निश्चलनीकरण व परदेशस्थ भारतीयांच्या समस्येबाबत याचिकेसाठी पाठिंब्याचे आवाहन
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
नमस्कार मंडळी,
माननीय पंतप्रधानांनी ८ नोव्हेंबर रोजी सरकारच्या निश्चलनीकरणाच्या निर्णयाची घोषणा केली. प्राथमिक प्रतिक्रियांनंतर परदेशात राहणाऱ्या भारतीयांमध्ये त्यांच्याजवळ असणाऱ्या ₹५०० व ₹१००० च्या जुन्या नोटांचे काय करावे याची काळजीयुक्त चर्चा सुरू झाली. सरकारने जाहिर केलेल्या माहितीनुसार परदेशात राहणाऱ्यांनी ३० डिसेंबर २०१६ किंवा ३१ मार्च २०१७ पर्यंत प्रत्यक्ष भारतात येऊनच स्वतःजवळच्या जुन्या नोटा बदलून घ्यायचा किंवा स्वतःच्या एनआरओ खात्यात जमा करण्याचा पर्याय उपलब्ध होता. दुसरा पर्याय म्हणजे विश्वासातले कोणी भारतात जात असल्यास त्यांच्याबरोबर जुन्या नोटा पाठवणे (ते पैसे एन आर ओ खात्यात इतर कुणाला भरु देण्याचे परवानगी पत्र सोबत पाठवणे हे इथे अध्याहृत आहे).
काळजी अशासाठी की या काळात भारतात जाणे प्रत्येकालाच जमणारे नाही. तसेच कुणी भारतात जात असेलही तर त्या व्यक्तिला ओळखीतल्या अनेकांकडून त्यांच्या जुन्या नोटा भारतात नेण्याची विनंती वा आग्रह होणे क्रमप्राप्तच होते. भारतात जाताना भारतीय चलन सोबत नेण्याची प्रती व्यक्ती कमाल मर्यादा ₹२५००० इतकी आहे. त्यामुळे कुणीही भारतात जात असल्यास थोड्याच लोकांच्या जुन्या नोटा नेणे शक्य आहे.
अशाच अनेक परदेशस्थ भारतीयांपैकी एक म्हणून याबाबत अधिक सोयीचा पर्याय भारत सरकार व रिझर्व बँकेने उपलब्ध करून द्यावा असे मलाही वाटत होते. जालावरच्या बातम्यांमध्ये विविध देशांतल्या भारतीयांनी भारत सरकारकडे याबाबतीत विनंत्या / मागण्या केल्याचेही वाचायला मिळत होते. माझ्यातर्फे मी खालील पदावरील व्यक्तींना त्यांच्या अधिकृत पत्त्यावर ईमेल पाठवले.
संदर्भः ₹२५००० मर्यादा (रिझर्व बँकेचे १९ जून २०१४ चे परिपत्रक; रिझर्व बँकेचे एफ क्यू पान प्रश्न क्र. ४)
- केंद्रीय परराष्ट्रमंत्री
- परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव
- परराष्ट्र मंत्रालयातले राज्यमंत्री
- अर्थ मंत्रालयाचे सचिव
- भारताचे अमेरिकेतले राजदूत
- रिझर्व बँकेची हेल्पलाइन
संदर्भः ₹२५००० मर्यादा (रिझर्व बँकेचे १९ जून २०१४ चे परिपत्रक; रिझर्व बँकेचे एफ क्यू पान प्रश्न क्र. ४)
प्रतिक्रिया
आपलं परराष्ट्र कार्यालय काहीच
नेमकं ठाऊक नाही
आज एक नवीन वटहुकुम जाहीर
पुन्हा एकदा निराशा
माझा अंदाज असा आहे की तुम्ही
अच्छा
गल्फमधून रोज २०-२५ विमाने
यावर उपाय
एक राहून गेले
हे केवळ दुबईच्या
स्वाक्षरी केली आहे.
+१
स्वाक्षरी केली...
धन्यवाद
निश्चलनीकरण
नवी मुदत ३० जून २०१७
सहमत आहे तुमच्याशी आपल्या
सकाळ मधील बातमी
अंतिम तारीख
<strong>अनिवासी भारतीयांना दिलासा</strong>
कस्टम्स विभागाचे प्रसिद्धीपत्रक
मदतीचे आवाहन
अजुन कुणी भेटलेले नाही
तुम्हाला मदत मिळो अशी अपेक्शा