Skip to main content

पोलीस यंत्रणा नेहमी व्हिलन सारखी का वागते?

लेखक वटवट यांनी सोमवार, 17/10/2016 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दिवस ही मळमळ मनात खदखदत होती... मिपाचा हा प्लॅटफॉर्म एखादा विषय चर्चिण्यासाठी अगदी योग्य आहे. आणि मुळात, मला माझे मत बदलायचे आहे ह्यासाठी हा विषय मी इथे मांडत आहे... पोलीस कायद्याचे रक्षक आहेत. ते आपल्यासाठी आहेत. ते आपल्यासाठी त्यांचे कर्तव्य पार पाडत असतात. ते खूप हालअपेष्टा सोसत असतात. त्यांचा पगार खूप कमी असतो. तरी ते आपल्यावर उपकारासारखं काहीतरी करत असतात. आपण त्यांचा आदर केला पाहिजे. आपण पोलीस मित्र म्हणून वागलं पाहिजे. आपलं संरक्षणखातं आणि पोलीस खातं एकंच काम करतं. ते बाहेरच्या शत्रूंच्या विरोधात लढतात आणि हे आतल्या शत्रूंच्या विरोधात... वगैरे वगैरे... लहानपणापासून हेच ऐकत आलोय. वर्तमानपत्रातून... रेडिओवर... चर्चासत्रांतून... सोशल मीडियातून हाच सूर दिसतो. पण माझं निरीक्षण खूप वेगळं आहे. कदाचित सगळ्यांचंच तेच निरीक्षण असेल. १. पोलीसखातं महसूल खात्यासारखंच अत्यंत करप्ट आहे. बहुतेक पोलिसांचं पोट उगाच वाढलेलं नसतं. जे उन्हातान्हातून ट्रॅफिक आणि गर्दी कंट्रोल करतात ते जास्त करून झीरो पोलीस असतात, कॉन्ट्रॅक्टबेसिस वरचे. तेही अधूनमधून हात मारतच असतात. पुण्यात जवळपास बर्याच पोलीस स्टेशन जवळ ऑनलाईन मटका जोरात चालतो. तिथले पोलीस आंधळे नसतात. दणक्यात मलिदा मिळतो... अगदी कमिशनर पर्यंत हे पैसे जातात असं ऐकलंय... नॉन-करप्ट पोलीस माझ्यातरी पाहण्यात नाही. आमच्या गावातल्या एका पोलिसांचं प्रकरण तर विधानसभेत गाजलं होतं.. आता त्यांना आमदारकीची स्वप्ने पडत आहेत. २. पोलीस कधीही आपले मित्र म्हणून वागत नाहीत. उलट त्यांचे हात मोकळे करायचे साधन म्हणजे सामान्य जनता, बऱ्याचदा असंच त्यांचं वर्तन असतं. अश्यातला माझा अनुभव सांगतो.. आमच्या कॉलेजमध्ये एक प्रकरण घडलं होतं. मुलीच्या तक्रारीवरून मुलाला वाकड पोलीस चौकीवर बोलावलं. तिच्या नुसत्या तक्रारी वरून मुलाला बेदम मारलं.. एक दिवस कस्टडीत पण होता तो. आम्ही फॅकल्टी म्हणून तिथे गेलो होतो. त्यांनी आम्हाला विचारलं "इथे कशाला #$%$ घालायला आला आहात?" आम्ही म्हणालो कि आमचा विद्यार्थी आहे तो म्हणून आलोय. मग ते म्हणाले "मग काय त्याला आमच्या $%# वर बसवू" आंम्ही म्हणालो "अहो तो मुलगा लहान आहे हो आणि काहीच चौकशी नं करता का त्याला मारताय?" त्यांनी आमचा अजून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. आणि आमच्या अंगावर "जाता कि नाही आता" म्हणून आले. आम्ही निघालो. दुसर्या दिवशी त्याला बेल मिळाली. एक आठवड्यात त्याने कॉलेज मधून टीसी घेतला. कॉलेजची बदनामी नको व्हायला म्हणून आम्हाला शांत बसायला सांगितलं गेलं. निदान मला तरी तुलनेने कायदे जरा जास्त माहिती आहेत. काय उपयोग? फाटायची ती फाटलीच कि... सामान्य माणसाची काही वेगळी गत असते? नुसत्या तक्रारीवरून कुठलीही चौकशी नं करता मारहाण करायचा त्यांना परवाना दिलेला असतो. ३. कुठलाही नवीन कायदा पास झाला कि ह्यांना चरायला कुरण सापडतं. ह्यांना खायच्या संधी मिळतात. साधारण आरोपी जरी असला तरी त्याला नं मारण्यासाठीसुद्धा पोलीस पैसे घेतात. बलात्काराचा आरोपी असला तर विचारायलाच नको. त्यातल्यात्यात जेंव्हा डोमेस्टिक व्हायोलन्स ऍक्ट पास झाल्यापासून तर त्यांना दाबून पैसे कमावण्याची संधी प्राप्त झालीये. एका केसमागे कित्येक लाख मिळतात, तेही बिनबोभाट... खरंतर इतकि उदाहरणे मला व्यक्तिशः माहित आहेत पण असल्या गोष्टींचे पुरावे नसतात कधीच म्हणून इथे लिहिता येत नाहीत... जर कोणी गरीब ह्या भानगडीत फसला तर मेलाच म्हणून समजा... हे खातं गरिबांसाठी नाही... आताच ट्रॅफिकरुल्स अजून कडक केलेत आणि दंडाची रक्कमपण वाढलीये...सो.. पोलिसांचा भाव पण वाढलाय. ४. जेल ऍडमिनिस्ट्रेशन आणि तिथे चालणारे गोंधळ ह्यावर तर एक मोठा प्रबंध होऊ शकेल. श्रीमंत आणि सेलिब्रिटी गुन्हेगारांना प्रचंड ऐषाराम कसा मिळतो आणि त्यावर कसं त्यांचं अर्थपूर्ण जीवन अवलंबून असतं हे सर्व ओपन सिक्रेट आहे. अबू सालेम ने जेलमधला महागडा असा टीव्ही फोडला होता. कोण त्याला बोलल्याचं ऐकिवात नाही. त्याने त्याच्या वाढदिवसाची जंगी पार्टी दिली होती, हे चालवून घेतलं जातं? त्यांच्यादृष्टीने देशद्रोही बिशद्रोही असलं काही नसतं... त्यांचा देश आणि धर्म एकंच... पैसा. ५. काही पोलिसांना मारलं कि लगेच सगळ्या देशातून पोलिसांच्या बाजूने आवाज सुरु लागला. अर्थात मी पोलिसांना मारण्याच्या बाजूने अजिब्बात नाही. पण त्याहीपेक्षा पोलिसांनी निरपराध लोकांना बेदम मारहाण केल्याची असंख्य उदाहरणे मी पहिली होती, पाहत आहे. त्यांना असे लायसन्स दिली आहेत. ६. गेल्या महिन्यात बाणेरच्या यशदामध्ये माजी आयपीएस अधिकारी वाय.पी.सिंग दिग्दर्शित आणि लिखित "क्या यही सच है" ह्या चित्रपटाचे स्क्रिनिंग होते. तेंव्हा मी आमच्या कॉलेजच्या मुलांना घेऊन तिथे गेलो होतो. चित्रपट तांत्रिक आणि अभिनयाच्या बाबतीत फार काही उच्च वगैरे नाही. अगदीच साधारण आहे. पण ज्या काही गोष्टी दाखवल्या त्या खूप हॉरिबल होत्या. काही गोष्टींचा अंदाज येणं वेगळं आणि त्याच गोष्टी खऱ्या आहेत ह्याची खात्री होणं वेगळं. कमिशनरच्या नेमणुकीला स्पॉन्सर लागतात आणि त्याचा जो काही रेट असेल तो ते स्पॉन्सर देतात, हे मला नवीन होतं. चित्रपट दाखवून झाल्यावर मी खुद्द वाय.पी. सिंग ह्यांनाच मी प्रश्न विचारला होता कि, जर एव्हढं हे खातं भ्रष्ट आहे तर आम्ही त्याच्यावर विश्वास का आणि कसा ठेवावा? त्यावर त्यांनी थातूरमातूर उत्तर देऊन वेळ टाळली. मला काय ते उत्तर मिळायचं ते मिळालं. ७. बांधकाम क्षेत्रात आज कित्येक अंडरवर्ड डॉन्सचे पैसे गुंतले जात आहेत आणि पुण्यात तरी बहुतेक एजंट्सना ते माहित आहे. पोलिसांना माहित नसेल? ८. अंतर्गत सुरक्षा खरंच ते सांभाळतात? ह्यावर मला खरंच शंका आहे. कारण पोलीस खातं हे नेहमी नेहमी विकलं जाऊ शकणारं खातं आहे. ९. मुळात मला पोलिसांबद्दल अजिब्बात आदर वगैरे नाही. उलट माझी सटकते, नेहमीच. ही सर्व माझी वैयक्तिक मते आहेत. (माझी ही मते फक्त पोलिसांसंबंधीच आहेत)

वाचने 20551
प्रतिक्रिया 118

प्रतिक्रिया

जे पोलिसांच्या ह्या वर्तनाचे बळी आहेत किंवा ज्यांना त्यांचं वागणं पटत नाही ते कशाला कारणं देतील... आणि कारणं दिली तर चूक बरोबर मध्ये परावर्तित होत नाही...>>>> --सहमत

In reply to by माझीही शॅम्पेन

कारण त्यांना "किती चोर्‍या झाल्या आणि त्यातल्या किती उघडकीस आल्या" याचा रिपोर्ट द्यावा लागतो.

जास्त काही सांगत नाही, टेराबाईटी होईल, एका कमिश्नराच्या कुटुंबाशी घनिष्ठ संबंध होते काही काळ, त्यामुळे गाळ किती, चिखल किती, चांगले स्वच्छ पाणी किती याचे फर्स्ट हॅन्ड अनुभव आहेत, अर्थात लेखातल्या मुद्द्यांशी सहमत, वेळ मिळाल्यास अधिक लिहीन.

In reply to by संदीप डांगे

डांगेजींना प्रत्येक गोष्टीत फष्ट ह्यांड अनुभव कस्काय असतात? पोलीस, कॉर्पोरेट जगत, राजकीय जगत, शिक्षण जगत अनेक प्रकारच्या धाग्यांवर यांचे फष्ट ह्यांड अनुभव असतात. बराच लोकसंग्रह दिसतोय!

In reply to by अनुप ढेरे

आम्ही लिहितो, इतर लिहीत नैत. अनुभव प्रत्येकाकडे असतातच. बाकी आमची लाईफष्टुरी अंमळ डिफ्रंट असल्याने आश्चर्य वाटणे साहजिक आहे, आत्मचरित्र लिहू तेव्हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल, :) ;)

बाकी घाटपांडे सर खुद्द dipartment वाले, त्यांचे अनुभव इतर कुणापेक्षाही जास्त विश्वासू असतील..

In reply to by संदीप डांगे

अहो आम्ही बिनतारी पोलीस म्हणजे बिनविषारी सापासारखे. भ्रष्टाचार अनास्था सगळीकडे भरलेली आहे. निवृत्त झाल्यावर ही आम्हाला त्रास होता व आहे. पहा http://bintarijagat.blogspot.in/2007/08/blog-post.html

एकदा दुपारी घरीच सुटीवर होतो. मुलाच्या शाळेतील एक बाई एका रिक्शात बसलेल्या होत्या. तो रिक्शावाला त्यांना मोबाईल वर काहीतरी दाखवत होता. ती बाई गयावया करुन बोलत होती. आमच्या वरच्या घरातील बाईने सदर बाब सांगितली. मी जोशात पोलिसांना फोन करुन बोलावले. दोन पोलिस गाडीवरुन आले आणि त्याला घेउन गेले. बाईला थांबायला सांगितले. पण बाई गायब. दोन तीन दिवसांनी माझ्या स्वयंपाकाच्या रुमची काच रात्री १० च्या आसपास दगड मारुन फोडली गेली. तपास केला तर तोच माणुस होता असे समजले. मुले आणि सौ घाबरले. मग मी ती घटना सांगितली. सौ आणि मुलांकडुन अजुन उपदेशाचे डोस घेतले. असे काही अत्यंत घाणेरडे अनुभव या खात्याने दिलेत. त्यांच्यावर होणार्‍या हल्याबद्दल अजिबात आश्चर्य वाटले नाही. आणि वाईटतर त्याहुन नाही. असतील काही चांगले पण ते गुलबकावलीचे फुल. कोणी पाहिले?

पण पोलीस विनोदीसुद्धा असतात हो. साधारण दोन वर्षांपूर्वी रस्त्यावर उभी केलेली एक मोटार गाडी आमच्या कॉलनीतून रात्रीच्या वेळेस चोरीला गेली. मालक सकाळी बाहेर येऊन पाहतो तो मोटार गायब. मग पोलिसात तक्रार इ. सोपस्कार झाले. काही महिन्यांनी गाडी कुठेतरी सोडून दिलेले मिळाली आणि त्यानंतर त्या मालकाच्या पोलीस स्टेशनला फेऱ्या सुरु झाल्या. कशाला? तर कुणी संशयित आरोपी मिळाला की पोलीस मालकाला बोलवायचे, चोराची ओळखपरेड व्हायची. बिचारा मालक मेटाकुटीस आला; तो घरात झोपलेला असताना गाडी रस्त्यावरून चोरीला गेली तर कसा ओळखणार तो चोराला? पण पोलिसांना काही हे पटत नाही. ते आपले बोलवीत राहतात गाडीच्या मालकाला. दोन तीन महिन्यांपूर्वी त्याच्या मुलाची नवीन कोरी व महागडी सायकल चोरीला गेली. मी विचारलं तू तक्रार केलीस का पोलिसात? तेव्हा त्याने मला वरील किस्सा सांगितला. 'मेरा भारत महान' असे म्हणून मी त्याचा निरोप घेतला, आणखी काय?

चांगले पोलीस ... वारजे पोलीस चौकीतले डी टी चव्हाण आणि कॉन्स्टेबल कदम रात्री 2 ते 7 पाच तास काम करूनही त्यांनी एकही रुपया घेतला नाही - आम्ही स्वखुशीने देऊनही. सविस्तर लिहितो नंतर, पण इतक्या वाईट अनुभवांमध्ये एक तरी चांगला असावा म्हणून टाकली प्रतिक्रिया.

जास्त अनुभव नाही पोलिसांचा. एकदा कोथरूडमध्ये बाईक वर थांबलो होतो सिग्नलला. एक रिक्षावाला मागून येऊन धडकला. त्याच्या हेडलाईटची काच फुटली. वर माझ्याकडेच 200 रु. भरपाई मागू लागला. देणार नाही बोलल्यावर 'अमके तमके साहेब माझ्या ओळखीचे आहेत. फोन करीन बोलला.' मी पण बोललो 'कर फोन आणि बोलावं तुझ्या साहेबाला.' हा फोन लावतोय तर नंबर 'आऊट ऑफ सर्विस' :) मग मीच 100 नंबर वर फोन केला. 5 मिनिटात 2 बीट मार्शल आले. तिथून सगळी वरात चौकीत. 'कितीही वेळ काथ्याकूट होऊ दे. एक पैसा पण देणार नाही. मला घरी जायचे अजिबात घाई नाही' असे स्पष्ट्पणे बोललो. रिक्षावाला पण कंटाळला नंतर. 200 रु. भरपाई मागण्याच्या नादात बिचाऱ्याचा 2 तास धंदा बुडाला. पोलीस पण कंटाळले. 100 नंबर वर फोन करून बोलावले असल्याने गुन्हा नोंद झाला होता. मग आमची एकमेकांबद्दल काहीही तक्रार नाही ह्या स्टेटमेंट वर सही घेऊन जायला सांगितले. :)

मला तर पोलिसांची दयाच जास्त येते. हजारो निरर्थक कायदे बजावण्याची ह्यांच्यावर जबाबदारी. ह्या पैकी अनेक कायदे तर एकदम मुंडू लेव्हल चे असतात. पासपोर्ट व्हेरिफिकेशन ह्यातील पहिल्या नंबर वर आहे. आमचे एक स्नेही पासपोर्ट करून देण्याचा धंदा चालवतात. तर म्हणे पोलिसांना महिन्याला अमुक इतकी रक्कम दिली कि कुणाचाही पासपोर्ट वेरिफिकेशन थे थांबवून ठेवत नाहीत. सगळ्यांत भिकार कायदा कुठला असेल तर "दारू पिऊन चालवण्याचा". म्हणजे कायदा बरोबर असला तरी तोंडाचा वास घेण्याचे जे काम काही पोलीस करतात हे मानवी अधिकारांचे उल्लंघन असेच समजले पाहिजे (दोघां साठी). कायदा केला आहे तर किमान पोलिसांना ब्रेथ एनएलझेर तरी द्या. फायदा एक कि तरी वाट्टेल तशी गाडी दुचाकी चालवली तरी महिलांना मात्र पोलीस थांबवू शकत नाहीत !

पोलीस खाते राज्य सरकारच्या हातांत ठेवायचा जो नियम आहे जो बहुदा ब्रिटिश सरकार साठी बरोबर होता कारण मूठभर सत्ताधारी लोकांना इतर जनतेची गळचेपी करणे सोपे जात होते. राज्य पोलिसांची संख्या कमी करून खरे तर नगरपालिका, ग्रामपंचायत ह्यांना आपले छोटे पोलीस ठाणे चालविण्याची मुभा असली पाहिजे. बहुतेक मुंडू लेव्हल ची जी कामे असतात ती तरी सहजगत्या होतील. भाडेकरू ओळख, नोकर ओळख, पासपोर्ट व्हेरिफिकेशन, समन्स बजावणे इत्यादी इत्यादी जी फुटकळ कामे असतात ती कमी खर्चांत लोकल बॉडी जास्त चांगल्या पद्धतीने करू शकत त्या शिवाय चांगली सर्व्हिस नाही मिळाली तर आम्ही लोकल प्रतिनिधींना भेटून किमान तक्रार तरी करू शकतो.

अगदीच अपवाद सोडला (तोही रिमूव्ह केला जाईल लवकरच) तर एकही कायदा निरर्थक नाही. आणि पोलीस खाते जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ताब्यात जर दिले. सरळसरळ ते ताटाखालचं मांजर होऊन बसेल. आमदार आणि नगराध्यक्ष अनभिषिक्त सम्राट होतील तालुक्याचे जे अत्यंत धोकादायक आहे... अंमलबजावणी करणारं खातं आणि कायदे बनवणारं खातं ह्यामध्ये अंतर असायलाच हवं...नाहीतर गोष्टी अजून कॉम्प्लिकेटेड होतील... असं मला वाटतं. आणि जेव्हढे जास्त कायदे तेव्हढे त्यांचे इन्कम सोर्स जास्त हे खरं...

आत्तापर्यंतच्या आयुष्यात तर यांचा फक्त त्रासच झालाय ,आंदोलने-दंगली होतात तेव्हा सगळ्यात जास्त तोडफोड हीच मंडळी करते आणि नाव आंदोलकांचं लावून मोकळे होतात ,कोल्हापूर मधील शेतकरी आंदोलनावेळी प्रत्यक्ष पाहिलं होत ,एकाही आंदोलकाने कोणत्याही गाडीची तोडफोड केली नव्हती ,यांच्याच पार्किंग van मधून रस्त्यावरील 2-wheeler भरून-भरून पोलीस स्टेशन मध्ये आणून 5-6 जण लोखंडी रॉड ने त्या चेपवत होते. हि जात किती नीच असते हे त्यावेळी चांगलच अनुभवलं .

वरळीला पासपोर्ट औफिस आणि परीसरात रात्री अपरात्री नेहमी वाटमारी व्हायची. पोलिसात गेल्यावर थातुरमातूर लिखापढी करून फिर्यादीला परत पाठवले जायचे. तक्रारीवर कधीच कार्यवाही केली जात नव्हती. कारण? वाटमारी करणारे पोलिसांचीच मुलं, वरळीच्या पौलिसकैंपात राहणारी.

मावळच्या गरीब शेतक-यांमागे धाऊन गाेळीबार करणारे आझाद मैदानात महिला पाेलिसांची अब्रु वाचवू शकले नाहीत. तिथे का ह्यांना लकवा मारला हाेता? संपादित प्रतिसाद लिहिताना सभासदांनी भान राखावे अशी किमान अपेक्षा आहे. : संपादक

In reply to by मोदक

असे प्रतिसाद नकोतच.

प्रतिक्रिया किमान "पोलीसांच्या भावाने/मुलाने/मित्राने" वाचल्यावर किमान पोलीसाम्बद्दल सर्वांची फक्त भ्र्ष्ट(लाच खाणारा) अशी नसून अमानवी/घृणास्पद वागणूक देणारा आणि उपद्रवी/माजुरडा (प्रंसगी राजसत्तेसमोर/गुंडासमोर्/पैशासमोर लाळघोट्या) आहे हे पुन्हा पुन्हा अनुभवले आहे म्हणून अत्यंतीक तिडीकेने लिहिल्या आहेत. अपवादात्म्क चांगले अनुभव असतील तर नावानिशी प्रसिद्द करावेत भांगेत तुळस पहायला हवीच की सगळ्यांना !!!!

काेणताही पाेलिस मेल्याची बातमी मी वाचतो तेव्हा मला खूप समाधान वाटते. असेच समाधान नक्सली, दहशतवादी, पाकिस्तानी इत्यादींना ही वाटते, विकृती एट इट्स बेस्ट. असो, जास्त बोलून उपयोग नाहीये इथे तरीही राहवले नाही.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आपापले अनुभव आहेत बापू, ज्यांना तुळस मिळत नाही त्यांच्या भावना विकृत वाटणे साहजिक आहे!

In reply to by संदीप डांगे

बापूसाहेबांशी सहमत निर्ढावलेला गुन्हेगार किंवा दहशतवादी मारला गेला तर त्याचे समाधान वाटणे एक गोष्ट आहे पण एखादे लहान बालक मग ते पाकिस्तानी जरी असेल तरीही त्याच्या मृत्यू बद्दल समाधान वाटणे बरोबर नाही. "कोणताही" पोलीस मेल्या बद्दल "समाधान वाटणे" हि आत्यंतिक प्रतिक्रिया आहे आणि वाईट अनुभवातून गेल्यामुळे भावनेच्या भरात श्री राम राम यांनी हि प्रतिक्रिया दिली असावी असे मी समजतो. पण जर थंड डोक्याने विचार केल्यावर त्यांना "तसेच" वाटत असेल तर मात्र ते विकृतीचे लक्षण समजावे लागेल.

परवाचीच गोष्ट, एक पोलीस नो हेल्मेट, नंबर नसलेली, काहीतरी 'आई' असे लिहिलेली बुलेट चालवत जात होता, कोणाला जाब विचारावा याबद्दल!

अतिशय एकांगी अशी 'वटवट' इथे चाललेली पाहून मनाला फारच क्लेष झाले. या अशा तद्दन फालतू चर्चांमुळे आणि विखारी विचारांना उथळ खळखळाटायला मिळते हे पाहूनच मिपावरचा वावर कमी केलाय हल्ली! मला कधी पोलीसांना पाहून भीती नाही वाटली. उलट रस्त्यावर कधी कोणाला पत्ता विचारायचा असेल तर मी रस्त्यावर उभा असलेला पोलीसच प्रेफर करतो. इथे कोणाला अशाही वेळी पोलीस व्हिलन का वाटावेत समजत नाही. असो... प्रतिक्रिया देणारही नव्हतो पण इथे काही महाभाग, पोलीसांना मारल्यावर खूष होतायत काहींना पोलीसांना जीवे मारल्यावर आनंद होतोय हे पाहिल्यावर संताप संताप होतोय माझा. माझ्या समोर उभा राहून कोणी हे बोलत असत तर माहित नाही काय झाल असतं माझ्या हातून! पोलीसांच्या माजोरडेपणाचा, लाचखाऊपणाचा अनुभव मीही घेतलेला आहे पण असे विचार बाळगून मी फिरत नाही व तसा प्रचारही करत नाही आणि करणारही नाही. दुसऱ्या बाजूला काय असत हे पाहण्याचा प्रयत्न कधीतरी इथे विखारी प्रतिसादकर्त्यांनी केला आहे काय?? करणार काय?? उत्तर नाही असेल तर मुस्काड आवरा! मूर्ख लेकाचे! Sandy

In reply to by चांदणे संदीप

शांत व्हा सँडी भाऊ, शांत व्हा. म्हणूनच मी कमी बोलायचे नियम पाळले इथे. शेवटी एकच प्रश्न विचारावा वाटतो, जर पोलीस इतकेच माजुरडे हलकट हरामखोर मरण्यालायक आहेत तर एकदा विचार करा जर पोलीस खातेच बंद केले तर काय होईल? अधिक माहिती करता जमल्यास पर्ज हा सिनेमा नक्की पहा ही विनंती

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

वकील लोक तर पोलिसांपेक्षा महा माजुर्डे. वरच्या धाग्या मध्ये पोलिसांनी केलेल्या कारनाम्याला कळस चढवणारे कोण असतील तर भिकार, महा माझुर्डे, कपटी, हलकट आणि पैशाला हपापलेले वकील च असतात. वटवट करून 3-4 हिअरिंग मध्ये निकाल लागू शकणारी केसेस 15-20 वर्ष चालवतात आणि बेइंग ह्यूमन ची बिरुद मिरवणाऱ्याना "बिग बॉस " मध्ये घर मिळवून देतात... (वटवट हा शब्द धागा कर्त्याला उद्देशून वापरला नाही, गैरसमज करून घेऊ नये)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

पोलीस खातेच बंद केले तर काय होईल?>> सोन्याभाऊ कोण म्हणतंय हे खातं बंद करायला... व्यवस्थित काम नाहीये ते करत हा विषय आहे ह्या धाग्याचा.... झाल्यास "क्या यही सच है" बघा....

In reply to by चांदणे संदीप

आपले जर काही चांगले अनुभव असतील तर टाका कि दादा मग... अर्थात पोलिसांना मारणे आणि त्यात आनंद मिळणे ह्याचं समर्थन कधीच होत नाही... ह्या धाग्याचा तोच विषय नाहीये... तुम्हाला पोलिसांची भीती वाटली नाही हा तुमचा वैयक्तिक अनुभव.. जर चांगल्या अनुभवाचं प्रमाण जास्त असलं असतं तर तोही धागा निघाला असताच कि... काय म्हणताय? आणि दुसरी बाजू कितीही काळी असली तरी परिणाम जर घाणेरडा असेल तर त्या परिणामांचं समर्थन नाही ना होत... ऑ?? काय?

हेच बोलायचं होतं काही चांगलं असलं कि का बोलत नाही कोण ..असतील ना वाईट अनुभव पण आय ऍग्री . पण हे मेल्यावर समाधान किंवा मारल्यावर समाधान हे काय आहे

मग काेणताही पाेलिस मेल्याची बातमी मी वाचतो तेव्हा मला खूप समाधान वाटते. हा (तुमचाच) नियम लावला तर, मावळ मध्ये पोलिसांनी गोळीबार केला म्हणून काश्मीरात आंदोलनकरत्यांचे दगड पेट्रोलबॉम्ब खाऊन मेलेला पोलीसही तुम्हाला समाधान देत असेल नाही का? राग मावळ पोलिसांवर आहे तर तसे स्पष्ट लिहा, असले सार्वत्रिकरण कश्याला? तुम्ही काही मावळ मधला एखादा पोलीस मेला तर मला समाधान वाटते म्हणले असते तर वैयक्तिक अनुभव म्हणून सोडून देता आले असते (तसे पाहता तेही आमच्यालेखी अक्षम्यच आहे पण तितके म्हणायचा तुमचा अनुभवसिद्ध अधिकार आहे हे लगोलगी मान्यच करून टाकतो कसा)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

भावनाओको समझो बापुसाहेब, दिल कि भडस है, त्यांचे खरोखर असे मत का झाले हे ऐकण्यास उत्सुक आहे, अर्थात त्यांच्या सरसकट मताला माझे अजिबात समर्थन नाही हे लक्षात घेणे.

In reply to by संदीप डांगे

वो मै समझ गया डांगे बुआ, मावळ मध्ये जेव्हा हे शेतकरी आंदोलन झाले तेव्हा मी खुद्द तळेगाव दाभाडेत राहत असे, तेव्हा एसपी संदीप कर्णिक होते, गोळीबार झाला होता पण त्याचे डायनॅमिक्स खूप वेगळे होते, पोलिसांवर खापर फोडणे सोपे आहेच, पण त्या आंदोलनादरम्यान एका "लाल मारुती स्विफ्टवर" खूप मोठे प्रश्नचिन्ह लागले होते त्यावर रामराम बुआ बोलतील का?

काही दिवसापूर्वी लोकसत्तेत अर्थतज्ञ प्रोफेसर अविनाश दिक्षीत यान्ची मुलाखत वाचली त्यात ते म्हणतात, "नोकरशहा आणि राजकारणी यांच्याकडून भ्रष्टाचार दूर होण्याची अपेक्षाच करता नये. याचं कारण- तेच याचे सर्वात मोठे वाटेकरी आहेत. तेव्हा स्वत:च्या हातानं ते आपल्या उत्पन्नावर हातोडा पाडून घेणार नाहीत". पोलिस पण त्यातलेच.

In reply to by दिगोचि

केस मिटवामिटवी करणारे एजंट आहेत. बहुतेकांचे राजकीय लागेबांधे असतात. "अडल्या हरी.." कडून पैसे घेऊन स्वतःच्या आणि पोलिसांच्या तुंबड्या भरतात.

In reply to by दिगोचि

"नोकरशहा आणि राजकारणी यांच्याकडून भ्रष्टाचार दूर होण्याची अपेक्षाच करता नये. याचं कारण- तेच याचे सर्वात मोठे वाटेकरी आहेत.
नोकरशहा आणि राजकारणी हे तर प्रत्येक देशात असतात . मग इथेच ही समस्या एव्हड्या मोठ्या प्रमाणात का ?

In reply to by मराठी_माणूस

बाकी ठिकाणी वचक असतो आणि भ्र्ष्टाचाराला समाजमान्यता नसते, म्हणजे बघा "अ"ने ओळखी पाळखीतून किंवा पैसे देऊन एखादे काम करून घेतले की तो प्रौढी मारून कसे पैश्याने काम करून घेतले ते सांगतो.(लायक व पात्र नसताना). तेच पैसे घेणारा चार ठिकाणी (दानधर्माचे) थेंब उडवून बाकी उजळ माथ्याने उडवत फिरतो,कारण ज्या समाजात राहतो त्याची त्याला साथच असते (सोबत बसण्याची).आणि म्हणून्च जे विकले जाऊ शकत नाहीत ते मारले जातात सतीश शेट्टीसारखे. या पैसे खाऊंवर त्यांच्या घरच्या लोकांचाच सत्सत्विवेकाचा वचक्/प्रेमळ धाक नसतो तर मित्रांची/जात बांधवांची/समाजाची कसली आली आहे चाड?