Skip to main content

"अशा का वागतात काही मुली?"

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 31/07/2017 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच एका 'फक्त प्रौढांसाठी' असणार्‍या WhatsApp ग्रुपवर(आता कुठला ग्रुप ते इथं नका विचारु!)एका वेगळ्या विषयावर चर्चा झाली.यात काही मिपाकरही होते. तर चर्चेचा विषय असा होता की 'तशा प्रकारच्या व्हिडिओजपैकी,काही व्हिडिओज हे मुलींना फसवून त्यांच्याच मित्राकडून नंतर डिलीट करण्याच्या वायद्याने काढले जातात.अर्थातच असं काही होत नाही.मैत्रिणीच्या आपल्यावर असलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन हे व्हिडिओज संकेतस्थळांवर लिक केले जातात. यात एका सदस्यांनी असा मुद्दा मांडला की "या मुलींना कळत कसं नाही? बॉयफ्रेंडच्या नको त्या मागण्यांना या मुली बळी कशा पडतात? यामुळे आपलं आयुष्य पणाला लागू शकतं हे या मुलींना का कळत नसावं? या फसवणूकीला जशा मुली जबाबदार आहेत तशीच त्यांना फसवणारे त्यांचे बॉयफ्रेंडही तेवढेच जबाबदार आहेत.पण आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत यातून सर्वात जास्त त्रास हा मुलींनाच होतो.भोगावं त्यांना लागतं.घरातल्यांची नाचक्की होते ती वेगळीच! अशा प्रकारचे व्हिडिओज चोरुनही काढले जातात.पण हा प्रकार घडतो केव्हा? जेव्हा ती मुलगी अशा प्रकारे मित्राच्या खुशीसाठी संमती देते तेव्हा! मग प्रश्न असा येतो की या मुली का तयार होतात अशा प्रकारांना? का ठामपणे नकार देऊ शकत नाहीत?बरं हा प्रकार अल्पशिक्षित मुलींबरोबर,खेड्यातच घडतो असं नाही अगदी शिकलेल्या शहरी मुलीही याला बळी पडतात. बरं हे असे लबाड लांडगेच या मुलींना आवडतात.त्यांचं स्टायलिश वागणं,कपडे,गाडी हेही जोडीला असतं. पण एखाद्या साध्या सरळ मुलानं यांना प्रपोज केलं की, "मी तुला किती चांगला समजत होते.तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती!" असं उत्तर मिळतं. मुली किती लेवलपर्यंत जाऊन माती खाऊ शकतात याचं एक उदाहरण पाहण्यात आहे. ही मुलगी BE Electronics चांगल्या मार्कांनी पासआऊट होती.एके ठिकाणचा कामाचा चांगला अनुभव होता.त्यानंतर आमच्या कंपनीत आली.इथे आधीपासूनच एक मुलगा टेस्टींगसाठी होता.याचं त्याच्या कॉलेजमधल्या दुसर्‍या एका मुलीबरोबर अफेअर होतं.तिच्याचबरोबर लग्नही ठरलं होतं.भावी बायकोबरोबर सगळे उद्योग करुन झाले होते. ही कंपनीत आलेली मुलगी त्याने पाहिली.हीला मी पटवणारंच असं म्हणून प्रयत्न सुरु केले.तिचा पाठलाग करणे वगैरे प्रकार सुरु झाले.ती आणि तिची मैत्रीण दोघी एकत्रच घरी जायच्या अॅक्टीवावरुन.सुरुवातीला ही मुलगी आपण भलं आपलं काम भलं अशी होती. हीच्या जोडीदार मैत्रिणीचे विचार म्हणजे प्रेमात पडायचं,नवर्‍याचा स्वभाव आधीपासून माहित असलेला चांगला अशा टाईपचे.तिच्या संगतीने हीचेही तसेच विचार.(अर्थात असे विचार काही गैर नाहीत) पण तसा कोणी हीच्या जिवनात नव्हता.मग ह्या ठोंब्याचे प्रयत्न सुरु होतेच.आणि वाढले.तिच्या शिव्या खाऊन,अपमान होऊनही पिच्छा सोडत नव्हता.ती बोलली नाही की हा डबा खायचा नाही. आता हीची ही जोडीदारीण हे सर्व प्रकार पाहत होती.तिने सुचवलं अगं एवढा मागं लागलाय तर नाही का म्हणतेस? प्रेमविवाह करायचा असं ठरलंय ना आपलं? दे त्याला रिस्पॉन्स! डिपार्टमेंटमधल्या काही लोकांनी त्या मुलाबद्दल सांगितलं तरीही ती बदलली नाही. स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याची मुळातच अक्कल नसल्याने तिने या मुलाला होकार दिला.तिला याचं लग्न ठरलंय हेही माहित होतं.तरीही मी निर्णय बदलायला लावीन असा विश्वास.दोघंही वाहवत गेले.सगळे "उद्योग" करुन झाले.यानं त्याचे फोटोही काढून ठेवले. या मुलीच्या घरी ती या नालायकाबरोबर बोलत असताना बापानं पकडलं.झोडपून काढलं पण लग्न करीन तर याच्याबरोबरचं म्हटल्यावर बापानं मुंबईचं एक स्थळ काढलं.तो मुलगा स्वभावानं कसा आहे वगैरे न पाहता जबरदस्तीनं लग्न लावून दिलं. या ठोंब्याच्या होणार्‍या बायकोलाही आपला होणारा नवरा इतका नालायक आहे हे माहित होतं तरीही गावभर फिरल्याने सगळीकडे प्रसिध्दी झाली होती.मग तिच्याबरोबर याचं लग्नही झालं. या एका प्रसंगात एक नव्हे तर चक्क तीन पूर्ण बिंडोक मुली पाहिल्या.त्या पण शिकलेल्या,इंजिनियर मुली. अजून एका सदस्यांनी असाच प्रेमज्वराचा अनुभव सांगितला.तो त्यांच्याच शब्दात. "आमच्या मित्राला ३ बहीणी आहेत... त्यातली ही दुसरी! दिसायला फार सुंदर. तीचं आणि एका मुलाचं प्रेम साधारण ८वी ते ९ वीच्या दरम्यान जुळलं.. ती त्याच्यापेक्षा ६ महिन्याने मोठी... १२ वी नंतर त्या दोघांमध्ये खूप जवळीक झाली... ती मुलगी, तिची लहान बहीण आणि आजी गावी तर बाकी मुंबईला होते.. तो मुलगा दररोज त्या मुलीच्या रात्री १२ च्या नंतर घरी यायचा... तो मुलगा गावात बहिणीकडे राहायला होत म्हणून गावात रात्री मुलांच्या कट्ट्यावर येत असे... त्यामुळे संशय ही कोण घेत नसे... एखादा सापडला.. गुरालाही मारत नसतील एवढा बेदम मारला... त्या मुलीला दोन ठेवून दिलेल्या... पण घरी सांगितलं नाही... वाटलं सुधारेल... पण परत ६ महिन्यांनी ह्यांचे प्रकरण चालू... अाख्या गावभर झालं.. तरी ती मुलगी बेफिकर... शेवटी घरच्यांना समजलं... एकदा माझे मित्र आणि आम्ही काही जणांनी बाहेर पकडलं त्यांना.... त्या मुलीला ही बेदम मारलं... मुलाचा हात मोडेपर्यंत मारलं.. पण ती एवढी बेफिकीर की करीन तर हाच.. दोघानी ही २१ पार केल होतं.. तिला फार समजावलं पण ऐकेनाच... पळून जाऊ नये म्हणून मग लग्न लावायचा विचार केला... आम्ही सांगून टाकलं लग्नानंतर परत तोंड नाही दाखवायचं ती उलट बोलली तुमच्या सारख्या सैतानांकडे मला यायचं ही नाही. त्या मुलाची परिस्थिती फार बिकट... अगोदरच बहिणीकडे शिकायला... राहतं दोन खणांचं कौलारू घर.. १० ते १२ गुंठे जमीन, अर्धवट शिक्षण म्हणून नोकरी नाही,आईवडील गावात एकाकडे स्ट्रॉबेरीच्या मळ्यात कोणाकडेतरी रोजंदारीवर जायचे. आणि मुलीचे वडील मातब्बर, भाऊ सॉफ्टवेअर मध्ये, मोठी बहीण पण जॉबला... परिस्थिती ने तर जहागिरदार.. देखणेपणावरती तर त्या मुलीला कुणीही पसंत केलं असतं. तिला इतके बोलूनही ती ऐकेना... समजावणार्‍यांनाच शिव्या द्यायची!.. शेवटी भातुकलीच्या खेळासारखं त्या बाहुला बाहुलीच लग्न(सगळ्यांच्या तोंडात हेच) मंदिरात लावून दिलं. आता वर्ष झालं असेल मुलगा कुठंतरी दुकानात जॉब करतो... परिस्थिती बिकट म्हणून तीही आता सासू बरोबर मजुरी करते.... कुठं ते राजकुमारीच जगणं आणि कुठं आता काबाडकष्ट! एकदा तिच्या नवऱ्या बरोबर नाश्ता करताना हॉटेल मध्ये भेटली... अक्षरशः रडली, वडील अाणि भाऊ बोलत नाहीत घरात येऊ देत नाहीत...मला मध्यस्ती कर म्हणून सांगत होती... विचारलं तिलाच शिव्या देताना थोडा का विचार केला नाहीस..??? तो पोरगा काहीच बोलला नाही.. बडवलेला म्हणून! (सैराटचीच कथा फुलवल्यासारखी वाटेल पण हे खरं आहे.) म्हणजे वास्तव समोर आलं की मग विचार करतात... पण त्याअगोदर केला असता तर ही वेळ अाली नसती. कुठे चुकतं या मुलींचं? विश्वास ठेवण्यायोग्य माणूस त्यांना अोळखता येत नाही की प्रेमात पडल्यावर मेंदूत काही रासायनिक बदल होतात? की कशाची भितीच वाटत नाही यांना? अशा का वागतात काही मुली?

वाचने 97857
प्रतिक्रिया 278

प्रतिक्रिया

... एका महत्वाच्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल! "अशा का वागतात काही मुली?" - अक्कल नसल्याने!

साधारणपणे एकाच वयाच्या मुला-मुलीत, मुली जास्त mature असतात असं एकूण निरीक्षण आहे. मुली भावनेच्या भरात वहावत जात नाहीत, त्यांचे पाय नेहेमीच जमिनीवर असतात. शारीरिक संबंधात पुढील नको असलेले परिणाम मुलींनाच भोगावे लागतात ह्याची त्यांना जाणीव असते. तरी देखील त्या अश्या का वागतात ह्याचे एक कारण म्हणजे 'तारुण्य सुलभ भावना' हे असू शकते. दुसरे कारण म्हणजे आवडलेला मुलगा, मग तो कोणीही व कोणत्याही परिस्थितीतला असो, हातातून निसटून जाऊ नये म्हणून केलेली किंवा करावी लागणारी एक तडजोड, असू शकते.

त्या मुलाची परिस्थिती फार बिकट... अगोदरच बहिणीकडे शिकायला... राहतं दोन खणांचं कौलारू घर.. १० ते १२ गुंठे जमीन, अर्धवट शिक्षण म्हणून नोकरी नाही,आईवडील गावात एकाकडे स्ट्रॉबेरीच्या मळ्यात कोणाकडेतरी रोजंदारीवर जायचे. आणि मुलीचे वडील मातब्बर, भाऊ सॉफ्टवेअर मध्ये, मोठी बहीण पण जॉबला... परिस्थिती ने तर जहागिरदार.. देखणेपणावरती तर त्या मुलीला कुणीही पसंत केलं असतं.>>>>> निव्वळ महान विचार आहेत.....दंडवत घ्यावा.

आपल्याकडे बहुसंख्य घरांमध्ये मुलींसाठी लग्न व संसार हेच मुख्य ध्येय म्हणुन मुलींवर ठासवले जाते. त्याचबरोबर २४ तास दुरचित्रवाणी, सिनेमे ईं. वरुन ईश्क, प्यार चा अविरत मारा चालु असतोच. मग थोडे वयात आल्याबरोबर काही लांडगे फायदा उठवतात व विचारांची काहीच खोली नसल्याने मुली फसतात .

सारासार विचारशक्ती गहाण पडल्याने असे किस्से घडतात. या बरोबरच मुलांकडे पालकांचे पुरेसे आणि सजग लक्ष नसल्याने असे प्रकार घडतात. माझा मुलगा साधारण सातवी आठवीत असताना त्याच्याच वर्गातल्या एका मुलीचे आई वडील जे आमचे स्नेही आहेत, गप्पा मारायला आले असता त्या बी (मुलीची आई) म्हणाली, 'तुमचं बरं आहे हो, तुम्हाला मुलगा आहे काळजी करावी लागत नाही. मुलीची किती काळजी घ्यावी लागते....' त्यावेळी मी त्यांना म्हणालो होतो, "मुलींइतकीच मुलाची काळजी घ्यावी लागते, मुलांकडेही डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. आपल्या मुलाने कुणाही मुलीचा गैरफायदा घेऊ नये असे संस्कार जाणीवपूर्वक करावे लागतात".

अशा का वागतात काही मुली? का वागतात काही मुली अशा? वागतात का काही मुली अशा? काही मुली अशा वागतात का? मुली अशा काही वागतात का? अशा मुली काही का वागतात? का अशा काही वागतात मुली? वागतात का मुली अशा काही? काही मुली अशा का वागतात? मुली अशा काही का वागतात?

गुरालाही मारत नसतील एवढा बेदम मारला... त्या मुलीला दोन ठेवून दिलेल्या... पण घरी सांगितलं नाही... वाटलं सुधारेल.
एकदा माझे मित्र आणि आम्ही काही जणांनी बाहेर पकडलं त्यांना.... त्या मुलीला ही बेदम मारलं... मुलाचा हात मोडेपर्यंत मारलं
कोण आहेत हे तुमचे मित्र? अटक व्हायला पाहिजे अशा लोकांना.

In reply to by अत्रे

अश्या रानटी प्रवृत्तीच्या लोकांमुळेच, गुन्हेगारी बळावते. त्यांना काय करायचे आहे ते करु द्या की, तुम्ही कशाला मोरल पोलिसिंग करता. मला वाटते ज्यांच्याकडे मुली ढुंकुनही बघत नाहीत अशीच लोक दुसर्‍याच्या फाटक्यात पाय घालत असतात.

In reply to by प्रसाद_१९८२

त्या रिकामटेकड्या मुलाला मारलं याचा राग येतो पण त्या मुलीची वाट लागली याचं वाईट नाही का वाटत? आणखी एखादीची वाट लागू नये म्हणून सावध राहणं चूक आहे?

कशाला मॉरल पोलिसिंग करत बसायचं? आपल्याला दुसरे काही उद्योग नाहीयेत का? ती मुलगी, तिचा नवरा, आणि त्यांचं नशीब, बघून घेतील!! आपल्याकडच्या लोकांना लष्करच्या भाकर्‍या भाजण्याची हौस फार. असं काही ऐकलं की घरचं कार्य असल्यासारखे जातात. मी तर माझ्या मित्रांना पण एकदा सांगून बघतो. तेही मित्र आहेत म्हणून, नाही ऐकलं तर मनात "झक मार" म्हणतो आणि सोडून देतो.

In reply to by सूड

हो खरंय आपण आपलं पाककृती,कलादालन,भटकंती,रांगोळी,ज्वेलरी डिझायनिंग असे धागे काढलेले बरे नाही का?

In reply to by उपयोजक

हो खरंय आपण आपलं पाककृती,कलादालन,भटकंती,रांगोळी,ज्वेलरी डिझायनिंग असे धागे काढलेले बरे नाही का?
प्रतिसाद समजला नाही, जरा विस्तृतपणे सांगता का?

In reply to by सूड

इथे तर स्वतःच्या निर्णयस्वातंत्र्यासाठी काबाडकष्ट करणे, गरिबीतून स्वप्रयत्नाने वर येणे ह्यालाच वाईट म्हटलंय. काबाडकष्ट केले म्हणजे आयुष्य बरबाद झाले असं समजणारे बहुदा रिकामटेकडे व परोपजीवी असतात.

In reply to by नगरीनिरंजन

+१. काबाडकष्ट केले म्हणजे आयुष्य बरबाद झाले असं समजणारे बहुदा रिकामटेकडे व परोपजीवी असतात. >> त्यांचा तर उदोउदो चाललेला असतो की इथे सतत...भाकर्या बडवण्याची किंमत वगैरे...

तुम्ही आधी टुक्कार पोरांची सांगत सोडा. असल्या उचापती मध्ये पडू नका. तुमचे लग्न झाले नसेल तर ते होण्यात पण अडथळे येतील. आपले शिक्षण नोकरी धंद्यात लक्ष घाला. इतरांच्या पोरींची जास्त काळजी करू नका. त्यांची काळजी करायला आपले प्रशासन खंबीर आहे.

बरं मग त्या रिकामटेकड्या मुलाला हातही न लावता किंवा त्याला एक पैसाही न देता त्या चांगल्या मुलीचं भवितव्य कसं वाचवायचं याचा सुयोग्य मार्ग सुचवा बघू!

In reply to by उपयोजक

चांगल्या मुलीचं भवितव्य कसं वाचवायचं याचा सुयोग्य मार्ग सुचवा बघू!
तिचं भवितव्य कशात चांगल वाईट आहे ते तिला ठरवू दे की. तुम्ही फार फार तर समजावून सांगा. मुलाला गुरासारखे मारणे, हात मोडेपर्यंत मारणे असले प्रकार करायचा हक्क तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना कुणी दिला?

In reply to by अभिजीत अवलिया

मी मारहाण केलेली नाही किंवा त्याचं समर्थनही केलेलं नाही.हा मित्राच्या गावी घडलेला प्रसंग आहे. त्या मुलाला आधी समजावलंच नसेल डायरेक्ट मारलंच असेल कशावरुन? समजावूनही बधला नसेल तर काय करावं? न कळत्या वयातलं कोणी भावनेत वाहून चुकीचा निर्णय घेत असेल तर माझा काय संबंध? माझ्या घरापर्यंत नाही ना आलं म्हणून तो घेऊ द्यावा का?इतकी डोळेझाक करावी का?

In reply to by उपयोजक

एकदा माझे मित्र आणि आम्ही काही जणांनी बाहेर पकडलं त्यांना.... त्या मुलीला ही बेदम मारलं... मुलाचा हात मोडेपर्यंत मारलं../blockquote> ह्याचा अर्थ तुम्ही पण मारहाण केलीत असा होतो. अवांतर — ही मोरल पोलिसिंगची हौस बर्याच लोकांना असते. विशेष करुन रस्त्यावर फुटकळ अपघात जरी झाला तरी हे लोक न्यायदान करायला हजर. गेल्या गुरवारी डांगे चौकात एका डाॅक्टरला गाडी चालवताना ब्रेन स्ट्रोक आला. त्यामुळे त्यांची गाडी दुसर्या कारला धडकली. मोरल पोलिस आले आणि डाॅक्टर दारु पिलेत असे अनुमान काढून त्यांना बेदम मारले. नंतर ते डाॅक्टर आहेत हे समजल्यावर पळून गेले.

In reply to by अभिजीत अवलिया

प्रतिसाद अर्धवट आला. एकदा माझे मित्र आणि आम्ही काही जणांनी बाहेर पकडलं त्यांना.... त्या मुलीला ही बेदम मारलं... मुलाचा हात मोडेपर्यंत मारलं.. — ह्याचा अर्थ तुम्ही पण मारहाण करणार्या ग्रुप मध्ये होता असा होतो माझ्या मते.

In reply to by अभिजीत अवलिया

अजून एका सदस्यांनी असाच प्रेमज्वराचा अनुभव सांगितला.तो त्यांच्याच शब्दात. "आमच्या मित्राला ३ बहीणी आहेत... त्यातली ही दुसरी! दिसायला फार सुंदर. तीचं आणि एका मुलाचं प्रेम साधारण ८वी ते ९ वीच्या दरम्यान जुळलं.. ती त्याच्यापेक्षा ६ महिन्याने मोठी... १२ वी नंतर त्या दोघांमध्ये खूप जवळीक झाली... ती मुलगी, तिची लहान बहीण आणि आजी गावी तर बाकी मुंबईला होते.. तो मुलगा दररोज त्या मुलीच्या रात्री १२ च्या नंतर घरी यायचा... तो मुलगा गावात बहिणीकडे राहायला होत म्हणून गावात रात्री मुलांच्या कट्ट्यावर येत असे... त्यामुळे संशय ही कोण घेत नसे... एखादा सापडला.. गुरालाही मारत नसतील एवढा बेदम मारला... त्या मुलीला दोन ठेवून दिलेल्या... पण घरी सांगितलं नाही... वाटलं सुधारेल... पण परत ६ महिन्यांनी ह्यांचे प्रकरण चालू... अाख्या गावभर झालं.. तरी ती मुलगी बेफिकर... शेवटी घरच्यांना समजलं... एकदा माझे मित्र आणि आम्ही काही जणांनी बाहेर पकडलं त्यांना.... त्या मुलीला ही बेदम मारलं... मुलाचा हात मोडेपर्यंत मारलं.. पण ती एवढी बेफिकीर की करीन तर हाच.. दोघानी ही २१ पार केल होतं.. तिला फार समजावलं पण ऐकेनाच... पळून जाऊ नये म्हणून मग लग्न लावायचा विचार केला... आम्ही सांगून टाकलं लग्नानंतर परत तोंड नाही दाखवायचं ती उलट बोलली तुमच्या सारख्या सैतानांकडे मला यायचं ही नाही. बाकी चालू द्या.

In reply to by उदय

वरील प्रतिसादाच्या आधी एक वाक्य आहे: 'अजून एका सदस्यांनी असाच प्रेमज्वराचा अनुभव सांगितला.तो त्यांच्याच शब्दात' त्यामुळे सदर लेखक मारहाणीत सामील असल्याचे दिसत नाही.

In reply to by उपयोजक

बरं मग त्या रिकामटेकड्या मुलाला हातही न लावता किंवा त्याला एक पैसाही न देता त्या चांगल्या मुलीचं भवितव्य कसं वाचवायचं याचा सुयोग्य मार्ग सुचवा बघू! === मुलीचे भवितव्य वाचवायला, एकाद्याला गुरासारखे मारणे, त्याचे हातपाय तोडणे हा "सुयोग्य" मार्ग आहे काय?

In reply to by प्रसाद_१९८२

बरं मारहाण करणं चुकीचं असं समजू! मग योग्य मार्ग तुम्ही सुचवा! पण हमखास लागू पडला पाहिजे.

In reply to by उपयोजक

पण हमखास लागू पडला पाहिजे.
मारहाणीचा मार्ग उपयोगी पडला नाही हे तुम्ही दिलेल्या उदाहरणावरूनच दिसून येते. उलट मारहाण केल्यामुळे त्यांचा लग्न करण्याचा निर्धार वाढला नसेल कशावरून (रिवर्स सायकॉलॉजि)? मुलगी सज्ञान असेल तर तुम्ही तिला समजावून सांगितल्याशिवाय काहीही करू शकत नाही. तिला कोणी नुकसान पोहोचवत असेल तर पोलीसांत तक्रार करू शकता. बाकी प्रत्येक जण आपलं भाग्य स्वतः ठरवतो, ते त्याचे त्याला/तिला ठरवू द्यावे.

In reply to by उपयोजक

मारहाण करणं चुकीचं असं समजू! कुठल्याही परिस्थितीत मारहाण करणे हे चुकीचेच आहे आणि तुम्ही त्याचे समर्थन करताय, हे काही बरोबर नाही.

मॉरल पोलिसींग की लत बहुत भयानक होती हय. त्यामुळे वर कितीकांनी सांगितलं तरी धागालेखकाला ते 'सत्कार्यात आलेले काटे' वाटतील. आणि महाराष्ट्रात तशीही मॉरल पोलिसींगची जुनी परंपरा आहे. (उदा० पंचहौद मिशन प्रकरण) काही नाही हो सकेशु, तुम्ही काही ऐकू नका या वैट्ट लोकांचं.

In reply to by मोदक

पंचहौद मिशन नावाची (मिशनरी) शाळा होती (अजूनही आहे सुभाषनगरजवळ). त्यांनी १८९२मध्ये काही समारंभाप्रीत्यर्थ लोकमान्य टिळकांना आणि न्या० रानड्यांना शाळेत बोलावलं. समारंभ संपल्यावर चहा दिला. त्यांनीही तो प्यायला. हे सगळं पेपरात छापून आल्यावर गदारोळ उठला. सनातनी लोकांच्या मते ख्रिस्ती लोकांच्या हातचा चहा पिणं हे पातक होतं. चुकीचं, अनैतिक होतं. त्याबद्दल या दोघांवर ग्रामण्य** बजावण्यात यावं अशी त्यांची मागणी होती. यात कोणीतरी शंकराचार्यांना आर्बिट्रेटर नेमलं. त्यांनी प्रायश्चित्त## घेण्याची शिक्षा फर्मावली. टिळकांनी घेतलं. रानड्यांनी काय केलं ते आठवत नाही. **हे ग्रामण्य म्हणजे एक नंबर प्रकार असायचा. बेसिकली वाळीत टाकणे, पण त्यात इतरही काही विनोद होते. प्रबोधनकार ठाकर्‍यांनी या ग्रामण्य प्रकरणावर बरंच विस्तृत लिहिलं आहे. ##हाही एक नंबर प्रकार

In reply to by आदूबाळ

पंचहौद फारच भारी प्रकरण झालं होतं. टिळकांनी देखील सहजा सहजी प्रायश्चित्त घेतलं नाही. आधी तर त्यांच्या वकीली डोक्याने "बटाटा पण आपला नाही, साबुदाणा पण नाही पण तो तर तुम्ही उपासाला पण खाता, शिवाय चहा चिनी मातीच्या भांड्यातुन दिला होता - तो निर्लेप च होता. फार काय, करणारे आचारी ब्राह्मण च होते" पर्यंत युक्तिवाद केले. ते नेहमीसारखेच प्रभावी देखील होते. शिवाय ग्रामण्याला भीक घालायची नाही हे त्यांनी ठरवलंच होतंं, वार्‍याशी सुद्धा भांडतील अशी आधीच ख्याती असलेल्या टिळकांना आणि त्यांच्या अ‍ॅटिट्युड ला या वाळीत टाकण्याचा असा कितीसा फरक पडणार आहे याची मुळात परंपरावाद्यांना देखील खात्री नव्हती. त्यांच्या मुलाची मुंज देखील त्याच काळातली . स्वतः पौरोहित्य करेन नाही तर काशीच्या ब्राह्मणांना बोलावेन वगैरे त्यांनी ठरवलं होतं (हा संदर्भ नीट आठवत नाहीये, खात्री करुन घ्यायला हवी) . कुटुंबाची मात्र त्यांच्या अवस्थ थोडी नाजुक झाली होती, मुलींबरोबर खेळायला कुणी मिळेना- घरी मदतीला आजुबाजुच्या बायका येईनात- पण जसा काळ पुढे जायला लागला तसा तो विरोध ही मवाळ व्हायला लागला कारण शेवटी वैयक्तिक हितसंबंध महत्वाचे असतातच - समाजाची भीती एका ठराविक मर्यादेपर्यंतच काम करते. होय नाही करता करता आणि " आम्ही म्हणलं नव्हतं टिळक छुपे सुधारक च आहेत" हे फार पुढे यायला लागल्यावर, त्यातल्या त्यात शंकराचार्यांची मध्यस्थी दोन्ही पार्टींना पटली आणि ते प्रकरण एकदाचं मिटलं. सुधारकांनी नेहमीसारखं सगळंच थेट शिंगावर घेतल्याने त्यांना शंकराचार्यांची ही पळवाट उरली नाही आणि वाळीत टाकलेल्या लोकांच्या सुधारणेसाठी ते नेहमीसारखे एकटेच झगडत राहिले.

In reply to by आदूबाळ

छ्या.. असे लिहायचे नै कै.. ..आणि या प्रकरणानंतर उण्यापुर्‍या वीस वर्षांत पुण्यात चहावाल्यांना अच्छे दिन आले. असे कैतरी लिहा. :D

लग्न करते वेळी मुलगी २१ वर्षाची होती, म्हणजे सज्ञान होती. तुम्ही सर्वानी समजावून पण पाहिले. तिने ऐकलं नाही. आता घेतलेल्या निर्णयामुळे रडत आहे. रडू द्यात की. तुम्ही कशाला जास्त काळजी करता. याचा विपरीत परिणाम असा होईल की लोक तुम्हालाच म्हणतील हा "केअशु' का एवढा इंटरेस्ट घेतोय या मुलीबद्दल. दुसरे म्हणजे त्या पोराचा तुम्ही हात मोडला. त्याने जर हाफ मर्डर ची केस तुमच्यावर ठोकली असती तर मग काय केले असते? म्हणून म्हंटले टुक्कार पोरांच्या नादी लागून दुसऱ्याच्या बापासाठी आपली दाढी मिशा काढू नका. बाकी मर्जी तुमची. सुयोग्य मार्ग म्हणाल तर एक भाऊ (मित्राची बहीण ती आपली बहीण) या नात्याने त्या मुलीने घेतलेला निर्णय सार्थ ठरवा म्हणून तिच्या गरीब रिकामटेकड्या नवऱ्याला कसे कामधंद्याला लावून त्यांची आर्थिक/सामाजिक परिस्थिती सुधारेल यासाठी प्रयत्न करा. हाणामारीच्या भानगडीत पडाल तर बाराच्या भावात जाल.

धाग्यावर बर्‍याच जणांचा प्रतिसाद हा मारहाण करु नका.लागते वाट मुलीची लागू द्या.तुम्हाला काय करायचंय? असा दिसतो आहे.पण धाग्याच्या नावाशी संबंधित प्रतिसाद येत नाहीयेत. मारहाणीवरच सगळ्यांचा फोकस आहे. धागा मुली अशा का वागतात यामागची सामाजिक किंवा मानसिक कारणे शोधली जावीत त्याचा उहापोह व्हावा यासाठी आहे.

In reply to by विशुमित

वरती नितीन पालकरांनी सुयोग्य शब्दात दिलेले उत्तर पुरेशे ठरावे असे वाटते. बाकी त्या नागराजांनी सैराट काढून चूकच केली म्हणायची.

In reply to by उपयोजक

प्रत्येकाला पैसा आणि त्यासाठी कोणाहीबरोबर राहणे पसंत असेल असे नाही. प्रत्येकाला आपले आयुष्य हवे तसे जगायचा अधिकार आहे. म्हणून मुली अशा वागतात आणि त्यांना तसे वागू द्यावे. गोडबोल्या पोरांच्या नादी लागून दु:ख मिळाले तर मिळू द्यावे. तो त्यांचा जीवनानुभव आहे. उगीच दुसर्‍याला जपण्याच्या व बोन्साय करण्याच्या भानगडीत पडू नये असे मला वाटते.

इमॅजीन करा. तुम्ही मला कट्ट्यावर भेटला.... माझे मित्र आणि काही जणांनी तुम्हाला बेदम मारलं... हात मोडेपर्यंत मारलं.. तरीपण तुम्ही बेफिकीर... धागे काढीन तर असेच.... कसं वाटतंय. तुम्ही काय करावं आणि काय करू नये हे कुणी दुसर्‍यानी ठरवावं.

In reply to by अकिलिज

उदाहरण तरी व्यवस्थित द्या. मी जर काहीच केलं नसेन तरीही तुम्ही मला का माराल? इथे काही तरी घडलं मग मारहाण झाली ना?

In reply to by उपयोजक

त्यांनी प्रकरण केलं. तुम्हाला आवडलं नाही (पक्शीः तुम्हाला असं काही प्रकरण करायाचा चान्स गावला नाही) तुम्ही असा उदात्त धागा काढला. आम्हाला आवडला नाही.

असाही एक धागा काढा . मी मोलाचे प्रतिसाद देईन . मी स्वतःच वाया गेलोय त्यामुळे . त्यात मारहाणी ची प्रवृत्ती असणारी ,मुलींना फसवणारी ,अश्या अनेक गोष्टी ऍड करता येतील . मुले अशी का वागतात असा धागा काढू काय म्हणता ?

मंगेश पाडगावकर यांची सुंदर कविता तुमचं काय गेलं ? याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं करु दे की ! मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ? तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला नको तितक्या जवळ जाऊन अंगाशी खेटला, लाल लाल गुलाबाचे फूल होऊन पेटला भेटला तर भेटू दे की पेटला तर पेटू दे की ! तुमच डोकं कशासाठी इतकं गरम झालं ? त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं करु दे की ! मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ? एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली पाऊस होता तरी भिजत त्याच्या घरी गेली, घरात तेव्हां कोणीच नव्हतं म्हणून त्याचं फ़ावलं तिला जवळ घेऊन त्याने चक्क दार लावलं, लावलं तर लावू दे की फावलं तर फावू दे की तुमच्या आमच्या पूर्वजांनी वेगळं काय केलं ? त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं करु दे की ! मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ? घरात जागा नसते हल्ली त्यांच चालणारच टॅक्सीत प्रकरण, ते थोडेच बसणार आहेत घोकत पाणिनीचं व्याकरण, गुलाबी थंडीचे परिणाम हे होणारच ! कुणीतरी कोणाला जवळ ओढून घेणारच घेतले तर घेऊ दे की व्हायचे ते होऊ दे की तुमच्या घरचं बोचकं त्याने थोडंच उचलून नेलं ? त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं करु दे की ! मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?

वर बर्‍याच प्रतिक्रिया वाचल्या. अनुभव विश्व मर्यादित असले कि अशा प्रतिक्रिया येणार हे अपेक्षित होते. बर्‍याच जणाना त्या मुलाला मारल हे खटकलय, पण लक्षात घ्या हि शेवटची पायरी आहे. आपणही आपल्या घरी लहान मुलाना प्रथम रागावतो आणि अगदिच निरुपाय झाला कि मारतो( असे मारावे कि नाही हा वेगळ्या धाग्याचा विषय) हिच गोष्ट त्या गावी झाली असणार हे लक्षात घेतले गेले नाही. मोठी शहरे सोडली तर लहान गावी अश्या गोष्टीचा बोभाटा पटकन होतो. घरात असे एखादे उदाहरण घडले तर त्या घरातील बाकीच्या मुलांच्या लग्नात तर अडचणी येतातच पण, भावकीत हि लग्न होताना अवघड होते. असे होउ नये ह्यासाठी त्या मुली व मुलाचे सुरवातीला काउन्सलींग केले गेले, तरी ही एकत नाही म्हणल्यावर नाईलाजानेच मारहाण झाली.यात घागाकर्त्याने एक मुध्दा लिहीला नाही आहे, त्या मुलीला जेव्हा सुरवातीला समजाउन सांगितले गेले कि तुझ्या आणि तुझ्या मुलाचा परिस्थिती असलेला फरक आणि लग्नानंतर तुझ्या जीवनशैलीत होणारा वाईट बदल ( जो तीला नंतर समजलाच) तेव्हा तीने, "माझे लग्न याच मुलाशी लावून दिले नाहीतर मी आत्महत्या करेन व चिठ्ठीत तुम्हा सगळ्यांची नावे लिहून ठेवेन". कायद्याची हि अक्कल त्या मुलीला आहे पण आपले भविष्यात नुकसान नको म्हणून आपल्याच भावकीतील लोकांना धमकी द्यावी अशी वाटते यात काही चुकीचे नाही? एका मुलीपायी होणारे सगळ्यांचे नुकसान या सर्व नातेवाईकांनी केवळ वर हि मंडळी म्हणत आहेत तसे केवळ "मोरल पोलिसिंग" नको यासाठी गप्प बसावे ? आणि असे काही त्यानी केले तर त्यांना एका फटक्यात टुकार, रानटी प्रवृत्ती ठरविणारे आहेतच . हाच दॄष्टिकोण ठेवून जायचे ठरवले तर जरा कुठे निसर्गरम्य स्थळी , एखाद्या एतिहासिक ठिकाणी जरा एकांत दिसला कि चाळे करणारी मंडळी दिसतात, अगदी नवीन लग्न झालेल्या लोकांचे हेच प्रकार पहायला मिळतात. एक तर सर्वसामान्य लोक जरा बदल म्हणून बाहेर पडलेले असतात, तिथे जावे तर आपल्याच लहान मुलांसमोर हे असले प्रकार बघून निमूटपणे परत यावे लागते. यातून कधी कधी गावकर्‍यांचा किंवा स्थानिकांचा संमय सुटून मारहाण झालेली वाचायला मिळते. मोराल पोलिसींगचे डोस पाजण्यापेक्षा हे प्रकार का खपवून घ्यायचे ? याचे आधी उत्तर द्या. या प्रेमी जीवांनी किंवा लग्न झालेल्या जोडप्या किमान आपला उपद्रव ईतरांना होणार नाही याची जाणीव ठेवायला नको? अन्यथा काही बागेमध्ये व मंदिरामध्ये "इथे अश्लिल चाळे केले तर बांबुचे फटके मिळतील " असा बोर्ड लावायची वेळ का यावी? माझा स्वताचा अनुभव देतो. एकदा पावसाळा संपता संपता रायगडला मी व माझा भाउ असे दोघेच गेलो होतो, मधला दिवस असल्याने गडावर फार गर्दी नव्हती. एक चार जणांचा ग्रुप होता. दोन मुले व दोन मुली. त्यात एक नवीन लग्न झालेले जोडपे होते. ठिकठीकाणी एकमेकाच्या गळ्यात हात घालून फोटो काढणे चालू होते. सुरवातीला मी दुर्लक्ष केले. मात्र जगदीश्वर परिसरातही हेच चाळे सुरु झाले. मंदिर परिसरात आपण आहोत याची साधी जाणीव त्याना नव्ह्ती. हेच चाळे करायचे होते तर महाबळेश्वर , माथेरान आहेच. ईथे मी आक्षेप घेतला. मग मात्र गड बघायला(?) आलेले हे तथाकथित पर्यटक मागे वळून न बघता परतीच्या वाटेला लागले. इथे मला कोणी कशाला हे मोराल पोलिसिंग किंवा दरडावल्याबध्दल पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे असे म्ह्णले तरी चालेल, पण काही श्रध्दा असलेल्या ठिकाणी असे चाळे करणे योग्य वाटत नाहीत. तुमच्या चार भिंतीत तुम्ही काहीहि करा. मला काय त्याचे हि समाजातील वाढणारी प्रवॄत्ती अनेक अनिष्ट गोष्टीना प्रोत्साहन देते आहे. थेट धाग्याशी संबधीत नाही पण रहावत नाही म्हणून उदाहरण देतो, परवा पिंपरीमधे झालेल्या तरूणाच्या अपघाताचा प्रकार किंवा आटपाडी-मुंबई बसला झालेला दहिवडीजवळ अपघात, दोन्ही ठिकाणी मदत राहिली बाजुला मोबाईल मधून फोटो काढून शेअर करण्याची घाई बघायला मिळते. बाकी धाग्याचा विषय नीट समजावून घेउन प्रतिक्रीया दिल्या जाव्यात असे वाटते.

In reply to by दुर्गविहारी

कोणालातरी माझा मुद्दा समजला हे वाचून बरे वाटले. काही मुद्दे लिहायचे राहीले असतील तर त्याबद्दल खरंच क्षमस्व! काही जणांना हा धागा एकांगी वाटला असेल पण तुमच्या विस्तृत प्रतिसादामुळे दुसरीही बाजू लक्षात येईल मिपा सदस्यांच्या असे वाटते. मनापासून आभार!!!

In reply to by दुर्गविहारी

आपण पण लक्षात घ्यायला हवे की ते तरुण/तरुणी पण सर्वसामान्य असतात आणि जरा बदल म्हणून बाहेर पडलेले असतात. नवीन लग्न झालेले जोडपे होते, त्यांना पण प्रायव्हसी हवी असते जी कदाचित घरी मिळत नाही. (भारतातली प्रायव्हसी हा एक स्वतंत्र धाग्याचा विषय आहे, म्हणून जास्त चर्चा करत नाही.) मुळात चाळे करणार म्हणजे काय करणार? गळ्यात गळे घालून फिरतील, एकमेकांशी सलगीने चिकटून बसतील, किसिंग करतील अजून काय? भारताबाहेर आलात तर हे सगळे सर्रास दिसते आणि कुणाला (लहान मुलांना पण) त्याचे कौतुक नाही. भारतात पण घरात टीव्हीवर लहान मुले हे सगळे बघतातच. त्याच्यासाठी इतके मोरल पोलिसिंग, पोलिसांच्या ताब्यात द्यायची भिती किंवा थेट मारहाण कशाला?

In reply to by उदय

आपले उदारमतवादी विचार समजले. ह्या तरुण, तरूणीना बाहेर पडून फिरायला कोणीही अडवत नाही किंवा नुकतेच लग्न झाल्यामुळे असणारे एकमेवांविश्यी नैसर्गिक आकर्षण समजू शकतो. पण सार्वजनिक ठिकाणी वावरताना काही गोष्टींची काळजी घेण गरजेच आहे. काही शिस्त सांभाळणे आवश्यक आहे. आपल्या चाळ्याचा ईतराना त्रास होउ न देण तर आपण करू शकतो ना? मंदिराजवळ असताना आपला प्रेमाचा उमाळा आवरता येईल ना? बाकी बंद खोलीत तुम्ही काय करताय ह्यावर कोणी आक्षेप घेत नाहिये. भारताबाहेर काहिहि चालत असले तरी आपण ह्या गोष्टी करताना भारतात आहोत याचे भान ठेवायलाच हवे. हे प्रकार करताना कित्येकदा एकांतात या जोडप्याना गाठून गुंडानी लुटण्याची किंवा भावना चाळवल्या जाउन मुलीवर बलात्कार केल्याच्या घटना घडल्या आहेत. आपण या गोष्टीना निमंत्रण देणार आहोत्?त्याना या आधी चांगल्या भाषेत समजावले होते. आणि मिठ्या मारुन फिरायला महाबळेश्वर, माथेरान आहेतच. अखिल महाराष्ट्राला वंदनीय रायगडावर हे करायची गरज नव्हती. बाकी सार्वजनिक जागी किसिंग, प्रेसिंग हे चाळे कायद्याने गुन्हा आहेत हे माहिती असेल अशी अपेक्षा करतो. पोलिसाची अश्या ठिकाणी चक्कर झाली हे प्रकार बंद होताना दिसतात, म्हणजे आपण काही चुकीचे करतोय हे यांना समजतय. भारतात मुलाबरोबर हे चाळे असलेले कार्यक्रम बघितली जातात हा निष्कर्ष कश्याच्या आधारावर काढला? आणि मुलांसमवेत असताना ईतर कुटूंबानी हे निमुटपणे चालवून घ्यावे अशी अपेक्षा तुम्हाला गैर वाटत नाही.

In reply to by दुर्गविहारी

बाकी सार्वजनिक जागी किसिंग, प्रेसिंग हे चाळे कायद्याने गुन्हा आहेत हे माहिती असेल अशी अपेक्षा करतो. >>> हे मला माहीत न्हवते. प्रश्न उदारमतवादी विचारांचा नाही, संकुचित मनोवृत्तीचा आहे. मिठ्या मारणे तर दूरची गोष्ट, भारतात तर नवरा-बायको हातात हात घालून गेले तरी संस्कृतीरक्षकांना चालत नाही. कित्येकदा एकांतात या जोडप्याना गाठून गुंडानी लुटण्याची किंवा भावना चाळवल्या जाउन मुलीवर बलात्कार केल्याच्या घटना घडल्या आहेत. >> या अशा घटना भारतातच नाही तर भारताबाहेरपण होतात. सुनसान जागी कुणीही लुटला जाऊ शकतो, बलात्कार किंवा विनयभंग होऊ शकतो. तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे? मिठ्या मारुन फिरायला महाबळेश्वर, माथेरान आहेतच. अखिल महाराष्ट्राला वंदनीय रायगडावर हे करायची गरज नव्हती. >>> गडांवर जाऊन दारूपार्ट्या करणे, तिथे जाऊन आरडा-ओरडा करणे, घाण करणे या गोष्टी करताना भान ठेवले जाते का? भारतात मुलाबरोबर हे चाळे असलेले कार्यक्रम बघितली जातात हा निष्कर्ष कश्याच्या आधारावर काढला? >>> टीव्हीवर काय प्रोग्राम दाखवतात ते मी स्वतः पाहिले आहे. शिवाय भारतात पॅरेंटल कंट्रोल्स ("V-Chip") किंवा प्रोग्राम रेटिंग प्रकार माझ्या माहितीत तरी नाहीत किंवा वापरले जात नाहीत. अन्यथा "मुन्नी बदनाम हुई" आणि "चोली के पिछे क्या है" सारखी गाणी प्राइम टाइममध्ये सर्रास दाखवली गेली नसती. का ही गाणी "चाळे" या सदरात बसत नाहीत?

In reply to by उदय

भारतात तर नवरा-बायको हातात हात घालून गेले तरी संस्कृतीरक्षकांना चालत नाही.>> माझे मत फक्त माझ्या अनुभवापुरते सांगितले आहे. सार्वजनिक जागी वावरताना किमान ईतरांनी आक्षेप घ्यावे असे वागु नये हे सांगावे लागते हे खरेच दुर्दैवी आहे. बर मग्न झालंय म्हणजे आयुष्यभर तुम्ही एकमेकांसोबत असणारच आहात ना? हे असले चाळे करणारे बघून मुंबईला नॅशनल पार्कमधे बर्‍याच बलात्काराच्या घटना झाल्या होत्या. त्याचा संदर्भ होता. घटना जुन्या आहेत त्याची लिंक मला सापडली नाही. गडावर चालणार्‍या प्रत्येक आक्षेपार्ह गोष्टींचा मी कडाडून विरोध करतो. या धाग्याशी काही संबध नव्हता म्हणून त्याचा उल्लेख केला नाही ईतकेच. तुमच्या घरात असणार्‍या टि.व्ही. वर काहीही दाखविले जात असेल पण कोणते चॅनेल बघायचे यावर तुमचे नियंत्रण नाही? चॅनेल ब्कॉक करू शकतोच ना? आणि टि.व्ही. वर काहिही दाखविले जाते म्हणून प्रत्यक्षात या घटना मुलांसमोर धरबंद न ठेवता व्हाव्यात असे तुमचे म्हणने आहे काय? बाकी धाग्याचा मुळ उद्देश, स्वताचे न्युड व्हिडीओ केवळ आपला मित्र सांगतोय म्हणून शेअर केल्याने होणार्‍या नुकसानाला त्या मुलीलाच तोंड द्यावे लागते हा असून केवळ एकच वाक्य उचलून त्यावर गदारोळ घालणारे सदस्य बघून कीव आली. मि.पा.वर हा धागा टाकायचा धागाकर्याचा उद्देश केवळ या माध्यमातून या अश्या मुलींपर्यंत हा संदेश पोहचला तर किमान आयुष्यात पुढे होणारे नुकसान टळेल ईतकाच आहे. त्याबध्दल काही चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे.