईक, उच्चविद्याविभुषित परिचितांचं मार्ग दर्शन, आईवडिलांनी साठवलेला पैसा, मिळवलेलं ज्ञान या कुठल्याच कुबड्या आपण नाही वापरल्या का? मग ज्यांच्या अगदी एखादया पिढीपलीकडल्या पूर्वजांनी भिका मागत पोटं भरली (ज्याला जोदार असं गोंडस नाव दिलं गेलं होतं.) त्यांनी एखादी कुबडी वापरली तर त्यांना चोर म्हणावं वाटतं? त्या कुबड्याच आहेत हे वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाला माहित असतं पण "ते जय-भीमवाले " असं म्हणत त्यांना आपण "घेट्टोत" ढकलतो. त्या कुबड्या पुढच्या पिढीला वापराव्याश्या वाटू नयेत असं समाज म्हणून आपण काय करतो? आरक्षणाविरूद्ध इथे गळे काढले जातात मग मेडिकलच्या सीटस जातीची खोटी प्रमाणपत्र देऊन मिळवल्याचं प्रकरण उघडकीला आलं होतं त्याचा निषेध किती जणांनी केला या संस्थळावर? मनोमन तरी किती जणांना वाटलं हे चुकीचं झालं म्हणून? एखादा मागासवर्गीय जनरल जागेसाठी अर्ज करू लागला की "आले हे. स्वत:च्या राखीव जागेतूनच करायचा ना अर्ज, इथेपण यांना हवं" अशी बरोबर उलटी भुमिका घेतली जात नाही का? अश्यावेळी तो माणूस स्वत:ला आजमावण्याचं धाडस कसं करेल याचा विचार अश्या पिंका टाकताना केला जातो का? समाज म्हणून ते नाही तर सवर्ण किती मागासलेले आहेत हेच यातून दिसतंय. आता खरंतर भिमा-कोरेगाव प्रकरणीत ग्रामस्थांनी परस्पर सहकार्याची भुमिका घेतल्याच्या बातम्या आहेत. चूक कोणाचीही असो असं पुन्हा होणार नाही अशी भाषा दोन्ही बाजूकडून झाली आणि ते ही कोणत्याही प्रस्थापित राजकारण्यांच्या नाक खुपसण्याला वाव न देता. ही खूप आशेची गोष्ट आहे. कदाचित इथल्या मंडळीसारखी जानवं या खांद्यावरून त्या खांद्यावर करत सव्यापसव्याला कसरत म्हणण्याची कला त्यांना अवगत नसावी. दोन गटात फूट पडणे हे आपल्या जगणं कठीण होण्याशी थेट निगडीत आहे, याचं गावकर्‍यांना लवकर भान आलं असावं. पण ते झालं हे खरच चांगलं, समुद्रमंथनातून विषाबरोबर अमृतही निघतं हा दिलासा देणारं आहे. या संस्थळावर मात्र शहाण्यांनी विषाचा प्यालाच दाखवत जो काही एकांगी हैदोस घातलाय तो बघता या समाजातलं असल्याची लाज वाटावी. सार्वजनिक ठिकाणी तुम्ही एवढे विष ओकू शकता तर खाजगीत किती विषमय असाल? असो, अश्या बाबतीत यापुढे तरी विवेकाने विचार मांडावा (जमल्यास करावा) एवढीच अपेक्षा. राजकारणी, ब्रिटीश, संघटना या कोणालाही नावं ठेवण्याआधी प्रत्येकाने माझ्याकडून जे मांडलं जातय त्यात तथ्य किती आणि कांगावा किती याचा डोकं स्थिर ठेवून विचार केला तरी अश्या घटना टळायला मदतच होईल. शेवटी समाज म्हणून सगळ्यांनाच पुढे जायचय.

वाचने 123661
प्रतिक्रिया 327

प्रतिक्रिया

21- मुझे विश्वास है कि मैं फिर से जन्म ले रहा हूँ (इस धर्म परिवर्तन के द्वारा). मग गतजन्मीच्या जाती च कौतुक कशाला?

In reply to by अविनाशकुलकर्णी

अविनाशजी.... निदान या जन्मी... एखाद्या महाराने शंकराचार्य व्हावं, आणि शेकडो ब्राह्मणांनी त्या शंकराचर्याच्या पाया पडावं....

In reply to by पगला गजोधर

एखाद्या महाराने शंकराचार्य व्हावं, आणि शेकडो ब्राह्मणांनी त्या शंकराचर्याच्या पाया पडावॅ गजोधर बुवा आमच्यासारखे असंख्य ब्राम्हण भक्तिभावाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पाया पडतात. माणूस कर्तृत्वाने मोठा व्हावा. कोणी " चढवल्याने" नव्हे

In reply to by पगला गजोधर

कुठलाही बहुजन शंकराचार्य का नको? अणि पाय फक्त ब्राम्हणानी का धरावेत सगळ्यानी का नको? उलट कुठल्याही जातीच्या माणसाने शंकराचार्य व्हावे व सर्व जातीतल्या लोकानी त्याना वन्दावे

In reply to by सुखीमाणूस

ते शंकराचार्य आणि पाय वगैरे राहुदेत! आपण जातपात न मानणारे आहोत अशा समजुतीत असलेल्यां प्रत्येकाने एक प्रयत्न करा. तुमचा एखाद दलित मित्र/मैत्रीण आहे? त्याला/तिला आणा मिपावर आणि एक वर्ष एक्टिव ठेवा. बघा जमतय का! इथे साध्या RTE मुळे 'त्यांची' मुलं 'आपल्या'सोबत शिकायला लागली हे सहन होत नाहीय लोकांना. विषवल्ली वगैरे म्हणत सुटलेत आणि शंकराचार्य बनायच्या बाता करतायत......

In reply to by एमी

आजकाल काही चांगल सांगायला गेल की तुमच बामणी शहाणपण शिकवू नका आस ऐकायला लागत. दलित मैत्रिणीलां मिपावर आणून काय बर सिद्ध होईल सामाजिक एकता? शाळेत नक्की सगळ्या प्रकारची मुले असावीत. त्याचा फायदा मुलांनाच होतो. आम्ही तर मुलाना मुद्दाम अशा शाळेत घातले जिथे मिक्स क्राउड असेल. अगदी दोघांच्या शाळाही बदलल्या कारण आधीची शाळा फारच साजूक तुपातली वाटली. सगळ्या मुलांनी आपल्याहून गरीब/श्रीमंत लोकांच्यात सहजतेने वावरले पाहीजे. कुठलाही गंड न बाळगता. आता एकीकडे समानता हवी असे म्हणायचे आणि दुसरीकडे मराठ्यांना वेगळ करायचा प्रयत्न करायचा. अवघड आहे बुवा.

In reply to by सुखीमाणूस

ओ पंत, टेस्टमोनि आहे प्रत्यक्ष दर्शी कडून ... शाळेत नावात "दक्षिण" अर्थी शब्द असलेल्या शैक्षणिक संस्थेत, ऍडमिशन च्या वेळेस, एका विशिष्ट जातीच्या मुलांनाच निवडा/पुढे आणा, आणि मुस्लिम मुले अजिबात नको, पुढे शैक्षणिक वर्षात शाळेच्या प्रतिनिधीतवात भलेही ते ओलांपियाड असो किंवा अजून काही... फक्त बुद्धीवान आडनावाची जमातच निवडा, असे स्पष्ट व्हर्बल ऑर्डर्स आहेत... लवकरच स्टिंग करून पुढे आणूच मॅटर....

In reply to by सुखीमाणूस

आजकाल काही चांगल सांगायला गेल की तुमच बामणी शहाणपण शिकवू नका आस ऐकायला लागत. >> सांगणार्याच्या बोलण्यातला आणि वागण्यातला फरक जाणवत असेल त्याना लगेच; म्हणून असं काहीतरी ऐकावं लागतं...

In reply to by पगला गजोधर

जे महार धर्मान्तर करून इसाई मुसलमान झाले ते का येत नाहीत समारंभाला? त्यांना अभिमान नाही का आपल्या पूर्वाश्रमीच्या जातीचा

In reply to by अविनाशकुलकर्णी

अविनाशजी, या कार्यक्रमाला येणाऱ्या जनतेची "जातीनिहाय व धर्मनिहाय", माहिती/डेटा/संदर्भ आपल्याला देता येईल काय इथे ? म्हणजे ती माहिती अभ्यासून आपल्याला उत्तर देता येईल, मिपावरील सभासदांपैकी कोणालाही....

नसेलही. पण महारांना ते आपल्या पूर्वजांच्या लढवय्येपणाचचं प्रतिक वाटतंय तर वाटू द्या नं. तिथे ते शांतपणे इतके वर्षं जातायत तर काय बिघडलं? >> +१. === इतिहाससंशोधकांनी तिथे "याला कागदोपत्री पुरावा कुठेय?" असं विचारलं आणि अर्धवट शहाणे पैलवान इथेही ते विचारत सुटलेत. महार इतके महत्वाचे होते का की त्यासाठी एक कागदी फर्मान सुटेल? >> जोपर्यंत टाईम मशीनचा शोध लागत नाही तोपर्यंतत 'खरा' इतिहास कळणार नाही. कागद, कलम उपलब्ध असलेले+ लिहिता येणारे जे थोडेफार असतील त्यांनी जे लिहिलं त्यावर विसम्बुन राहायचं. ब्रिटिश काहीतरी लिहिणार, ब्राह्मण काहीतरी लिहिणार, अर्थ लावणारं काहीतरी अर्थ लावणार.... आणि सत्य काहीतरी तिसरेच असणार.... === बाकीचे नंतर वाचते :)

इकडच्या प्रतिक्रिया वाचुन 2 दिवस असलेच विचार येत होते.. बाकी वेळा चांगली असणारी माणसं अशावेळी ईतकी विखारी कशी होतात. तुम्ही खूप पोटतिडकीने लिहिलंय पण त्यातही चुका काढणारे येतील पण त्यातला आशय किती जण समजून घेतील?
असे अनेक खडे येता जाता फेकत असतो
असे खडे फेकणारे तर रोजच दिसतात.

जर तुम्ही मुस्लीम असाल आणि तुम्हाला या देशात असुरक्षित वाटायला लागलं असेल, जर तुम्ही दलित असाल आणि अचानक तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आपला अपमान केला जातो असं वाटत असेल, जर तुम्ही हिंदू असाल आणि अचानक तुम्हाला वाटायला लागलं की हिंदु धर्म धोक्यात आलाय, जर तुम्ही जैन असाल आणि तुम्हाला अचानक वाटतंय की आपल्या परंपरा बंद केल्या जात आहेत, तुम्ही कुठल्याही जातीधर्माचे असाल आणि अचानक तुम्हाला जातीधर्माच्या वादांमुळे असुरक्षित वाटायला लागेल तेव्हा —सोशल मिडियापासुन दूर रहा... — न्युज चॅनलवरची भांडणं पाहु नका आणि एकच काम करा एकदा तुमच्या सभोवताली असलेल्या तुमच्या वेगवेगळ्या जातीधर्माच्या पण जीवाला जीव देणार्‍या मिञांना आठवून पहा... तुम्ही एका सुंदर देशात राहता याचा तुम्हाला अभिमान वाटेल कायप्पा फॉरवर्ड!

लॉजीकल म्हणा किंवा पोटतिडकिने म्हणा, जे काहि टंकलय ते प्रामाणिकपणे अवतरलय म्हणुन हा प्रतिसाद प्रपंच. जातीच्या उतरंडीत दलीत-पददलीतांना अनंत यातना भोगाव्या लागल्या यात कोणाचं दुमत नसावं. ऐकुन खरं वाटणार नाहि, पण जातीव्यवस्थेमुळे जे दु:ख दलीतांनी भोगलं तेच आणि तसच दु:ख प्रामुख्याने ब्राह्मण समाजाने भोगलं. अर्थव्यवस्थेत नगण्य स्थान, आपल्या वाटेला आलेल्या कामाचा घरबंध नसण्याचा मानसीक जाच, सामाजीक अवहेलना (केवळ इतर जातींमधुन नाहि तर अगदी स्वजातीय, किंबहुना स्वजातीय जास्तच), स्त्रीयांची पिळवणुन (केवळ एक स्त्री म्हणुन नव्हे तर ब्राह्मणाच्या घरी जन्माला आलली स्त्री म्हणुन) हे केवळ वानगीदाखल उदाहरणं. जातीय श्रेठत्वाचा अहंकार, थोडीफार सामाजीक जबाबदारीची जाणिव आणि काहि पदं, कधिमधी चार दमड्या गाठीशी, एव्हढ्या भांडवलावर भटांचं दु:ख झाकल्या गेलं. अर्थात, त्याची दलीतांच्या दु:खाशी तुलना होणार नाहि, पण पिढीजात दु:ख भोगल्यामुळे दलीत समाजाचा दंगल सदृश उद्रेक एकवेळ स्वाभावीक म्हणता येईल, पण तो जस्टीफाय होत नाहि. भूकमरीने मरणासन्न झालेल्या माणसाने अन्नाची नासाडी करण्याबाबत जो आक्षेप आहे त्याच पद्धतीचा आक्षेप दलीत समाजाबाबत, मुख्यतः त्यांच्या नेतृत्वाबद्दल ऐकायला मिळतो. भारताचे राजकीय स्वातंत्र्य आणि आंबेडकरांचा उदय असे दोन सुदैवयोग एकाच कालखंडात भारतात अवतरले. त्यापैकी भारतीय स्वातंत्र्य दोन पाऊल पुढे, एक पाऊल मागे करता करता लोकशाहीच्या मार्गाने उन्नत होत गेलं. त्याच वेगाने बाबासाहेबांनी चेतवलेला ज्ञानप्रकाश दलीत समाजात मॅच्युअर झाला असता तर आज दलीत समाजाने आपल्या विद्वत्तेच्या आणि कर्तुत्वाच्या जोरावर उभा भारत पादाक्रांत केला असता. त्याच्या नेमकी उलट स्थिती आज बघायला मिळते. ज्ञानलालसेने पेटुन उठलेल्या दलीत विद्यापीठांमधे अ‍ॅडमिशन घेताना जीव मेटाकुटीला येणारे सर्व वर्गाचे विद्यार्थी बघण्याऐवजी आरक्षणाची ढाल मिरवण्यात आनंद मानणारा दलीत समाज बघुन खेद वाटतो (हे सार्वत्रीकरण नाहि. खरोखर विद्वत्ता गाजवणार्‍या दलीतांची संख्या अजीबात कमि नाहि. पण समाज म्हणुन हे वास्तव आहेच). शिवाय आता हा ट्रेंड वेगळच रुप घेताना दिसतो. ज्यांना ठेचा लागल्या, ज्यांचे मार्ग अवरुद्ध करण्यात आले, त्यांच्या वाटा मोकळ्या झाल्याबरोबर त्यांनी आपले राजमार्ग बनवण्यात व्यग्र होण्याऐवजी ते रस्ता रोको करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवताहेत. अभिमानाची उदाहरणं तयार करण्याऐवजी अत्यंत तकलादु अशा अभिमानाच्या जागा इतिहासातुन उकरुन काढायला बघताहेत. यात इतर कुणाचं नाहि, स्वतः दलितांचं नुकसान आहे. राहिला मुद्दा भिमा-कोरेगाव प्रकरणातल्या राजकारणाचा. हि सर्व भानगड राजकारणच नाहि तर सत्ताकारण प्रेरीत आहे असं मानायला भरपूर वाव आहे. गुजरातमधे तद्दन जातीय भांडवलावर एक तरुण आमदार होतो. दिल्लीस्थीत राजकारण्यांच्या साथीने देशपातळीवर जातीय खेळी मांडायला महाराष्ट्रातुन सुरुवात करतो. त्याला प्रकाश आंबेडकरांसारखे जुने-जाणते लिडर्स बळी पडतात याचं जास्त दु:ख वाटतं. असो. हा केवळ दलीत समाजाचा प्रॉब्लेम आहे असं नव्हे. कमि-अधीक प्रमाणात/प्रकारात सर्वत्र हे असच चालु आहे. पिकल्या पानांनी काय करायचे ते उपद्व्याप केले आहेतच. नवीन पिढीने डोळे उघडे ठेऊन मार्गक्रमण करावे आशी इच्छा आहे. बाकी आपला मेरा भारत महान आहेच.

In reply to by अर्धवटराव

ऐकुन खरं वाटणार नाहि, पण जातीव्यवस्थेमुळे जे दु:ख दलीतांनी भोगलं तेच आणि तसच दु:ख प्रामुख्याने ब्राह्मण समाजाने भोगलं. >> राजकारण, समाज आणि एकूणच परिस्थिती बदलताना प्रत्येक जातीने दु:ख भोगलय. ब्राम्हण म्हणून त्यांना किमान मान मिळत होता हे तुम्ही नाकारू शकतच नाही. हा मान दलितांना नव्हता किंबहूना तो असावा ही जाणीवही नव्हती. आंबेडकरांनी ही जाणीव निर्माण करण्यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न केले. ही अशी मानचिन्ह शोधणं, हिंदू संस्कृतीमधले, धर्मातले विपर्यास दाखवणं हे सर्व समाजाचा आत्मसन्मान जागृत करण्यासाठी आवश्यक वाटलं असावं. जेणेकरून आपली परिस्थिती ही आपल्या गतजन्माच्या कर्माचे फळ किंवा धर्माने आपल्याला जे दिलय तेच स्वाकारायला हवं असे विचार सोडून त्यांनी आपली परिस्थिती बदलण्यासाठी प्रवृत्त व्हावं. स्त्रियांच्या बाबतीत तुम्ही बरोबर बोलताय. किंबहूना ब्राम्हणांच्या स्त्रियांना जिथे पोचायला शतकं लागली तिथे या स्त्रिया काही दशकातच पोहोचू लागल्या. कारण परिस्थितीने आधीपासून त्यांना घराबाहेर पडायची सवय होती. म्हणूनच ब्राम्हण बायका जेव्हा जातीच्या अभिमानाबद्दल बोलत असतात तेव्हा सांगावं वाटतं की बायांनो या जातीनं कित्येक वर्षं तुम्हाला काय दिलय त्याची मोजदाद करा आणि मग अभिमानाच्या गोष्टी करा. केशवपवन, सतीसारख्या टोकाच्या स्त्रीद्वेष्ट्या सवर्ण सामाजातल्या प्रथा या समाजात नव्हत्या. अर्थात घरातलं स्त्रियांचं स्थान दुय्यमच होतं पण तोंड दाबून बुक्क्याचा मार नसावा. त्याच वेगाने बाबासाहेबांनी चेतवलेला ज्ञानप्रकाश दलीत समाजात मॅच्युअर झाला असता तर आज दलीत समाजाने आपल्या विद्वत्तेच्या आणि कर्तुत्वाच्या जोरावर उभा भारत पादाक्रांत केला असता. त्याच्या नेमकी उलट स्थिती आज बघायला मिळते. >> विद्वता आणि कर्तृत्वाला अचूकपणे पुढे येण्यासाठी आपल्या भारतीय व्यवस्थेत जागा आहे का हो? कोणत्याही व्यवस्था ठाम नियमांनी बांधलेल्या नाहीत. आरक्षित जागां खोट्या प्रमाणपत्राने मिळ्वणे हे त्यातलंच एक, बरेचदा उमेदवार मिळत नाही म्हणून जागा ठाराविक वर्ष रिकाम्या ठेवून मग जनरल उमेदवार नेमला जाणं हे सर्रास होत होतं कालपरवापर्यंत. समाजाने टाकलेले आरक्षणाचे चार तुकडे त्यांनी निमूटपणे चघळावे आणि उपकार मानावे अश्या प्रकारच्या मानसिकतेचं वारंवार घडणारं दर्शन . जिथे आरक्षित आहे तिथे हा प्रकार मग परफॉर्मन्स बेस्ड जागांवर/ व्यवसायांसंदर्भात विचारूच नका. इथेच कित्येक वेळेला आरक्षित कोट्यातून प्रवेश मिळवलेल्या डॉक्टरकडे मी का जाव? असा प्रश्न विचारला गेलाय. डॉक्टर होण्याची पात्रता नसलेली पण वडिलांच्या पाठिंब्यावर पुढे जात राहणारी मुले, पेड सीट्सवर प्रवेश मिळवलेली मुले यांच्या बाबतीत असं विधान मी ऐकलेलं नाही. फक्त आरक्षित म्हणजे गुणहीन, नि:सत्व, आणि पैश्याच्या वा वशिल्याच्या जोरावर पुढे जाणारी? बरेचदा योग्य व्यक्तींना पुढे आणण्यात मिडियाची भुमिका निर्णायक ठरते. मिडीयात अर्थातच चांगलं लिहीता- बोलता येण्याला प्राधान्य असल्याने सवर्णांचं वर्चस्व असतं त्या मुळे कौतुकही सिलेक्टीव्हांचच होतान दिसतं. (हे आता त्वरेने भूतकाळात जमा होत आहे याची मला कल्पना आहे.) दलित साहित्य म्हणजे दु:खांचं भांडवल करणारं असं म्हणताना शिल्पा कांबळेची "निळ्या डोळ्यांची मुलगी" मिडीयानं कितीसं उचलून धरलं? या पुस्तकात ज्या अलिप्तपणे दलितत्व, शिक्षणाची आस, भोवतालची दारू, झगड्यातली संस्कृती, आपल्या आपल्याच सुस्थितीत पोचलेल्याकडून नाकारलं जाणं अश्या अनेक सत्यांची गुंफण आहे ती निव्वळ अमेझिंग आहे. किती ठिकाणी या पुस्तकांची परिक्षण लिहीली गेलीत? अनुल्लेखानं मारलं जाणं हे कित्येक गुणी दलित कलाकारांनी सोसलय, सोसत आहेत. त्यांचं पॉलिश्ड नसणं हे त्यांच्या गुणांना मारत आलेलं आहे. अर्थात ही परिस्थिती आता झपाट्याने बदलते आहे. ज्यांना ठेचा लागल्या, ज्यांचे मार्ग अवरुद्ध करण्यात आले, त्यांच्या वाटा मोकळ्या झाल्याबरोबर त्यांनी आपले राजमार्ग बनवण्यात व्यग्र होण्याऐवजी ते रस्ता रोको करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवताहेत. अभिमानाची उदाहरणं तयार करण्याऐवजी अत्यंत तकलादु अशा अभिमानाच्या जागा इतिहासातुन उकरुन काढायला बघताहेत. >> हे करायला सामाजिक वातावरणही कारणीभूत असतं. आपले पूर्वज, आपली संस्कृती याबद्दल नको तेवढा अभिमान आजूबाजूला ओसंडून वाहत असताना प्रत्येक जातीगटाला आपापल्या अभिमानाच्या जागा शोधायच्या असतात. त्या "तकलादू" आहे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्या गटाच्या अस्मितेला ठेच पोहोचते आणि सामाजिक ऐक्यात मुळातच असलेल्या भेगा रुंदावायला लागतात. मला नेमकं हेच म्हणायचं आहे. कोणत्या गटाचा अभ्भिमानविषय कसा चुकीचाय ते दाखवत बसायची इतरांनाही गरज का भासावी? वाद त्यांच्या अभिमानाच्या जागेवरून झालेला नाही आणि ते आता उकरून काढलेलं ही नाही. पण सध्याच्या राष्ट्र्भक्त-द्रोही या खेळात इंग्रजांना पाठिंबा देणारे अशी त्यांची संभावना करणारे ढ्कलसंदेश पाठ्वले गेले. हे चुकीचं होतंच असं कोणीतरी म्हणतय का? त्याऐवजी तेच चुकले असा सार्वत्रिक समज पसरवला गेलाय. मी मेवाणीची भाषणं ऐकलेली नाहीत. उना प्रकरणातून त्याचा उदय झाला आहे. आणि ते प्रकरण निषेधार्हच होतं. त्याची कोणत्याही प्रश्नाबद्द्ची कोणतीही मांडणी मी ऐकली नाही. त्यामुळे मी भाष्य करणार नाही पण तुम्ही हे जे ठामपणे सांगताय एवध्या ठामपणे फक्त चर्चेतल्या भाजपा प्रवक्त्यांनी सांगीतलं आहे. बातम्याही तश्या नव्हत्या. या प्रकरणात दलित जमावाकडून दगडफेक झाली नव्ह्ती त्यामुळे त्याचा हात वैगेरे कल्पनाविलास असावा. अर्थात मला सत्ताकारण वा राजकारण यावर कोणतंही भाष्य करायचं नाही. मुळात समाजात सामंजस्य असलं तर अश्या प्रकारच्या राजकारणाला वाव मिळणारच नाही. मी कोणताही उद्रेक जस्टीफाय केलेला नाही. पण उद्रेक का होतो हे डोळे उघडून नीट बघा तरी. ह्या बद्दल द्वेषमूलक विधानं तरी करू नका. (दलित आंदोलनात नेहमी असं होतंच, हे कोणाचंततरी विधान होतं ना आधीच्या चर्चेत. ) नव्या पिढीच्या डोक्यात आधीच बायस्ड मतं भरायची, मग कसे राहणार त्यांचे डोळे उघडे?

In reply to by अंतरा आनंद

केवळ एक घटनाविशेष म्हणुन नाहि तर थोडा लार्जर पर्स्पेक्टीव्ह विचारात घ्या. समाजमनाचं जे काहि थोडंफार ऑब्सर्वेशन मी केलय त्यावरुन मला एव्हढं नक्की वाटतं कि अगदी ८०-९० च्या दशकापर्यंत सामाजीक अभिसरणाची पुढे जाणारी गाडी आता यु टर्न घ्यायला लागली आहे अशी शंका येते. दलीतांसाठी, फोर दॅट मॅटर कुठल्याही पर-जातीय व्यक्तीसाठी घरचे आणि मनाचे दरवाजे एकदम बंद असणं, मग थोडं किलकिले होणं, दारं सताड उघडी होणं आणि शेवटी जात हा फॅक्टर अजीबात विचारात न येणं, हे सगळं स्थित्यंतर मी बघितलं आहे. केवळ प्रातिनीधीक म्हणुन नाहि तर समाजजीवनाचा ट्रेण्ड तसा होतोय याची शाश्वती येण्याइतपत ते जाणवलं. अगदी मागच्या पिढीचे लोक २१व्या शतकाच्या दुसर्‍या-तिसर्‍या दशकापर्यंत जातीभेद नामशेष जरी नाहि तरि अगदी डायल्युट होण्याच्या मार्गावर होण्याबद्दल बरेच सकारात्मक दिसायचे. आंबेडकरांनी शक्य त्या सर्व मार्गांनी दलीत समाजाची अस्मीता जागृत केली हे स्वाभावीक होतं, योग्य देखील होतं. आंबेडकरांनी दाखवलेला मार्ग इतका स्वच्छ होता कि त्यात अंध-पोथीवादासारखा धोका निर्माण व्हायचे चान्सेस जवळपास शुण्य होते. शिवाय त्यावर मार्गक्रमणाची अनिवार्यता देखील वादातीत होती/आहे. हा रोग, हे औषध इतका सरळ कारभार होता. समाजधुरीणांचा पराभव त्यांचेच वैचारीक अनुयायी करतात असं म्हणतात. कधि त्यात नेत्याच्या वैचारीक बैठकीची अँबिग्युटी असते, कधि ते काळानुरुप नसतात, कधि मूळ समस्या आपोआप डायल्युट होते, तर कधि समाज/अनुयायी आळशी बनतात, शिवाय राजकीय/आर्थीक फायदे मिळवण्याची धडपड. आंबेडकरी चळवळीला यापैकी कुठल्याच कारणाचा धोका नव्हता. दबलेला, पिचलेला, अधिकारांपासुन वंचीत असा समाज ते आधुनीक काल सुसंगत, व्यवस्थीत एस्टेब्लीश्ड समाज हा प्रवास तसा सोपा नाहि. पण दलीत चळवळीला आंबेडकरांसारखा नेता आणि नुकताच स्वतंत्र झालेला भारत अशी युनीक बैठक मिळाली. जगाच्या इतीहासात फार थोडी अशी उदाहरणं सापडतील. या पार्श्वभूमीवर गाडी कुठे जायला हवी होती आणि आता ति कुठे जातेय हे बघायला हवं. इतर समाज घटकांप्रमाणे दलीत समाजाला देखील आपल्या अस्मीतांचं कौतुक असणे, अभिमान असणे वगैरे अगदी योग्य आहे. किंबहुना कर्तुत्व गाजवणे, त्यातुन जाज्वल्य अस्मीता निर्माण करणे, व त्यातुल पुढील कर्तुत्वाला पोषक खाद्य पुरवणे हे सहज-स्वाभावीक समाजशास्त्र आहे. पण इतर समाजांचं जाऊ दे, स्वतः दलीत समाजाला आपल्या अस्मीतांमधुन कुठले पोषक मुल्य मिळताहेत याचं भान हवं. आजुबाजुला अंध-अस्मीतांचा बाजार भरला असताना दलितांनी तसं केलं तर काय बिघडलं असा युक्तीवाद करता येईल, पण इतरांच्यात चुकीच्या अस्मीतामुळे होणारं नुकसान सहन करायला बरीच राखीव चरबी आहे. दलितांना सध्या तरी ते प्रिव्हिलेज नाहि. २-३ पिढ्यांच्या चुका त्यांना मूळ मार्गावरुन बर्‍याच लांब घेऊन जातील. इतर समाज घटकांनी दलितोद्धाराकडे किती सकारात्मक दृष्टीने बघितलं हा हमखास वादाचा विषय असेल. मला वाटतं या बाबतीत भारत देश अगदी डिस्टींक्शनने नाहि तरि काठावर नक्कीच पास झाला असावा. ५-१० मार्क जास्तच पडले असावे. दलीत समाज स्वतः देखील अंतर्गत आणि बाह्य मर्यादांवर मात करत पुढे नक्कीच गेला आहे. पण हा प्रवास उत्तोरोत्तर पोझीटीव्ह वळणं घेण्याऐवजी नकारात्मकतेकडे का झुकायला लागला आहे हे कळायला मार्ग नाहि. तसा तो होत नसेल देखील, नसल्यास आनंदच आहे. पण ताक घुसळुन लोणि वर यावं आणि त्यावरुन मूळ मटेरिअलची क्वालिटी कळावी या न्यायाने जर दलीत लिडरशीप अजमावतो म्हटलं तर चित्रं फार काहि बरं नाहि. उना व तत्सम प्रकरणांमधे नेमकं काय झालं याचं चर्वीतचर्वण बाजुला ठेवलेलं बरं. एक नवीन नेतृत्व उदयाला आलं एव्हढच सध्या महत्वाचं. त्याबद्दल काहि वावगं वाटत नाहि. पण हे तरुण तुर्क महाराष्ट्रात येतात. आधुनीक पेशवाई, आर.एस.एस ला नागपुरात जाऊन संपवणे, संवीधान कि मनुस्मृती वगैरे अत्यंत बाष्कळ मुद्यांवर इथे गर्दी खेचतात. मराठी दलीत सारस्वत त्याची री ओढतात. हे केवळ सोईचं राजकारण म्हणुन सोडुन द्यायचं कि खरच आपल्याकडे विचारांची वानवा आहे हा प्रश्न छळतो. अवांतरः दलीत हि केवळ एक जात नाहि. ति एक अवस्था आहे. माणुस म्हणुन जगण्याचा हक्क नाकारणारी. या अवस्थेला कारणीभूत व्यवस्था जशी जुन्या काळात कळत-नकळत निर्माण झाली असेल तशीच व्यवस्था आज पाय रोऊन घट्ट होत चालली आहे. स्वच्छ पाणि, शुद्ध हवा, पोषक आहार, मनाला आवडेल त्या विषयाची स्वच्छंद बौद्धीक भटकंती, एक सजीव प्राणि म्हणुन व्हायला हवा तो विकास... हे सगळं मला नाकारण्यात येत आहे. ते तसच स्विकारायला माझ्या नकळत मला भाग पाडण्यात येत आहे. इथे तसं करणारा कुठलाच दृष्य धर्मग्रंथ नाहि कि राजसिंहासन नाहि. मागच्या शतकातलं आव्हान परतुन लावण्या अगोदरच एक नवीन आव्हान समोर उभं ठाकलं आहे. मी आधुनीक दलीत आहे. ( कसलं भारी लिवलय... वाह :) )

In reply to by अर्धवटराव

पण इतर समाजांचं जाऊ दे, स्वतः दलीत समाजाला आपल्या अस्मीतांमधुन कुठले पोषक मुल्य मिळताहेत याचं भान हवं. आजुबाजुला अंध-अस्मीतांचा बाजार भरला असताना दलितांनी तसं केलं तर काय बिघडलं असा युक्तीवाद करता येईल, पण इतरांच्यात चुकीच्या अस्मीतामुळे होणारं नुकसान सहन करायला बरीच राखीव चरबी आहे. दलितांना सध्या तरी ते प्रिव्हिलेज नाहि. २-३ पिढ्यांच्या चुका त्यांना मूळ मार्गावरुन बर्‍याच लांब घेऊन जातील. >> मान्यय. पण त्यांच्या अस्मिता जोपर्यंत कोणाच्या मार्गात येत नाहीत तोपर्यंत त्यांना विरोध का करावा? तो ही हिंसक? (त्यांच्यावर दगडफेक झाली, गाड्या जाळल्या गेल्या, दुकानं आदी बंद ठेवून त्यांची गैरसोय केली गेली याबद्द्ल मी बोलतेय. ते नक्की चुकीचच होतं असं कोणीही इथे स्पष्ट बोलायला तयार नाहीय. ) दलीत समाज स्वतः देखील अंतर्गत आणि बाह्य मर्यादांवर मात करत पुढे नक्कीच गेला आहे. पण हा प्रवास उत्तोरोत्तर पोझीटीव्ह वळणं घेण्याऐवजी नकारात्मकतेकडे का झुकायला लागला आहे हे कळायला मार्ग नाहि. >> तुम्ही नेत्यांवरून समाजाचं आकलन करू बघता आहात. तसं नाहीय. दुसरं म्हणजे सगळीकडेच भरलेला अस्मितांचा बाजार, वाढता धार्मिक आंधळेपणा/एकारलेपणा, संधी आणि संपत्तीच्या वाटपातली वाढ्ती असमानता यामुळे प्रत्येक समाजगट नकारात्मकतेकडेच वळतोय. हे तरुण तुर्क महाराष्ट्रात येतात. आधुनीक पेशवाई, आर.एस.एस ला नागपुरात जाऊन संपवणे, संवीधान कि मनुस्मृती वगैरे अत्यंत बाष्कळ मुद्यांवर इथे गर्दी खेचतात. मराठी दलीत सारस्वत त्याची री ओढतात. >> राममंदिर , गोमाता, लव-जिहाद, राष्ट्रगीताला उभे रहाणे असे एकाहून एक बांष्कळ मुद्दे गेली कित्येक वर्षे देशभर, मिडीयात चर्चेत आहेतच की. उना प्रकरणात काय झालं याचं चवीतर्वण नाही पण ती घटना दलितांना भान आणून देणारी ठरली. या हिंदूराष्ट्रात आपले स्थान काय असेल याचं भान. त्यामुळे तो बाष्कळ (सौम्य शब्दय) प्रकार झाला नसता तर हे मेवानी वैगेरे उदयाला आले नसते. अवांतराबद्द्ल : मी/ तुम्ही वा इतरही नागरीक म्हणून दलित आहोत, हे सत्य.

In reply to by अंतरा आनंद

राममंदिर , गोमाता, लव-जिहाद, राष्ट्रगीताला उभे रहाणे असे एकाहून एक बांष्कळ मुद्दे गेली कित्येक वर्षे देशभर, मिडीयात चर्चेत आहेतच की. उना प्रकरणात काय झालं याचं चवीतर्वण नाही पण ती घटना दलितांना भान आणून देणारी ठरली. या हिंदूराष्ट्रात आपले स्थान काय असेल याचं भान. त्यामुळे तो बाष्कळ (सौम्य शब्दय) प्रकार झाला नसता तर हे मेवानी वैगेरे उदयाला आले नसते. >> राममंदिर तसं जुनं झालं. २०१४ पासून चालू झालेला दादरी उना वगैरे ठिकाणचा गोराक्षसांचा धुमाकूळ, आता परवाचा लवजिहादचा विडिओ, तीन वर्ष सलग दुष्काळ पडूनही शेतकऱ्यांकडे केलेले साफ दुर्लक्ष....मेवानी, हार्दिक, मराठा मोर्चा वगैरे यातून, यामुळे आलेत. आताही या नेत्यांवर टीका करताना मुळ प्रोब्लेमबद्दल कोणीच बोलत नाही. त्यांना लोकांचा पाठिंबा का मिळतोय? कारण यांना पीडितांबद्दल सहानुभुती नाही कि मदत करायची नाही! फुकटचम्बू, विषवल्ली, कॅन्सर वगैरे उपहासच चालुय....

In reply to by अंतरा आनंद

केवळ दलीतांच्या अस्मीता डोळ्यात खुपल्या म्हणुन हा तंटा उभा झाला हे मनाला पटत नाहि. या शंकेला सबळ पुरावा असा काहि नाहि. पण हल्ली जसे वारे वाहताहेत त्यात सर्वकाहि आलबेल वाटत नाहि. पहिला दगड कुणी व का मारला हे कदाचीत त्या दगडालाच ठाऊक. अर्थात, सामाजीक दुभंगलेपणा आहेच. त्यात आपल्या उच्चनीचतेच्या कल्पनांचं बारुद देखील ठासुन भरलय. किंबहुना म्हणुनच ठिणगी पेटवायचा प्रयत्न झाला असावा. मी नेत्यांवरुन समाजाचं आकलन नाहि करत आहे. काहि दशकांचा ग्राफ डोळ्यासमोर धरला तर सामाजीक परिस्थिती ज्या स्टेजला यायला हवी होती त्यापासुन बरीच भरकटलेली दिसतेय. व या भरकटलेपणात अंगभूत सामाजीक मर्यादा आणि बाह्य परिस्थितीपेक्षा नेतृत्वाचा वाटा जास्त वाटतोय. जास्त वाईट याचं वाटतं कि नेतृत्वाची नवी फळी त्याच कर्दमात रुतायला बघतेय. इतर समाजगट फक्त सामाजीक नकारात्मकडे झुकतोय, पण त्यांच्या तिजोरीला आणि सर्वंकष हितसंबंधांना बाधा येईल असं दिसत नाहि. त्यामानाने दलितांचे सर्वंकष हितसंबंध मजबूत व्हायला एव्हाना जो पाया डेव्हलप व्हायला हवा होता तसा होताना दिसत नाहिए. दलितांच्या संघर्षातुन आग तर निर्माण होतेय लेकीन हंडी नहि पक रही. असो. दलीत समाजाला गेल्या १ वर्षात जर सो कॉल्ड हिंदुराष्ट्रातल्या स्वतःच्या स्थानाबद्द्ल अचानक भान निर्माण होत असेल तर दलीत समाजाने एका फटक्यात आजवरच्या समस्त आंबेडकरी कर्तुत्वाचा शुण्याने गुणाकार केला असं म्हणावं लागेल. राममंदीर, गोमाता, लव जिहाद हे मुद्दे हे मुद्दे अगोदर देखील तेव्हढेच तीव्र होते. त्याला मिडीया कव्हरेज गेल्या २-३ वर्षात मिळायला लागलय एव्हढच. मेवानी आणि तत्सम नेतृत्वाचा उदय होणारच होता. दलितांना अचानक आलेल्या भानाची हि परिणीती नाहि. शुद्ध राजकीय सारीपटावरची विशुद्ध चाल एव्हढच त्यामागचं सत्य. भगव्याच्या जोडीला निळा रंग यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणात गेला नव्हता. या रंगसंगतीचा परिणाम म्हणजे मेवानी आणि मित्रपरिवार. (मेवानी हे नाव केवळ प्रातिनीधीक म्हणुन वापरलं आहे. प्रत्यक्ष्य मेवानी कसा उदय पावला याबद्दल पूर्ण खात्री नाहि). असो.

In reply to by अर्धवटराव

केवळ दलीतांच्या अस्मीता डोळ्यात खुपल्या म्हणुन हा तंटा उभा झाला>> असं मी म्ह्टलेलंच नाही. त्यात आपल्या उच्चनीचतेच्या कल्पनांचं बारुद देखील ठासुन भरलय. किंबहुना म्हणुनच ठिणगी पेटवायचा प्रयत्न झाला असावा. >> हे खरं आहे. म्हणूनच आपल्या पातळीवर या कल्पना मोडीत काढायला हव्यात असं म्हणतेय मी. जे तसं करत असतील त्यांना हे लागायचं कारणच नाही. तसं न करता "दलित समाज असाच" असं म्हणं चुकीचं आहे. इतर समाजगट फक्त सामाजीक नकारात्मकडे झुकतोय, पण त्यांच्या तिजोरीला आणि सर्वंकष हितसंबंधांना बाधा येईल असं दिसत नाहि. त्यामानाने दलितांचे सर्वंकष हितसंबंध मजबूत व्हायला एव्हाना जो पाया डेव्हलप व्हायला हवा होता तसा होताना दिसत नाहिए. दलितांच्या संघर्षातुन आग तर निर्माण होतेय लेकीन हंडी नहि पक रही. >>खरं आहे. इतर समाजाच्या तिजोर्६या आहेत. दलित (त्याच बरोबर भटक्या , विमुक्त वैगेरे) समाजाच्य नाहीत म्हणून त्यांची बाजू माध्यमांमध्येही लंगडी असते.

In reply to by अंतरा आनंद

तेजस यांनी या प्रतिसादात "ज्यांनी कोणी त्यांच्यावर दगडफेक केली त्यांना शोधून शिक्षा झालीच पाहिजे असं म्हणलंय.". मी या प्रतिसादात असं म्हणलंय की "दगडफेक ई. करणारे (मग ते कुठल्याही गटाचे असोत) हे समाजकंटक होते/ आहेत.". आता यात प्रॉब्लेम असा आहे की ही दगडफेक ब्राम्हण लोकांनी केली सरळसरळ आरोप केलाय. पण याचे काही पुरावे आहेत का? नुसतीच भिडे गुरुजींना आणि एकबोट्यांना अटक करा म्हणून मागणी करत आहेत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती दगडफेक या दोघांनी किंवा ब्राम्हणांनी केली याचे पुरावे कोणी देत नाही आणि मागतही नाही! आता मी म्हणतोय दगडफेक करणारे समाजकंटक आहेत. लक्षात घ्या मी कुठल्याही जातीधर्माकडे बोट दाखवत नाहीये. जर खरंच ब्राम्हणांनी केली असेल तर ते पण समाजकंटकच आहेत, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण सिद्ध तर करा. व्यक्तीकडे बघून समजतं का त्याची जात कुठली आहे ते? वाढता धार्मिक आंधळेपणा/एकारलेपणा, संधी आणि संपत्तीच्या वाटपातली वाढ्ती असमानता यामुळे प्रत्येक समाजगट नकारात्मकतेकडेच वळतोय. यातून बाहेर पडायला आपले आपणच प्रयत्न केले पाहिजेत. संधी तर सगळ्यांनाच उपलब्ध आहेत, का अजूनही तुम्हाला म्हणायचंय की दलितांना मुद्दाम काही संधी नाकारल्या जात आहेत? म्हणजे पात्रता असूनही केवळ दलित आहेत म्हणून संधी दिली जात नाही अशी उदाहरणं द्या. उना प्रकरणात काय झालं याचं चवीतर्वण नाही पण ती घटना दलितांना भान आणून देणारी ठरली. भान यायला ही घटना घडायची काय गरज होती? यात सुद्धा मारणारे ब्राम्हण होते का? इंडियन एक्सप्रेस मधली ही बातमी वाचा. प्रत्येक घटनेला जातीय रंग द्यायची काय गरज आहे? उद्या मी एखाद्या निरुद्योगी माणसाला पैसे दिले आणि सांगितलं की एका चौकात जा आणि सांग मी xxx संस्थेचा कार्यकर्ता आहे आणि दगडफेक कर. मला त्या माणसाची जात/ धर्म माहित नाही आणि त्या माणसाला फक्त पैसे मिळण्याची कारण. कशाला दगड फेकायचेत, कोणावर फेकायचेत याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही. मग बघणारे म्हणतात xxx संस्था जातीय आहे. पण सत्य काय आहे याचा शोध किती जण घेतात? माझं वैयक्तिक मत सांगतो - एखाद्या स्पर्धेत जो स्पर्धक मागे असतो त्याने पुढे जाण्याला महत्व दिलं पाहिजे. बाकी प्रेक्षक काय ओरडत आहेत, आपल्याला स्पर्धेच्या ठिकाणी पोचायला किती त्रास झाला, ऊन आज जरा जास्त आहे ई. ई. मागे ओढणाऱ्या अन्य गोष्टींकडे लक्ष देऊ नये.

In reply to by ट्रेड मार्क

बऱ्याच वर्षापुर्वी पाहीलेल्या तमस मालिकेचि आठवण झाली, मी जेव्हा माझ्या दलित, मुस्लिम, ख्रिस्ती मित्रात असतो तेव्हा जातिभेद दिसुन येत नाहीत, वा मी त्यांच्या घरी जातो किंवा ते माझ्याकडे येतात. किंबहुना आम्हाला जात ,धर्म ,पंथ आहे हेच लक्षात येत नाहि

अंतरा आनंद, उत्तम व संतुलीत लेख. खुप दिवसांनी असा सकस लेख वाचला.

अंतरा आनंद, माझं भाष्य येणेप्रमाणे : १.
आपण एकंदरीतच समाज म्हणून विवेकी असण्यापेक्षा भावनेच्या लाटेवर हेलकावे खाणं स्वाकारतो.
मी स्वत:स यांतून वगळतो आहे. मी भावनांच्या लाटेवर हेलकावत वगैरे नाही. २.
जातींनी महापुरुष वाटून घेतलेत म्हणणार्‍यांपैकी किती जणं आंबेडकर जयंती साजरी करतात? नाहीपेक्षा ती आपल्या सोसायटीत साजरी व्हावी असं किती जणांना वाटतं?
मला स्वत:ला कुठल्याही माणसाची जयंती बियंती साजरी करायला आवडंत नाही. भयाण कंटाळवाणा प्रकार असतो. मात्र आंबेडकरांनी दिलेली शिकवण आचरणांत असावी म्हणून माझा जमेल तितका प्रयत्न चाललेला असतो. मी भारतात असतो तर असली जयंती अजिबात साजरी केली नसती. हां, पण त्या दिवशी शुभेच्छा आवर्जून पाठवल्या असत्या. शिवाय त्यांनी भारताचं हित कसं पाहिलं यावर यथोचित भाष्य केलं असतं. ३.
"ज्यांच्यामुळे मला प्रमोशन मिळत नाहीय ना त्यांची मिरवणूक आहे" असं उत्तर माझ्या एका कलीगनं दिलं होतं. अर्धवट माहिती देऊन पुढील पिढीच्या मनात अशी विषाची पेरणी केली जाते.
म्हणूनंच आरक्षण रद्द करायला पाहिजे. आंबेडकर फक्त दहा वर्षं ठेवायचं म्हणंत होते ते उगीच नाही. ४.
झाडू-गाडगं नसेलही पण "बाजू हो शिवशील, सावली पडली तर विटाळ होईल" हे उद्गार तरी महारांसाठी निघत होतेच ना? मग त्याचं समर्थन करताय का?
कोणीही समर्थन करत नाहीये. अस्पृश्यतेवर कायद्याने बंदी आहे. असो. हे उद्गार निघायचे कारण की महार मेलेल्या गुरांचं मांस खायचे. नेमक्या याच कारणासाठी बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मेलं ढोर खाऊ नका आणि मेलं ढोर ओढू नका. ५.
कोपर्‍यातल्या कपात वरून पडलेला चा पिणारी म्हारीण तर आता आतापर्यंत साहित्याचा भाग होतीच ना. ती काय सर्वस्वी काल्पनिक होती?
असेलही. पण अस्पृश्यता कायद्याने बंद झाली आहे. ६.
पण महारांना किती गावात मानाचं स्थान होतं? इथे आपण किती गावच्या मातीतले आहोत हे दाखवण्याची होड लागलेली असते, त्यांना हे गावाचं वास्तव माहित नाही का?
ज्या अर्थी महार वतन दिलं जायचं त्याअर्थी महारांना व्यवस्थित मान होता. फक्त पराक्रम गाजवायला हवा. जो अनेक महारांनी गाजवला होताही. ७.
आमचे पूर्वज कसे वेदशास्त्रसंपन्न होते म्हणत अभिमान मिरवता त्याच पूर्वजांचा (त्यावेळची जनरीत म्हणून का होईना) काहीजणांना जन्मावर आधारीत उपेक्षेची वागणूक देण्यात सहभाग होताच म्हणून लाजही वाटून घ्यावी का वाटत नाही? यालाच दांभिकपणा म्हणतात.
माझ्या बापाने भले केला असेल अन्याय. म्हणून तुम्ही माझ्यावर केलेला अन्याय मी खपवून घेणार नाही. भले मला कोणी दांभिक म्हंटलं तरी चालेल. ८.
प्रकाश आंबेडकरांची राजकीय ताकद ती काय आणि अशी आंदोलनं ते करतातच कशी काय? असा एक सुज्ञ प्रश्न आहे. म्हणजे? जे निवडून येऊ शकतात त्यांना अशी हिंसक आंदोलनं करण्याचा फुकट परवाना मिळतो? जे निवडून येत नाहीत त्यांची अशी काही बाजू नसतेच? आंबेडकरांनी हिंसक आंदोलन करा असं म्हटलं होतं का? कोणाला जमवलेल्या जमावावर नियंत्रण ठेवता येतं?
च्यायला, एकतर आगी लावायच्या आणि मग बूड जळू लागलं की पेट्रोलच्या नावाने बोंबा ठोकायच्या. जर कोणालाच जमावावर नियंत्रण ठेवता येत नाही तर मग पूज्य संभाजी भिडे यांच्या विरोधात प्रकाश आंबेडकर खोटेनाटे आरोप का करताहेत? पूज्य भिडे गुरुजी पुण्यांत कुणाच्या तरी अंत्यविधीस गेले होते. भीमा-कोरेगावाचा संबंध आलाच कुठे? प्रकाश आंबेडकर जनतेस मूर्ख समजतात काय? लोकांना ढोंगं बरोब्बर कळतात. ९.
(ठेवता आलं असतं तर बाबरी मशीद पाडली गेली नसती. का ती नियंत्रणाखाली जाणून बुजून घडवलेली घटना होती?)
बाबरी नामे कोणती मशीद तिथे नव्हती. जे पडलं ते जुनं राममंदिर होतं. हिंदूंनी हिंदूंचं देऊळ पाडलं तर कोणासही कसलीही अडचण व्हायला नको. शिवाय प्रस्तुत भीमा-कोरेगाव प्रकरणाचा रामजन्मभूमीशी कसलाही संबंध नाही. १०.
मात्र राम होताच आणि तो अयोध्येत विवक्षित ठिकाणीच जन्मला हे ठामपणे सांगीतलं जातं, जणू रामजन्मानंतर घुगर्‍या वाटायचं काम कौसल्यामातेनं यांच्याकडेच सोपवलेलं होतं.
अगदी बरोबर बोललात पहा. श्रीराम हा राष्ट्रीय पुरुष आहे. त्याच्या जन्मस्थानाबद्दल कुठलीही तडजोड केली जाणार नाही. प्रस्तुत भीमा-कोरेगाव प्रकरणाचा रामजन्मभूमीशी कसलाही संबंध नाही. ११.
मुळात एखाद्या ठिकाणी जमाव मोठ्या संख्येनं येतो त्यावर दगडफेक होते, दुकानं बंद ठेवली जातात, त्यांच्याविरोधात वातावरण तयार केलं जातं, या मूळ मुद्द्यावर कोणीही बोलत नाहीय.
बोलताहेत की. पूज्य संभाजी भिडे यांनी शासनाकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. १२.
’बाबासाहेबांना आम्ही मानतो पण हे आहेत का कोणी तसे?" असं सर्रास म्हणणार्‍या किती जणांमध्ये त्यांच्या त्यांच्या जातीच्या महापुरुषाचे गुण १०% तरी आहेत?
मी महापुरुषांना जातीच्या दृष्टीकोनातून पहात नाही. बाकी गुणांचं म्हणालात तर हिंदूंना धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. पूज्य संभाजी भिडे हेच काम निरलसपणे करताहेत. १३.
१) आरक्षणाच्या कुबड्या घेतलेले हे लोक (२) संस्कार आहेत का यांच्याकडे (३) मी म्हटलं बाकी कोणीही आण नवरा/नवरी म्हणून पण जय भीमवाला/वाली नको बाई (४) अच्छा तू *** आहेस? वाटत नाही हे असे अनेक खडे येता जाता फेकत असतो
म्हणूनंच बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे वागायचं असतं. वागतो का कोणी नेता त्यांच्यासारखा? १४.
हे असे खडे आपल्याकडून भिरकावले जाणार नाही याची प्रत्येकाने वैयक्तिकरित्या दक्षता घेतली तरी हे असे भडके उडण्याला थोडाबहुत आळा बसेल.
साफ चूक. पूज्य संभाजी भिडे कोणाच्याही अध्यातमध्यात नसतांना जितेंद्र आव्हाड आणि प्रकाश आंबेडकर हे गणंग त्यांचा द्वेष करतातच की नाही? १५.
हेच का ते सामान्य मध्यमवर्गीय आणि हाच काय तो ब्राम्हणी सुसंकृतपणा, अशी शंका येते.
मग तुम्ही शिकवला की नाही सुसंस्कृतपणा? का नुसतेच शंका प्रदर्शित करताहात? १६.
( कुंभमेळ्यासाठी दुष्काळातही गोदावरीत पाणी ओतलं तेव्हा ते नाही खटकलं या लोकांना.) हाच मानभावी सुसंस्कृतपणा या मागासवर्गीय शहरी लोकांना पदोपदी भेटत असतो
का म्हणून खटकावं? १७.
आपले आई वडील केवळ जन्माने वरच्या जातीतला म्हणून छोट्या वयाच्या व्यक्तीलाही मान देतात, हात जोडतात (हे आता आता पर्यंत उत्तर, मध्यप्रदेशात होतं की नाही? अजूनही असेल) हे बघताना त्या जातीच्या मुलांना वेदना होत नसतील का?
अशा वेदना होऊ नयेत म्हणूनंच ब्राह्मण सुधारला पाहिजे. १८.
आपल्याला कमी लेखलं जातं हे स्वीकारून आत्मसन्मान कसा जपत असतील ते? पूर्वंजांच्या चार कथा उचलून निरूपणं करत बसण्याएवढं साधं नाही ते.
ब्राह्मण भिक्षुक नाही का भिका मागून जगतात ते? तरी त्यांच्या आत्मसन्मानास धक्का पोहोचंत नाही. कसा काय बरं? काय मत आहे यावर तुमचं? १९.
सवर्णांना चांगलं बोलण, वाचणं बाळकडू घरात मिळालेलं असतं. ५० च्या दशकातल्या बहुसंख्य आरक्षितांना ते मिळालं होतं का? पण उच्चारावरून लिहीण्यावरून , वागण्या बोलण्यातल्या रांगडेपणावरून त्यांना खुसूखुसू हसताना ते हे कुठून शिकतील हे भान असतं का?
म्हणूनंच आंबेडकरांनी दलितांना सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. २०.
मग ज्यांच्या अगदी एखादया पिढीपलीकडल्या पूर्वजांनी भिका मागत पोटं भरली (ज्याला जोदार असं गोंडस नाव दिलं गेलं होतं.) त्यांनी एखादी कुबडी वापरली तर त्यांना चोर म्हणावं वाटतं?
आंबेडकरांनी फक्त दहा वर्षंच आरक्षण ठेवायला सांगितलेलं होतं म्हणून. स्वार्थी नेत्यांनी आंबेडकरांच्या शिकवणुकीस धाब्यावर बसवलं, त्याचा दोष बाकी समाजावर का म्हणून ढकलता? २१.
आता खरंतर भिमा-कोरेगाव प्रकरणीत ग्रामस्थांनी परस्पर सहकार्याची भुमिका घेतल्याच्या बातम्या आहेत. चूक कोणाचीही असो असं पुन्हा होणार नाही अशी भाषा दोन्ही बाजूकडून झाली आणि ते ही कोणत्याही प्रस्थापित राजकारण्यांच्या नाक खुपसण्याला वाव न देता. ही खूप आशेची गोष्ट आहे. कदाचित इथल्या मंडळीसारखी जानवं या खांद्यावरून त्या खांद्यावर करत सव्यापसव्याला कसरत म्हणण्याची कला त्यांना अवगत नसावी.
बरोबर आहे. आहेच मुळी ही आशेची गोष्ट. मात्र इथे जानव्याचा संबंध काय आहे ते कळलं नाही. जानवेधारी लबाड असतात असं सूचित होतं आहे. एकीकडे आशेची गोष्ट म्हणायचं आणि लगेच पुढच्या वाक्यात बकवास ओकायचा. अशाला थोतांड म्हणतात. २२.
या संस्थळावर मात्र शहाण्यांनी विषाचा प्यालाच दाखवत जो काही एकांगी हैदोस घातलाय तो बघता या समाजातलं असल्याची लाज वाटावी.
या समाजात असल्याची लाज वाटंत असेल तर तुम्ही खुशाल वानप्रस्थ स्वीकारा. माझं अनुमोदन आहे. २३.
सार्वजनिक ठिकाणी तुम्ही एवढे विष ओकू शकता तर खाजगीत किती विषमय असाल?
तुम्ही कारण नसतांना राममंदिर आणि जानवं ओढून आणलंत. तुम्हीसुद्धा खाजगीत भरपूर विष ओकंत असणार. २४.
शेवटी समाज म्हणून सगळ्यांनाच पुढे जायचय.
राममंदिर व जानवं अशा असंबंधित गोष्टी चर्चेस आणल्याने तुम्हाला पुढे जाण्यात रस नाही, असं माझं मत आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आंबेडकर फक्त दहा वर्षं ठेवायचं म्हणंत होते ते उगीच नाही. >> फेकू नका! पाप लागतं! 'तो' बघतोय सगळं, हिशेब ठेवतोय! पुढल्या जन्मी ते हे बनाल!

In reply to by एमी

अॅमी, प्रत्यक्ष वाल्मिकी ऋषींच्या कुटुंबियांनी पापाचा वाटा उचलायला नकार दिला होता. पण इथे तर तुमच्यासारखी साक्षात कम्युनिस्ट हिंदूंच्या पापाची काळजी वाहते आहे हे पाहून मला गहिवरून आलं. लगेच खिडकीतून सूर्य पश्चिमेला तर उगवला नाही ना याची खातरजमा केली. असो. प्रकाश आंबेडकरांची मुलाखत आहे. तीत थोरल्या आंबेडकरांना फक्त दहा वर्षं आरक्षण अभिप्रेत होतं हे स्पष्टपणे सूचित होत आहे. : https://www.outlookindia.com/magazine/story/what-if-reservations-had-co… आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

स्वतःच ज्या लिंका चिटकवताय त्यातरी नीट वाचत जा हो... जमलं तर... political reservation आणि reluctantly agreed या शब्दांचा अर्थ काय आहे? === बाकी कॉम्युनिस्ट या (अजूनेका) शिक्कयासाठी आभार _/\_

In reply to by एमी

अॅमी, तो दुवा तुमच्यासाठी दिला आहे. मी अजिबात वाचणार नाहीये. कारण की थोरले आंबेडकर आरक्षणाच्या विरोधात होते आणि ठेवलंच तर फक्त दहा वर्षांसाठी असावं असं त्यांना अभिप्रेत होतं. हे तथ्य तुम्हाला मान्य का नाही? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

धन्य आहात _/\_ === बाकीच्यांसाठी, राखीव मतदारसंघ ठेवणे आणि शिक्षण, नोकरीत आरक्षण ठेवणे या दोन भिन्न बाबी आहेत. गापैनी दिलेल्या लिंक मधूनच: In fact, while he advocated a 10-year period for the reservation of constituencies, he wanted reservation in service and colleges to be permanent. --- If those reservations were not put in plave, there would have been a People's War Group in ever Indian state. The oppressed classes would have never found a channel to come into mainstream. What would have been deni to them, they would have taken by force. In fact, I foresee the future generations taking up violence if this madness of privatisation continues. Job opportunities for Dalits are shrinking because of privatisation. Sso 'what-if-there-were-no-reservations-after-independence' is close to becoming a reality. And the way the poor Dalit youths will respond will answer the question what would have happened if there were no reservations in free India. >> याची चुणूक दिसलीच असेल गेल्या काही दिवसात...

In reply to by एमी

अॅमी,
In fact, while he advocated a 10-year period for the reservation of constituencies, he wanted reservation in service and colleges to be permanent.
थोरल्या आंबेडकरांना नोकऱ्या व शिक्षणात कायमस्वरूपी आरक्षण हवं होतं ही प्रकाश आंबेडकरांची लोणकढी थाप आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by शलभ

शलभ, अभ्यास वाढवायच्या सूचनेबद्दल धन्यवाद. त्यानुसार अभ्यास वाढवला आहे. वाढीव अभ्यासानुसार असं कळलं की थोरले आंबेडकर हयात असतांना सरकारी नोकरी व शिक्षणात आरक्षण नव्हतं. जे काही आरक्षण होतं ते केवळ राजकीय (म्हणजे लोकप्रतिनिधी निवडण्यापुरतं) होतं. सहजिकंच आंबेडकरांनी जे काही भाष्य केलंय त्याचा संबंध केवळ राजकीय आरक्षणाशीच आहे. शैक्षणिक व शासकीय नोकरी क्षेत्रांत आरक्षण १९८२ नंतर सुरू झालं. तेव्हा बाबासाहेब हयात नव्हते. आ.न., -गा.पै.

In reply to by एमी

अॅमी, शाहू महाराज घटनापूर्व काळांतले होते. स्वतंत्र भारतात नोकऱ्या व शिक्षणात आरक्षण १९८२ नंतर सुरू झालं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

म्हणजे घटनापूर्व काळात इंग्रजांनी/काही राजांनी आपापल्या राज्यात शिक्षण, नोकरीत आरक्षण दिलं होतं, मग १९४७ ते १९८२ शून्य आरक्षण होतं आणि १९८२ ला परत ते आरक्षण चालू झालं असं का? तुम्हाला ही माहिती कुठून मिळाली? === तुम्ही मअंजावर बरेच जुने आहात, आरक्षणावरच्या बऱ्याच चर्चा वाचल्या असणार, सहभाग घेतला असणार तरी असे काहीतरी बोलताय याचं आश्चर्य वाटतंय....

In reply to by गामा पैलवान

आम्ही १९८० मध्ये इंजिनिअरिंगला अ‍ॅडमिशन घेतली तेव्हा ३४ टक्के आरक्षण होते. त्यामुळे १९८२ मध्ये शैक्षणिक आरक्षण सुरू झाले हे अगदीच कैतरी आहे.

अंतरा आनंद, उत्तम लेख 1+ ===== Patriotism is the last refuge of a scoundrel. - Samual Johnson What he's calling attention to is that scoundrels, when challenged, will often use false patriotism in order to shut up their opponents. ≠======= नवपेशवाई / पेशवाई 2.0 2017’s Top Fake News Stories Circulated by the Indian Media https://thewire.in/210115/2017s-top-fake-news-stories-circulated-by-the…

बाकी, चांगले हात धुवून घेतले. छान. -दिलीप बिरुटे

एकविसाव्या शतकातील दोन दशकं पूर्ण होत असताना एकूणच राज्याच्या पारंपरिक राजकारणाचे स्वरूप बदलत चालले असून त्यामुळे जातीय, सांप्रदायिक, वांशिक समीकरणे कालबाह्य होत असल्याचा जो समज करून घेतला जात होता, त्या धारणे ला भीमा कोरेगाव घटनेने तडा दिला आहे.

In reply to by अँड. हरिदास उंबरकर

+१. काही मूर्ख लोकांमुळे संपूर्ण दलित समाज आज दुर्दैवाने इतरांपासून खूप दूर गेला.

In reply to by आनन्दा

मूर्ख लोकांमुळे संपूर्ण दलित समाज आज दुर्दैवाने इतरांपासून खूप दूर गेला.
खरंय आणि या मूर्ख लोकांनाच मनुस्मृती समर्थक म्हणतात... ज्यांनी दलितांना इतरांपासून खूsssssप दूर, अगदी गावकुसाबाहेर नेऊन ठेवलं.

In reply to by पगला गजोधर

त्या भूतकाळातून आता कोणी गावकुसाबाहेर नाहीये आणि कायद्याने दलिताना पुर्ण रक्षण पुरवले आहे.

In reply to by पगला गजोधर

प.ग., तथ्यांमध्ये किटाळ शोधायचं तुमचं कसब अपरंपार आहे. इंग्रजीत यांस assuming evidence in fact म्हणतात. गूगल करू नका. काही सापडणार नाही. आ.न., -गा.पै.

बहुधा इथे झलेल्या बर्‍याचश्या चर्चा या "दलित समाज कसा वाईट आहे" यावर नसून दलित समाजाला त्याचे नेते कसे वापरून घेतायत यावर बरीचशी चर्चा झाली. तसेच मूळ इतिहास नेमका काय आहे यावर देखील बरीचशी चर्चा झाली होती. त्यातून तुम्ही नेमके सेलेक्टिव्ह रीडिंग करून मोती वेचलेत. असो. अम्ही काय समजवणार? परंतु दलितांचे मुसलमानांसारखे होऊ नये अशी इच्छा आहे म्हणून बोलावे लागतेय. सो कोल्ड दलित असलेले माझे अनेक मित्र आहेत, पण ते आत्ता काय विचार करत असतील हे त्यांना विचारायची पण हिंमत होत नाहीये. जातीयवादाचे भूत, विशेषतः जाती जातींमध्ये भांडणे लावण्याचे प्रयत्न भारतात बरेच होत आहेत, यामागे एक मोठा राजकीय अजेंडा आहे, ते प्रयत्न दुर्दैवाने यशस्वी होऊ नयेत एव्हढीच इच्छा. मोदी विरोधक असण्याचा तुम्हाला अधिकार आहे, पण सामाजिक एकता विरोधक असण्याचा आणि एखाद्या जातीविरुद्ध गरळ ओकण्याचा अधिकार नाही (म्हणजे नसावा, बाकी बोलायचेच असेल अभिव्यक्तीस्वतंत्र्य आहेच.). किमान एकांगी विचार टाळावेत एव्हढीच इच्छा...

कंसय नं, जेंव्हा अटकेपार झेंडा लावला जातो, तेव्हा रघुनाथ'पंत' लावतात.... जेव्हा कोरेगाव-भीमाला शिकस्त मिळते, तेव्हा ती 'मराठा' सैन्याला शिकस्त मिळते.....

In reply to by पगला गजोधर

साडे तीन की पाच टक्के वाले बोलतात तिकडे कुठे लक्ष देता? तरी बर बिचारा शेवटचा बाजीराव हरला आणि त्याच्या पराभवाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या. किंवा पेशव्यांचे वन्शज साधे आयुष्य जगत आहेत.

In reply to by पगला गजोधर

आणि पानिपत हारले तेव्हा ते पेशवे हारले / सदाशिवरावभाऊ हारले. सेनापती जर बलाढ्य असेल तर हारजीतीचे श्रेय त्यालाच मिळते. इथे जातीचा संबंध नाही. दिल्लीचे तख्त हलवणारे म्हणुन महादजी शिंदे लक्षात राहतात. वडगाव च्या लढाईचे शिलेदार म्हणुन शिंदे / होळकर लक्शात राहतात. तसेच भीमा कोरेगाव मध्ये इंग्रज जिंकले म्हणुन लक्षात राहतात आणि हारणारे मराठे असतात. याऊप्पर जातीवाचक उल्लेखानेच लढवय्यांची अवहेलना करायची असल्यास काय बोलु शकतो?

In reply to by पगला गजोधर

मराठा सैन्यात अठरापगड जातीची माणसे होती. कुठल्याही सैन्याचा जो सेनापती असतो, त्यालाच हार अथवा जीत ह्यांचे श्रेय मिळते हे तुम्हाला माहित नसणे शक्यच नाही.काड्या लावण्यात तुमचा मिपावर सद्यस्थितीला कोणीही हात धरू शकत नाही.

In reply to by तेजस आठवले

शिवाजीराजे यांच्या काळात अठरापगड जातीची माणसे होती.... परंतु उत्तरं पेंशवाईंतं तसें नव्हतें....

In reply to by पगला गजोधर

इतकं ठामपणे म्हणताय तर या प्रतिसादाच्या सारखंच तुम्ही पण शिवाजी महाराजांच्या सैनिकांचा आणि पेशवाईतील सैनिकांचा "जातीनिहाय व धर्मनिहाय", माहिती/डेटा/संदर्भ आपल्याला देता येईल काय इथे ? म्हणजे ती माहिती अभ्यासून आपल्याला उत्तर देता येईल, मिपावरील सभासदांपैकी कोणालाही....

In reply to by ट्रेड मार्क

सर, एखाद्याने संदर्भ मागितला, तर मागितलेला संदर्भ न देता, उलट त्यालाच प्रतिप्रश्न विचारण्याची, आपली भूमिका मला अनाकलनीय वाटते. असो मी माझ्या वाचनात आलेली माहिती खाली देत आहे की ज्या द्वारे मी वरील प्रतिक्रिया दिली. निदान ती वाचून झाल्यावर, आपणही मी मागत असलेली संदर्भ माहिती, देण्याचं सौजन्य दाखवाल अशी अपेक्षा बाळगतो. . . शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील लक्षणीय उपस्थिती बाबत: प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार ने अपनी पुस्तक “Shivaji and his Times” के पेज 363 पर उल्लेख किया है कि शिवाजी की सेना में बड़ी संख्या में महार भी थे | इतना ही नहीं तो शिवन्नक महार को तो उनके जीवट और बहाद्दुरी के लिए पुरष्कृत करते हुए शिवाजी के पुत्र राजाराम ने कलमबी गांव भेंट किया था। ========= पेशवाईत महार सैनिकांबाबत दुजाभाव होण्याचा उल्लेख : केव्ही कोटवाले ने अपनी पुस्तक “politics of the Dalits – 1974” के पेज 142-145 में उल्लेख किया है कि कुछ लोगों ने जाति के आधार पर महारोकी मराठा शिविर में उपस्थितिपर पेशवा के ब्राह्मण सलाहकारके पास तीव्र आपत्ति जताई |  ====≠================= उत्तरपेशवाईत त्या दुजाभावात वाढ झाली असण्याची शक्यता चा रेफ: ' मराठ्यांविरुद्धची नव्हे तर ब्राह्मणांविरुद्धची लढाई ' साहित्यिक आणि समीक्षक प्राध्यापक ऋषीकेश कांबळे लढाईची दुसरी बाजू मांडतात. कांबळे यांच्या म्हणण्यानुसार, महार समाजाचा समावेश असलेल्या तुकडीनं मराठ्यांना नाही तर ब्राह्मणांना नमवलं होतं. "
ब्राह्मणांनी जबरदस्तीनं अस्पृश्यता लादल्यानं महार समाज नाराज होता.
ही अनिष्ट पद्धत बंद करण्याबाबत महार समाजानं ब्राह्मणांना सांगितलं. मात्र त्यांनी ऐकलं नाही. या कारणामुळेच महार समाजानं ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीत सामील होण्याचा निर्णय घेतला," असं कांबळे सांगतात. ते पुढे म्हणाले, "ब्रिटिश सैन्यानं महार समाजातील व्यक्तींना लष्करी प्रशिक्षण दिलं आणि पेशव्यांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. मराठा शक्तीच्या नावावर ब्राह्मणांची पेशवाई होती, त्याविरुद्धची ही लढाई होती. महारांनी या लढाईत ब्राह्मणांना हरवलं. ही लढाई महार समाजाची मराठ्यांविरुद्धची लढाई कधीच नव्हती." "महार आणि मराठा यांच्यादरम्यान मतभेद किंवा संघर्ष कधीच नव्हता. इतिहासात अशा वादावादाची उदाहरणंही नाहीत. ब्राह्मणांनी अस्पृश्यतेची प्रथा बंद केली असती तर ही लढाई कदाचित झालीच नसती," असं कांबळे आवर्जून नमूद करतात. "मराठ्यांचं नाव घेतलं जातं कारण मराठ्यांचं राज्य पेशवाईत ब्राह्मणांच्या हाती होतं. ही लढाई म्हणजे पेशव्यांची शेवटची मोठी लढाई होती. ब्रिटिशांना त्यांना नमवायचं होतं. म्हणूनच ब्रिटिशांनी महार समाजातील व्यक्तींना हाताशी घेतलं आणि पेशवाई संपुष्टात आणली." (बीबीसी मराठी)

In reply to by पगला गजोधर

तुम्ही संदर्भ मला मागितला नव्हता, त्यामुळे मी त्याचं उत्तर आधी दिलं नाही. पण जर एखाद्याने केलेल्या विधानावर जर तुम्ही संदर्भ मागताय तर त्याच आधारे मी पण तुम्ही केलेल्या विधानावर संदर्भ (खरं तर आकडेवारी) मागितली. तर... तुम्ही दिलेलं सगळं बहुतांशी २-३ लेखकांनी त्यांच्या इतिहासाच्या आकलनाप्रमाणे लिहिलेल्या पुस्तकातले उतारे आहेत. यात कुठलीही आकडेवारी वा इतर पुरावे उपलब्ध नाहीत. आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाबाबत - प्रत्यक्षदर्शींकडून मिळवलेल्या माहितीवरून तिथे जमलेले बहुतांशी लोक कामधंदा नसलेले आणि डोक्यात चुकीच्या कल्पना भरलेले होते. गेले काही दशके राजकारण्यांनी त्यांना मतांसाठी वापरून घेतलं आणि आता सुद्धा काही राजकारण्यांनी त्यांना फूस लावली आणि ते तिथे गोळा झाले. दगडफेक ई. करणारे (मग ते कुठल्याही गटाचे असोत) हे समाजकंटक होते/ आहेत. त्यांनी पैसे घेऊन हे काम घडवून आणले. संजय सोनवणींनी लिहिलेला हा लेख वाचा. साहित्यिक आणि समीक्षक प्राध्यापक ऋषीकेश कांबळे यांनी मांडलेली बाजू म्हणजे तर कहर आहे. अस्पृश्यता काय फक्त पेशवाई आल्यावर आली होती का? पेशवे हा हुद्दा तर स्वतः शिवाजी महाराज असताना पण होता. पेशवा म्हणजे अष्टप्रधान मंडळाचा प्रमुख आणि तुमच्याच म्हणण्याप्रमाणे शिवाजी महाराज असताना मराठा सैन्यात सर्व जातीच्या लोकांचा समावेश होता.अष्टप्रधान मंडळाने दलितांवर अन्याय होईल अश्या काही गोष्टी केल्या होत्या का? स्वराज्याचे पहिले पेशवे म्हणून शिवाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांची नेमणूक सन १६७४ मध्ये केली. पुढे बाजीराव पेशवांच्या काळात फक्त पेशवे प्रबळ होते पण तरी ते छत्रपतींना बांधील होते. मग प्रा. कांबळे यांच्या मते समस्त मराठ्यांनी काय ब्राम्हण असलेल्या पेशवांकडे सगळं राज्यकारभार देऊन सन्यास घेतला होता काय? अस्पृश्यता ही काय फक्त ब्राम्हण आणि इतर जातीचे यांच्यात नव्हती, तर मराठा समाजात पण होती आणि अगदी दलित समाजात जी उतरंड होती त्यांच्यातही आपापसात होती. मग कोणी कोणाशी भांडायचं आणि किती काळ? काही शे वर्षांपूर्वी झालेल्या अन्यायाबद्दल आता द्वेष बाळगून काय साध्य होणार आहे? सध्याच्या काळात अस्पृश्यता आहे का? ब्राह्मणांकडून दलितांवर कोणते अत्याचार होत आहेत? ब्राह्मणांनी जबरदस्तीनं अस्पृश्यता लादल्यानं महार समाज नाराज होता हे एकीकडे म्हणताय आणि फक्त ३०० का ५०० महार सैनिकांनी मिळून २५०००-३०००० "ब्राह्मण" सैन्याचा पराभव केला हे पण म्हणताय. तर साधा प्रश्न आहे की मग एवढे अत्याचार महारांनी का सोसले? सरळ सत्ता उलथून टाकून स्वतःच राज्य स्थापन का केलं नाही?

अर्धवटराव,
पिढीजात दु:ख भोगल्यामुळे दलीत समाजाचा दंगल सदृश उद्रेक एकवेळ स्वाभावीक म्हणता येईल, पण तो जस्टीफाय होत नाहि.
तुमच्या मतांचा आदर आहे. मात्र प्रस्तुत प्रसंग उत्स्फूर्त व स्वाभाविक नसून मुद्दाम पेटवलेला आहे. प्रकाश आंबेडकर, जिग्नेश मेवाणी हे लोकं पूज्य संभाजी भिड्यांच्या मागे लागलेले आहेत. या दोन गणंगांचा दलितांच्या हिताशी फुटक्या कवडीइतुकाही संबंध नाही. त्यांना फक्त भिडे व एकबोटे यांना अटक झालेली बघायचीय. सगळे सलोख्याच्या गप्पा मारताहेत. मारू द्या. काही हरकत नाही. पण प्रकाश आंबेडकरांचा कोणी निषेध करतांना दिसतो का? भिडे गुरुजींसारख्या ऋषितुल्य व्यक्तीवर अट्रोसिटीचा गुन्हा कशाच्या आधारे प्रविष्ट केला? प्रकाश आंबेडकरांच्या सल्ल्यानेच ना? सांगायचा मुद्दा काये की दंगलीमागचा हेतू स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर स्वत:कडे बघायला हवं ना? आ.न., -गा.पै.

तुम्ही वरतीच म्हणालात ना कि असे खडे फेकणारे रोजच दिसतात, इकडे मिपावर पण पगला गजोधर नियमितपणे खडे फेकण्याचे आणि काड्या घालण्याचे काम करतच असतात.

In reply to by तेजस आठवले

पग तर केवढ मोठ समाज कार्य करत आहेत. ते अतिशय आधुनिक असल्यामुळे सगळ्या प्रोब्लेम ना एकच उत्तर आहे त्यान्च्याकडे की ब्राम्हण हटाव. मग तेव्हा त्यान्ची ठाम खात्री असते की अख्खा पाकिस्तान मानवतावादी होईल पण ब्राम्हण राज्यावर आले की आलेच मनुस्म्रुतीचे राज्य. बाकी सगळ्यांना समान न्याय आणि संधी पण ब्राम्हण आले राज्यावर की आगपाखड

आपण एकंदरीतच समाज म्हणून विवेकी असण्यापेक्षा भावनेच्या लाटेवर हेलकावे खाणं स्वाकारतो.
+१
महारांना ते आपल्या पूर्वजांच्या लढवय्येपणाचचं प्रतिक वाटतंय तर वाटू द्या नं. तिथे ते शांतपणे इतके वर्षं जातायत तर काय बिघडलं? या संदर्भात तिथे जमलेल्या लोकांना विरोध म्हणून दुकानं बंद केली गेली, त्यांच्यावर दगडफेक झाली अश्या प्रकारच्या बातम्या आहेत, त्याचं काय?
महारांना त्या प्रतीकांचा अभिमान असला तर त्यात वावगे काहीच नाही.प्रश्न हा आहे कि आत्ताच का दंगल झाली? ज्यांनी कोणी त्यांच्यावर दगडफेक केली त्यांना शोधून शिक्षा झालीच पाहिजे. कोरेगाव-भीमा गावातल्या ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन हिंसाचार करणारे, दगडफेक करणारे लोक बाहेरून आले होते अशी माहिती सांगितली आहे.त्या अनुषंगाने पोलीस आणि शासकीय, न्यायालयीन यंत्रणा यांनी तपास करून दोषींना शोधून काढणे अपेक्षित आहे. https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/bhima-kor… तपास यंत्रणांनी काम सुरु करण्यापूर्वीच प्रकाश आंबेडकरांनी भिडे गुरुजी आणि एकबोटे यांच्यावर आरोप केला. त्यासाठी त्यांनी काहीही पुरावे दिले नाहीत. वरती ह्या दोघांना अटक झाल्याशिवाय शांतता प्रस्थापित होणार नाही असे सुद्धा सांगितले.याकूब मेमनवर ज्या प्रकारे गुन्हे दाखल करण्यात आले, तसेच गुन्हे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर दाखल करा, अशी मागणी केली. हे तर काही च्या काही होतं. याकूब ला शिक्षा न्यायालयाने सगळे साक्षीपुरावे बघितल्यानंतर कायद्याच्या चौकटीत दिलेली होती. तेव्हापण लोकसत्तासकट अनेक पुरोगाम्यांनी अश्रू ढाळले होते. https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/prakash… https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/prakash…
अश्या प्रकारे त्यांच्या विरूद्ध जनमत तयार करणं कोणत्या संस्कृतीत बसतं?
हे तर सरळ सरळ घडवून आणलेलं आहे.मागील साधारण वर्षभरातल्या घटना बघितल्या तर नितीन आगे प्रकरण, कोपर्डी प्रकरण, मराठा आरक्षणाची मागणी आणि त्याच्या समर्थनार्थ निघालेले लाखोंचे मोर्चे आणि त्या निमित्ताने झालेले शक्तिप्रदर्शन हे सगळे विचारात घेऊ. मराठा समाज एका झेंड्याखाली एकत्र आला आणि ह्या निमित्ताने झालेले शक्तिप्रदर्शन आणि एकजूट काहीजणांच्या छातीत धडकी भरवणारी ठरली असू शकते.त्यातच कोपर्डीचा निकाल लागला आणि नितीन आगे प्रकरणात साक्षीदार फिरल्याने न्याय झाला नाही त्यामुळे पण काही प्रमाणात असंतोषाची बीजे पेरली गेली असावीत. ह्या घटनेनंतर रामदास आठवले यांनी सरळसरळ मराठा लोकांनी हा हल्ला केल्याचे सांगितले होते. https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/i-feel-that-those-wh…
राजकिय अपरिहार्यता: प्रत्येक गोष्टीत राजकारण्यांना दोष देणं ही फॅशन बनली आहे. कारण ते सोप्पय. आपणही आपल्या व्यक्तीगत पातळीवर हे राजकारण पुरेपूर खेळत असतो. अश्या जाती विभागणीला, उतरंडीला समाजात मान्यता असते, प्रत्येक व्यक्तीच्या मनात ती उतरंड जागी असते म्हणूनच त्याचा फायदा राजकारणी उठवू शकतात. प्रत्येकाने व्यक्ती म्हणून आपण ही उतरंड पाळतो की नाही (मानतो की नाही असं मी म्हटलेलं नाही. कारण ’मी मानत नाही पण नाती तोडून चालत नाहीत, सवय ’, वैगेरे सुटकेचे मार्ग असतात ) हे मनाला विचारावं. खालच्याला वर येण्यासाठी व्यक्तीगत पातळीवर आपण किती आधार दिलाय हे शोधून पहावं. तसं होत नाही. मागासांच्या वागण्यातल्या विसंगती शोधून, त्यांची आधुनिकता किती बेगडी आहे ह्याकडे बोट दाखवणारे आणि त्यांना वेगळे पाडणारेच मोठ्या संख्येने असतात. (इथे या विषयावर ज्या हिरीरीने लिहीलं गेलंय त्यावरून सिद्धच होत.) "जातीने महापुरुष वाटून घेतले आहेत", असं तोंडाने म्हणायचं आणि फक्त आपल्याच जातीतल्या महापुरुषाचा उदो उदो करायचा ही दांभिकता बहुसंख्यांमध्ये असते, म्हणून तर असे अभिमानी गट तयार होतात आणि राजकारण्यांना आयतं खाद्य मिळतं.
ह्या पूर्ण पॅराग्राफशी सहमत. जर आपल्याच जातीचा उदो उदो करत आहेत असं म्हणावं तर संभाजी भिडे गुरुजी हे ब्राह्मण असावेत आणि ते तर शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या वैचारिक प्रभावाखाली आपले काम करतायत.शिवाजी महाराज तर काही ब्राह्मण नव्हते, ते तर मराठा होते.आपल्या पैकी किती जणांना शिवाजी महाराज आणि त्यांची कुणबी/ मराठा जात ह्याबद्दल बरेच वर्षांपूर्वी(२० वर्षांपूर्वी वगैरे.) वाद झडलेले आठवतायत ?संभाजी ब्रिगेडला जे बाबासाहेब पुरंदरे जळी स्थळी दिसतात ते तर ब्राह्मण आहेत आणि त्यांनी आयुष्य शिवाजी महाराजांच्या सेवेसाठी वाहून घेतले आहे.त्यांच्या लेखनाविषयी मतमतांतरे असतील, पण ब्रिगेड त्यांचा दुस्वास करते हे कोणीही नाकारू शकणार नाही.
अर्धवट माहिती देऊन पुढील पिढीच्या मनात अशी विषाची पेरणी केली जाते.
हे फक्त दलितांच्याच बाबतीत होतं असं नाही, सर्वच जातींच्या बाबतीत होतं.प्रत्येक समूहाचं, जातीचं, धर्माचं स्टिरीओटायपिंग करणं ह्याला आपण इतके अधीन झालो आहोत की ह्यातून कोणीच सुटत नाही.दलितांच्या / मराठ्यांच्या / ब्राह्मणांच्या /दुसऱ्या जातींतल्या पुढील पिढीत अशी विषपेरणी केलीच जात नाही असे काही आहे का ? दलितांना हीन वागणूक दिली जात होती, त्यांना अस्पृश्य मानून त्यांचा स्पर्श टाळला जात होता हे कोणीही अमान्य करणार नाही. पण हे करणारे काय फक्त ब्राह्मणच होते ? सगळेच सवर्ण त्यांना अशी वागणूक देत असणार.तसेच दलितांमधला ज्या काही जाती असतील, त्यांच्या पण एकमेकांत काही उतरंड असणारच की,का सगळे दलित एकमेकांना समान समजत होते आणि समानतेने सगळे व्यवहार करत होते ?मग दोष कोणाकोणाला द्यायचा ?
वेळ येताच "गेले आपल्या जातीवर", "हे असंच अन्कल्चर्ड वागणार", "माजलेत" अशी मुक्ताफळं उधळली जात नाहीत का?
कोण उधळतो ही मुक्ताफळे ? आणि अशी मुक्ताफळे दलित, मराठे आणि ब्राह्मण एकमेकांबद्दल उगाळतात का फक्त सवर्ण दलितांबद्दल उधळतात ?
आरक्षण घेतलेली पहिली पिढी आता कुठे रिटायर होतेय. पिढ्यापिढ्या शिक्षण, मानाचं जगणं नाकारलं गेलेली, स्वत:ची जमीन नसलेली अशी जमात आता कुठे प्रवाहात येऊ लागलीय तर फुकटचंबूपणा दिसतो.
पिढयानपिढया शिक्षण कोणी नाकारलं होतं हो ?शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी शिक्षण असे तुम्ही गृहीत धरताय. प्रत्येक जाती त्यांचे त्यांचे व्यवसाय करत होती. न्हावी, चांभार, सुतार, लोहार, वाणी, सोनार, मूर्तिकार, शिल्पकार हे सगळे त्यांचे पिढयानपिढया चालत आलेले व्यवसाय सांभाळत होती. पुस्तकी शिक्षण हे इंग्रजांच्या काळात चालू झाले. पूर्वीच्या काळी ब्राह्मणांना सोडून इतरांना अध्यायन करण्याचा अधिकार नव्हता, पण मग इतर जाती पण आपापल्या व्यवसायाचे ज्ञान इतरांना सहज देत होती ?ज्यांच्या जमिनी होत्या ते लोक त्या कसायला माणसे ठेवत, त्यांना कुळे म्हणत, ह्याच कुळकायद्यात ब्राह्मणांकडच्या जमीनी गेल्या. तुम्ही आम्ही जसे एखाद्या कंपनीत नोकरी करतो तसे.डोंगरावरचे आदिवासी पण प्रवाहाबाहेरचे पण त्यांना दारात नागली वारी उगवून खायला कुणाची ना नव्हती.जमीनी नव्हत्या तर मग महार वतन दिल्याचे उल्लेख आहेतच की. म्हणजे महारांकडे शौर्य होते, ताकद होती आणि त्यांच्या पराक्रमाचे कौतुकही होत होते. बरं पूर्वीचे सगळे सरदार, जमीनदार, वतनदार, अंमलदार, मामलेदार, जमादार, तसेच गावाची व्यवस्था पाहण्यासाठी असलेले देशमुख, चौगुला, खोत, इनामदार हे झाडून सगळे ब्राह्मण होते ? एक पेशवाई सोडली तर ब्राह्मणांकडे कधीही सरदारकी नव्हती.प्रचंड गरिबी आणि अंतर्गत प्रश्न ब्राह्मणांना पण होतेच की.
आमचे पूर्वज कसे वेदशास्त्रसंपन्न होते म्हणत अभिमान मिरवता त्याच पूर्वजांचा (त्यावेळची जनरीत म्हणून का होईना) काहीजणांना जन्मावर आधारीत उपेक्षेची वागणूक देण्यात सहभाग होताच म्हणून लाजही वाटून घ्यावी का वाटत नाही? यालाच दांभिकपणा म्हणतात.
ब्राह्मणांच्या पूर्वजांनी त्या काळी केलेल्या वाईट वर्तणुकीची जर आजच्या काळातील ब्राह्मणांना लाज वाटायला हवी तर मग पूर्वीच्या दलितांना दिलेल्या वागणुकीचा प्रभाव आत्ताच्या दलितांवर पडला पाहिजे हा दांभिकपणा नाही का ? ब्राह्मण जर पूर्वजांचा अभिमान मिरवत असतील तर मग आत्ता तुम्ही दलित पूर्वजांवरील अत्याचारांचे भांडवल करून त्याचा वापर करून घेत घेता हा दांभिकपणा नाही ?
दलितांच्या आंदोलनात नासधूस जाळपोळ होतेच:- इतर आंदोलनात होत नाही का?. स्वघोषित सैनिक काय पुष्पवृष्टी करत आंदोलनं करतात का? जाळपोळीचं समर्थन नाही पण ठराविक समाजाला दोष का देता? रिकामटेकडे आणि समाजकंटक ही नासधूस करतात आणि प्रत्येक आंदोलनात थोडफार होतंच.
हे १००% खरे आहे.फक्त दलितांच्या आंदोलनात नासधूस होते असे कोणी म्हणत असेल तर ते साफ चुकीचे आहे.
प्रकाश आंबेडकरांनी याचा राजकीय लाभ उठवला / त्यांनी चिघळवलं:
ह्याबद्दल खरं खोटं माहित नाही, पण ज्याप्रकारे ते अचानक प्रकाशझोतात आले त्यावरून अशी शंका घेतली जाऊ शकते.
मात्र राम होताच आणि तो अयोध्येत विवक्षित ठिकाणीच जन्मला हे ठामपणे सांगीतलं जातं, जणू रामजन्मानंतर घुगर्‍या वाटायचं काम कौसल्यामातेनं यांच्याकडेच सोपवलेलं होतं. ]
रामाच्या जन्माबद्दल माहित नाही, पण सर्वोच न्यायालयाने व्यवस्थित आढावा घेऊन आणि सगळे पुरावे नीट तपासून त्या जागेवर पूर्वी राम मंदिरच होतं असं स्पष्टपणे म्हटलंय.
थेट पुराणकाळात नेऊन दोन दंगलखोर बनविणार्‍या, "खतरेमें" ची हूल देत हिंदू समाजाला गेल्या दशकांपर्यंत आणि अजूनही वेठीला धरणार्‍यांबद्द्ल प्रेम असणार्‍यांनी दोन दिवसातल्या आर्थिक नुकसानीबद्द्ल गळे काढावे हा शुद्ध दांभिकपणा नाही का?
हा निष्कर्ष कसा काढलात ?कोणाला त्या गोष्टीचे प्रेम आहे ? पूर्वी आर्थिक नुकसान झाले असेल म्हणून आत्ता झाले तर काहीच बोलायचे नाही ?
अरे ही गावकुसाबाहेर ठेवलेली माणसं आता प्रवाहात येतायत. आता जगणं शिकलेली ही नवीन पिढी ही आधीच्या पिढीचा अशिक्षित वा अर्धशिक्षितपणा, एकंदरीत जगण्यात वाढलेली स्पर्धा, स्त्री-पुरूष समानता, गावाकड्ची आपली माणसं आणि नवीन सुशिक्षित समाजात वावरताना आजूबाजूला गोळा केलेली माणसं यांच्यात वावरण्याचा तोल सावरणे, आपल्या पूर्वज-काळात फारसं अभिमानास्पद काही नाही किंवा जे आहे असं आपण मानतो त्याला समाज मान देत नाही अश्या अनेक पातळ्यांवर लढत असते. संपन्नतेची सुखं उपभोगतानाही स्वप्निल सोनावणे, नितीन आगे सारखी प्रकरण त्यांना आपण आजूनही गावकुसाबाहेरच आहोत याचं वेदनादायक भान आणून देतात, सैरभैर करून सोडतात. व्यक्तिगत पातळीवर छोटे मोठे संभावित अपमान आणि "तुम्ही ते काय!" च्या नजरा असतातच.
हे होत असणार हे मला मान्य आहे आणि त्याची जाणीव पण आहे.
त्या पोस्टवर एवढ्या विखारी प्रतिक्रिया आल्यात की हेच का ते सामान्य मध्यमवर्गीय आणि हाच काय तो ब्राम्हणी सुसंकृतपणा, अशी शंका येते.
सोशल मीडिया वरच्या ह्या बातम्या मध्यमवर्गीयांनी आणि ब्राह्मणी विचारधारा असल्यानी दिल्या आहेत ह्याचा काय पुरावा ? कोणीही आपली ओळख लपवून प्रतिक्रिया देऊ शकतो. इकडे मिपावर पण काही लोक पगलेपण घेऊन काड्यासारु प्रतिक्रिया देत असतातच की.

तेजससी/गामाजी, तुमचंच बरोबर हो, तुमच्या मता प्रमाणे कोरेगावच्या लढाईत पेशवाई विजयी झाली, पुढची शे दोनशे वर्षे , अखंड हिंदुस्तानवर त्यांनी एकछत्री अंमल केला, राज्य करूकरू ते शेवटी कंटाळले, शेवटी जवाहलाल नेहरूंच्या हाती भारताच्या चाव्या ठेवून ते परत आपल्या कोकेशस पर्वतराजीत आपल्या बरखट्सगार्डन या स्वगृही परतले.... पेशवाई विजयी झाल्यामुळे त्यानंतर 2 वर्षांनी विजयस्तंभ कोरेगाव येथे उभारला जाऊच शकत नाही... तो नक्कीच २०१४ नंतर गुपचूप एका रात्रीत उभारला गेला असणार.... आसेतुहिमाचल पेशवाईचा एक छत्री अंमल असल्याने, १८५७ चा उठाव हा नक्की कोणाविरुद्ध?, त्यामुळे १८५७ चा उठाव ही फेक-इतिहास असणारच तुमच्या मते , कारण पेशवाईचा एकछत्री राज्य होते नं....

ब्राह्मण द्वेषाचे मूळ : (आभार :श्री धम्मदीप कसबे ) एका ब्राह्मणेतराचे मत ................ भटाळलेले व्हा… माझ्या अनुभवानुसार मी हे लिहितोय. कदाचित इतरांचा अनुभव वेगळा असू शकतो. पण ब्राह्मणेतर समाजाच्या मनात ब्राह्मणांबद्दल न्यूनगंडInferiority complex आहे. हे मी बर्‍याचदा पाहिलेलं आहे. आम्ही थिएटर करायचो त्या ग्रूपमध्ये असे अनेक नट होते जे ब्राह्मणांना पाहून बोटे मोडायचे. त्यांचं म्हणणं असं की ब्राह्मणांचे उच्चार चांगले असतात. मराठी शुद्ध बोलतात, म्हणून अनेक लोक स्टेजवर अभिनय करतात. पण केवळ उच्चार आणि शुद्ध मराठी म्हणजे अभिनय नव्हे. हे काही अंशी खरं सुद्धा आहे. मी अनेक असे नट (व्यावसायिक नव्हे, हौशी नट) पाहिलेत जे उच्चार चांगले आहेत म्हणून नट झालेत. पण अभिनयाच्या नावाने बोंब. पण ब्राह्मणांविषयी या गोष्टी ब्राह्मणेत्तर समाजाकडून द्वेष म्हणून बोलल्या जातात. द्वेष हा बर्‍याचदा न्यूनगंडातून निर्माण होतो. या न्यूनगंडाला सुद्धा भली मोठी परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातच हा द्वेष निर्माण करण्यात आला होता. आज भारताला स्वतंत्र होऊन ७० वर्षे होऊन गेली आहेत. तरीही आज सुद्धा जाणीवपूर्वक ब्राह्मणद्वेष पोसला जात आहे. ब्राह्मणद्वेष हा व्रत म्हणून जोपासला जात आहे. मी स्वतः ब्राह्मणेतर समाजातला आहे. मला कुणी ब्राह्मणांविरोधात बोलताना दिसलं तर मी त्याला भटाळलेले व्हायला सांगतो. जसं लोक म्हणतात की ब्राह्मणांवर लहानपणापासूनच चांगले संस्कार होतात. त्यांना स्तोत्र वगैरे माहित असतात, त्यांचं मराठी चांगलं असतं. पण ते संस्कार आम्हाला मिळत नाही. आमच्या आई-वडीलांवर असे संस्कार कधी झाले नव्हते तर ते आमच्यावर कुठून करणार? अशी तक्रार लोक करतात. म्हणून मी त्यांना म्हणतो, अरे लहानपणी तसे संस्कार झाले नाहीत हे मान्य. पण मग आता तुम्हाला कोणी थांबवलंय? आता तुम्ही तुमच्यावर संस्कार करुन घ्या आणि आपल्या मुलांवरही करा. आपल्याला जर शुद्ध बोलता येत नसेल तर आपण आता शिकू शकतो. आता संस्कार वर्ग वगैरेंच्या माध्यमातून या गोष्टी शिकता येतात. पण मला वाटतं की ब्राह्मणेतर समाजातील मुले, जे कला-क्षेत्रात येऊ पाहत आहेत, त्यांनी शुद्ध मराठीपेक्षा स्पष्ट मराठीवर अधिक लक्ष दिलं पाहिजे. उदा.अनेक लोक असतात, त्यांना कसली घाई असते कळत नाही. ते काय बोलतात हे ब्रह्मदेवालाही कळत नाही. इतकं वेगात आणि अस्पष्ट बोलतात. आम्हाला थिएटरमध्ये शिकवलं गेलंय की संवाद म्हणताना आपले शेवटची अक्षरं सुद्धा ऐकू आली पाहिजे. म्हणजे समजा असं वाक्य असेल, “मी आता बाजारात जाऊन फुलं आणणार”. तर बरेच नट शेवटचा “र” तोंडातल्या तोंडात उच्चारतात. म्हणजे “मी आता बाजारात जाऊन फुलं अण्णा” असं काहीतरी ऐकू येतं. मग या वाक्याचा अर्थच बदलतो. ही समस्या आहे अनेक हौशी ब्राह्मणेत्तर नटांची. या समस्येतून पळवाट शोधण्यासाठी ते ब्राह्मण समाजावर आसूड ओढताना मी पाहिलंय. हे एक उदाहरण. एखादा ब्राह्मण समाजातील उत्तम नट असेल तरी सुद्धा त्याच्याकडे पाहून नाक मुरडतात. हे केवळ कलेच्या क्षेत्रातच होतं असं नाही. तर सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यातही होतं. आपण द्वेषाची परिसीमा इतकी गाठली आहे की आपल्याला ब्राह्मण मुख्यमंत्री सुद्धा आवडत नाही. प्रत्येक गोष्टीत आपण जात पाहायला लागतो. ते याच Inferiority complex मुळे. म्हणूनच मी माझ्या मित्रांना सांगत असतो, भटाळलेले व्हा. म्हणजे काय तर त्यांच्यासारखे हुशार व्हा. ब्राह्मण समाजाचा द्वेष करु नका. तर त्यांच्याकडून अनेक गोष्टी आपल्याला शिकता येतील. मला पूर्वी “ष” हा उच्चार करता येत नव्हता. माझ्या एका ब्राह्मण मित्राने मला तो उच्चार शिकवला. आपणही आपल्या मुलांना श्लोक, स्तोत्र पठण करायला बसवलं पाहिजे ज्यामुळे त्यांचे उच्चार आणि भाषा स्पष्ट होईल.. मग इथे काही लोक इतका अतिरेक करताना म्हणतात, संस्कृत ही ब्राह्मणांची भाषा आहे. हा पराकोटीचा द्वेष आहे. म्हणजे आपल्या नाकर्तेपणात सुद्धा समाधान मानून जे कर्ते आहेत त्यांनाच नाकर्ते म्हणायचे. आजही काही लोक मनुस्मृती जाळतात. म्हणे मनुस्मृती हे ब्राह्मणांचं कारस्थान आहे. मनु हा स्वतः क्षत्रीय होता. मला मनुस्मृतीत काय लिहिलंय यात मुळीच रुची नाही. आज हिंदूंनी संविधान स्वीकारले आहे. म्हणून मनुस्मृती चांगली की वाईट याचे सोयर-सुतक आम्हाला नाही. पण मनुस्मृतीतल्या एखाद्या श्लोकामुळे माझे उच्चार सुधारणार असतील तर मी नक्कीच त्याचे पठण करीन. उच्चारासाठी संस्कृत श्लोक हा उत्तम उपाय आहे. ब्राम्हणांच्यात अनेक प्रगतिशील लोक कलाकार व्यावसायिक आहेत.ते केवळ ब्राह्मण आहेत म्हणूण त्यांचा इतका द्वेष करणे म्हणजे अक्षरशः मूर्खपणा आह ब्राह्मण समाज कोणतेही आरक्षण नसताना स्व-बळावर आज जगत आहे. लोक त्यांचा द्वेष करतात. पण ते प्रतिकार न करता कर्तृत्व गाजवत आहेत. या समाजाला मी बुद्धीचा समाज मानतो आणि बौद्धिक पातळीवर मलाही ब्राह्मण व्हायला आवडेल. त्यासाठी मला माझे आडनाव बदलायचे नाही, मला माझी जात, वर्ण बदलायचा नाही. आता कुणी म्हणेल की मी अजूनही जातीला चिकटून आहे. पण ज्या दिवशी आपण अरक्षण वगैरेंच्या चक्रव्यूहातून बाहेर पडू तेव्हा खर्‍या अर्थाने आपल्याला भारतीय समाज म्हणून जगता येणार आहे. नाहीतर हिंदू, मुस्लिम, दलित, बौद्ध असले भेद राहणारच. त्यामुळे आता ७० वर्षे झाल्यानंतर एक भारतीय समाज म्हणून आपल्याला ७० वर्षे मागे जायचे आहे की अद्ययावत व्हायचे आहे? हे आपल्यालाच ठरवले पाहिजे. त्याची सुरुवात साहित्याला दलित किंवा मुस्लिम न म्हणता करता येईल. साहित्य हे साहित्यच असावे. ते मराठीत लिहिले गेले असेल तर ते मराठी साहित्य, हिंदीत लिहिले गेले असेल तर ते हिंदी साहित्य. एवढीच काय ती वर्गवारी असावी. जाती, पंथाच्या आधारावर साहित्याची वर्गवारी ठरु नये. जे Inferiority complex मुळे ब्राह्मणांचा द्वेष करतात. त्यांनी ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ कसे होता येईल याचा विचार करायला पाहिजे. ब्राह्मणांची मुले कोणत्या कोणत्या कलेत पारंगत असातत. कुणी गाणे म्हणतो, कुणी तबला वाजवतो तर कुणी चांगले लेखन करतो. ही सवय तुम्ही स्वतः आणि तुमच्या मुलांना लावा. ब्राह्मणेत्तर उच्चभ्रू समाज सोडला तर इतर लोक आपल्या मुलांना या सवयी लावत नाहीत. ब्राम्हण समाजाचे पुढारी नाहीत किंवा त्यांचा असा कोणताही नेता नाही ज्याच्या एका हाकेवर समाज रस्त्यावर उतरेल. कारण प्रत्येक ब्राम्हण हा स्वतंत्रपणे विचार करू शकतो. मराठा काय इतर मागासवर्गीय काय किंवा दलित काय नेत्याच्या हाकेला मेंढरांसारखे मागे जातात. ७० वर्षे झाली पण मराठा समाजातील 60-65 घराणी सोडली तर बाकी मराठा समाज मागासलेलाच राहिला आहे. सगळे पुढारी मंत्री इ याच काही घरण्यातून येतात आणि त्यांसाजे आपापसातच रोटी बेटी व्यवहार होतात. बाकी मराठा समाजाला कोणीही शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांच्या नावावर चिथावू शकतो. हीच स्थिती आमच्या दलित समाजाची आहे. पूज्य डॉ. बाबासाहेबांच्या नावाने आमच्या नेत्यांनी आमच्या समाजाचा वापर करून घेतला आणि स्वतः सरकारी जावई झाले आहेत. आमचा समाज मात्र आज आहे तिथेच आहे. 1 जानेवारीला ज्या तरुणांनी बंद मध्ये भाग घेऊन हिंसाचार केला त्यांना आता सरकारी संघटना "वेचून वेचून" आत टाकतील. त्यांना जामीन द्यायला किंवा सोडवायला आमचे नेते काही येणार नाहीत. नेत्यांच्या चिथावणीने चार दगड फेकताना आपण विद्रोही म्हणून यशस्वी झाल्याचे वाटते पण "आत टाकल्यावर बाहेर" येण्यासाठी पदरमोड करावी लागली की भ्रमनिरास होतो. नंतर खटला भरला की या तरुणांना सरकारी नोकरीतून बाद केले जाईल. याची ना आमच्या नेत्यांना ना खंत ना खेद. आपण नेत्यांच्या चिथावणीला बळी न पडता किंवा मेंढरांसारखे त्यांच्या मागे विचार न करता जाण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीचा विचार करायला शिकू या. अन्यथा अजून 70 वर्षांनी पण आपण आहोत तेथेच राहू. ब्राह्मणांचा द्वेष करण्यापेक्षा त्यांच्यासारखेच व्हा लेखक: धम्मदीप कसबे. व्हॉटस अँप वरून साभार

खरे डॉक्टर, धम्मदीप कसबे यांचा संदेश उद्धृत केल्याबद्दल आभार. दलित नेत्यांविषयी केलेलं हे विधान विशेषकरून पटलं :
नेत्यांच्या चिथावणीने चार दगड फेकताना आपण विद्रोही म्हणून यशस्वी झाल्याचे वाटते पण "आत टाकल्यावर बाहेर" येण्यासाठी पदरमोड करावी लागली की भ्रमनिरास होतो. नंतर खटला भरला की या तरुणांना सरकारी नोकरीतून बाद केले जाईल. याची ना आमच्या नेत्यांना ना खंत ना खेद.
मलाही हेच सांगायचं होतं पण नीट शब्द सापडंत नव्हते. प्रकाश आंबेडकर नक्षलवादी आहे. या माणसाचा दलितांच्या हिताशी काडीमात्र संबंध नाही. काही संबंध असलाच तर तो हितशत्रू म्हणून आहे. प्रकाश आंबेडकरांपासून सावध राहायला हवं. मराठा समाजातही थोडीफार अशीच परिस्थिती असल्याचं लेखकाचं निरीक्षण आहे. आ.न., -गा.पै.