Skip to main content

ताज्या घडामोडी: भाग ८

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 27/07/2017 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद आल्याने प्रतिसाद एका पानात रहावे यासाठी नवीन धागा सुरु करीत आहे. धाग्याची सुरूवात http://indianexpress.com/article/india/gujarat-congress-three-mlas-join… या बातमीने करीत आहे. गुजरातमध्ये वाघेलांपाठोपाठ अजून ३ कॉग्रेस आमदारांनी (बळवंतसिंह राजपूत, तेजश्री पटेल, पी आय पटेल) राजीनामा देऊन भाजप प्रवेश केला आहे. डिसेंबर २०१७ मधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये काँग्रेसला धक्के बसायला सुरूवात झाली. विशेष म्हणजे या ३ आमदारांपैकी २ पटेल आहेत. मागील दीडदोन वर्षे पटेलांना राखीव जागा द्यावात यासाठी गुजरात पेटविण्याचे प्रयत्न झाले. त्याचा काहीसा फटका भाजपला बसला होता. या पार्श्वभूमीवर २ पटेल आमदारांनी भाजपत जाणे ही भाजपसाठी आनंदाची बातमी आहे.

वाचने 42850
प्रतिक्रिया 215

प्रतिक्रिया

In reply to by गॅरी ट्रुमन

मोरारजी देसाई आणि आय.के.गुजराल ह्या दोघांन्नी जेव्हढी रॉ च्या मेहनतिचि वाट लावलि तेव्हढि तर साला जन. झिया ने हि नाहि लावलि.

In reply to by थिटे मास्तर

भरत शाह प्रेझेंट पाहिल्यावरच कदाचित बंद करायला हवा होता...तरी बघितला बाबा ४० मिनिट. मधुर भांडारकर कडुन हि अपेक्षा नव्हती. छ्या.

भाजपच मुखपत्र म्हणा नायतर काहीपण म्हणा, पण इतक्या सातत्याने राजकारणातल्या बातम्या (नवीन आणि अगदी जुन्यापान्या सुद्धा ) देण्याचं काम का देव जाणे भाजप कडे झुकलेले लोकच करताना दिसतायत. आणि ते नुसतंच न करता अभ्यास आकडेवारीसकट करतायत, त्यामुळे त्यांना खोटं पाडणं इतर पक्षाच्या समर्थकांना जमत नाहीये. एकूण काय, मिसळपाव वर पण बीजेपी ला चांगला विरोधी पक्ष नाहीये :P श्री-गुरुजी पूर्णपणे भाजप कडे झुकलेले असले तरी, ट्रुमन साहेब सगळ्याच बातम्या देतायत. भाजप ला नावं पण ठेवतायत, विरोधी पक्ष कुठेच दिसत नाहीये त्याकडे पण लक्ष देतायत, मध्ये कोणी राजकारणी स्वर्गवासी झाले तर त्याची पण माहिती देतायत. जर कोणी इतर पक्षाचे समर्थक अशा प्रकारे फॅक्टस + त्यांचे त्या-त्या पक्षाचे बायस्ड मत इथे मिसळपाव वर देऊ शकले तर वाचायला खरंच आवडेल. आत्ता बरेच कुंपणावरचे लोक ज्यांना कुठल्याच पक्षाविषयी जवळीक नाहीये ते फक्त भाजप कडे झुकलेली मतच वाचतायत इथे. ट्रुमन साहेबाना विशेष धन्यवाद - सातत्याने राजकारणावरच्या माहितीपूर्ण बातम्या देण्याबद्दल .

In reply to by वीणा३

ट्रुमन साहेबाना विशेष धन्यवाद - सातत्याने राजकारणावरच्या माहितीपूर्ण बातम्या देण्याबद्दल . >> सहमत. खरं तर मिपावर राजकारणाबद्दल चर्चा मी मागच्या ३-४ आठवड्यांतच वाचायला लागले. पण फक्त ताज्या घडामोडीच नाही, तर आधीच्याही काही रोचक घडामोडी वाचायला मिळाल्या. या धाग्यांमध्ये माझ्याकडून भर गालण्यासारखे काही नसले तरी सध्या तरी नियमितपणे धाग्यावर येऊन वाचून जात आहे.

In reply to by रुपी

धन्यवाद वीणाताई, रूपीताई आणि पिराताई.
मिसळपाव वर पण बीजेपी ला चांगला विरोधी पक्ष नाहीये :P
मिपावर सध्या भाजपविरोधक फार लिहित नाहीयेत. म्हणजे मिपावर बीजेपीला चांगला विरोधी पक्ष नाही असे नाही.अडवाणी भाजपचे सारथी असताना भाजपला कडाडून विरोध करायचे काम मिपावर मीच करत होतो :) २०१५ मधील दिल्ली विधानसभा निवडणुका किंवा बिहार विधानसभा निवडणुकांच्या वेळचे मिपावरील चर्चांचे धागे तुम्ही बघितले आहेत का याची कल्पना नाही. त्या चर्चांमध्ये भाजपविरोधकही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते हे वाचायला मिळेलच. हाच प्रकार कन्हैय्याप्रकरणीही झाला होता . इतकेच काय तर ७-८ महिन्यांपूर्वी नोटाबंदीच्या वेळी मोदी-भाजपवर किती टिका झाली होती हे पण दिसेलच. गुरमेहर कौर प्रकरणावरही मिपावर धागा आला होता. त्यातही अशी टिका झालेली वाचायला मिळेल. तसेच मुंबई महापालिका निवडणुका, खा.रविंद्र गायकवाड विमान कर्मचारी मारहाण प्रकरण या चर्चांमध्येही शिवसेना समर्थकांनी भाजपवर भरपूर टिका केली आहे. उत्तर प्रदेश मधील विधानसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींनी सगळ्या विरोधकांना झोपविल्यानंतर पूर्ण देशातील विरोधी पक्ष थंडावले तोच परिणाम मिपावरही बघायला मिळत असावा :) या गोष्टी बर्‍याच अंशी सिझनल असतात. समजा पंजाबमध्ये आपला यश मिळाले असते तर आपसमर्थकांना चेव चढला असता. तसेच मोदींनी कुठली महत्वाची चूक केली आणि त्याचे पडसाद कुठल्या निवडणुकांमध्ये उमटले तर परत विरोधी पक्ष सक्रीय होतील. सध्या मिपावर भाजपविरोधी मंडळी विशेष लिहित नसली तर त्याविषयी माझ्यासारखे काहीच करू शकणार नाहीत. असे सदस्यही लिहिते व्हावेत असे मात्र नक्कीच वाटते. गेल्या काही वर्षापासून बरेच विरोधी सदस्य 'तिकडे' गेले आहेत. तेव्हा विरोधी मते वाचायची असतील तर इकडच्या नाही तरी 'तिकडच्या' चर्चांमधून वाचायला मिळतील असे वाटते. पुरोगामी विचारवंती वातावरणात माझा तरी जीव घुसमटतो म्हणून मी तिकडे जाणे चारेक वर्षांपासून सोडून दिले आहे तेव्हा तिकडे लेटेस्ट काय चालू आहे याची कल्पना नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

बॅटमॅनबाबत सहमत. थत्तेचाचा सोयीस्कर पिंका टाकून विषयांतर करतात आणि स्वत:वर शेकले की उत्तरे देत नाहीत असे अलिकडचे निरीक्षण आहे. तसेही थत्तेचाचा "मिपावर यावेसे वाटत नाही.. यावेसे वाटत नाही" असा अनेकदा बोललेले वाचले आहे, त्यामुळे त्यांना सिरीयस चर्चेमध्ये रस असेल असे वाटत नाही.

In reply to by मोदक

थत्तेचाचा सोयीस्कर पिंका टाकून विषयांतर करतात आणि स्वत:वर शेकले की उत्तरे देत नाहीत असे अलिकडचे निरीक्षण आहे. त्यांची आत्यंतिक कॉन्ग्रेस प्रेमी मते त्यांना बर्‍याचदा पेचात टाकत. पण ते फारच अभ्यासू लिहायचे. जसे श्रीगुरुजी आणि ट्रुमन यांची चर्चा वाचायला मिळते तसे थत्तेचाचा आणि इंद्रराज पवार यांचे वादविवाद फार रंगत असत. मिपाच्या सुरुवातीच्या काळातल्या इथल्या राजकीय चर्चा त्यांच्या अभ्यासपूर्ण, कॉन्ग्रेसप्रेमी प्रतिसादांशिवाय अपूर्णच ठरतील. असो. विषयांतर होईल.

In reply to by वीणा३

सहमत! मी सुद्धा आजकाल इथे चक्कर मारुन जाते. हा धागा सातत्याने अपडेट केला जातो, नवीन काढला जातो. बरीच माहिती कळते. ज्यांना इतर पक्षाबद्दल लिहायचंय त्यांना लिहायला मिपा तितकंच उपलब्ध आहे जितकं ट्रुमन आणि श्रीगुरुजींना. इतकी लोकशाही असताना पोटात दुखण्याचे कारणच काय खरं तर.. पण असो..

In reply to by पिलीयन रायडर

ज्यांना इतर पक्षाबद्दल लिहायचंय त्यांना लिहायला मिपा तितकंच उपलब्ध आहे जितकं ट्रुमन आणि श्रीगुरुजींना. इतकी लोकशाही असताना पोटात दुखण्याचे कारणच काय खरं तर.. पण असो.. +११

In reply to by वीणा३

एकूण काय, मिसळपाव वर पण बीजेपी ला चांगला विरोधी पक्ष नाहीये>>> ==>> मिपावर सुद्धा प्रबळ विरोधीपक्ष आणि निपक्ष सदस्य आहेत फक्त मिपाकर हुशार असल्या कारणाने जे विरोधीपक्ष मोदीसरकारला उठसुठ विरोधकरून चुका करत आहेत, ते कदाचित तो प्रकार इथे करत नाहीत. या मंडळींकडे भाजपकडे झुकलेलीच मतं आहेत हे उमगणे सुद्धा नसे थोडके. बाकी जनता सुज्ञ आहे, या वर माझा नितांत विश्वास आहे.

In reply to by विशुमित

भाजपीय नेते आणि समर्थक बोलण्यात /लिहण्यात पटाईत आहेत, यामध्ये काही दुमत नाही. एखादी गोष्ट इतकूस असली तरी ती फुगवून बडा चढाके कसे लोकांच्या गळी उतरायचं यात त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही. बऱ्याच वेळा आरसा दाखवून सुद्धा फक्त सोयीच्या प्रश्नांना उत्तरे द्याची आणि अडचणीत आणणाऱ्या प्रश्नांना बगल द्याची ही त्यांची कार्यपद्धती. नाहीतर मागील ६० वर्षातील एखादे अप्रासंगिक उदाहरण देऊन सध्य काळातील प्रश्नांना फाट्यावर मारून द्यायची. पण कामाच्या बाबतीत आउटपुट काय शून्य. नाहीतर २०१९-२०२४ची गाजरं दाखवायची. माझ्या मते भाजप/मोदी विरोधकांनी पेशियन्स ठेवून या सरकारला राहिलेले २/३ वर्ष किंवा अजून एक टर्म सरकार चालवून द्यावे. काय त्यांना करायचंय ते करून द्यावे. आखा भारत काबीज करू देत, हिंदुराष्ट्र येऊ देत, सुशासन येऊ देत, शेतकऱ्यांचं वाटोळे/कर्जमुक्ती करू देत, भटजी-शेटजीचे कल्याण होऊ देत, अल्पसंख्यांकांच्या किडा बसवू देत, पाकिस्तान निस्तनाबुद करू देत, काश्मीरचा बच्चा बच्चा ठेचून काढू देत किंवा चीनचा पार भुगा करू देत. विरोधकांनी शांत बसून हे पाहत राहावे. जनतेला आपोआप सगळे पटेल. निदान त्या नंतर पुढील ५० वर्ष तरी लोक यांच्या भूल थापांना बळी पडणार नाहीत.

In reply to by विशुमित

नाहीतर मागील ६० वर्षातील एखादे अप्रासंगिक उदाहरण देऊन चला, म्हणजे गांधी / नेहरू खानदानाने देश चालवताना अप्रासंगिक उदाहरणे तयार केली आहेत हे किमान मान्य केलेत..! माझ्या मते भाजप/मोदी विरोधकांनी पेशियन्स ठेवून या सरकारला राहिलेले २/३ वर्ष किंवा अजून एक टर्म सरकार चालवून द्यावे. काय त्यांना करायचंय ते करून द्यावे. हे वाक्य टिपीकल सरंजामशाही वृत्तीचे प्रतीक आहे. विरोधक कोण आहेत जे सरकार चालू देणार..? सामान्य मतदार भाजपाला आघाडीचे सरकार म्हणून निवडून देतो आहे. मग "विरोधी पक्षाने सरकार चालवून द्यावे" म्हणजे नक्की काय करावे..? विरोधी पक्ष पूर्वी सत्तेत बसला होता आणि आता बुडाखालची खुर्ची गेली आहे हे मान्य का होत नाहीये..? आखा भारत काबीज करू देत, हिंदुराष्ट्र येऊ देत, सुशासन येऊ देत, शेतकऱ्यांचं वाटोळे/कर्जमुक्ती करू देत, भटजी-शेटजीचे कल्याण होऊ देत, अल्पसंख्यांकांच्या किडा बसवू देत, पाकिस्तान निस्तनाबुद करू देत, काश्मीरचा बच्चा बच्चा ठेचून काढू देत किंवा चीनचा पार भुगा करू देत. अजुन एक टर्म मध्ये इतके सगळे जर केलेच तर विरोधक नक्की कोणत्या भूलथापांबद्दल बोलणार ते तरी सांगा.

In reply to by मोदक

विरोधी पक्ष पूर्वी सत्तेत बसला होता आणि आता बुडाखालची खुर्ची गेली आहे हे मान्य का होत नाहीये..?>>> ==> माझा ही तोच मुद्दा आहे. विरोधकांनी हे मान्य करून मतदारांच्या कौलाचा आदर केला पाहिजे. एकदा त्यांच्या मनासारखे होऊ देत. नंतर दूध का दूध और पाणी का पाणी जनतेला दिसेलच. अजुन एक टर्म मध्ये इतके सगळे जर केलेच तर विरोधक नक्की कोणत्या भूलथापांबद्दल बोलणार ते तरी सांगा.>>> ==> करू तर देत पहिले त्यांना मग बोलू.

In reply to by वीणा३

श्री-गुरुजी पूर्णपणे भाजप कडे झुकलेले असले तरी, ट्रुमन साहेब सगळ्याच बातम्या देतायत. भाजप ला नावं पण ठेवतायत, विरोधी पक्ष कुठेच दिसत नाहीये त्याकडे पण लक्ष देतायत, मध्ये कोणी राजकारणी स्वर्गवासी झाले तर त्याची पण माहिती देतायत. जर कोणी इतर पक्षाचे समर्थक अशा प्रकारे फॅक्टस + त्यांचे त्या-त्या पक्षाचे बायस्ड मत इथे मिसळपाव वर देऊ शकले तर वाचायला खरंच आवडेल. आत्ता बरेच कुंपणावरचे लोक ज्यांना कुठल्याच पक्षाविषयी जवळीक नाहीये ते फक्त भाजप कडे झुकलेली मतच वाचतायत इथे. मी भाजपच्या प्रत्येक भूमिकेचे समर्थन करीत नाही. नुकतेच झालेले बिहार प्रकरण व त्यापूर्वी भाजपने गोव्यात व मणीपूरमध्ये स्थापन केलेले सरकार याविरोधात मी लिहिले होते. इथे इतर पक्षांचे समर्थकसुद्धा आहेत. २०१४-१५ मध्ये केजरीवाल समर्थकांनी इथे अनेक धागे काढले होते व त्यावर तुंबळ युद्ध झाले होते. परंतु 'आपलाच दाम खोटा' निघाल्यामुळे ते आता केजरीवालांचे समर्थन करण्यापासून लांब राहतात. इथे एकजण राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक आहेत. इथे शिवसेनेचे कट्टर समर्थक सुद्धा अनेक आहेत. रवींद्र गायकवाड किंवा नुकत्याच येऊन गेलेल्या शिवसेनेच्या धाग्यावर सेना समर्थकांनी सेनेचे हिरिरीने समर्थन केले होते. पूर्वी काही जण मनसेचे समर्थक होते. परंतु त्यांचाही दाम खोटा निघाला, त्यामुळे तेही आता लिहीत नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

गुरूजी.. तुम्ही अनेकदा नको त्या गोष्टीचे पण समर्थन करता त्यामुळे असे मत तयार झाले असावे. इथे इतर पक्षांचे समर्थकसुद्धा आहेत. २०१४-१५ मध्ये केजरीवाल समर्थकांनी इथे अनेक धागे काढले होते व त्यावर तुंबळ युद्ध झाले होते. परंतु 'आपलाच दाम खोटा' निघाल्यामुळे ते आता केजरीवालांचे समर्थन करण्यापासून लांब राहतात. इथे एकजण राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक आहेत. इथे शिवसेनेचे कट्टर समर्थक सुद्धा अनेक आहेत. रवींद्र गायकवाड किंवा नुकत्याच येऊन गेलेल्या शिवसेनेच्या धाग्यावर सेना समर्थकांनी सेनेचे हिरिरीने समर्थन केले होते. पूर्वी काही जण मनसेचे समर्थक होते. परंतु त्यांचाही दाम खोटा निघाला, त्यामुळे तेही आता लिहीत नाहीत. + २० लाख.

http://abpmajha.abplive.in/mumbai/update-on-traffic-police-related-pil-…
हेड कॉन्स्टेबल सुनील टोके यांनी ट्रॅफिक पोलिसांच्या भ्रष्टाचारासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेची गंभीर दखल घेत, मुंबई उच्च न्यायालयानं याचं जनहीत याचिकेत रुपांतर करण्याचे निर्देश दिलेत. टोके यांनी पोलिसांच्या सेवेत असताना केलेल्या या आरोपांतील तथ्य पडताळून पाहण्यासाठी जनहितार्थ या याचिकेची मोठ्या स्तरावर चर्चा होणे गरजेचं आहे ही भावना हायकोर्टानं व्यक्त केली होती.
http://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/crime/cop-who-exposed-corrupt… http://www.hindustantimes.com/mumbai-news/acb-report-on-no-corruption-i… http://www.dnaindia.com/mumbai/report-curb-corruption-if-you-can-t-stop… लढा चालू ठेवल्याबद्दल सुनील टोके यांचे अभिनंदन. यांचा मेल आयडी कोणाकडे आहे का? मराठी वर्तमानपत्रांत फार काही या केसबद्दल दिसत नाही. "व्हाट्सअप ने काढले नवीन फिचर!" छाप टुकार बातम्या देण्यापेक्षा सखोल अभ्यास करून बातम्या दिल्या तर बरे होईल.

डॉकलाम मध्ये भारत चीन ह्यांच्यात तणाव असतानाच उत्तराखंडच्या बाराहोती परिसरात १० चिनी सैनिकांनी २५ जुलैला घुसखोरी केली होती असे समोर आले आहे. http://economictimes.indiatimes.com/news/defence/chinese-army-entered-u…

In reply to by अभिजीत अवलिया

चिनी सैनिकांची घुसखोरी नवीन नाही. अनेक ठिकाणी भारत व चीन यांच्यातील सीमारेषा पूर्णपणे निश्चित झालेली नाही. याचा फायदा घेऊन चिनी सैनिक अनेकवेळा घुसखोरी करतात व भारताने विरोध करून उच्च पातळीवर चर्चा झाल्यानंतर काही दिवसानंतर परत जातात. यामागे अनेक उद्देश आहेत. भारत किती विरोध करतो याची चाचपणी ते करीत असावेत. तसेच आम्ही मनाला येईल तेव्हा तुमच्या प्रदेशात घुसू शकतो व तुम्ही आम्हाला प्रतिकार करू शकत नाही हे वारंवार दाखवून द्यायचा उद्देश असावा. तसेच भविष्यात सीमेवरील काही प्रदेशावर कब्जा करायचा असल्यास वारंवार त्या प्रदेशात आत जाऊन पाहणी करावी हासुद्धा उद्देश असेल. राजनैतिक पातळीवर आम्ही तुमच्यापेक्षा सामर्थ्यवान आहोत हे वारंवार दाखवून भारताला बचावात्मक भूमिका घ्यायला पार पाडणे हादेखील उद्देश असावा. १९६२ च्या पराभवानंतर भारत सावध आहे. त्यामुळेच भारतीय सैनिकांनी भारत, भूतान व चीन यांच्या सीमेवरील वादग्रस्त त्रिभुज प्रदेशात रस्ते बांधण्यापासून चीनला रोखलेले आहे. त्यामुळे चीनचा तिळपापड झालेला आहे. चीन व भूतान यांच्यात राजनैतिक संबंध नाहीत. चीनला ते सुरू करायचे आहेत. परंतु अजूनपर्यंत तरी त्यात यश आलेले नाही. भारत व भूतान यांच्यातील करारानुसार भूतानचे परराष्ट्र धोरण भारताच्या सल्ल्यानुसार ठरते. तसेच भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी भारतावर आहे. त्यामुळे भूतानच्या वतीने भारताने आपल्याला आव्हान दिले आहे हे चीनला सहन झालेले नाही. मागील दीड महिन्यांपासून चीन सातत्याने आक्रमक भाषा बोलत आहे. मागील दीड महिन्यात चीनने अनेकवेळा भारताला युद्धाची धमकी दिलेली आहे. भारताची अवस्था १९६२ पेक्षा वाईट करू अशीही धमकी आलेली आहे. चीनची सरकारी वृत्तपत्रे 'ग्लोबल टाईम्स' आणि 'चायना डेली' सातत्याने भारताविरूद्ध प्रक्षोभक लेख लिहीत आहेत. १९६२ च्या युद्धाची चित्रे प्रसिद्ध करून भारताला घाबरवून सोडायचा प्रयत्न सुरू आहे. दस्तुरखुद्द चीनचे राष्ट्राध्यक्ष युद्धाची भाषा बोलत आहेत. या सर्व प्रकरणात भारताने अत्यंत प्रगल्भ व ठाम भूमिका घेतलेली आहे. चीनच्या कोणत्याही प्रपोगंडाला उत्तर न देता भारत शांत राहून आपल्या भूमिकेवर ठाम आहे. चीनच्या कोणत्याही धमकीला न जुमानता भारताने आपले सैन्य भूतानच्या सीमावर्ती भागात तयार ठेवले आहे. भारतीय नेतेही बहुतांशी शांत राहून आपले काम करीत आहेत. चीनच्या बर्‍याच धमक्यानंतर अरूण जेटलींनी "भारत आता १९६२ चा भारत राहिलेला नाही" असे सांगून युद्ध झाले तर ते १९६२ प्रमाणे एकतर्फी न होता भारत जोरदार प्रतिकार करेल व त्यात चीनचेही प्रचंड नुकसान होईल हे सूचित केले होते. सुषमा स्वराज यांनी सुद्धा चीनने सैन्य मागे घेतले तरच चर्चा होईल असे सांगून भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. चीन भारत कुरापत काढायची वाट पहात आहे. उत्तराखंडमध्ये घुसखोरी करणे हा त्याच प्रयत्नाचा भाग आहे. भारतीय सैन्याने थोडादेखील प्रतिकार केला तरी ते कारण दाखवून भारतावर हल्ला करायला निमित्त मिळेल याची चीन वाट पहात आहे. सुदैवाने भारताने अतिशय प्रगल्भ व समतोल भूमिका घेतलेली आहे. चीन लष्करीदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या भारतापेक्षा बराच प्रबळ असला तरी भूतकाळाचे ओझे न बाळगता चीनच्या कोणत्याही धमकीला घाबरायचे नाही, चीनच्या प्रक्षोभक प्रचाराला अजिबात उत्तर द्यायचे नाही, कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडून वातावरण पेटेल असे करायचे नाही आणि त्याचवेळी आपले सैन्य मागे न घेता आपल्या भूमिकेवर ठाम रहायचे अशी भारताने अत्यंत योग्य भूमिका घेतलेली आहे. भारत व चीन मध्ये युद्ध होण्याची शक्यता खूप कमी आहे. तसे झाले तर दोन्ही देशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. युद्ध टाळण्यासाठी चीन सातत्याने दबाव वाढवित आहे. आपला दबाव भारत फार काळ सहन करू शकणार नाही व शेवटी दबावामुळे भारत माघार घेईल अशी चीनची अटकळ असावी. चीनबरोबर इतके ताणल्यानंतर भारताने चीनच्या दबावामुळे माघार घेतली तर ती मोठी चूक ठरेल. आपण भारतासारख्या मोठ्या देशाला सुद्धा दबाखाली झुकवू शकतो असा संदेश देण्यात चीन यशस्वी होईल. चीनच्या सीमेवरील इतर १३ लहान देशांनाही हा इशारा असेल व त्यांच्यावरील चीनची दादागिरी अजून वाढेल. त्याचबरोबर भविष्यात भारताला चीनसमोर पुन्हा एकदा पडेल भूमिका घ्यायला लागून भारतीय सैन्याचे व पर्यायाने संपूर्ण देशाचे मनोधैर्य खच्ची होईल. चीनलासुद्धा इतक्या पुढे आल्यानंतर आता माघार घेणे अवघड झाले आहे. त्रिभुज प्रदेशातून सैन्य माघारी घेऊन काम थांबविले तर चीनच्या सैन्याचा व चीनचा दरारा कमी होईल व सीमेवरील इतर छोटे देशसुद्धा चीनच्या नजरेला नजर भिडवून बोलायला लागतील. यामुळे चीनच्या विस्तारवादी हालचालींना काही काळ पायबंद बसेल. एकंदरीच चीनने अट्टाहासाची भूमिका घेऊन स्वतःची व भारताची अडचण करून ठेवली आहे. हा प्रश्न दीर्घकाळ लोंबकळत राहील असा अंदाज आहे.

तसेच भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी भारतावर आहे.
ही चुकीची माहिती आहे असे मला कालच समजले. भारत भूतान मैत्री करारात कुठेही भारत भूतानचे संरक्षण करेल असे म्हटलेले नाही. सध्या देखील भारत मित्रत्वाच्या नात्याने आणि आपल्याच पूर्वोत्तर राज्यांच्या संरक्षणासाठी डोकलाम वादात उतरलाय.

In reply to by अभिजीत अवलिया

बर्‍याच माध्यमातून असेच लिहिले आहे की भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी भारतावर आहे. अर्थात माध्यमातून १००% अचूक लिहिले जाते असे नाही.

In reply to by श्रीगुरुजी

वर ह्याची सविस्तर माहिती आहे . इंडिया भूतान ट्रीटी कश्या बदलत गेल्या याची . माध्यमांतल्या बातम्या वेगळ्या आणि खात्रीशीर बातम्या वेगळ्या . शस्त्रास्त्र पुरवठा भारत करेल , भूतान स्वतः शस्त्रास्त्र बनवून कुठेही निर्यात करू शकणार नाही , भूतान च्या सार्वभौमत्वाला काही दगा झाला तर भारत सरकार भूतान सरकार कडून काही मुद्द्यावर ग्वाही घेऊन सर्व शस्त्रास्त्र पुरवठा करेल असे अनेक मुद्दे आहेत त्यात . आणि आंतराष्ट्रीय कायद्यात प्रत्येक मुद्दा कुठल्यातरी टर्म्स वर बनतो . अपवाद व्हॅटिकन सिटी .(संरक्षणाच्या बाबतीत म्हणायचे झाले तर )

अभिजीत अवलिया व गॅरी यांच्या प्रतिसादात काही समान मुद्दे असल्याने दोघांना एकत्रित उत्तर देत आहे. राष्ट्रवादीने न मागता पाठिंबा दिला होता ? हा पाठिंबा राष्ट्रवादीने खरोखरच न मागता दिला होता असे मला तरी वाटत नाही. पडद्याआड भाजप-राष्ट्रवादीमध्ये काहीच बोलणी न होता राष्ट्रवादीने 'महाराष्ट्रात स्थिर सरकार यावे या उदात्त हेतूने' भाजपला पाठिंबा जाहिर केला यावर फार कोणी विश्वास ठेवणे कठिण आहे. मतदार तितके भाबडे नक्कीच नाहीत. राष्ट्रवादीने २०१४ मध्ये निवडणुक निकालांच्या दिवशी दुपारी अचानक भाजपला पाठिंबा का दिला असावा हे तसे एक गूढच आहे. त्यामागे २-३ वेगवेगळी कारणे असावीत. १) भाजपला पाठिंबा दिला तर भाजप आपल्या पक्षातील नेत्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार नाही अशा समजूतीने पाठिंबा दिला असावा. २) निवडणुकपूर्व प्रचारात भाजप व शिवसेना यांच्यातील संबंध रसातळाला गेले होते. विशेषत: शिवसेनेने भाजपविरूद्ध अत्यंत जहरी भाषा वापरली होती. त्यामुळे निवडणुकीनंतर हे दोघे भविष्यात कधीच एकत्र येणार नाहीत अशी पवारांची समजूत झालेली असावी. अशा परिस्थितीत आपण बाहेरून पाठिंबा दिला तर आपल्याला हवे तसे या सरकारला नाचविता येईल व भविष्यात सरकारमध्येही सामील होऊन सत्तेची फळे चाखता येतील हा पाठिंबा देण्यामागे हेतू असावा. तसेच वेळ पडल्यास आपल्या सोयीने पाठिंबा काढून घेऊन सरकार पाडून मध्यावधी निवडणुक घेण्यास भाग पाडता येईल अशीही समजूत असावी. आपल्या विरूद्ध सातत्याने बोलणार्‍या भाजपने आपलाच पाठिंबा घेतला तर भाजपबद्दल जनतेत अतिशय वाईट मत होईल व असे सरकार काही काळाने पाडले तर आपल्याला फारसा तोटा न होता भाजपलाच सर्वाधिक फटका बसेल असेही त्यामागे गणित असावे. ३) अजून एक वेगळी शक्यता म्हणजे न मागता पाठिंबा देऊन त्याबदल्यात काही मागण्या पदरात पाडून घ्याव्यात अशी एक योजना असावी. आपल्या नेत्यांना भविष्यात भ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचवावे हा एक हेतू असणारच. त्याचवेळी असेही वाचण्यात आले होते की मुख्यमंत्रीपदावर खडसे किंवा फडणवीस किंवा इतर कोणी येण्याऐवजी गडकरींना मुख्यमंत्री करावे यासाठी पवार गुपचूप काही भाजप नेत्यांबरोबर दिल्लीत फिल्डींग लावत होते. इतर कोणापेक्षाही गडकरींना मॅनेज करणे सोपे जाईल अशी त्यांची समजूत असावी. शिवसेना तुम्हाला अजिबात पाठिंबा देणार नाही. आम्ही बाहेरून बिनशर्त पाठिंबा देऊ. परंतु त्याबदल्यात तुम्ही गडकरींना मुख्यमंत्री करा अशी काहीतरी त्यांची मागणी होती असे वाचले होते. पवारांच्या दुर्दैवाने मोदी, शहा व फडणवीस त्यांच्यापेक्षाही वरचढ निघाले. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर मौन बाळगून मोदी-शहांनी फडणवीसांना मुख्यमंत्री बनविले व शेवटी शिवसेनेला पाठिंबा द्यायला भाग पाडले. त्यामुळे पवारांची खेळी फसली. काहीच फरक नाहीये. जिथे सत्ता तिथे आम्ही हे सगळ्या पक्षांचे सूत्र असते. त्याला जनकल्याणाचा मुलामा चढवला की झाले. भाजप हा नावाला 'पार्टी विथ डिफरन्स' आहे. जो पक्ष गोव्यासारख्या अत्यंत छोट्या राज्याची सत्ता मिळावी म्हणून संरक्षण मंत्र्याला परत पाठवतो आणि हे महत्वाचे खाते कामचलाऊ असल्यासारखे चालवतो त्याच्याकडून बिहारच्या सत्तेचा मिळत असलेला घास सोडला जाईल हे अपेक्षित न्हवतेच. बिहार मॉडेलप्रमाणे सपा-बसपा २०१९ मध्ये खरोखरच एकत्र आले तर (ही शक्यता बरीच आहे) ही आघाडी (बिहारमध्ये झाले त्याप्रमाणे) लवकरच तुटणार म्हणून त्यांना मिळणार्‍या मतांची बेरीज न होता त्यांची बरीच मते कापली जावीत या उद्देशाने भाजपने हा उद्योग केला आहे असे मला वाटते हेच मी ४-५ वेळा लिहिले आहे. उत्तर प्रदेशात २०१७ मध्ये ही युती झाली नाही म्हणून २०१९ मध्येही होणारच नाही आणि राष्ट्रपती निवडणुकांमध्ये विरोधकांमध्ये फाटाफूट झाली हा विरोधक एकजिनसी नसल्याचा पुरेसा संदेश आहे असे मला तरी वाटत नाही. त्यापेक्षा बराच जास्त मोठा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवायला हवा आणि त्यासाठी बिहारमध्ये झाले ते चांगलेच झाले असे मला वाटते. बिहारमध्ये जे झाले व त्यापूर्वी गोवा व मणीपूर मध्ये जे झाले ते अयोग्य होते हे मी यापूर्वीच लिहिले आहे. राजकारण कितीही वाईट असले तरी तिथे थोडी तरी नीतिमत्ता असायला हवी असे माझे मत आहे. २०१३ पासून सातत्याने भाजपवर कठोर टीका करणार्‍या व भाजपशी विश्वासघात करणार्‍या नितीशकुमारांना भाजपने काही मिनिटांत पाठिंबा देणे अयोग्य होते. याच न्यायाने उद्या भाजप केजरीवालांशीही हातमिळवणी करू शकेल. लालू व नितीश ही युती २०१९ पूर्वीच तुटण्याची बरीच शक्यता होती. तसे होताना नितीशकुमारांची विश्वासार्हता जवळपास पूर्ण नष्ट झाली असती व त्याचा फायदा भाजपला झाला असताच. त्यांची युती तुटण्याची वाट न बघता भाजपने घाई करून नितीशकुमारांना पाठिंबा देऊन सत्तेत घुसायची घाई केली. कालपरवा बिहार मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. त्यात जदयुचे १४, भाजपचे ११ आणि भाजपचा मित्रपक्ष असलेल्या लोजपचा १ असे नवे मंत्री समाविष्ट करण्यात आले. तसेच भाजपचे मंगल पांडे पाटण्यात उपस्थित नसल्यामुळे त्यांना शपथ घेता आली नाही. त्यांचाही मंत्रीमंडळात लवकरच समावेश होईल. म्हणजे जदयुचे १४ आणि भाजप+ मित्रपक्षांचे १३ मंत्री आहेत. म्हणजे भाजपला पूर्वीइतके दुय्यम स्थान दिले गेलेले नाही. राज्यसरकार हे मुख्यमंत्र्यांच्या नावाने ओळखले जाते. त्यामुळे कोणत्याही सरकारची बरीवाईट कामगिरी ही मुख्यमंत्र्याच्या खात्यात जमा होते. त्यामुळे भाजपचे पूर्वीपेक्षा जास्त मंत्री असले तरी हे सरकार नितीशकुमारांचे म्हणूनच ओळखले जाणार. मंत्रीमंडळाचे कोणतेही निर्णय हे त्यांच्या मान्यतेनुसारच होणार. त्याअर्थाने भाजप अजूनही दुय्यम भूमिकेतच आहे. तसेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांनी राज्यातील ४० पैकी ३१ लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी २५ जागा स्वतः भाजपच्या आहेत. या जागा भाजप सोडायला तयार होईल ही शक्यता बरीच कमी. तेव्हा जदयुला जास्तीतजास्त ९ (किंवा लोजपसारख्या मित्रपक्षांना जदयुच्या तिकिटावर निवडणुक लढवायला लावून जास्तीत जास्त १५) जागा लढवायला मिळू शकतील. पूर्वी जदयु २५ आणि भाजप १५ जागांवर निवडणुक लढवत असे. ते आकडे बरोबर उलटे होतील ही शक्यता जास्त. जर युती तुटली तर २०१९ मध्ये लोकसभेच्या जागावाटपाच्या प्रश्नावरून तुटायचा संभव आहे. आणि त्यातही अमित शहा शिवसेनेला शेवटपर्यंत झुलवत ठेवले होते तसे झुलवत ठेऊन नितीशकुमारांची बार्गेनिंग पॉवर कमी करतील कारण अगदी ऐनवेळी नितीशनी युती तोडली तर भाजप-जदयु-राजद अशी तिरंगी लढत होऊन परत २०१४ ची पुनरावृत्ती होईल हे नितीशकुमारांना कळणार नाही असे नाही. सध्या भाजपचे बिहारमध्ये २५ नसून २२ खासदार आहेत. ७ खासदार लोकजनशक्ती व २ खासदार उपेंद्र कुशवाहच्या पक्षाचे आहेत. समजा ही नवीन युती २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत टिकली तर संजदला जास्तीत जास्त ९ जागा लढवायला मिळू शकतात. यापूर्वी ४० पैकी २५ जागा लढविणारा संजद २०१९ मध्ये फक्त ९ जागांवर समाधान मानेल असे वाटत नाही. समजा संजदला जास्त जागा द्यायच्या तर त्यातील जास्तीत जास्त जागा भाजपच्या कोट्यातून द्यावा लागतील. म्हणजे एका अर्थाने भाजप स्वतःचे नुकसान करून घेणार. समजा जागावाटपावरून युती तुटली तर पुन्हा एकदा संजदच्या बरोबरीने भाजपची विश्वासार्हताही कमी होणार.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी, तुम्ही राष्ट्रवादीने २०१४ मध्ये निवडणुक निकालांच्या दिवशी अचानक भाजपला पाठिंबा का दिला असावा हे त्याची वेगवेगळी कारणे तुमच्या अंदाजे सांगितलीत. शेवटी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर मौन बाळगून मोदी-शहांनी फडणवीसांना मुख्यमंत्री बनविले व शेवटी शिवसेनेला पाठिंबा द्यायला भाग पाडले असेही म्हणालात. --> तुम्ही अजूनही पवारांनी भाजपाला स्व:खुशीने मदत केली असे गृहीत धरत आहात. माझा अंदाज असा आहे -> निवडणूक निकाल लागल्यानंतर कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले न्हवते. आपण जर लगेच शिवसेनेकडे युतीचा प्रस्ताव ठेवला तर त्यांना बरीच महत्वाची पदे द्यावी लागलील हे भाजपच्या लक्षात आले. तेव्हा शिवसेनेचे खच्चीकरण करण्यासाठी भाजपा+राष्ट्रवादीने पडद्यामागे हालचाली केल्या. राष्ट्रवादीने महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी (?) स्थिर सरकार हवे अशा उदात्त हेतूने भाजपाला पाठिंबा द्यायचा असे वरकरणी घोषित करायचे असे ठरले असावे. त्याबदल्यात राष्ट्रवादीच्या महत्वाच्या बगलबच्च्यांवर सरकारने कोणतीही कारवाई करायची नाही असे डील झाले असावे. त्यामुळे सिंचन घोट्याळातील पुरावे भरलेला ट्रक परत कुठे दिसलाच नाही. माझा आक्षेप ह्या पाठिंब्याला आहे. जरी राष्ट्रवादीने स्व:खुशीने पाठिंबा दिला होता असे एकवेळ मानले तरी भाजपाने तो का घेतला हा माझा प्रश्न आहे. संपूर्ण निवडणुक प्रचार काळात भाजपाने राष्ट्रवादीवर NCP म्हणजे Naturally Corrupt पार्टी, हे राष्ट्रवादी नाही, हे तर भ्रष्ट्रवादी अशी टिका केली होती. राष्ट्रवादीचे १०-१० चे घड्याळ म्हणजे त्यांनी गेल्या १० वर्षात भ्रष्टाचार १० पट वाढवला आणि अजून सत्तेत आले तर १५ पट वाढवतील असे पंतप्रधानांचे मत होते. (दुवा - http://timesofindia.indiatimes.com/home/specials/assembly-elections-201… ) मग इतक्या भ्रष्ट पक्षाचा पाठिंबा जरी राष्ट्रवादीने स्वत:हुन दिला असे समजले तरी 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' अशी जाहिरात करून स्वच्छ कारभाराची हमी देणार्या भाजपने घेतला तर हा जनतेचा विश्वासघात न्हवता का?
भाजपशी विश्वासघात करणार्‍या नितीशकुमारांना भाजपने काही मिनिटांत पाठिंबा देणे अयोग्य होते. भाजपने घाई करून नितीशकुमारांना पाठिंबा देऊन सत्तेत घुसायची घाई केली.
इथे पण तुम्ही नेहमीप्रमाणे सोईस्कर भूमिका घेतली आहे. जसे काही नितीशकुमारांनी तडकाफडकी राजीनामा दिला. हे समजल्यानंतर पंतप्रधानांना नितीशकुमारांच्या भ्रष्टाचार विरोधी लढ्याचे कौतुक वाटले आणि ५ मिनिटात त्यांनी ट्विटर वरून नितीश कुमारांचे अभिनंदन केले. नंतर ह्या भ्रष्टाचार विरोधी उदात्त लढ्यात सामील झाल्याबद्दल लगेच नितीशकुमारांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाला. इथे जितके ढोंगी नितीश आहेत तितकाच ढोंगी भाजप देखील. मोदीना २०१९ साली कुणीही आव्हान देऊ शकणार नाही असे परवा नितीश म्हणाले. आणि हेच कारण होते नितीशकुमारांचे महागठबंधंन सोडून भाजपच्या कळपात शिरण्याचे. तसे पण किमान २०२४ पर्यंत केंद्रात सत्ता बदल होईल असे वाटत नाही. मग पराभूतांचा राजा होण्यापेक्षा विजेत्यांच्या कळपात शिरून निदान मुख्यमंत्रीपदी तरी कायम राहू हा सोईस्कर विचार. कारण इतकाच जर त्यांना भ्रष्टाचाराचा तिटकारा होता तर मुळात लालू यादवांशी हातमिळवणी केलीच नसती. हा संधीसाधूपणा जसा नितीशकुमारांनी केला तसेच बिहारची सत्ता मिळतेय म्हटल्यावर हावऱ्यासारखी ती घेण्याचा भाजपाने देखील केला. पण तुम्ही फक्त नितीश विश्वासघातकी, पवार विश्वासघातकी, काँग्रेस विश्वासघातकी असे उच्चं आवाजाने बोलता पण भाजपाने हे जे विश्वासघात केलेत त्याबद्दल फक्त 'भाजपाने चूक केली हा' अशी सौम्य भाषा वापरता. हे म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशी भूमिका आहे. कुणी कशी भूमिका घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण दाखवून द्यावेसे वाटले इतकेच.

In reply to by अभिजीत अवलिया

पण तुम्ही फक्त नितीश विश्वासघातकी, पवार विश्वासघातकी, काँग्रेस विश्वासघातकी असे उच्चं आवाजाने बोलता पण भाजपाने हे जे विश्वासघात केलेत त्याबद्दल फक्त 'भाजपाने चूक केली हा' अशी सौम्य भाषा वापरता. हे म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशी भूमिका आहे.
+१

In reply to by अभिजीत अवलिया

तुम्ही अजूनही पवारांनी भाजपाला स्व:खुशीने मदत केली असे गृहीत धरत आहात. माझा अंदाज असा आहे -> निवडणूक निकाल लागल्यानंतर कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले न्हवते. आपण जर लगेच शिवसेनेकडे युतीचा प्रस्ताव ठेवला तर त्यांना बरीच महत्वाची पदे द्यावी लागलील हे भाजपच्या लक्षात आले. तेव्हा शिवसेनेचे खच्चीकरण करण्यासाठी भाजपा+राष्ट्रवादीने पडद्यामागे हालचाली केल्या. राष्ट्रवादीने महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी (?) स्थिर सरकार हवे अशा उदात्त हेतूने भाजपाला पाठिंबा द्यायचा असे वरकरणी घोषित करायचे असे ठरले असावे. त्याबदल्यात राष्ट्रवादीच्या महत्वाच्या बगलबच्च्यांवर सरकारने कोणतीही कारवाई करायची नाही असे डील झाले असावे. त्यामुळे सिंचन घोट्याळातील पुरावे भरलेला ट्रक परत कुठे दिसलाच नाही. माझा आक्षेप ह्या पाठिंब्याला आहे. जरी राष्ट्रवादीने स्व:खुशीने पाठिंबा दिला होता असे एकवेळ मानले तरी भाजपाने तो का घेतला हा माझा प्रश्न आहे. कारण असे असण्याची बरीच शक्यता आहे. अर्थात इतरही काही शक्यता आहेत, परंतु मला हीच शक्यता सर्वाधिक आहे असे वाटते. मी वर लिहिल्याप्रमाणे निवडणुक प्रचाराच्या काळात सेना-भाजप संबंध इतके विकोपाला गेले होते की निकालानंतर हे दोन्ही पक्ष अजिबात एकत्र येणार नाहीत असे पवारांना वाटले असावे. अशा परिस्थितीत आपण बाहेरून पाठिंबा जाहीर करून आपल्याला एका दगडात अनेक पक्षी मारता येतील असे त्यांचे गणित असावे. आपल्या पाठिंब्यामुळे आपल्याविरूद्ध असलेली भ्रष्टाचाराची प्रकरणे लांबणीवर टाकली जातील, आपला पाठिंबा स्वीकारला तर आपले काही नुकसान नाही परंतु भाजपची बदनामी होईल, आपला पाठिंबा नाकारला भाजपला शिवसेनेच्या नाकदुर्‍या काढाव्या लागतील म्हणजेच आपला पाठिंबा स्वीकारला किंवा नाकारला तरी भाजपची अडचणच होऊन भविष्यात भाजपला तोटा होईल, आपल्याला जेव्हा सोयिस्कर परिस्थिती निर्माण होईल तेव्हा पाठिंबा काढून घेऊन मध्यावधी निवडणुक लादता येईल व त्यावेळी भाजपला भरपूर तोटा होऊन आपल्याला फायदा होऊ शकेल असे काहीतरी गणित त्यांच्या मनात असावे. शिवसेनेचे खच्चीकरण करण्यासाठी राष्ट्रवादीने पाठिंबा दिला यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही, कारण शिवसेना पूर्ण खच्ची झाली तर कॉग्रेस/राष्ट्रवादी विरोधी मते भाजपकडे एकवटतील. तसेच जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत शिवसेना आपल्यापेक्षा जास्त कट्टर विरोधकाची भूमिका पार पडेल हे पवारांनी ओळखले होते. भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेचे खच्चीकरण होऊन देणे काँग्रेस/राष्ट्रवादीला परवडण्यासारखे नव्हते. त्यामुळे ही शक्यता निकालात निघते. फडणविसांनी मागील ३ वर्षात राष्ट्रवादी व काँग्रेसच्या काही नेत्यांच्या भ्रष्टाचारावर नक्कीच कारवाई केलेली आहे. परंतु सिंचन घोटाळ्याची चौकशी फार वेगाने सुरू नाही असी दिसते आहे. माझ्या मते ही चौकशी म्हणजे फडणविसांनी हातात ठेवलेला हुकुमाचा एक्का आहे. २०१९ पूर्वी निवडणुकीच्या आधी काही काळ या चौकशीला वेग येऊन अजित पवार, तटकरे हे सुद्धा भुजबळ चाचा-भतीजांप्रमाणे, रमेश कदम इ. प्रमाणे आत जातील असा माझा अंदाज आहे. अर्थात निवडणुकीवर डोळा ठेवून आपल्याला सोयीचे असेल तेव्हा कारवाई करणे हे निश्चितच अयोग्य आहे. जरी राष्ट्रवादीने स्व:खुशीने पाठिंबा दिला होता असे एकवेळ मानले तरी भाजपाने तो का घेतला हा माझा प्रश्न आहे. मग इतक्या भ्रष्ट पक्षाचा पाठिंबा जरी राष्ट्रवादीने स्वत:हुन दिला असे समजले तरी 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' अशी जाहिरात करून स्वच्छ कारभाराची हमी देणार्या भाजपने घेतला तर हा जनतेचा विश्वासघात न्हवता का? भाजपने जसा पाठिंबा नाकारला नव्हता, तसाच तो स्वीकारलाही नव्हता. पाठिंब्याविषयी पूर्ण मौन पाळून भाजपने सरकार स्थापन केल्यामुळे शिवसेनेचा धीर सुटला व त्यामुळे सेना सत्तेत सहभागी झाली. २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसला १४५ तर भाजपला १३८ जागा मिळाल्या होत्या. भाजपची एकूण संख्या मित्रपक्षांसहीत १८७ होती तर काँग्रेसची एकूण संख्या मित्रपक्षांसहीत २१० च्या आसपास होती (२००४ मध्ये भाजपला हरवून काँग्रेसने विजय मिळविला हा प्रचार एक मोठा विनोद आहे कारण ५४३ सदस्यांच्या लोकसभेत दोन्ही पक्षांच्या सदस्यसंख्येत फक्त ७ चा फरक होता व दोन्ही पक्ष बहुमतापासून प्रचंड लांब होते). काँग्रेसने नंतर अजून काही मित्रपक्षांचा पाठिंबा मिळविला. त्यात भर म्हणजे ६२ जागा जिंकणार्‍या डाव्या पक्षांनीही काँग्रेसला बाहेरून पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे काँग्रेसच्या समर्थक खासदारांची संख्या ३१० च्या पुढे जाऊन पोहोचली. आता काँग्रेसला इतर कोणाचीही गरज नव्हती. त्या निवडणुकीत सपने ३५ जागा जिंकल्या होत्या. मुलायमसिंगने १९९९ मध्ये वाजपेयींचे सरकार १ मताने पडल्यानंतर सरकार स्थापन करण्यासाठी सोनिया गांधींच्या परकीय जन्माचा मुद्दा उपस्थित करून पाठिंबा देण्याचे नाकारले होते. सोनिया गांधी ते विसरल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांनी २००४ मध्ये सपकडे पूर्ण दुर्लक्ष केले. सत्ता स्थापनेपूर्वी त्यांनी काँग्रेससमर्थक पक्षांची बैठक बोलाविली होती. त्यात अर्थातच सपला निमंत्रण नव्हते. निमंत्रण नसताना सुद्धा मुलायम सिंगने स्वतःहून आपल्या पक्षाच्या वतीने अमरसिंगला बैठकीसाठी पाठविले. सोनिया गांधींनी बैठकीला आलेल्या अमरसिंगची दखलही घेतली नाही. आपल्या भाषणात त्यांनी पाठिंबा देणार्‍या सर्व पक्षांचे आभार मानले, परंतु त्यात सपचा उल्लेख नव्हता. आपल्या पक्षाचा उल्लेख नसल्याचे पाहून अमरसिंगांनी हात वर करून "हम भी है आपके साथमें" असे ओरडून सांगितले होते. अर्थात सोनिया गांधींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे सुरू ठेवले. नंतर २००८ पर्यंत सप संसदेत स्वतःहून संपुआ सरकारला पाठिंबा देत होता परंतु त्यांना संपुआत घेतलेले नव्हते. सोनिया गांधींनी त्यांचा पाठिंबा स्वीकारला नाही आणि नाकारला पण नाही. फक्त योग्य वेळी म्हणजे २००८ मध्ये विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी त्यांच्या पाठिंब्याचा उपयोग करून घेतला. फडणविसांनी राष्ट्रवादीने स्वतःहून दिलेल्या पाठिंब्याचा स्वीकार न करता आणि न नाकारता त्याबद्दल मौन पाळून सेनेला नमविण्यासाठी असाच उपयोग करून घेतला. इथे पण तुम्ही नेहमीप्रमाणे सोईस्कर भूमिका घेतली आहे. जसे काही नितीशकुमारांनी तडकाफडकी राजीनामा दिला. हे समजल्यानंतर पंतप्रधानांना नितीशकुमारांच्या भ्रष्टाचार विरोधी लढ्याचे कौतुक वाटले आणि ५ मिनिटात त्यांनी ट्विटर वरून नितीश कुमारांचे अभिनंदन केले. नंतर ह्या भ्रष्टाचार विरोधी उदात्त लढ्यात सामील झाल्याबद्दल लगेच नितीशकुमारांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाला. इथे जितके ढोंगी नितीश आहेत तितकाच ढोंगी भाजप देखील. मोदीना २०१९ साली कुणीही आव्हान देऊ शकणार नाही असे परवा नितीश म्हणाले. आणि हेच कारण होते नितीशकुमारांचे महागठबंधंन सोडून भाजपच्या कळपात शिरण्याचे. तसे पण किमान २०२४ पर्यंत केंद्रात सत्ता बदल होईल असे वाटत नाही. मग पराभूतांचा राजा होण्यापेक्षा विजेत्यांच्या कळपात शिरून निदान मुख्यमंत्रीपदी तरी कायम राहू हा सोईस्कर विचार. कारण इतकाच जर त्यांना भ्रष्टाचाराचा तिटकारा होता तर मुळात लालू यादवांशी हातमिळवणी केलीच नसती. हा संधीसाधूपणा जसा नितीशकुमारांनी केला तसेच बिहारची सत्ता मिळतेय म्हटल्यावर हावऱ्यासारखी ती घेण्याचा भाजपाने देखील केला. पण तुम्ही फक्त नितीश विश्वासघातकी, पवार विश्वासघातकी, काँग्रेस विश्वासघातकी असे उच्चं आवाजाने बोलता पण भाजपाने हे जे विश्वासघात केलेत त्याबद्दल फक्त 'भाजपाने चूक केली हा' अशी सौम्य भाषा वापरता. हे म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशी भूमिका आहे. कुणी कशी भूमिका घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण दाखवून द्यावेसे वाटले इतकेच. २०१७ मध्ये भाजपने गोवा, मणीपूर व उ. प्र. मध्ये (आदित्यनाथांना मुख्यमंत्री बनविणे) घेतलेले राजकीय निर्णय चुकीचे आहेत हे मी पूर्वी अनेकदा लिहिले आहे. मात्र बिहार प्रकरणात भाजपने फक्त चूक केलेली नसून मतदारांचा विश्वासघात केला आहे असे म्हणण्यास माझी मुळीच हरकत नाही.

२०१९ च्या आधी नितीश-लालू युती तुटली असती असे चित्र उभे राहिले कारण आधीपासूनच पडद्याआडून भाजप-जदयु यांच्यात बोलणी सुरू होती असे म्हणायला हरकत नसावी. तेव्हा या घडामोडी झाल्या त्या इतक्या लवकर झाल्या कारण भाजपही मागून पिना मारायचे काम करत होता. ते काम भाजपने केले नसते तर कदाचित नितीशकुमार तसेही महागठबंधनमध्येच राहिले असते ही शक्यता नाही का? म्हणजे हे महागठबंधन २०१९ पूर्वी तसेही तुटले असते असे तुम्हाला वाटते तशी परिस्थिती उभी करण्यात भाजपचाच हात आहे. तो समजा नसता तर नितीश आनंदाने त्या महागठबंधनमध्येच राहिले असते असे म्हणायला जागा नाही का? भाजपने अगदी 'इनोसन्टली' काही मिनिटात नितीशकुमारांना पाठिंबा जाहिर केला होता असे मला तरी वाटत नाही. या नाटकाची पटकथा आधीच ठरलेली होती. त्यातून भाऊ तोरसेकरांनी म्हटल्याप्रमाणे लालूंना दुसर्‍या दिवशी रांचीला चाराघोटाळ्याशी संबंधित सुनावणीसाठी जायचे होते अशा दिवशी संध्याकाळी हे सगळे नाटक घडले म्हणजे स्वतः लालूंना फार काही करता येईल अशी परिस्थिती राहिली नाही. तेव्हा मला वाटते की नितीश महागठबंधनमध्येच २०१९ पर्यंत राहतील ही शक्यता लक्षात घेऊनच भाजपने आधीपासूनच ते महागठबंधन तोडायचे प्रयत्न सुरू केले. आणि नितीशनेही असे तडकाफडकी महागठबंधन तोडले कारण भाजपच्या पाठिंब्याची हमी होती. अन्यथा नितीशकुमारांनी इतकी मोठी जोखीम घेतली असती असे वाटत नाही. तेव्हा २०१९ पूर्वी महागठबंधन तसेही तुटले असते असे तुम्ही म्हणत आहात त्याला ही पार्श्वभूमी आहे.
राज्यसरकार हे मुख्यमंत्र्यांच्या नावाने ओळखले जाते.... समजा जागावाटपावरून युती तुटली तर पुन्हा एकदा संजदच्या बरोबरीने भाजपची विश्वासार्हताही कमी होणार.
त्याप्रमाणेच केंद्रसरकार विशेषतः मोदी सरकार हे पंतप्रधानांच्याच नावाने ओळखले जाते. मोदींची आजची लोकप्रियता २०१९ पर्यंत कायम राहिली तर युती तुटली तरी भाजपवर फार परिणाम व्हायला नको. पण इतर राज्यांमध्ये मतदारांना कोणतीही विरोधकांची आघाडी केवळ मोदीविरोध या नावावर उभी राहिली तर ती कधीच स्थिर होऊ शकणार नाही हा जबरदस्त निर्विवाद संदेश लालू-नितीश फुटल्यामुळे गेलाच आहे. त्यावरही फार परिणाम होऊ नये.

In reply to by गॅरी ट्रुमन

फक्त आणि फक्त मोदी ह्यांच्या जीवावर . तेजस्वी यादव ह्याची वाढती लोकप्रियता ह्याला बऱ्याच अंशी कारणीभूत आहे . गठबंधंन होऊन लालूप्रसाद जर ८० जागा मिळवत असतील तर ह्या पुढील निवडणुकांमध्ये नितीशकुमार अजून खाली जातील . मोदी ह्यांना २०१९ साठी फक्त नितीशकुमारांना आपलेसे करायचे आहे . कारण २८२ जागा आज असल्या आणि सर्व विरोधक एकत्र आले किंवा नितीशकुमार हा त्यांचा स्वच्छ चेहरा म्हणून पुढे करता आला तर मोदींना भारी पडले नसते फार पण उपद्रव मूल्य वाढले असते . त्यामुळे आयकर धाडी . हे सगळे राजकारण काही एका दिवसात नाही शिजत .नितीशकुमारांना आता राज्य हवे आहे आणि मोदींना देश . विरोधक सक्षम नसल्याचे कालखंड पहिले तर भारतीय राजकारणात हि अभूतपूर्व परिस्थिती आहे .पद्धतशीर रित्या विकासपुरुष केलेला प्रचार असो , व विरोधकांना नामोहरम करणे असो. देश आपल्या ताब्यात हवा हे प्रचारतंत्र काँग्रेस च्या १९६९ काळापासून ची आठवण करून देते . फक्त त्या काळी विवेकी लोक होती . आज विवेकी लोक कमी आहेत त्यामुळे राजकारण अजून सोपे झाले आहे . ह्या लाटेवर मोदी प्रत्येक गोष्ट कॅच करून स्वार झालेले आहेत . अवांतर _ मिपावर विरोधी नाही पण समतोल मते देणारे बरेच आहेत हो मिपाकरांनो .आताशी कुठे ३ वर्षे झाली सद्य सरकारला . निवडणूक आहेच कि पुढची बोलायला :))

In reply to by वरुण मोहिते

फक्त त्या काळी विवेकी लोक होती .
म्हणजे कोण? नेते कि मतदार?
मिपावर विरोधी नाही पण समतोल मते देणारे बरेच आहेत हो मिपाकरांनो .
+१००००००००

In reply to by गॅरी ट्रुमन

एकंदरीत २-३ मुद्द्यांवर आपले मतभेद आहेत. १) भाजपने नितीशकुमारला लालूबरोबर युती तोडायला लावून स्वतः पाठिंबा दिला हे २०१९ च्या दृष्टीने योग्य झाले असे तुमचे मत आहे. परंतु भाजपने थोडी नैतिकता दाखवून नितीशकुमारांना पाठिंबा द्यायला नको होता. किंबहुना २०१९ पूर्वीच ही युती त्यातील अंतर्विरोधामुळे तुटलीच असती व अंतिमतः भाजपलाच त्याचा फायदा झाला असता असे माझे मत आहे. २) मतदारांना कोणतीही विरोधकांची आघाडी केवळ मोदीविरोध या नावावर उभी राहिली तर ती कधीच स्थिर होऊ शकणार नाही हा जबरदस्त निर्विवाद संदेश लालू-नितीश फुटल्यामुळे गेलाच आहे, असे तुमचे मत आहे. माझे मत असे आहे की विरोधकांमध्ये एकी नाही हा संदेश यापूर्वी मतदारांना अनेकवेळा गेलेला आहे. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या मतदानातही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. उत्तर प्रदेशातही सप-काँग्रेस युतीबद्दलही निवडणुक संपल्यानंतर उलटसुलट बातम्या येत होत्या. ३) बिहारमध्ये राजद-संजद-काँग्रेस ही युती २०१९ पर्यंत कायम राहील या भीतिने भाजपने ती तोडण्याचा प्रयत्न केला असे तुमचे मत आहे. माझ्या मते ही युती २०१९ पूर्वी तुटण्याची बरीच शक्यता होती. विरोधकांमध्ये एकी नाही हा संदेश त्यावेळी पुन्हा एकदा गेला असता. युती स्वतःहून तुटण्याची वाट न बघता ही युती फोडून स्वत: नितीशबरोबर युती करणे योग्य नव्हते. राजद-संजद-कॉग्रेस युतीत लालूचा बराच हस्तक्षेप होता. लालूला फक्त १०-१२ आमदारांची गरज असल्याने लालू फोडाफोडी करून नितीशचे सरकार पाडून त्याजागी स्वतःच्या पक्षाचे सरकार आणण्याचा प्रयत्न करणार हे नक्की होते. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवची लोकप्रियता बर्‍यापैकी वाढत होती. नितीशकुमार परवा दुसर्‍यांदा शपथ घेताना विधानसभेत तेजस्वी यादवने केलेले भाषण त्याच्या परिपक्वतेची साक्ष देणारे होते. इतक्या लहान वयात त्याने खूपच चांगले भाषण करून नितीशकुमारांना जे बोचकारे काढले त्यावरून भविष्यात त्याचे राजकीय भविष्य उज्ज्वल आहे असा माझा अंदाज आहे. शेवटी नितीशकुमारांना युती तोडावीच लागली असती व त्या परिस्थितीत मध्यावधी निवडणुक किंवा पाठिंब्यासाठी भाजपची विनवणी या दोनच शक्यता होत्या व दोही शक्यता भाजपसाठी जास्त अनुकूल ठरल्या असत्या.

In reply to by श्रीगुरुजी

हे सगळे जर-तरचे खेळ आहेत. या सगळ्या गोष्टी साध्य झाल्या असत्या तर सोन्याहून पिवळे पण इतिहास बघता तसे होणे सहजसाध्य होते असे मला तरी वाटत नाही. १. २०१४ मध्ये सुरवातीला वाटत होते की नितीश आणि लालू त्यांच्यातील २० वर्षांचे वैर विसरून एकत्र येणेच शक्य नाही. पण ते आले. २. नंतर वाटायला लागले की आधीच्या विधानसभेत ११५ आमदार असताना नितीशकुमार १०० जागा मान्य करणे शक्य नाही त्यामुळे जागावाटपावरून राजद-जदयु-काँग्रेस महागठबंधन तुटेल. पण तसे झाले नाही. ३. नंतर वाटायला लागले की जदयुच्या किमान १५ आमदारांचे तिकिट कापले गेल्यामुळे जदयुमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होईल. पण तसे झाले नाही. ४. नंतर वाटायला लागले की जदयुच्या आमदारांनी बंडखोरी केली नसली तरी ते आतून महागठबंधनचे नुकसान करतील. पण तसे झाले नाही. ५. नंतर वाटायला लागले की इतकी वर्षे जदयु आणि राजदचे कार्यकर्ते एकमेकांविरूध्द प्रचार करत असल्यामुळे त्यांच्यात कटुता कायमच असेल आणि ते महागठबंधनचा प्रचार व्यवस्थित करणार नाहीत. पण तसे झाले नाही. ६. नंतर वाटायला लागले की जदयुची 'महादलित' व्होटबँक लालू यादवांच्या राजवटीत झालेल्या 'यादवीच्या' त्रासामुळे महागठबंधन सत्तेत आल्यास परत तसेच होईल या भितीने भाजपला मत देईल आणि जदयु-राजदच्या नुसती मतांची बेरीज होणार नाही. पण तसे झाले नाही. इतक्या सगळ्या गोष्टी विपरीत झाल्यावर कधीनाकधी नितीश-लालू एकमेकांपासून दुरावतील आणि ती वेळ २०१९ पूर्वीच होईल यावर विसंबून राहण्यात कितपत अर्थ होता? कदाचित हे 'विशफुल थिंकिंग' ठरले असते.

In reply to by गॅरी ट्रुमन

२०१९ मध्ये किंवा त्यापूर्वी लालू-नितीश एकमेकांपासून वेगळे होतील हे विशफुल थिंकिंग असू शकेल. त्याचप्रमाणे त्यांची युती २०१९ पर्यंत टिकून राहील हे सुद्धा विशफुल थिंकिंग असू शकते.

In reply to by श्रीगुरुजी

चप्रमाणे त्यांची युती २०१९ पर्यंत टिकून राहील हे सुद्धा विशफुल थिंकिंग असू शकते.
आधीचा इतिहास लिहिला त्याचे कारण हे की त्यांच्या युती २०१९ पर्यंत टिकून राहिल हे विशफुल थिंकिंग असण्यापेक्षा नसायची (म्हणजे युती २०१९ पर्यंत टिकून राहायची) शक्यता जास्त होती हे दाखवून देणे. कारण आधीच्या ६ अडथळ्यांवर महागठबंधन फसेल असे वाटत होते त्यापैकी एकाही अडथळ्यावर ते फसले नाही. तेव्हा सातव्यावर ते फसेल आणि ते पण २०१९ च्या आधी ही शक्यता तसे न होण्यापेक्षा कमीच असे भाजप नेतृत्वाला वाटले असले तर त्यात त्यांची चूक आहे असे वाटत नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

ठीक आहे. बघूया २०१९ पर्यंत काय होतंय ते. शरद यादव नवा पक्ष काढण्याच्या तयारीत आहेत असं काही वेळापूर्वीच वाचलं. त्यांच्या मागे फार कोणी जाईल असे वाटत नाही. परंतु त्यामुळे संजदला एखादा तडा पडेल हे मात्र नक्की. कदाचित २०१९ मध्ये राजद्+काँग्रेस्+शरद यादव अशी पूर्ण नवीन युती पहावयास मिळेल.

खासदारांना स्वतःचे वेतन वाढवण्याचा अधिकार असता कामा नये; यासाठी वेगळी यंत्रणा आसावी अशी स्तुत्य मागणी वरुण गांधींनी लोकसभेत केली आहे. http://www.loksatta.com/desh-videsh-news/do-not-have-any-right-to-mps-t…

१. काही दिवसापूर्वी डॉ कलाम यांच्या स्मारकाविषयी झालेला वाद वाचला, वाचून दुःख झालं. खरतर डॉ कलाम यांच्या पुतळ्यापाशी धार्मिक ग्रंथ आणि हातात वीणा देण्याचं प्रयोजन मला कळलं नाही. DRDO च्या म्हणण्यानुसार त्यांना वरून (म्हणजे सेंट्रल मिनिस्ट्री) कडून जो प्लॅन आला तो त्यांनी अमलात आणला (संधर्भ : बातमी Read here). डॉ कलाम हे कला आसक्त असतील हि, ते अध्यात्मिक असतील हि, परंतु सगळ्यात महत्वाचे म्हणजे डॉ कलाम हे विज्ञाननिष्ठ होते, त्यांचा वैज्ञानिक दृष्टीने भारतास खूप काही दिले त्यामुळं त्यांचा पुतळ्यात त्यांच्या मुख्य अंगाचं प्रतिबिंब दिसायला हवं होत. गीता काय तिथं कुराण हि नको होत हवं होत एखाद फिसिक्स किंवा गणिताचं प्रसिद्ध पुस्तक, विण्याची ऐवजी हातात एखाद यंत्र, पेन्सिल किंवा अग्निबाणाची प्रतिकृती. २. काही दिवसापूर्वी गाई च्या दूध, मूत्र आणि शेण यांच्या संशोधनासाठी एक उचस्तरीय समिती नेमण्यात आली त्यात विजय भाटकर, रघुनाथ माशेलकर आणि स्वतः मंत्री हर्षवर्धन यांचा समावेश आहे. हे पाहून सरकारच प्राथमिकता स्पष्ट होते. मुळात गाई वरील संशोधनास विरोध करण्याचं कोणतंच कारण नाही, कारण कोणतीही गोष्ट वैज्ञानिक पातळीवर संशोधन होऊन स्वीकारली किंवा नाकारली पाहिजे. विरोध आहे तो प्राधान्य ठरवायला. मुळात भाटकर आणि माशेलकर हे खूप मोठे वैज्ञानिक त्यांचा वेळ हा देशासाठी लाखमोलाचा त्यामुळे आपल्या देशास अनेक वैज्ञानिक आणि शैक्षणिक समस्या भेडसावत असताना तो तिथे उपयोगी पडला पाहिजे. गाई वरील संशोधन ह्या गोष्टी त्या क्षेत्रातील संशोधकांनी हाताळल्या पाहिजेत एवढे उच्चदर्जाचे रिसोर्सेस वापरता कामा नयेत. (संधर्भ Read here) ३. भारत सरकार ने वैज्ञानिक संस्था आणि संशोधन यावरील निधीत कपात केल्याची बातमी वाचली , अत्यंत negative स्टेप. मुळात प्रश्न असा पडतो कि हे मंत्री अधिकारी असे निर्णय का घेत असतील , याच कारण मुळात देशाचे प्रमुख मोदी आणि RSS यांच्या विचारसरणीत दडलेलं आहे. जेंव्हा मोदीच कर्णाच उदाहरण देऊन आपल्याकडे जुन्या काळी जेनेटिक science होत असे बडबडतात, गणेशाचं उदाहरण देऊन आपल्याकडे प्लास्टिक सर्जेरी तंत्रज्ञान होत असे म्हणतात तेंव्हा वैज्ञानिक आणि कॉमन सेन्स असणारी सामान्य लोक याना डोकयावर हात मारून घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. आणि त्यांचे मंत्री अधिकारी सुद्धा मग हाच अँप्रोच घेऊन पुढे येतात. (संधर्भ : Read here)

In reply to by अमितदादा

कला आसक्त असतील हि, ते अध्यात्मिक असतील हि, परंतु सगळ्यात महत्वाचे म्हणजे डॉ कलाम हे विज्ञाननिष्ठ होते
तुमच्या डिक्शनरीत कला आणि विज्ञाननिष्ठता तसेच अध्यात्म आणि विज्ञाननिष्ठता या एंट्रीज विरोधार्थी शब्द आहेत म्हणून आहेत का? ========================================== आम्ही जेव्हा एखादं प्रतिगामी मत मांडतो तेव्हा "उद्या तुम्ही असेही कराल" असा उद्यावाचक प्रयोग आम्हा कंजर्ववेटीवांबद्दल फारदा मिसळपावर होत असतो. हाच न्याय इथे लावला तर त्यांचे केस, किंवा पँट कशाला दाखवली, विज्ञाननिष्ठतेचा नि केसांचा / पँटचा संबंध काय असं देखिल उद्या तुम्ही विचाराल. =============== कला आसक्त असतीलही मंजे काय - भयंकर आसक्त होते, अतीव गीताप्रेमी होते. उठ सुट कुठेही गीता कोट करायची अवैज्ञानिक सवय होती त्यांना. "शांततेचं पालन करण्यासाठी हातात शस्त्र असावं लागतं" इ इ विक्षिप्त, त्यांच्या कामाशी असंबंधित विचार त्यांनी त्याच पुस्तकातून उचललेले!

In reply to by अमितदादा

त्यांचा वैज्ञानिक दृष्टीने भारतास खूप काही दिले
भारतास केवळ अध्यात्मिक दृष्टिच्या शास्त्रज्ञांनी काही दिले. नास्तिकी वैज्ञानिकांनी अजून तरी काही दिलेले नाही.

In reply to by अमितदादा

मुळात भाटकर आणि माशेलकर हे खूप मोठे वैज्ञानिक त्यांचा वेळ हा देशासाठी लाखमोलाचा
हो, पण म्हणूनच ते गाईबद्दल व्यवस्थित रिपोर्ट देऊन सरकारचे भ्रम (होपफुली कायमचे) दूर करतीलना? ====================== बातमी द हींदूने दिली आहे, तेव्हा धुळीचे थर पुसून वाचायला हवी. एका मोठ्या मँडेटमधे (समितीच्या टर्म्स ऑफ रेफरन्स मधे) गाय हा शब्द आढळला कि त्यांनी सुतावरून ढग गाठला.

In reply to by arunjoshi123

तुम्ही प्रतिसाद सॅरकॅस्टिकली दिलाय का? नसेल तर हा खालील उपप्रतिसाद.
तुमच्या डिक्शनरीत कला आणि विज्ञाननिष्ठता तसेच अध्यात्म आणि विज्ञाननिष्ठता या एंट्रीज विरोधार्थी शब्द आहेत म्हणून आहेत का?
नाही. "कला आसक्त असतील हि, ते अध्यात्मिक असतील हि, परंतु सगळ्यात महत्वाचे म्हणजे डॉ कलाम हे विज्ञाननिष्ठ होते" हे वाक्य तेच सिद्ध करताय.
हो, पण म्हणूनच ते गाईबद्दल व्यवस्थित रिपोर्ट देऊन सरकारचे भ्रम (होपफुली कायमचे) दूर करतीलना?
हे पहा मूळ प्रतिसादातील वाक्य "गाई वरील संशोधन ह्या गोष्टी त्या क्षेत्रातील संशोधकांनी हाताळल्या पाहिजेत एवढे उच्चदर्जाचे रिसोर्सेस वापरता कामा नयेत." उरलेले मुद्दे भारीच विनोदी आहेत त्यामुळं त्याचा प्रतिवाद नाही करत.

गुजरातमधील काँग्रेसच्या आमदारांना ठेवण्यात आलेल्या बेंगलोरमधील रिसॉर्टवर आयकर विभागाच्या धाडी पडल्याच्या बातम्या आहेत! योग्य कृती? कि भाजपचा अहमद पटेलांना हरवण्यासाठी चाललेला उतावळेपणा? या अशा (अ)योग्य वेळी पडलेल्या धाडींमुळे भाजप विच-हंटिंगसाठी सरकारी यंत्रणा वापरतोय असा मेसेज जाणार नाही का?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

मी हीच बातमी लिहायला आलो होतो ...... सरकारी यंत्रणेचा गैरवापर हे "सर्व" विरोधी पक्ष कायमच सांगतात .... पण सध्याच्या घटना, त्यांचा क्रम आणि वेळ बघता असेच वाटते

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

गुजरातमधील काँग्रेसच्या आमदारांना ठेवण्यात आलेल्या बेंगलोरमधील रिसॉर्टवर आयकर विभागाच्या धाडी पडल्याच्या बातम्या आहेत! योग्य कृती?
कायद्याप्रमाणे ही कृती करण्यात येत असेल तर त्यात अयोग्य काय आहे? आणि या रिझॉर्टने तशाही बर्‍याच लांड्यालबाड्या केल्या आहेत. सिद्दरामय्यांच्याच काँग्रेस सरकारने या रिझॉर्टला सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याबद्दल मागच्या वर्षी नोटिस बजावली होती. आयकर विभागाच्या धाडी अशा एकाएकी पडत नसतात तर त्यापूर्वी काहीतरी हालचाली विभागीय पातळीवर होतच असतात. त्यामुळे ही कारवाई काँग्रेस आमदार तिथे गेल्यावर झाली असायची शक्यता फारच कमी. कायद्याप्रमाणे कारवाई होत असेल तर त्यात कोणीही तक्रार करू नये. कदाचित काँग्रेसने मुद्दामून अशाच रिझॉर्टमध्ये आपल्या आमदारांना पाठविले असेल असेही मला वाटायला लागले आहे. मोदी सरकार आल्यापासून विरोधकांची एक मोडस ऑपरेन्डी झाली आहे. कितीही बेकायदा गोष्टी केल्या असल्या तरी मोदींवर टिका करून ठेवलेली असली तर त्या बेकायदा गोष्टींसाठी सरकारने बडगा उगारला तर 'आम्ही मोदीविरोधी म्हणून कारवाई होत आहे' अशी ओरड करायला हे लोक मोकळे असतात. अवॉर्डवापसीमध्ये लहान प्रमाणावर हा प्रकार बघायला मिळाला होता. मागच्या वर्षी रविशकुमारच्या हिंदी एन.डी.टी.व्ही ला एक दिवस बंद ठेवायचा आदेश दिल्यावर आणि त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात प्रणॉय रॉयच्या एन.डी.टी.व्ही ला मध्यंतरी नोटिस बजावल्यावर हा प्रकार बघायला मिळाला होता. त्याप्रमाणेच काँग्रेसने मुद्दामून अशा रिझॉर्टमध्ये आमदारांना कशावरून नेले नसेल? म्हणजे धाड पडल्यावर काँग्रेसचे आमदार इथे उतरले होते म्हणून धाड पडली वगैरे वगैरे ओरड करायला काँग्रेसवाले मोकळे आणि स्वयंघोषित पुरोगामी त्यात सूर मिसळायलाही मोकळे.

In reply to by गॅरी ट्रुमन

आणि या धाडीचे भांडवल करुन, कॉंग्रेजने आजही राज्यसभेत गोंधळ घालून राज्यसभेचा वेळ वाया घालवला आहे. शिवाय या रिसॉर्टवर धाड पडल्याने, गुजरात राज्यसभेच्या निवडणुकीत अहमद पटेल यांचा पराभव होणे कसे काय शक्य आहे ? मागे 'गुजरात मधील आमदार, पैसे देऊन भाजपा फोडत आहे' ह्या कॉंग्रेसने केलेल्या आरोपाचे कोणतेही पुरावे त्यांनी अजूनही दिले नाहीत.

In reply to by गॅरी ट्रुमन

"कायद्याप्रमाणे ही कृती करण्यात येत असेल तर त्यात अयोग्य काय आहे" - बरोबर, पण प्रश्न वेळेचा आहे ... खूपचं योगायोग वाटतो .... आयकर विभागाच्या धाडी बद्द्ल कुठेतरी वाचलं होतं .... नक्किच त्या अशा एकाएकी पडत नसतात बरीच प्रोसिजर आहे ... परवानग्या घ्याव्या लागतात अगदी असेच बिहार मध्ये सुद्धा ... कदाचित खूपच वेगवान हालचाली करतात :-) आणि हो आत्ताच नाही, आधी म्हटल्याप्रमाणे "सरकारी यंत्रणेचा गैरवापर हे "सर्व" विरोधी पक्ष कायमच सांगतात" तर ... कुछ तो गडबड होती ही होगी ... ?

In reply to by संग्राम

रीसॉर्टवर नेमकी आताच धाड पडणे हा योगायोग नक्कीच नाही. ज्याप्रमाणे मलिष्काने विडंबनात्मक रॅप प्रसिद्ध केल्यानंतर तिच्या घरी महापालिकेचे कर्मचारी डासांच्या अळ्या तपासण्यासाठी गेले हा योगायोग नव्हता, तसाच हासुद्धा योगायोग नाही. राजकारणात असे योगायोग क्वचितच घडतात. जयललिताच्या मृत्युनंतर २ महिन्यांनी शशिकलाने पनीरसेल्वम हटवून त्याच्या जागी स्वतःला बसविण्याची तयारी सुरू केल्यानंतर तिने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या १-२ दिवस आधीच तिच्याविरूद्ध सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या खटल्याचा निकाल लागला हा सुद्धा योगायोग नव्हता.

In reply to by श्रीगुरुजी

सहमत आहे. पण तरी देखील कारवाई केली म्हणून काँग्रेसने थयथयाट करणे अयोग्य आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

कृती योग्य कि अयोग्य हा मुद्दा नाहीये, आयकर खात्याने टाकलेली धाड हि योग्यच आहे कारण ते त्यांचे काम आहे. मुद्दा हा आहे कि स्थळ आणि वेळ हे ह्या धाडीचा संदर्भ ठरवतात. भाजपने अशा मुद्द्यांपासून लांब रहायला हरकत नाही. नाहीतरी कित्येक धाडी वर्षानुवर्षे पुढे ढकलल्या जात नाहीत का?

In reply to by arunjoshi123

थेट हंट करायला हरकत नाही पण सगळ्याच भ्रष्टाचार्यांना करावं. काँग्रेसकडू तशी अपेक्षा नव्हती पण ह्या सरकारकडून आहे. उगाच वेळ काळ पाहून टार्गेट करण्याने प्रकरणाचं महत्व कमी होतं आणि एकूणच लक्ष विचहंटिंगकडे वळते असे मला वाटते.

अहमद पटेल स्वतः पैसा पावर वापरुन विरोधकांना नामोहरम करणार्‍यांपैकी आहे. त्यात त्याने मोदी आणि अमित शहांना लय त्रास दिलेला आहे चित्र विचित्र केसेस त्यांच्या मागे लाउन. अमित शहा वैयक्तिक बदला घेत आहेत आता. बोया पेड बबुल का आम कहांसे पाए.

अमितदादा,
मुळात भाटकर आणि माशेलकर हे खूप मोठे वैज्ञानिक त्यांचा वेळ हा देशासाठी लाखमोलाचा त्यामुळे आपल्या देशास अनेक वैज्ञानिक आणि शैक्षणिक समस्या भेडसावत असताना तो तिथे उपयोगी पडला पाहिजे. गाई वरील संशोधन ह्या गोष्टी त्या क्षेत्रातील संशोधकांनी हाताळल्या पाहिजेत एवढे उच्चदर्जाचे रिसोर्सेस वापरता कामा नयेत.
डॉक्टर माशेलकर, डॉक्टर विजय भटकर इत्यादि बड्या संशोधकांनी गोसंशोधन गांभीर्याने घेतल्याने जनतेत एक सकारात्मक संदेश जाईल. अस्सल भारतीय वाणाच्या गायी आणि बैलांची संख्या चिंताजनक रीत्या कमी होते आहे. या हानीस पायबंद बसून बहूपयोगी गायींचं संवर्धन होणं भारतीय जनतेच्या भल्यासाठीच आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

देशी गोसंवर्धन हे कायम धार्मिक/राजकीय चष्म्यातूनच पाहिलं गेलं पाहिजे असं नाही (अमितदादा, तुम्ही पाहताय असा आरोप नाही बरंका, सर्वसाधारण बोलतोय) भारतातल्या कित्येक वाणाची गुरे दुग्धोत्पादना करता सर्वोत्तम आहेत, गीर, कांकरेज, नेल्लोर कॅटल वगैरे तिकडे ब्राझील मध्ये फायदेशीर म्हणुन प्रसिद्ध होतायत, आमचे मिलिटरीतले एक पाहुणे सांगतात त्याप्रमाणे, आर्मी फार्म जेव्हा सुरु होती तेव्हा फक्त साहिवाल गायी पाळत, त्यांच्यानुसार फौजेला कधीही म्हशींचे दूध पाजत नसत तर साहिवाल गायीचंच असे. (भुलचुक घेणे देणे) वैयक्तिक अनुभव हा की, ऑपरेशन फ्लड अंतर्गत दुग्धोत्पादन वाढवायला, जर्सी/संकर गायी प्रमोट केल्या गेल्या अन तो एक टेम्परवारी प्रयोग होता. ट्रॉपिकल वातावरण असलेल्या भारतात हे भारी पडलं, संकरित गायी रोगराईला जास्त बळी पडतात अन जर्सी मेंटेन करायचा खर्च नफ्याचे गणित गंडवतो. शास्त्रोक्त विचार करून देशी गायी संगोपन ह्यावर रिसर्च केल्यास फायदाच होईल.

In reply to by गामा पैलवान

@गामा पैलवान सहमत नाही. @जेम्स वांड
देशी गोसंवर्धन हे कायम धार्मिक/राजकीय चष्म्यातूनच पाहिलं गेलं पाहिजे असं नाही (अमितदादा, तुम्ही पाहताय असा आरोप नाही बरंका, सर्वसाधारण बोलतोय)
धन्यवाद, परंतु हे लक्ष्यात घ्या सरकार मधीलच काही लोक हा मुद्दा धार्मिक करतायत, त्यांना दूध उत्पादन, शेतकरी हित याच काही पडलेलं नाही त्यांना फक्त पोलिटिकल स्कोर वाडवायचा आहे.
वैयक्तिक अनुभव हा की, ऑपरेशन फ्लड अंतर्गत दुग्धोत्पादन वाढवायला, जर्सी/संकर गायी प्रमोट केल्या गेल्या अन तो एक टेम्परवारी प्रयोग होता. ट्रॉपिकल वातावरण असलेल्या भारतात हे भारी पडलं, संकरित गायी रोगराईला जास्त बळी पडतात अन जर्सी मेंटेन करायचा खर्च नफ्याचे गणित गंडवतो. शास्त्रोक्त विचार करून देशी गायी संगोपन ह्यावर रिसर्च केल्यास फायदाच होईल
याबाबत मी सहमत नाही माझा वैयक्तिक अनुभव वेगळा आहे, मी ज्या ग्रामीण भागातून आहे तिथे गावात हाताच्या बोटावर मोजण्याइतपत देशी गाई आहेत बहुतांश शेतकरी जर्सी गाई वापरतात. तसेच मध्यंतरी लोकसत्ता मध्ये एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने (बहुतेक ?) इसराईल मधील दूध उत्पादन आणि संकरित गायी यावर लेख लिहलेला, यामध्ये इसराईल मध्ये गाई ची संख्या न वाढवता दूध उत्पादन कसे वाढवले यावर लिहलेलं. त्यामुळं देशी गाई च्या दूध उत्पादन वाढवण्यात मर्यादा आहेत हे आपण मान्य केलं पाहिजे. याबात तद्न्य व्यक्तीच मत आकडेवारी सह वाचाय मिळाल्यास माझं वरील मत बदलायची माझी तयारी आहे. तसेही माझ्या मूळ प्रतिसादात म्हंटल्याप्रमाणे सरकारी कमिटी दूध उत्पादन वाढवण्याबाबत काम करणार नसून गाई + औषध यावर काम करणार आहे. (संशोधनास विरोध नाही, मूळ प्रतिसाद वाचावा). इथेच थांबतो नाहीतर चर्चा गाईवर फिरण्याची.

http://m.maharashtratimes.com/india-news/dujana-to-armyman-congrats-you… ही बातमी फार महत्वाची आहे. अशा अनेक टेप प्रसारीत व्हायला पाहिजेत मानवाधीकार आयोगाच्या बुरख्यामागे दडलेल्या अतीरेक्यांचे पितळ उघडे पाडण्यासाठी हे आवश्यक आहे

पीपल्स डेमॉक्रसी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र आहे. नितीशकुमारांनी महागठबंधन तोडले आणि भाजपशी हातमिळवणी केली याविषयी या मुखपत्रात काही गोष्टी छापून आल्या आहेत असे इकॉनॉमिक्स टाईम्समधील या बातमीत म्हटले आहे: १. भारताच्या राजकीय इतिहासात 'बूर्झवा' राजकारण्यांनी अनेक कोलांट्या आतापर्यंत मारल्या आहेत. नितीशकुमारांनी भाजपबरोबर हातमिळवणी करून मारलेली कोलांटीउडी त्यातील सर्वात मोठ्या कोलांट्याउड्यांपैकी असेल. म्हणजे भाजपबरोबर हातमिळवणी केल्यावर नितीशकुमार बूर्झवा झाले. त्यापूर्वी ते 'प्रोलेटॅरीएट' होते तर. २. नितीशकुमारांनी यादव कुटुंबियांविरूध्दच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे निमित्त बनवून आपले ढोंग पुर्ण केले (to enact this elaborate charade) ३. भाजपविरोधातील राष्ट्रीय पातळीवरील महागठबंधनच्या म्होरक्यानेच भाजपबरोबर हातमिळवणी केल्यामुळे भाजपविरोधातील राष्ट्रीय पातळीवरील आघाडीची संकल्पना आता संकटात पडली आहे. ("the concept of a Grand Alliance lies in tatters" ) ४. भाजपविरोधात सर्व विरोधी पक्षांची आघाडी उघडावी असे माकपला वाटते पण ते अनेकविध धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र घेऊन साध्य होणार्‍यातले नाही. (this cannot be accomplished by putting together an alliance of a motley bunch of secular parties. ) ५. बहुतेक सर्व राज्यपातळीवरील पक्षांनी आपल्या सोयीप्रमाणे भाजपबरोबर हातमिळवणी करायला मागेपुढे बघितलेले नाही. बहुतेक सर्व स्थानिक पक्षांनी 'निओ-लिबरल' अजेंडा वेळोवेळी अंमलात आणला आहे आणि अशा पक्षांचा संधीसाधू युत्या करण्याकडे कल असतो . त्यामुळे अशा संधीसाधू स्थानिक पक्षांना एकत्र घेऊन भाजपविरोधातील सर्व विरोधी पक्षांची राष्ट्रीय पातळीवरील आघाडी विश्वसनीय होऊ शकणार नाही. (Why such a grand alliance is unworkable is the unreliable character of many of the regional parties. Most of the regional parties have embraced the neo-liberal policies and are prone to make opportunistic alliances. The CPI-M said it had concluded "that with the regional parties as the main constituents, there can be no credible all-India alliance. ) नितीश-लालू युती तुटल्यामुळे विरोधी पक्षांच्या मनोधैर्यावर परिणाम होईल आणि २०१९ मध्ये आपण मोदींविरोधात विश्वसनीय पर्याय देऊ शकणार नाही असे विरोधी पक्षांना वाटायला लागेल आणि अर्धी लढाई ते तिथेच हरतील आणि किंबहुना त्या कारणामुळेच महागठबंधन तोडून विरोधी पक्षांना चांगलाच दणका द्यावा असे मला वाटले होते. तो परिणाम होताना दिसत आहे. तसे असेल तर नितीशकुमारांबरोबर हातमिळवणी करून भाजपने चांगले केले असे म्हणायला हवे.

In reply to by गॅरी ट्रुमन

गॅरी ट्रुमन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं मुखपत्र चक्क वाचता तुम्ही? साष्टांग दंडवत घ्या राव माझा! असो. तुमचं हे विधान पटलं :
तसे असेल तर नितीशकुमारांबरोबर हातमिळवणी करून भाजपने चांगले केले असे म्हणायला हवे.
भाजपचे उत्तरप्रदेशात जास्तीतजास्त आमदार निवडवून आणले जातात तेव्हा लबाड बोक्याचा एक डोळा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर असतो. लबाड बोका २०१७ सालच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गर्क असल्याचं दाखवतो तेव्हा तो २०१९ ची पूर्वतयारी करंत असतो. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं मुखपत्र चक्क वाचता तुम्ही?
मी कम्युनिस्टांना कितीही विरोध करत असलो तरी मी आतून खरा कम्युनिस्टच आहे यावर अनेकांना विश्वास बसत नाही. आता खात्री पटायला हवी. जोक्स अपार्ट मी अर्थातच माकपचे मुखपत्र वाचत नाही पण इकॉनॉमिक टाईम्स मात्र वाचतो आणि त्यात माकपच्या मुखपत्रात आलेल्या लेखाची बातमी होती.

व्यंकय्या नायडू ५१६ वि. २४४ मतांनी उपराष्ट्रपती पदावर निवडून आले. यावेळी दोन्ही पदांवर खूप मिळमिळीत व्यक्ती आहेत असे माझे मत आहे.

आज उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान झाले आणि मतमोजणीही आजच पार पडली. भाजप उमेदवार एन.व्यंकय्या नायडू ५१६ मते मिळवून विजयी झाले. विरोधकांचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांना २४४ मते मिळाली. नायडूंचा उपराष्ट्रपती म्हणून ११ ऑगस्टला शपथ घेतील. 1 याबरोबर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष या चार सर्वात मोठ्या पदांवर प्रथमच भाजपशी संबंधित असलेले नेते आले आहेत.

चांगली बातमी http://www.tribuneindia.com/mobi/news/nation/sc-to-take-up-ayodhya-appe… हा वाद लवकरात लवकर मिटावा हीच सदिच्छा. न्यायालयाने अडीच महिन्यांंहून अधिक काळ राखून ठेवलेला तिहेरी तलाक सुनावणीवरील निकाल देखील लवकरात लवकर जाहीर करावा अशी इच्छा आहे.

Ahead of the 70th Independence Day, Prime Minister Narendra Modi on Sunday invoked the Quit India Movement and exhorted the countrymen to use the same spirit to expel problems of communalism, casteism, corruption, terrorism, poverty and dirt from the country by 2022. He asked the people to take a pledge to contribute in some way or the other to create a “New India”. चले जाव आंदोलनातून प्रेरणा घ्यावी व देश प्रगतीकडे न्यावा , असे मा. मोदीजीनी आवाहन केले. १९४२ साली संघ चले जाव आंदोलनात सहभागी नव्हता. आज ७० वर्षानंतर याच आंदोलनाची आठवण येऊन आजच्या राज्यकर्त्याना व जनतेला देशप्रेमाची प्रेरणा मिळत आहे, हे खरोखरच प्रत्येक भारतीयास अभिमानास्पद आहे. http://indianexpress.com/article/india/with-quit-india-spirit-expel-com…