Skip to main content

गुजरात विधानसभा निवडणुक-२०१७

लेखक गॅरी ट्रुमन यांनी शुक्रवार, 01/12/2017 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, गुजरात विधानसभा निवडणुकांसाठीचे पडघम वाजू लागले आहेतच. राज्यात विधानसभेच्या १८२ जागांसाठी ९ आणि १४ डिसेंबरला मतदान होणार आहे तर मतमोजणी १८ डिसेंबर रोजी होणार आहे. नेहमीप्रमाणे १८ डिसेंबरला सकाळपासूनच मिपावर ऑनलाईन असणारच आहे. या लेखातून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन त्याविषयीचे माझे मत मांडणार आहे. खालील नकाशात दाखविल्याप्रमाणे गुजरात राज्यात कच्छ, सौराष्ट्र, मध्य गुजरात, उत्तर गुजरात आणि दक्षिण गुजरात असे पाच विभाग आहेत. Gujarat (संदर्भः http://www.gujaratindia.com/images/guj-map-divied.jpg) खालील तक्त्यात या विभागांमध्ये येणारे जिल्हे आणि एकूण विधानसभा मतदारसंघ दाखविले आहेतः Regions खालील तक्त्यात या विभागांमध्ये गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये निकाल कसे लागले हे बघता येईल. 1 २००८ मध्ये विधानसभा मतदारसंघांच्या सीमांची पुनर्रचना करण्यात आली होती. त्यामुळे २००७ आणि २०१२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यातील विभागांमधील मतदारसंघांच्या संख्येत फरक होता हे या तक्त्याच्या शेवटच्या दोन कॉलमवरून कळेलच. या तक्त्यावरून आपल्याला पुढील निष्कर्ष काढता येतातः १. राज्यात भाजप सर्व विभागांमध्ये बर्‍यापैकी शक्तीशाली आहे. अनेकदा राज्यात सत्तेत असले तरी राज्याच्या सर्व विभागांमध्ये एखाद्या पक्षाची ताकद असतेच असे नाही. गुजरातमध्ये भाजपची अशी स्थिती नाही. २०१२ मध्ये उत्तर गुजरातमध्येच भाजपने काँग्रेसपेक्षा दोन जागा कमी जिंकल्या होत्या. इतर सर्व विभागांमध्ये भाजपने काँग्रेसपेक्षा बर्‍याच जागा जास्त जिंकल्या होत्या. २. एकेकाळी दक्षिण गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष बर्‍यापैकी ताकद राखून होता. पण हळूहळू भाजपने काँग्रेसला तिथूनही हुसकावून लावले असे दिसते. ३. तक्त्यावरून कळेलच की मध्य गुजरातमध्ये २०१२ मध्ये २००७ च्या तुलनेत ४ विधानसभा जागा जास्त होत्या तर दक्षिण गुजरातमध्ये ३. सौराष्ट्र आणि उत्तर गुजरातमधील जागांची संख्या अनुक्रमे ४ आणि ३ ने कमी झाली. यातही अजून महत्वाचे म्हणजे मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे शहरी भागातील विधानसभा जागांची संख्या वाढली आहे तर ग्रामीण भागातील जागांची संख्या कमी झाली आहे. राज्यातील तीन सर्वात मोठी शहरे आहेत अहमदाबाद, सुरत आणि वडोदरा. त्यापैकी दोन, अहमदाबाद आणि वडोदरा मध्य गुजरातमध्ये आहेत तर सुरत दक्षिण गुजरातमध्ये आहे. २००७ मध्ये अहमदाबाद शहरामध्ये १२, सुरत शहरामध्ये ७ तर वडोदरा शहरामध्ये ३ जागा होत्या. त्या २०१२ मध्ये वाढल्या आणि अहमदाबादमध्ये आता १७, सुरतमध्ये ९ आणि वडोदरामध्ये ५ जागा झाल्या आहेत. गुजरात हे मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालेले राज्य आहे त्यामुळे त्या राज्यात शहरी भागातील विधानसभेच्या जागांची संख्या वाढणे क्रमप्राप्त होते. भाजप शहरी भागांमध्ये बर्‍यापैकी बलिष्ठ आहे. त्यामुळे शहरी भागामधील विधानसभेच्या जागांची संख्या वाढल्याचा फायदा २०१२ मध्ये भाजपलाच झाला होता. मी म्हणत आहे की भाजप शहरी भागांमध्ये बलिष्ठ आहे. वर दिलेल्या तक्त्यावरून ते कळणार नाही. त्यासाठी आपल्याला राज्यातील शहरांमध्ये २०१२ च्या निवडणुकांमध्ये भाजपची कामगिरी कशी होती हे बघायला लागेल. ते खालील तक्त्यात दिले आहे. 1 यावरून एक महत्वाची गोष्ट स्पष्ट होते. २०१२ मध्ये भाजपने या शहरांमधील ४१ पैकी ३७ जागा जिंकल्या म्हणजे या शहरांमध्ये भाजपचा 'स्ट्राईक रेट' जवळपास ९०% होता. २०१२ मध्ये भाजपने पूर्ण गुजरातमध्ये १८२ पैकी ११५ जागा जिंकल्या होत्या. याचाच अर्थ ही शहरे सोडून राज्याच्या इतर भागांमधून भाजपने १४१ पैकी ७८ जागा जिंकल्या होत्या म्हणजेच ही शहरे वगळता भाजपचा 'स्ट्राईक रेट' ५५% म्हणजे त्या मानाने बराच कमी होता. उरलेल्या १४१ जागांपैकी अनेक जागा निमशहरी भागातील आहेत. या जागांवर भाजपचा स्ट्राईक रेट ९०% नसला तरी ५०% पेक्षा नक्कीच बराच जास्त होता. म्हणजेच ग्रामीण भागातील विधानसभा जागांवर भाजपचा 'स्ट्राईक रेट' ५०% पेक्षा थोडा कमीच होता. मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे शहरी भागांमधील जागा वाढल्याचा भाजपला कसा फायदा झाला हे त्यातून समजू शकेल. गुजरात निवडणुकांच्या या पार्श्वभूमीवर २०१७ मध्ये काय परिस्थिती आहे याविषयी आता लिहितो. २०१७ च्या परिस्थितीविषयीचे माझे मत राज्यात भाजप मार्च १९९५ पासून (सप्टेंबर १९९६ ते मार्च १९९८ या कालावधीतला खंड वगळता) सतत सत्तेवर आहे. इतकी वर्षे सत्तेत असल्यामुळे भाजपला प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसणे अपेक्षित आहे. त्यातच हार्दिक पटेलच्या आंदोलनामुळे भाजपपुढे मोठे आव्हान उभे केले होते. २०१५ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शहरी भागात भाजपने आपला बालेकिल्ला राखला पण ग्रामीण भागात मात्र बर्‍यापैकी पिछेहाट झाली होती. अशावेळी भाजपला या निवडणुका जड जाणार का या प्रश्नाचे उत्तर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा तौलनात्मक अभ्यास केल्याशिवाय मिळणार नाही. याविषयी मला पुढील मुद्दे मांडायचे आहेतः १. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदाचा लोकप्रिय स्थानिक चेहरा नाही हा पक्षापुढे असलेला मोठा अडसर आहे. भाजपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहिर केलाच पाहिजे ही गरज आता राहिलेली नाही. कारण नरेंद्र मोदींचे स्थान आता इतके मोठे झाले आहे की मोदी राज्यांमध्ये मुख्यमंत्री व्हायला जाणार नसले तरी विधानसभा निवडणुकांमध्येही भाजप मोदींच्या नावावर मते मागू शकतो. उत्तर प्रदेशात त्यातून मोठे यश पक्षाने मिळवले होते. पण जर विरोधी पक्षांनी स्थानिक लोकप्रिय मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार दिला तर मात्र भाजपचा पराभव होऊ शकतो हे दिल्ली आणि बिहार विधानसभा निवडणुकांच्या निकालातून कळतेच. गुजरातमध्ये काँग्रेसकडे असा चेहरा मुळातच नाही याचा त्रास काँग्रेसला होईल असे मला वाटते. २०१२ मध्ये मी गुजरात विधानसभा निवडणुकांचा बराच अभ्यास केला होता.तेव्हा जाणवले होते की स्थानिक उमेदवार कोणीही असला तरी मतदारांपुढे मोदींचा चेहरा आणि त्यांची लोकप्रियता हे मुद्दे महत्वाचे होते म्हणजे एका अर्थी सर्व १८२ जागांवर भाजपकडून नरेंद्र मोदीच निवडणुक लढवत आहेत अशी परिस्थिती होती. आज मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून पंतप्रधानपदावर गेले असले तरी या परिस्थितीत फार फरक पडलेला दिसत नाही. २. नोटबंदी आणि जी.एस.टी नोटबंदी आणि जी.एस.टी चा भाजपला त्रास होईल का? हे दोन्ही निर्णय घेताना मोदींनी मोठी राजकीय जोखिम उचलली होती. व्यापारी आणि छोटेमोठे व्यावसायिक हा जनसंघाच्या दिवसांपासून पक्षाचा पाठिराखा होता. गुजरातमध्ये या वर्गाचे प्रमाण बरेच मोठे आहे.या वर्गातून करचुकवेपणाचे प्रमाण मोठे होते हे अगदी उघडे गुपित आहे. पण जी.एस.टी मुळे यांनाही कर भरणे सक्तीचे झाले आहे. त्यामुळे त्यांच्यात भाजपविरोधी असंतोष असणे अपेक्षित आहे. तरीही याविषयी मला दोन गोष्टी लिहाव्याशा वाटतातः २अ: नोटबंदीमुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे आणि त्याचे प्रतिबिंब उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये उमटणार असे चित्र उभे केले गेले होते. तसे काहीही झाले नाही. याचे कारण काय असावे? माझ्या मते नोटबंदीनंतर प्रथमच श्रीमंतांची तारांबळ उडत आहे, त्यांना बँकेपुढे रांगा लावाव्या लागत आहेत असे चित्र उभे राहिले. नाही म्हटले तरी गरीब वर्गात श्रीमंतांना असा त्रास द्यायचा निर्णय मोदींनी घेतला याचे समाधान वाटले असेल तरी आश्चर्य वाटायला नको. त्यातूनच पूर्वी भाजपला कधीही मत न दिलेल्या वर्गानेही भाजपला मते दिली. म्हणजे नोटबंदी आणि जी.एस.टी मुळे भाजपचा पारंपारिक समर्थक वर्ग जरी दुखावला गेला असला तरी त्याची भरपाई भाजपला पूर्वी कधीही मत न दिलेल्या वर्गाच्या समर्थनातून होऊ शकेल असे मला वाटते. २बः दुसरे म्हणजे जरी नोटबंदी आणि जी.एस.टी हे निर्णय आवडले नसले तरी दुखावल्या गेलेल्या वर्गापुढे दुसरा कोणता समर्थ पर्याय आहे का? राहुल गांधींनी कितीही राणा भिमदेवी थाट आणला असला तरी त्यांच्या मर्यादा सर्वांनाच माहित आहेत. याविषयी भाऊ तोरसेकरांनी एका लेखात म्हटले आहे की ऐन दिवाळीत महाराष्ट्रात एस.टी चा संप झाला त्यावेळेनंतर टमटम, खटारा इत्यादी स्थानिक वाहतुक सेवांना पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त बरकत आली का? तर तसे होऊ शकले नाही कारण शेवटी गावांमध्ये सेवा पुरविण्यात एस.टीचा हात कोणी धरू शकत नाही.त्यामुळे लोकांना एस.टी शिवाय पर्याय नव्हता. भाजपची गुजरातमधील स्थिती काहीशी तशीच आहे. ३. हार्दिक-अल्पेश-जिग्नेश त्रिकूट हार्दिक पटेलने भाजपपुढे सुरवातीला मोठे आव्हान उभे केले ही गोष्ट खरी आहे. पण काँग्रेसने त्याचा योग्य फायदा उचलला नाही असे म्हणावेसे वाटते. हार्दिक पटेलची मागणी आहे पाटिदार समाजाला आरक्षण द्यावे. आणि असे आरक्षण दिल्यास मुळात आरक्षण मिळणार्‍या ओबीसी समाजाच्या आरक्षणात आणखी एक वाटेकरी येणार म्हणून ओबीसींचा या पाटीदार आरक्षणाला विरोध आहे. ओबीसी नेता अल्पेश ठाकोरचे म्हणणे तेच आहे. म्हणजे हार्दिक आणि अल्पेश यांच्या मागण्या परस्परविरोधी आहेत. या दोघांनाही काँग्रेसने एकाच वेळी एकत्र आणले असले तरी त्यामुळे त्यांचे समर्थक मात्र दुखावले गेले आहेत हे नक्कीच. सुरवातीला आपले आंदोलन गैरराजकीय असेल असे जाहिर करणार्‍या हार्दिकने नंतर काँग्रेसशी हातमिळवणी केली हे न आवडल्यामुळे हार्दिकच्या अनेक समर्थकांनी त्याच्या आंदोलनाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे सुरवातीला हार्दिक आणि काँग्रेस समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याच्याही बातम्या होत्या. तसेच नंतर हार्दिक समर्थकांना उमेदवारी द्यावी लागल्यामुळे काँग्रेसने काही मतदारसंघांमध्ये आधी जाहिर केलेले उमेदवार बदलले. काँग्रेसने उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाबरोबर युती करताना जी चूक केली त्याचीच पुनरावृत्ती गुजरातमध्ये होताना दिसत आहे. जो काही निर्णय असेल तो पडद्याआड घेऊन मग जाहिर करणे श्रेयस्कर ठरले असते पण काँग्रेसने घाईघाईत निर्णय घेतला हे जाहिर केले आणि दुसर्‍या पक्षाच्या हातात जास्त बार्गेनिंग पॉवर आपण होऊन दिली. आता दलित नेता जिग्नेश मेवानीने काँग्रेसबरोबर निवडणुक न लढवता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवायचे ठरवले आहे. इतके दिवस या त्रिकूटाचा पाठिंबा आपल्याला असणार असे चित्र काँग्रेसने उभे केले होते. भाऊ तोरसेकरांनी हार्दिक पटेलविषयी एक म्हणणे मांडले आहे. ते म्हणतात की २०१२ मध्ये पाटीदार समाजाचे सर्वात ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून मोदींना आव्हान उभे करायचा प्रयत्न केला होता. त्याचे काय झाले? केशुभाईंच्या पक्षाला ३% मतेही मिळू शकली नव्हती. हार्दिक हा केशुभाईंपेक्षा जास्त लोकप्रिय आहे का? भाऊ तोरसेकरांनी आणखी एक मुद्दा मांडला होता. १९७० च्या दशकात गुजरातमध्ये नवनिर्माण आंदोलन झाले होते त्यावेळच्या विद्यार्थी नेत्यांची नावेही आपल्या आता लक्षात आहेत का? असे नेते येतात आणि जातात. विशेषत: धरसोडपणा केल्यास अशा नेत्यांची विस्मृतीत अस्तंगत व्हायची शक्यताच सर्वात जास्त. ४. काँग्रेसमधील लाथाळ्या गुजरात निवडणुकांपूर्वी काही महिनेच शंकरसिंग वाघेला पक्षातून बाहेर पडले. वर दिलेल्या तक्त्यातून समजते की २०१२ मध्ये उत्तर गुजरातमध्ये काँग्रेसने भाजपपेक्षा २ जागा जास्त जिंकल्या होत्या. त्याच भागात-- पंचमहल, दाहोद, गोध्रा शंकरसिंग वाघेलांना काही प्रमाणावर जनाधार आहे. वाघेलांनंतर काँग्रेसचे अनेक आमदार बाहेर पडले आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हार्दिक पटेलच्या समर्थकांना उमेदवारी द्यायला लागली म्हणून काँग्रेसने आधी उमेदवारी जाहिर केलेल्या काहींचे तिकिट कापले. हे सगळे प्रकार काँग्रेससाठी नक्कीच चांगले नाहीत. विशेषतः २२ वर्षांनंतर भाजपला हरवायची संधी प्रथमच चालून आलेली असताना एकदिलाने आणि व्यवस्थित आखणी करून निवडणुकांना सामोरे जायला पाहिजे होते. तसे होताना मात्र दिसत नाही. काँग्रेस बर्‍यापैकी सुस्थितीत असलेल्या उत्तर गुजरातमध्ये (पाटण, बनासकांठा जिल्ह्यात) पूर आला होता. त्यावेळी काँग्रेसचे आमदार बंगलोरला जाऊन बसले होते हे चित्र उभे करण्यात भाजप बर्‍यापैकी यशस्वी झाला. जर पूर परिस्थिती हाताळण्यात अपयश आले असेल तर त्याचा दोष राज्य सरकारला जायला हवा. पण नेमक्या त्याचवेळी काँग्रेस आमदार बंगलोरला जाऊन बसल्यामुळे राज्य सरकारला 'तुम्ही काय केलेत' हा प्रश्नही काँग्रेसला विचारायची कोंडी झाली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकांविषयीचे माझे मत या सगळ्या परिस्थितीत मला वाटत आहे की भाजपला या विधानसभा निवडणुका जिंकायची चांगली संधी आहे. सुरवातीला अनुकूल परिस्थिती असूनही काँग्रेसने नेहमीप्रमाणे सगळ्याचा विचका केलेला दिसत आहे. मला वाटते की भाजप १८२ पैकी १३० ते १३५ जागा जिंकेल. प्रत्यक्षात काय होईल हे १८ डिसेंबरलाच समजेल. राजदीप सरदेसाईंचे गुजरातमधील राजकीय परिस्थितीविषयी एक विधान देऊन हा लेख संपवतो. राजदीप सरदेसाई म्हणतातः “Only anger can unseat BJP in Gujarat. At the moment, there is disappointment with BJP but not outright anger” १४ डिसेंबरला दुसर्‍या फेरीतील मतदान झाले की नंतर एक्झिट पोल्सचे निकाल येतील. शक्य झाल्यास त्यापूर्वी मतमोजणीपूर्व धागा काढून कसेही निकाल लागल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतील याविषयी माझे मत मांडेन.

वाचने 83981
प्रतिक्रिया 310

प्रतिक्रिया

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

धर्म वि. धर्म आणि जात वि. जात यापैकी जास्त घातक कोणतं याचा जरा शांततेने विचार करा आणि ठरवा!!
दोन्हीही ....

In reply to by पगला गजोधर

असहमत! जातींमध्ये फूट पडणे अत्यंत धोकादायक आहे आणि ते अगदी उघडपणे करणारे पक्ष दुसऱ्या पक्षांना हिंदुत्ववादी वगैरे म्हणतात हेच मुळी हास्यास्पद आहे. भाजपने अगदी जशास तसे "राजकारण" करावे आणि निवडणुका जिंकाव्यात. उगाच पार्टी विथ डिफ्फरन्स वगैरे च्या भानगडीत समोरच्याच्या गलिच्छ राजकारणाला विजयी होऊ देऊ नये. हा मार्ग चालत नाही कळल्यावर तरी मार्ग बदलतील.

आत्ताच समजलं कि मोदींच्या कालच्या भाषणाला उत्तर म्हणून पूर्व पंतप्रधानांनी एक उत्तर लिहिलंय. बातम्यांमध्ये त्या पत्राची जोरदार चर्चा सुरु आहे. व्यक्तिशः मला देखील मोदींचं या भाषणात केलेलं वक्तव्य अजिबात आवडलेलं नाही. त्यांच्या म्हणण्या प्रमाणे सरळ सरळ पाकिस्तानचा हस्तक्षेप आहे या निवडणुकीत आणि मणिशंकर अय्यर यांच्या घरी झालेल्या स्नेह भोजनात मनमोहन सिंग, पूर्व मिलिटरी चीफ, आणि काही ब्युरो क्रॅट्स यांचा काही पाकिस्तानी ऑफिसिअल्स शी गुजरात निवडणुकांच्या संदर्भात चर्चा झाल्या असा आरोप आहे.( अहमद पटेलनी मु.मं.व्हावं असं म्हणे पाकिस्तानला वाटतं.) आणि बराच काही म्हणालेत नमो. या सगळ्या आरोपांचा किंवा शंकांचा जाहीररीत्या शंख करायची आवश्यकता काय होती?दोषी व्यक्तींना टाका सरळ तुरुंगात.. प्र.पदाला शोभेल असं थोड तरी वागायला हवं होतं.

In reply to by चष्मेबद्दूर

दोषी व्यक्तींना टाका सरळ तुरुंगात..
एक गोष्ट सांगा. समजा खरोखरच मोदींनी यांना तुरूंगात टाकले तर तुम्ही त्याचे समर्थन करणार आहात का? जर उत्तर नाही असे असेल तर असल्या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. भारताच्या राजधानीत भारतीय संसदेवर हल्ला करायच्या भयंकर प्रकारातल्या दहशतवाद्याची 'पुण्यतिथी' साजरी होते, घराघरातून अफजल निघतील अशा घोषणा होतात, भारत देशाचे तुकडेतुकडे होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असे जाहिरपणे म्हटले जाते आणि अशांना देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरूंगात टाकले तरी लोक त्याविरूध्द बोलणारे पण असतात. तेव्हा मणीशंकर अय्यर आणि मनमोहनना तुरूंगात टाकले तर सर्व पुरोगामी किती हलकल्लोळ करतील याची कल्पनाच केलेली बरी. एकूणच या देशात या पुरोगामी आणि ढोंगी सेक्युलर लोकांची विषवल्ली फारच फोफावलेली आहे. तिची पाळेमुळे उध्वस्त व्हायला हवीत आणि अजूनही मोदी ते करण्याच्या स्थितीत नाहीत. मिडियामध्ये, विद्यापीठांमध्ये पुरोगाम्यांचे मोठे वर्चस्व आहे. ते पूर्ण उध्वस्त करायची ताकद मोदींमध्ये यावी म्हणूनच मोदींना माझ्यासारखे लोक पाठिंबा देतात. जर का या हलकटातल्या हलकट डाव्या पुरोगाम्यांना कोणी देशोधडीला लावू शकेल तर तो नेता म्हणजे मोदीच आहे. सध्या तरी दुसरा नेता दिसत नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

भाजपा वाल्यांची स्वतः सोडून बाकीचे सर्व देशद्रोही किंवा negative विचारांचेच आहेत अशी मनस्थिती झालीये हे परत स्पष्ट होतंय तुमच्या प्रतिसाद वरून. असो, कुठल्याही देशभक्ताला वाईट गोष्टी करणारे तुरुंगात जावे असंच वाटत असतं. आणि देशद्रोह्यांना त्यांचा गुन्हा सिद्ध करून शिक्षा द्यावी अशीच त्यांची इच्छा असते. देशभक्ती म्हणजे फक्त तिरंगा फडकवणे आणि सिनेमाच्या आधी राषट्रगीताला उभे राहणे नाही, हे समजून घ्यावं. राहवलं नाही म्हणून प्रतिसाद लिहिला. ______________===_______===___________ जल्पकांच्या या जगी जाहले कठीण हे जगणे, भाळी बसती कित्येकांच्या नकोसे शिक्के.. च.ब.

In reply to by चष्मेबद्दूर

या सगळ्या आरोपांचा किंवा शंकांचा जाहीररीत्या शंख करायची आवश्यकता काय होती?
पाकिस्तानला बिजेपी आणी कॉग्रेस एकच वाटत नाही, त्यांना काँग्रेस जास्त पसंद आहे, त्यातली त्यात काँग्रेसमधले मुस्लिम नेते अजून जास्त पसंद आहेत आणि पाकिस्तान हा आपला शत्रू देश आहे हे काही गुजराथी लोकांना माहित नसेल म्हणून केला असेल शंख.

In reply to by चष्मेबद्दूर

आत्ताच समजलं कि मोदींच्या कालच्या भाषणाला उत्तर म्हणून पूर्व पंतप्रधानांनी एक उत्तर लिहिलंय. बातम्यांमध्ये त्या पत्राची जोरदार चर्चा सुरु आहे. ते पत्र वाचून हसू आलं आणि चीडही आली. म्हणे मोदींनी घटनात्मक संस्थांची प्रतिष्ठा धुळीस मिळविली. म्हणे गुजरातमध्ये पराभवाच्या भीतिमुळे मोदींनी अपशब्द वापरणे सुरू केले आहे. म्हणे मोदी कोणतेही निमंत्रण नसताना पाकिस्तानला गेले. म्हणे मोदींनी देशाची माफी मागावी. आपल्या १० वर्षाच्या कारकीर्दीत हे भारतातील सर्वाधिक सामर्थ्यवान पदावर असूनसुद्धा एका कठपुतळीसारखे वावरल्यामुळे घटनात्मक संस्थांच्या प्रतिष्ठेत भर पडली होती का त्या संस्थांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली होती? आसाममध्ये कधीही वास्तव्य केले नसताना खोट्या भाडेपावत्या सादर करून तिथून राज्यसभेची निवडणुक लढताना घटनात्मक संस्थांच्या प्रतिष्ठेत भर पडली होती का त्या संस्थांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली होती? देशातील साधनसंपत्तीवर सर्वात पहिला हक्क हा मुस्लिमांचा आहे असे सर्वोच्च पदावरून भेदभाव करणारे वक्तव्य करताना घटनात्मक संस्थांच्या प्रतिष्ठेत भर पडली होती का त्या संस्थांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली होती? हे क्वचितच पत्रकारांना सामोरे जायचे. परंत जानेवारी २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान होणे हे देशासाठी अत्यंत घातक ठरेल हे अपशब्द वापरताना त्यामागे लोकसभा निवडणुक पराभव होईल अशी भीति नव्हती का? सोनिया गांधी, राहुल, दिग्विजय, इम्रान मसूद, मण्या अय्यर, गुरूदास कामत अशा असंख्य कॉग्रेसजनांनी यांच्याच कारकीर्दीत मोदींविषयी वारेमाप अपशब्द वापरले, तेव्हा आपल्या सहकार्‍यांना यांनी का माफी मागण्यास सांगितले नव्हते? यांच्या कारकीर्दीत भ्रष्टाचाराने कळ्स गाठला होता. त्याबद्दल यांनी आपल्या तोंडातून आजवर अवाक्षर तरी काढले का? देशाचे प्रचंड नुकसान यांच्या १० वर्षांच्या कारकीर्दीत झाले. यांच्या नाकाखाली लूटमार सुरू असताना हे होयबासारखे तोंडात मिठाची गुळणी घेऊन डोळे मिटून स्वस्थ बसून होते. त्याबद्दल हे कधी माफी मागणार? मोदी कोणतेही निमंत्रण नसताना पाकिस्तानला गेले असे तब्बल १० वर्षे पंतप्रधान पदावर बसविलेल्या व्यक्तीने म्हणावे हे आश्चर्यकारक आहे. अधिकृत पदांवर असलेल्या देशांमधील नेत्यांमध्ये अशा आकस्मिक भेटी होत असतातच. अशा भेटी कधी पूर्वनियोजित असतात आणि तर कधी अचानकही ठरतात. २००० साली क्लिंटन फक्त भारतभेटीवर येऊन परत जाताना अचानक ४-५ तासांसाठी पाकिस्तान भेटीवर गेले होते. ही भेट अजिबात पूर्वनियोजित नव्हती. त्यांच्या या भेटीबाबतही असेच म्हणावे लागेल का? पूर्वी रशियाचे पंतप्रधान (नाव विसरलो) दुसर्‍या देशाला भेट देऊन रशियाला परत जाताना अचानक भारतात येऊन तत्कालीन पंतप्रधानांना भेटून गेले होते. त्यामुळे मोदी पूर्वनियोजित भेट नसताना अचानक पाकिस्तानला २-३ तासांची भेट देऊन आले यावर निदान पंतप्रधानपदावर बसून गेलेल्या व्यक्तीने तरी शंका व्यक्त करायला नको होती. दुसरं म्हणजे मोदी पाकिस्तानला गेले ते कॅमेर्‍यांच्या गराड्यात. त्यांच्या भेटीचा प्रत्येक क्षण नागरिकांना दिसत होता. त्या भेटीसंबंधात काहीही लपवाछपवी केलेली नव्हती. याउलट हे मात्र पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्र्याला गुपचूप भेटले व भेट गुप्त ठेवायचा प्रयत्न केला. जुलै २०१७ मध्ये डोकलामध्ये भारत व चीनचे सैन्य हातात शस्त्रे घेऊन समोरासमोर युद्धाच्या पावित्र्यात उभे होते. कोणत्याही क्षणी युद्ध सुरू होईल इतके वातावरण तापलेले होते. अशा प्रसंगी पप्पू माजी संरक्षण सचिव शिवशंकर मेनन यांच्या बरोबर गुपचूप चिनी राजदूताला भेटला व जेव्हा भेटीची बातमी फुटली तेव्हा काँग्रेसचा सुरजेवालाने पत्रकार परीषद घेऊन अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे छातीठोकपणे सांगितले. परंतु चिनी दूतावासाने भेटीची प्रकाशचित्रे प्रसिद्ध करून भेट झाल्याचे मान्य केल्यानंतर खांग्रेसी तोंडावर पडले होते. संरक्षण सचिव असल्याने शिवशंकर मेनन यांना अनेक लष्करी गुपिते माहिती असणार. अशी व्यक्ती युद्धाच्या वातावरणात शत्रू देशाच्या राजदूताला गुपचूप भेटते हे अत्यंत संशयास्पद आहे. खांग्रेसवाले गुपचूप पाकिस्तानी व चिनी अधिकार्‍यांना का भेटत आहेत याचा खुलासा विचारणे म्हणजे घटनात्मक संस्थांची प्रतिष्ठा धुळीस मिळविली असे होते का? खांग्रेस, पाकिस्तान व चीन यांच्यात नक्कीच काहीतरी संशयास्पद सुरू आहे आणि हे ढुढ्ढाचार्य मौनीबाबा सुद्धा त्यात आता सामील झाले आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

सहमत. या प्रकारामुळे मनमोहनसिंगांविषयी जो काही थोडाथोडका आदर शिल्लक राहिला होता तो पण आता धुळीला मिळाला आहे. प्रतिसादात थोडी सुधारणा सुचवतो.
२००० साली क्लिंटन फक्त भारतभेटीवर येऊन परत जाताना अचानक ४-५ तासांसाठी पाकिस्तान भेटीवर गेले होते. ही भेट अजिबात पूर्वनियोजित नव्हती.
नाही बिल क्लिंटन यांची पाकिस्तान भेट होणार हे आधीच ठरले होते. पाकिस्तानात मुशर्रफने बंड करून लष्करी राजवट आणल्यामुळे बिल क्लिंटन पाकिस्तानला गेले ती 'स्टेट व्हिजिट' नव्हती तर त्याला भारतातून परत जात असताना 'स्टॉप-ओव्हर' असे म्हटले गेले होते. बिल क्लिंटन त्याच भेटीत वॉशिंग्टनला परतण्यापूर्वी मस्कत आणि जीनीव्हाला पण गेले होते. त्या भेटी आधीच ठरल्या होत्या की ते अचानक तिथे गेले होते हे माहित नाही. जॉर्ज डब्ल्यू बुश २००६ मध्ये भारतात आले तेव्हा येताना काबूलला त्यांनी अशी अचानक भेट दिली होती. सुरक्षेच्या कारणामुळे त्यांच्या भेटीची माहिती आधी जाहिर करण्यात आली नव्हती असे सांगण्यात आले होते. बहुदा बराक ओबामाही २०१० मध्ये येताना (किंवा जाताना) काबूलला गेले होते असे वाटते. तपासून बघायला हवे. राजीव गांधींनी १९८५ मध्ये अमेरिकेला भेट दिली होती. त्यावेळी त्यांची रॉनाल्ड रेगन यांच्याशी चांगली चर्चा होऊन दोन देशांमधील संबंध चांगले होतील अशी शक्यता निर्माण होते आहे असे वाटत असतानाच राजीव गांधी परतताना मॉस्कोला असेच अचानक थांबले होते. याविषयी अधिक http://indiatoday.intoday.in/story/mikhail-gorbachev-gave-rajiv-gandhi-… इथे. रेगन उघडपणे सोव्हिएट रशियाला 'इव्हिल इम्पायर' आणि कम्युनिझमला मानवतेला लागलेला कलंक असे म्हणत असत. अशावेळी भारतासारख्या देशाचा नेता अमेरिकेतून परत जाताना मॉस्कोमध्ये थांबला हे रेगन प्रशासनाला फार आवडलेले नव्हते. मोदींच्या डिसेंबर २०१५ मधील लाहोर भेटीवर प्रश्नचिन्ह उभे करण्यार्‍या काँग्रेसला राजीव गांधींच्या १९८५ मधील मॉस्को भेटीचा विसर पडला होता असे http://www.asianage.com/india/congress-targets-pm-forgets-rajiv-gandhi-… इथे पण म्हटले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

पण एकानी गाय मारली म्हणून दुसऱ्यानी वासरू मारावे का, हा प्रश्न आहे. काँग्रेस हलकट आहेच म्हणूनच भाजपला निवडून दिलं. आता त्यांच्याच सारखं वागून काय मिळवणार ? एक गोष्ट नक्की आहे कि, मोदी विरोध म्हणजे देशद्रोह नाही आणि मोदी म्हणजेच भाजपा नाही. मी भाजप ला फक्त डेव्हलपमेंट च्या मुद्द्यावर मत दिलं होतं. पण आता अशी खात्री वाटत आहे कि सत्ता मिळाल्यावर सगळे सारखेच. शहा पुत्र, डोवल पुत्र यांच्या कंपन्या, जज लोयांच्या हत्येबाबत समोर आलेल्या गोष्टी, गोरक्षकानी केलेल्या हत्या आणि आता गोमांसावरची उठवलेली बंदी...या सगळ्या उलट सुलट घटना काय दाखवतात? माझ्या देशात हे सगळं व्हावं याच फार वाईट वाटतं.

In reply to by चष्मेबद्दूर

शहा पुत्र, डोवल पुत्र यांच्या कंपन्या>>> ==>> शाह पुत्राच्या उड्या माहित होत्या, पण त्या प्रकरणात एवढा दम नव्हता. पण डोवाल पुत्राने काय केले ? वाचले नाही कुठे ?

In reply to by विशुमित

डोव्हल पुत्राची गोष्ट शाहपुत्राहून फुस्की आहे. पण त्या आर्टिकल्सनी त्यांचं काम बजावलं आहे. त्या आर्टिकल्सचं काम मोदी विरोधकांना वॉटाबाऊटरीसाठी खाद्य पुरवणे एवढच होतं. भ्रश्टाचाराविरोधी काही नाही. शाहपुत्राचा लेखात भ्रष्टाचाराचा आरोप देखील नाही. आर्टिकल लिहिलंच अशा प्रकारे होतं की वाचक आपोआप भ्रष्टाचार आहे असं मत बनवेल.

In reply to by चष्मेबद्दूर

पण एकानी गाय मारली म्हणून दुसऱ्यानी वासरू मारावे का, हा प्रश्न आहे. काँग्रेस हलकट आहेच म्हणूनच भाजपला निवडून दिलं. आता त्यांच्याच सारखं वागून काय मिळवणार ? त्यांच्यासारखे कधी वागले? मोदींची पाक भेट पूर्वनियोजित नसली तरी त्यात लपवाछपवी नव्हती. शहा पुत्र, डोवल पुत्र यांच्या कंपन्या, जज लोयांच्या हत्येबाबत समोर आलेल्या गोष्टी, लोयांचा ३ वर्षांपूर्वी झालेला नैसर्गिक मृत्यू म्हणजे हत्या?

मोदींनी काहीही केले तरी ते पंतप्रधानपदाची शान कशी कमी करत आहेत वगैरे गोष्टी मोदीविरोधक बोलत आहेतच. पण मोदी कोणतीही महत्वाची गोष्ट अशी 'लूज एन्डेड' ठेवतील हे शक्यच नाही. पाकिस्तानी लष्कराच्या अर्शद रफिकने गुजरातमध्ये अहमद पटेल मुख्यमंत्री व्हावेत असे म्हटले. ती बातमी पुढीलप्रमाणे: असे झाल्यानंतर पाकिस्तानला गुजरात निवडणुकांमध्ये आणि त्यातही काँग्रेसच्या यशात का इंटरेस्ट आहे हा प्रश्न उभा का राहू नये? बरं तो लष्करी अधिकारी त्याचे तो काहीतरी बरळला आहे आमचा त्याचा काही संबंध नाही असे काँग्रेसकडून म्हटले गेले आहे का? तसे कोणतेही स्पष्टीकरण काँग्रेसकडून आले नाही तर संशय नक्कीच वाढेल. आता राहिला प्रश्न मनमोहनसिंगांनी पाकिस्तानी हायकमिशनरला गुप्तपणे भेटण्याचा. मनमोहनसिंग १० वर्षे पंतप्रधान असल्यामुळे त्यांना अनेक गोपनीय गोष्टी माहित आहेत हे नक्कीच. अशी गोपनीय माहिती असलेल्या कोणीही पाकिस्तानसारख्या देशाच्या हायकमिशनरला गुप्तपणे भेटणे कितपत योग्य आहे? मनमोहनसिंग जर खरोखरच निस्पृह वगैरे असतील तर आपण असे पाकिस्तानी हायकमिशनरला भेटणार आहोत आणि अमुक तमुक गोष्टींवर चर्चा करणार आहोत एवढे जरी त्यांनी आधीच म्हटले असते तर संशयाला काहीच जागा राहिली नसती. आजी/माजी पंतप्रधानांना खाजगी आयुष्य नसते आणि त्यांचे आयुष्य हीच एक 'खुली किताब' बनते. त्यामुळे पाकिस्तानी हायकमिशनरला आपण भेटणार आहोत एवढे तरी त्यांनी आधी जाहिर नक्कीच करायला हवे होते. राजकारणाशी काहीही संबंध नसलेल्या कोणालाही मनमोहनसिंगांनी भेटणे आणि ती माहिती जगजाहिर न करणे आणि पाकिस्तानी सरकारच्या प्रतिनिधीला भेटणे यात नक्कीच फरक आहे हे नक्कीच. इतकेच नव्हे तर ही बातमी मिडियामध्ये आल्यानंतर सुरवातीला काँग्रेसने तर अशी कोणतीही भेट झालीच नव्हती असेही म्हटले. ते का? जर तुमच्याकडे लपविण्यासारखे काहीच नसेल तर ही बातमी आल्यानंतर सुरवातीला खंडन का केले? काही महिन्यांपूर्वी डोकलाम प्रकरण चालू असताना राहुल गांधी चीनी राजदूताला भेटले होते. त्यावेळीही नेमका हाच प्रकार काँग्रेसने केला होता. त्याचीच पुनरावृत्ती परत झाली. या सगळ्या गोष्टी संशयास्पद न वाटता नेहमीप्रमाणे मोदींना दोष देणे याला कमालीचा पूर्वग्रह सोडून दुसरे काय म्हणता येईल? नशीबाने बहुसंख्य भारतीय जनता सुशिक्षित नाही त्यामुळे या गोष्टी त्यांना तरी नक्कीच संशयास्पद वाटतील अशी अपेक्षा आहे.

आता ते चमच्यावर गेले. सोन्याचा ( सोनियाचा ) चमचा घेउन जन्मलेल्या राहूलना गरिबी काय ठावूक ? मी उन्हाळ्यात गरिब मुलांची काळजी करतो , अंबानीच्या मुलांची नव्हे !

In reply to by babu b

गरीब राहिले तरच गरिबांबद्दल कळवळा रहातो ! मग गरीबी असणं चांगलं की नसणं , हे नवीन कन्फ्युजन आता निर्माण झाले आहे .. पिढ्यानपिढ्या कष्ट केल्यावर कोणती तरी पिढी सोन्याचा चमचा घेउन येणारच की ! की पुढच्या पिढीला गरिबांचा कळवळा रहावा म्हणून मागच्या पिढीने सगळे चमचेच टाकून द्यायचे का ?

In reply to by babu b

बाबूजी, स्पष्टीकरण द्यावं लागावं इतकं माणसाचं ज्ञान गरीब नसावं. किंवा तसं सोंग करू नये. ---------------------- मोदिंची सद्य लायकी "फक्त" काँग्रेसवाल्यांच्या ऑफिसात चहा विकायची आहे असं काँग्रेस म्हणाली. भाजप प्राचीन काळी ते चहा विकत असे म्हणे.

In reply to by arunjoshi123

मोदी चहा विकायचे हे त्यानी बायोडेटात नव्हते लिहिले .. तसे काही एक्पिरिअन्स सर्टिफिकेटही नव्हते .. निवडणुकीच्या जाहिराती सुरु झाल्यावर हेच बोलू लागले , मी चहा विकायचो म्हणून. आरटीआयखाली रेल्वेत माहिती मागितली तर त्यानाही माहीत naahee की ते कुठे अन कधी चहा विकायचे ... मग इतराना कसे ठावूक असणार ते चहा विकायचे म्हणून ?

In reply to by babu b

नेहरू लफडी करायचे असं त्यांच्या बायोडाटात नव्हतं लिहिलं. त्या बायकांनी त्यांना तसं अनुभव प्रमाणपत्र दिलं नव्हतं. मग त्यांचेच सहकारी लिहू लागले. आरटीआय मधे हॉटेलांत किंवा दिल्लीच्या वा लंडनच्या भवनांत माहीती मागीतली तरी मिळणार नाही. ============================= तरी भाजपने त्यांना किंवा त्यांचा वारसा सांगणार्‍या राहुलला भाजप भवनाबाहेर लफडी करायला (आणि राजकारण सोडायला) बोलावले का?

In reply to by babu b

न्हेरू-गांधी परिवार आनि "पिढ्यानपिढ्या कष्ट"... हहपुवा... पिढ्यानपिढ्यांचे बलिदान काय कमी पल्डं म्हनून आत्ता हे कायबाय नवं की काय ?! झ्येंडा मिर्वताना सुदीक यवडं भान ईस्रून कसं चालंल बाबूजी ?! =)) =)) =))

In reply to by गब्रिएल

मी इन् जनरल बोललो. सोन्याचा चमचा तोंडात घेउन आलेल्याना गरिबी कशी समजणार ? संदर्भ जरी राहूल गांधींचा असला तरी ते इन् जनरल कुणालाही ॲप्लिकेबल आहे. म्हणून मी म्हटलं की जनतेने श्रीमंत व्हायचे सोडून द्यायचे की काय ?

In reply to by babu b

म्हणून मी म्हटलं की जनतेने श्रीमंत व्हायचे सोडून द्यायचे की काय ?
तसं नाय हो. पण काँग्रेसी पुरोगामी मार्गाने श्रीमंत होऊ नये. देश लुटत नव्हे तर वैध मार्गाने श्रीमंत व्हावे.

In reply to by arunjoshi123

१. बाजपेयीची ५ आणि मोदीची ४ ... ९ वर्षात भ्रष्टाचाराबद्दल किती लोकाना अटक झाली ? किती रिकव्हरी झाली ? २. काँग्रेस, रावा , सेनेच्या कितीतरी लोकाना भाजपाने आपल्यात सारवासारव करुन समाविष्ट केलेले आहे. जर काँग्रेसवाले अवैध मार्गाने श्रीमंत होतात , तर भाजपा हे सर्व का करत आहे ?

In reply to by babu b

१. बाजपेयीची ५ आणि मोदीची ४ ... ९ वर्षात भ्रष्टाचाराबद्दल किती लोकाना अटक झाली ? किती रिकव्हरी झाली ?
एवढी नोटबंदी होऊनही ससिकला कडे किती पैसे सापडले. https://www.ndtv.com/tamil-nadu-news/tax-officials-find-1-4-crore-undec… ( हा चॅनल तुमचाच) ३,००,००० कंपन्या रद्द केल्या आहेत. बर्‍याच प्रकारचा फ्रॉड सरकारने आटोक्यात आणला आहे. --------------- वायपेयींच्या काळात काही झालं नाही. हे मान्य. --------------------------------------- प्रॉब्लेम असा कि मागच्या सरकारने एकदा सगळं काळ्याचं पांढरं केलं की पुढच्या सरकारला अवघड जातं चोर पकडणं. मागचं सरकारच चोरांचं असेल तर असंभव. पण स्वामींनी (जे बीजेपीचे आहे) घातलं कि लोकांना जेलमधे. ------------------------------------------------ उरलेले हळूहळू जातील. पकडून जेलात टाकायचा मोदी काय इंदिरा बाय नाहीत. ते सगळे कायदे बनवत आहेत. मागचे पकडता येतील का माहित नाही पण पुढे शिस्त असेल असं फ्रेमवर्क देशात येत आहे.

In reply to by babu b

१. बाजपेयीची ५ आणि मोदीची ४ ... ९ वर्षात भ्रष्टाचाराबद्दल किती लोकाना अटक झाली ? किती रिकव्हरी झाली ?
एवढी नोटबंदी होऊनही ससिकला कडे किती पैसे सापडले. https://www.ndtv.com/tamil-nadu-news/tax-officials-find-1-4-crore-undec… ( हा चॅनल तुमचाच) ३,००,००० कंपन्या रद्द केल्या आहेत. बर्‍याच प्रकारचा फ्रॉड सरकारने आटोक्यात आणला आहे. --------------- वायपेयींच्या काळात काही झालं नाही. हे मान्य. --------------------------------------- प्रॉब्लेम असा कि मागच्या सरकारने एकदा सगळं काळ्याचं पांढरं केलं की पुढच्या सरकारला अवघड जातं चोर पकडणं. मागचं सरकारच चोरांचं असेल तर असंभव. पण स्वामींनी (जे बीजेपीचे आहे) घातलं कि लोकांना जेलमधे. ------------------------------------------------ उरलेले हळूहळू जातील. पकडून जेलात टाकायचा मोदी काय इंदिरा बाय नाहीत. ते सगळे कायदे बनवत आहेत. मागचे पकडता येतील का माहित नाही पण पुढे शिस्त असेल असं फ्रेमवर्क देशात येत आहे.

In reply to by babu b

१. बाजपेयीची ५ आणि मोदीची ४ ... ९ वर्षात भ्रष्टाचाराबद्दल किती लोकाना अटक झाली ? किती रिकव्हरी झाली ?
एवढी नोटबंदी होऊनही ससिकला कडे किती पैसे सापडले. https://www.ndtv.com/tamil-nadu-news/tax-officials-find-1-4-crore-undec… ( हा चॅनल तुमचाच) ३,००,००० कंपन्या रद्द केल्या आहेत. बर्‍याच प्रकारचा फ्रॉड सरकारने आटोक्यात आणला आहे. --------------- वायपेयींच्या काळात काही झालं नाही. हे मान्य. --------------------------------------- प्रॉब्लेम असा कि मागच्या सरकारने एकदा सगळं काळ्याचं पांढरं केलं की पुढच्या सरकारला अवघड जातं चोर पकडणं. मागचं सरकारच चोरांचं असेल तर असंभव. पण स्वामींनी (जे बीजेपीचे आहे) घातलं कि लोकांना जेलमधे. ------------------------------------------------ उरलेले हळूहळू जातील. पकडून जेलात टाकायचा मोदी काय इंदिरा बाय नाहीत. ते सगळे कायदे बनवत आहेत. मागचे पकडता येतील का माहित नाही पण पुढे शिस्त असेल असं फ्रेमवर्क देशात येत आहे.

In reply to by arunjoshi123

नोटाबंदी झाली भाजपाच्या काळात , नव्या नोटा छापल्या भाजपाच्या काळात, अन भ्रष्टाचारी माणसाच्या घरात करोडोंच्या नव्या नोटा सापडल्या तर त्याला जबाबदार कोण ? काँग्रेस की भाजपा ? शशिकला भ्रष्टाचारी ! एकेकाळी जयललिता भाजपा सरकारच्या पार्टनर होत्या ना ? वाजपेयींच्या काळात ? काळ्याचे पांढरे ? नोटाबंदीच्या वेळेस वॉलंटरी डिस्क्लोजर कुणी जाहीर केले होते ? काँग्रेसने की भाजपाने ? अन त्यात सर्वात जास्त पैसे भरणारा मनुष्य गुजरातचाच निघाला हा निव्वळ योगायोग . !!

In reply to by babu b

नोटाबंदी झाली भाजपाच्या काळात , नव्या नोटा छापल्या भाजपाच्या काळात, अन भ्रष्टाचारी माणसाच्या घरात करोडोंच्या नव्या नोटा सापडल्या तर त्याला जबाबदार कोण ? काँग्रेस की भाजपा ?
नोटबंदी मुळेच काळे पैसे ट्रेस झाले ना शशिकलाचे? का मनमोहनने केले? ---------------------------------------------- नोव्हेंबर १६ ते नोव्हेंबर १७ इतक्या काळातच शशिकलेने (पकडलेल्या नोटांइतका) भ्रष्टाचार केला आणि त्याच्या पूर्वी सावपणे बसली होती मनमोहनाच्या काळात? मस्तंय कि. ================================
शशिकला भ्रष्टाचारी ! एकेकाळी जयललिता भाजपा सरकारच्या पार्टनर होत्या ना ? वाजपेयींच्या काळात ?
नक्की? मग सुब्बू नं कुणाचं सरकार कसं पाडलं? उगंच काहीही? =============================================
काळ्याचे पांढरे ? नोटाबंदीच्या वेळेस वॉलंटरी डिस्क्लोजर कुणी जाहीर केले होते ? काँग्रेसने की भाजपाने ? अन त्यात सर्वात जास्त पैसे भरणारा मनुष्य गुजरातचाच निघाला हा निव्वळ योगायोग . !!
वेळेस नै हो, पूर्वी. आणि स्वस्फूर्त डिस्क्लोजर हा तर चिदंबरमचा आवडता आणि नेहमीचा धंदा होता ना? एकूण कितीदा हे झालंय हे माहित आहे? ------------------------ नोटबंदीत ३०% चलन एकट्या भिकारड्या पुरोगामी बंगालमधे डिपॉझिट झालंय. तिथं गुजराती नाहीत. पूर्वाश्रमीचे काँग्रेसी आहेत.

प्रधानसेवकांनी गुजरात निवडणुकांमधे पाक हस्तक्षेपाचे जे तुणतुणे लावले आहे ते लाजिरवाणे आहे. आता मोदि फोर्मली दिग्विजयसिंग प्रभृतींच्या मांदियाळीत जाऊन बसले. डिस्गस्टींग.

In reply to by अर्धवटराव

छान छान! चला आता मिळून एका पक्षाच्या अधक्ष्यासमोर मान तुकवून उभे राहणार्यांना प्रधानसेवक करू.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

तर ते हि दिवस दिसतील. तसंही युवराजांचं आणखी ३० वर्षाचं राजकारण शिल्लक आहे. त्यात कमितकमी ६ लोकसभा निवडणुका होतील. त्यातली किमान एक तरी नक्की जिंकेल युवराज. पण ते दिवस आणायला मोदिंना इतकी घाई का झाली आहे कळत नाहि.

In reply to by अर्धवटराव

४७ ते ७७ या ३० वर्षात असं काही झालं नव्हतं. हां २०३९ मधे मोदिंनी आणिबाणी लादली तर स्कोप आहे राहुलला.

In reply to by अर्धवटराव

मोदींना नाही मोदीद्वेष्ट्याना/विरोधकांना घाई झाली आहे एवढे मात्र नक्की! त्यांनी अमुक असं भाषण केलं की २०१९ मध्ये ते जाणार वगैरे कल्पनाविलास सुरु झालेलेच आहेत. का बुआ? त्यांना लढू द्या ना निवडणूका जशा लढायचं आहेत तशा. जर त्यांच्या अशा वागण्याने त्यांना जनता हाकलणारच असेल तर बेष्टच की! जनतेने निवडणुकांबाबत असेच राहावे हीच तर अपेक्षा आहे. घाणेरडे राजकारण करून निवडणुका जिंकायची संधी भाजपने विरोधकांना का द्यावी?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

घाणेरडे राजकारण करून निवडणुका जिंकायची संधी भाजपने विरोधकांना का द्यावी?
तशी संधी देऊ नये असं वाटतं.

In reply to by अर्धवटराव

मला वाटत पाकिस्तानी लोकांबरोबर कॉंग्रेसची मीटिंग झाली याचा मुद्दा बनविण्यात कॉंग्रेसचीच चुक आहे. मोदिन्चि नाही. कारण अशी बैठक झाली याचे कुठल्याही वृत्तपत्रात वृत्त नाही. मोदिन्नि जेव्हा अशी बैठक झाल्याचे सांगितले तेव्हा कॉंग्रेसने त्याचा त्वरित इन्कार केला. मुख्य म्हणजे तिथे काय चर्चा झाली हे कॉंग्रेसने अजूनही स्पष्ट केलेले नाही. मनमोहन सिंगंनी गुजरात बद्धल कोणतीही चर्चा झाली नाही असे सांगितले, पण ते त्यांच्या पुरते मर्यादित आहे. बाकीचे सर्वजण अजूनही गप्पच आहेत. मुळात अशा बैठकीत जाण्यासारखे त्या बैठकीत काय होते हे त्यानी स्पष्ट करायला हवे. मणिशन्करने पाकिस्तानकडे मोदिन्ना हटविण्यासाठी उघड मदत मागितली हेही "सत्यच" आहे. तर अशा बैठकीत काय झाले याचे वृत्त कुठेही प्रसिद्ध न झाल्यामुळे त्या बैठकीचा "अंदाज" बांधण्याला मोदिन्ना वाव मिळाला. आणि त्यानी त्याचा निवड्णुकिय मुद्दा बनविण्याची संधी का सोडावी?

In reply to by SHASHANKPARAB

मोदिपण टिकवण्यासाठी, मोदिपण आणखी ग्लोरिफाय करण्यासाठी. मोदिंनी असले मुद्दे निवडणुकीत उचलणे त्यांचं स्वतःचं प्रतिमाहनन आहे (असं मला वाटतं)

In reply to by अर्धवटराव

प्रधानसेवकांनी गुजरात निवडणुकांमधे पाक हस्तक्षेपाचे जे तुणतुणे लावले आहे ते लाजिरवाणे आहे.
हस्तक्षेप सिद्ध झाला कि कपाळ बडवून घेऊ.

Newly-inducted Congress leader Alpesh Thakor today said that imported mushrooms have helped Narendra Modi get a "fair" complexion. Addressing a rally in Gujarat on the last day of the election campaign for the second phase, OBC leader Thakor said, "Modi ji eats mushrooms from Taiwan and one mushroom costs Rs 80,000 and he eats five mushrooms everyday". "He was dark like me but he became fair because of imported mushrooms," said Thakor, who is contesting from Radhanpur constituency in Patan district. http://m.indiatoday.in/story/alpesh-thakor-gujarat-election-mushroom-na… काहीही दिवसांपूर्वी हार्दिक बरळला होता "मोदींनी दाढीमिशीच्या मशागतीसाठी एक खास डिझाइनर ठेवलेला आहे व त्यासाठी ते रोज हजारो रूपये खर्च करतात. " पप्पू पूर्वी बरळला होता "मोदी रोज इंपोर्टेड डाळ खातात. " आणि आता अल्पेशची बरळ!

In reply to by श्रीगुरुजी

असेलही. पूर्वी म्हणे चाचा नेहरुंचे कपडे पॅरीसच्या लौन्ड्रीत धुवायला जात असे ऐकले होते. इंदीराजींची ती कोणतीतरी महेश्वरी का काय साडी ३ लाखाची असायची असे ऐकले होते, जोंगा जीप, लोट्टोचे शूज हे राजीव गांधीमुळे माहीत झाले. तसेच कैतरी असावे. बडे लोगा...बडी बाते......

In reply to by श्रीगुरुजी

पप्पू पूर्वी बरळला होता >> त्यात बरळणे कुठे दिसले? फेकूसुद्धा पचास करोड की गर्लफ्रेंड असे भारतीय स्त्रीला च हिणवत होता हे विसरला काय? एका प्रतिष्ठीत बाईचा "भाव" सांगणे हे तिचे चारित्र्यहनन नव्हे काय? पण काय आश्चर्य नाही,स्वतःच्या बायकोला सोडुन देणार्या आणि दुसर्याच्या बायकोचे भाव, दर सांगत फिरणार्या फेकूचे संस्कार रेशिमबाग, नागपुरचे . हे अगदी स्पष्ट आहे.

In reply to by सिंथेटिक जिनियस

सिंजि, ५० कोटींची गर्लफ्रेंड हा काय प्रकार आहे? हा पैसा त्या बाईच्या खात्यात आढळून आला ना? मग हा तिचा 'भाव' कसा झाला? आ.न., -गा.पै.

In reply to by सिंथेटिक जिनियस

त्यात बरळणे कुठे दिसले?
मग काय लताचे गाणे ऐकू आले कि काय? आपल्याकडे भिकारीदेखील आयात केलेलीच दाळ खातो काही विशिष्ट महिन्यांत. आणि मश्रूमने पुरोगामी लोक गोरे होतात का? ===============================
एका प्रतिष्ठीत बाईचा "भाव" सांगणे हे तिचे चारित्र्यहनन नव्हे काय?
पुरोगामी मन घाणच असते. अहो, त्यांनी कधी तिचा भाव असं म्हटलं? ========================= http://www.livemint.com/Politics/JRHi8Pmh9m9j2bmNfoV63L/Jaiswal-under-f… जुन्या बाईत (आणि चक्क बायकोत) मजा येत नाही असं स्टेजवर म्हणणारा पुरोगामी मंत्री मात्र आदरणिय असतो?

In reply to by सिंथेटिक जिनियस

मला वाटत की मोदिन्नि कुणाच्याही गर्लफ्रेंडचा किंवा बायकोचा भाव किंवा दर सांगत नव्हते. जर त्या "विशेषणा" सबंधित बातम्या नीट वाचल्या तर लक्षात येईल की सुनंदा पुष्करना काहीही ना करता 50 कोटींची भागीदारी मिळाली त्यामुळे हे विशेषण मोदिन्नि त्याना दिले.. अर्थात प्रत्येकजण याचा हवा तसा अर्थ लावतो. जसे काही सुद्न्य लोकांना सपूर्ण काळा पैसा भारतात परत जरी आला तरी कुठलेही सरकार 15 लाख लोकांमध्ये वाटणार नाही हे माहीत आहे, त्याचवेळी काही लोक अजूनही त्या 15 लाखांच्या प्रतीक्षेत आहेत.. अगदी तसेच

पुरोगामी काँग्रेसने शेवटी भारतातील मुस्लिमांना अपिल करायचा पाकिस्तानच्या लष्कराचा माणूस आणून गुजरातचा मुख्यमंत्री काँग्रेसी मुस्लिम झाला पाहिजे असं म्हणवून घेतलं. किती ते व्होटबँकेचं राजकारण! ====================== पण पुरोगाम्यांना आता हे कळत नाहीय की इस्लाम इ निवडणूकीचा मुद्दा असूच शकत नाही. हिंदूत्ववाद्यांचा सगळ्यात खतरनाक नेता मोदी पंतप्रधान झाला तरी सर्व त्रास पुरोगाम्यांनाच (अवार्ड वैगेरे वापस द्यावं लागतं, इ) होतो (मुस्लिमांना नाही) हे मुस्लिम जाणून चुकले आहेत. एरवीही त्यांना इस्लाम/पाक इ विषयांत रस नाही. हे तथाकथित सेक्यूलर पुरोगामी उगाचच बीजेपीचा बाऊ दाखवत असतात. ================================ तरी सलग २२ वर्षे एकच पक्षाचे सरकार मंजे अयोग्य आहे. दिल्लीत (राज्यात) सोडून काँग्रेसवाले मंजे अशक्य देशद्रोही आहेत. त्यांच्यापेक्षा अनागोंदी परवडली. म्हणून गुजरातेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरकार यावे अशी इच्छा आहे.

In reply to by arunjoshi123

आतापर्यंत ३-४ वेळा तेच तुटलेले तुणतुणे वाजवतोय ? आरोप कोर्टाने नाकरला आहे आणि खोट्या आरोपाबद्दल दंड लावला आहे . http://www.firstpost.com/india/sc-dismisses-rape-case-against-rahul-gan…

In reply to by कपिलमुनी

आरोप कोर्टाने नाकरला आहे आणि खोट्या आरोपाबद्दल दंड लावला आहे .
हांग कसं लायनीवर आलात. कोर्टानं मोदींना २००२ च्या दंग्यांत सहभागी असल्याचा आरोप नाकारला आहे ना? पण मानतात कुठे पुरोगामी? सरकारचं जे काही चालू आहे ते मायनॉरिटीज साठी धोकादायक आहे, ब्ला ब्ला ब्ला. ======================== कोर्टानं एखादी गोष्ट सुस्पष्ट शब्दांत सांगीतली असताना (जसं कि आर एस एस एक नॉमल संस्था आहे, बीजेपी एक नॉर्मल पार्टी आहे, मोदी २००२ मध्ये निष्पाप आहेत) आपल्यालाच जास्त अक्कल आहे म्हणत या तिघांना (संघ, बीजेपी, मोदी) दिवसरात्र शिव्या घालणं हेच केवळ का मान्य असावं? तोच येडा (का येडझवा?) कित्ता गिरवत राहुल गांधी बलात्कारी आहे असं दिवसरात्र का म्हणू नये? पुरोगामी आरोपी असले न्यायालयाने मुक्तता केली कि बाकीच्यांनी गप्प राहावं आणि प्रतिगामी आरोपी असले कि न्यायालयाची ही चूक असू शकते? हा काय न्याय आहे? त्यामुळे कपिलमुनी व्यक्तिशः तुम्ही येडे नसाल तर भारताच्या सगळ्या घटनात्मक संस्थांना मान्य असलेल्या फ्रेमवर्कच्या मर्जीनुसार जे जे काही होत आहे ते ते अधिकृत आहे म्हणा. काही गोष्टींशी वैचारिक असहमती असेल तर तिचा आदर आहे. पण घटनात्मक मान्य गोष्टींना क्रिमिनल, विकृत इ ठरवण्यार्‍या लोकांचा समाचार घेतलाच पाहिजे.

In reply to by arunjoshi123

हांग कसं लायनीवर आलात. कोर्टानं मोदींना २००२ च्या दंग्यांत सहभागी असल्याचा आरोप नाकारला आहे ना? पण मानतात कुठे पुरोगामी?
जबराट. इतकेच नव्हे तर संजीव भट या पोलिस अधिकार्‍याने गोध्रा ट्रेन जळीतकांडानंतर मोदींनी 'हिंदूंना त्यांचा राग व्यक्त करू द्या' असे आपण एका बैठकीत सामील होतो त्या बैठकीत सांगितल्याचे म्हटले होते. नंतर संजीव भट त्या बैठकीत हजर नव्हतेच असे उघडकीला आले आणि कोर्टाने या संजीव भटला मस्त तासले होते. तरी केवळ मोदींविरोधात काहीतरी बोलले या एका क्रेडेन्शिअलमुळे हा मनुष्य यच्चयावत सगळ्या पुरोगाम्यांच्या गळ्यातला ताईत आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

नंतर संजीव भट त्या बैठकीत हजर नव्हतेच असे उघडकीला आले आणि कोर्टाने या संजीव भटला मस्त तासले होते. तरी केवळ मोदींविरोधात काहीतरी बोलले या एका क्रेडेन्शिअलमुळे हा मनुष्य यच्चयावत सगळ्या पुरोगाम्यांच्या गळ्यातला ताईत आहे.
शिक्षा करायचीच आहे या न्यायाने काँग्रेसने मोदींची चौकशी केली. गुजरातमधे न्याय होणार नाही म्हणून गुजरातबाहेर चौकशी केली. बलात्कारी (आरोप असलेला) राहुल गांधीला कोर्टाने मुक्त केले तेव्हा न्यायालय दिल्लित होते आणि दिल्ली राज्य सरकार आणि केंद्र सरकार काँग्रेसचेच होते. म्हणून मला मोदींसारखी या आरोपाची फेअर चौकशी झाली आहे असे वाटत नाही. ================================ राहुलला बलात्कारी म्हटल्याने काही पुरोगामी लोकांना जसा त्रास होतो तसाच त्रास मोदींना मुस्लिमविरोधी म्हटल्याने आम्हाला होतो. ============== सबब नेहमी चांगले बोलावे. राजकारणात विविध पक्षांची सत्ता येत जात असते. त्यातला नेमका एक निवडून न भूतो न भविष्यति असा कांगावा करू नये. सत्याधारित प्रमाणात विरोध/आरोप/असहमती इ इ प्रकार करावेत.

In reply to by arunjoshi123

टिट फॉर टॅट असे विधान असेल तर तुमचे चालू द्या ! ( मी वैयक्तीकरीत्या न्यायलायाला मानतो , मोदीना निर्दोष ठरवले आहे तर ते मान्य करायलाच हवे पण लगेच साध्वी , पुरोहित यांच्या बाबतीत न्यायलय चुकीचे आहे असे पलटी मारणे योग्य नाही. तसेच रागा ला निर्दोष ठरवले आहे हे मान्य करयल हवे तसेच त्यांना National Herald मधे शिक्षा झाली तर त्याचाही स्विकार हवा .)

In reply to by कपिलमुनी

तुमच्याइतक्या समजदार आणि संतुलित व्यक्तिसाठी माझा उपरोध नसतो. ============ ज्या केसेस बंद त्या बंद, ज्या चालू त्या चालू. चालू केस मधे बोलायचा अधिकार आहे. आरोप सिद्ध झाल्यावर नाही.

In reply to by arunjoshi123

बाय ग्वॉड, कैसा गुग्ली डाला हाय !? मान गये, अजो !!! तुमच्याइतक्या समजदार आणि संतुलित व्यक्तिसाठी माझा उपरोध नसतो. हेच्यासाटी +१०० पन, जेंच्यासाटी त्यो बान होता त्येंच्या त्यो बर्राबर जिव्हारी लाग्लाच की हो ! लई जळ्जळ, लई जळज्ळ ! आता तुमी तेन्ला जळिस्तळिकाष्टीपाषानि दिसत र्‍हानार आनि... संभाळून र्‍हावा ;) =)) =)) =))

In reply to by arunjoshi123

तेव्हा न्यायालय दिल्लित होते आणि दिल्ली राज्य सरकार आणि केंद्र सरकार काँग्रेसचेच होते. म्हणून मला मोदींसारखी या आरोपाची फेअर चौकशी झाली आहे असे वाटत नाही. ...... कायपण लोकांच्या अपेक्षा असतात. !! मग सगळीकडे राज्यात देशात एकाचेच् राज्य् आले , तर कोर्ट कुठे उत्तर ध्रुवावर नेणार काय ?

In reply to by babu b

मक्केला नेता येईल का? पुरावा नको साक्षीदार नको मुत्तवा कि काय म्हणतात ते एकदम शिक्षा देऊन मोकळे.

In reply to by babu b

कायपण लोकांच्या अपेक्षा असतात. !!
हे विधान संदर्भासहित निट लिहिले तर काँग्रेसी व पुरोगामी लोकांच्या अपेक्षा कायपण असतात असे होइल. -------------- भाजपवाले अशी अपेक्षा ठेवत नाहीत. काँग्रेसने एक निर्बुद्ध, खडूस म्हातारी राज्यपाल म्हणून मोदींच्या उरावर बसवली होती कैक वर्षे. तिला हाकला अशी देखील तक्रार कधी मोदिंनी केली नाही. तेच पुरोगामी केजरीवाली दुसर्‍या स्पेसिसच्या पुरोगामी काँग्रेसने नेमलेल्या राज्यपालाच्या नावाने जबरदस्त ठणाणा करत होता. ========================================
मग सगळीकडे राज्यात देशात एकाचेच् राज्य् आले , तर कोर्ट कुठे उत्तर ध्रुवावर नेणार काय ?
सगळीकडे आपलीच सत्ता असल्याने मागे पेंग्विन करतील त्यापेक्षा बिनडोक अन्याय नेहरूच्या पिढीने केलेले आहेतच. प्रश्न तोंड मागे वळवून तिकडच्या साईडला विचारला. ================= माझं फक्त इतकं मत आहे कि मोदींनी जी अग्निपरीक्षा दिली त्यामानानं राहुल निवांत सुटला. त्याला डाव्या माध्यमांनी बलात्कारी म्हणून बदनाम केले नाही याचे दु:ख आहे. केले असते तर तो देखील मोदींइतकाच निखरून आला असता.

In reply to by arunjoshi123

केले असते तर तो देखील मोदींइतकाच निखरून आला असता. हीहीही ! निखरून याय्ला मूळात सोनं आसायला लाग्तं, अजोसाब ! :) नायतर जळून राख =))

In reply to by arunjoshi123

हांग कसं लायनीवर आलात. कोर्टानं मोदींना २००२ च्या दंग्यांत सहभागी असल्याचा आरोप नाकारला आहे ना? पण मानतात कुठे पुरोगामी? सरकारचं जे काही चालू आहे ते मायनॉरिटीज साठी धोकादायक आहे, ब्ला ब्ला ब्ला. अ जो साहेब तुम्ही तर कपिल मुनींना शॉर्ट बॉल टाकून स्टंपबाहेर खेचलं आणि मागून स्टंपिंग केलं कि हो. मान गये

In reply to by सुबोध खरे

जो मोदींना मुस्लिमविरोधी म्हणतो त्या प्रत्येक बॅट्समनला आउट करायचा राहुलला बलात्कारी म्हणणे हा स्टँडर्ड बॉल आहे.

In reply to by arunjoshi123

हांग कसं लायनीवर आलात. कोर्टानं मोदींना २००२ च्या दंग्यांत सहभागी असल्याचा आरोप नाकारला आहे ना? पण मानतात कुठे पुरोगामी? सरकारचं जे काही चालू आहे ते मायनॉरिटीज साठी धोकादायक आहे, ब्ला ब्ला ब्ला. जबरदस्त! तुम्ही एकदम मुनीवर्यांच्या कफनीलाच हात घातला की!!!!!

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपला जोरदार झटका दिला आहे. केंद्र सरकारने नुकतीच जीएसटीतील १७८ वस्तूंवरील करात कपात केली आहे. त्याचा निवडणूक प्रचारात वापर करू नका, असे आदेशच निवडणूक आयोगाने दिले आहेत. ऐन मतदानाच्या आधी निवडणूक आयोगाने दिलेल्या या आदेशामुळे भाजपला जोरदार झटका बसला आहे. जीएसटीमधील वस्तूंच्या करपातीचा मुद्दा पुढे करून मतदारांना आकर्षित करण्याचा भाजपने प्रयत्न सुरू केला होता. त्यालाच निवडणूक आयोगाने सुरुंग लावला आहे. मात्र कोणत्याही वस्तूचं वा सेवांचं नाव न घेता कर प्रणाली सुलभ करण्याच्या प्रक्रियेबाबत बोलण्याची मुभा मात्र आयोगानं भाजपला दिली आहे.

In reply to by babu b

असे आदेशच निवडणूक आयोगाने दिले आहेत. ऐन मतदानाच्या आधी निवडणूक आयोगाने दिलेल्या या आदेशामुळे भाजपला जोरदार झटका बसला आहे.
संहिता लागू झाल्यावरचा निर्णय आहे का सरकारचा?
जीएसटीमधील वस्तूंच्या करपातीचा मुद्दा पुढे करून मतदारांना आकर्षित करण्याचा भाजपने प्रयत्न सुरू केला होता.
नाय हो.

In reply to by arunjoshi123

असे आदेशच निवडणूक आयोगाने दिले आहेत. ऐन मतदानाच्या आधी निवडणूक आयोगाने दिलेल्या या आदेशामुळे भाजपला जोरदार झटका बसला आहे.
म्हणजे प्रचाराची वेळ संपल्यावर राहुल गांधींनी टिव्ही चॅनेलला मुलाखत दिली याविषयी निवडणुक आयोगाने राहुल गांधींकडे स्पष्टीकरण मागितले आहे त्यामुळे निवडणुक आयोगाला पक्षपाती म्हणता पण येणार नाही. कारण भाजपला झटका देणारा निवडणुक आयोग नि:पक्षपाती असेल तर तोच निवडणुक आयोग राहुल गांधींकडे स्पष्टीकरण मागितल्यावर पक्षपाती होऊ शकणार नाही ना? http://www.hindustantimes.com/assembly-elections/gujarat-elections-elec…

In reply to by गॅरी ट्रुमन

मुलाखत दिलेली चालते म्हणे. मत मागण्याला प्रतिबंध आहे . ( म्हणे )