Skip to main content

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुक-२०१७ मतमोजणी

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुक-२०१७ मतमोजणी

Published on शनीवार, 16/12/2017 प्रकाशित
नमस्कार मंडळी, गुजरात आणि हिमाचल प्रदेश राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सोमवार १८ डिसेंबर रोजी होईल. मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होईल. नेहमीप्रमाणे त्या दिवशी मी मिपावर ऑनलाईन असणारच आहे. जसेजसे कल आणि निकाल येतील तसेतसे ते इथे पोस्ट करणार आहे. त्यासाठी हा नवा धागा उघडत आहे. या धाग्यावर विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि त्याअनुषंगाने संबंधित विषयांवर चर्चा व्हावी ही अपेक्षा. धन्यवाद.

याद्या 44036
प्रतिक्रिया 249

सर्वच एक्झिट पोल भाजप ला स्पष्ट बहुमत दाखवत आहेत. त्यामुळे नक्कीच भाजप ठसाठशत विजयी होण्याची शक्यता वाटते . यातून एकच गोष्ट अधोरेखित होतीये, देशात अजूनही, मोदी यांना भरपुर सपोर्ट आहे, शिवाय विरोधी पक्षाकडे मोदींना आव्हान देईल अशी शक्ती व कुवत नाहीये, विरोधी पक्षाने सखोल आत्मचिंतन व सातत्यपूर्ण प्रयत्न व मेहनत केलीच पाहिजे.

In reply to by पगला गजोधर

आपला संबीत पात्रा/मणी अय्यर तर होत नाहीये नं? अशी विचार करण्याची वेळ काही लोकांवर आहे. दु ४ वा bjp 98, cong 81 मी मागच्या वेळेस अंदाज दिलेली 95/85 http://www.misalpav.com/comment/974440#comment-974440 कदाचित मणीला पडमभूषण देतील यावेळी.... जर 98 म्हणजे विकासासाठी... तर 81 हे विकास पोकळ आहे हे दाखवतो. जर 98 जातीय राजकारणाविरुद्ध तर 81 हे धार्मिक विद्वेषा विरुद्ध का नाही समजायचे ? जर 49 टक्के मतदार देशप्रेमी तर 43% देशद्रोही नाही... 5 लाख मते नोटा ला ? जर सलग 22 वर्षे राज्य हातात ठेवणे आचिव्हमेंट तर, 55 वर्षे देश हातात ठेवणे आचिव्हमेंट कसे नाही ? जर 98 आमदार राज्यसभेच्या निवडणुकीत प्रभाव टाकणार तर 82 आमदार पण प्रभाव टाकणारच नं ?

In reply to by पगला गजोधर

2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींवर जनतेने विश्वास टाकला, त्यावेळीसचा विरोधी पक्ष व आताचा विरोधी पक्ष यात गुणात्मक दृष्टया फरक जाणवतोय का ? होम पिच वरची ही मॅच Bjp जिकणार होतीच, परंतु किती फरकाने हाच मुद्दा होता. या होम पिचवर नाही म्हटलं तरी थोडासा bjp ला अडवांतेज होताच, त्यांची कार्यकर्ता फळी मजबूत होतीच, तरीही टफ फाईट झाली, तर विरोधी पक्ष आत्मनिरीक्षण करून स्वतः सुधारणा करू शकतात, फक्त अमित शाहच सुधारणा करत नाही.... आज सुधीर चौधरी चं (झी वाल्या)तोंड पाहण्यासारखं होतं...

In reply to by पगला गजोधर

गुजरातेत Bjp चा सीट ट्रेंड हा डाऊनट्रेंड कन्टीन्यू राहिलाय.... ट्रेंड रिवर्सल आजिबात पाहण्यात नाहीये.... उलट काँग्रेस चा पॅटर्न दोजी मॉर्निंग स्टार आहे का ?

मला वाटतं की टाइम्सने त्यांच्या साईटमार्फत केलेला देशव्यापी सर्व्हे बरच काही सांगून जातो...

मतमोजणी ८ वाजता सुरू होईल. सुरवातीला पोस्टल मतांची मोजणी होईल. ती पूर्ण झाल्यानंतर ई.व्ही.एम उघडण्यात येतील. साधारण ८ वाजून १० मिनिटांच्या सुमारास पहिले कल हाती येतील. जसेजसे कल (आणि नंतर निकाल) हातात येतील तसेतसे मी ते इथे पोस्ट करणार आहेच.

भाजपा हरली तर कोणत्या मुद्याचा जनमतावर परिणाम झाला म्हणाल? १) नोटाबंदी २) जाएसटी ३) गोहत्या बंदी व त्यांचा अतिरेक ४) आरक्षण ५)इतर?

In reply to by कंजूस

भाजपचा पराभव झाल्यास अ‍ॅन्टी इन्कबन्सीला तोंड देण्यात आलेले अपयश, मोदींच्या नावावर लोक नेहमीच मते देतील हा आत्मविश्वास नडणे, काँग्रेसने हार्दिक पटेल प्रभृतींना पुढे आणून भाजपला चेकमेट केले आणि त्याला तोंड देण्यात भाजपला अपयश आले वगैरे मुद्दांचा समावेश असेल.

In reply to by गॅरी ट्रुमन

GST मुळे व्यापारी वर्गाचा असंतोषही थोडाफार हातभार लावेल असे वाटते. कारण यामुळे cash flow वर नाही म्हणलं तरी परीणाम झाला आहेच.

In reply to by चाणक्य

जी.एस.टी चा सुरतमध्ये मोठा परिणाम होईल असे म्हटले जात होते. पण सुरत शहरातील सगळ्या जागा भाजपनेच जिंकल्या आहेत.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांना भाजप जिंकल्यास मुख्यमंत्री होणार का हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी 'पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल' असे म्हटले. त्यामुळे पक्षाचा रूपाणी सोडून अन्य कोणाला मुख्यमंत्री करायचा बेत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना निवडणुक झाल्यानंतर मुख्यमंत्री केले जाणार का? ते मेहसाणामधून निवडणुक लढवत आहेत. त्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर पटेल मतदार आहेत त्यामुळे त्यांची जागा धोक्यात आहे असे म्हटले जात आहे. मुळात विजय रूपाणी किंवा अन्य कोणा भाजप नेत्याला मुख्यमंत्री करायचा प्रश्न उभा राहणार की नाही हे समजेल अजून काही तासात. उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मतमोजणी पद्धत चुकीची आहे. गुप्त मतदान नसते. एकेका भागाला एकेक मतपेटी असते ती जोडली की त्यात्या भागातल्या लोकांनी कोणत्या पक्षाला मत दिले हे पक्षांना कळते. तसं करायला नको. फक्त त्या पेटीत किती मतं आहेत ते दिसले पाहिजे. प्रभागाच्या सर्व मतपेट्या जोडून झाल्यावरच पक्षांची मते दिसली पाहिजेत आणि विभागाचा निकाल.

मतमोजणी सुरू झाली आहे. पहिले कल काही मिनिटात हाती येतील.

गुजरातमधील पहिले कल हाती आले आहेत. पहिला कल भाजपच्या बाजूने गेला आहे. नक्की जागा कोणती हे अजून सांगितलेले नाही.

गुजरातमधून आणखी काही कल आले आहेत. भाजप ४ जागांवर तर काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे.

आता गुजरातमध्ये भाजप १० जागांवर तर काँग्रेस २ जागांवर पुढे आहे. काँग्रेस गांधीनगर उत्तर आणि पाटणमधून तर भाजप अंजार, दहेगाम, दीसा या जागांवरून पुढे आहे.

हे आकडे पोस्टल मतांचे आहेत. त्यामुळे हे आकडे वेगवेगळ्या चॅनेलवर थोडे वेगळे आहेत. हे आकडे थोडेफार बदलू शकतात. नितीन पटेल मेहसाणामधून पुढे आहेत. घाटलोडिया या भाजपच्या बालेकिल्ल्यातून भाजप पुढे आहे.

एन.डी.टी.व्ही वर भाजप २० आणि काँग्रेस ४ वर पुढे असे दाखवत आहेत तर रिपब्लिकवर ९-९ असे आकडे दाखवत आहेत.

मटा : गुजरात भाजपा ११ तर कॉग्रेस १० असे दाखवत आहे. हिमाचल मध्ये भाजपा १ असे दाखवत आहे.

एन.डी.टी.व्ही वर दावा केला जात आहे की त्यांनी निवडणुक आयोगाने व्हेरीफाय केलेले आकडे दाखवत आहेत. एन.डी.टी.व्ही वर भाजप ४४ तर काँग्रेस ११ जागांवर पुढे दाखवत आहेत. तर इतर लोकल चॅनेल्सवर भाजप ५२ ठिकाणी आणि काँग्रेस ४१ ठिकाणी आघाडीवर आहे असे दाखवत आहेत.

आता एन.डी.टी.व्ही आणि इतरांमधला फरक थोडा कमी झाला आहे. एन.डी.टी.व्ही अर भाजप ५७ आणि काँग्रेस १९ जागांवर पुढे दाखवत आहेत तर लोकल चॅनेलवर भाजप ६३ आणि काँग्रेस ४१ जागांवर पुढे दाखवत आहेत. एन.डी.टी.व्ही वर हिमाचलमध्ये भाजप ३ आणि काँग्रेस १ जागेवर दाखवत आहेत तर इतर लोकल चॅनेलवर भाजप २७ आणि काँग्रेस ८ जागांवर पुढे दाखवत आहेत.

आताच एन.डी.टी.व्ही वर जाहिर केले की आतापर्यंत आकडे आले आहेत त्यापैकी ९०% मते पोस्टल मते आहेत. त्यामुळे हे आकडे बदलू शकतात. सध्याचे आकडे--- भाजप ६०, काँग्रेस २४ आणि इतर १ (गुजरातमध्ये) तर हिमाचलमध्ये भाजप ३ आणि काँग्रेस १.

काँग्रेसचे शक्तीसिंग गोहिल मांडवीमधून आघाडीवर आहेत, वडगाममधून जिग्नेश मेवानी आघाडीवर आहेत. राधनपूरमधून अल्पेश ठाकोर पिछाडीवर आहेत.

मेहसाणामधून काँग्रेस आघाडीवर दाखवत आहेत. याचा अर्थ उपमुख्यमंत्री नितीन पटेल पिछाडीवर गेलेले दिसत आहेत.

एन.डी.टी.व्ही वरील नकाशावरून काँग्रेसने सौराष्ट्रमध्ये बर्‍यापैकी आघाडी मिळवलेली दिसत आहे. आताचे आकडे गुजरातः भाजप: ६९ , काँग्रेसः ३४ हिमाचलः भाजपः ८, काँग्रेसः २

आता काँग्रेसने फरक बराच कमी केलेला दिसत आहे. आता भाजप ७२ तर कॉम्ग्रेस ४३ जागांवर पुढे आहे. भाजपने मागच्या वेळेपेक्षा ४ जागांवर मागे आहे तर काँग्रेसने ६ जास्त जागा मिळवताना दिसत आहे. हिमाचलमध्ये भाजप १२ तर काँग्रेस ४ जागांवर पुढे आहे.

गुजरात : टाईम्स नाऊ : भाजप : ८० काँग्रेस : ५५ इतर : ४

आतापर्यंतचे आकडे बघता गुजरातमध्ये भाजप जिंकेल पण २०१२ पेक्षा काहीशा कमी जागा घेऊन असे वाटते. हिमाचलमध्ये मात्र भाजपचा विजय होताना दिसत आहे. याक्षणी: गुजरातमध्ये भाजप-- ७९, काँग्रेस-- ५६ तर हिमाचलमध्ये भाजप--१६ आणि काँग्रेस-- १०

सौराष्ट्रमधून आणि उत्तर गुजरातमधून काँग्रेस पुढे आहे तर दक्षिण आणि मध्य गुजरातमधून भाजप. भाजप-- ८०, काँग्रेस-- ५७ हिमाचलमध्ये भाजप--१८ आणि काँग्रेस--१०

भाजप सुरतमधील सगळ्या जागांवर पुढे आहे. सुरतमध्ये पटेलांची संख्या लक्षणीय आहे.

ही निवडणुक रंगतदार होत आहे. आता गुजरातमध्ये आता भाजप-- ७७ आणि काँग्रेस--६३ जागांवर पुढे आहे. भाजप जिंकेल पण २०१२ पेक्षा कमी जागांवर असे दिसत आहे. आता नितीन पटेल पुढे गेले आहेत.

सौराष्ट्रमधील ४८ जागांपैकी काँग्रेस २८ जागांवर तर भाजप २० जागांवर आघाडीवर दिसत आहे. आता भाजप ७७ आणि काँग्रेस ६४ जागांवर पुढे आहे.

सध्या काँग्रेसने सौराष्ट्रमध्ये आघाडी घेतलेली दिसत आहे. भाजप मागच्या वेळेपेक्षा पिछाडीवर दिसत आहे त्याचे कारण सौराष्ट्र आहे. सौराष्ट्र-कच्छ मधून ५४ पैकी ४९ जागांचे कल आले आहेत. काँग्रेस २९ तर भाजप २० जागांवर पुढे आहे. आता भाजप ७९ आणि काँग्रेस ६५ जागांवर पुढे आहे.

आता भाजप ७८ तर काँग्रेस ६६ जागांवर पुढे आहे. बर्‍याच महिन्यांनंतर अशी निवडणुकींमध्ये चुरस बघायला मिळत आहे. विजय रूपाणी राजकोट (पश्चिम) मधून पिछाडीवर आहे.

काँग्रेसने १९८५ मध्ये १४९ जागा जिंकल्या होत्या. त्याखालोखाल २०१२ मधील ६१ जागा ही काँग्रेसची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती. या क्षणी १४८ जागांचे कल हाती आले आहेत. त्यापैकी काँग्रेस ६८ जागांवर आहे. म्हणजे ही काँग्रेसची ३२ वर्षातील सर्वोत्तम कामगिरी असे म्हणायला हरकत नसावी.

आता भाजप आणि काँग्रेस दोघेही ७६ जागांवर पुढे आहेत. हे लिहिता लिहिता काँग्रेस ८० जागांवर तर भाजप ७८ जागांवर पुढे आहे.

आता काँग्रेस ८२ तर भाजप ७७ जागांवर पुढे आहे.

आता काँग्रेस ८६ आणि भाजप ७४ जागांवर पुढे आहे. भाजपचे माजी नेते यतीन ओझांनी काँग्रेस ९९ जागांवर पुढे आहे अशी बातमी दिली आहे. मोदी-शहांना हा मोठा धक्का असे म्हणायला हरकत नसावी

महाराष्ट्रात लवकरच इलेक्शन होणार ह्याची चाहूल दिसतेय .............. पण नक्कीच सुरेख निकाल , दिल गार्डन गार्डन होतेय ABP माझा भाजप ७७ काँग्रेस ८८ इतर 4

आता काँग्रेस-८६ आणि भाजप-- ७७ जागांवर पुढे आहे. सौराष्ट्रमधून काँग्रेस ३३ तर काँग्रेस १७ जागांवर पुढे आहे.

भाजपला आता थोडीफार आशा असेल तर ती मध्य गुजरातमधून. तिथे अजून १० जागांचे कल हाती यायचे आहेत. सौराष्ट्रामधून सगळ्या जागांचे कल आले आहेत. दक्षिण गुजरातमधून जवळपास सगळ्या जागांचे कल आले आहेत.

आता काँग्रेस- ८४ आणि भाजप- ८० असे यशवंत देशमुखांनी जाहिर केले आहे.

आता भाजप- ८४ आणि काँग्रेस-८२

या रोलरकोस्टरवरून छत्तिसगड निवडणुकांची आठवण येत आहे.

आता भाजप- ८६ आणि काँग्रेस-८१

अजूनही भाजप जिंकेल असा वाटते ... पण टक्कर झालीये ह्याचे इतर राज्यात नक्कीच परिणाम दिसतील भाजप ८८ काँग्रेस ८२ इतर 2

लैच भारी निकाल वाटायलाय, स्वयंघोषित पंडितांची भाकिते चुकल्याचा आनंद आहे, काँग्रेस पुढे आल्याचा आनंद नाही पण भाजपाच्या माजूरडेपणाला चाप लागेल ह्याचा जास्त आनंद आहे. बहुधा मोदी शहा पेक्षा रुपाणीमुळे इलेक्शन फसली हा युक्तिवाद लौकर यावा ही अपेक्षा.

आता भाजप ८७ आणि काँग्रेस ८३ जागांवर पुढे आहे.

भाजप ८८ काँग्रेस ८२ इतर १ अवांतर : मला शेअर बाजार गडगडलाय त्याचा टेन्शन आलाय , उगाच नको तिथे गुंतवणूक करून ठेवलीये :(

काँग्रेस नेते शक्तीसिंग गोहिल मांडवीमधून मागे. तर भाजपचे जितू वाघानी भावनगरमधून मागे. गोधरामधून भाजप पुढे आता भाजप ८८ आणि काँग्रेस ८२

अजून ११ जागांवरील कल हाती यायचे आहेत. त्या सगळ्या जागा दक्षिण आणि मध्य गुजरातमध्ये आहेत. आता भाजप ८९ आणि काँग्रेस ८० जागांवर पुढे

गुजरातमध्ये सीसॉ चालले आहे ! भाजप/काँग्रेस्/इतर : ९०/८०/२ मध्ये एकदा भाजपला हार्ट अ‍ॅटॅक येण्यासारखी परिस्थिती झाली होती ! :) हिमाचलमध्ये भाजपचा विजय जवळजवळ नक्की आहे : ३८/२६/२

आता १७४ जागांवरील कल हाती आले आहेत. भाजप ९० तर काँग्रेस ८१ जागांवर पुढे आहे.

कलांचे रिव्हर्सल होत आहे. आता भाजप ९६ आणि काँग्रेस ८२ जागांवर पुढे आहे.

भाजप ९६ काँग्रेस ८२ इतर ३ आलेसुद्धा असतील काही जणांना हार्ट अ‍ॅटॅक :)

छत्तिसगड विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप-काँग्रेस यात तीन वेळा कलांचे वरखाली झाले होते त्याची आठवण झाली.

In reply to by रंगीला रतन

काहीतरी गडबड झालेली दिसत आहे. एक आकडा लिहून दुसरा वाचायला जावे तर तो बदललेला दिसतोय ! :) आता ९५/८४/३

सौराष्ट्रमध्ये भाजपने पिछाडी कमी केली आहे. १५ मिनिटांपूर्वी काँग्रेस ३५ जागांवर पुढे होती आता २९ जागांवर पुढे आहे. आता भाजप-- ९८ आणि काँग्रेस ८० जागांवर पुढे

हिमाचलमध्ये भाजप ४१ आणि काँग्रेसमध्ये २५ जागांवर पुढे

आता भाजप ९६ आणि काँग्रेस ८२ जागांवर पुढे

काँग्रेसने पाटीदार भागात मोठे यश मिळवलेले दिसत आहे. पण भाजपने वनवासी भागात मोठे यश मिळवलेले दिसत आहे. आता भाजप ९७ आणि काँग्रेस ८१

आता भाजप ९४ आणि काँग्रेस ८४.

पाटीदारांची मते मिळवायच्या मागे काँग्रेस गेली पण त्यांनी त्यांचे स्वतःचे निष्ठावान मतदार गमावलेले दिसत आहेत. जर काँग्रेसने आपले हक्काचे मतदार राखले असते आणि वर पाटीदार मते घेतली असती तर काँग्रेसला मोठा विजय मिळाला असता असे म्हटले जात आहे. मणीशंकर अय्यर यांचे विधान भावले का? भाजप--- ९४ आणि काँग्रेस-८४ आता नितीन पटेल मागे.

In reply to by गॅरी ट्रुमन

मणीशंकर अय्यर यांचे विधान भावले का?
भावले नाही भोवले :) इतक्या रोलरकोस्टर निवडणुका चालू असताना अशा चुका व्हायच्याच :)

आता भाजप ९२ आणी काँग्रेस ८५.

आता भाजप ९५, काँग्रेस ८३ आणि इतर ४.

टाईम्स नाऊवर एका भूतपूर्व इसींनी मोठी चपखल व अर्थपूर्ण टिप्पणी केली: गुजरात निवडणूकीत इव्हिएमची जीत झाली ! (पक्षी : अटीतटीची लढत झाल्याने इव्हिएमबद्दलच आरोप निकालात निघाले आहेत !)

गॅरी भाऊ NDTV भाजप १०५ काँग्रेस ७६ इतर १ ABP माझा भाजप ९८ काँग्रेस ८० इतर ४

आता उत्तर गुजरातमध्ये भाजप १७ तर कोंग्रेस १४ जागांवर पुढे दिसत आहे. हे लिहिता लिहिता भाजप ९८ आणि काँग्रेस ८२. पूर्ण निकाल येईपर्यंत मला जागेवरून उठू द्यायचे नाही असे गुजरातच्या मतदारांनी ठरवलेले दिसते :) :)

आता भाजप १०० आणि काँग्रेस ८०. उत्तर गुजरातमधील कल बदललेले आहेत.

गुजरात - भाजप १०६, काँग्रेस - ७४ (एबीपी) हिमाचल - भाजप ४०, काँग्रेस २४ दोन्ही राज्यात भाजपला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

दोन्ही राज्यात भाजपला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. गुजरात च्या बाबतित अंशतः मान्य. हिमाचल मध्ये नसलेलि सत्ता मिळणे हे मोठे यशच म्हणावे लागेल.

आता ए.सी.निल्सनने भाजपला १०७ आणि काँग्रेस्ला ७१ जागांवर आघाडी आहे असे सांगितले आहे.

गुजरात - भाजप १०६, काँग्रेस - ७३ (एबीपी) हिमाचल - भाजप ३९, काँग्रेस २५

आता भाजप १०३ आणि काँग्रेस ७५ जागांवर पुढे. हिमाचलमध्ये भाजप ३९ आणि काँग्रेस २५ जागांवर पुढे

गुजरात - भाजप १०३, काँग्रेस - ७६ (एन्डीटीव्ही) हिमाचल - भाजप ४१, काँग्रेस २२ एन्डीटीव्हीच्या दाव्यानुसार आतापर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार काँग्रेसला ४९% व भाजपला ४४% मते मिळाली आहेत. काँगेसला तब्बल ५% जास्त मते मिळूनसुद्धा मागे कशी हे गूढच आहे.

सध्या कॉंग्रेसला ज्या काही ७३ जागा मिळताना दिसत आहेत त्याचे श्रेय राहुल गांधींना द्यायला टिव्हीवरच्या चर्चेत बसलेल्या काही तथाकथित पुरोगामी वक्त्यांनी सुरु केलेय. मात्र त्यांच्या हे लक्षात येत नाही की, २०१२ पेक्षा ज्या काही वाढीव जागा कॉंग्रेसला मिळत आहेत त्या हार्दीक, अल्पेश व जिग्नेश या तिकडींने पाटीदार व इतर लोकांना भाजपा पासून फोडलेय त्याचा तो परिणाम आहे.

निवडणूक आयोगाच्या वेब साईट वर आता (१०. ३०) जाहीर झालेले निकाल १६७ आहेत त्यात भाजप ९७ आणि काँग्रेस ६४ दाखवत आहेत. याचा अर्थ आता भाजपचे सरकार आले आहे असे म्हणता येईल बाकी सर्व मोह माया आहे

आता गुजरातमध्ये भाजप १०७, काँग्रेस ७३ तर हिमाचलमध्ये भाजप ४० आणि काँग्रेस २२ जागांवर पुढे

भांडवली बाजार सकाळी जवळपास ७०० अंकांनी (अडीच टक्क्यांनी) कोसळला होता. आता बाजार १७१ अंकांनी वर आहे.

गुजरातमधील दोन निकाल आले आहेत. जमालपूर-खाडियामधून काँग्रेसचा तर एलीसब्रीजमधून भाजपचा विजय झाला आहे. हे दोन्ही मतदारसंघ अहमदाबाद शहरात आहेत. जमालपूर-खाडियाविषयी मी मतमोजणीपूर्व धाग्यात लिहिले होते.

गुजरात मध्ये सध्या ५ अन्य आघाडीवर आहेत ते कोण? काही माहिती आहे का?

विजय रूपाणी आणि नितीन पटेल दोघेही आघाडीवर. आता गुजरातमध्ये भाजप १०५ आणि काँग्रेस ७५. तर हिमाचलमध्ये भाजप ४२ आणि काँग्रेस २२.

या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील १९८५ मधील विधानसभा निवडणुकीची आठवण झाली. डिसेंबर १९८४ मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने देशात तब्बल ४१४ जागा जिंकल्या होत्या. त्यात महाराष्ट्रातील ४८ पैकी तब्बल ४३ जागांचा समावेश होता. त्यानंतर जेमतेम ३ महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेची निवडणुक झाली. लोकसभा निवडणुकीतील अपयशाचा धडा घेऊन पवारांनी विरोधी पक्षांची मोट बांधली. पवारांच्या अध्यक्षतेखालील तत्कालीन समाजवादी काँग्रेस, जनता पक्ष, भाजप व शेकाप यांनी एकत्र येऊन पुलोद स्थापन करून काँग्रेसविरूद्ध एकत्रित निवडणुक लढवून मतांची फाटाफूट टाळायचा प्रयत्न केला. त्या निवडणुकीचे निकाल यायला सुरूवात झाल्यानंतर सुरवातीस पुलोदचे उमेदवार आघाडीवर होते. नाशिकमधील सर्व १४ जागांवर पुलोद उमेदवारांनी विजय मिळविला. निकालांचा कल बघून काँग्रेसच्या गोटात घबराट पसरली होती. शेवटी संध्याकाळी मतमोजणी संपल्यानंतर २८८ पैकी काँग्रेसला १६२ जागा मिळून बहुमत मिळाले. पुलोद गटाला १०४ जागा मिळाल्या होत्या (समाजवादी काँग्रेस ५६, जनता पक्ष २०, भाजप १६ आणि शेकाप १२). लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिले तर काँग्रेसला कमीतकमी २२५ जागा मिळायला हव्या होत्या. परंतु त्यांना १६२ जागांवर समाधान मानावे लागले. आताची स्थिती - गुजरात - भाजप १०७, काँग्रेस - ७४ (एबीपी) हिमाचल - भाजप ४२, काँग्रेस २३

मगाशी १२५ अंकानी गडगडलेल्या सेन्सेक्सनी अता १८१ अंकांनी उसळि घेतलि आहे.

गुजरातमध्ये आता भाजप १०६ आणि काँग्रेस ७४ . हिमाचलमध्ये भाजप ४२ आणि काँग्रेस २३. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी विजयी. हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर यांचे घर असलेल्या विरमगाममधून भाजपच्या डॉ. तेजश्री पटेल पुढे.

एलिस ब्रिज मधून भाजपचे उमेदवार राकेश शाह तब्बल ९२,४४८ मतांनी विजयी. हिमाचल प्रदेश: भाजप ४०, काँग्रेस २५

In reply to by श्रीगुरुजी

एलीसब्रिज मतदारसंघ अहमदाबाद शहरात आहे. किंबहुना साबरमती नदीवर ५-६ पूल आहेत त्यापैकी एक एलिसब्रिज आहे. त्या पूलाच्या नावावरून या मतदारसंघाचे नाव आहे. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. १९९३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे हरेन पंड्या पहिल्यांदा निवडून गेले होते. त्यानंतर अनेक निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून भाजपने ७५% पेक्षा जास्त मते घेतली आहेत. एलिसब्रिजबरोबरच भाजपचे घाटलोडिया, नारणपुरा (पूर्वीचा सरखेज), मणीनगर हे अहमदाबाद आणि परिसरामधील इतर बालेकिल्ले आहेत.

या निवडणुकांची मतमोजणी बघता गुजरातमधील २००७ च्या निवडणुकांच्या मतमोजणीचीही आठवण झाली. हिरव्या देशातून बघितलेली मी ती शेवटची मतमोजणी होती आणि पूर्ण रात्र जागून निकाल बघितले होते हे लक्षात आहे. त्यावेळीही काही काळ काँग्रेस भाजपच्या पुढे होती पण मार्जिन यावेळेइतके नव्हते. यावेळी एक वेळ अशी आली होती की काँग्रेस भाजपपेक्षा १२ जागांनी पुढे होती. २००७ मध्ये हा फरक ५ पेक्षा जास्त कधीच नव्हता. काँग्रेस ८६ आणि भाजप ७४ जागांवर पुढे बघून माझ्याही काळजाचा ठोका चुकला होता :) :) अजूनही मतमोजणी पूर्ण झालेली नाही. नक्की निकाल काय लागतात हे बघायचे. मी अंदाज व्यक्त केला होता १३० ते १३५. बर्‍याचदा निकालांचे अंदाज व्यक्त करताना मला काय होईल असे वाटते त्याबरोबरच काय व्हावे असे वाटते याचाही प्रभाव नकळत पडतोच. पुढच्या वेळी ती काळजी घ्यायला हवी. मलाही हा धडा मिळालाच आहे.

आता भाजप ११० आणि काँग्रेस ७० जागांवर पुढे आहे.

रिपब्लिक चॅनेलवर म्हटले जात आहे की भाजपने २०१२ पेक्षा जास्त (४७.८५% पेक्षा जास्त) मते मिळवली आहेत. तसे असेल तर हे बर्‍यापैकी इन्क्रेडिबल (मराठी शब्द?) आहे. २००२ मध्ये भाजपने ४९.८५%, २००७ मध्ये ४९.१२% तर २०१२ मध्ये ४७.८५% मते मिळवली होती. जर १५ वर्षांपर्यंत भाजप ४८-४९% मते राखत असेल तर ते नक्कीच काहीतरी वेगळे आहे हे नक्कीच. हे लिहितालिहिता भाजप १०७ आणि काँग्रेस ७२.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

अजून मतमोजणी पूर्ण व्हायला वेळ आहे. जर ४९.३% इतकीच मते कायम राहिली तर २००७ पेक्षा जास्त मते मिळाली असतील. २००७ मध्ये ११७ जागा होत्या. या क्षणी भाजप ११० जागांवर पुढे आहे. ११७ पेक्षा काही जागा कमी पडल्या तर त्या मतांचे डिस्ट्रीब्युशनमुळे होईल. पण इतक्या वर्षांनंतरही ४९% पेक्षा जास्त मते मिळवणे सोपे नाही.

मागच्या दोन मिनिटात कल बदलले आहेत. गुजरातमध्ये भाजप १०१ आणि काँग्रेस ७८ जागांवर पुढे आहे. हिमाचलमध्ये भाजप ४३ आणि काँग्रेस २१ जागांवर पुढे आहे. आता गुजरातमध्ये १०२/७७ आणि हिमाचलमध्ये ४४/२०.

जीएसटी, नोटाबंदी असे लोकविरोधधी निर्णय करुनही मतदारांनी मोदींना स्विकारले आहे असे दिसत आहे. राहुल गांधींना अजूनही बरीच मजल गाठायची आहे असे दिसते. मोदींचा महाविजय असे म्हणता येईल का?

In reply to by कलंत्री

जीएसटी, नोटाबंदी असे लोकविरोधी निर्णय करुनही

हे निश्चित लोकांना विरोधी वाटले की तुम्ही काढलेला निष्कर्ष आहे?
मतदारांनी मोदींना स्विकारले आहे असे दिसत आहे.
उपरोक्त सर्व बाबी सोडल्या तर इतर काही सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या कामांचा प्रभाव असेल असं अजिबात वाटत नाही का? कुठलेही शिक्के न मारता उघड्या डोळ्यांनी बघणारा अडाणी नाखु

एबीपीनुसार गुजरात - भाजप १०२, काँग्रेस ७८ - काँग्रेस २०१२ मधील जिंकलेल्या २६ जागांवर मागे - पटेलबहुल ३७ मतदारसंघांपैकी २१ जागांवर भाजप पुढे - झी च्या वृत्तानुसार दोन्ही पक्षांना ४६% मते आहेत. परंतु भाजप अंदाजे २४ जागांवर पुढे आहे. हिमाचल प्रदेश - भाजप ४४, काँग्रेस २०, इतर ४

गुजरातः भाजप-१०२, काँग्रेस-७७ हिमाचलः भाजप-४५, काँग्रेस-१९

हिमाचल प्रदेश मध्ये पहिला निकाल कॉंग्रेसच्या बाजूने आला आहे.

नाही हा मोदींचा महाविजय बोलताच येणार नाही सध्या जनतेकडे मोदींशिवाय कोणताच पर्याय नाहीये म्हणून भाजप निवडून येणार हे सर्वमान्य आहे , मोदींनी हे निवडणूक स्वतःहून खूप महत्वाची केली कारण त्यांना आमदारांची संख्या वाढवायची होती जे होताना दिसत नाहीये त्यामुळे हा मोदींचा विजय न म्हणता नैतिकदृष्ट्या त्यांचा एक प्रकारे पराभव झालेला आहे असेच म्हणता येईल सध्या तरी काँग्रेस हा पर्याय आहे हे जनतेने पूर्णपणे अमान्य केले आहे , राहुल खूप मेहनत घेतोय पण त्यांचाच पक्षातले काही अतिहुशार व्यक्ती जसे दिग्विजय, मणिशंकर आणि आता मनमोहन मध्ये मध्ये पाय घालत आहेत , जसे मोदींनी स्व पक्षातले असे घोडे स्वतः लगाम घालून चूप बसवले तसाच काहीतरी राहुल ला करावे लागणार आहे नाहीतर काँग्रेस साठी येणार काळ कधीच सोपा नसणार आहे. पण ह्या निवडणुकीचे परिणाम लुवकाराचं महाराष्ट्रात दिसून येतील असा मला तरी वाटतेय , शिवसेना नक्कीच ह्या संधीच्या शोधात होती (जसा त्यांनी आधीच पूर्वसूच दिली होती कि सत्तेतून बाहेर पडू )

In reply to by जेसीना

शिवसेना नक्कीच ह्या संधीच्या शोधात होती (जसा त्यांनी आधीच पूर्वसूच दिली होती कि सत्तेतून बाहेर पडू ) 68 and Counting.....

गुजरातः भाजप-१०५, काँग्रेस-७४ हिमाचल: भाजप-४५, काँग्रेस-१९ काँग्रेसचे अर्जुन मोडवाढीया पोरबंदरमधून पराभूत झाले आहेत.