Skip to main content

"अशा का वागतात काही मुली?"

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 31/07/2017 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच एका 'फक्त प्रौढांसाठी' असणार्‍या WhatsApp ग्रुपवर(आता कुठला ग्रुप ते इथं नका विचारु!)एका वेगळ्या विषयावर चर्चा झाली.यात काही मिपाकरही होते. तर चर्चेचा विषय असा होता की 'तशा प्रकारच्या व्हिडिओजपैकी,काही व्हिडिओज हे मुलींना फसवून त्यांच्याच मित्राकडून नंतर डिलीट करण्याच्या वायद्याने काढले जातात.अर्थातच असं काही होत नाही.मैत्रिणीच्या आपल्यावर असलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन हे व्हिडिओज संकेतस्थळांवर लिक केले जातात. यात एका सदस्यांनी असा मुद्दा मांडला की "या मुलींना कळत कसं नाही? बॉयफ्रेंडच्या नको त्या मागण्यांना या मुली बळी कशा पडतात? यामुळे आपलं आयुष्य पणाला लागू शकतं हे या मुलींना का कळत नसावं? या फसवणूकीला जशा मुली जबाबदार आहेत तशीच त्यांना फसवणारे त्यांचे बॉयफ्रेंडही तेवढेच जबाबदार आहेत.पण आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत यातून सर्वात जास्त त्रास हा मुलींनाच होतो.भोगावं त्यांना लागतं.घरातल्यांची नाचक्की होते ती वेगळीच! अशा प्रकारचे व्हिडिओज चोरुनही काढले जातात.पण हा प्रकार घडतो केव्हा? जेव्हा ती मुलगी अशा प्रकारे मित्राच्या खुशीसाठी संमती देते तेव्हा! मग प्रश्न असा येतो की या मुली का तयार होतात अशा प्रकारांना? का ठामपणे नकार देऊ शकत नाहीत?बरं हा प्रकार अल्पशिक्षित मुलींबरोबर,खेड्यातच घडतो असं नाही अगदी शिकलेल्या शहरी मुलीही याला बळी पडतात. बरं हे असे लबाड लांडगेच या मुलींना आवडतात.त्यांचं स्टायलिश वागणं,कपडे,गाडी हेही जोडीला असतं. पण एखाद्या साध्या सरळ मुलानं यांना प्रपोज केलं की, "मी तुला किती चांगला समजत होते.तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती!" असं उत्तर मिळतं. मुली किती लेवलपर्यंत जाऊन माती खाऊ शकतात याचं एक उदाहरण पाहण्यात आहे. ही मुलगी BE Electronics चांगल्या मार्कांनी पासआऊट होती.एके ठिकाणचा कामाचा चांगला अनुभव होता.त्यानंतर आमच्या कंपनीत आली.इथे आधीपासूनच एक मुलगा टेस्टींगसाठी होता.याचं त्याच्या कॉलेजमधल्या दुसर्‍या एका मुलीबरोबर अफेअर होतं.तिच्याचबरोबर लग्नही ठरलं होतं.भावी बायकोबरोबर सगळे उद्योग करुन झाले होते. ही कंपनीत आलेली मुलगी त्याने पाहिली.हीला मी पटवणारंच असं म्हणून प्रयत्न सुरु केले.तिचा पाठलाग करणे वगैरे प्रकार सुरु झाले.ती आणि तिची मैत्रीण दोघी एकत्रच घरी जायच्या अॅक्टीवावरुन.सुरुवातीला ही मुलगी आपण भलं आपलं काम भलं अशी होती. हीच्या जोडीदार मैत्रिणीचे विचार म्हणजे प्रेमात पडायचं,नवर्‍याचा स्वभाव आधीपासून माहित असलेला चांगला अशा टाईपचे.तिच्या संगतीने हीचेही तसेच विचार.(अर्थात असे विचार काही गैर नाहीत) पण तसा कोणी हीच्या जिवनात नव्हता.मग ह्या ठोंब्याचे प्रयत्न सुरु होतेच.आणि वाढले.तिच्या शिव्या खाऊन,अपमान होऊनही पिच्छा सोडत नव्हता.ती बोलली नाही की हा डबा खायचा नाही. आता हीची ही जोडीदारीण हे सर्व प्रकार पाहत होती.तिने सुचवलं अगं एवढा मागं लागलाय तर नाही का म्हणतेस? प्रेमविवाह करायचा असं ठरलंय ना आपलं? दे त्याला रिस्पॉन्स! डिपार्टमेंटमधल्या काही लोकांनी त्या मुलाबद्दल सांगितलं तरीही ती बदलली नाही. स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याची मुळातच अक्कल नसल्याने तिने या मुलाला होकार दिला.तिला याचं लग्न ठरलंय हेही माहित होतं.तरीही मी निर्णय बदलायला लावीन असा विश्वास.दोघंही वाहवत गेले.सगळे "उद्योग" करुन झाले.यानं त्याचे फोटोही काढून ठेवले. या मुलीच्या घरी ती या नालायकाबरोबर बोलत असताना बापानं पकडलं.झोडपून काढलं पण लग्न करीन तर याच्याबरोबरचं म्हटल्यावर बापानं मुंबईचं एक स्थळ काढलं.तो मुलगा स्वभावानं कसा आहे वगैरे न पाहता जबरदस्तीनं लग्न लावून दिलं. या ठोंब्याच्या होणार्‍या बायकोलाही आपला होणारा नवरा इतका नालायक आहे हे माहित होतं तरीही गावभर फिरल्याने सगळीकडे प्रसिध्दी झाली होती.मग तिच्याबरोबर याचं लग्नही झालं. या एका प्रसंगात एक नव्हे तर चक्क तीन पूर्ण बिंडोक मुली पाहिल्या.त्या पण शिकलेल्या,इंजिनियर मुली. अजून एका सदस्यांनी असाच प्रेमज्वराचा अनुभव सांगितला.तो त्यांच्याच शब्दात. "आमच्या मित्राला ३ बहीणी आहेत... त्यातली ही दुसरी! दिसायला फार सुंदर. तीचं आणि एका मुलाचं प्रेम साधारण ८वी ते ९ वीच्या दरम्यान जुळलं.. ती त्याच्यापेक्षा ६ महिन्याने मोठी... १२ वी नंतर त्या दोघांमध्ये खूप जवळीक झाली... ती मुलगी, तिची लहान बहीण आणि आजी गावी तर बाकी मुंबईला होते.. तो मुलगा दररोज त्या मुलीच्या रात्री १२ च्या नंतर घरी यायचा... तो मुलगा गावात बहिणीकडे राहायला होत म्हणून गावात रात्री मुलांच्या कट्ट्यावर येत असे... त्यामुळे संशय ही कोण घेत नसे... एखादा सापडला.. गुरालाही मारत नसतील एवढा बेदम मारला... त्या मुलीला दोन ठेवून दिलेल्या... पण घरी सांगितलं नाही... वाटलं सुधारेल... पण परत ६ महिन्यांनी ह्यांचे प्रकरण चालू... अाख्या गावभर झालं.. तरी ती मुलगी बेफिकर... शेवटी घरच्यांना समजलं... एकदा माझे मित्र आणि आम्ही काही जणांनी बाहेर पकडलं त्यांना.... त्या मुलीला ही बेदम मारलं... मुलाचा हात मोडेपर्यंत मारलं.. पण ती एवढी बेफिकीर की करीन तर हाच.. दोघानी ही २१ पार केल होतं.. तिला फार समजावलं पण ऐकेनाच... पळून जाऊ नये म्हणून मग लग्न लावायचा विचार केला... आम्ही सांगून टाकलं लग्नानंतर परत तोंड नाही दाखवायचं ती उलट बोलली तुमच्या सारख्या सैतानांकडे मला यायचं ही नाही. त्या मुलाची परिस्थिती फार बिकट... अगोदरच बहिणीकडे शिकायला... राहतं दोन खणांचं कौलारू घर.. १० ते १२ गुंठे जमीन, अर्धवट शिक्षण म्हणून नोकरी नाही,आईवडील गावात एकाकडे स्ट्रॉबेरीच्या मळ्यात कोणाकडेतरी रोजंदारीवर जायचे. आणि मुलीचे वडील मातब्बर, भाऊ सॉफ्टवेअर मध्ये, मोठी बहीण पण जॉबला... परिस्थिती ने तर जहागिरदार.. देखणेपणावरती तर त्या मुलीला कुणीही पसंत केलं असतं. तिला इतके बोलूनही ती ऐकेना... समजावणार्‍यांनाच शिव्या द्यायची!.. शेवटी भातुकलीच्या खेळासारखं त्या बाहुला बाहुलीच लग्न(सगळ्यांच्या तोंडात हेच) मंदिरात लावून दिलं. आता वर्ष झालं असेल मुलगा कुठंतरी दुकानात जॉब करतो... परिस्थिती बिकट म्हणून तीही आता सासू बरोबर मजुरी करते.... कुठं ते राजकुमारीच जगणं आणि कुठं आता काबाडकष्ट! एकदा तिच्या नवऱ्या बरोबर नाश्ता करताना हॉटेल मध्ये भेटली... अक्षरशः रडली, वडील अाणि भाऊ बोलत नाहीत घरात येऊ देत नाहीत...मला मध्यस्ती कर म्हणून सांगत होती... विचारलं तिलाच शिव्या देताना थोडा का विचार केला नाहीस..??? तो पोरगा काहीच बोलला नाही.. बडवलेला म्हणून! (सैराटचीच कथा फुलवल्यासारखी वाटेल पण हे खरं आहे.) म्हणजे वास्तव समोर आलं की मग विचार करतात... पण त्याअगोदर केला असता तर ही वेळ अाली नसती. कुठे चुकतं या मुलींचं? विश्वास ठेवण्यायोग्य माणूस त्यांना अोळखता येत नाही की प्रेमात पडल्यावर मेंदूत काही रासायनिक बदल होतात? की कशाची भितीच वाटत नाही यांना? अशा का वागतात काही मुली?

वाचने 97857
प्रतिक्रिया 278

प्रतिक्रिया

दम लागला ब्वॉ ! एवढे प्रतिसाद वाचून. काल मी एक प्रतिसाद टाईपला होता पण तो मिपावरुन गायब झाला. असो. १. मुलगा / मुलगी प्रेमविवाह करण्याचे स्वप्न बघत असेल आणि काही कारणांस्तव पालकांस मंजुर नसेल तर हरप्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा. थर्ड पार्टिलाही बोलावून समजून सांगावे. त्यांची बाजू ऐकून घ्यावी. पुढील येऊ शकणार्‍या अडचणींची कल्पना द्यावी. आपल्या मुला / मुलीस प्रसंगी दोन-चार झापडी मारल्यास जास्त वाईट वाटुन घेऊ नये. मात्र हात पाय मोडेस्तोपर्यंत / मरेपर्यंत मारु नये. त्याने काँप्लीकेशन्स वाढतात. थर्ड पार्टीला तर अजिबात मारहाण करु नये. त्याचे / तिचे हातपाय मोडल्यास त्यांचे हगणेमुतणे काढणे, औषधोपचाराचा खर्च त्यांच्या पालकांच्या माथी येतो. कोणीही पालकांना विचारुन प्रेम करत नसल्यामुळे पाल्यांच्या प्रेमाची सजा पालकांस देऊ नये. २. याउप्परही ऐकत नसल्यास जी काशी करायची आहे ती करुन द्यावी. पुढे जाऊन उभयता सुखी झालेच तर झाले गेले विसरुन जाऊन सुखाने नांदावे. पुढे जाऊन बरेवाईट झालेस तर आपल्या मुला / मुलीस अथवा थर्ड पार्टीस 'बघा आम्ही सांगत होतो तेव्हा ऐकले नाही. भोगा आता कर्माची फळे' असे वारंवार सुनवावे. त्यामुळे न मारताच समोरचा अर्धमेला होऊन जातो. तेव्हाच मेलो असतो तर बरे झाले असते असे त्यांना वारंवार वाटते. ३. मुलगा / मुलगी फसली तर प्रेमपुर्वक त्याला परतायची दारे उघडी ठेवावी. न जमल्यास तु आम्हाला नि आम्ही तुला मेलो असे निर्वाणीचे ऐकवून काय तो सोक्षमोक्ष लावून टाकावा. ४. स्वत:च्या अनुभवातुन शिकतो तो माणूस आणि दुसर्‍याच्या अनुभवातुन शिकतो तो हुशार माणूस ! जगात ९५% लोक्स हे पहिल्या प्रकारचे असतात. तेव्हा किती लोड घ्यायचा ते स्वतः ठरवून घ्यावे. ५. सामाजिक जबाबदारी म्हणून दुसर्‍याच्या भावा/ बहिणीच्या मॅटर मधे पडू नका. उद्या तुमच्यावर तीच पाळी आली तर ते तुमच्या मदतीला येतीलच असे नव्हे. तसेही एकदा सुरुवातीचे फुलपंखी दिवस निघून गेल्यावर दोघांनाही आटे-दालचा भाव माहित होते. महंगाई की मार म्हणजे एकदम बेस्ट. आवाज होत नाही. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. दुसर्‍याच्या दु:खात आपले सु:ख सामावले आहे याची जाणिव ठेवा. असो. कोणता पर्याय पटतो तो निवडा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. लाजु नका !

In reply to by धर्मराजमुटके

हे पटलं भाऊ आपल्याले..जवळच्या नात्यातला माणसाच्या भानगडीत पडून हात पोळून घेतले आहेत..तेंव्हापासून प्रेमप्रकरण म्हटलं की 'देव तुमचं भलं करो' असं म्हणून बाजूला होतो...आता भविष्यात माझ्याच मुलीच्या बाबतीत काही घडल्यास लक्ष घालावेच लागेल..त्यासाठी तुमचा प्रतिसाद लक्षात ठेवतो.. बाकी एक वाचलेला किस्सा सांगतो..खरा-खोटा माहिती नाही. एक मुलगी परधर्मीयाच्या प्रेमात पडली. दोघे पळून गेले. पोलिसांनी लगेच कारवाई करून दोघांना आईबापा समोर उभे केले. मुलीनी स्पष्ट सांगितले, लग्न करेल तर याच्याशीच आणि त्याच्या धर्मातील/ घरातील पद्धतीशी जुळवून घेईल. पोलिसाने शक्कल लढविली, म्हणाला एक दिवस तर जुळवून दाखव..बाजारातून मांसाहाराचे सामान आणले आणि मुलीला म्हणाला पूर्ण स्वयंपाक करून दाखव...शाकाहारी घरात वाढलेल्या मुलीने सगळा ताल बघून बापाच्या घरी जाणे पसंद केले.

In reply to by चिनार

जवळच्या नात्यातला माणसाच्या भानगडीत पडून हात पोळून घेतले आहेत>>> ==> आमच्या बंधूंची नोकरी धोक्यात आली होती नात्यातल्या भानगडी पायी. काहीही कारण नसताना. याना काय बोलाय जातंय उदारमतवादी म्हणून. इथेच बघा की धागा लेखकाला म्हंटलं बाबा मारझोडीच्या फंदात पडणे चांगले नाही तर तोच आपल्यावर डाफरतोय. मग म्हंटलं कर बाबा तुला काय करायचं (जोशी बुवा चे वाक्य(तत्व) इथे नाही वापरत) ते. यात आपल्या सारख्या (उदारमतवादी) त्रयस्थाच काय चुकलं? हायला आपण कसे काय उदारमतवादी ह्याची काय टोटल लागेना ...!!

In reply to by विशुमित

मला तर या धाग्यावर काहीच टोटल लागत नाहीये.. १. धागाकर्त्यांनी दोन विषय एकत्र का केले? न्यूड व्हिडीओ आणि घरच्या लोकांच्या विरोधात लग्न हे दोन वेगळे विषय आहेत. २. लोकांना आपले अनुभव सांगावे तर ते आपल्याच अंगावर का येतात? ३. काही लोकं अगम्य भाषेत का लिहितात? धाग्याचा पार केजरू झाला आहे. वास्तविक आजकाल सगळ्याच धाग्यांचा केजरू होतोय..

In reply to by धर्मराजमुटके

धाग्यावर "९६" नवे प्रतिसाद पाहुन अवाक होऊन धागा उघडला, मग अजो दिसले... अजोंचे प्रतिसाद इग्नोर करत शेवटाला यायला वेळ लागला नाही. पण बरं झालं सगळं वाचलं.. हे रत्न त्यामुळेच हाती आलंय! एक नंबर प्रतिसाद धर्मराज भाऊ!! थोडक्यात महत्वाचे काय? तर ते हे आहे.

In reply to by धर्मराजमुटके

धर्मराज मुटके, तुम्ही सांगितलत ते भारी आहे. पण भावकी कधिकधी बेकार असते हो दादा. मनात नसल तरी पडाव लागतं त्यात. मारहाण नको हे कबुल आहे. कुणी सांगाव, उद्या मार खाणारा आपलाच निघायचा. मला वाटत की यात मुलीकडल्यांच आणि मुलाकडल्यांच वेगळवेगळ मत असेल. आपली बाजू कोणती ते पण बघतात लोकं आणि मग ठरवतात - पडतं घ्यायचं का मारायच ते.

In reply to by यशवंत पाटील

एकंदरीतच गावगाड्यात निष्पक्ष राहणे अवघड असते याचा फर्स्ट हँड अनुभव आहे. गावात राहयचं तर कोणत्यातरी एका गोटात / कळपात राहावेच लागते मजबुरी म्हणून. पण त्यात बरेचदा अप्रिय निर्णयांचे समर्थन करावे लागते. मी या सगळ्या गोष्टीपासुन प्रथमपासुन दुर राहतो त्यामुळे गावी गेल्यावर भाऊबंद अतिशहाणा समजतात. पण त्याला इलाज नाही.

लेखाच्या पहिल्या भागावर प्रतिसाद - मुली/मुले यांनी आपापले नग्न/इतर अवस्थेतले फोटो काढणे आणि शेअर करणे हा फक्त आपल्याकडे असलेला प्रॉब्लेम नाही. याची सुरवात पाश्चात्य देशात झालेली दिसते. जसा हा प्रॉब्लेम त्यांच्यासाठी जुना आहे तसेच या बाबतीत तिकडे जनप्रबोधनही मागच्या दशकापासून सुरु आहे. आपल्याकडेही शाळा, कॉलेजेसमधून मुलांना आपले "सार्वजनिक होऊ नये असे वाटणारे" फोटो / व्हिडीओ न काढण्याचा सल्ला दिला पाहिजे.
For the best part of a decade, young women like Erin have been told by police, parents and schools not to take any photographs that they would not want shared with the world
https://www.theguardian.com/australia-news/2016/sep/01/nude-selfies-wha… एका मुलीला तिच्या आईने विचारले - की तू असा फोटो बॉयफ्रेंडला का पाठवला - तर तिने असे उत्तर दिले की "मला वाटले आम्ही प्रेमात आहोत. मला वाटलेच नाही की तो त्या फोटोचा गैरवापर करेल"
When one teenage girl’s picture was shared after she sent it to a boy with whom she was in a long-distance relationship, her mother asked her why she’d sent it. “I thought we were in love,” she said. “I didn’t think he would do anything like that.”
https://www.theguardian.com/society/2015/nov/10/sexting-becoming-the-no… म्हणजे मुलांना प्रेम म्हणजे काय असते हे घरी समजावून दिले पाहिजे आणि कोणावर किती विश्वास ठेवायचा हे पण आधीच घरी शिकवायला पाहिजे. हा विषयच घरी निघाला नाही तर त्यांना तरी कसे समजणार ..

In reply to by अत्रे

म्हणजे मुलांना प्रेम म्हणजे काय असते हे घरी समजावून दिले पाहिजे आणि कोणावर किती विश्वास ठेवायचा हे पण आधीच घरी शिकवायला पाहिजे.
अगदी मनातलं बोललात... पालक आणि मुलांमध्ये सुसंवाद असणं अत्यावश्यक आहे. पण अनेकदा पालकच हि गरज समजून घेत नाहीत, आणि नंतरचे प्रश्न निर्माण होतात.

In reply to by अत्रे

धाग्याच्या पहिल्या भागासाठी हा प्रतिसाद तंतोतंत उपयुक्त आहे. असे फोटो मुलं मुलींना का काढावेसे वाटतात ह्याचे उत्तर मिळाले.

धाग्यातल्या एकाच मुद्द्यावर तेही काही तरी चुकीचे तर्क लावून काहीजणांकडून प्रतिसाद दिले गेले आहेत.अनेकदा मुद्दा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला तरीही चालूच आहे.त्यामुळे थोडं अधिक सुगम,स्पष्ट लिहितो. १] ज्या मुलाला मारहाण झाली ती मी केलेली नाही.माझा त्यात सहभाग नव्हता.त्यात मी होतो असा शोध कृपया लावू नये.ती ग्रुपमधील दुसर्‍या सदस्यांच्या गावी झालेली आहे.या मारहाणीला मी जबाबदार असल्याचं किंवा ती मी केल्याचं कुठेही लिहिलेलं नाही. २] मारहाण करणं अयोग्यच आहे.त्याचं कुठेच समर्थन होऊ शकत नाही.आधी त्या मुलाला समजावलं गेलंही असेल.लोक एवढेपण निष्ठूर नसतात.पण मारहाण कोणत्या परिस्थितीत झाली असावी याचाही अंदाज करता येऊ शकतो.गावातील वजनदार व्यक्तीच्या मुलीचं कोणावर तरी प्रेम बसतं हे कदाचित त्या मातब्बराला सहन झालं नसावं.कितीही राग आला किंवा आपली मुलं कितीही चुकीची वागली तरी तिच्या किंवा प्रियकराच्या अंगाला हातही लावायचा नाही इतका विवेक त्या गावात राहणार्‍या,या प्रसंगामुळे,मुलीच्या हटवादीपणामुळे,रागात असणार्‍या आणि रागातून काहीही करण्याएवढी आणि ते पचवण्याची हिंमत आणि आर्थिक सामर्थ्य असणार्‍या माणसाला सांगायला जाईल कोण? जसं इथं तुम्हाला काय करायचंय जातीय मुलगी तर जाऊदे तुम्ही कोण मधे बोलणारे असं म्हटलं जातंय तसंच माझी मुलगी आहे तू कोण सांगणारा असं म्हणून गावातल्या मध्यस्थी करणार्‍यांनाच मारहाण होईल अशी भिती वाटल्याने कदाचित कोणी मध्यस्थी केली नसेल, आणि कोणी समजुतीनं मध्यस्थी न केल्यामुळे,विवेकवादी मार्ग न दाखवल्यामुळेदेखील त्या मुलाला ही मारहाण झाली असावी. ३] अजून एक चर्चिला गेलेला मुद्दा तो म्हणजे तो मुलगा आर्थिकदृष्ट्या गरीब होता.गरीब असणं हा दोष आहे का? तो मुलगा फक्त गरीब असता तर काही मध्यममार्ग निघालाही असता.पण वर सुरुवातीला विवेचनात दिल्याप्रमाणे या मुलीचे बाकीचे कुटूंबीय दुसर्‍या गावी रहायचे.पण गावात त्यांना फार मान होता.या मुलीच्या आजीकडे या मुलीला शिक्षणासाठी ठेवलं होतं.हा मुलगा बहिणीकडे शिकायला होता.याच गावात.हा त्या मुलीला रात्री १२ च्या दरम्यान भेटायला यायचा.सोबत मित्रालाही पाळत ठेवण्यासाठी घेऊन यायचा.घरात फक्त आजी.आता अशा परिस्थितीत कोणताही गैरप्रकार या मुलीबाबत घडू शकला असता. हा मुलगा कोणत्याही ठिकाणी कामावर टिकत नसे.घरची गरीबी असूनही हा धरसोडपणा काय दाखवतो? शिवाय एवढा विरोध होऊनही लग्न झालयं,आपल्यावर संसाराची थोडीफार जबाबदारी आहे म्हटल्यावर एखाद्याने वर्षभरात स्वभावात बदल करुन परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले असते.पण इथे तेही दिसलं नाही. अजूनही हा मुलगा स्वभावाने,आर्थिक स्थितीने गरीब पण गुणांची खाण असलेला,समजुतदार मुलगा वाटतो का? ती मुलगी या मारहाण करणार्‍या या मित्राला भेटून रडत काय सांगायची तर नवर्‍याला चांगल्या ठिकाणी नोकरीला लावा हे सांगायची.सासुबरोबर शेतात कामाला जायची. याचा अर्थ ती त्या परिस्थितीत खुश होती का? लग्नाचा हा निर्णय तिचा स्वत:चा होता तर ती गावातल्या लोकांना त्या मुलाला सुधारण्यासाठी मध्यस्थी का बरं करायला सांगायची? ४] सर्वात महत्वाचं: धाग्याचा विषय मुली अशा का वागतात? त्या ठामपणे अयोग्य मागणीला नकार का देत नाहीत? किंवा सज्ञान असूनही दिखाव्याला बळी का पडतात असा आहे.त्यावर चर्चा अपेक्षित आहे. मारहाण करणे हा गुन्हा आहे,असंस्कृतपणाचं,रानटीपणाचं लक्षण आहे याची कृपया आम्हाला जाणीव करुन द्या.आम्ही त्याबद्दल अनभिज्ञ आहोत.अशी मागणी धाग्यातून केलेली नाही.धाग्याचा तो विषय नाही.धाग्याचा विषय समजून घ्या. ५] चांगल्या स्वभावाच्या एखाद्या साध्या मुलाला 'तुला मी चांगला समजत होते.तू असं काही विचारशील असं वाटलं नव्हतं' असं म्हणून त्याला वाटेला लावण्याची अक्कल या मुलींकडे असते.पण कामधंदा न करता उनाडक्या करणारा मुलगा स्टायलिश वागण्यासाठी पैसा कुठून आणतो? तो जे काही सांगतोय ते खरंच आहे का? अशी कोणत्याही प्रकारची चौकशी न करता त्याच्याबरोबर वाहवत जाताना ही अक्कल कुठे जाते? हे वयच तसं असतं म्हणता.म्हणजे या वयात पाय घसरु शकतो,चुकीचा निर्णय घेतला जाऊ शकतो हे मान्य ही करता आणि वर कोणी समजावून सावरायला गेलं किंवा शेवटचा पर्याय म्हणून मारहाण झाली तर मुलगी सज्ञान आहे असं ही म्हणता. सज्ञान असेल तर या मुली असे चुकीचे निर्णय कसे घेतात? आणि सज्ञान असेल तर हे वयंच तसं असतं असं म्हणून तिची बाजू घेणं,भलामण करणं योग्य आहे? ६] या सगळ्या प्रकारामुळे या कुटूंबातल्या इतर सदस्यांच्या विवाहाचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो.आम्ही त्या भंपक मुलाशी लग्न कर असं सांगितलं नव्हतं.ती सज्ञान आहे.तुम्ही आम्हाला का दोष देता? हे असं सांगितल्यावर घरातल्या बाकीच्या अविवाहित सदस्यांची लग्न होतील? सहजपणे? या कुटूंबातल्या मोठ्या माणसांचं पाल्यांकडे लक्ष नाही,आमची मुलगी आम्ही असल्या घरात का द्यावी? असं म्हणून नकार मिळायला लागला तर(खेडेगावात असं होऊ शकतं)आपली एक मुलगी तिच्या आवडत्या मुलाबरोबर संसार करते आहे यात आनंद मानून उरलेल्या भावंडांच्या विवाहाच्या प्रश्नाकडं दुर्लक्ष करावं का? ७] या अशा फसलेल्या मुलींपैकी काहीजणी सहन न होऊन माहेरी परत येतात. सज्ञान या गटात बसत असतील तर घेतलेल्या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी त्या मुली का घेत नाहीत? यावेळी त्यांची अक्कलहुशारी,लग्न करतानाचं धाडस कुठे जातं?का परत येतात त्या? ८] अशा आवडत्या पण नाकर्त्या मुलाशी लग्न करुन मुलीनं सगळ्या कुटूंबाला हाल भोगायला लावावेत आणि त्याच कुटूंबानं त्या मुलीची वाताहत झाल्यावर तिला मायेनं जवळ करावं,नवीन आयुष्य जगायला मदत करावी ही अपेक्षा का? सज्ञान आहे ना मुलगी? आता इतकं स्पष्ट लिहिल्यावरही अजूनही मारहाण या एकाच खुंटीला पकडून कोणाला लोंबकाळत बसायचं असेल तर खुशाल बसावं!

In reply to by उपयोजक

आम्ही त्या भंपक मुलाशी लग्न कर असं सांगितलं नव्हतं.ती सज्ञान आहे.तुम्ही आम्हाला का दोष देता? हे असं सांगितल्यावर घरातल्या बाकीच्या अविवाहित सदस्यांची लग्न होतील? सहजपणे?
ही भीती का असावी कोणाला? आणि कोणी अशा फालतू कारणासाठी नातेवाईकांशी लग्न करणार नसेल तर मी म्हणेन अशा लोकांशी नाते न जमणेच उत्तम! किंबहुना अषा अनेक फालतू कारणांमुळे आजकाल बऱ्याच लोकांची लग्ने होत नाहीत.

In reply to by अत्रे

किंबहुना अषा अनेक फालतू कारणांमुळे आजकाल बऱ्याच लोकांची लग्ने होत नाहीत.
माझा रोख जे लोक अशा कारणांमुळे एखादे स्थळ नाकारतात त्यांच्यावर होता.

In reply to by अत्रे

परिस्थिती काय आहे यापेक्षा काय असावी यावर आधारित प्रतिसाद! हि शहरी (एकमेकांशी फार नसलेले संबंध) वातावरणातील आदर्श अपेक्षा आहे. ग्रामीण भागात दहा पैकी नऊ लोक नातेवाईकांच्या माहितीवर आधारित लग्न करतात. आदर्श अपेक्षा ठेऊन नऊ लोकांना दूर ढकलणे इतके सहज शक्य असते असे नाही. शहरात हे प्रमाण कदाचित दहात चार असेल पण सहा लोकांचा पर्याय उपलब्ध असल्याने ग्राह्य आहे. थोडक्यात ज्याचे जळते त्यालाच कळते - हेच खरे!

मारहाण करण्यापेक्षा जुन्या पिक्चर सारखा ब्लॅंक चेक देऊन बघायचे

वरील सर्व चर्चा वाचताना अचानक पुलंच्या 'बटाट्याची चाळ' मधील 'काही वासर्या' हे प्रकरण आठवले. त्यातील अण्णा पावशेंच्या वासरीतील काही वाक्ये लिहायचा मोह अनावर झाला. "३ जुलै - संध्याकाळी ऑफिसमधून परतताना जिन्याखाली आमची दुसरी कार्टी आणि चौबळाचा दिवटा बोलताना पुन्हा आढळली. दोघांनाही बदडले. कार्ट्याना शक्य तितके लवकर उजवले पाहिजे" "९ नोव्हेंबर - पोंबुर्प्याची हाडे मोडली. पुन्हा माझ्या पोरीच्या वाटेला जाणार नाही ...." व्यक्ती तितक्या प्रकृती ह्या न्यायाने वरील धाग्यावर विविध प्रतिक्रिया वाचायला मिळाल्या, त्यातील कोणत्या बरोबर कोणत्या चूक हे शेवटी काळच ठरवेल. शेवटी 'ज्याचं जळते त्यालाच कळते' हेच खरे.

In reply to by सौन्दर्य

"३ जुलै - संध्याकाळी ऑफिसमधून परतताना जिन्याखाली आमची दुसरी कार्टी आणि चौबळाचा दिवटा बोलताना पुन्हा आढळली. दोघांनाही बदडले. कार्ट्याना शक्य तितके लवकर उजवले पाहिजे" "९ नोव्हेंबर - पोंबुर्प्याची हाडे मोडली. पुन्हा माझ्या पोरीच्या वाटेला जाणार नाही ...." ई------ कसले रानटी लोक त्याकाळी होते नाही? आधी मुलांचे बौध्दिक घ्यायचे, त्यांचे काउन्सलिंग करायचे. काहीच नाही जमले तर पाडगावकरी कविता आहेच. आधी स्वताची कार्टी आणि चौबळाचा दिवटा याचा खरच काही दोष नाही याची खात्री स्वताला पटवून घ्यावी असे नाही वाटले यांना. "सो क्रुएल यु नो". चक्क मारहाण करताहेत? आणि पोंबुर्प्याची हाडे मोड्ली मोडली म्हणजे काय? त्याने उद्या केस केली म्हणजे? त्याचे काउन्सलिंग कराता येत नव्हते काय? तुमच्या पोरीचा यात दोष नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? त्या बिचार्‍या मुलाचाच तुम्हाला दोष दिसतो काय? आणि पु.ल. ना तरी विनोद म्हणुन असले लिहावेसे वाटते तरी कसे?

शेवटी 'ज्याचं जळते त्यालाच कळते' हेच खरे.

हे वाक्य भिडून गेले. त्यासाठी तुम्हाला ___________________/\__________________________

In reply to by दुर्गविहारी

प्रभा पावशे आणि मधू (?) चौबळ शेवटी सगळ्यांना फाट्यावर मारून 'इलोप'* होतात हा तपशील विसरू नका. *त्रिलोकेकरांच्या भाषेत

In reply to by आदूबाळ

तपशिल चुकला मालक... मार खाल्लेल्या प्रभा पावशेचं लग्न होतं. मार न खाल्लेली रतेन समेळ इलोप होते. :-)

In reply to by रामपुरी

अर्रर्रर्र .... चुकलंच! प्रभा पावशेचं कोणाबरोबर लग्न होतं? अण्णा पावशे तिला भलत्याबरोबर 'उजवण्यात' यशस्वी होतात ना?

In reply to by आदूबाळ

सगळा तपशिल आठवत नाहीये पण पोंबुर्प्याची हाडे मोकळी करताना त्याला अण्णा सांगतात " उद्या तिचं लग्न ठरवतोय. मुलगा इंजिनियर (?) आहे. तुझ्यासारखा उडाणटप्पू नाही. चांगला ५००० हुंडा मोजतोय" वगैरे... :-)

In reply to by रामपुरी

विंजिनिअर नाही कै, पोष्टात हो! आणि 3000 हुंडा! आण्णांची परिस्थिती हलाखीची आहे आणि मुलींच्या लग्नाच्या चिंतेने खंगलेले आहेत असं काहीतरी पोंबुरप्याने लिहिल्यामुळे पेटलेले आण्णा हात मोकळा करतात बहुतेक!

आधीचा धागा 'हा प्रश्न कसा सोडवावा?' नंतरचा धागा 'अशा का वागतात काही मुली'. एकूण वाटचाल पाहून साहेब काट्यावर आले आहेत असे वाटते.

In reply to by अप्पा जोगळेकर

ताज्या घडामोडी हा तद्दन फालतू विषय. घरसंसार कामाचा. पण तुम्ही लोकांना तिकडे डायव्हर्ट करताय. पण असो.

मुलींनी निवडलेला मुलगा भंपक निपजला, म्हणून मुलींची अक्कल काढण्यापर्यंत ठीक आहे. पालकांनी ठरवून दिलेली स्थळंही खूप सुस्वभावी निघतील आणि संसार सुखाचे होतील याचीही शाश्वती कोणी देऊ शकत नाही. उदाहरणा दाखल,आजकाल शेतकर्‍यांच्या मुलांना सहजासहजी मुली देत नाहीत. मग मुलांना शहरात पाठवून तो नोकरीला आहे असे सांगतात. लग्न करेपर्यंत पोरं उंडारतात. लग्न झाल्यावर नोकरी सुटली हे कारण देऊन गावी परतण्याचा निर्णय घेतात. तसं बघायला गेलं तर हि सुद्धा एक प्रकराची शुद्ध फसवणूकच आहे. मुलीचंही स्वतःचं करियर करायचं स्वप्न वगैरे असल्या गोष्टी झाकल्या जातात. दोन्ही प्रकारात पाहीलं तर मुलींनी स्वतः ज्याच्यावर प्रेम केलंय त्याच्याबरोबरचा संसार ती बर्‍यापैकी सावरेल तरी. अर्थात् जर त्यासाठी ती इतरांची मदत मागत असेल तर धागाकर्त्याला प्रतिसादातले शेवटचे चार मुद्दे टंकायला आयती संधी मिळेल. इतकेच.

In reply to by अकिलिज

मुलींनी निवडलेला मुलगा भंपक निपजला, म्हणून मुलींची अक्कल काढण्यापर्यंत ठीक आहे. पालकांनी ठरवून दिलेली स्थळंही खूप सुस्वभावी निघतील आणि संसार सुखाचे होतील याचीही शाश्वती कोणी देऊ शकत नाही.
उदारमतवाद्यांच्या तर्करत्नांच्या खाणीतील अजून एक रत्न. अहो, मायबाप "आजघडीला काय दिसतंय" हेच फार तर फार पाहू शकतात ना? भविष्यात काय होईल, किंवा विवाहपूर्व ड्यू डिलिजन्सने बाहेर न आलेल्या गोष्टी किती खतरनाक निघतील हे "आज" मायबापांना माहीत झालं तर ते स्थळ मोडतीलच कि. डोळ्यासमोर दिसत असलेले भविष्य मुली दुर्लक्षितात, पालक नाही, असा विस्।अय आहे. ================ (तसे काही पालक आपल्या मुलिची बरेचदा दुर्लक्ष करून वाट लावतात, आणि पालक असे का वागतात असा धागा निघू शकतो, पण असो.)

एखादा/दि प्रेमात पड्ला कि त्या व्यक्तिचे जगच नुसते प्रेम बनुन जाते(काहीतरी हार्मोन लोचा असावा). मुलांना स्वतःचे घर सोड्ताना स्वतःच्या बापाकडुन मिळ्नार्या संप्पतीवर पाणी सोडावे लागु शकते त्यामुळे मुलाच्या घरच्यांकडुन विरोध झाला तर मुले व्यावहारिक निर्णय घेत असावेत. मुलींना मात्र स्वतःचे घर सोडावेच लागणार असते, मनाप्रमाणे लग्न करा अथवा मनाविरुध्द. शिवाय मुली मानसिक जास्त गुंतलेल्या असतात. मुलांची मात्र शारीरिक ओढ जास्त असते(बहुतेक केस मध्ये). मुलींना पहिल्यापासुनच व्यावहारीक निर्णायात सामावुन घेतले जात नाही. त्यांना व्यावहारीक निर्णय न शिकवल्यामुळे (घरातल्यांची चुक) त्यांना व्यावहारीक निर्णय घेता येत नाहीत. म्हणुन त्या अशावेळी व्यावहारीक निर्णय न घेता मनाला आवडेल तोच निर्णय घेतात.. आणि ....

In reply to by जेडी

मुलींना पहिल्यापासुनच व्यावहारीक निर्णायात सामावुन घेतले जात नाही. त्यांना व्यावहारीक निर्णय न शिकवल्यामुळे (घरातल्यांची चुक) त्यांना व्यावहारीक निर्णय घेता येत नाहीत. म्हणुन त्या अशावेळी व्यावहारीक निर्णय न घेता मनाला आवडेल तोच निर्णय घेतात..
+10

In reply to by जेडी

मुलींना पहिल्यापासुनच व्यावहारीक निर्णायात सामावुन घेतले जात नाही. त्यांना व्यावहारीक निर्णय न शिकवल्यामुळे (घरातल्यांची चुक) त्यांना व्यावहारीक निर्णय घेता येत नाहीत. म्हणुन त्या अशावेळी व्यावहारीक निर्णय न घेता मनाला आवडेल तोच निर्णय घेतात.. +१०० हीच कारणमिमांसा अपेक्षित आहे धाग्यातून!

In reply to by उपयोजक

हीच कारणमिमांसा अपेक्षित आहे धाग्यातून!
तुम्ही आमचा क्लास घेत आहेत का, "धाग्याचा अपेक्षित विषय ओळखा" म्हणून? (हलके घेणे! :))

In reply to by जेडी

मुलींना पहिल्यापासुनच व्यावहारीक निर्णायात सामावुन घेतले जात नाही.
व्यावहारिक निर्णयात सामावून घेणे म्हणजे नक्की काय? मुलांना तरी कोणत्या व्यावहारिक निर्णयात सामिल करतात? त्यांची खेळणी, कपडे, पुस्तके कोणती , कुठून घ्यायचे इतकेच समाविष्ट केले जाते. शेत विकायचं का, पिक कोणतं घ्यायचं, जनावर कोणतं विकायचं, नोकरी बदलायची का, दुकानात कोणतं सामान कितीला यात मुलांचा नि मुलिंचा सहभाग समान असतो. ============================================ आणि वयामानानुसार हवं तेवढं मुलींना सहभागी करून घेतात. वास्तविक नोकरदार लोकांमधे संसार चालवण्याचे काम स्त्रीयाच करतात. जास्तीत जास्त पुरुष बघ्याचे काम करतात. ऑफिसला जायचं आणि यायचं. घर चालवायचं इतकं कठीण ज्ञान आभाळातून टपकतं कि काय? ======================================= धाग्याचा विषय "काही" मुली असे का वागतात असा आहे. बाकी सगळ्या मुली (९९%) शहाण्यासारख्याच वागत असतात. इथे चर्चा अपवाद असणार्‍या मुलींच्या मनोवृत्तींची आहे. =========================== प्रेम होणे हे अंततः कोणत्याही अन्य घटकांनी ठरत नसते. प्रेमपात्र ठरण्यासाठि जे काही नैसर्गिक कारण ते अयोग्य म्हणता येत नाही. मग सिविलायझेशन्स घातलेले संकेत कुचकामी ठरतात. आणि अशा का वागतात असा प्रश्न पडतो.

In reply to by arunjoshi123

>>>यांची खेळणी, कपडे, पुस्तके कोणती , कुठून घ्यायचे इतकेच समाविष्ट केले जाते. शेत विकायचं का, पिक कोणतं घ्यायचं, जनावर कोणतं विकायचं, नोकरी बदलायची का, दुकानात कोणतं सामान कितीला यात मुलांचा नि मुलिंचा सहभाग समान असतो. तुमच्याकडे असेल, ग्रामीण भागात मुलींना फक्त शाळाआणि घर एवढेच माहीत असते. >>>शेत विकायचं का, पिक कोणतं घ्यायचं, जनावर कोणतं विकायचं, नोकरी बदलायची का ह्या गोष्टीत मुलांना सामावुन घेतले जाते... मुलींना अजिबात नाही... >>>वास्तविक नोकरदार लोकांमधे संसार चालवण्याचे काम स्त्रीयाच करतात. नुसता किराणामाल आणि भाजी घेणे म्हणजे व्यावहारीक निर्णय नव्हेत...

In reply to by जेडी

तुमच्यामते मुलांना सहभागी करून घेतले जाणारे व्यावहारिक निर्णय जरा सांगाल का?

माझ्या लांबच्या नातेवाईकाच्या एकुलत्या एका मुलीची सत्यकथा मुलीच्या वर्गात( क्लास मध्ये) असलेला परधर्मीय मुलगा आणि या मुलीचे पुण्यात "प्रेम" जमले. मुलगा १२ ला तीन वेळा नापास आणि आता शिक्षण सोडून दिलेले.मुलगा सध्या काहीच करत नाही.अम्बरनाथला असतो. मुलगी बी कॉम च्या शेवटच्या वर्षाला पुण्यातच आहे २० वर्षाची . बी कॉमच्या दुसऱ्या वर्षाला असताना त्यांचे प्रेम प्रकरण मुलीच्या वडिलांना लक्षात आले. त्यांनी मुलीला हर तर्हेने समजावण्याचा प्रयत्न केला पण मुलगी आडमुठी आहे. वडिलांनी सांगितले कि मुलगा काही तरी करू दे मग तुमचे लग्न लावीन. मुलीला समजावण्यात प्रयत्न चालू आहे कि तुला १००० रुपये स्कुटरच्या पेट्रोलला लागतात मोबाईल, बाहेर खाणे थोडीशी मौजमजा इत्यादी इतर खर्च मिळून सध्या महिना खर्च ५ हजार रुपये. लग्न झाल्यावर तूच मुलाला पोसायचे आहे तेंव्हा कमीत कमी १५ हजाराची नोकरी मिळवणे आवश्यक आहे. मुलालापण बोलावून समजावले कि तू काहीच करणार नसशील तर मुलीचे तुझ्याशी लग्न कसे आणि का करून द्यायचे? मुलाचे वडील नाहीत आईच्या निवृत्तिवेतनावर जेमतेम चालू आहे. मुलगा दोन वर्षांपासून काहीच करत नाही. पॉकेट मनी मधून फक्त मुलीला फोन करतो. बाप कराटेचा ब्लॅक बेल्ट असूनही सज्जन पणे वागला/ वागतो आहे. माझ्याशी मन मोकळे करु शकतो म्हणून बोलणे होते. परधर्मिय असल्याबद्दल हि त्याचा आक्षेप नाही पण मुलगा अगदीच टिनपाट आहे. मुलाच्या नादाला लागून मुलीच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख खाली येत चालला आहे.निदान मुलीचे दोन वेळेस व्यवस्थित पोट भरेल एवढा तरी पैसे मिळवावा अशी अपेक्षा ठेवणे चूक आहे का? तिचे आयुष्य तीला पाहिजे तसे जगावे इथपर्यंत ठीक आहे उघड्या डोळ्याने प्राण जात नाही त्यामुळे काळीज तुटतं अशी बापाची अवस्था. मुलीचे डोळे कधीतरी उघडतील या आशेवर आहे.

In reply to by शलभ

स्पष्ट लिहिलं तरी सिध्द करुन द्यावं लागतंय. त वरुन ताकभात काहीजणांना अोळखता येत नाही कि ते मुद्दाम करतात ते काही समजत नाही.

In reply to by उपयोजक

विरोधासाठी विरोध होतो बऱ्याच वेळेस. क्ष=३ तर क्ष चा वर्ग ९ सिद्ध करा म्हणून सांगितलं कि आधी क्ष=३ कसे काय सिद्ध करा असे विचारण्याला काही अर्थ असतो का? क्ष चा वर्ग ९ आहे किंवा नाही यावर मते मांडावीत!

In reply to by शलभ

काय तरी अपेक्षांचा दर्जा राव!!! अहो, "सज्ञान मुलीला समजावलंच कसं म्हणून एकेकाच्या मुस्काडीत ठेऊन दिली असती" अशी काहीतरी उच्च दर्जाची अपेक्षा करा ना.* =============================== तारूण्यसुलभ शेण खाल्ल्यानंतर समाजाकडून रित मोडली म्हणून शारिरीक शिक्षा होणे हा गुन्हा असून मात्र असा गुन्हा करू इच्छिणारांस शारिरिक दंड करणे मात्र गुन्हा नाही इ इ तर्करत्नांचा आनंद घ्या.

In reply to by शलभ

धागाकर्ता म्हणतोय, एकदा तिच्या नवऱ्या बरोबर नाश्ता करताना हॉटेल मध्ये भेटली... अक्षरशः रडली, वडील अाणि भाऊ बोलत नाहीत घरात येऊ देत नाहीत...मला मध्यस्ती कर म्हणून सांगत होती... विचारलं तिलाच शिव्या देताना थोडा का विचार केला नाहीस..??? तो पोरगा काहीच बोलला नाही.. बडवलेला म्हणून! यात ती मुलाबद्दल काहीच तक्रार करताना दिसत नाहीये. आता धागाकर्त्याला आधीपासूनच मुलाची बाजू ठेचायचीय तर मुलगा टिनपाट आहे म्हणून जाहीर करणं आलंच. खरेंच्या स्टोरीतही मुलीला मुलाबद्दल काही वावगं वाटत नाहीये. पालक लोकांनाच अपेक्षाभंग होण्याची काळजी लागलेली दिसतेय.

In reply to by अकिलिज

पालक लोकांनाच अपेक्षाभंग होण्याची काळजी लागलेली दिसतेय. उघड्या डोळ्याने प्राण जात नाही त्यामुळे काळीज तुटतं अशी बापाची अवस्था मुलीचे दोन वेळेस पोट भरू शकेल एवढे तरी त्या मुलाने कमवावे हि अपेक्षा पण चूक आहे? म्हणजे मुलाला शाळेत घातलं तर त्याने किमान पास व्हावे (९० टक्के नाही) इतकीही अपेक्षा पालकांची असू नये? बढिया है!!!!!!!!!!!!!

In reply to by शलभ

स्वतः ची बहीण असल्या टिनपाट पोरा बरोबर फिरू लागली तरी हे लोक अशीच उच्च विचारसरणी बाळगतील का ? रिक्षा चालवत असला तरी काय झाले , मेहनती आहे. इ इ .. मजुरी करत असला तरी काय झाले ? हुशार आहे तो .. इ इ ..

In reply to by अभिजित - १

+१००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००० टक्के सहमत. उगाच आम्ही कसे विद्वान आणि वेगळ्या दृष्टीकोणातुन विचार करू शकतो हे दाखविण्याच्या प्रयत्नात काही अतिअशहाणे आय.डी. अश्या प्रतिक्रिया देताना दिसतात. याना आपल्या मुली किंवा बहीणी यांच्यावर हा प्रसंगा आल्यावर हेच विचार सुचतील का हा प्रश्न पडलाय. शिवाय मोराल पोलिसिंगच्या नावाने गळे काढणार्‍या आय,डी. ना एकच विचारायचे आहे. उद्या दुबई किंवा ईतर अरेबियन देशातून चांगल्या पॅकेजच्या नोकरीची ऑफर आली तर केवळ तिथे मोराल पोलिसींग चालते म्हणून हे महाभाग नोकरी नाकारणार आहेत कि बॅगा भरायला पळणार आहेत?

In reply to by अभिजित - १

स्वतः ची बहीण असल्या टिनपाट पोरा बरोबर फिरू लागली
बहीण फिरायला जाणे फार मोठि गोष्ट झाली. ती कचरा जमा करून जाणारी बाई असते तिला सोफ्यावर बसू दे आणि डायनिंग टेबलवर काही स्पून फोर्कने खाऊ दे म्हणावं. किंवा हापिसात सेक्यूरीटि गार्डला एक स्मित द्या आणि इतरांना जसे हाय मंता तसे त्यांना पण रोज हाय म्हणा, एवढं केलं तरी पावलो.

In reply to by सुबोध खरे

ईथे बरेच काउन्सलिंग एक्स्पर्ट आहेत डॉक. त्यांची अपाँईटमेंट घ्या आणि आणा त्यांच्याकडे. बघुया काय उजेड पाडतात. ;-) नाहीच जमले तरी चिंता नाही, पाडगावकरांची कविता वडीलाना वाचायला देवु. त्यांची चुक त्याना लगेच कळेल. ते ही सहन होत नसेल तर वडीलांना मुलीच्या मुलीच्या भानगडीत पडू नये म्हणून सांगा. त्यांना काय अधिकार मुलीने काय करायचे हे ठरवायचा. शिवाय मुलगा वाईटच हे ठरविणे एकांगी नाही का? कशावरून तो उद्या पंतप्रधान होणार नाही? मोदी चहावाले असताना झालेच ना? शिवाय मुलीच्या आयुष्याचे नुकसान होत असेल तर होउ देत, तीला नवीन जिवनानुभव मिळतील. भले तीचे धिंडवडे निघु देत पण त्याला जिवनानुभव म्हणायचे बर का. न जाणो या अनुभवावरुन ती उद्या पुस्तक लिहील आणि त्याला बुकर पारितोषिक मिळेल. आपण आशा करत रहायची.

In reply to by दुर्गविहारी

अरे व्वा, काय सुंदर समरी केली आहे उदारमतवादी विचारांची. तुम्हाला जबर्‍या कौशल्य आहे हो, (आम्ही दुर्बोध, रटाळ, कंटाळवाणे, इ इ होऊन जातो याच गोष्टी मांडताना.) ========================= पण एक वाक्य राहिलं. "रामाच्या मंदिरात संडास का नाही करायची? राम त्याच्या काळात संडास करत नव्हता का? संडास करणं अपवित्र कसं? ती एक मूलभूत अंतःप्रेरित शारीरिक प्रक्रीया आहे. " हे मांडायचं विसरलात.

In reply to by arunjoshi123

संडास उघड्यावर करणे योग्य नाही म्हणून! आणि त्यामुळे आजार देखील पसरू शकतात! रामाच्या मंदिराच्या जवळ देखील त्यासाठी शौचालय असत बर का!! कारण ती नैसर्गिक क्रिया आहे. भक्तांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली जाते... अहो गावांमध्ये कोणी आता उघडयावर देखील बसू नये म्हणून सरकार लोकशिक्षण करतंय! हागणदारीमुक्त गाव करायला... पण काही लोक असतातच तरीही आडमुठ... ते सगळीकडेच असतात म्हणा! तिथे पण इथे पण!

In reply to by शब्दबम्बाळ

दुर्गविहारिंनी असं उपरोधानं लिहायचं असं मला अभिप्रेत होतं. तुम्ही वास्तविकच लिहून टाकलंत. एकच पडतं म्हणा.

In reply to by दुर्गविहारी

जिथे तिथे पाडगावकर आणि इतरांना आणण्यापेक्षा वरती मी तुम्हाला काही प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तरे देता का? फार अवघड वाटत असेल तर राहू द्यात, काही जबरदस्ती नाहीये... पण बघा शक्य झालं तर! तुमचे गडावर वागण्यासाठीचे "२१ अपेक्षित" वगैरे काही असेल तर तेही तिथे प्रसिद्ध करू शकाल!

In reply to by शब्दबम्बाळ

फालतु प्रतिसादाना मी फाट्यावर मारणार हे मी आधीच सांगितले आहे. तेव्हा जे मुध्दे मला पटत नाहीत त्यावर मुळ धाग्याचा विषय सोडून किती चर्चा करायची याला काही मर्यादा आहेत म्हणून थांबलोय. योग्य धाग्यात मी उत्तरे देईनच. बाकी मी काहीही लिहीले तरी त्याला तुम्ही फाटे फोडणारच हे दिसतच आहे. पण चिंता नको, धागा तुम्ही काढा तिथे उत्तरे देतो. यानंतर तुम्हाला हवे ते समजायला तुम्ही रिकामे आहात.

In reply to by दुर्गविहारी

बरोबर! तुमचा वरचा प्रतिसाद अगदी विषयाला धरून आणि अत्यंत माहितीपूर्ण आहे नाही का?! :) बुकर पारितोषिक वगैरे! फालतू फाटे कोण फोडतोय ते तरी बघायचं होत ते लिहिताना! असो मला पटत नाही ते फालतू/कचरा इतकाच तुमचा विचार दिसतोय... चालायचं... "चर्चा" करायचीच असेल तर वेगळ्या धाग्याची काही गरज नाहीये, जर करायचाच असेल तर तुमच्या प्रतिसाद खाली जे लिहिलंय तिथे प्रतिवाद करा नाहीतर सोडून द्या! योग्य वेळ योग्य धागा वगैरे कशाला पाहिजे! चालू दे तुमची "विषयाला धरून" चर्चा!

In reply to by शब्दबम्बाळ

प्रतिसाद देण्यापुर्वी जरा विचार करीत जा. एकूणच या धाग्यावर मुदा काय आहे हे न समजुन घेताच प्रतिसाद द्यायची स्पर्धाच लागली आहे. वरच्या प्रतिसादाबध्दल म्हणाल तर त्यासाठी धागा पुन्हा एकदा वाचुन पहा म्हणजे ज्या महाभागानी ज्या मुलीनी केवळ चुकीचे निर्णय घेतल्यामुळे वाइट जीवन जगावे लागते त्यांना "गोडबोल्या पोरांच्या नादी लागून दु:ख मिळाले तर मिळू द्यावे. तो त्यांचा जीवनानुभव आहे. " ह्या छापाच्या प्रतिक्रिया दिल्यात त्यांना मारलेला तो टोला आहे. इथे धाग्याचा मुळ विषय सोडून मी कशी काय प्रतिक्रीया दिली. तुमचा दुसरा मुध्दा, गडाची पवित्रता वगैरे. मि.पा.वर जेव्हा आपण एका धाग्यावर प्रतिसाद देत असतो तेव्हा शक्यतो ते धाग्याशी संबधीत असावेत असा संकेत आहे. यामुळेच तुमच्या शंकाना उत्तरे देण्यासाठी दुसरा धागा काढा असे मी सांगतोय. यामुळे विषयाशी संबधी नसलेली चर्चा या धाग्यावर होणार नाही आणि गडकोटाच्या काढलेल्या धाग्यावर ईतर ईंटरेस्ट असलेले आय.डी. चर्चा करु शकतील ईतकाच माझा उद्देश आहे. अंवातर चर्चा खुप झालेली आहे , त्यामुळे मी याप्रकारच्या प्रतिसादावर निदान या धाग्यावर तरी उपप्रतिसाद देणार नाही.

In reply to by सुबोध खरे

मुलगा टिनपाट आहे हे मान्यच.. पण तरी मुलीला तोच मुलगा का आवडतो याचा एकदा विचार व्हायला हवा ? निदान कुतुहल म्हणून तरी... शारिरिक आकर्षण म्हणाल तर तो जगातला सर्वात देखणा तरूण आहे असं तर नक्कीच नसेल ? मग नेमकं काय ? काहीतरी कारण असेलच ना ? जर ते कारण शोधून त्यातला फोलपणा मुलीला दाखवता आला तर कदाचित प्रश्न सुटू शकेल...

याला फार मोठया प्रमाणात चित्रपट, नाट्य , दूरदर्शन जबाबदार आहे ! कलेच्या नावाखाली केवळ विकारांचे उदात्तीकरण केले जात आहे , लोक अभिरूचीहीन पण वासना चेतवणाऱ्या किळसवाण्या मनोरंजनाला चटावलेले आहेत. पुढीची १००० वर्षे पुरी पडतील इतके चित्रपट निर्माण झालेत गेल्या १०० वर्षात ! आता तातडीने आणि चळवळ करून हा उद्योग बंद पडला पाहिजे , अतोनात नुकसान केले आहे या लोकांनी समाजाचे ! एका जर्मन कलीगबरोबर प्रवासात असताना तेलगु चित्रपट पाहण्याचा प्रसंग आला, तसा नाईलाज होता .. त्याची कॉमेंट फार बोलकी होती, तो म्हणाला, Suhas , this is not just vulgar but worst than porn ! आणि हा सिनेमा, मंडळी सहकुटुंब मिटक्या मारत पहात होती ! कसली डोंबळाची महान भारतीय संस्कृती सांगणार त्याला? आणखी एक प्रसंग परवा हाफ़ीसात घडलेला! माझ्या नवऱ्याची बायको नावाची मराठी मालिका सध्या जोरात आहे ... त्या संदर्भातील चर्चा ! मुली पण या चर्चेत सामील ! एक लग्न झालेला तरुण म्हणाला ... "च्यायला त्या गुरुनाथ ची मजा आहे, शिकायला पाहिजे त्याच्याकडून , बायको आणि भानगड मस्त म्यानेज करतोय !' सगळी मंडळी फिदीफिदी हसली, त्यात मुलीपण सामील ! त्या हरामखोर गुरुनाथला वास्तविक जोड्याने मारला पाहिजे ! घरात बायको असताना बाहेर शेण खातोय ! ही समाजाची मानसिकता असेल तर यातून सुदृढ सक्षम समाज कसा निर्माण होईल? चित्रपट उद्योग बंद करता येत नसेल तर त्यांना CSR लागू करा. प्रत्येक बाजारू चित्रपटामागे एक संस्कारक्षम चित्रपट निर्माण करणे कायद्याने बंधनकारक करा. विकार ग्रस्त ययाती कसा लयाला गेला ह ेपण दाखवा !

In reply to by विटेकर

अस्म कसं ? अस कसं? ह्यातून त्याना जिवनानुभव मिळत नाही का? आणि सिरीयल आणि चित्रपट अनेकांना रोजगार देतात, त्यांचा पोटावर तुम्ही पाय आणताय? असहिष्णुपणा झाला हा. ;-) ह. घ्या.

बेदम मारून का प्रश्न सुटणार होता ? आधी बेदम मारले वगैरे तिथेच सगळे गणित वाया गेले. तरुण मुले ती, ती प्रेम नाही करणार तर आणखीन कुणी ? उलट आई वडील आणि मुलांचे संबंध ठीक होते तर व्यवस्थित बोलून वगैरे मामला रफा दफा केला जाऊ शकता. मूर्ख आईवडील मुलीकडून साऱ्या चांगलंय मित्रांना राख्या बांधवून घेता आणि नंतर पोर गुंडा बरोबर पळून गेली म्हणून छाती बडवतात.

आजुबाजुच्या पाच {वाजतगाजत झालेल्या } गेल्या वर्षभरातील लग्न झालेल्या मुली घर सोडून परत माहेरी गेल्या आहेत. काहींची धुसफूस चालू आहे. नवरा दारू पिऊन मारतो हे कारण कोणत्याही प्रकरणात नसून "हवी तशी मजा करायला {इथे} मिळत नाही" हे आहे. चार प्रेमविवाह आहेत. थोडक्यात ज्यांचे संसार हसतखेळत चालू आहेत ती जोडपी नशिबवान आहेत. गपचिप संसार कर हे अशा प्रकरणात सांगणारे आपण कोण? लोकल ट्रेनच्या एका टोकाला मोटरमन आणि दुसय्रा टोकाला गार्ड असतो पण एकाला टोकाला मोटरमन अन दुसरीकडे मोटरवुमन आहेत!

छान

सर्व प्रतिसाद वाचले आता शेवटी सारांश सांगून धाग्याला निरोप द्यावा असे वाटते. बाकी, काही प्रतिसाद नेहमीप्रमाणेच भन्नाट होते. शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे

माझ्या ओळखीच्या ऑफीसमधील एक मुलगी त्र ३-४ जणाबरोब्र फिरुन आता एका ब्रोब्र प्रेमात आहे आणि हिच मुलगी ऑफीसमधील इत्र मुलीच्या चारित्र्याबद्द्ल वाईट बोलायची. ख्रत्र एकही मुलगी वाईट नव्हती हि आणि हिचि सख्खी मैत्रिण सोडुन.

बरं हे असे लबाड लांडगेच या मुलींना आवडतात. त्यांचं स्टायलिश वागणं,कपडे,गाडी हेही जोडीला असतं.
बरोबर आहे, असल्या स्वभाववैशिष्ट्याला खरं म्हणजे आचरटपणाला काय म्हणणार ? दुसर्‍या मुलीची कहाणी दु;खद आहे, मी देखिल असे युगुल क्लेशात जगताना पाहिले आहे ! लेख आवडला !