राजकारण आणि आपण !
हल्ली शेकडा ९९% पेपर आणि वृत्तवाहिन्यांवर केवळ आणि केवळ राजकारणाशी संबंधित बातम्यांचा रतीब पहायला मिळतो. पेपरात पहिलं पान राजकारण . . . टीव्हीवर बातम्या लावल्या की राजकारण . . . . अतिरेक झालाय असं नाही का वाटत ? मी तर अतिशय उबगलोय बुवा . . . राजकारण हा जीवनाचा एक भाग असू शकतो पण तो इतका महत्वाचा आहे का की त्याचा इतका उदो उदो करावा ? जो प्रकार भारतात क्रिकेटचा तोच देशाच्या राजकारणाचा . . . . गाव पातळी, तालुका पातळी, जिल्हा पातळी, राज्य पातळी, देश पातळी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणारं राजकारण हेच सामान्य माणसाचं आयुष्य आहे का ? ते सोडून दुसरं काही महत्वाचं नसतं का ? राजकारणाचा नक्की उगम केव्हा आणि कशासाठी झाला असावा ?
काही लोकांना नाही समजत ह्या घडामोडी आणि त्यांचं महत्व . . . . मग ते जगात रहायच्या योग्यतेचे नाहीत का ? मागे कोणी कोणाला कसा शह दिला आणि काय घडलं ह्या वायफळ गोष्टी आपल्या आधीच कमी साठवणूक क्षमता असलेल्या मेंदूत साठवून ठेवून वेळी अवेळी दुसऱ्या माणसाच्या तोंडावर घडाघडा बोलता आलं म्हणजे आपण काही फार मोठा तीर मारला असं काही असतं का ? मिठाने जेवण चविष्ट होतं म्हणून कोणी मिठाचीच भाजी आमटी करुन खात नाही तसंच राजकारण नाही का ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मला तर वाटते मीडियामध्ये केवळ
मानव समाजशील प्राणी आहे,
हे मात्र खरं आहे.आजकाल ३ c
सहमत
बाकी, कुक्कुटशर्विलक
पूर्वी कसं होतं
खरं आहे बोकोबा
+१
खर आहे
"पेपरवाले सध्याच्या सरकारच्या
+111111
मी काय म्हणतो...
खरय! जळी स्थळी काष्ठी पाषाणी
मुलींना राजकारण आणि क्रिकेट समजत नाही?
लँगर
लँगर बाईंना काय बोलायचं काम
लँगर बाईंना काय बोलायचं काम नाय ! बेष्ट हैत !प्राडॉ वेगळा पुरूष विभाग यासाठी मागत होते तर..बरखा दत्त आणि मायंती लँगर
बरखा दत्त?? ती नक्की बाई आहे
डाउट का यावा?
बघा की राव, आजकाल साहित्य,
व्हॉट्सअॅप चाणक्य उवाच . . .