आवडला.
माझ्या मित्राच्या बाबतीत घडलेला किस्सा.
माझा ठाणेकर मित्र पहिल्यांदाच पुण्याला गाडी घेऊन गेला. कुठल्याशा सिग्नलला लाल दिवा लागला म्हणून गाडी थांबवली आणि मागून एका स्कूटरवाल्याने गाडीला ठोकर दिली! बरे, दिली तर दिली वर पुढे येऊन मित्रालाच दमदाटी - "गाडी का थांबवली?"
"अहो, रेड सिग्नल आहे", मित्र
"तर काय झालं? दुसरं कोणी थांबलय?"
मित्राने इकडे तिकडे वळून पाहिले. वाहतूक सुरूच होती!
"माफ करा. पुण्यात नवीनच आहे मी. इथे चौकात रोषणाईसाठी दिवे लावतात याची कल्पना नव्हती!", मित्र गाडी चालू करीत म्हणाला.
अहो, तो मी नव्हेच! तुम्हाला बावनखणी माहित नाही?
घाशीराम कोतवाल पाहून या!
तरीही नाही समजले तर इथे मिपावर आपले बरेच पुणेकर रसिक आहेत, त्यांना विचारा!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
बावनखणी म्हणजे ...
पूर्वी म्हणजे पेशवाईच्या काळात नाटकशाळा (म्हणजे नाचगाण्यासाठी ठेवलेल्या बाया)लोकांच्या (सरदारांच्या) वाड्यावर असायच्या. .. भर वस्तीत आणि घराघरात... त्यामुळे मुलांना बालवयात विविध नाद लागून ती वाया जातात असे पेशव्यांचे सरदार खाजगीवाले यांना वाटले. त्यामुळे त्यानी या मुलांना फुकट जाण्यापासून वाचवण्यासाठी तेन्व्हाच्या पुणे शहराबाहेर एक ५२ खोल्यांची म्हणजे 'खणांची' इमारत बांधली. सर्व नाटकशाळानी त्यातच उतरावे असा नियम करण्यात आला.तिला बावनखणी म्हणत. पण वरील कथेतल्या मुलाप्रमाणे तेंव्हाच्याही बालकाना प्रश्न पडत असे आपले वडील रोज संध्याकाळी बावनखणीत का जातात. जिज्ञासा वाढत गेली आणि शहराबाहेरील बावनखणी जगप्रसिध्द झाली. आणि नंतर तर 'ईष्कबाजी' लाच बावनखणी असे नाव रूढ झाले. असो ..
असा हा बावनखणीचा इतिहास.
इतिहासकार
डॅनी
पुण्याचे पेशवे
जो नीट गाडी चालवू शकतो तो जगाच्या पाठीवर कुठेही अगदी नीट गाडी चालवू शकतो.
पुण्यात जो नीट श्वास घेऊ शकतो (प्रदूषित हवेत).. त्याला जगातल्या कोणत्याही हवेचा त्रास होत नाही.
(हा.. आता एखाद्याला शुद्ध आणि स्वच्छ हवेचा त्रास नक्की होऊ शकेल. :))
- प्राजु
प्रतिक्रिया
जगप्रसिद्ध बावनखणी?????????
फर्मास लेख
बावनखणी
मस्त
पुण्यात..
सही आहे...
मस्त लेख
टिउसाहेब,
मस्त!
हा `म्रुत्युगोल' माझा नाही!