वृत्तबद्ध लिहिताना
माझी एक गोची होते
यमक जुळवू जावे तर
अलगद काही निसटून जाते
माझी कविता "जुळत" नाही
टोटलच बघा लागत नाही
(अन जुळलीच बेटी चुकून तर..)
कमावलेली कृत्रिमता
हट्टीपणे हटत नाही
कवितेचे झटपट वर्ग
कुठे कोणी घेतं का?
असल्यास जरा सांगा मला
प्रतिभा विकत मिळते का?
(एक कोडं सुटत नाही ...)
भावना इतक्या तरल कशा?
शब्द इतके रुक्ष कसे ?
मग त्याची कविता वाचता वाचता
डोळ्यात पाणी येतेच कसे?
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2713
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे घ्या....
छान !
In reply to हे घ्या.... by चांदणे संदीप
नाहीतर... गोची होते! :)हे नसतं तरी चाललं असतं.हे
In reply to छान ! by संजय क्षीरसागर
मस्त !
In reply to हे घ्या.... by चांदणे संदीप
असू द्या ओ तै
In reply to मस्त ! by सस्नेह
सॅन्डीबाबा, तेरा हायज्याकिंग
In reply to असू द्या ओ तै by चांदणे संदीप
इत्ता आवड्या हय, इत्ता आवड्या
In reply to सॅन्डीबाबा, तेरा हायज्याकिंग by अभ्या..
कामिलांचा
In reply to इत्ता आवड्या हय, इत्ता आवड्या by अभ्या..
लय भारी!!
In reply to कामिलांचा by चांदणे संदीप
क्या बात है!!
धन्यवाद!
In reply to क्या बात है!! by अनन्त्_यात्री
आवड्या
खिक्क....यमके गुर्जींना
मोजक्या शब्दांत अमाप अर्थ
मोजक्या शब्दांत अमाप अर्थ
...धन्यवाद!