Skip to main content

मोदीप्रेम आणि मोदीद्वेष: -१०० ते +१००

लेखक arunjoshi123 यांनी शुक्रवार, 06/10/2017 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, तुमच्या मते तुमची आणि मिपावरच्या इतर आयडींची मोदीभावना काय आहे? याच्या सर्व्हेमधे जर तुम्हाला रस असेल तर सहभागी व्हा. शून्यापेक्षा जास्त ते १०० = चढती चांगली भावना. शून्यापेक्षा कमी ते -१०० = चढती वाईट भावना. इथे चांगली आणि वाईट हे शब्द पात्रता, चांगुलपणा, नशीब, क्षमता, इ इ अनेक गुण आणि तसलेच अवगुण अशा अर्थाने आहेत. ============================ अर्थातच लोकांचं मत नेहमी तेच नसतं. शिवाय प्रत्येक मुद्द्याबद्दल तेच नसतं. प्रत्येक मुद्द्याचं महत्त्व तेच नसतं. कोणाला हे रिलेटीव नजरेने पाहायचं असेल, कोणाला संदर्भ पाहायचे असतील, कोणाला देशाचं पडलं असेल, कोणाला संकुचित अस्मितांचं पडलं असेल, कोणाला काही दूरगामी बाबी आवडत असतील. तर मोदी आहेत, असतील, पंतप्रधान झालेत, होतील, काही करताहेत, काही करत नाहीयेत, खरे आहेत, खोटे आहेत, सच्चे आहेत, नाटकी आहेत, सक्षम आहेत, अक्षम आहेत, असायला पाहिजेत, असायला नको होते, इ इ अनेक विचार असणार. या सर्वांचं एकत्रीकरण करून, गेल्या ७० वर्षांत जे पंतप्रधान होऊन गेले आणि येत्या १०-१५ वर्षांत जे होतील (मोदी राजकारणात असेपर्यंत), त्यांच्या तुलनेत वा अशी काही तुलना न करता, -१०० ते १०० पैकी किती मार्क द्यावे वाटते? =================================== तुम्ही तुमचे मार्क्स या धाग्यात बदलू शकता, एकदा दिलेले मार्क्स लढवायची फार आवश्यकता नाही. वाटल्यास स्पष्टीकरण देऊ शकता. एखाद्या व्यक्तिमत्त्वाच्या एकूणत्वात त्या त्या संदर्भात तुम्हाला काय महत्त्वाचं वाटतं हे तुम्ही कसं ठरवता हे तुम्ही सांगाल तर उत्तमच. ========================= रेंजच्या बाहेरची उत्तरे बाद. अग्राह्य. ============================================= ज्यांचे उत्तर ० नाही ते लोक देखिल संतुलित मानण्यात येतील. असल्यास. ==================================== लेखात तुम्ही मार्क दिले मंजे तुम्ही मत देणार असं मानलं जाणार नाही. त्याचा संदर्भ वेगळा असू शकतो. ============================ व्यक्तिशः मला लोक जेव्हा एखाद्या सार्वजनिक व्यक्तिस "खोटा तो खोटा" वा "खरा तो खराच" हे कसे, कधीपासून, का मानायला चालू करतात यात रुची आहे.

वाचने 24647
प्रतिक्रिया 91

प्रतिक्रिया

1) जवाहर लाल नेहरू : +100 (आधुनिक भारताचे जनक,शेणापासून अणूयुगाकडे नेणारे,सामान्य चहावाला सुद्धा प्रधानमंत्री होऊ शकेल इतकी सक्षम लोकशाही बनवणारे ) 2) गुलझारीलाल नंदा : ०० 3) लाल बहादुर शास्त्री : +२५ 4) इंदिरा गांधी : +७५ (-२५ आणीबाणी आणि शास्त्री गव्हर्नमेंट मध्ये हस्तक्षेप ) 5) मोरारजी देसाई : -१०० 6) चरण सिंह : +२० ( + २० स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग व शेतकरी नेते ) 7) राजीव गांधी : +५० (+५० दृष्टा नेता ,माहिती तंत्रज्ञान क्रांती , -५० शाहबानो , लिट्टे,बोफोर्स) 8) वी. पी. सिंह : +२०(-८० मंडल कमिशन ) 9) चंद्र शेखर : -५० 10) पी. वी. नरसिम्हा राव : ७५ (इकॉनॉमिक रिफॉर्म्स ) 11) अटल बिहारी वाजपेयी : -२० (मशीद पाडून आलेले सरकार ,पोखरण मुळे आर्थिक निर्बंध ओढवून घेतले,चान्गले रस्ते ) 12) एच. डी. देवेगौडा : - १०० 13) इंदर कुमार गुजराल : -१०० 14) मनमोहन सिंह : युपीए १ +५० , यूपीए २ -५० 15) नरेंद्र मोदी : +४० (- जी एस टी ,नोटबंदी ,फेकाफेक,महागाई,GDP , + एकहाती निर्णय घेण्याची क्षमता, काश्मीर पॉलिसी,फॉरेन पॉलिसी,अजून शिल्लक असलेली २ वर्षे )

चौकटराजा,
दोन हजार वर्षात राजे लोकांनी स्वतः चे मोठमोठे महाल बांधण्याखेरीज काय केले
जगात कुठली संस्कृती दोन हजार वर्षं टिकून राहिली आहे? एक चीनी सोडल्यास दुसरी कुठलीच नाही. भारत ही सुवर्णभूमी होती हे परदेशी प्रवाशांनी लिहिलेलं आहे. आ.न., -गा.पै.

मोदी + १०० कायप्पावरून – मी खूपच निराश झालो होतो, हताश झालो होतो. कोणीच मला भाव देत नसे रस्त्यावरचा कुत्रासुद्धा मला विचारात न्हवता. ""कशातच मला कर्तृत्व दाखवता येत न्हवत ....."" : : : : मग मी चौकात उभा राहून मोठयाने ओरडलो - ""मोदीने देशाची वाट लावलीय, देश विकायला काढलाय”" : : : : प्रत्येक ग्रुपवर मोदींविरोधात मेसेज (स्वतः ला न कळलेले/ पूर्ण न वाचलेले देखील) फॉरवर्ड करू लागलो. आज प्रत्येक वाहिनी आणि वृत्तपत्र मला ""परखड, अभ्यासू, राजकीय विश्लेषक आणि आलम दुनियेतील कोणत्याही विषयाचा तज्ज्ञ"" म्हणून बोलावतात

In reply to by आकाश कंदील

मी खूपच निराश झालो होतो, हताश झालो होतो. कोणीच मला भाव देत नसे रस्त्यावरचा कुत्रासुद्धा मला विचारात न्हवता. परफेक्ट! याची प्रत्यक्ष उदाहरणे म्हणजे शत्रुघ्न सिन्हा, यशवंत सिन्हा, अरूण शौरी . . .

अमेरिकन अर्थतज्ज्ञ रिचर्ड थेलर यांना अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर आहे. त्यांनी मागील वर्षी भारतातील निश्चलीकरणाचे समर्थन केले होते. अमेरिकेच्या दबावामुळे मोदींनी नोटाबंदी केली हे आता निर्विवाद सिद्ध झाले आहे.

In reply to by शब्दबम्बाळ

बरोबर. परंतु या दोघांची तुलना अप्रस्तुत आहे. थेलर यांचा भारताचा तसा काही संबंध नाही किंवा त्यांचे भारतात काही हितसंबंधही गुंतलेले नाहीत. त्यामुळे एक निष्पक्ष अर्थतज्ज्ञ या भूमिकेतून ते या निर्णयाचा विचार करू शकतात. मात्र अमर्त्य सेन यांच्याबाबतीत असे म्हणता येणार नाही. एकतर ते भारतीय असल्याने त्यांची स्वतःची एक ठाम विचारसरणी आहे व ती डावी विचारसरणी आहे. दुसरं म्हणजे २०१५ मध्ये त्यांची नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची पहिली ३ वर्षांची टर्म संपल्यानंतर त्यांना इच्छा असूनसुद्धा दुसरी टर्म मिळाली नाही (त्यावेळी त्यांचे वय ८१ होते). त्यामुळे तसेही ते मोदींवर खार खाऊन होते. त्यामुळे त्यांचे मत निष्पक्ष मानता येणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

>>>अमेरिकेच्या दबावामुळे मोदींनी नोटाबंदी केली हे आता निर्विवाद सिद्ध झाले आहे. कसे? आणि काय रेफरंस आहे याचा? इधरभी तुम उधरभी तुम खेळताय काय?

In reply to by मोदक

उपरोध आहे म्हणुनच रेफरंस मागितला आहे. नसेल तर त्या वाक्याला कुचाळक्या या पलीकडे किंमत उरत नाही. बाकी चालूद्या.

In reply to by श्रीगुरुजी

>>>त्यांनी मागील वर्षी भारतातील निश्चलीकरणाचे समर्थन केले होते. त्यांच्या आणि राजन यांच्या मतात फरक असेल तर याविषयी अधिक वाचायला नक्की आवडेल. काही दुवा वगैरे उपलब्ध आहे का त्यांच्या लेखाचा?

अर्थव्यवस्था कॅशलेस कडे जाण्यासाठी ते मोठ्या नोटांना विरोध सुचवतात. तसेच त्यामुळे भ्रष्टाचार कमी होतो असे त्यांचे म्हणणे आहे. थोडक्यात पाठिंबा व विरोध दोन्हीही आहे ५०,१०० व २०० च्या नोटा भरपूर छापून झाल्यावर व वितरण व्यवस्था व्यवस्थित स्थापीत झाल्यावर २००० च्या नोटा रद्द होऊ शकतात. तसेच छोट्या नोटांचा व्यवस्थित पुरवढा असेल तर मागील वर्षीच्या चूका टाळता येतील. असे झाले तर मात्र त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे असे म्हणता येईल.

In reply to by शाम भागवत

अगदी थोडक्यात सांगायचे झाल्यास भष्टाचारी, निवडणूकात पैशाचा उपयोग करणारे राजकारणी, अतिरेकी, गुन्हेगार, काळाबाजारवाले, हवालावाले यांना मोठ्या नोटांबद्दल काय वाटते त्याचा अभ्यास करून त्या ठेवायच्या की नाहीत हे ठरवणे. त्यांना जर त्या हव्या असतील तर त्या रद्द करणे. तसेच या लोकांना १०, २०, ५०, १००, २०० वद्दल काय वाटते हे लक्षात घेणे. त्यांना त्या त्रासदायक वाटत असतील तर त्यांचे प्रमाण वाढवणे.

नानबा,
कुठलाही समाज स्वायत्त असतो तेव्हा वेगळ्या सोन्याच्या धुराची गरज नसते.
काय बोललात. समाज स्वायत्त असणे ही नव्या युगाच्या भाषेत अधोगती आहे. सगळ्यांना सगळं जग एकमेकांना जोडलं गेलेलं बघायचंय. ही जोडणी करतांना आर्थिक स्वायत्ततेचा बळी द्यायलाच हवा का, यावर काहीच विचारमंथन होत नाही. आ.न., -गा.पै.

नेहरु 80 इंदिरा गांधि 70 राजिव गांधि 80 अटलबिहारी वाजपेयी 5 व्हि पि सिंग १०० नरेंद्र मोदी 5

नेहरु ९० इंदिरा गांधि ९० राजिव गांधि ९० अटलबिहारी वाजपेयी ३ व्हि पि सिंग ८० मनमोहन ९० नरेंद्र मोदी ( १५ लाख दिले तर ९० नाहीतर ० )

मनमोहन ९० नरेंद्र मोदी ( १५ लाख दिले तर ९० नाहीतर ० ) जबरदस्त न्याय मोगा !! ज्याच्या का ळात देशातला काळा पैसा बाहेर गेला त्याला ९० मार्क ज्याने हा बाहेर गेलेला काळा पैसा परत आणण्याचा निर्धार केला त्याला ० मार्क ? १५ लाख फुकटचे मिळणार म्हणुन गेले ४ वर्ष लाळ टपकत आहे ह्याचा अर्थ खालिल गोष्टी तुम्हाला मान्य आहे !! १. बराच पैसा बाहेरर्च्या देशात गेलेला आहे २. सध्याच सरकार बाहेत गेलेला पैसा परत आणण्याचा प्रयत्न करत आहे

नेहरु 70 इंदिरा गांधी 40 राजिव गांधी 30 अटलबिहारी वाजपेयी 80 व्हि पि सिंग हे कोण??? ओळखत नाही. मनमोहन 10 नरेंद्र मोदी 50

जवळजवळ प्रत्येक प्रतिसादकाने सर्वच पक्षांच्या पंतप्रधानांना कमीअधिक मार्क्स दिले आहेत. तेव्हा जालावर दिसते तितकी कट्टरता नसावी.