Skip to main content

अंतरंग

लेखक अमिता राउत यांनी सोमवार, 26/12/2016 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
मी न माझे राहिले शब्द कंठी दाटले, सुक्या पापण्यांचे पाते ओले भासले. काय सांगु मनाला या बुद्धीची अगतिकता. स्वच्छंदी अंतरंग रंगले नकळत हसु उमटले , जुन्या आठवणींचे मनी गीत गुंजले . अंतरंगाची वेडी माया स्वप्नांची पाठ सोडेना, बिलगुनी तू मज येता अंगी रोमांच उठले. बेधुंद मुक्त मनाने वेध घेत करी आसमंती विहार. आसवांना चुकवत करी धाव जीवलागाचा. ऊन सावलीचा खेळ आयुष्याचा, गोडासाठी साथ खार्याची …
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 878
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

कविता चांगली आहे. फक्त जरा यमक-वृत्त याकडे लक्ष दिले तर अधिक चांगली झाली असती. किंवा मग सरळ मुक्त छंदातच लिहावे. (वैधानिक इशारा: विडंबन झाल्यास चिडू नका! )

In reply to by पैसा

तुमच्या सल्ल्याचा मी लिहितांना नक्की विचार करेन,धन्यवाद .