परत हे दिसले कि टॅलेंट असले कि गाव-शहर हा फरक राहात नाही. गावातील मुले देखील तितकीच पुढे येउ शकतात.
अवांतर- हा लेख वाचुन आठवण झाली. माझी चुलत बहिण तासगाव ( सांगली ) येथे असते. तिच्या चौथीत शिकणा-या मुलीला गणित ऑलिम्पियाड साठी निवडलाय......पूर्ण महाराष्ट्रातून काही हजार मुले बसली होती त्या परिक्षेसाठी. गुणवत्ता असेल तर बहुतेक वेळा त्याचे चिज होतेच.
असेच लेख लिहित रहा.
"परत हे दिसले कि टॅलेंट असले कि गाव-शहर हा फरक राहात नाही. गावातील मुले देखील तितकीच पुढे येउ शकतात."
अशा स्वरुपाच्या प्रतिक्य्रिया अधुन मधुन वाचयला मिळतात. पण माझा समज असा आहे की, गावातील हुषार मुलांना पुढे यण्यासाठी जास्त कष्ट (शहरी हुषार मुलांच्या तुलनेने) करावे लागतात. ह्याबाबत मत्भेद होऊ शकतो.
तुमच्या भाचीचे उदाहरण तुम्ही दिले आहे. तिच्या बाबतीत वरील समज कसा लागू होतो?
लेख आवडला. ह्रदयाला भिडला. मुलांचं कौतुकतर वाटलंच आणि
(परत येताना माझ्या डोक्यात मात्र काही प्रश्न होते, दहावीतही ही मुलं नाहीत आणि यांना वीजटंचाईचा विचार करायला लागतो. फारसे काही रीसोर्स नसताना ही मुलं एवढा विचार करतात. आपण इथे मराठी-अमराठी म्हणून वाद घालत बसतो, मराठी लोकांना मराठीची लाज वाटते का म्हणत बसतो, आणि ही मुलं बिन्धास्त विलमशी मराठीत बोलत होती)
हे विचार करायला लावणारं आहे.
मस्त माहितीपुर्णलेख आवडला. आणी स्वतःच्या कामाचे यांव आन ढ्यांव पोवाडे न गाता आजुबाजुच्या घटनांचे, मुलांच्या प्रयोगाचे केलेल वर्णन एकदम बहारदार.
१००% सहमत.
छान !
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
"जास्त मुलं असतील तर त्या घरातल्या मुलांच्या प्राथमिक गरजाही पूर्न होनार नाहीत. कमी उत्पन्न असताना पाल्कांना मुलांना जास्त सोयी देता येतात, जास्त लक्ष देता येतं..."
इयत्ता ३ री ते ९ वी या वयोगटातील मुलं असा विचार सुद्धा करतात हे उल्लेखनीय आहे.
वा सुंदर लिहिलयस... आवडल.
दहावीतही ही मुलं नाहीत आणि यांना वीजटंचाईचा विचार करायला लागतो. फारसे काही रीसोर्स नसताना ही मुलं एवढा विचार करतात. आपण इथे मराठी-अमराठी म्हणून वाद घालत बसतो, मराठी लोकांना मराठीची लाज वाटते का म्हणत बसतो
हे खासच.
मुलांशी साधलेल्या संवादावर वेगळा धागा काढून त्यांच्या प्रोजेक्ट्स विषयी अजून सविस्तर माहिती देता येते का बघावे ही विनंती.
कवटी
http://www.misalpav.com/user/765
लेखनातला सहजपणा आवडला आणि मुलांच्या प्रयोगाचं केलेलं कौतुकही.
माठाच्या फ्रीजचे प्रयोग बर्याच शाळेत होतात असे वाटायला लागलं आहे !
विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रयोगाबद्दल अजून डिटेल येऊ द्या..कोणाचा लंबर काढला तेही सांगा !
>>लेखिका नॅशनल सेंटर फॉर रेडीओ ऍस्ट्रोफिजिक्समधे कंत्राटी नोकरीवर आहे.
कायमस्वरुपी नौकरी होण्यासाठी शुभेच्छा ! :)
सुंदर लिहिले आहेस गं आदिती...
यानिमित्ताने मुलांची प्रतिभा आणि काहितरी करुन दाखवण्याची जिद्द अगदी जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचते...
मुख्य म्हणजे, मुलांनी किती उत्साहाने हे सगळे केले आणि भाषेच्या अडचणीशिवाय अगदी सहजपणे विशद करुन सांगितले याचे नवल वाटते...
अनेक प्रयोगदेखील अचंबित करुन गेले.. डासांच्या वड्या, डायनामो..., ओलं फडकं,... छानच.... :) आपणही करुन पहायला पाहिजे
पण सगळ्यात हृदयाला किनार लावून गेले ते हे वाक्य " पण पाचवीतला मुलगा जेव्हा रात्री सहा-सात तास वीज नसते सांगत होता तेव्हा खरंच वाईट वाटलं "
खरे तर आपल्या देशाची ही शोकांतिका आहे. राज्यकर्ते फक्त वचनांवर वचने देत राहतात पण भारताचा बहुसंख्य ग्रामीण भाग अंधारातून प्रकाशात काही येत नाही.
असेच छान छान लिहित रहा..
(विज्ञानप्रेमी) सागर
साध्या सोप्या आणि सरळ भाषेत मांडलेला ग्रासरुट लेव्हलवरचा "विज्ञान दिन" आवडला ...
पहिल्या भागात "कम्युनिकेशन गॅप आणि सरकारी यंत्रणा" ह्याचे मस्त वर्णन केले आहेस ...
खरी मज्जा आहे ती दुसर्या भागात, ग्रामीण अथवा निम्नशहरी भागातील लहान मुले आपल्या आसपासच्या परिस्थीतीशी सांगड घालुन विज्ञानाच्या मदतीने आपल्या समस्या आपणच कशा सोडवायच्या ह्याचे प्रयत्न करताना दिसतात. त्यासाठी विज्ञान दिन अथवा प्रदर्शन वगैरे एक चांगला मंच आहे. इथे त्यांना प्रोत्साहन मिलायलाच हवे ...
त्यांनी चंद्रावर स्वारी करण्यापेक्षा आधी निम्नशहरी भागातले लोडशेडिंग ६ तासावरुन २ तासावर कसे येईल ह्याचा विचार करणे योग्य आणि तेच स्वागतार्ह्य ...
उत्तम ओळख करुन दिलीस ह्या प्रयत्नांची ...
अगदी रहावलं नाही म्हणुन सांगतो की शक्य तितके अशा प्रदर्शनांना व स्पर्धेला हजरी लाऊन त्यांचे कौतुक करणे महत्वाचे. कारण आजच्या मोठ्ठ्यामोठ्ठ्या "संशोधन आणि विकास" मधल्या जिनीयसना सुचणार नाही अशा आयडीया काही वेळा ह्या ग्रासरुटमधुन येतात असा अनुभव आहे. त्यांना प्रोत्साहन हे हवेच अन्यथा ह्या भावना कोमेजुन जातील ...
मस्त लेख, अभिनंदन ...!!!
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
लेख अतिशय आवडला. एकदम मनमोकळ्या गप्पा गुंफल्या आहेत.
बाईंचा आजवरचा सर्वात उत्तम लेख.
एन.सी.आर.ए. नेहमीचे काम, २८ फेब्रु विज्ञान दिन का म्हणतात, होय होय म्हणता म्हणता नाय नाय चालणारी देशी इश्टाईलचा कारभार. लहान मुलांनी केलेले विज्ञान प्रकल्प, वीजेच्या अभावातील जग,... क्या बात है. केवढी माहीती!
लेख अतिशय आवडला.
अतिशय सुंदर लेख आणि अनुभव चित्रण.
आधी आलेल्या कडवट अनुभवांचा कोणताही खेद न मानता, लहान मुलांमधे मिसळुन त्यांनी काय केले आहे हे पहाण्याची उत्सुकता निश्वितच अनुकरणीय आहे. त्याचबरोबर, ज्ञान हे भाषेमधे बंदिस्त नसते, भाषेचा त्याला अडसर नसतो हा संदेश अतिशय प्रगल्भतेने त्याचबरोबर योग्य जागी पोहोचेल अशा शब्दांत मांडलेले आहे.
आपल्याकडुन खरे तर खगोलशास्त्रासंबंधी अधिक लेखांची आम्हाला अपेक्षा आहे. अर्थातच, आपले कामाचे स्वरुप, त्यासाठी द्यावा लागणारा वेळ, यासर्वांची सांगड घालतांना अशा पद्धतीच्या लेखांसाठी आवश्यक असणारा निवांतपणा मिळणे कठीण असले, तरी महिन्याला एक लेख अशी क्षुल्लक मागणी फार होणार नाही असे वाटते.
पुनश्च एकवार अभिनंदन!!
--अवलिया
आधी शहरातील संस्थांमध्ये विज्ञानदिनाच्या कार्यक्रमाचा आलेला अनुभव आणि त्या पार्श्वभूमीवर खेड्यातल्या शाळेतल्या मुलांनी दाखवलेला उत्साह यांचे सुंदर चित्रण केले आहे. कागदाचा लगदा किंवा माठाचा सदुपयोग वगैरे प्रयोग पन्नास वर्षापूर्वी आमच्या लहानपणी करून लोकांना दाखवले जात होते . त्या काळातसुद्धा गामीण भागात वीजटंचाई होती. घरोघरी रॉकेलचे कंदील असायचेच . त्यामुळे सायकलच्या डायनॅमोच्या उपयोगापेक्षा कंदीलाचा वापर करणे अधिक सोपे वाटले असते.
आपल्यावर आलेल्या अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न करावा असे लहान मुलांना वाटणे हे प्रयोगातल्या तपशीलापेक्षा सर्वात जास्त महत्वाचे आहे.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
विज्ञानदिनी खेड्यातील विद्यार्थ्यांचे प्रयोग आणि त्याचं वर्णन वाचून पाबळच्या विज्ञानाश्रमाची आठवण झाली.
तिथे असे सगळे प्रयोग आहेतच पण त्यांचा उपयोग रोजच्या जिवनातसुद्धा पाबळच्या आणि आसपासच्या खेड्यांतील मुलंमुली इतक्या सहजपणे करतात की बघून थक्क व्हायला होतं.
उगीच आपण शाळा-कालेजात जाऊन डिग्र्या मिळवतो असं वाटतं.
वा छान.. आता रेग्युलर लिहायला लागा बाई.
बादली ब्युरेटचा प्रयोग म्हणजे त्याच्यामागचा विचार आणि त्याची हाताळणी खूप आवडली...
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
खतरनाक लेख आहे आदिती.
फार शब्द न वापरता किंवा फुकाचे निष्कर्ष न काढता तू जे काही झणझणीत अंजन डोळ्यांत घातलं आहेस, त्याला तोड नाही. तुमच्या ऑफिसात कितीतरी लहान मुलं सहलीकरता म्हणूनही येत असतील ना? अशा पाहुण्यांच्या भेटी, काही अंतर्गत राजकारणं, काही सर्जनशीलतेनं आणि अगदी प्रतिकूल परिस्थितीत विलक्षण काम करणारी माणसं या सगळ्यांबद्दल लिही ना. आपल्या प्रगत आणि आधुनिक वैज्ञानिक भारतातल्या अशा संस्थांमधे काय काय चालतं, ते तरी आम्हांला कळेल.
आपल्या प्रगत आणि आधुनिक वैज्ञानिक भारतातल्या अशा संस्थांमधे काय काय चालतं, ते तरी आम्हांला कळेल.
त्यांना सुखानं नोकरी करूद्यात की... :)
अवांतर : लेख खूप छान झाला आहे...
अभिनिवेशाचा अभाव भावला. हुश्श
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
अगदी छान लेख!
लहान वयात या मुलांना किती समजतय!
कुठलाही प्रयोग सादर करताना आपण तोच प्रयोग का करतोय या मागचं भान असलेलं
दिसतं (प्रयोग समजावून सांगताना लगेच कळतं समोरच्याला).
हे सगळ्यात आवडलं. ते योग्य भाषेत आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल आभार!
रेवती
लेख आवडला .. कानात-डोळ्यात शिरले नाही हा शब्दछल मस्त :)
मुलांचे कौतूक .. आणि पुढल्या वर्षी साध्या सोप्या मराठीत चांगले तक्ते बनवण्यासाठी शुभेच्छा !
-- लिखाळ.
लेख आवडला.
लहानग्यांची कल्पनाशक्ती भन्नाट असते. फक्त त्यांना योग्य संधी आणि उत्तेजन देणे महत्वाचे असते.
ह्या बाल वैज्ञानिकांमधूनच उद्याचा एखादा नोबेल पारितिषिक विजेता उदयाला येईल.
अजून असेच लेखन येऊ दे.
पाणीटंचाई, वीजटंचाई आणि गरिबीच्या भीषण दुष्काळाशी सामना करुनही विज्ञानाची आच जितीजागती ठेवणार्या संशोधक मुलामुलींची कहाणी आमच्यासमोर मांडणार्या तुझ्यातल्या कट्टर संशोधिकेला सलाम!!
समाजाच्या विषण्ण करणार्या अनास्थेने किती बुद्धिमान कळ्या उमलतानाच खुडल्या जात असतील ह्याची गणतीच नाही!! फार वाईट वाटतं असं काही वाचून.
माझ्यासमोरचे प्रश्न हे प्रश्नच नव्हेत असं आता मला वाटायला लागलंय! :(
चतुरंग
चतुरंग यांनी अगदी नेमक्या शब्दात माझ्याच भावना व्यक्त केल्या आहेत. मला हेच म्हणायचे होते.
तू जे काम केलेस त्या अनुभवाचा , त्या भागातल्या मुलांकरता थोडा अधिक उपयोग कसा करून घेता येईल ? शाळेतल्या या मुलांकरता इतर काही योजना तुझ्याकडे आहेत का ? तशा प्रकारची योजना इथे मांडता येईल का ?
उत्तम लेख. सुंदर मांडणी. तुझ्या नेहमीच्या शैलीत आहे.
या मुलांची प्रोजेक्ट्स पाहून आपण किती वेगळ्या जगात रहातो ते लक्षात आलं.
भेदक सत्य / वास्तव. आणि दुर्दैव म्हणजे, आपल्यापैकी प्रत्येक जण याचा विचार न करता आपली चौकट दुसर्याला लावून मत प्रदर्शन करतो.
तू जास्त लिहित नाहीस हे आमचे दुर्दैव, अजून काय....
बिपिन कार्यकर्ते
खुप छान लेख आहे अदिती...असाच अनुभव मी मागे एकदा मलकापुरला गेलेलो असतांना आला. म्हणजे मी परिक्षक नव्हतो, पण अमेरिकेहुन (!) आलेलो असल्यामुळे 'ऑलमोस्ट' परिक्षक होतो. B) तेव्हाही त्या मुलांनी केलेले प्रयोग, 'टाकाऊतुन टिकाऊ', ते समजावतांना त्यांचा असलेला आत्मविश्वास बघुन थक्क व्हायला झालं होतं!
वृत्तांत आवडला.
गावातील सामान्य गरजा व अडचणी काय असतात व अशा प्रयोगातून त्या कशा सोडवता येतात हे मुलांना कळणे फार महत्वाचे आहे.
एक प्रश्न- अशा विज्ञान प्रयोगाचे विषय कोण ठरवतं?
लेख आवडला.
तरी गावाकडचे विज्ञान कडुनिंब, माठाचा फ्रिज, सायकलची बॅटरी इथेच थांबले आहे हे पाहून वाईटही वाटले. वीसेक वर्षांपूर्वी मी शाळेत असताना विज्ञान आणि गणित शिकले तेव्हाचे प्रयोग असेच होते.
प्रतिक्रिया
फार छान!
मस्त आहे लेख.
"परत हे
लेख आवडला.
मस्त
मस्त
असच म्हणतो.
छान लेख.
छान लेख.
वा सुंदर
छान !
खूपच सुंदर... साक्षात समोर घडल्यासारखा वाटला..
सुंदर लेख ...
सुंदर
सुरेख !!!!!
सुंदर लेख
आवडला
छान लेख
वा छान.. आता
कंत्राटी
अदिती,
खतरनाक लेख
आपल्या
अभिनिवेशा
लेख चांगला झाला आहे
अगदी छान
असेच म्हणते
हेच म्हणते..
लेख आवडला ..
मस्त!
मस्त
जबरदस्त लेख अदिती!!
पाणीटंचाई,
+१
उत्तम लेख.
मुलांचे कल्पक प्रकल्प
उत्तम!!
अप्रतिम!!
फारच छान
उत्तम...
वृत्तांत
छान
लेख
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी