इंदिराजी
'गत हजार सालोंका युद्ध हमने जित लिया है.'
माजी पंतप्रधान इंदिराजी यांचा आज जन्मदिवस. यानिमित्तानं त्यांच्या कारकीर्दीबद्दल थोडंसं...
कित्येक वर्षं नेहरूंची मुलगी यापेक्षा वेगळं स्थान नव्हतंच इंदिराजींचं. गुंगी गुडीया वगैरे म्हणायचे त्यांना. आणि बरंच तथ्य पण होतं त्यात. केरळ सरकार खाली खेचणं सोडलं तर अत्यंत साधारण असाच कार्यकाळ राहिला होता त्यांचा. झंझावाती कारकिर्दीला सुरवात झाली 70-71 साली.
जानेवारी 1971 मध्ये आपलं जम्मू ते श्रीनगर विमान हायजॅक करून लाहोर ला उतरवण्यात आलं आणि अतिरेक्यांनी काही मागण्या केल्या. इंदिराजींनी ठाम भूमिका घेऊन दहशतवादासमोर झुकण्यास ठाम नकार दिला. अतिरेक्यांना प्रवाश्यांना सोडावं लागलं पण त्यांनी विमान पेटवून दिलं. तरी इंदिराजींनी पाकिस्तानी विमानांना आपल्या आकाशात बंदी घातलीच. हे काही पहिले पहिले प्रसंग होते.
पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान मधला बराचसा अनागोंदी कारभार भारताला डोकेदुखी ठरत होता. इंदिराजींनी या प्रश्नाचा काय तो निकाल लावायचाच असं ठरवलं होतं. यात लक्ष घालायला सुरवात केल्यावर त्यांना लवकरच लक्षात आलं की हा प्रश्न काही चर्चातून सुटणारा नाही. त्यांनी याबाबतीत वातावरण निर्मिती करायला सुरुवात केलीच होती. अनेक देशाना भेटी देऊन पाकिस्तान प्रश्न, भारताची बाजू आणि भूमिका याबद्दल माहिती देऊन आंतरराष्ट्रीय राजकारणात आपली बाजू भक्कम करून ठेवण्यात आली. दुसऱ्या बाजूला लष्कराला तयारी करण्याची सूचना देऊन ठेवलीच होती. 3 डिसेंबर 1971 रोजी भारताच्या हवाई हद्दीचा भंग करून पाक विमानांनी अमृतसर, अंबाला आणि इतर ठिकाणी बॉम्बिंग केलं आणि युद्धाला सुरवात केली. पूर्व पाकिस्तान मधून निर्वासितांचे लोंढे भारतात येत होते. त्यातल्याच तरुण मुलांना ट्रेनिंग देऊन 'बांगलादेश मुक्ती वाहिनी' तयार केली. अश्या सगळ्या पार्श्वभूमीवर, भारतीय लष्कराला आदेश दिले की पाकिस्तानात शिरा. तेरा दिवस! तेरा दिवसात पाकिस्तान ला पाणी पाजून भारतीय सेना विजयी झाली आणि नवा बांगलादेश जन्माला आला. ही भारताच्या इतिहासातील सर्व बाजूंनी तयारी करून योग्य संधीची वाट पाहून खेळलेली एकमेव खेळी. जिंकल्याची वार्ता मंत्रिमंडळाला सांगताना इंदिराजी म्हणतात, "गत हजार सालोंका युद्ध हमने जित लिया है".
आपल्या मंत्रिमंडळातून इंदिराजींनी सिंडिकेट ग्रुप ला तर काढून फेकलंच होतं. परत त्यांना कुणी गुंगी गुडीया बोललं नसेल. गुजरात आणि बिहार मध्ये भ्रष्टाचारविरोधी विद्यार्थी आंदोलन सुरू असताना भ्रष्टाचाराला पाठिंबा असल्यासारखी काही विधानं त्यांच्याकडून झाली आणि इथे निगेटिव्ह इम्पॅक्ट पडायला सुरुवात झाली. राजनारायण यांनी दाखल केलेल्या खटल्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल आला आणि इंदिराजींवर 6 वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घातली गेली. ही बंदी पण झुगारून राजीनामा न देता इंदिराजींनी 25 जून 1975 रोजी आणीबाणी जाहीर केली आणि सुरु झाला भारताच्या इतिहासातील काळं पर्व. एकछत्री अंमल, कडक सेन्सॉरशिप इत्यादी. याच कालावधीत देशातल्या लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले.
1977 साली इंदिराजींनी पुन्हा निवडणुका जाहीर झाल्या आणि 30 वर्षात प्रथमच केंद्रात काँग्रेस ची सत्ता गेली. जनता पार्टी ला लोकांनी प्रचंड प्रमाणात मतदान केलं. याच जनता पक्षाच्या अंतर्गत कलहामुळे इंदिराजी 1980 साली पुन्हा निवडून आल्या. 'गरिबी हटाव' च्या मुद्द्यावर त्या पुन्हा पंतप्रधान झाल्या.
काही दिवसातच पुन्हा एका काळ्या पर्वाला त्यांना सामोरं जावं लागलं. ते म्हणजे ऑपरेशन ब्लु स्टार. सुवर्ण मंदिरात लपून बसलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी लष्कराला हेव्ही आर्टिलरी चा वापर करावा लागला आणि पवित्र सुवर्णमंदिरात रणगाडे घुसवल्याने शिखांच्या भावना दुखावल्या गेल्या. याचिच परिणीती दंगलींमध्ये झाली.
फेब्रुवारी 1984 मध्ये, ज्यांच्या नावावरून पुण्यात पूल आहे, ते लंडन मधील भारतीय अधिकारी रवींद्र म्हात्रे यांचं 'जम्मू काश्मीर लिब्रेशन फ्रंट' च्या अतिरेक्यांनी अपहरण केलं आणि मकबूल भट या त्यांच्या म्होरक्याला सोडण्याची मागणी केली. इंदिराजींची भूमिका तीच, दहशतवादासमोर झुकणार नाही. दोन दिवसात रवींद्र म्हात्रे यांचं टॉर्चर केलेलं प्रेत सापडल्याची बातमी भारतात आली, आणि 4 दिवसात स्पेशल ऑर्डर काढून इंदिराजींनी मकबूल भट ला फासावर लटकावला!
31 ऑक्टोबर 1984 ला याच ऑपरेशन ब्लु स्टार चा रोष मनात ठेवून इंदिराजींची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या करण्यात आली आणि एक झंझावात अखेर थंड झाला.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
समजले नाही!
नाही समजले ना? असू द्या मग.
उद्धट उत्तर
उद्धट उतर??
ठीक
तुमच्या आवडत्या पक्षाच्या
इंदिरा गांधींचं विवाहपश्चात
मॅकीयव्हॅलीच्या स्वप्नातील
शब्दशः सहमत मला सुद्धा इंदिरा
धवल क्रांती राहिले का ?
धवल क्रांती देखील काही
कश्याबाबत बोलताय अप्पा? ऑपेशन
मस्त लिहिलंय
नुकतच ब्लड टेलीग्राम वाचल.
आणीबाणी आणि जोरजबरदतीचे
+++111
मला वाटतं बऱ्याच प्रमाणात
असहमत. इंदिरा गांधींची
१९७९ मध्ये बिहारमधील पांडे
१९७९ मध्ये बिहारमधील पांडे बंधूंनी ईंडिअन एअर लाईन्सच्या विमानाचे अपहरण करून ते श्रीनगरला नेले होते व इंदिरा गांधींवरील खटले काढून टाकावेत अशी त्यांची मागणी होती. याच पांडे बंधूंविरूद्ध कोणताही खटला दाखल न करता इंदिरा गांधींनी त्यांना बिहार राज्याच्या मंत्रीमंडळात मंत्री केले होते.बिहार नाय वो... उत्तर प्रदेश.१९७१ मधील नगरवाला प्रकरणसुद्धा इंदिरा गांधींच्या कारकीर्दीतच घडले होते. दिल्लीतील स्टेट बँकेला एक दिवस अचानक एक फोन आला. फोन करणार्याने आपण पंतप्रधान कार्यालयातून बोलत असून इंदिराजींना तातडीने ६० लाख रूपये हवे असल्याचे सांगितले. काही वेळाने नगरवाला नामक व्यक्ती येऊन ६० लाख रूपये घेऊन गेला. तो माणूस व ६० लाख रूपये आजतगायत सापडलेले नाहीत.इथे काहीतरी वेगळी माहिती आहे गुरूजी.. - https://en.wikipedia.org/wiki/1971_Nagarwala_scandalबिहार नाय वो... उत्तर प्रदेश.
१९७० च्या दशकात एकदा सौदी
तेल नावाचा इतिहास
तेल नावाचा इतिहास
सौदी
प्रतिसाद
सिमला कराराचे हाडूक
इथे सगळेजण इंदिराजींच्या राजकीय निर्णयांबद्दल बोलताहेत, तर
सहमत आहे
बांगलादेश युध्द
पाक
बांगलादेश वेगळा काढायचं एक कारण
भुत्तोंची सत्ता उलथवून हुकूमशहा बनलेले
गामा मूर्ख आहे तर असो ....