शिवसेना हा तसा पहायला गेले तर एक छोटा राजकीय पक्ष.
छोटा म्हणायचे कारण की या पक्षाने मुंबई , नाशीक, ठाणे या पलीकडे कुठे काही फारसे केल्याचे वाचल्याचे आठवत नाही.
सेनेने महारष्ट्रातील लोकाम्साठी नक्की काय केले ते खरेच अभ्यासायला हवे. एके काळी मराठी चा जयघोष करणारी सेना घुमजाव करत एकाएकी हिंदुत्ववादी कशी झाली याची कारणे कधीच बाहेर आली नाहीत. तरीही लोकाना खास करुन तरुणाना; सेनेचे आकर्षण होते कारण बाळासाहेबांची भाषण करण्याची हातोटी.
मुंबईत एकेकाळी गिरणी कामगारांच्या बळावर वाढलेल्या सेनेने दत्ता सामंतांच्या संपाच्या वेळेस काय भुमीका घेतली होती हे कोणाला आठवणार नाही.
पुण्यात गाजलेल्या टेल्को सम्पाच्या वेळेस देखील सेना कुठेही चर्चेतही नव्हती.
सेना खरी चर्चेत आली ती सेनेकडे मुंबईचे महपौर पद आल्या नंतर.
बाबरी मशीद प्रकरणात कोणतीही जबाबदारी न घेणार्या भाजप पेक्शा बाळासाहेबानी " हो शिवसेनैकीनी हे केले असल्यास मला त्याचा अभिमान आहे" अशी घोषणा केली त्या घोषणेला लोक त्यांचा खरेपणा समजले. नंतर सेनेच्या या रोखठोकपणाचे लोकाना अधीकच आकर्षण वाटू लागले.
त्यातूनच सेना विधानसभेत सत्ताधारी झाली. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक अपेक्षीत पण वेगळा प्रवाह सुरू झाला.
सेने बद्दल बरीच चर्चा होते. त्यानी ग्रामीण भागात शाळा, पतसंस्था , कॉलेज , रोजगार या साठी काहीच केले नाही.
याबद्दलही काही विचारायचे नाही.
लखोबा लोखंडे , नारोबा , खंडोजी खोपडा वगैरे घणाघाती दुषणांवर जनता त्यातील मनोरंजकतेमुळे खुष असायची.
सध्याच्या फडणवीस सरकारात सेनेची काय भुमीका आहे ते जगजाहीर आहे.
शिवसेनेबद्दल समर्थनार्थ एक गोष्ट मात्र वारंवार सांगितली जाते की १९९२ च्या मुंबई दंगलीच्या वेळेस सेना नसती तर मुंबई वाचली नसती.
शिवसेना होती म्हणून आपण आज मुंबईत आहोत.
हे ऐकल्यावर एक विचार मनात येतो की त्या वेळेस मुंबईत मुंबै पोलीस , निमलश्करी दले, काही भागात लक्शर तैनात केले होते. हे सगळे असतानाही परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती आणि शिवसेना या सर्वांपेक्शा प्रबळ होती,
राज्य राखीव पोलीस दल ही त्यावेळेस तैनात होते. मग त्यांचे जवान हे त्यावेळेस काय केळी खात बसले होती की काय अशी शंका येते.
या वेळेस शिवसेने ने नक्की असे काय केले की जे पोलीस दल , निमलष्करी दले आणि भारतीय सेना याना जमत नव्हते?
एखादा राजकीय पक्ष हा राज्य पोलीसदल , सैन्य दल यांच्या पेक्षाही प्रबळ ठरतो याला कोणते लक्षण मानायचे.
मला यात कोणत्याही राजकीय पक्षाची भलामण करायची नाही मात्र केवळ जाणून घ्यायचे आहे.
१९९२ च्या दंगलीत सेनेने असे काय केले की त्यामुळे मुंबई जे पोलीस दले, निमलक्षरी दले , राज्य राखीव सुरक्शा दले याना त्यांच्या हत्यारांसहीतही वाचवणे जमत नव्हते आणि सेनेने ते करुन दाखवले
( हे उघडपणे मुंबईत कोणाला विचारायचे माझे धाडस नाही. म्हणुन इथे विचारतोय )
वर्गीकरण
वाचने
119771
प्रतिक्रिया
329
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>> सेनेने काय केले हे कोणीच
In reply to दिवे लावणे वगैरे लिहून कृपया by विजुभाऊ
स्थानीय लोकाधिकार समिती
In reply to >>> सेनेने काय केले हे कोणीच by श्रीगुरुजी
स्थानीय लोकाधिकार समिती किंवा
In reply to स्थानीय लोकाधिकार समिती by सौन्दर्य
<<<<कोणत्याही पक्षाचे भवितव्य
In reply to स्थानीय लोकाधिकार समिती किंवा by श्रीगुरुजी
चष्मा बदला...
In reply to दिवे लावणे वगैरे लिहून कृपया by विजुभाऊ
भेंडिबाजार जवळच्या एका पोलिस
In reply to चष्मा बदला... by राजाभाऊ
भेंडिबाजार जवळच्या एका पोलिस इमारतीतल्या रहिवाश्यांच्या सुटके व्यतिरिक्त समाजकंटकांना जबरदस्त चोप देण्याचं काम त्यांनी केलं होतं.चला, सेनेने ५१ वर्षात केलेले १ काम सापडलं. अजून अशी काही कामे आहेत का?हि २ कामे होतात
In reply to भेंडिबाजार जवळच्या एका पोलिस by श्रीगुरुजी
LOL
In reply to हि २ कामे होतात by एकुलता एक डॉन
शिवसेनेचे हे तिसरं काम--
In reply to भेंडिबाजार जवळच्या एका पोलिस by श्रीगुरुजी
सुसंस्कृत तर आहोतच पण आमची
In reply to दिवे लावणे वगैरे लिहून कृपया by विजुभाऊ
शिवसेना हा तसा पहायला गेले तर एक छोटा राजकीय पक्ष.राष्ट्रीय पातळीवर छोटाच आहे पण राज्यपातळीवर सत्तेत बसलेला, प्रथम क्रमांकाच्या पक्षापेक्षा थोडीशी कमी मते मिळालेला, कित्येक वर्षे सत्ताधारी पक्षाशी लढणारा पक्ष आहे. टोटल संसदेत नगण्य असला तरी इतर प्रादेशिक पक्षांपेक्षा बरीचसे सातत्य ठेवून लोकप्रतिनिधी निवडून आणण्याची ताकद असलेला पक्ष आहे.छोटा म्हणायचे कारण की या पक्षाने मुंबई , नाशीक, ठाणे या पलीकडे कुठे काही फारसे केल्याचे वाचल्याचे आठवत नाही.दुसरे अज्ञानी विधान, जरा आमदारांची लिस्ट काढून पहा, कोकण, मराठवाडा, विदर्भ प. महाराष्ट्रात देखील सेनेचे आमदार आहेत आणि कित्येक जण १५ वर्षाहूनही अधिक वर्षे कट्टरपणे सेनेशी एकनिष्ठ आहेत.सेनेने महारष्ट्रातील लोकाम्साठी नक्की काय केले ते खरेच अभ्यासायला हवे.अवश्य. पण चष्मा चढवून आणि आधीच वर्तूळ काढून बाण मारणे नको.एके काळी मराठी चा जयघोष करणारी सेना घुमजाव करत एकाएकी हिंदुत्ववादी कशी झाली याची कारणे कधीच बाहेर आली नाहीत.इतके वर्षे हिंदुत्वाचा जयघोष करुन वेळोवेळी प्रातःस्मरणीयांची यादी अपडेट करुन आता विकासाचा अजेंडा मिरवण्यामागील कारणे तशीच बाहेर येत नसतात.तरीही लोकाना खास करुन तरुणाना; सेनेचे आकर्षण होते कारण बाळासाहेबांची भाषण करण्याची हातोटी.असणारच.मुंबईत एकेकाळी गिरणी कामगारांच्या बळावर वाढलेल्या सेनेने दत्ता सामंतांच्या संपाच्या वेळेस काय भुमीका घेतली होती हे कोणाला आठवणार नाही.पुण्यात गाजलेल्या टेल्को सम्पाच्या वेळेस देखील सेना कुठेही चर्चेतही नव्हती.संबंधही नाही, नुसती पुणे मुंबई आणि गिरण्या म्हणजे आक्खा महाराष्ट्र नव्हे.सेना खरी चर्चेत आली ती सेनेकडे मुंबईचे महपौर पद आल्या नंतर.अर्थात. स्थानिक राजकारणात जनतेची काय अपेक्षा असते ते जनतेने दाखवून दिले.बाबरी मशीद प्रकरणात कोणतीही जबाबदारी न घेणार्या भाजप पेक्शा बाळासाहेबानी " हो शिवसेनैकीनी हे केले असल्यास मला त्याचा अभिमान आहे" अशी घोषणा केली त्या घोषणेला लोक त्यांचा खरेपणा समजले. नंतर सेनेच्या या रोखठोकपणाचे लोकाना अधीकच आकर्षण वाटू लागले.असतेच. विटा आणि कमंडलूसाठी कोण हिंडले हो आधी? प्रस्तावित रामंदिराची चित्रे हेडगेवारांची जन्मशताब्दीचे मुहूर्त साधून कोणी पोहोचवली? राम ह्या विषयावरील बहुतांशी हिंदूची जुळलेली नाळ कोणी राजकारणात एनकॅश केली?त्यातूनच सेना विधानसभेत सत्ताधारी झाली. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक अपेक्षीत पण वेगळा प्रवाह सुरू झाला.त्याच्या आधीपासून सेनेचे बोर्ड अगदी गावोगावी होते, शाखाही अन कार्यकर्तेही.सेने बद्दल बरीच चर्चा होते. त्यानी ग्रामीण भागात शाळा, पतसंस्था , कॉलेज , रोजगार या साठी काहीच केले नाही. याबद्दलही काही विचारायचे नाही.अंदाजपंचे विधान, आपणास इंटरेस्ट असेल तर या एक्दा मराठवाड्यात अथवा प. महाराष्ट्रात. दाखवेन कित्येक संस्था. आता वेबवरील बातम्या अन लिंका ह्यावरच विश्वास ठेवून पूर्वग्रहाला मुंबईत बसून कुरवाळयाचे असेल तर नाईलाज आहे.लखोबा लोखंडे , नारोबा , खंडोजी खोपडा वगैरे घणाघाती दुषणांवर जनता त्यातील मनोरंजकतेमुळे खुष असायची.प्रोब्लेम काये? ह्यापेक्षा जहाल उपमा वापरल्या गेल्या आहेत. सध्याच्या फडणवीस सरकारात सेनेची काय भुमीका आहे ते जगजाहीर आहे.शिवसेनेबद्दल समर्थनार्थ एक गोष्ट मात्र वारंवार सांगितली जाते की १९९२ च्या मुंबई दंगलीच्या वेळेस सेना नसती तर मुंबई वाचली नसती. शिवसेना होती म्हणून आपण आज मुंबईत आहोत.जे सांगतात त्यांना विचारायचे. इथे दंगलीत सापडलेले कुणी आहेत का?हे ऐकल्यावर एक विचार मनात येतो की त्या वेळेस मुंबईत मुंबै पोलीस , निमलश्करी दले, काही भागात लक्शर तैनात केले होते. हे सगळे असतानाही परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती आणि शिवसेना या सर्वांपेक्शा प्रबळ होती, राज्य राखीव पोलीस दल ही त्यावेळेस तैनात होते. मग त्यांचे जवान हे त्यावेळेस काय केळी खात बसले होती की काय अशी शंका येते.या वेळेस शिवसेने ने नक्की असे काय केले की जे पोलीस दल , निमलष्करी दले आणि भारतीय सेना याना जमत नव्हते? एखादा राजकीय पक्ष हा राज्य पोलीसदल , सैन्य दल यांच्या पेक्षाही प्रबळ ठरतो याला कोणते लक्षण मानायचे.तत्कालीन राज्यकर्त्यांचे धोरण आणि अशा इमर्जन्सीत घडलेल्या तो घटनांचा परिपाक आहे. सेना अथवा पुलीस हे हुकुमाचे ताबेदार असतात. सेनेच्या कार्यकर्त्यांचा लोकल लेव्हलवर चांगला जनसंपर्क असल्याने त्यांनी काय भुमिका घेतली होती, त्याकाळात अॅक्चुअली काय घडले ह्याचे बरेचसे अहवाल वगैरे प्रकाशित आहेत, त्याची लिंक पण दिलेली आहे त्याचा अभ्यास करावा अथवा स्वतः एखादा अहवाल बनवावा.मला यात कोणत्याही राजकीय पक्षाची भलामण करायची नाही मात्र केवळ जाणून घ्यायचे आहे. १९९२ च्या दंगलीत सेनेने असे काय केले की त्यामुळे मुंबई जे पोलीस दले, निमलक्षरी दले , राज्य राखीव सुरक्शा दले याना त्यांच्या हत्यारांसहीतही वाचवणे जमत नव्हते आणि सेनेने ते करुन दाखवलेवरील सेम उत्तर.( हे उघडपणे मुंबईत कोणाला विचारायचे माझे धाडस नाही. म्हणुन इथे विचारतोय )का हो? सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर दाखल गुन्ह्याची जितकी सरासरी असते तितकीच सेनेच्या नावावर पण असणार आहे. केवळ गुंडाचा पक्ष हिच टिका असेल तर महाराष्ट्रातील जनतेने आजपर्यंत इतके आमदार खासदार निवडूनच दिले नसते. त्यामुळे मुंबईत जाऊन उघडपणे बिनधास्त विचारा. जास्तीत जास्त काय होईल? वेडा म्हणतील. ह्यापेक्षा काही नाही. उंच ग्यालरीत बसून कुत्र्यांना छू करुन भुंकवून वैचारीक श्रीमंती दाखवणार्यानी असल्यांची पत्रास कशाला बाळगायची? . ............... आता बघा पटते का ते. केवळ पुणे मुंबई ठाणे इतकेच राजकारण माहीत असणार्यांनी सेनेच्या नावाने खडे फोडू नयेत. गिरणी कामगारांची आता कदाचित दुसरी तिसरी पिढी तरुण असेल. त्याकाळच्या राजकारणांचे संदर्भ आता उगाळून शिळ्या कढीला उत आणणे आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचे लेबल लावणे चूक आहे. अगदी माझ्या गावात सुद्घा वर्षानुवर्षे शिवसेनेचे राजकारण करणारे आमदार खासदार मी पाहतोय ते गिरणीकामगारांवर नव्हे तर लोकल प्रश्नांवर वेळोवेळी दिलेला लढा आणि प्रभावी जनसंपर्क ह्यावर निवडून आलेले आहेत. जनता ही स्त्रीसारखी असते म्हणतात. तिला शेपूट घालणारा अन वैचारिक काथ्याकूट करणारा नेता नको असतो. तिच्या प्रॉब्लेम्सना समजून, सामोरे जाऊन, काहीही करुन सोडवणारा नेता हवा असतो. साधे परवाचेच उदाहरण घ्या. गावात डुकरांचा प्रचंड त्रास झाला. लहान मुलांना पण हि डुकरे चावू लागली. निवेदने देऊन, मोर्चे काढूनही प्रशासन ढिम्म. सेनेच्या एकाने उचलले डुकराचे पिलू अन ठेवले आयुक्ताच्या केबिनात. तीन दिवसात जवळपास सर्व डुकरे पक्डली गेली. पिल्लू सोडणार्यांनी केसेस घेतल्या अंगावर पण मार्गी तर लागला ना प्रश्न. किती दिवस कागदी घोडे नाचवणार? आता अशा आंदोलनांचा विषय म्हणाल तर लहानपणापासून माझ्या जिल्ह्यात अन शेजारील चार पाच जिल्ह्यात शहरी जनतेसोबत, शेतकरी, कामगार अशा अनेक आंदोलनात मी सेनेचे नाव ऐकतोय. पाहतोय. आणि आम्ही मुंबईपासून चारपाचशे कीमी तरी दूर आहोत. मग सेनेने मुंबई दंगलीत काय केले हा प्रश्न जितका फिजूल आहे तितकाच मंदीर आंदोलनात इतर पक्षांनी काय केले हा प्रश्न. अगदी भाजपाचे उदो उदो चालू असले तरी राजकारणात सुरुवात शेटजी भटजींचा पक्ष म्हणूनच हिणवला गेला होता आणि ते संबोधन खरे असावे अशीच वाटचाल होती. मराठवाड्यातील कार्यकर्त्यांचे मोहोळ असणारा मुंडेसाहेब सोडले तर दुसरा नेता सांगा. मुंडेसाहेबांचे राजकारण ही सेनेला जवळपास जाणारेच होते. ग्रामीण पार्श्वभुमीमुळे त्यांना महाराष्ट्रातील शेतकरी अन ग्रामीण जनतेच्या प्रश्नांची जाण होती. स्व. महाजन साहेबांनी व त्यांनी सेनेशी नाळ जोडली. हिंदुत्व ह्या एकाच मुद्द्यावर ही युती झालेली होती. तेंव्हाची जनता ही बहुसंख्य हिंदूंचे प्रश्न व अन्यधर्मीयांचे लांगूलचालन अशा तत्कालीन राजकीय धोरणांना कंटाळून युतीच्या मागे उभी राहीली. त्याकाळातही भाजपाकडे कार्यकर्त्यांची वानवाच असायची, ते पुरवले सेनेने. राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अरेरावीला तसेच उत्तर द्यायची ताकद सेनेकडे होती. नुसता भाजपा कदापिहि ग्रामीण भागात उभा राहू शकला नसता. कित्येक भाग तर असे आहेत की ह्या ५-१० वर्षात भाजपा गावात नसायचा. फक्त माहीत असायचा. अर्थात आपले काम साधले की शिव्या देत देत पध्दतेशीरपणे मदत करणार्यांना विसरायचे हा टिपिकल भाजपी खाक्या आता दिसून येतोय. अगदी बलराज मधोकांपासून आडवाणींजीपर्यंत जे झाले ते आता सेनेबाबतीत होतेय. गोध्रा प्रकरणापासून मोदीकार्ड चालू शकेल हा अंदाज आला की बाकी सगळ्या गोष्टी विसरुन राजधर्म पाळता न येणार्या मोदींना लॉन्च केले गेले. आता विकास अन आक्रमक धोरणांचे जनता स्वागत करतीय ते केवळ हा माणूस आपले प्रश्न सोडवू शकेल, आपली प्रगती घडवू शकेल ह्या विश्वासाने. ह्यात भाजपाच्या धोरणांचा अन पक्षाचा विजय आहे असे समजण्यात गल्लत करु नये. इंदिरा इज इंडीयाला कसे प्रजेने शिस्तीत रस्ते दाखवले हेही विसरु नये. आता विचारसरणीबाबत म्हणले तर मी शिवसैनिक नाही की दुसर्या कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता. पण युजअॅन्डथ्रोची जी पॉलीसी अत्यंत गलिच्छ पणे राबवली जातीय अन ती कशी योग्यच आहे याचा उदोउदो करुन विरोधी विचारसरणी नसतानाही एकेकाळी गळ्यात गळे घालणार्या मित्रपक्षांना आता गरज संपली की असे झोडपले जाते त्याचा राग येतो. ह्या पॉलीसीला सपोर्टिंग ही जी सामूहिक हननाची मोहीम राबवली जातीय ती अत्यंत गलिच्छ आहे. स्वतं:ला माहीत असलेले तेवढे पूर्णसत्य असे मानणार्या विद्वानांकडून जी एकतर्फी आकडेवारी सादर करुन ह्या विचारसरणीला आंतरजालावर पसरवण्याच्या पध्दतीला गोबेल्सनीतीशिवाय दुसरी उपमा नाही. इतका द्वेष अन त्रास असेल तर सरळ सरळ काडीमोड घेऊन मोकळे व्हावे. सेना काय जबरदस्ती घुसणार नाहीये. पण एका घरात राहून संसाराचे वाटोळे गावभर करणार्याला गावाकडे काय म्हणतात ते वेगळे सांगणे नको.आणि एक, मुख्य प्रश्न आपण
In reply to सुसंस्कृत तर आहोतच पण आमची by अभ्या..
प्रतिसादांच्या गदारोळात
श्रीगुरुजींना प्रश्न
+१००००
In reply to श्रीगुरुजींना प्रश्न by गामा पैलवान
काही फायदा नाहीये सांगून
काही फायदा नाहीये सांगून
शिवसेनेचा बहुसंख्य
ही गरळ
जरा विचार केलात आणि इतिहास
In reply to ही गरळ by अभिदेश
लोल
In reply to जरा विचार केलात आणि इतिहास by श्रीगुरुजी
>>> २०१४ पर्यंत शिवसेना
In reply to लोल by अभिदेश
आपला प्रतिसाद
In reply to >>> २०१४ पर्यंत शिवसेना by श्रीगुरुजी
अभिदेश
In reply to आपला प्रतिसाद by अभिदेश
मला वाटतं गल्लत होतेय!
In reply to अभिदेश by सुज्ञ
मला मुळात हे "शिवसेनेने काय
In reply to मला वाटतं गल्लत होतेय! by हतोळकरांचा प्रसाद
मला मुळात हे "शिवसेनेने काय काम केले ते सांगा" वगैरे पूर्वग्रहदूषित प्रश्नामागचं प्रयोजनच कळत नाही. जर असे काही प्रश्न खरंच पडत असतील तर गुगल करून पहिले तरी त्यांनी काय काम केले साधारणपणे समजू शकते. गेलाबाजार त्यांची स्वतःची वेबसाईट तरी नक्की धुंडाळता येते. तिथे त्यांनी त्यांची कामे खोटी टाकली असतील तर त्यांना पुराव्यानिशी उघडे पडत येते.शोधून काहीच सापडलं नाही म्हणूनच विचारलं. विचारून २ दोन दिवस लोटले तरी गेल्या ५१ वर्षात १९९३ मध्ये कोणाला तरी बडवून काढलं याशिवाय दुसरं काम सांगता आलेलं नाही. शिवजलक्रांती वगैरे जलयुक्त शिवारचंच काम आहे. वेबसाईटवर तर संपूर्ण थापा असणार. 'सामना'तून जिथे रोज गरळ ओकण्याशिवाय दुसरं काही नसतं, तसंच वेबसाईटवर पण असणार.हे सर्व न करता त्यांचे सध्याचे आमदार/खासदार काहीतरी मनगटात दम वगैरे भाषणं करून निवडून येतात आणि मग पाच वर्षे भाषणे करतात आणि परत निवडणूक आल्या कि अशीच भाषणे करतात आणि निवडून येतात अशा अर्थाची सरसकट विधाने करणे तार्किक वाटते का? हि अशी सरसकट विधाने तर काँग्रेस/राष्ट्रवादीला देखील लागू होत नाहीत. मग शिवसेनेवर आसूड का? म्हणजे भाजप ची चांगली कामे पुढे करून भाजप मला आवडते हे म्हणताना मला शिवसेनेची अडचण अजिबात होत नाही. त्यांच्या फुकाच्या धमक्या आणि आजकाल सरकारच्या आतून विरोधी भूमिका बजावणं मलाही नाही पटत पण त्यांची ती स्ट्रॅटेजी आहे. भाजपच्या विरोधात प्रचार करून त्यांचे उमेदवार निवडून येतात हे विसरून चालता येत नाही.प्रत्येक निवडणुकीच्या वेळी सेना एखादा भावनिक बागुलबुवा निर्माण करून मते मिळवितात. तो बागुलबुवा कधी दाक्षिणात्यांच्या स्वरूपात असतो तर कधी मुस्लिमांच्या स्वरूपात तर कधी उत्तर भारतीय, बिहारींच्या स्वरूपात तर कधी गुजरात्यांच्या स्वरूपात असतो. याव्यतिरिक्त, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, महाराष्ट्र तोडण्याचा डाव आहे, महाराष्ट्रातले उद्योगधंदे बाहेर नेण्याचा डाव आहे असा प्रत्येक निवडणुकीत प्रोपागंडा असतोच. हा धागा सेनेवर आहे,भाजपवर नाही. त्यामुळे भाजपच्या कामांची चर्चा इथे करण्याची गरज नाही. सेनेची कामे दाखवा म्हटले की आधी भाजपची दाखवा असे म्हणणे हीच सेनेने काहीही न केल्याची कबुली आहे. भाजपच्या कामावर इतर अनेक धागे निघाले आहेत. अजूनही निघतील. त्यात भाजपबद्दल लिहिता येईल. ९५-९९ या काळात मंत्रीमंडळात भाजप कनिष्ठ भागीदार होता. खरं तर भाजपच्या जन्मापासून भाजपचा जनाधार महाराष्ट्रात सेनेच्या तुलनेत खूप जास्त होता. त्याविषयी इतर ३-४ धाग्यांवर भरपूर आकडेवारी देऊन सविस्तर लिहिले आहे. इथे परत लिहिण्याचा कंटाळा आला आहे. जनाधार जास्त असूनसुद्धा भाजपने कनिष्ठ भूमिका का स्वीकारली हे एक गूढ आहे. सेनेच्या तुलनेत खूप जास्त जनाधार असूनसुद्धा मंत्रीमंडळात कनिष्ठ भूमिका घ्यावी लागली तरी भाजपचे त्याबद्दल चडफडाट न करता, न कुरकुरता मिळालेल्या संधीचा फायदा करून घेतला. नितीन गडकरी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असताना अतिशय धडाडीने काम करून त्यांनी मेळघाटात प्रथमच डांबरी रस्ते बांधले. मुंबईत ५५ उड्डाणपूल, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग असे अनेक मोठे प्रकल्प यशस्वीपणे राबविले. पंढरपूर यात्रेच्या मार्गावर अनेक वर्षे मागणी होत असलेला एका नदीवरील पूल त्यांच्या खात्याने ३८ दिवसांत बांधून पूर्ण केला होता. आपल्या कामाचे श्रेय कोणाला जाईल याचा विचार न करता त्यांनी इतके धडाडीने काम केले की हे खाते त्यांच्या नावाने ओळखले जाऊ लागले. आज परिस्थिती पूर्ण वेगळी आहे. मंत्रीमंडळात दुय्यम भूमिका स्वीकारावी लागल्याचे सेनेला सहन झालेले नाही. त्यामुळे पहिल्या दिवसापासून चडफडाट, असहकार, सरकारच्या प्रत्येक निर्णयावर मंत्रीमंडळाच्या बैठकीत संमती व बाहेर आल्यावर सडकून टीका, प्रत्येक कामात अडथळे, अत्यंत अर्वाच्य भाषेत भाजप नेत्यांचा उद्धार, पोकळ बढाया यापलिकडे त्यांनी काहीही केलेले नाही. केजरीवाल मागील दोनअडीच वर्षे जे करीत आहेत, तेच सेना इथे करीत आहे. हातात जी खाती आहेत, त्यात चांगले काम करून आपल्या कामाचा ठसा उमटविण्याऐवजी सातत्याने नकारात्मक भूमिका घेत राहिल्याने सेनेबद्दल संताप व तिरस्कार वाढत आहे.अपेक्षित प्रतिसाद (खरंतर
In reply to मला मुळात हे "शिवसेनेने काय by श्रीगुरुजी
उघडे पडलात...
In reply to मला मुळात हे "शिवसेनेने काय by श्रीगुरुजी
+ १
In reply to अभिदेश by सुज्ञ
हा प्रतिसाद 'सुज्ञ' यांच्या
In reply to + १ by श्रीगुरुजी
आम्ही हे केले ते केले आमच्या
In reply to अभिदेश by सुज्ञ
आम्ही हे केले ते केले आमच्या मनगटात ताकद व अंगात रग आहे वगैरे बाष्कळ बाता न मारता यांनी व यांच्या समर्थकांनी आधी जमिनीवर यावे व आपण आता सोळाव्या नासुन एकविसाव्या शतकात आहोत हे ध्यानात घ्यावें. ते होणे मुश्किल दिसतेरस्त्याने एखादा वेड लागलेला माणूस हातवारे करीत, तोंडाने मोठ्याने बडबडत जात असताना काही जण त्याच्याकडे वेडा समजून दुर्लक्ष करतात तर काही जण त्याचा सदरा ओढ, त्याच्या मागून जाऊन त्याला टप्पल मारून पळून जा, त्याच्यासमोर त्याला वेडावून दाखविणे अशी खिल्ली उडवून त्याला काव आणत असतात. सध्या उधोजी, राऊत, कदम अशा सेना नेत्यांची अवस्था रस्त्याने हातवारे करीत, बडबडत जाणार्या वेड्यासारखी झाली आहे. बहुतेक पक्ष त्यांच्या बरळण्याकडे, धमक्यांकडे व फुशारक्यांकडे दुर्लक्ष करतात. आशिष शेलार, सोमय्या इ. नेते मात्र त्यांची टिंगल उडवितात. विशेषतः सामाजिक माध्यमांवर सेना नेत्यांच्या टिंगलीचा महापूर आला आहे. आपल्याला मूर्ख समजले जात आहे व आपल्याला कोणीही जमेस धरत नाही हे यांच्या लक्षात आलेले नाही. आम्ही भूकंप करू, आम्ही राजीनामे खिशात ठेवून हिंडत आहोत, यांच्या कंबरड्यात आम्ही लाथा घालत राहिल्यामुळे यांना शेतकर्यांना कर्जमाफी द्यावी लागली, सर्जिकल स्ट्राईक करा असे आम्हीच सांगत होतो, जलयुक्त शिवार योजना आमचीच आहे अशा हास्यास्पद बढाया वाचून आता यांची कीवही येत नाही.सुज्ञ
In reply to अभिदेश by सुज्ञ
??
In reply to सुज्ञ by अभिदेश
+१
In reply to ?? by गॅरी ट्रुमन
शिवसेनेच्या तीन वर्षांतील
In reply to +१ by अनुप ढेरे
भाजप सेनेच्या खांद्यावर
In reply to जरा विचार केलात आणि इतिहास by श्रीगुरुजी
भाजप सेनेच्या खांद्यावर वाढलेला नसून सेनाच भाजपच्या खांद्यावर बसून महाराष्ट्रात वाढली.खम्प्लीट असहमत. सेना महाराष्ट्रात मोठा भाऊ होता. मात्र २०१४ ला भाजपाचे पारडे जड झाले जे उधोजीरावांना समजले नसावे किंवा इतके दिवस आपल्या हातात असलेले नेतेपद भाजपाकडे कसे सोपवायचे अशा विचाराने त्यावेळी सुरू झालेली आदळापट अजूनही सुरू आहे.या मताशी सहमत! भाजप वरचढ
In reply to भाजप सेनेच्या खांद्यावर by मोदक
>>> खम्प्लीट असहमत.
In reply to भाजप सेनेच्या खांद्यावर by मोदक
असहमतीश असहमती
In reply to भाजप सेनेच्या खांद्यावर by मोदक
इतके असूनही भाजपनेच शिवसेनेला
In reply to असहमतीश असहमती by गॅरी ट्रुमन
इतके असूनही भाजपनेच शिवसेनेला विनाकारण मोठ्या भावाचा दर्जा दिला.हेच म्हणायचे आहे. विनाकारण का असेना पण दर्जा होता जो २०१४ ला सेनेकडून भाजपाकडे गेला.पण त्यामुळे आपण खरोखरच मोठा
In reply to इतके असूनही भाजपनेच शिवसेनेला by मोदक
गुरूजी.. आता असे आहे..
In reply to पण त्यामुळे आपण खरोखरच मोठा by श्रीगुरुजी
सेनेला अडवाणी/महाजन यांच्या
In reply to गुरूजी.. आता असे आहे.. by मोदक
१९८० च्या विधानसभा
In reply to असहमतीश असहमती by गॅरी ट्रुमन
१९८० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला राज्यात ९.४% मते होती तर २८८ पैकी १४ जागा मिळाल्या होत्या.त्यावेळी शिवसेना कुठे होती? १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्येही शिवसेनेच्या तथाकथित बालेकिल्ल्यात-- गिरणगावात शिवसेनेचे वामनराव महाडिक तिसर्या क्रमांकावर फेकले गेले होते.शिवसेनेचा तथाकथित दुसरा बालेकिल्ला म्हणजे ठाणे.तिथे निवडून कोण आले? तर पूर्वाश्रमीचे जनसंघाचे (आणि जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणुक लढविणारे) रामभाऊ म्हाळगी आणि शिवसेनेचे सतीश प्रधान ८% मते मिळवून आपले डिपॉझिट गमावून बसले. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता पक्षाचे राज्यातून ८ उमेदवार विजयी झाले. त्यापैकी रामभाऊ म्हाळगींव्यतिरिक्त राम जेठमलानी आणि सुब्रमण्यम स्वामी हे जनसंघाची पार्श्वभूमी असलेले होते. या सगळ्यात शिवसेना कुठे होती?शिवसेनेने १९७८ च्या विधानसभा निवडणुकीतही ३५ उमेदवार उभे केले होते. त्यातील एकही निवडून आला नव्हता. वास्तविक पाहता १९७८ मध्ये जनता पक्ष, समाजवादी काँग्रेस व इंदिरा काँग्रेस या ३ प्रमुख पक्षात मते विभागली गेली होती. अशावेळी सेनेला निदान आपल्या तथाकथित बालेकिल्ल्यात (म्हणजे मुंबई-ठाण्यात) तरी काही जागा मिळायला हव्या होत्या कारण सेनाविरोधी मते ३ पक्षात विभागली गेली होती. परंतु सेनेला भोपळाच मिळाला होता. १९८० च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात व महाराष्ट्रात इंदिरा कॉंग्रेसची प्रचंड लाट होती. इंदिरा कॉंग्रेसला देशात एकूण ३५५ व महाराष्ट्रात ४६ पैकी (२ जागा त्यांनी सेनेला सोडल्या होत्या) ३९ जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत सेनेने इंदिरा काँग्रेसशी युती करून आपल्या तथाकथित बालेकिल्ल्यात २ जागा लढविल्या होत्या. एकतर हा भाग म्हणजे यांचा बालेकिल्ला (असा यांचा गैरसमज) व त्यातून सर्वत्र प्रचंड लाट असलेल्या इंदिरा काँग्रेसबरोबर युती यामुळे खरं तर या दोन्ही जागा सेनेसाठी केकवॉक ठरायला हव्या होत्या. प्रत्यक्षात दोन्ही ठिकाणी यांचा पराभव झाला. मुंबई-ठाणे हा भाग सेनेचा बालेकिल्ला आहे हा भ्रम खरं तर तेव्हाच उघडकीला आला होता. मुंबई-ठाण्यातील काही प्रभाग वगळले तर इतरत्र सेनेला स्थान नाही हे तेव्हाच सिद्ध झाले होते.१९८४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप युती होती.पण त्यावेळी इंदिरा हत्येनंतरच्या सहानुभूतीच्या लाटेत सगळेच वाहून गेले. १९८५ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.त्यावेळी भाजपला ७.३% मते आणि १६ जागा तर शिवसेनेला छगन भुजबळांची माझगाव ही एकमेव जागा मिळाली होती.या काळात भाजपकडे राम नाईक यांची बोरीवली, राम कापसे यांची कल्याण, कोकणात श्रीधर नातूंची गुहागर, अप्पासाहेब गोगट्यांची देवगड इत्यादी हक्काच्या जागा होत्या.शिवसेनेकडे हक्काच्या अशा नक्की कोणत्या जागा होत्या आणि किती?वर लिहिलेल्या भाजपच्या हक्काच्या जागा सेनेने घशात घातल्याच, पण त्याबरोबरीने पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघही सेनेने जबरदस्तीने बळकावला. शिवाजीनगरमधून याआधी भाजपने सलग दोन वेळा विजय मिळविला होता. भाजपने बांधलेला हा मतदारसंघ सेनेने आयत्या बिळावर नागोबाप्रमाणे हिसकावून घेतला. सेनेकडे स्वतःचा बांधलेला एकही मतदारसंघ नसताना त्यांना २८८ मधील १८३ जागा देणे व स्वतःकडे फक्त १०५ जागा ठेवणे हा मूर्खपणा होता.असला बेजबाबदार मित्रपक्ष दूर झाला हे चांगलेच झाले. असे म्हणतात की पाठीत खंजीर खुपसणार्या मित्रापेक्षा दिलदार शत्रू परवडला.शिवसेनेविषयी नेमके हेच मलाही वाटत आहे. ही गोष्ट बरीच आधी व्हायला हवी होती ती आता झाली आहे. अपेक्षा एकच की शिवसेना बाहेर पडल्यावर त्याजागेवर राष्ट्रवादी काँग्रेस नको. तसे झाले तर विधानसभा निवडणुकांमध्ये तरी माझे मत भाजपला नक्कीच नाही.गरज पडल्यास सत्ता गेली तरी हरकत नाही पण शिवसेना नको आणि राष्ट्रवादीही नको.+१सेनेची अजून एक नवीन भोंदूगिरी
अगदी खरे
In reply to सेनेची अजून एक नवीन भोंदूगिरी by श्रीगुरुजी
इथे उद्धव ठाकरे आदींचा सतत
कुठे झाला
In reply to इथे उद्धव ठाकरे आदींचा सतत by पुंबा
या गोष्टीशी प्रचंड सहमत!
In reply to इथे उद्धव ठाकरे आदींचा सतत by पुंबा
मुद्दे सोडून झोडपायचे भाजप
In reply to या गोष्टीशी प्रचंड सहमत! by हतोळकरांचा प्रसाद
उत्तरे
In reply to या गोष्टीशी प्रचंड सहमत! by हतोळकरांचा प्रसाद
तुमचे "मुद्दे" वर समजले आहेतच
In reply to उत्तरे by सुज्ञ
भाजपाने काय काम केले वगैरे
In reply to तुमचे "मुद्दे" वर समजले आहेतच by हतोळकरांचा प्रसाद
मी सुरवातीपासूनच ते विचारत
In reply to भाजपाने काय काम केले वगैरे by प्रसाद_१९८२
तेच तर सांगायचा प्रयत्न चालला
In reply to मी सुरवातीपासूनच ते विचारत by श्रीगुरुजी
जर तेव्हाचे काम गडकरींचे होते
In reply to तेच तर सांगायचा प्रयत्न चालला by हतोळकरांचा प्रसाद
जर तेव्हाचे काम गडकरींचे होते तर मग इतर मंत्र्यांची कामे शिवसेनेची नसतील का? किंवा मग आजची सामाजिक बांधकामाची कामे, परिवहनची कामे, उद्योगाची कामे इ. शिवसेनेची नसतील का?हे सर्व सब्जेक्टिव्ह आहे. नक्की टँगिबल कामे आहेत का? सामाजिक बांधकामाचं कोणतं काम सेनेने केले आहे? परिवहन, उद्योग या क्षेत्रात सेनेने नक्की कोणती कामे केली आहेत?आधीची तुमची यादी जलयुक्त शिवार आणि एक दोन लोकांवर कारवाई सुरू करणे (कारवाई करणे नव्हे) यापुढे गेलेली नाही ते एक असोच!हा धागा शिवसेनेवर आहे, भाजपवर नाही. त्यामुळे मी भाजपने केलेली फक्त एकदोन उदाहरणे दिली. भाजपची कामे पहायची असतील तर भाजपवर काढलेले धागे वाचा.सुरुवात शिवसेनेच्या वेबसाईटवर त्यांनी टाकलेल्या कामांपासून होऊ शकते. बाकी ९५-९९ च्या सरकारमधील शिवसेनेचे झुणका भाकरी योजना, ५ जीवनावश्यक वस्तूंच्या भाव स्थिर ठेवणे, स्वस्त धान्य दुकानांचे उत्तम व्यवस्थापन, महागाईवर नियंत्रण, कामधेनू योजना, महाराष्ट्र छात्र सेना, सैनिकी शाळा (मुलींसाठीही), सेतू योजना, क्रीडापीठ, आदिवासींसाठी पाडासेवक (बहुतेक हेच नाव असावं), निवृत्ती वय कमी करून काही अंशी का होईना नौकऱ्या उपलब्ध करणे इ. कामे थोडावेळ बाजूला ठेवू!झुणकाभाकर केंद्र म्हणजे लोकांना कोपर्याकोपर्यावर बेकायदेशीर टपर्या टाकून दिल्या. माझ्या घराजवळही अशी एक टपरी कोपर्यावर होती. या टपर्यात झुणकाभाकरी ऐवजी पेप्सी, बिसलेरी, गुटख्याच्या पुड्या असल्या गोष्टी विकायला असायच्या. यथावकाश यातील बरीचशी केंद्रे बंद पडली. बाकी हे ५ जीवनावश्यक वस्तूंच्या भाव स्थिर ठेवणे, स्वस्त धान्य दुकानांचे उत्तम व्यवस्थापन, महागाईवर नियंत्रण, कामधेनू योजना, महाराष्ट्र छात्र सेना, सैनिकी शाळा (मुलींसाठीही), सेतू योजना, क्रीडापीठ, आदिवासींसाठी पाडासेवक (बहुतेक हेच नाव असावं) हे नक्की काय आहे, हे कधी सुरू झालं, त्याचा जनतेला काय फायदा झाला याविषयी जरा सविस्तर सांगा. मुख्य म्हणजे शिवसेनेच्या वेबसाईटवरून कॉपीपेस्ट करू नका. कोणत्याही पक्षाच्या मुखपत्रात व वेबसाईटवर फक्त स्वतःचेच ढोल बडविलेले असतात. त्यामुळे कोणत्यातरी दुसर्या स्त्रोतातून माहिती सांगा.तुमच्या पूर्वग्रहदोषीत
In reply to जर तेव्हाचे काम गडकरींचे होते by श्रीगुरुजी
युती सरकार
In reply to तुमच्या पूर्वग्रहदोषीत by हतोळकरांचा प्रसाद
इंडिअन स्कूल ऑफ बिझनेस
In reply to युती सरकार by गॅरी ट्रुमन
हायला हे माहीत नव्हतं! जबरी
In reply to इंडिअन स्कूल ऑफ बिझनेस by गॅरी ट्रुमन
समज
In reply to हायला हे माहीत नव्हतं! जबरी by आदूबाळ
आता आयायटी गांधिनगर पण आहे
In reply to समज by गॅरी ट्रुमन
हो
In reply to आता आयायटी गांधिनगर पण आहे by अनुप ढेरे
मी कुठल्याही साईटवरून कॉपी
In reply to तुमच्या पूर्वग्रहदोषीत by हतोळकरांचा प्रसाद
मी कुठल्याही साईटवरून कॉपी करतोय याच्याशी काहीही संबंध नसावा त्यामुळे त्याचा उल्लेख तुम्हाला ह्या योजना काय होत्या याची माहिती नकोच आहे त्यामुळे तुम्ही फाटे फोडता या मताकडे घेऊन जातो.संबंध आहे. शिवसेनेच्या संकेतस्थळावरून उचलून इथे जे लिहिले आहे त्याच्यावर मी किंवा इतरांनी डोळे झाकून विश्वास ठेवावा अशी अपेक्षा आहे का? मी कोणत्याच पक्षाच्या संकेतस्थळावर/मुखपत्रात काय लिहिले आहे त्यावर डोळे झाकीन विश्वास ठेवत नाही. त्यामुळे तुम्ही इथे शिवसेनेच्या संकेतस्थळावरून उचललेली शिवसेनेच्या भरीव (!) कामांची यादी इथे टाकली आहे त्यावर आंधळेपणाने निदान मी तरी विश्वास ठेवणार नाही. शिवसेनेची एक गंमत तुम्हाला माहिती नसावी. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात (चुकलो. वचननाम्यात असा शिवसेनेचा शब्द होता. जसे सेनेने जलयुक्त शिवार या योजनेचे आपल्यापुरते शिवजलक्रांती असे नामांतर केले आहे, तसेच इतर पक्ष ज्याला जाहीरनामा म्हणतात त्याला शिवसेना वचननामा असे संबोधते) आपल्या सरकारने १९९५-९९ या काळात १९९५ मधील वचननाम्यात दिलेली ८०% आश्वासने पूर्ण केली आहेत असा दावा केला होता. नंतर २००४ च्या निवडणुकीच्या वेळी शिवसेनेच्या वचननाम्यात आपल्या सरकारने १९९५-९९ या काळात १९९५ मधील वचननाम्यात दिलेली ९०% आश्वासने पूर्ण केली आहेत असा दावा केला होता. हे १९९९-२००४ या काळात सत्तेवर नसताना ही जास्तीची १०% आश्वासने कशी काय पूर्ण केली हे खुदा जाने. सांगायचा मुद्दा असा की राजकीय पक्षाने स्वत: केलेल्या दाव्यांवर कधीही डोळे झाकून विश्वास ठेवू नये.चला मान्य करू कि शिवसेनेने कामे केलेली नाहीत. आता हा भाजपचा धागा नाहीये वगैरे पळपुटेपण तुम्ही करणारच नाहीत, त्यामुळे सांगा बरं पटापट कि कुठली भाजपची कामे तुम्हाला आवडतात.अजून किती वेळा सांगायचं की हा धागा भाजपवर नसून शिवसेनेवर आहे. भाजपच्या कामासंदर्भात मिपावर अनेक धागे निघाले आहेत व काही अजूनही जिवंत आहेत. तिथे भाजपच्या कामगिरीवर प्रचंड दळण दळले गेले आहे. वाटल्यास त्या धाग्यांच्या उरल देतो, पण इथे ते पुन्हा टाकणे योग्य होणार नाही. त्यामुळे धाग्याचा शिवसेना हा विषय भरकटून भाजप हा विषय चघळला जाईल.बाकी तुम्ही कॉम्पुटर लिटेरेट असालच असा माझा कयास आहे त्यामुळे उगाचच वायफळ (अज्ञानमुलक) फाटे फोडण्यापेक्षा त्या योजनांबद्दल माहिती तुम्ही काढू शकालच याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाहीये. त्यामुळे माहिती शिवसेनेच्या साईटवर आहे म्हणून खोटी वगैरे अंध विरोधकांची लक्षणे पण तुम्ही दाखवणार नाहीत याबद्दल खात्री आहेच.मी वर दिलेल्या शिवसेनेच्या भरीव (!) कामांची माहिती काढायचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ "क्रीडापीठ" हे नक्की काय आहे हे बराच वेळ गुगलून पाहिल्यावर त्याबद्दल काहीच मिळाले नाही. तुम्ही शिवजलक्रांती या योजनेची दिलेली चित्रफीत सुद्धा २-३ वेळा पाहिली. शिवसेनेने केलेल्या भरीव (!) कामांची माहिती कोठे मिळेल (शिवसेनेचे संकेतस्थळ व वचननामा सोडून इतरत्र) ते सांगा.फक्त एक निरीक्षण नोंदवतो आणि रजा घेतो, तुमच्यासारख्या अभ्यासू आयडीचा ग्रामीण महाराष्ट्रातील अभ्यास कमी पडतोय. ते झुणका भाकरी योजनेचा अभ्यास करणे तर फार गरजेचं आहे. काय आहे एखाद्या पक्षाचा विरोध करणं वेगळं आणि त्या पक्षाच्या एखाद्या चांगल्या योजनेचा विरोध करणं वेगळं! अशातूनच लोकं मागच्या सरकारच्या 108 योजनेचा पण अंधपणे विरोध करतात.झुणका भाकरी योजना किंवा वडापावच्या गाड्या (दोन्ही गोष्टी बेकायदेशीर जागेत) ही सेनेच्या रोजगारनिर्मितीची सर्वोच्च कल्पना. असल्या गोष्टी करण्याऐवजी सेना नेत्यांनी सहकारी कारखाने, महाविद्यालये, डेअर्या अशा गोष्टी सुरू केल्या असत्या तर कितीतरी जास्त प्रमाणात स्थायी स्वरूपाची रोजगार निर्मिती झाली असती. झुणका भाकरी केंद्रात आधी लिहिल्याप्रमाणे झूणका भाकरी ऐवजी बिसलेरीच्या बाटल्या, गुटख्याच्या पुड्यांची माळ, बिस्किटांचे पुडे अशा गोष्टी दिसायच्या. यातली बहुसंख्य केंद्रे १९९९ नंतर बंद झाली. बाबा आढावांनी १९७५ मध्ये सुरू केलेले मंडईतील मूळ झुणकाभाकरी केंद्र अनेक दशके सुरू होते (ते बहुतेक अजूनही सुरू आहे). त्याचीच नक्कल करून कोपर्याकोपर्यावर उभी केलेली बेकायदेशीर झुणकाभाकर केंद्रे केव्हाच बंद झाली.नक्कीच
In reply to मी कुठल्याही साईटवरून कॉपी by श्रीगुरुजी
पुरावे नसताना बेछूट विधाने
In reply to मी कुठल्याही साईटवरून कॉपी by श्रीगुरुजी
मी तुम्हाला मुद्दे सांगितले,
In reply to पुरावे नसताना बेछूट विधाने by हतोळकरांचा प्रसाद
मी तुम्हाला मुद्दे सांगितले, तेही तुम्ही स्वतःहून कुठलाही अभ्यास न करता पूर्वग्रहदूषित मते मांडत आहात म्हणून.मी आधीच सांगितलंय की शिवसेनेच्या भरीव कामांचे जे दावे केले जात आहेत ते मी तपासून त्यातील सत्यता तपासायचा प्रयत्न केलेला आहे. उगाच हवेत बाण मारलेले नाहीत.मग काढायचे काय जाहीरनामे मागचे सगळ्यांचे (हा शिवसेनेचा धागा आहे वगैरे कारणे द्यायची असतील दुसरा धागा काढा किंवा कुठल्याही राजकीय धाग्यावर जिथे या विषयाशी संबंधित चर्चा होईल तेव्हा टाका नाहीतर उगाच एकांगी टीका काय कोणीही करतं)?काढा की सगळ्यांचे जाहीरनामे. मी कधी त्याला विरोध केलाय? हा शिवसेनेचा धागा आहे हे सत्यच आहे. इथे भाजपची कामगिरी, शेकापची कामगिरी, अद्रमुकची कामगिरी, मनसेची कामगिरी इ. गोष्टी दळायला सुरूवात केली तर धागा त्या दिशेने भरकटत जाईल.क्रीडापीठ: १९९५ सालच्या किती गोष्टी आंतरजालावर आधारित आहेत हो? हि योजना बदलत बदलत आजच्या सरकारच्या क्रीडा खात्यात आहे काय कि बंद पडली किंवा दुसऱ्या नावाने सुरुच आहे याची कुठे माहिती मिळतेय का बघा, मला वाटते माहिती मिळत नाही नाही म्हणून एखादी गोष्टच खोटी वगैरे असले पोकळ दवे सहज करता येतात. म्हणजे मी तरी तसंच करतो माहिती मिळत नाही म्हणजे दोनही बाजू असू शकतात, चालली नाही योजना किंवा चालली. दोन्हीची शक्यता गृहीत धरायला अडचण कसली? बाकी इतर बाकीच्या योजनांची माहिती मिळाली कि नाही?१९९५ च्या बर्याचश्या गोष्टी आंतरजालावर नाहीत हे सत्य आहे. परंतु त्या काळात घडलेल्या (किंवा त्यापूर्वीची घडलेल्या) महत्त्वाच्या घटनांबद्दल किंवा त्या काळात सुरू झालेल्या व अद्यापही सुरु असलेल्या योजनांबद्दल आंतरजालावर वाचायला मिळते. आता ही क्रीडापीठ नावाची योजना तितकी महत्त्वाची नसेल, किंवा त्या योजनेमुळे फारसे काही घडलेच नसेल किंवा काही काळानंतर त्या योजनेचा बोजवारा उडून ती लगेचच संपुष्टात आली असेल तर आजच्या काळात त्या योजनेविषयी वाचायला मिळणे अवघड आहे. ज्या योजनेबद्दल शिवसेनेच्या संकेतस्थळाशिवाय इतरत्र उल्लेख नाहीत ती योजना खरोखरच अस्तित्वात होती किंवा शिवसेनेने केलेले ते एक भरीव काम होते यावर कसा विश्वास ठेवायचा?झुणका भाकरी आणि शिवसेनेचे सहकारी कारखाने वगैरे - पुरावे कशाचेही नाहीत, स्वतःच्या घराबाजूची कुठली टपरी बेकायदा होती वगैरे पुरावे तर नसतीलच वरून महाराष्ट्रभर तहसील कार्यालयाच्या आत उघडण्यात आलेली झुणका भाकर केंद्रे सुद्धा बेकायदेशीरच, दुर्दैवाने तुमच्या गल्लीच्या पलीकडेही महाराष्ट्र आहे! टपरी आणि गुटख्याच्या माळा! त्या टपरीचालकाने काय ठेवावे हे सरकारच्या योजनेत लिहायला हवं होतं? हास्यास्पद पूर्वग्रहदूषित मते! एखाद्या पक्षाच्या नेत्याने स्वतःच्या फायद्यासाठी काढलेल्या संस्था म्हणजे त्या पक्षाचे रोजगारनिर्मितीचे धोरण? महाराष्ट्रातल्या कोणत्या डेअऱ्या, कारखाने कोणत्या नेत्याचे आहेत, ते कोणत्या पक्षाचे आहेत याचा अभ्यास असेल तर तो टाका इथे. नाही म्हणजे हा भाजपचा धागा आहे वगैरे पळपुटेपणा तुम्ही करणार नाहीत असे वाटले होते पण शेवटी तुम्ही फाटा फोडलातच. जरा भाजपच्या किंवा इतर दोन मुख्य पक्षांच्या आतापर्यंतच्या ५-५० वर्षाच्या कामगिरीचा कोणता धागा तुम्ही संदर्भासाठी वापरात आहेत त्याची लिंक द्याल का प्लिज? वाचून घेतो. आणि हो, झुणका भाकर योजनेचा अभ्यासही राहिला आहे. झुणका भाकर आणि रोजगार निर्मिती? झुणका भाकरी केंद्रे का बंद झाली १९९९ नंतर याचा अभ्यासही गरजेचा आहेच, त्यामुळे अभ्यास वाढवा!झुणका भाकर केंद्राचे निमित्त करून कोपर्याकोपर्यावरील सार्वजनिक जागा ढापल्या गेल्या होत्या. या केंद्राचा मूळ उद्देश १ रूपयात झुणकाभाकरीचे पोटभर जेवण देणे हा होता. प्रत्यक्षात काही काळातच या केंद्रांचे रूपांतर इतर गोष्टी विकणार्या टपरींमध्ये झाले. कोणत्याही नेत्याने स्वतःच्या स्वार्थासाठी एखादी डेअरी, कारखाना, शिक्षणसंस्था काढली तरी त्याचा इतरांना फायदा होतोच. पुण्यात येऊन पंतगराव कदमांनी भारती विद्यापीठ सुरू करून आपल्या गावाकडच्या अनेकांना तिथे नोकर्या दिल्या. पुण्यातील देखील अनेकांना तिथे नोकर्या मिळालेल्या आहेत. पंतगरावांनी तिथे बक्कळ कमावले ही गोष्ट खरी आहे, पण इतरांना देखील त्याचा फायदा झाला हे नाकारता येईल का? शिवसेनेने निदान स्वतःच्या स्वार्थासाठी असे काही केले का? झुणका भाकर केंद्रे, वडापावच्या गाड्या जागा दिसेल तिथे उभे करणे व त्याला स्थानिक नेत्यांचे पाठबळ असल्याने कारवाईची भीति यातून काय साध्य झाले? सरकार बदलले अशा गाड्यांवर/केंद्रांवर कारवाई सुरू होते. पोलिसांची, स्थानिक दादांची खंडणी तर असतेच. बाकी भाजपच्या कामगिरीविषयी वाचायचं असेल तर अगदी अलिकडेच "मोदी सरकारची ३ वर्षे" या शीर्षकाचा धागा निघाला आहे. तिथून वाचायला सुरूवात करा. नंतर नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राईक, महाराष्ट्रातील शेतकर्यांचा संप, तुकाराम मुंढे, करण जोहरच्या सिनेमावरील बंदी इ. विषयांवर अनेक धागे आहेत. ते नजरेखालून घाला. मोदींच्या पहिल्या वर्षानंतर मीच एक धागा काढला होता. तो धागा तब्बल १ वर्षे वाहत होता. त्यात केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारच्या कामगिरीवरही प्रतिसाद आहेत. भाजपच्या बरोबरीने इतर पक्षांच्या संदर्भातही दळण दळले गेले आहे. तेही वाचा.अर्थातच, असहमतीवर सहमती! मला
In reply to मी तुम्हाला मुद्दे सांगितले, by श्रीगुरुजी
मलासुद्धा सेनेची ५१ वर्षातील
In reply to अर्थातच, असहमतीवर सहमती! मला by हतोळकरांचा प्रसाद
हायला भाजपने तीन वर्षे कामे
In reply to मलासुद्धा सेनेची ५१ वर्षातील by श्रीगुरुजी
बाकी तुमचं मत पक्कं
In reply to मी कुठल्याही साईटवरून कॉपी by श्रीगुरुजी