Skip to main content

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: आम्ही येतोय

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी शुक्रवार, 10/02/2017 06:57 या दिवशी प्रकाशित केले.
a तो संदेश सर्वात आधी नासाच्या उपग्रहांनी पकडला. “आम्ही येतोय.” फक्त दोनच शब्द होते संदेशात. “आपण शांततेच्या मार्गाने बोलणी करू.” संयुक्त राष्ट्रसंघ “सर्व देशांनी आपापले क्षेपणास्त्र अवकाशाच्या दिशेने वळवावेत.” अमेरिका “जगाचा अंत जवळ आलाय.” व्हॅटिकन “ते आपले मित्र असावेत.” भारत “ही भारताची चाल.” पाकिस्तान काही दिवसांनी परत एक संदेश मिळाला- “लढायला तयार रहा.” यावेळचा संदेश पृथ्वीच्या अगदी जवळून आलेला. जगभरातलं सैन्य अन शस्त्रास्त्रं खडबडून जागे झाले, धार्मिक स्थळी जाणाऱ्यांची संख्या शेकडो पटींनी वाढली. अन दुसऱ्या दिवसापासून- किण्वनाशी संबंधित उद्योगधंदे बंद पडू लागले. जिवाणू विषाणूंमुळे होणारे रोग जादुची कांडी फिरवल्याप्रमाणे छुमंतर झाले. ते अतिप्रगत मायक्रो-एलीयन्स पृथ्वीवरच्या सुक्ष्मजिवांना मारून केव्हाच निघून गेले होते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5010
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

ज ब र द स्त ! काय कलाटणी आहे!! अचाट!!

क्या बात क्या बात क्या बात. याला म्हणतात शशक

एक शंका : सगळे सूक्ष्म जिवाणू मेल्यावर जीवनोपयोगी बॅक्टेरिआंचे काय ? आणि पर्यायाने त्यावर अवलंबून असलेल्या निसर्गचक्राचे काय ?

In reply to by सस्नेह

कचऱ्याचे ढीग, मेलेली न कुजलेली जनावरे आणि इतर अनेक परिणाम होतील. माणसाला जीवसृष्टी टिकवून ठेवायला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल! :) च्यामारी पण ते एलीयन्स आपल्या बॉलीवूड विल्लन सारखे आहेत वाटत. आवाज करून मग येतात, मारायला!

In reply to by सस्नेह

अगदि हेच मनात आलं. जिवाणू आणि विषाणू फक्त रोगराईच निर्माण करतात असं नाही.

मस्तच . अशाच आशयाचा "रशियन्स आर कमिंग" चित्रपट असावा .

मस्त! कथा आवडल्या गेली आहे....

जबरदस्त कलाटणी एक नंबर शशक

भारीच