आपला लेख अतिशय चांगला आहे ,पण हे बदल करणार कोण ? आपले मंत्री तर मुलांना नको ते शिकवु पाहतात त्यांच्या डोक्यात
हे बदल कधी घुसणार ?या साथि कुणाला नवस करावा हे कळ्त नाही .
गेस्ट लेक्चररची कल्पना चांगली आहे...
मला तुमचे सांगणे पटते पण फार प्रॅक्टिकल अडचणी उद्भवतील असे वाटते.
अशा प्रकारचे बोलणे शिक्षकापुढे केले तर शिक्षक म्हणतात, " तुम्हाला सगळे ज्ञान शाळेत शिकवावे असेच वाटते... इथे आधीच नॉर्मल अभ्यासक्रम पूर्ण करता करता अवघड होतंय, त्यात १४ विद्या ६४ कला कशा शिकवणार? जे एवढे हौशी पालक आहेत ते स्वतः अधिक कष्ट घेऊन / शिकवणी लावून शिकवतातच ...वाहतुकीचेही नियम शाळेतच शिकवावे ? उद्या वैयक्तिक स्वच्छता , आंघोळ, दात घासणे शाळेत शिकवावे असे म्हणाल.. हल्ली पालकांना पोरांसाठी घरी वेळ द्यायला जमत नाही म्हणून शाळेत हे शिकवावे आणि ते सुद्धा शिकवावे अशी नवीन टूम निघत असते सारखी"...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
त्रास यांनी चांगला विषय मांडला आहे.
प्रतिसाद / मत नंतर देईन.
अवांतरः त्रास यांच्या पूर्वीच्या धाग्यात ते आय टी क्षेत्रातले शिक्षण घेत आहेत असे म्हटले होते. पण त्यांनी आय टी बरोबरच इतरही विषयांत रस घेतलेला दिसतो. कीप इट अप. समाजाला अश्या बहुरंगी व्यक्तिमत्वांची खूप गरज असते.
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
Guest Teacher, गायन, वादन, नॄत्य, अभिनय ,Resource pooling हे सगळे शहरांमधे ठिक आहे..
खेड्यात हे शक्य नाहिये...
तिथे एक वर्ग = एक शिशक हेच समीकरण असते...
शहरामधे जे शिकवतात ते खेड्यामधे जितके लागू होते तितकेच शिकवायला पाहिजे. खेड्यातील मुलांना त्याच्या सभोवती जे आहे त्यातच रोजगार मिळावा असेच शिक्षण देणे आवश्यक आहे. त्यात शेती, त्यावर आधारीत व्यवसाय, त्याचे इकॉनॉमिक्स, त्याचे इंजिनीयरींग, हेच महत्वाचे आहे. त्या मुलांना शहरी मुलांसारखे शिक्षण देउन त्यांची आपण वाट लावतो आहोत.
एक शिक्षक ४ वर्ग आहेत बंड्याभाउ त्या शाळांच काय करणार हे?
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.
एक शिक्षक ४ वर्ग आहेत बंड्याभाउ त्या शाळांच काय करणार हे?
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.
लेख छान वाटला. बरेच मुद्दे व्यवहारात अमलात आणण्याजोगे आहेत असे वाटतेय.
आपल्याकडचे शिक्षण हे खूप पुस्तकी आहे, बरीच मुले घोकमपट्टी करून पास झालेली पाहिली आहेत. पण पास होऊनही फारसे ज्ञान पदरात पडलेले नसते. कारण विषयच नीट कळलेला नसतो. शाळांमध्ये एखादा विषय शिकवताना त्या विषयाच्या संदर्भात हॅण्ड्स ऑन एक्टिव्हीटीज फारच कमी असतात किंवा नसतातच.
>>काही विषयाच्या परीक्षा घेउ नयेत पण नुसतेच विषय शिकवावेत. उदा. इतिहास
हा मुद्दा पटला. किमान १ ली ते ८ वी परिक्षाच नसाव्यात ह्या मताचा मी आहे. इतिहास सारख्या विषयाची परिक्षा घेऊन काय साध्य होते माहित नाही. उलट एखादा सर्व विषयात पास होउन फक्त इतिहासात नापास झाला तर त्या मुलाचे आख्खे वर्ष वाया जाणार.
उलट एखादा सर्व विषयात पास होउन फक्त इतिहासात नापास झाला तर त्या मुलाचे आख्खे वर्ष वाया जाणार.
अगदी ह्याच मताचा मी आहे. त्यामुळेच काही विषयांची परिक्षा घेत बसत बसण्यापेक्षा त्या न घेउन जो वेल वाचतो त्या वेळेत इतर काही मुल्यवर्ध्रित शिक्षणासारख्या गोष्टी शिकवता येतील ते पहावे.
श्री त्रास,
आपले चिंतन आणि वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची सवय आवडली. मात्र येथेच न थांबता आपण या सक्रियतेची जोड देउ शकता. सरळ एखादी सायकल घ्यायची आणि आपल्यासर्व मुद्द्याचे सादरीकरण बनवायचे. महाराष्ट्राच्या शहरी, निमशहरी आणि खेड्यावजा गावात जायचे आणि यावर चर्चा, विचार मंथन घडवुन आणायचे असा घाट घाला.
अजून बरेच काही करता येण्यासारखे आहे. सुरवात करणारा हवा.
या उपक्रमात मलाही सहभागी व्हायला आवडेल.
द्वारकानाथ कलंत्री
मी सुरुवात केली आहे. सध्या माझ्या विद्यार्थ्यांना एका नवीन पद्धतीने शिकवत आहे.
सगळ्या लोकांपर्यंत असे विचार पोहोचवायचे असतील तर जी काही माध्यमे आहेत त्यातील सर्वात कमी वेळखाउ आणि स्वस्त पर्याय म्हणजे वर्तमानपत्रे. त्यांना हा लेख पाठवला तर साधी पोहोच सुद्धा मिळाली नाही. छापुन येणे दुरच.
तरीही काही नव विचारांच्या शिक्षकांपर्यंत हा लेख पाठवून त्यांची मते घेतली आहेत. बघुया काय करता येइल ते.
तुमच्या माहितीतील गुरुजनांना हा लेख दाखवू शकाल का?
छान चर्चाविषय.
'जीवन सुखात जगण्याची कला' व 'भाजी-भाकरी मिळवण्याची विद्या' अश्या दोन पातळीवर आपले शिक्षण असावे असे मला वाटते. जीवन जगण्याच्या कलेबद्दल प्राथमिक-माध्यमिक शाळेत मुलांची मानसिकता बनवता येईल आणि त्याचबरोबर भाजी-भाकरी कमवायचे शिक्षण घेण्यासाठी पूर्वतयारी करता येईल. (हे कसे करावे याबद्दल माझ्याकडे आराखडा नाही आणि याच तत्त्वावर आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ठीक..तो प्रयत्न योग्य तर्हेने कसा करावा हे तज्ञ ठरवतीलच.)
शिक्षण म्हणजे काय? शिक्षण कसे असावे? याबद्दल जे. कृष्णमुर्तींचे विचार मननीय आहेत. त्यांचे याविषयीचे निबंध 'शिक्षण' या नावाने प्रसिद्ध पुस्तकात मराठीत अनुवादित वाचलेले स्मरतात.
-- लिखाळ.
श्री त्रास,( छे असे कसे म्हणु?) एक सुन्दर विषय.
आपले चिंतन आणि वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची सवय आवडली. मात्र येथेच न थांबता आपण या सक्रियतेची जोड देउ शकता. सरळ एखादी सायकल घ्यायची आणि आपल्यासर्व मुद्द्याचे सादरीकरण बनवायचे. महाराष्ट्राच्या शहरी, निमशहरी आणि खेड्यावजा गावात जायचे आणि यावर चर्चा, विचार मंथन घडवुन आणायचे असा घाट घाला.
अजून बरेच काही करता येण्यासारखे आहे. सुरवात करणारा हवा.
या उपक्रमात मलाही सहभागी व्हायला आवडेल.- मलाही आवडेल
at and post : janadu.
ह्या एप्रिल-मे मधे मी १५ दिवस सुट्टी घेणार आहे त्या वेळेत ४ ते ५ दिवस ह्या कामासाठी राखून ठेवण्याची माझी तयारी आहे. शाळांना ह्यादिवसात सुट्ट्या असतील व शिक्षक रिसेप्टिबल असतील.
करुया काहितरी.
मला इथे संपर्क साधा- tras.denar@gmail.com
तुमचे लेखातुन व्यक्त झालेले विचार आवडले.तुम्ही म्हणता ती Bloom's Taxanomy आम्ही शिक्षक लोक दैनंदिन अध्यापनात वापरतो.तुम्ही म्हणता तसे बदल होऊ घातले आहेत्.पण ते राबवणारे शिक्षक ही काही पातळीपर्यंत कमी पडतात्.सर्वस्वी शिक्षणक्षेत्रातील अपयशाचे खापर सरकार किंवा तत्सम कोणावर फोड॑ण्यापेक्षा आपणास शिक्षणप्रणालीतील १ घटक म्हणुन काय करता येईल याचा विचार सर्वार्थाने व्हायला हवा.
प्रतिक्रिया
शिक्शणातील बदल
बदलांची
गेस्ट
नॉर्मल अभ्यासक्रम
चांगला विषय
सध्या
लेख चांगला
तुमचा
खेड्यात हे शक्य नाहिये...
शहरामधे जे
काहि ठिकाणी
काहि ठिकाणी
लेख छान
उलट एखादा
माझ्या स्वप्नातील शिक्षण.
मी सुरुवात
छान
कृपया ते
इंग्रजीतू
धन्यवाद
चर्चा छान चालू आहे..
मलाही आवडेल
ठिक आहे
अगदी बरोबर.
ज्यांचा