Skip to main content

पुतळा हटाव

लेखक जानु यांनी मंगळवार, 03/01/2017 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी बातमी वाचली ती पुण्यातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडने पाडुन टाकला. फार पूर्वी वाचलेले बाळकराम आठवले. त्या काळातील वाचलेले खुसखुशीत लेखन, नाटके, लेख आठवले. पु. ल., चि. वि. यांचे लेखन वाचुन त्यात वाटणारा आनंद किती निर्मळ आणि प्रांजळ होता याची आठवण पुन्हा एकदा झाली. त्या काळात ठकीच लग्न किती आनंददायी वाटलं? खरच गडकरी फेकुन द्यावेत का? कोणाकोणाला फेकायचे याची यादी एकदा बनवायच म्हणा. आपण इतके स्वार्थी झालोत का? की असहाय आहोत? खूप विचार आहेत एकत्रित सुसंबद्ध पणे लिहता येत नाहीत पण व्यक्त तरी करावे म्हणून लिहतो. एवढीच हिंमत आणि समाधान. जिथे मला कोणी ओळखत नाही आणि यावर कोणी सत्ताधारी किंवा त्याचा भाऊ, दादा हाच तो आपल्याला विरोध करणारा असे म्हणणार नाही.

वाचने 35506
प्रतिक्रिया 175

प्रतिक्रिया

In reply to by प्रकाश घाटपांडे

याला जातीय रंग च्ढवायची काय जरूरी आहे? हे कृत्य जतियवादीच अहे. नहीतर पुतळे हटवण्यासाठी दुसरे कोणते सयुक्तिक कारण सापडते आहे? २०१० साली घदलेल्या या घटनेची पुनरवृत्ती झली झाली आहे. हे वाचा click here

संभाजी ब्रिगेड हि संघटना जातीय नाही असं म्हणायचंय का तुम्हाला ?

In reply to by प्रकाश घाटपांडे

मी हि तेच म्हणतोय . त्या संघटनेने काही केलं कि ते जातीय रंग बघूनच केलेलं असतं .. असो . सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान म्हणून तरी पोलीस काही कारवाई करतील हीच आशा

In reply to by अद्द्या

त्यांना हळूच कुणीतरी सांगा, त्यांच्या ष्टाईलने "त्ये गडकरी कै बामन न्हवतं गड्या!!" दुसर्‍या दिवशी पुतळा आहे त्या अवस्थेत परत येईल. =))

In reply to by नावातकायआहे

नाटक वाचले- नाटकाचे पहिले आणि शेवटची २-३ पाने हेच मूळ असावे पुतळा हटाव मोहिमेचे (ज्याला दरोडा म्हणायचे आहे त्यांनी म्हणावे ) पण नाटक संपूर्ण नाही आहे त्यामुळे ज्या वेळी नाटक लिहायला घेतले होते त्यावेळेस ज्ञात असलेला संभाजी महाराजांबद्दलचा इतिहास काय होता हे जाणून घेतले पाहिजे. लिहणारे गडकरी होते म्हंटल्यावर आणखी स्फोटक वाटणारच "पुतळा हटाव" वाल्याना. बाकी निवडणूक आली आहे आणि चिखलफेक ही होणार. त्यात संभाजी ब्रिगेड प्रथमच निवडणूक लढवणार आहे आणि त्यांनी असे काही ठोस काम ही पुण्यामध्ये केले नाही त्यामुळे कमी वेळा मध्ये जास्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी ते असली स्टंटबाजी करणारच. म्हणून सृजन नागरिकांनी त्याला जास्त हवा न देता कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या खात्याच्या कोर्टामध्ये चेंडू ढकलून द्यावा. कृपया शांतता राखावी आणि आपले मत मतपेटीतून द्यावे. महाराष्ट्र पुरोगामी राहिला नाही असली वाक्य फेकून विचारवंतांनी गळे सुद्धा काढू नयेत ही विनंती. त्यामुळे खळ खट्याक करणाऱ्यांना आणखी स्फुरण चढते. (तसे आता अवॉर्ड वापसी सुद्धा कोणी करणार नाहीत, हा भाग अलविदा)

In reply to by विशुमित

पुण्यामधील सर्वच नेत्यांनी पुतळा हटावचा निषेद केला आहे. निलेश राणे नी मात्र बाजू घेतली आहे पण संभाजी ब्रिगेड नव्हती असे म्हणतात. पोलीस शोध लावतीलच. http://www.loksatta.com/pune-news/pune-mayor-and-other-leaders-reaction… "राम गणेश गडकरी यांचे लेखन आक्षेपार्ह वाटत असेल तर त्याचा प्रतिवाद व्याख्यान, लेखन, विचाराच्या मार्गाने करा, पुतळे फोडून नाही असे माजी साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी सांगितले." यांच्या वाक्यामध्ये "इतिहास संशोधन' हा एक शब्द हवा होता.

In reply to by विशुमित

संभाजीच्या चारित्र्य हननाची सुरुवात करणारी बखर मूळातच ताराराणीने लिहून घेतली होती कारण संभाजीचा मुलगा शाहु हा सातारला दुसरी राजगादी स्थापायच्या प्रयत्नात होता. वस्तुतः संभाजीच्या दासी आणि दासिकन्या यांचा तपशीलवार उल्लेख डॉ. सदाशिव शिवदे यांच्या ज्वलज्वलनतेजस या महाराणी येसूबाई यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकात डिट्टेलवार आला आहे. दासीकन्या किती व औरंगजेबाने त्यांचे निकाह कोण कोणत्या मुसलमान सरदारपुत्राबरोबर लावून दिले. दासीपुत्र किती व त्यांना बाटवून त्यांची नावे काय काय ठेवण्यात आली. सगळे सगळे सापडेल. आता त्या काळात दास्या ठेवायची पद्धत होती म्हणून कोण याचे समर्थन करू पाहील तर बामणाच्या पेशवाईला का नावे ठेवायची ते ही कळूद्य. आता जा बरं जा त्या ताराराणीचा पुतळा हटवा कावळा नाक्यावरून. आहे का दम पाहुया **मधे!

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पेशवे साहेब, संभाजीने किती दास्या ठेवल्या यावरुन त्याचे कर्तॄत्व मोजू नये असे वाटते. ठेवल्याही असतील. तो राजा होता. त्याने त्याची कर्तबगारी कमी होत नाही. संभाजी मुघलांना काही काळा पुरता जाऊन मिळाला होता हे त्याच्या कर्तबगारीला जास्त बट्टा लावणारे वाटते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

संभाजीच्या चारित्र्य हननाची सुरुवात करणारी बखर मूळातच ताराराणीने लिहून घेतली होती याचा पुरावा मिलेल का

In reply to by देवेन भोसले

जरुर मिलेल. बहुधा शिवाजी अँड हिज टाइम्स मधे. डिट्टेल वार पेशवे सांगतीलच. सुद्द भाषेत.

In reply to by नावातकायआहे

ऐतिहासिक नाटक आहे कि सेक्स कथा ..काय ते शब्द आणि काय ती रचना ..हि संस्कृती होती काय आपली . हा गडकरी असल्या प्रणय कथा सांगतो आणि आम्ही मुकाट्याने वाचतो

In reply to by amit१२३

काय ते शब्द आणि काय ती रचना ..हि संस्कृती होती काय आपली आपली संस्कॄती काय होती. जरा विस्कटून सांगा की.

In reply to by amit१२३

हा गडकरी असल्या प्रणय कथा सांगतो आणि आम्ही मुकाट्याने वाचतो
आणि काय हो? राजाला प्रणय करायचा अधिकार नाही का?

In reply to by सूड

प्रणय करण्याचा अधिकार सगळ्या प्रौढांना आहे. पण राजाला स्वतःच्या सरदारांच्या बायको बरोबर नसावा. काय म्हणता? ऐतिहासिक पुरावे सुद्धा पाहिजेत त्यासाठी कारण ह्या नाटकातील पात्रे काल्पनिक नाहीत. cinematic लिबर्टी एक वेळ मान्य करू पण एवढी अतिरंजित की राजे शेवटी स्वतःला रंडी बाज वगैरे दूषणे लावून घेतात. आक्षेप हा असावा. हे नाटक गडकरींव्यतरिक कोणीही लिहले असते तरी ते आक्षेपार्यच आहे.

In reply to by विशुमित

इसकाळ वरील प्रतिक्रियेतून साभार.. """ amit maruti लोक एखाद्या घटनेचा कसा विचार करतील किंवा मीडिया त्यांना कसा विचार करायला भाग पाडेल याचे उत्तम उदाहरण आज दिसले. लोकांना सत्य काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा त्यामागे कोण असेल , हेतू काय असेल आताच का ? याचा संशय घेण्यात जास्त इंटरेस्ट आहे. असो राम गणेश गडकरी एक उत्तम नाटककार पण त्यांच्या राजसंन्यास नाटकाबद्दलच शंका का आहेत .. १) या नाटकाचे ५ भाग आहेत पण यातील २ आणि ४ भाग लिहिलेच नाहीत त्याआधीच त्यांचे निधन झाले असा गडकरी समर्थकांचा दावा आहे. म्हणजे गडकरींनी पहिल्या भागानंतर तिसरा आणि डायरेक्ट पाचवा भाग लिहिला ..ग्रेट कोई मिल गया नंतर क्रिश २ २) हे नाटक ऐतिहासिक आहे कि काल्पनिक ..कारण नावे ऐतिहासिक आहेत पण पात्रांच्या तोंडी शब्द सगळे प्रणय कथेचे आहेत. आता त्यांच्या एकाच प्याला , प्रेमसंन्यास या नाटकांमुळे ते अजरामर झाले पण म्हणून त्यांनी केलेली हि चूक माफ करता येईल का ? हे म्हणजे आसाराम ने दिलेल्या प्रवचनामुळे त्यांना सोडून द्या असे म्हटल्यासारखे होईल. राजसंन्यास या नाटकाच्या पहिल्या भागात सुद्धा काही गोष्टी नाटकाला रंजक बनवण्यासाठी घुसडण्यात आल्या आहेत जसे आजकाल चित्रपटात लव्ह सिन असेल तर सेक्स करताना किंवा किस करताना दाखवले जाते. ऐतिहासिक नाटकात या गोष्टी चालतात का ? बाजीराव मस्तानी मध्ये बाजीराव आणि काशीबाई नाचली तर चालत नाही पण महाराजांच्या नावावर पात्राने चुंबन आणि अश्लील बोललेलं चालतं ..""""

In reply to by विशुमित

तुम्ही हा प्रतिसाद तिकडून इकडे डकवाला आहे म्हणजे तुम्ही त्याच्याशी सहमत आहेत असे गृहीत धरून (नसाल तर तसे सांगा आणि ह्या प्रतिसादाला फाट्यावर मारा)... हे नाटक १०० वर्षांपूर्वी लिहिलेलं आहे आणि त्यावर चर्चा गेल्या काही वर्षांपूर्वी सुरु झालीय, आणि पुतळा काल फोडला गेलाय. त्यामुळे "टाईमिंग"वर आणि हेतूवर विचार करण्यात का इंटरेस्ट नसावा? त्यांच्या मधल्या खंडांची जर माहितीच उपलब्ध नसेल तर तसे सांगणे म्हणजे क्रिश २? काहींच्या काही! त्यांनी चूक केलीय कि नाही हे ठरवण्याचा निकष काय असावा ह्याला काही अर्थ आहे कि नाही? आणि माफ न करता काय करायचे तर पुतळा गुपचूपणे फोडून आपला राग व्यक्त करायचा? तुम्ही खाली घाशीराम कोतवालचा उल्लेख केला आहे, तुमचे त्याबद्दल काय मत आहे? ते नाटक तशा पद्धतीने मांडणे योग्य होते कि अयोग्य? आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर ते नाटक अयोग्य असेल तर त्या नाटकावर बंदी आणण्याचा विचार करायचा कि त्या नाटककाराची पद्धतशीर "इज्जत" काढायची? तुम्हाला काय वाटते त्यावर? मुळात तुम्ही वैयक्तिक ते नाटक वाचलं आहे का? मी वाचले नाही, त्यामुळे त्यातल्या संदर्भांवर प्रतिक्रिया देऊ शकत नाही.

In reply to by विशुमित

या नाटकाचे ५ भाग आहेत पण यातील २ आणि ४ भाग लिहिलेच नाहीत त्याआधीच त्यांचे निधन झाले असा गडकरी समर्थकांचा दावा आहे.
यात काहीही नवल नाही. कादंबरी / नाटक यासारखी मोठी कलाकृती लिनियरली लिहिली गेली आहे असं क्वचितच घडतं. उदा० J K Rowling wrote the final chapter of the last Harry Potter book seven years before the release of the first book.
आजकाल चित्रपटात लव्ह सिन असेल तर सेक्स करताना किंवा किस करताना दाखवले जाते. ऐतिहासिक नाटकात या गोष्टी चालतात का ?
का चालू नयेत यामागचं लॉजिक कळलं नाही.

In reply to by आदूबाळ

का चालू नयेत यामागचं लॉजिक कळलं नाही.
कसं चालेल? ऐतिहासिक कथानकं म्हणजे चितळे यांच्या साजूक तुपात बुडवून काढल्याइतकी सात्त्विक असावीत असा अलिखित नियम नाही का? 'पेरनास्थाण' म्हणजे सात्विकच असायला पाहिजे, त्याला त्याचं वैयक्तिक आयुष्य असून कसं चालेल?

In reply to by विशुमित

असे कितीतरी नाटकांबद्दल आहे. वानगीदाखल 'साष्टांग नमस्कार' हे नाटकसुद्धा अत्रे यांनी असेच नॉन लिनिअरली लिहिले आहे. 'कर्‍हेचे पाणी' या आत्मचरित्रात मधे याचा उल्लेख सापडू शकेल. कित्य्के चित्रपटांचे शूटिंगसुद्धा असेच नॉन लिनिअरली होते. ऐतिहासिक पात्रे आणि काल्पनिक कथा हे तर अगदी कॉमन आहे. 'रायगडाला जेंव्हा जाग येते', 'इथे ओशाळला मॄत्यू', 'सीमेवरुन परत जा' अशी कितीतरी नाटके इतिहासाला १०० % धरुन नाहीत. उगाच इतरांच्या प्रतिक्रिया इथे डकवण्यापेक्षा तुम्हाला 'संभाजी ब्रिगेड'चे क्रूत्य पटले आहे असे का म्हणत नाही.

In reply to by नावातकायआहे

दिलेल्या लिंक मध्ये कुठेच दुसरा खंड नाहीये आक्षेप दुसऱ्या खंडावर आहे संजय सोनवणी यांच्या ब्लॉग मध्ये दुसऱ्या खंडातील उतारे दिलेत. पण दुसरा खंड आहे का???? वर दिलेल्या लिंक मध्ये पहिला तिसरा आणि पाचवा खंड आहे ?????

जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती गावात सज्जनांच्या आता तणाव नाही ...या कवीच्या कवितांतही पुढेमागे जाळल्या जायचं पोटेन्शियल आहे. त्यामुळे नाव लिहीत नाही.

In reply to by आदूबाळ

खेदजनक पण शक्य आहे! याच कवीच्या ह्या ओळीत याचं सार आहे - "दूर नाही राहिलेली राजसत्तेची लढाई एरवी, होतास बाबा तू कुणाला प्यार पांडू?"

In reply to by आदूबाळ

बसुनी गळेकापूंसवे मी काल मैफल जिंकली कटला जरी होता गळा उठलो अचानक गात मी आणि मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते असे म्हणणारे भटसाहेब त्यांची अख्खी हयात जळाले आहेत, त्यांना या शेळपटांची काय भीती! त्यांच्या कविता लोकांच्या मनात आणि हृदयात आहेत!

हे कळल्यावर पहिला विचार मनात आला तो हाच की महाराष्ट्र आता राहायाचा लायक राहिला नाही. पुरोगामी महाराष्ट्र, सांस्कृतिक राजधानी असे शब्द ऐकले की आता हसू येते. जातीयवाद, प्रतीकांचे राजकारण या सगळ्या दुय्यम गोष्टी आहेत. खरी चिंता ही की आपल्याला आपल्या वैचारिक लीगसीचं, आयकॉन्सचं काहीही पडलं नाही.

१० / १२ लोकांनी असा पुतळा रात्री बेरात्री भिरकावून देणे हे निश्चितच आक्षेर्पाह आहे. त्या नाटकातील फोलपणा काढणे आणि संभाजी महाराजांची उज्ज्वल बाजू मांडणे हे निश्चितच शक्य आहे. छत्रपती म्हणून ९ वर्ष लढा देणारे आणि केवल लोकापवादांनी बदनाम होणारे अशा एखाद्या लेखाने / नाटकाने अथवा पुस्तकाने कसे बरे बदनाम होतील? त्याचबरोबर गडकर्‍यांचे मोठेपणही कसे बरे अमान्य करता येईल ? पुण्यात अशा घटना पुढे होऊ नये हीच अपेक्षा.

In reply to by कलंत्री

संभाजी महाराजांची उज्ज्वल बाजू मांडणे हे निश्चितच शक्य आहे.
कशाला उज्ज्वलच बाजू हवी आहे ? नेता मानता ना त्यांना? मग आहे तस स्वीकारा की!! त्यांची कोणतीही बाजू मांडली तरी त्यांनी केलेलं कार्य फिकं पडणार आहे का? कसंय ना, एखाद्या व्यक्तीला देवत्व द्यायच्या नादात ती व्यक्ती माणूस होती आणि त्यामुळे असलेल्या गुण-अवगुणांमुळे त्या व्यक्तीचं महत्त्व कमी होत नाही याची समज यायला तितकी वैचारिक पोच असणं गरजेचं आहे आणि या लोकांकडून त्याची अपेक्षा करणं चूक आहे.

In reply to by सूड

100 वेळा सहमत सूडराव तुमच्याशी अगदी मनातले बोललात. आपल्याकडे व्यक्तीपुजेचे इतके स्तोम आहे न कि बास, या निमित्ताने मागे एकदा नेपोलिअन वरचे मराठी अनुवादित पुस्तक वाचले होते त्यात त्याचा पराक्रमाबरोबरच त्याच्या रंगेलपणाबद्दल तसेच त्याच्या इतर निगेटिव गोष्टींबद्दल हि बैजवार लिहिले गेले होते अगदी तठस्थपणे.

In reply to by उपेक्षित

मग "घाशीराम कोतवाल" ला त्यावेळेस एवढा विरोध का बरं झाला असावा ? साहेबा हा भारत आहे, त्यात महाराष्ट्र आहे आणि त्यावरून कडी हे पुणे आहे त्यामुळे नेपोलिअनचे तुणतुणे इथे वाजून काही उपयोग नाही.

In reply to by सूड

व्यक्तीपूजेचे स्तोम माजले आहे,अगदी कोणीही व्यक्तीपूजक त्यातून सुटला नाही,कोणीतरी कोणालातरी असं ना तसं पूजतच असतो.

In reply to by निष्पक्ष सदस्य

हो बरोबर आहे कोणाचा संभाजी तर कोणाचा गडकरी. चालायचं. लोकांना इग्नोर मारा म्हंटलं तर लागले सगळेच गळे काढायला.

In reply to by विशुमित

बोलणे इग्नोअर करावे.. झुंडशाही इग्नोअर होता नये. पुतळेच काय कुठल्याही सार्वजनिक मालमत्तेच नुकसान करणार्‍यांना ताळ्यावर आणायलाच हवं.

'एखादेच फुटके नशीब म्हणुनी प्रेतास शॄंगारिते' या गडकर्‍यांच्याच ओळी आठवल्या. भाई, दादा, आबांचे पोस्टर शहरात गावोगाव मिरवत असताना यांच्याच पुतळ्याच्या नशीबी नदीत फेकले जाणे यावे ही एक केविलवाणी गंमतच. संभाजी ब्रिगेड ही संघटना अस्तित्वात असणे ही संभाजी राजांची सगळ्यात मोठी बदनामी आहे.

लोकहो, महाराष्ट्राचे शत्रू कोण हे या प्रसंगातनं व्यवस्थित कळतं. मात्र हा हल्ला कोणावर झालाय याचा उहापोह व्हायला हवा. हा हल्ला मराठी भाषेवर आहे. गडकरी कादंबरीकार होते. त्यांना शंभूराजांचा अपमान करायचं काही कारण नव्हतं. तसा हेतूही नव्हता. मग दंभाजी ब्रिगेडला यांत खुसपट काढायचंय कशाला मुळातून? कारण की दंभाजी ब्रिगेडास मराठी भाषेचं खच्चीकरण करायचंय. राम गणेश गडकरी यांनी अलंकारांद्वारे मराठी भाषेस वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. याचा दंभाजी ब्रिगेडास प्रचंड राग येतो. मध्यंतरी काही वर्षांपूर्वी याच ब्रिगेडी लोकांनी अशुद्ध मराठी लिहिण्याचा घाट घातला होता. उदा. : शिवाजी हा शब्द षिवाजी असा लिहिणे. यावरून दंभाजी ब्रिगेड ही मराठीची मारेकरी आहे हे नि:संशयपणे सिद्ध होतं. गडकऱ्यांचा पुतळा मोडण्याचा हा गलिच्छ प्रकार राज्य सरकार मराठी संवर्धन पंधरवडा साजरा करत असतांना मुद्दामून केला गेला आहे. तस्मात, महाराष्ट्राचे शत्रू मराठीचेही शत्रू आहेत हे स्पष्ट व्हावे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मध्यंतरी काही वर्षांपूर्वी याच ब्रिगेडी लोकांनी अशुद्ध मराठी लिहिण्याचा घाट घातला होता. उदा. : शिवाजी हा शब्द षिवाजी असा लिहिणे.
खेदजनक आहे.
दंभाजी ब्रिगेड
मग हा शुद्धलेखनाचा कोणता प्रकार आहे बरे?

In reply to by निष्पक्ष सदस्य

निष्पक्ष सदस्य, दंभाजी ब्रिगेड हा शुद्धलेखनाचा प्रकार नाही. यास मोडतोड म्हणतात. पुतळ्याची केली ना अगदी तश्शीच मोडतोड. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माननीय,गा. पै
दंभाजी ब्रिगेड हा शुद्धलेखनाचा प्रकार नाही. यास मोडतोड म्हणतात. पुतळ्याची केली ना अगदी तश्शीच मोडतोड.
मग तुमच्यात आणि ब्रिगेडी मंडळीत काही फरक नसावा. आ.न नि.स

In reply to by निष्पक्ष सदस्य

निष्पक्ष सदस्य, एकदम बरोबर बोललात पहा. माझ्यात आणि दंभाजी ब्रिगेड्यांत काहीच फरक नाही. धटासी असावे धट, उद्धटासी उद्धट । खटनटाचे नटखट, अगत्य करी ॥ -इति रामदास स्वामी (ब्राह्मण संत) आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

लक्षणें ऐकोन मानी वीट | मत्सरे करी खटपट | नीतीन्याय उद्धट तो येक पढतमूर्ख || भरी भरे आला क्रोध नावरे | क्रिया शब्दांस अंतरे | तो येक पढतमूर्ख || || इति श्री रामदास || ( सांगायची गरज नसावी) आ.न नि.स

In reply to by निष्पक्ष सदस्य

निष्पक्ष सदस्य, अचूक श्लोकाबद्दल तुमचं कौतुक आहे. दंभाजी ब्रिगेड पढतमूर्ख आहे हे किती समर्पक शब्दांत सांगितलंत तुम्ही! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अगदी अगदी!! ब्रिगेडी पिलावळ पढतमूर्ख आहेच,वादच नाही. बाकि, आपला एक वरचाच प्रतिसाद खालील प्रमाणे↓ एकदम बरोबर बोललात पहा. माझ्यात आणि दंभाजी ब्रिगेड्यांत काहीच फरक नाही.

In reply to by निष्पक्ष सदस्य

निष्पक्ष सदस्य, अहो, ती तर तुमच्या बालबुद्धीने मारलेल्या आकलनाच्या प्रदीर्घ मजलेस दिलेली प्रोत्साहनपर कौतुकाची दाद होती. तुम्ही ती फार गांभीर्याने घेतलीत. एकंदरीत बालबुद्धी सार्थ केलीत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

शिवाजी हा शब्द षिवाजी असा लिहिणे
हे थोर आहे! म्हणजे 'त्यांचं' प्रमाणलेखन आम्ही मानणार नाही वगैरे लॉजिक ठीक आहे, पण "षिवाजी" असाच का लिहायचा म्हणे?

In reply to by आदूबाळ

शिवाजी हा शब्द षिवाजी असा लिहिणे>>> हा हा हा... नववर्षाला एका मित्राला नवर्षाभिनंदन केलं तर म्हणतो कसा मी गुडीपाडव्याला नव वर्ष साजरी करतो. म्हणलं बस बोंबलत.

गडकऱ्यांचं लिखाण हे फार वर्षापासून चे आहे. याना आता कशी आठवण आली. हा प्रकार जातीय आहे कि राजकीय हे शोधून याना पाठिंबा देणार्यांना शिक्षा झाली पाहिजे.

आज हा पुतळा काढला, मागे एकदा दादोजींचा काढ होता की काहीतरी असेच, उद्या आणखी काही........................एक प्रश्न पडतोय. इतका वेळ यांना मिळतो कसा? नै म्हणजे, आजकाल सगळेजण बिझी असतात असं ऐकलय. पुतळ्याकडे पाहून त्या मनुष्याचे विचार आठवणे, स्फुर्ती घेणे राहू द्यात.............कोणत्या चौकात कोणता पुतळा आहे याकडे लक्ष तरी कसं राहतं? आपल्या घराच्या कोनाड्यात असलेलं गांधीलमाशीचं घर पाडायला जमत नाही, हे उद्योग बरे सुचतात? बरं, राजकीय रंग दिला तरी सगळ्यांना गठ्ठ्याने पैसे मिळत असतात असेही नाही. त्यापेक्षा कष्टाची भाकरी तरी खावी. भाकरीतही व्हरायटी आहे, भाजीत आहे. ही हेव्यादाव्याची कामे करून तब्येतीचे, वेळाचे नुकसान कोण करून घेणार?

ज्या गडकर्यां मुळे साहित्यीकांच्या पिढ्या घडल्या , त्यांचा असा अपमान तो ही "पुण्या सारख्या" शहरात अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे आज आचार्य अत्रे असते तर त्यांनी नवयुगाच्या अग्रलेखातून असल्या करंट्यांना कुत्र्यासारखा झोडपून काढला असता (श्वानमित्रांनी माफ करावे, आणि माझा पुतळा कुठेही नाही)

In reply to by इल्यूमिनाटस

नवयुगातूनचं का म्हणून बरे? दैनिक 'मराठा' मधून का नाही ? आणि तुमच्या "पुण्यासारख्या" शहरात अपमान होणे हे कधीपासून लाजिरवाणे समजले जाऊ लागले ?

In reply to by गणामास्तर

अपमान दोन प्रकारचे असतात 1. शाब्दिक अपमान 2. विकृत अपमान "पुण्यासारखे" शहर हे शाब्दिक /वैचारिक अपमानांसाठी प्रसिद्ध आहे आणि त्याचे प्रत्युत्तर देखील तसेच दिले जाते आणि जेव्हा ते जमत नसेल तेव्हा असले घान्येर्डे प्रकार घडतात. त्यामुळे असल्या घटनांना पुण्याच्या संस्कृतीशी जोडण्याचे काहीच कारण नाही राहता राहिला प्रश्न नवयुग कि मराठा कुटं बी छापा कि राव

संभाजी राजांचा अपमान झाल्या सारखे वाटले म्हणून राम गणेश गडकरींचा पुतळा फोडला!! महाराजांशी गद्दारी केली म्हणून खंडूजी खोपडेच्या वंशजांचा निप्पात करणार काय? जावळीतले सगळे मोरे संपवून टाकणार काय? औरंगजेबाची कबर नेस्तनाबूत करणार काय? महाराजांना दगा केला म्हणून अफजल खानाची कबर तोडणार काय? मिर्झाराजे जयसिंगची समाधी फोडणार काय? एवढी खुमखुमी असेल तर सीमेवर जाऊन लढत का नाही? महाराजांकडून थोडे शिकत का नाहीत देशाचे खरे शत्रू कोण हे सुद्धा यांना कळत नाही!! खरेतर शिवाजी यांचा आदर्श नाही की संभाजीचे यांना कौतुक नाही!! स्वार्थ आणि गलिच्छ राजकारण यांनी बरबटलेली डोकी स्वतःचे सोडा पण कुणाचेच भले करू शकत नाहीत!! जाती द्वेषाच्या दारुनी धुंद झालेली डोकी घेऊन घर जाळायला निघालेले हे शहाणे, कायदा यांना काहीच कसे करीत नाही?? कि कायदाच षंढ झाला आहे आणि जातीयवादाला विकला गेला आहे? सर्व जाती धर्माच्या मराठी समाजा कडून याचा तीव्र निषेध व्हॉटस अॕप वरुन साभार

In reply to by सुबोध खरे

पुतळा हटवण्या पेक्षा ब्रिगेडीनी कायदेशीर मार्गानी गडकरींचे लेखन खोडून काढले असते तर बरं झाले असते. मी काही संभाजी ब्रिगेडचा प्रवक्ता नाही पण या व्हाट्सअप पोस्टला काही प्रतिप्रश्न विचारू इच्छितो, जाणकारांनी मार्गदर्शन करावं. महाराजांशी गद्दारी केली म्हणून खंडूजी खोपडेच्या वंशजांचा निप्पात करणार काय? जावळीतले सगळे मोरे संपवून टाकणार काय? औरंगजेबाची कबर नेस्तनाबूत करणार काय? मिर्झाराजे जयसिंगची समाधी फोडणार काय?>>>> -- शत्रू मेला म्हणजे शत्रुत्व मेले, अशी आपली संस्कृती सांगते बहुतेक. वरील दिलेल्याच्या वंशजांना शिक्षा देणे कितपत योग्य आहे ? महाराजांना दगा केला म्हणून अफजल खानाची कबर तोडणार काय?>>> -- ती स्वतः शिवाजी महाराजांनी जिजाऊंच्या सांगण्यावरून बांधून घेतली होती म्हणे ? महाराजांचा अवमान होईल ना ? (तसे ही ते करताच म्हणा) एवढी खुमखुमी असेल तर सीमेवर जाऊन लढत का नाही?>> -- सैन्यात न जाता सीमेवर लढण्याची परवानगी असते का ? खरेतर शिवाजी यांचा आदर्श नाही की संभाजीचे यांना कौतुक नाही!!>> -- कोणाची कशी आणि किती भक्ती आहे हे कसे मोजणार? स्वार्थ आणि गलिच्छ राजकारण यांनी बरबटलेली डोकी स्वतःचे सोडा पण कुणाचेच भले करू शकत नाहीत!!>> -- प्रचंड सहमत जाती द्वेषाच्या दारुनी धुंद झालेली डोकी घेऊन घर जाळायला निघालेले हे शहाणे, कायदा यांना काहीच कसे करीत नाही??>> -- माझ्या माहिती प्रमाणे पुतळा हटवला आहे घरे नाही जाळली कोणाची. तसे २ सैनेनी एस टी आणि बसेस च्या काचा किती तरी वेळा फोडल्या अजून पण त्यांचे सुप्रीमो आत गेले नाहीत. पण आताचे महाराष्ट्राचे गृहमंत्री योग्य कारवाई करतील याची आशा बाळगणे वावगे आहे का? कि कायदाच षंढ झाला आहे आणि जातीयवादाला विकला गेला आहे?>>> -- कायदा षंड असतो की जातीयवादी ? सर्व जाती धर्माच्या मराठी समाजा कडून याचा तीव्र निषेध>> -- निषेद निषेद निषेद ...!!

In reply to by विशुमित

शत्रू मेला म्हणजे शत्रुत्व मेले, अशी आपली संस्कृती सांगते बहुतेक.
म्हणजे पुतळा काढून गडकरीं कार्य संपवलं असं वाटतंय का? उलट गडकरींबद्दल शष्प माहित नसणारे लोक पण त्यांचं साहित्य शोधायला लागतील. जातींवर बोलू नये, पण विशिष्ट जातीच्या लोकांना विशिष्ट नेत्यांच्या नावावरुन कोणीही सहज चिथवू शकतो आणि सत्यासत्य न पडताळता हेही जातात घरचं कार्य असल्यासारखे!!

In reply to by सूड

म्हणजे पुतळा काढून गडकरीं कार्य संपवलं असं वाटतंय का?>>> -- असे कोठे म्हंटले मी हे कृपया कोणी दाखवेल का? उलट गडकरींबद्दल शष्प माहित नसणारे लोक पण त्यांचं साहित्य शोधायला लागतील.>>> -- चांगलं आहे की त्यामुळे गडकरी नक्की कोण आणि त्यांची योग्यता काय होती हे प्रत्येकाला समजेल. जातींवर बोलू नये, पण विशिष्ट जातीच्या लोकांना विशिष्ट नेत्यांच्या नावावरुन कोणीही सहज चिथवू शकतो आणि सत्यासत्य न पडताळता हेही जातात घरचं कार्य असल्यासारखे!!>>> -- जातीवर बोलू नये म्हणणारे मग कशासाठी बोलत असतील असे घरच कार्य असल्यासारखे?

एका बिडीच्या ब्रँड चं नाव 'संभाजी' असल्याचा अभिमान वाटतो बहुतेक ह्यांना !!

हा हा हा मला अजिबात आश्चर्य वाटले नाही हे प्रकरण ऐकून ! मी 2 3 वर्षांपूर्वीच म्हणालो होतो की शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आगरकर सावरकर कर्वे ह्यांच्या कार्याना काडी ची किंमत राहिली नाहीये. गडकरी बिचारे ब्राह्मण सदृश नाव असल्याने भरडले गेले . मी पैज लावून सांगतो आता ह्या नंतर कोणाकोणाचा नंबर आहे ते शाहू महाराजांशी मतभेद म्हणून टिळकांचा फुलेंशी मतभेद होते म्हणून चिपळूणकारांचा आंबेडकरांशी मतभेद होते म्हणून इरावती कर्वेंचा , मग सहज म्हणून इतर कर्वेंचा गडकरी तो बस झाकी है बालगंधर्व अभी बाकी है राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा =)))) हा हा हा हा हा हा बघूया आता मातीत डोकं खुपसून बसलेले शहामृग कधी डोकं बाहेर काढतात ते :D

In reply to by प्रसाद गोडबोले

गडकरी तो बस झाकी है बालगंधर्व अभी बाकी है >>>> पुण्याचा मानबिंदू असलेले 'बालगंधर्व' पाडणार? http://www.esakal.com/pune/marathi-news-balgandharva-rangmandir-pune-10… एका वर्षातच आमची भविष्यवाणी खरी ठरत आहे ! ! - अस्सल जातिवंत ज्योतिषी मार्कस ऑरेलियस अ‍ॅन्टोनियस ऑगस्टस

In reply to by प्रसाद गोडबोले

तुमच्या वरच्या वाक्याचा अर्थ "गडकरी आडनावामुळे/जातीमुळे पुतळा पडला गेला तसेच एके दिवशी बालगंधर्वांचे होणार" असा प्रतीत होत होता, बरे झाले क्लिअर केलेत. ================== बालगंधर्व पाडण्याचा वगैरे कुठलाही प्रस्ताव नसल्याचे पालिकेने सांगितल्याचे वाचले कुठेतरी. दुरुस्तीसाठी राखीव १० कोटींचा खर्च पुनर्विकसन या सदरात टाकल्याने हा गोंधळ झाला असण्याची (किंवा जाणीवपूर्वक आवई उठवली असण्याची) शक्यता नाकारता येत नाही. ================== पण, समजा पुनर्विकसनासाठी पाडली इमारत आणि नवीन बालगंधर्व इमारत बांधली तर चुकीचं काय त्यात? सध्य इमारतीतील मूत्र विसर्जन गृहात गेलो तर वाटते या इमारतीला बालगंधर्वांचे नाव देऊन बालगंधर्वांचा अपमान तर होत नाही ना?

मला तर सुरवातीला हे आर्य मदिरा मंडळाच्या सदस्यांचे काम वाटले होते. एकच प्याला च्या निषेधार्ध त्यांनी हे कृत्य केले असावे असे वाटले.

निवडणुका तोंडावर आल्याने केलेल्या मूर्ख कृत्याला फक्त राजकिय रंग आहे! बाकी ब्रिगेडी लोकांचे वैचारिक तारे अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या फेबु वाॅलवर वाचून मनोरंजन झाले आहे ! तिकडे अभिमानाने या मर्द मराठ्यांनी पुतळा फोडला असे लिहून त्यांचे फोटो दिले आहेत. त्या पोरांना गडकरी कोण, त्यांचे कसले नाटक वगैरे माहित असण्याची शक्यता शून्य दिसते आहे. जरा हात साफ करुन घेतला वाटतं पोरांकडून. चार वडापाव वर काम झाले असावे!

In reply to by अजया

पुष्कर तर म्हंटला सन्मानाने पुतळा परत नाही बसवला तर पुण्यात नाटकाचा खेळ करणारच नाही. (या वडापाव खाऊ करंट्यामुळे बिचाऱ्याच्या पोटावर पाय आला. निवडणूक होई पर्यंत पुतळा बसला तर ठीक नाहीतर अवघड आहे त्याचे)

विशुमित, तुमचा पवित्रा चुकीचा वाटतो आहे. तपासून बघा ही विनंती. गडकर्‍यांनी हे नाटक केव्हा लिहिले, त्यावेळी उपलब्ध साधने (कागदपत्रे इत्यादी) त्यांनी तपासून लिहिलंय की तेव्हा अपुर्‍या संशोधनामुळे उपलब्ध असलेली वाईट रंगवलेली संभाजीराजांची प्रतिमा ही खरेतर मूळाशी आहे हे बघितलं पाहिजे. शंभर वर्षांआधी कुणीतरी काहीतरी लिहून ठेवलंय म्हणून आज त्यांचा पुतळा उखडणे योग्य ठरवायचे असेल तर आजची ही पिलावळही शंभर वर्षांआधीच्याच काळात राहते हेही मान्य करावे लागेल. गडकर्‍यांना जो सन्मान आज दिला जातो तो राजांना बदनामीकारक प्रस्तुत केले म्हणून नाही दिला जात एवढे जरी दगडांच्या डोक्यांना कळले तरी पुरे. कारण तसे असते तरच पुतळा उखडणे सुसंगत वाटले असते. संभाजीराजांबद्दल बदनामीकारक मजकूर परवायला कोणी सुरुवात केली हे जरा इतिहासात डोकावून बघायची गरज होती. तसे बघितले असते तर आपलीच घरे फोडायची वेळ आली असती व ते अडचणीचे ठरले असते मग... कोणतीही कारणे दिली तरी एका कलाकाराचा असा अपमान होणे कोणत्याही दृष्टीने योग्य नाही. गडकर्‍यांच्या संभाजीला उखडायचे असेल तर गडकर्‍यांपेक्षा मोठे होऊन दाखवावे, त्यात मर्दानगी दिसली असती, रात्रीच्या अंधारात जाऊन निर्जीव दगडी पुतळ्यांवर मर्दानगी दाखवणार्‍यांच्या मनगटात नेमकं कोणाचं रक्त वाहतंय याची खात्री करुन घ्या म्हणावं....