हा प्रश्न कसा सोडवावा?
सध्या काही मित्रांनी त्यांच्यासाठी वधुसंशोधनाच्या कामात मलाही सामील करुन घेतलंय.बरेचसे मित्र हे ब्राह्मण समाजातील आहेत.त्यानिमित्याने विविध वधुवरसंशोधन संस्थांना भेटी देणं सुरु आहे.बहुतेक मित्र हे पौरोहित्य करणारे किंवा अल्पउत्पन्न गटातील आहेत.शिक्षणही आर्टस किंवा कॉमर्स शाखेतून पदवी,पदव्युत्तर असेच आहे.वयंही साधारण २८ ते ३५-३६ या गटातील आहेत.सगळे दक्षिण महाराष्ट्रातील म्हणजे सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर,सिंधुदुर्ग या जिल्ह्यातले आहेत.
वधुवरसंशोधन संस्थांमधील बर्याचशा मुली या पुणे,मुंबई,अौरंगाबाद,नाशिक अशा ठिकाणी चांगल्या पोस्टवर,चांगल्या पगारावर नोकर्या करणार्या आहेत.फार थोड्या मुली या १२ वी किंवा फक्त BA,B.com अशा आहेत.
जी समस्या सध्या सगळीकडे आहे तीच इथेही जाणवली.मुलींच्या अवाजवी अपेक्षा! मुलगी नको मुलगा हवा या हट्टाचे दुष्परिणाम हे आता असे समोर येत आहेत.
मुलगा इंजिनियर किंवा तसंच शिक्षण असणारा,मुंबई किंवा पुणे,बंगळूर अशा मोठ्या शहरात राहणारा,महिना किमान ४० हजारांवर पगार असणारा,स्वत:चा फ्लॅट असणारा हवा.अशा अपेक्षा आहेत या मुलींच्या!
चांगल्या पोस्टवर असणार्या,बर्यापैकी मिळवणार्या मुलींच्या अपेक्षा समजण्यासारख्या आहेत,पण १२ वी किंवा BA असं शिक्षण असणार्या जेमतेम पगार मिळवणार्या मुलींनादेखील लग्नासाठीचा मुलगा इंजिनियर किंवा तसंच एखादं ग्लॅमरस शिक्षण असणारा किंवा सरकारी नोकरी असणारा हवा आहे.
मुलींची वयं २९,३२,३४ झाली तरीही या अपेक्षा कमी होत नाहीत.
आपल्या जातीत कमी शिकलेल्या मुली मिळत नसतील तर दुसर्या जातीतील मुली करुन घ्या, हा ही सल्ला मुलांना देऊन झालाय.पण पौरोहित्य करणार्या किंवा छोट्या गावांमधे नोकरी करणार्या मुलांना किंबहुना त्यांच्या पालकांना पटणारा,रुचणारा नाही.कदाचित यामुळे त्यांच्या व्यवसायावर किंवा कुटूंबातील अन्य सदस्यांच्या विवाहात अडचणी येऊ शकतात.आंतरजातीय विवाहासाठी खरंतर प्रबोधन करायला लागेल पण सध्या तेवढा वेळ देणं शक्य नाही.कारण आधीच या मुलांची लग्नाची वयं उलटून चाललेत.
मग यावर बरंच डोकं खाजवून काही उपाय सापडले आहेत. ते असे,
१) भारतातल्या अन्य राज्यांमधेही ब्राह्मण समाज आहे.या राज्यांमधे भौगोलिकदृष्ट्या मागासलेले असे काही भाग आहेत.तेथील पालकांना आपल्या मुलींना फार खर्चिक शिक्षण देणं किंवा त्यांच्या विवाहावर फार खर्च करणं शक्य होत नाही.अशा भागातल्या या पालकांशी संपर्क साधून त्यांना अशा आंतरराज्यीय विवाहासाठी राजी करणे.अर्थात भाषा आणि काही प्रमाणात संस्कार वेगळे असणारंच पण हा काही फार मोठा इश्यु नसावा!
२) हल्ली नोकरीच्या निमित्ताने किंवा बदललेल्या जीवनशैलीमुळे रोजचं जीवन हे खुप दगदगीचं झालेलं आहे.बर्याचदा प्रसारमाध्यमांतून असं वाचायला,ऐकायला मिळतं की तिशीनंतर मुलींसाठी अपत्यप्राप्ती ही सहजसाध्य नसते.मग काही वेळा खर्चिक डॉक्टरी उपायांनंतर हे साध्य होतं. तर यात कितपत तथ्य आहे? हे जर सरसकट होत असेल,अपत्यप्राप्तीला असा विलंब हमखास होतंच असेल तर यासंबंधी शास्त्रीय माहिती मुलींना देऊन योग्य वयात विवाह करण्यासंबंधी त्यांचं प्रबोधन करावं.मतपरिवर्तन करावं
(यासंबंधी शास्त्रीय माहिती,लिंका इथे कोणी दिल्या तर आभारच!)
३) होणार्या नवर्याला तिशीच्या आतच गलेलठ्ठ पगार असावा अशी बर्याच मुलींची किंबहुना त्यांच्या आईवडीलांची तशी अपेक्षा असते.वाढलेली महागाई हे कारण त्यांच्याकडून पुढे केलं जातं.
आता ही महागाई कुठे भेडसावते?तर काही मुख्य गोष्टींमधे म्हणजे,
* मुलानं घर/फ्लॅट घेतला असेल तर त्याचा हप्ता,
* हल्ली प्रत्येक घरात किमान दुचाकी तरी असतेच त्यासाठी लागणारं पेट्रोल,किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास केल्यास होणारा खर्च.
* घरखर्च.
* होणार्या अपत्याच्या इंग्रजी माध्यामातल्या शिक्षणाचा खर्च.(त्यासाठी हल्ली खुप आधीपासून बचत करावी लागते!)
या सगळ्या खर्चांबाबत फक्त मुली त्यांचे पालक आणि एकुणच समाजाचं काही प्रमाणात प्रबोधनाचा प्रयत्न करणे.कारण बर्याचदा आपण आंधळेपणाने दुसरा तसं करतो म्हणजे आपणही(ऐपत,क्षमता नसताना) असं असंच केलं पाहिजे या सामाजिक दबावाला बळी पडतो.
४) काही असे कोर्सेस किंवा व्यवसाय ज्यांमधे आर्थिक प्राप्ती चांगली आहे पण त्यांना तितकसं ग्लॅमर नाही.उदा. ITI किंवा पौरोहित्य.
माझे पती ITI आहेत किंवा भटजी आहेत हे सांगण्यात मुलींना कमीपणा वाटतो.
दुर्दैवाने आताशा या ग्लॅमरस शिक्षणालाच जास्त महत्व आलंय.
काहीवेळा ITI झालेल्या व्यक्तीच्या नोकरीची स्थिरता अधिक असू शकते.
हा गैरसमज दूर करुन अशा कोर्सेसना,पौरोहित्याला ग्लॅमर यावं म्हणून प्रयत्न केले पाहिजेत.
५) पती-पत्नी दोघांनी मिळून कष्ट केले,विश्वास ठेवला,लग्नानंतरही सुरुवातीची काही वर्षे दोन्हीकडच्या पालकांनी थोडाफार आर्थिक,मानसिक पाठींबा या जोडप्याला मिळाल्यास पुढील वाटचाल सुसह्य होईल असा विश्वास निर्माण केला पाहिजे.
आता हे सगळे उपाय प्रत्यक्षात आणण्यासाठी काय काय करता येईल? किंवा अजून काही उपाय असतील तर तेही सुचवले जावेत.
आज हा प्रश्न ब्राह्मण समाजात प्रकर्षाने जाणवत असला तरी काही वर्षांनी इतर समाजातही जाणवू लागेल किंवा लागलाही असेल.इथे पुरोहितांना नाकारलं जातंय,इतर समाजात कदाचित शेतकरी मुलगा नाकारला जाईल.
एकंदरीत या प्रश्नाचा काही निकाल लागावा, परिस्थिती बदलण्यास मदत मिळावी यासाठी हा लेखनप्रपंच!
प्रतिक्रिया
स्वतःचे घर होईस्तोवर लग्न न
परत एकदा धन्यवाद डॉ. साहेब!
पण मुलींच्या अवास्तव मागण्या
रेवती ताई सहमत!
डॉक, स्वतःचे घर नसलेल्या
डॉक्टर साहेब धन्यवाद.
खूप माहितीपूर्ण माहिती.
माझ्या स्वतःच्या मुलीला किंवा
लाखभर रूपये पगार आणि
कोकणातील स्थळे
मुलगी नको मुलगा हवा या
सध्या महागाईचे प्रमाण खूपच
परवाहून आलेल्या
माझा स्वतःचा खर्च मुंबईत
धन्यवाद डॉक्टरसाहेब.
काही मोठा खर्च राहिला असेल तर
बरेचजणांनी चांगले मुद्दे
नैसर्गिक न्याय व अक्कल
पूर्वी टका आणि मुवि यांचे असे
उत्पन्नाचा दुसरा स्रोतबद्दल
होईल हो लग्न! असं तुम्हाला का
चांगल्या वधुवर सूचक मंडळात
खरे सर, इथे धागे काढून झैरात
हायला
ज्या मुला किंवा मुलीचा चेहरा
ऍमी ताई
एखादी सो कॉल्ड सुंदर नसलेली
प्रचंड सहमत!
डॉक आणि पिरा दोघांशी असहमत.
अर्थातच कुणी कुणाकडुन काय
येस! कोण कोणासोबत कशासाठी
इथे बरेचजण लवकर लग्न करा
5 वर्ष डेटिंग करून लग्न
मागच्या पिढीतील हे "अपवाद"
तुम्ही नमूद केलेल्या
बोंबला! पाच वर्षात अंदाज नाही
(No subject)
प्रतिसाद पूर्ण का दिसत नाहीय
you can live happily single
लवकर लग्न आणि घटस्फोट
लवकर घटस्फोट हे बऱ्याचदा बरे
इतर समाजात हे प्रश्न नाहीत
खालच्या जातीत,तुमच्याकडे हे
आंतरजातीय विवाह
आश्चर्य हे आहे की सगळीकडे
आप्पा काय हे?
असेच असते साहेब. 'आम्ही काहीच
रिझनेबल
त्यामुळे लग्न झालेल्या मुलीने
अर्रर्रर्र
Pagination