Skip to main content

पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर भारताचा हल्ला

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 29/09/2016 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
वेगवेगळ्या वाहिन्यांवरील वृत्तानुसार व वेगवेगळ्या संकेतस्थळांवरील बातमीनुसार भारतीय सैन्याच्या तुकड्यांनी आज पहाटे भारत व पाकिस्तानमधील नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधील काही अतिरेकी प्रशिक्षण केंद्रांवर हल्ला करून काही अतिरेकी व सैनिकांना मारून भारतीय सैनिक सुखरूप भारतीय प्रदेशात परतले. काही वाहिन्यांवरून ५ अतिरेकी प्रशिक्षण केंद्रांवर हल्ले केले असे सांगण्यात येत आहे. काही वाहिन्या हीच संख्या ६ व ७ असे सांगत आहेत. आपले २ सैनिक मारले गेले व काही जखमी झाले असे पाकिस्तानने जाहिररित्या मान्य केले आहे. परंतु भारताने सीमारेषा ओलांडलेली नाही असा त्यांचा दावा आहे. या हल्ल्यात भारतीय सैनिकांनी ३०-३५ अतिरेकी मारले असेही आकडे वाहिन्यांवरून सांगण्यात येत आहे. एकंदरीत प्रत्येक वृत्तसंस्था वेगवेगळे आकडे सांगत आहे. इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, (http://indianexpress.com/article/india/india-news-india/india-conducted…) ndia conducted surgical strikes last night along the LoC to safeguard our nation, the Defence Ministry said on Thursday. “Significant casualties have been caused to terrorists and those trying to shield them. We don’t have a plan to further conduct such strikes. India has spoken to Pakistan,” DGMO Lt Gen Ranbir Singh said. “… Now, based on very specific and credible information we received yesterday, that some terrorist teams had positioned themeselves at launch pads along the LoC with an aim to carry out infiltration and terrorist strikes in J&K and various other metros in our country. There were launch pads at the LoC where terrorists were present waiting to infiltrate the nation and attack areas in Kashmir and metros across the country,” the DGMO said. No Indian casualties occurred during the surgical strikes that were carried out last night by the Indian Army. Meanwhile, Pakistan, in a statement issued has said: At least two Army men were killed as Indian and Pakistani troops exchanged fire over the Line of Control in “Azad Jammu and Kashmir”. The exchange of fire began at 2:30am, ISPR said, and continued till 8:00am. “Pakistani troops befittingly responded to Indian unprovoked firing on the LoC in Bhimber, Hotspring Kel and Lipa sectors,” the statement said. दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेचे मंत्री जॉन केरी यांनी सुषमा स्वराजांची २ वेळा भेट घेऊन "पाकिस्तानबरोबरील वाद चिघळवू नका" असा सल्ला दिला होता. या सल्ल्यानंतर दोनच दिवसात हा हल्ला झाल्यामुळे भारत या हल्ल्याची तयारी करीत आहे असा अमेरिकेला अंदाज आलेला असावा. या हल्ल्याची व्याप्ती वाढली तर त्याचे छोट्या युद्धात रुपांतर होऊ शकते व त्यामुळे अमेरिकेच्या भारतीय उपखंडातील हितसंबंधावर परीणाम होऊ शकतो. म्हणूनच केरी यांनी जाहीररित्या हा सल्ला दिला असावा. http://indianexpress.com/article/india/india-news-india/india-pakistan-… _________________________________________________________________________ असे हल्ले करण्याशिवाय भारताकडे पर्यायच शिल्लक नव्हता. आपली वाट लागली तरी चालेल, पण भारताला सुखाने जगू द्यायचे नाही हा विडा उचललेल्या पाकिस्तानला इतर कोणत्याही मार्गाने थोपविण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी, संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानवर टीका, ट्रॅक २ डिप्लोमसी, पीपल-टू-पीपल कॉंटॅक्ट, बस-ट्रेन सेवा, मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा, भूतकाळातील सर्व युद्धात झालेले पराभव . . . अतिरेक्यांना प्रशिक्षण देऊन व शस्त्रे व इतर सर्व तर्‍हेची मदत देऊन भारतात पाठवून दहशतवादी कारवाया घडवून आणणे व अतिरेक्यांना आपल्या देशात आश्रय देण्याचे धोरण पाकिस्तान बदलायला तयार नाही. त्यामुळे जशास तसे उत्तर देणे हा एकमेव पर्याय शिल्लक होता. आधी पठाणकोट हल्ला आणि आता झालेला उरी हल्ला यामुळे मोदींना जोरदार टीकेचा सामना करावा लागला. आपल्यात व आधीच्या सरकारमध्ये काहीच फरक नाही, आपण नुसते बोलघेवडे आहोत इ. स्वरूपाच्या टीकेमुळे मलीन झालेली आपली प्रतिमा बदलण्यासाठी हा हल्ला करणे आवश्यकच होते. परंतु असे हल्ले करून शत्रूला जरब बसविण्यामागे जी प्रगल्भता लागते ती अजूनही भारताकडे आलेली दिसत नाही. मागील वर्षी आणि परत यावर्षी सुद्धा भारतीय सैन्याने म्यानमारमध्ये प्रवेश करून फुटीरतावाद्यांना मारले होते. सिंधू पाणीवाटप करार रद्द करावा यासाठी चर्चा सुरू आहे. आणि आता आज पहाटे हा हल्ला झाला. या प्रत्येक घटनेनंतर प्रकर्षाने दिसतोय तो प्रसिद्धीचा उतावीळपणा. असे हल्ले गुपचूप करून हल्ले केल्यावरसुद्धा त्याची जाहिरात किंवा गाजावाजा केला नाही तर ते योग्य ठरेल. गतवर्षी म्यानमारमधील कारवाईनंतर लगेच लष्कराने पत्रकार परीषद घेऊन हल्ल्याची माहिती दिल्यावर लगेच म्यानमारने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अतिरेकी किंवा शत्रूच्या सैनिकांवर ज्या कारवाया केल्या जातात त्याची वाच्यता करण्याची गरज नाही. जुलैमध्ये सुरक्षा दलांनी काश्मिरमध्ये अतिरेकी बुर्‍हान वाणीला मारल्यानंतर लगेच ते जाहीर केले होते. त्यामुळे काश्मिरमध्ये जनतेला भडकावण्यात येऊन आजही तिथली परिस्थिती अशांत आहे. बुर्‍हान वाणी ७-८ महिने फरारी होता. त्याला मारल्यानंतर ते जाहीर न करता त्याचा अंत्यविधी गुपचुप उरकला असता तर तो मेल्याचे बाहेर समजले नसते व त्यामुळे पुढील समस्याही निर्माण झाल्या नसत्या. निदान भविष्यात तरी अशा कारवाया शेवटपर्यंत गुपचूप ठेवल्या तर नवीन समस्या निर्माण होणार नाहीत. आजच्या कारवाईची जाहीर माहिती देऊन मोदी सरकारला आपली प्रतिमा उजळून घेण्यास मदत झाली असेल. परंतु त्यातून जिन्गोइझम निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. आता पुढील काही दिवसात अत्यंत बेजबाबदार वाहिन्यांवरून वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी व माजी लष्करी अधिकारी एकत्र बोलावून चर्चांचा कीस पाडला जाईल. भाजपचे प्रवक्ते स्वतःची पाठ थोपटून घेतील व काँग्रेसमध्ये असे करायची हिम्मतच नव्हती असे टोमणे मारतील. काँग्रेसवाले बांगलादेश मुक्तीचे उदाहरण देऊन आम्हीचे कसे ग्रेट होता व आमच्या काळातसुद्धा अशा कारवाया होत होत्या, पण आम्ही जाहिरातबाजी करीत नव्हतो असे प्रत्त्युत्तर देतील. यातून युद्ध होऊन दोन्ही देशातील नागरिकांना त्रास होईल व म्हणून अशा हल्ल्यांऐवजी चर्चा करावी असा सल्ला पाकिस्तानप्रेमी निधर्मांध देतील (मराठी वाहिन्यांवर प्रकाश बाळ, जतीन देसाई, हेमंत देसाई इ. मंडळी यात आघाडीवर असतील). भारताने काय करायला हवे याबाबत अनेकांचे सल्ले सुरू होतील. एकंदरीत पुढील काही दिवसात वाहिन्यांवरून प्रचंड धुरळा उडणार आहे. आज झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान वठणीवर येईल व भारतावर हल्ले थांबवेल असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. भारताने अशा कारवाया सुरूच ठेवाव्यात, परंतु त्याचा गाजावाजा करू नये.

वाचने 73322
प्रतिक्रिया 290

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

भाजपचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे म्हणून तर गावाकडे उगाच शेतकरी लोक या सरकारला शिव्या देत नाहीत. साधं उधाहरण दुधाचं घेतला तर रु.25/ लिटर सरकारी रेट असताना हे आल्यावर रु.16-17 झाला. शेणाचे सुद्धा पैसे गवळ्यांकडे राहत नाहीत.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सत्तेच्या राजकारणात कृषी मंत्रालय महत्त्वाचे समजले जात नाही. पंतप्रधानाखालोखाल गृह, अर्थ, परराष्ट्र व्यवहार व संरक्षण ही चारच खाती याच क्रमाने महत्त्वाची समजली जातात. त्यामुळे कोणताही खासदार या ४ पैकी एक खाते मिळविण्याची धडपड करीत असतो. महाराष्ट्रात सुद्धा भाजपमधील व सेनेमधील अनेकांना गृहमंत्रीपद हवे होते. परंतु फडणविसांनी चतुराईने हे खाते स्वतःकडेच ठेवले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

गुर्जींच्या म्हण्या प्रमाणे कृषी मंत्रीपद हे खूपच हलक्या दर्जाचे आणि बिन कामाचे खाते आहे. मान्य आहे. पण देश आणि देशातील नागरिक फक्त वित्त, गृह, संरक्षण आणि पराष्ट्र व्यवहारा वरतीच देशात जिवंत आहेत अशी यांची धारणा झालेली झालेली दिसतेय. शेतकऱ्याचे काय नेहमीचेच रडगाणे आहे, अशी पक्की समजूत काही लोकांची झालेली दिसत आहे. असो

In reply to by विशुमित

हलक्या दर्जाचे किंवा बिनकामाचे खाते असे शब्द माझे नाहीत. तुमचे शब्द माझ्या तोंडात टाकू नका. मी फक्त एवढंच सांगतोय की भारतीय राजकारणात अर्थ, गृह इ. च्या तुलनेत कृषी खाते हे दुय्यम किंवा कमी महत्त्वाचे समजले जाते.

In reply to by श्रीगुरुजी

दर्जा काय आणि महत्वाचे काय, मतीतअर्थ तर तोच आहे ना. शरद पवारांकडे एकदम खालच्या क्लास च खातं होतं, एवढ्यासाठीच तर लोकांचा आटापिटा चालू दिसतोय.

In reply to by विशुमित

खालच्या क्लासचं नाही हो, सत्तेच्या राजकारणात दुय्यम किंवा फारसं महत्त्वाचं नसलेलं असा त्याचा अर्थ आहे.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

काय करतो केंद्रीय कृषिमंत्री? Rural Development आणि Agriculture एकत्र असायला हवेत आणि agriculture आणि food वेगळे असायला हवेत ही जुनी मागणी आहे. FCI मध्ये अन्नधान्याचे पडून असणारे आणि सडणारे साठे आणि किरकोळ स्तरावर होणारी भाववाढ हेच कुठल्याही केंद्रीय कृषीमंत्र्याचं आजवरचं कर्तृत्व आहे. Correct me if I am wrong.

In reply to by बोका-ए-आझम

बोका साहेब- पवारांच्या कृषिमंत्रिपदाच्या काळामध्ये- अन्न धान्य उत्पादकता, फळबागा, फुलशेती, मत्यशेती, वेगवेगळ्या संशोधन, ऊस उत्पादकांचे कल्याण, डाळिंब-द्राक्ष- सफरचंद- आंबे-इ फळांसाठी जागतिक बाजारपेठेत शिरकाव करण्या साठी घेतलेले कष्ट उल्लेखनीय आहे. एक विदा देतो आता आणखी ही देऊ शकतो. http://pib.nic.in/newsite/PrintRelease.aspx?relid=80384 पवारांबाबत फक्त द्वेष दिसतो लोकांच्या मनामध्ये त्याची खंत वाटते.

In reply to by विशुमित

हे प्रसिद्धीपत्रक पवारांच्याच (Press Information Bureau, Government of India, Ministry of Agriculture) खात्याने प्रसिद्ध केले आहे. सुज्ञांस अधिक सांगणे नलगे!

In reply to by श्रीगुरुजी

हे हे, हा हा, हो हो! गुरुजींचा हा प्रतिसाद सर्वांनी सेव्ह करून ठेवा, वारंवार गरज पडणार आहे यापुढे! ;)

In reply to by संदीप डांगे

मला वाटते या पुढे गुरुजींच्या प्रत्येक प्रतिसादाला मला फक्त एवढाच प्रतिवाद करावा लागेल.. "" एक हास्यापद रडका प्रतिसाद"'" ("श्रीगुरुजी हालके घ्या पण मी तसं करणार नाही कारण अजून तरी सुसंस्कृतपणा टिकून आहे)

In reply to by संदीप डांगे

हे हे, हा हा, हो हो! गुरुजींचा हा प्रतिसाद सर्वांनी सेव्ह करून ठेवा, वारंवार गरज पडणार आहे यापुढे! ;)
हरकत नाही. करा सेव्ह. आवश्यकता भासल्यास खालील वाक्ये सुद्धा सेव्ह करून ठेवा. पवारांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली आहे व वर्तमानात आणि भविष्यात त्यांना व त्यांच्या पक्षाला काहीही भवितव्य नाही. अर्थात राष्ट्रवादीतील नेत्यांनी (पवारांसहीत) राष्ट्रवादी सोडून इतर पक्षात प्रवेश केला तर त्यांचे भवितव्य बदलू शकते. पण ते राष्ट्रवादीलाच चिकटून राहिले तर त्यांना काहीही भवितव्य नाही.

In reply to by श्रीगुरुजी

आप समझे नही, "मंत्र्यांच्या खात्याने प्रसिद्ध केलेल्या कोणत्याही पत्रकाला खरे मानू नये" ह्यासाठी तुमचा प्रतिसाद जपून ठेवूया म्हटले,

In reply to by संदीप डांगे

"मंत्र्यांच्या खात्याने प्रसिद्ध केलेल्या कोणत्याही पत्रकाला खरे मानू नये" ह्यासाठी तुमचा प्रतिसाद जपून ठेवूया म्हटले,
"मंत्र्यांच्या खात्याने प्रसिद्ध केलेल्या कोणत्याही पत्रकाला डोळे झाकून खरे मानू नये" असा त्याचा अर्थ होता.

In reply to by श्रीगुरुजी

बरोबर, फक्त मंत्री कोण होता त्यावर तुमचे डोळे उघडे होते की झाकलेले होते हे तुम्हीही नाही तिसरेच कोणीतरी ठरवणार! अन त्यांनी दिलेला निर्वाळा नाही ऐकला तर तुम्ही एकतर अंधभक्त म्हणवले जाल किंवा सिक्युलर किंवा ते कोण ते क्लिंटन का कोण म्हणतात तसे बुबुडा का काय म्हणतात ते म्हणवले जाल! तात्पर्य काय बेंबट्या कुंपणावर बसणे आवडत असले तर बुडास तारा रुतत राहतात म्हणून रडण्यात हशील नाही ;)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बरोबर, फक्त मंत्री कोण होता त्यावर तुमचे डोळे उघडे होते की झाकलेले होते हे तुम्हीही नाही तिसरेच कोणीतरी ठरवणार! अन त्यांनी दिलेला निर्वाळा नाही ऐकला तर तुम्ही एकतर अंधभक्त म्हणवले जाल किंवा सिक्युलर किंवा ते कोण ते क्लिंटन का कोण म्हणतात तसे बुबुडा का काय म्हणतात ते म्हणवले जाल! तात्पर्य काय बेंबट्या कुंपणावर बसणे आवडत असले तर बुडास तारा रुतत राहतात म्हणून रडण्यात हशील नाही ;)
पवारांच्या खात्याच्या प्रसिद्धीपत्रकावरून काही वर्षांपूर्वी घडलेली सत्य घटना आठवली. २००४-२००९ या काळात लालू रेल्वेमंत्री होता. २००५ पासून २००९ पर्यंत रेल्वे खात्याच्या अंदाजपत्रकात प्रचंड नफा दाखविला गेला. विशेषत: आधीच्या अनेक वर्षांच्या कालखंडात रेल्वे अंदाजपत्रकात कायमच तोटा दिसायचा. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे नफ्यात आल्याने लालूवर स्तुतीसुमनांचा वर्षाव सुरू झाला. लालूच्या दूरदृष्टीचे व मॅनेजमेंट स्किल्सचे अग्रलेखातून कौतुक करताना संपादकांच्या लेखण्या झिजल्या. लालू दिसायला व बोलायला गावंढळ असला तरी अत्यंत बुद्धिमान असून त्याच्याकडे कमालीचे व्यवस्थापन कौशल्य आहे असे अनेकजण प्रमाणपत्र देऊ लागले. कहर म्हणजे आयआयएम (अहमदाबाद) या देशातील प्रथम क्रमांकाच्या व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्रात लालूला व्याख्यानासाठी निमंत्रित करून लालूचा सन्मान करण्यात आला (त्यावेळी मला आयआयएम मधील विद्यार्थ्यांची व प्राध्यापकांची कीव वाटली होती). लालूला हॉर्वर्ड विद्यापीठाने व्याख्यानासाठी सन्मानपूर्वक निमंत्रण पाठविले आहे असेही वृत्तपत्रात छापून येत होते. एकंदरीत लालू म्हणजे मॅनेजमेंट गुरू म्हणून प्रसिद्धीस पावला. २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीत लालूने काँग्रेसबरोबर युती न करता स्वतंत्र निवडणुक लढविली. त्यात लालूच्या खासदारांची संख्या २२ वरून ४ वर आली व कॉंग्रेसची संख्या १४५ वरून २०६ वर पोहोचली. आता काँग्रेसला लालूची गरज राहिली नसल्याने लालूला मंत्रीमंडळात घेतले गेले नाही. युपीए-२ मध्ये ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री झाल्या. रेल्वे खात्याचा पहिला अर्थसंकल्प मांडताना त्यांच्या लक्षात आले की लालूने मागील ५ वर्षे आकडेवारीत गडबड करून अर्थसंकल्पात खोटे आकडे टाकून रेल्वे नफ्यात आहे असे दाखविले होते. अर्थसंकल्पातले आकडे व प्रत्यक्षातले आकडे यात प्रचंड तफावत होती. आता अर्थसंकल्प मांडायचा तर त्यात खरे आकडे टाकावे लागून त्यात तोटा दिसणार व केवळ एक वर्षात तुफान नफ्यात असणारी रेल्वे सेवा ममता बॅनर्जींनी तोट्यात नेली असा त्यांच्यावर दोषारोप होणार हे ओळखून ममता बॅनर्जींनी श्वेतपत्रिका काढून खरे आकडे जाहीर केले व लालूचे पितळ उघडे पाडले. आता लक्षात आलं असेल की मंत्र्याच्या खात्याने प्रसिद्ध केलेल्या आकड्यांवर व प्रसिद्धीपत्रकांवर डोळे झाकून का विश्वास ठेवू नये. तो मंत्री जर कै. मधू दंडवते यांच्यासारखा अत्यंत स्वच्छ व प्रामाणिक असेल तर असा विश्वास ठेवायला अजिबात हरकत नाही. पण लालू, पवार इ. मंत्र्यांच्या खात्याने प्रसिद्ध केलेल्या आकड्यांवर मिठाची चिमूट घेऊनच बघावे लागेल.

In reply to by मोदक

आम्हाला शोधायला गुरुजींइतका रिकामा वेळ असता तर... काश!! गुरुजींचे लै कौतुक वाटते, इतक्या लोकांची इतकी लफडी इतक्या अचूक घटनां-तारखांसकट लक्षात ठेवतात आणि क्षणाचाही विलंब लागू न देता भदाभदा ओतत जातात. भारी!!! बाकी, कोणाला पायउतार व्हा सांगणारे आपण कोण राव? समझदार को इशारा काफी. आपण फकस्त इशारे करायचे काम इमानेइतबारे करायचे. =))

In reply to by संदीप डांगे

>>> आम्हाला शोधायला गुरुजींइतका रिकामा वेळ असता तर... काश!! +१ खरं आहे तुमचं म्हणणं. आम्ही रिकामटेकडे असल्याने आमच्याकडे रिकामा वेळ भरपूर आहे हे सर्वांना ठाऊक आहे. तुम्ही यच्चयावत प्रत्येक धाग्यावर अनेक टेराबायटी प्रतिसाद लिहिण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या कार्यात व्यस्त असता. त्यामुळे माहिती शोधण्यासाठी पुरेसा रिकामा वेळ तुम्हाला मिळू शकत नाही याची सर्वांना जाणीव आहे.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही यच्चयावत प्रत्येक धाग्यावर अनेक टेराबायटी प्रतिसाद लिहिण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या कार्यात व्यस्त असता >>>> काहीही खोटं बोलू नका गुरुजी, आधी सिद्ध करा बघू वरचं विधान कि आम्ही यच्चयावत प्रत्येक धाग्यावर अनेक टेराबायटी प्रतिसाद देत असतो ते!

In reply to by संदीप डांगे

त्यात काय सिद्ध करायचंय. सगळ्यांनाच माहिती आहे ते. तरीसुद्धा पुरावेच हवे असतील तर देतो पुरावे. सहर्ष सादर करीत आहोत नामदार श्रीमान संदीप डांगे यांच्या टेराबायटी प्रतिसादांच्या मालिकेतील प्रथम पुष्प - http://www.misalpav.com/comment/884032#comment-884032

In reply to by श्रीगुरुजी

अहो गुरुजी, "यच्चयावत प्रत्येक धाग्यावर" ह्याचा अर्थ कळतो का, कि उचलले बोट आणि निघाले बडवत किबोर्ड? मी लिहितोच टेराबायटी, त्यात काय लाजायचं? तुम्ही फक्त एवढं सिद्ध करा की "मिपाच्या यच्चयावत प्रत्येक धाग्यावर".

In reply to by संदीप डांगे

वेगळी जाहिरात करण्याची गरजच नाही. तुमचे असंख्य टेराबायटी प्रतिसाद त्यासाठी पुरेसे आहेत.

In reply to by विशुमित

विरोधी पक्षाचे व नेत्याचे जे चांगले आहे ते चांगले म्हणायला जीभ अडखळणे आणि जे चुकीचे ते तिखटमीठ लावून बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणे हे 'सर्वच' राजकीय पक्षांचे गुण असतात, पण एक सामान्य नागरिक म्हणून निरक्षीर विवेकाची अपेक्षा असते तेही हल्ली पूर्ण होत नाही, मी काही भाजप नेते व काही काँग्रेस नेते ह्यांच्यासोबत काही विशिष्ट प्रसंगी काम केले आहे, नेते मंडळींची चांगली कामे पुढे येत नाहीत हि खंत आहे, 'कोणत्याही' नेत्याला सामान्य जनता विरोधचयच नजरेतून बघायला लागली तर कठीण होत जाते,

In reply to by संदीप डांगे

मलाही तेच म्हणायचं आहे. दुसऱ्याला कमी करून आपण मोठे होत नसतो, त्या दोन काड्यांची गोष्ट शाळेत ऐकली होती.

In reply to by संदीप डांगे

हा प्रतिसाद पवारांच्या काँटेक्स्ट मधे आहे का ? तसे असेल तर पवारांचे कोणते गुण भारतीय किंवा महाराष्ट्रीय राजकारणाला दिशा देऊन गेले यावर प्रकाश टाकाल का ?

In reply to by अप्पा जोगळेकर

महाराष्ट्रीय राजकारणाला दिशा देऊन गेले यावर प्रकाश टाकाल का ?
नसलयास पक्षी महाराष्ट्रीय राजकारणाला (दु)र्दशा देऊन गेले यावर प्रकाश टाकाल का ? साठीही चालेल. मीही पवार पंप्र व्हावेत असे (सन १९९० पर्यंत अगदी ) वाटणारा एक होतो.

In reply to by संदीप डांगे

पाणी घातलेलं दूध प्यायची एवढी सवय झालेली आहे लोकांना की नीरक्षीरविवेक वगैरे गोष्टी बाराच्या भावात गेलेल्या आहेत. शिवाय मोदींनी सर्जिकल स्ट्राईक हा राजकीय फायद्यासाठी आणि ब्रँड मोदीची पडझड रोखण्यासाठी केला वगैरे मत जर प्रसारमाध्यमं व्यक्त करत असतील तर लोक्स आपल्याला हवे तेच तर्क काढणार आणि मांडणार. नीरक्षीरविवेक हा दोन्ही बाजूंनी असावा लागतो. मोदींना शिव्या घालण्याला निःपक्षपातीपणा म्हणणं आणि दुसरीकडे नीरक्षीरविवेकाची अपेक्षा करणं हा बावळटपणा आजकाल राहुल गांधी पण करत नाहीत. ;)

In reply to by बोका-ए-आझम

अंदाधुंद प्रतिसाद, मी व्यक्त केलेले मत आणि तुमचा प्रतिसाद याचा काहीच संबंध नाही, ;) असो!

In reply to by विशुमित

पवारांबाबत फक्त द्वेष दिसतो लोकांच्या मनामध्ये त्याची खंत वाटते
त्याला जबाबदार ते स्वतः आहेत.
पवारांच्या कृषिमंत्रिपदाच्या काळामध्ये- अन्न धान्य उत्पादकता, फळबागा, फुलशेती, मत्यशेती, वेगवेगळ्या संशोधन, ऊस उत्पादकांचे कल्याण, डाळिंब-द्राक्ष- सफरचंद- आंबे-इ फळांसाठी जागतिक बाजारपेठेत शिरकाव करण्या साठी घेतलेले कष्ट उल्लेखनीय आहे.
हे कष्ट पवारांनी स्वतः घेतले की त्यांच्या मंत्रालयात काम करणाऱ्या अधिका-यांनी घेतले? बरं, यात सडलेल्या धान्याची दारु बनवायचा प्रतिसाद कसा नाही? आणि सर्वात शेवटचं - एक कृषीमंत्री म्हणून हे करणं पवारांचं कामच होतं. काय उपकार केले का? किंवा आमच्या अकोल्याच्या भाषेत - काय उखाडलं बे ?

In reply to by बोका-ए-आझम

एक कृषीमंत्री म्हणून हे करणं पवारांचं कामच होतं. काय उपकार केले का? किंवा आमच्या अकोल्याच्या भाषेत - काय उखाडलं बे ? ^^^ हा पण प्रतिसाद सेव्ह करून ठेवतो, भाजपच्या कोणत्याही केंद्रीय व राज्य मंत्र्याने यापुढे अमूक केले तमुक केले म्हटले की असेच म्हणता येईल, काय म्हणता?

In reply to by संदीप डांगे

जोपर्यंत लोकांची वृत्ती अशी demanding होत नाही, तोपर्यंत लोकप्रतिनिधी, मग ते कुठल्याही पक्षाचे का असेना, काम करणार नाहीत हे तर तुम्हीही मान्य कराल.जर लोकशाहीमध्ये लोक अंतिम सत्ताधारी आहेत तर असले appraising प्रश्न विचारायलाच पाहिजेत. पण असेच प्रश्न इतर पक्षांनाही विचारा. 'पक्ष'पात करु नका. Is it a fair expectation?

In reply to by बोका-ए-आझम

सर्जिकल स्ट्राईक मोदींनी केला का सैन्यांनी? मग एवढी पोस्टर बाजी कशा साठी? http://www.ndtv.com/india-news/pms-message-yet-to-reach-up-as-bjp-plans… सर्जिकल स्ट्राईक करून मोदींनी आणि भाजप ने उपकार नाही केले देशावर. त्या सरकारच्या **डा ला पेट्रोल लावल्याशिवाय काम करणारच नाही का?

In reply to by विशुमित

शिव्या देण्यामुळे तुमचंच frustration समोर येतंय हे लक्षात येतंय का? Surgical Strike करुन मोदींनी देशावर उपकार केले असं कुठे म्हटलंय? त्यांनी पंतप्रधान म्हणून स्वतःचं काम केलंय. पोस्टर लावण्याची गोष्ट असेल तर त्यात चुकीचं काय आहे? जर काँग्रेसने केलं असतं तर त्यांनी पोस्टर्स छापली नसती असं जर तुमचं म्हणणं असेल तर बोलणंच खुंटलं. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या दुर्दैवी हत्या ' मां बेटे का यह बलिदान, नही भूलेगा हिंदुस्तान ' अशा घोषणा देऊन काँग्रेसवाले अजूनही वापरतात; स्वातंत्र्यलढ्यातली काँग्रेस आणि आत्ताचा काँग्रेस पक्ष हे पूर्णपणे वेगळे असतानाही ' आम्ही देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं' असं धादांत खोटं बोलतात ते चालतं, मग भाजपच्या पंतप्रधानाने घेतलेल्या निर्णयामुळे झालेल्या सकारात्मक गोष्टीचा जर त्यांच्या पक्षाने राजकीय फायदा उठवायचा प्रयत्न केला तर त्यात चुकीचं काय आहे? जे दोन वर्षे सत्तेवर असलेला पक्ष करु शकला ते १० वर्षे सत्तेवर असलेला आणि त्याही आधी सत्ता उपभोगणारा पक्ष का करु शकला नाही? सैन्य तेच होतं, त्याची क्षमताही तीच होती. एका पक्षाने इच्छाशक्ती दाखवली, ते त्याचा फायदा उठवणार. दुस-याने संधी असताना दवडली. ते आरडाओरडा करणार. हे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेचं आश्चर्य वाटलं नाही.

In reply to by बोका-ए-आझम

बरोबर! सैन्य सत्ताधारी पक्षाची बटीक असल्याचे ट्रेंड सेट करणे म्हणजे अत्युच्च देशभक्ती आहे, जय हिंद!.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

जे चुकीचे आहे त्याचे समर्थन तुमच्याकडून तरी अपेक्षित नव्हते बोक्याभाऊ, असो. बाजू निवडायची अहमहमिकाच लागली आहे त्याला कोण लय करणार, वाईट वाटले मनापासून इतकेच म्हणतो :(

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

' सैन्य ही सत्ताधारी पक्षाची बटीक आहे ' या तुमच्या उद्गारांबद्दल सखेद आश्चर्य वाटलं. शेवटी लोकशाहीत सैन्य हे लोकप्रतिनिधींनी बनवलेल्या सरकारच्या आदेशाप्रमाणे चालतं. सैन्याने सरकारचे आदेश पाळणे म्हणजे सैन्य बटीक होणं आहे का हे आपण सांगावे. आपल्याला अनुभव आहे. १९७१ मध्ये बांगलादेशसाठी लढताना आणि १९८६-८८ मध्ये श्रीलंकेत लढताना आपलं सैन्य बटीक होतं का हेही जाता जाता सांगून टाकावे. तुमच्यामते जर कोणता पक्ष सत्ताधारी आहे यावर हे अवलंबून असेल तर तसंही सांगा म्हणजे यापुढे गैरसमज होणार नाही. :(

In reply to by बोका-ए-आझम

लोकशाही तत्वधनात तुम्ही वर्णन केलेला सैन्याचा रोल ह्यात असहमती दर्शवण्यालायक काहीच नाही हे आधीच स्वच्छ शब्दात मान्य करतो, "सैन्य हे सरकारचे बटीक आहे" हे विधान का आले त्याच्याकडे जरा वळतो आता मी. पहिली गोष्ट, तुम्ही जे बांगलादेश युद्ध किंवा इतर युद्धाचे रेफरन्स देत आहात ते इथे गैरलागू होतात कारण सर्जिकल स्ट्राईक अन फुल स्केल वॉर ह्यात फरक असतो (तो वरती एक्का काकांनी उत्तमरीत्या विशद केला आहेच) सर्जिकल स्ट्राईकवर एक राजकारणाचे सावट कायम असते, ह्याचे भान कायम ठेवायला लागते, सुदैवाने मोदींना त्या बाबीची पूर्ण जाण आहेच हे ही मी नमूद करतो, फक्त त्या बाबतीत त्यांची पार्टी महामूर्ख आहे हे तुम्ही मान्य कराल काय? क्षणभर जर 71 वगैरे युद्धे अन त्याचे राजकीय वापर जे तुम्ही सांगताय ते valid धरले तर इथेही धरायला हरकत नाही, पण किती?? हा कळीचा मुद्दा आहे, राजकीय पोस्टरबाजी इतकी करावी का ? हा पण मुद्दा आहे , काल कामानिमित्त आग्रा मार्गे हिंडन एअरबेसला गेलो होतो, आग्रा महानगर बीजेपी ने जी आचरट पोस्टर लावली आहेत त्याचे मला दुर्दैवाने फोटो घेता आले नाहीत, पण त्या पोस्टर्सवर कुठेही सैन्याला धन्यवाद आभार वगैरे नाहीये तर फक्त अन फक्त मोदी आहेत, ह्या दळभद्री उद्योगांनी कमीपणा कोणाला येतोय? इतका की शेवटी मोदींना त्यांच्या मंत्री अन कार्यकर्त्यांना "इनफ ऑफ चेस्ट थांपिंग नाऊ" सांगावे लागले असावे?? ज्या पार्टीला आपण जगातली सर्वात मोठी कॅडर बेस्ड पार्टी असल्याचा अभिमान आहे तिला एका गावातली पोरेटोरे सांभाळता येऊ नयेत? बरं परत एक मुद्दा मांडतो, दरवेळी जर बीजेपी ने काही चूक केल्यास काँग्रेसनेही हेच केले होते असे उद्धृत करावे लागले तर माझ्यामते त्याच्याइतका पॉलिटिकली इनकरेक्त स्टँड दुसरा नसावा कारण जनतेने काँग्रेसला कंटाळून बहुमत दिलेले आहे, दिल्लीत बसून प्रतिकाँग्रेस व्हायला नाही हे आपण एकमेकांना अन बीजेपीला सांगून उपयोग नाही असेही नोंदवतो. बाकी दिल्लीकर जाणोत

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बाकी सर्जिकल स्ट्राईक आणि फुल स्केल वाॅर यात फरक आहे हे मान्य आहेच, पण दोन्हीही वेळा हे निर्णय लोकनियुक्त सरकारचे असतात या संदर्भात ते उदाहरण आहे, बाकी काही नाही. Real reason why Cong never took credit for pre-2014 surgical strikes in Pak http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/heres-the-… via The Economic Times App(Download Now): http://ecoti.in/etapps बाकी भाजप हा काही धुतल्या तांदळासारखा पक्ष नाही, पण जेव्हा ते काही चुका करतात तेव्हा ज्या पद्धतीने त्या media मध्ये highlight होतात त्यावरून media चा anti-BJP bias स्पष्टपणे दिसतो. इतर पक्षांनी असं करूनही भाजपने ती चूक भारतीय राजकारणात पहिल्यांदाच केल्याचा जो आव आणला जातो ते खटकतं. इथे मिपावरही तसंच होतं. लोकांनी भाजपच्या चुका, घोडचुका जरुर दाखवाव्या पण मग दुस-या पक्षांबाबतही तसं वागावं. भाजपच्या चुका दाखवायच्या आणि दुस-या पक्षांच्या चुका दाखवल्या की भक्त, नमोरुग्ण असे शेरे मारायचे याला अर्थ नाही. किंवा मग सरळ आपण biased आहोत हे मान्य करावं. निस्पृह असल्याचे दावे करु नयेत. (हे अर्थातच तुम्हाला उद्देशून नाही. प्रतिसाद जरी तुम्हाला असला तरी.)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

तवा गरम असेल तर पोळी भाजणे हा राजकारणाचा गुण आहे. मागच्या काहि दिवसांमधे अनेकवेळा बॅकफुटवर गेलेलं सरकार आणि पक्ष आल्या संधीचं सोनं लुटायला बघतय हे दुर्दैवी असलं तरी स्वाभावीक आहे (फार काहि दुर्दैवीसुद्धा नाहि... राजकारणातली नैतिकता स्वच्छ व्हायला अजुन बरच साबण घासायचं आहे भारताला)

In reply to by बोका-ए-आझम

बोका साहेब भाजपने या बातमीचा राजकीय लाभ उठवावा कि नाही हा प्रश्न वेगळा आहे ( कोणताही राजकीय पक्ष त्याचा फायदा उठवणार नाही असे होणारच नाही) परंतु अजून तशी वेळ आलेली नाहि. हा मामला थंड होऊ द्यायला हवा होता. पाकिस्तानी लष्कर याचे काय उत्तर देते आहे ते पाहणे आवश्यक आहे. आणि या राजकीय धुरळ्यामुळेच संजय निरुपम किंवा केजरीवाल सारखे लोक लष्करावर उघडपणे अविश्वास दाखवत आहेत. राजकीय इच्छाशक्ती मोदी साहेबानी दाखवली हि वस्तुस्थिती. अन्यथा आता त्यांच्या वर टीका करणारे मिपावरील हेच लोक कुठे गेली तुमची ५६ इंची छाती म्हणून विचारत होते. आता त्याला उत्तर मिळाले म्हणून हि कोल्हेकुई चालू आहे. तरीही हि वेळ योग्य नाही असेच मी म्हणेन.

In reply to by सुबोध खरे

हे मला सांगून काय फायदा आहे? भाजपची राजकीय धोरणं मी ठरवतो का? मी फक्त वस्तुस्थिती सांगितली. हा सर्जिकल स्ट्राईक होण्याआधी मिपावर उरी हल्ल्यासंदर्भात जो धागा धर्मराज मुटकेंनी काढलेला आहे त्यावर एका प्रतिक्रियेत मी स्पष्टपणे म्हटलं आहे की उत्तर प्रदेशात निवडणुका असल्यामुळे आणि त्या महत्वाच्या असल्यामुळे सरकारला उरी प्रकरणावर काहीतरी ठोस कृती करावीच लागेल. कुठलाही राजकीय पक्ष हा त्याच्यासंदर्भात होणाऱ्या सकारात्मक गोष्टींचा राजकीय फायदा उचलण्याचा किंवा पोळी भाजण्याचा प्रयत्न करतोच. ते नाकारणं चुकीचं आहे. जर कुणाचा दोष असला तर तो लोकशाही आणि त्याच्या अनुषंगाने निवडणूक आणि ती जिंकणं या ज्या अपरिहार्य गोष्टी आहेत त्याचा आहे. आज भाजप आहे, उद्या काँग्रेस असती तरी ते असंच वागले असते याबद्दल मला खात्री आहे. आपल्या नैतिकतेच्या कल्पना आणि राजकीय पक्षांचे आडाखे यात फरक असल्यामुळे आपल्याला धक्का बसत असेल, पण मी पत्रकारिता करत असताना जे थोडंफार राजकारण पाहिलंय त्यावरून मला अजिबात आश्चर्य वाटलेलं नाही.

In reply to by बोका-ए-आझम

शिव्या देण्यामुळे तुमचंच frustration समोर येतंय हे लक्षात येतंय का?>>>> साहेब तुम्हीच शिव्या देताय मी नाही--- आमच्या कडे उखडण्याला उपटणे म्हणतात., हे लक्षात येतंय का????

In reply to by विशुमित

तर मग ** असे दोन तारे का टाकलेत? सरळसरळ जो शब्द वापरायचा होता तो वापरायचा. मी जो शब्द वापरला आहे तो शिवी नसल्यामुळे व्यवस्थित पूर्णपणे वापरला आहे.

In reply to by विशुमित

सर्जिकल स्ट्राईक मोदींनी केला का सैन्यांनी? मग एवढी पोस्टर बाजी कशा साठी? http://www.ndtv.com/india-news/pms-message-yet-to-reach-up-as-bjp-plans-...
या विशिष्ट लिंकवर एक पूर्ण पोस्टर आहे व दुसर्‍या एका फलकाचा थोडासा भाग आला आहे. दोन्ही फलकांवर जे लिहिले आहे ते अत्यंत अस्पष्ट असल्यामुळे नक्की काय लिहिले आहे ते समजत नाही. पहिल्या पूर्ण फलकावर मोदी व पर्रीकरांची चित्रे आहेत. परंतु त्यावर भाजप या पक्षाचे नाव व कमळ हे चिन्ह नाही. त्यामुळे हा फलक भाजपने लावलेला नाही असे दिसत आहे. दुसर्‍या फलकाचा जो अगदी थोडासा भाग दिसतो त्यात मोदींचे चित्र व त्याखाली कमळाचे चिन्ह एवढेच दिसते. उर्वरीत फलक दिसत नाही व त्यामुळे त्या फलकावर काय लिहिले आहे ते सांगता येत नाही. त्यामुळे ही पोस्टरबाजी भाजपने केली आहे असे दिसत नाही. हा वृत्तांत 'एनडीटीव्ही'ने दिला असल्याने मिठाची चिमूट घेऊनच त्याकडे पहायला हवे. मुद्दाम अस्पष्ट चित्रे टाकून वाचकांची दिशाभूल करणे व भाजपबद्दल मत कलुषित करणे हाच त्यामागचा उद्देश दिसतो.
सर्जिकल स्ट्राईक करून मोदींनी आणि भाजप ने उपकार नाही केले देशावर. त्या सरकारच्या **डा ला पेट्रोल लावल्याशिवाय काम करणारच नाही का?
कोण म्हणतंय मोदींनी किंवा भाजपने देशावर उपकार केले आहेत? जे केलंय ते त्यांचं कामच आहे व ते करायलाच हवं होतं. आणि **डा ला पेट्रोल लागल्याचं म्हणाल तर निदान पेट्रोल लागल्यावर तरी त्यांनी काम केलं. आधीच्या सरकारने तर आग लागून **ड पूर्ण जळून गेलं होतं तरी ते ढिम्म होते.

In reply to by श्रीगुरुजी

म्हणजे NDTV सुद्धा खोटा आणि अतिरंजित चॅनेल म्हणायचं. जी अगदी विश्वासू अशी वृत्त वाहिन्या असतील त्याची कृपया यादी देता का म्हणजे पुढे मला अडचण येणार नाही खरे खोटे करण्याची. कोण म्हणतंय मोदींनी किंवा भाजपने देशावर उपकार केले आहेत?>>> तुम्हीच. तुमच्या प्रत्येक प्रतिसादामध्ये. बाकी हा प्रतिवाद बोका शेठना होता, तुम्ही त्यासाठी कष्ट घेतले अत्यानंद झाला .

In reply to by विशुमित

तुम्हीच. तुमच्या प्रत्येक प्रतिसादामध्ये.
कोणत्या प्रतिसादात? मोदींनी देशावर उपकार केले आहेत असे लिहिलेला एकतरी प्रतिसाद दाखवा.
म्हणजे NDTV सुद्धा खोटा आणि अतिरंजित चॅनेल म्हणायचं.
एनडीटीव्ही हे पराकोटीचे भाजपविरोधी चॅनेल आहे. भाजप विरोधी व्यक्तीना या वाहिनीवरून कायमच मोठे कव्हरेज मिळते. या चॅनेलची मते मिठाची चिमूट घेऊनच पहायला हवीत. तुम्ही वर दिलेल्या लिंकमध्ये अस्पष्ट फोटो का दिले असावेत हे सांगता का जरा? तसेच त्या फलकांवर भाजप किंवा कमळ नसताना सुद्धा ही पोस्टरबाजी भाजपचीच आहे असे ते कोणत्या आधारावर सांगतात?

युपिएच्या काळात "सर्जिकल स्ट्राईक्स" झाले नाहीत. जे काही झाले ते "जरा मोठ्या प्रमाणावर झालेली लाईन ऑफ कंट्रोल जवळची स्किर्मिशेश" होती; सर्जिकल स्ट्राईक ही विशिष्ट व्याख्या असलेली कारवाई असते; अश्या अर्थाची माहिती त्या काळात DGMO पदावर काम करणार्‍या लष्करी अधिकार्‍याने (ज्यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही प्रकारच्या कारवाया होतात) एका राष्ट्रिय वाहिनीवर दिली आहे. त्या अधिकार्‍याच्या मते भारतिय सेनेने "काही दिवसांपूर्वीचे म्यानमार ऑपरेशन" आणि "आताचे पाकिस्तान ऑपरेशन" हे केवळ दोनच सर्जिकल स्ट्राईक्स आत्तापर्यंत केले आहेत. म्यानमारमध्ये आपले सैन्य व म्यानमारचे सैन्य यांच्यामध्ये एक समन्वय होता. त्याविरुद्ध, पाकिस्तान ऑपरेशनमध्ये सहकार्य नसलेल्या (किंबहुना अत्युच्च्य पातळीवरच्या सामरिक तयारीत उर्फ रेड अ‍ॅलर्टमध्ये असलेल्या शत्रूच्या ताब्यातल्या) प्रदेशात घूसून २५० किलोमीटर लांबीच्या लाईन ऑफ कंट्रोलवरून ०.५ ते ३ किलोमीटर आतवर घूसून ७ ते ८ अतिरेकी तळ उद्धवस्त केले गेले आहेत. इतक्या मोठ्या स्तराचा आणि आवाक्याचा सर्जिकल स्ट्राईक यश्स्वीपणे करणे हे भारतालाच नव्हे तर सामरिक महासत्ता म्हणवणार्‍या देशानाही भूषणावह वाटेल. दुसर्‍या एका मान्यवर सैन्यतज्ञाच्या मते हा सर्जिकल स्ट्राईक काही दिवसांनी देशोदेशीच्या लष्करी शिक्षणसंस्थांत "केस स्टडी" म्हणुन शिकवला जाईल. गेल्या काही दिवसांत पाकिस्तानी सरकार आणि सैन्य यांच्याबद्दल ज्या बातम्या पाकिस्तानी व इतर माध्यमांत येत आहेत त्यावरून या सर्जिकल स्ट्राईकचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पुरावे बाहेर येत आहेत. विषेशतः पाकिस्तानी संसदेमधिल भाषणे; मुलकी सरकारच्या आणि सैन्याच्या (व विशेषतः ISI च्या) अधिकार्‍यांमधिल सभांचे तपशील; आणि एका वरिष्ठ पाकिस्तानी पोलिस अधिकार्‍याच्या केलेल्या स्टींग ऑपरेशनमध्ये त्याच्या तोंडून मिळालेली माहिती; इत्यादींमुळे सर्जिकल स्ट्राईकसंबंधी अतीसंशयी लोकांचेही संदेह दूर झाले आहेत. सर्जिकल स्ट्राईकची पहिली माहिती भारताच्या DGMO या उच्च्पदस्थ सैनिक अधिकार्‍याने दिली होती, त्यांची विश्वासार्हता आव्हान देण्यापलिकडची आहे. पाकिस्तानी मुलकी सरकार, सैन्य आणि ISI इत्यांदीसारखे खोटे बोलण्याची परंपरा भारतिय सैन्यात नाही, हे सांगायला नकोच. त्यामुळे जे झोपल्याचे सोंग घेऊन आपल्या स्वार्थी संकुचित हितसंबंधांसाठी अजून खुसपटे काढत आहेत, त्यांना जागे करण्याचे प्रयत्न करणे म्हणजे आपल्या वेडपटपणाचे प्रदर्शन करण्यासारखे होईल. आपली शक्ती फुका खर्च करण्याऐवजी त्यांच्या चालू असलेल्या अजेंड्याला अनुल्लेखाने मारणेच योग्य होईल. सर्जिकल स्ट्राईकची माहिती/पुरावे अजिबात उघड करू नये असे मला वाटते, कारण... १. पाकिस्तानी सैन्याला सर्जिकल स्ट्राईक होताना तर कळले नाहीच, पण "हा स्ट्राईक कसा काय झाला ?" हे पण त्यांना अजून उमगलेले नाही. या कारवाईला "अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू" हा इंग्लिश वाक्प्रचार चपखलपणे बसतो. थोडक्यात या सर्जिकल स्ट्राईकचे तंत्र भारतिय सेनेचे गुपित म्हणा, Intellectual Property Right (IPR) म्हणा, आहे. पाकिस्तानी सैन्याला येन केन प्रकारेण (स्वतःच्या र्‍हेटोरीकने किंवा उल्लू भारतीय वाचाळविरांच्या टीकाटीप्पणीने) याबद्दलची माहिती मिळाली तर हवी आहेच. कारण त्या माहितीचा उपयोग त्याला (अ) भविष्यातले सर्जिकल स्ट्राईक्स टाळण्याचे उपाय करायला आणि (आ) स्ट्राईक्स झालेच तर त्यांचा प्रतिकार करायला होईल. २. याचा दुसरा अर्थ असा की, या स्ट्राईक्सची माहिती उघड करण्याने (अ) आपले भविष्यातले स्ट्राईक्स धोक्यात येतील व (आ) त्यातली गुपिते उघड झाल्यामुळे, स्ट्राईक करणार्‍या भारतिय सैनिकांच्या सुरक्षेला, आरोग्याला आणि जीवाला धोका वाढेल, हे नक्की. ३. आपल्या शक्तीबद्दल शत्रूला जेवढी कमी माहिती असते, तेवढा त्याच्या मनातला गोंधळ जास्त असतो आणि त्याच्यामध्ये यशाबद्दलची खात्री कमी राहते. "Keep them guessing." या तत्वामुळे मिळणारा वरचढपणा युद्धात बर्‍याचदा अस्त्र-शस्त्रांपेक्षा जास्त फायदा देऊन जातो. ===================================== अवांतर : कारगिल युद्धात आपल्या सैन्याला "लाईन ऑफ कंट्रोल" चे जमिनीवर अथवा हवेत उल्लंघन करू नये असा सरकारच आदेश होता. त्यामुळे... (अ) भारतिय स्थलसेनेला खडतर मार्ग चोखाळायला लागून त्यांचे काम कठीण झाले होते आणि (आ) भारतिय वायूसेनेच्या कारवायांवर बंधने येऊन त्यांचेही काम कठीण झाले होते. याचाच अर्थ असा की, "लाईन ऑफ कंट्रोलचे जमिनीवर अथवा हवेत उल्लंघन करू नये" ही अट त्यावेळेस नसती तर भारतिय सैनिकांची जीवितहानी, इजा व इतर सामरिक खर्च लक्षणीय प्रमाणात कमी झाला असता.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

या स्ट्राईक्सची माहिती उघड करण्याने (अ) आपले भविष्यातले स्ट्राईक्स धोक्यात येतील व (आ) त्यातली गुपिते उघड झाल्यामुळे, स्ट्राईक करणार्‍या भारतिय सैनिकांच्या सुरक्षेला, आरोग्याला आणि जीवाला धोका वाढेल, हे नक्की. जर कधी पुरावे जाहीर झालेच तर ते बहुधा सेन्सर्ड असतील पण १. ही कारवाई सैन्याने केली. सरकारने त्यासाठी आवश्यक तो पाठिंबा दिला. त्याबद्दल कौतुक आहेच. पण पुरावे सरकारने जाहीर केले तर उगाच सरकारने कारवाई केली असा मेसेज जाईल आणि सैन्याला या कारवाईसंदर्भात दिले जाणारे महत्व कमी होईल. २. सैन्य कोणाही सोम्यागोम्याला अ‍ॅन्सरेबल आहे असा मेसेज जाईल. हेही चुकीचे आहे. (लादेनच्या कारवाईच्या चित्रफीती कोणीही न मागता उपलब्ध करुन दिल्या गेल्या.) निदान यासाठी तरी पुरावे जाहीर होऊ नयेत.

In reply to by अप्पा जोगळेकर

जर कधी पुरावे जाहीर झालेच तर ते बहुधा सेन्सर्ड असतील (अ) अश्या कारवाईचे सेन्सर्ड पुरावे हे "डॉक्टर्ड" आहेत असे म्हणणे विरुद्ध पार्टीला सोपे असते (आणि पाकिस्तान तर १००% सबळ पुराव्याला, तो पुरावाच नाही असे म्हणतो असा आतापर्यंतचा अनुभव म्हणतो, नाही का? ) या प्रकरणात तर अधिकाधिक माहिती उघड व्हावी म्हणुन तो नकाराच्या अनेक क्लृप्त्या वापरेल हे सूर्याहून जास्त सत्य आहे !! आणि (आ) पुरेसे सबळ पुरावे देण्यामध्ये कारवाईची गुप्तता आणि प्रक्रिया उघड होते, जे करणे आत्मघातकी होईल. तज्ञ लोक शीत पाहून पूर्ण भाताचे पातेले ओळखतात, हे सांगायला नकोच ! ++++++++++++++ लादेनच्या कारवाईच्या चित्रफीती कोणीही न मागता उपलब्ध करुन दिल्या गेल्या. लादेनची कारवाई कही शेकडा किमी पाकिस्तानच्या हद्दीत शिरून केलेली होती. अशी कारवाई पाकिस्तानी सैन्यदलाच्या सहकार्याशिवाय होणे शक्य नाही. कारण देशाच्या इतक्या आत अनेक हेलिकॉप्टर्स शिरतात आणि त्यांचा सुगावा रडार्सच्या अनेक रांगांना लागू शकत नाही, इतकीही पाकिस्तानी फौज बुळी नाही ! पाकिस्तानी सैन्याकडे लादेनच्या घराचा पुरेसा पुरावा देऊन "ही कारवाई तुम्ही करा किंवा ती आम्हाला विनाअडथळा करू द्या" अन्यथा "तुमच्या अबोटाबाद या महत्वाच्या सैनिकी तळाशेजारी होणारी ड्रोन/रॉकेट हल्ल्याची तयारी ठेवा व त्यामुळे होणारी नामुष्की सोसा" असा काहीसा सज्जड दम दिला गेला होता असे अंदाज आहेत. पाकिस्तानी सैन्याकडे लादेनला मारण्याचे श्रेय/आरोप पचविण्याची ताकद/धमक/तयारी नव्हती. तसे केले असते तर पाकिस्तानातले सर्व रंगांचे सर्व अतिरेकी गट उलटून त्यांचे जानी दुष्मन होण्याचा धोका होता. या ऑपरेशन नंतर कोणाही लष्करी अधिकार्‍यावर कामचुकारीच्या आरोपावरून कारवाई झाली नाही. फक्त लादेनच्या जागेची माहिती देणारा सिविलियन डॉक्टर कैदेत खितपत पडला आहे आणि अमेरिका त्याला सोडविण्याची अजून धडपड करत आहे; यावरून काही बोध होऊ शकतो. राहता राहिला प्रश्न चित्रफितीचा. ती जाहीर केली किंवा न केली असती तरी तात्कालीक गदारोळ सोडता (आणि तो झालाच ! ) काही फार फरक पडला नसता. अमेरिकेने "बनवलेल्या" कोणत्या पुराव्याला कोणता महत्वाचा देश चुकीचा म्हणतो ? आणि जे चिल्लर लोक त्याला चुकीचा म्हणतात त्यांना भीक घालायची गरज अमेरिकेला वाटत नाही. "वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शनच्या पुराव्यांच्या" आधारे इराकवरचा हल्ला केला गेला तेव्हा त्यांना कोणी फारसा विरोध केला नव्हता. इथे तर ओसामाचा खातमा व्हावा असे, अतिरेकी गट आणि पाकिस्तान या दोघांना सोडून, बहुतेक सर्व जगाला वाटत होते. अर्थातच, अमेरिकेने दिलेला भलाबुरा कोणताही पुरावा खोटा आहे असे म्हणून स्वतःला अवलक्षण करून घ्यावे असे कोणा महत्वाच्या देशाला वाटले नाही, आणि ज्यांनी त्या पुराव्यावर विश्वास ठेवला नाही त्यांची दखल घ्यावी असे इतरांना वाटले नाही... उलट "गुड रिडन्स" असे म्हणत जगाने सुस्कारा सोडला. याला जागतिक राजकारण म्हणतात ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

वरचे आवांतर लिहिण्याचा उद्देश हाच की... "लाईन ऑफ कंट्रोल ओलांडा" अशी आज्ञा सैन्यदलांना देणे ही अत्युच्च्य दर्जाची "राजकीय इच्छाशक्ती असणे आणि ती वापरण्याची धमक असणे" याचे लक्षण आहे. कारण अशी आज्ञा देणार्‍यावर (म्हणजेच भारतात, पंतप्रधानांवर) त्या आज्ञेमुळे होणार्‍या सर्व जागतिक-देशांतर्गत-सामरिक परिणामाची जबाबदारी असते... तेथे राजकारणी सारवासारव चालत नाही. पूर्णविराम (PERIOD).

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

"लाईन ऑफ कंट्रोल ओलांडा" अशी आज्ञा सैन्यदलांना देणे ही अत्युच्च्य दर्जाची "राजकीय इच्छाशक्ती असणे आणि ती वापरण्याची धमक असणे" याचे लक्षण आहे. अगदी अगदी!! आणि हीचे महत्व अजुन वाढते, जेव्हा ती प्रत्युत्तर म्हणुन, बदला घेण्यासाठी केली जाते!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

वरचे आवांतर लिहिण्याचा उद्देश हाच की... "लाईन ऑफ कंट्रोल ओलांडा" अशी आज्ञा सैन्यदलांना देणे ही अत्युच्च्य दर्जाची "राजकीय इच्छाशक्ती असणे आणि ती वापरण्याची धमक असणे" याचे लक्षण आहे. कारण अशी आज्ञा देणार्‍यावर (म्हणजेच भारतात, पंतप्रधानांवर) त्या आज्ञेमुळे होणार्‍या सर्व जागतिक-देशांतर्गत-सामरिक परिणामाची जबाबदारी असते... तेथे राजकारणी सारवासारव चालत नाही. पूर्णविराम (PERIOD).
पूर्ण सहमत

म्हात्रेसाहेब, व्याख्या करण्याच्या तांत्रिकेत न शिरता आपल्याला असे म्हणता येईल काय कि लष्कराने पाकी व आतंकी हल्ल्यांचे बदले घेण्याची - युपीए व एनडीए काळातही- कारवाई केली? कारण आतापावेतो असे काही (हल्ल्यानंतर कारवाई केल्याचे) झाले नसल्याचे जनमानसात रूढ असल्यानेच चीड जास्त होती, जर असे झालं असेल तर ते skirmish होते की strike ह्याने जनतेला काय फरक पडतो? म्हणजे कि आपण उत्तर दिले होते व नेहमी देतो, ह्यावेळेस जरा जास्त केले. ( जागतिक राजकारनावर या तांत्रिकतेने खूप फरक पडतो हे थोडा वेळ नाही मानले तर)

In reply to by संदीप डांगे

तीव्र असहमत ! याची कारणे वरचे प्रतिसाद परत वाचलेत तर सहज कळेल. सोईसाठी त्यातले काही महत्वाचे भाग खाली परत देत आहे (पण त्यातली सर्व वाक्ये मुळातून वाचल्यास जास्त योग्य होईल)... १. युपिएच्या काळात "सर्जिकल स्ट्राईक्स" झाले नाहीत. जे काही झाले ते "जरा मोठ्या प्रमाणावर झालेली लाईन ऑफ कंट्रोल जवळची स्किर्मिशेश" होती; सर्जिकल स्ट्राईक ही विशिष्ट व्याख्या असलेली कारवाई असते; अश्या अर्थाची माहिती त्या काळात DGMO पदावर काम करणार्‍या लष्करी अधिकार्‍याने (ज्यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही प्रकारच्या कारवाया होतात) एका राष्ट्रिय वाहिनीवर दिली आहे. २. त्या अधिकार्‍याच्या मते भारतिय सेनेने "काही दिवसांपूर्वीचे म्यानमार ऑपरेशन" आणि "आताचे पाकिस्तान ऑपरेशन" हे केवळ दोनच सर्जिकल स्ट्राईक्स आत्तापर्यंत केले आहेत. ३. "लाईन ऑफ कंट्रोल ओलांडा" अशी आज्ञा सैन्यदलांना देणे ही अत्युच्च्य दर्जाची "राजकीय इच्छाशक्ती असणे आणि ती वापरण्याची धमक असणे" याचे लक्षण आहे. कारण अशी आज्ञा देणार्‍यावर (म्हणजेच भारतात, पंतप्रधानांवर) त्या आज्ञेमुळे होणार्‍या सर्व जागतिक-देशांतर्गत-सामरिक परिणामाची जबाबदारी असते... तेथे राजकारणी सारवासारव चालत नाही. पूर्णविराम (PERIOD). लाईन ऑफ कंट्रोलचा छोटामोठा भंग आणि तिच्यावरीन गोळीबार ही पाकिस्तानच्या बदमाशीमुळे होणारी नेहमीची गोष्ट आहे. त्यामुळे त्यातल्या त्यात जास्त स्किरमिश (चकमक) होणे ते करताना काही मीटर्स LOC ओलांडणे हे नेहमीपेक्षा जास्त असले तरी आक्रमण समजले जात नाही. तसा आताही आपला एक जवान चुकून LOC पलिकडे जाऊन पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात आहे हे वाचले असेलच. हे आक्रमण नाही. याविरुद्ध... "आम्ही लाईन ऑफ कंट्रोल ओलांडून खोलवर लष्करी कारवाई केली व त्यात अनेक लोकांना (मग ते अतिरेकी असले तरी ते परकिय सत्तेच्या ताब्यात असलेल्या भूमीवरचे लोक असतात) ठार करून आलो" असे सीमेवरच्या सर्व्वोच्च अधिकार्‍याने पत्रकार परिषद घेऊन सांगणे... म्हणजेच साध्या शब्दांत "आम्ही तुमच्या घरात घुसून काही जणांना ठार करून आलो आहोत. तुमच्यात हिम्मत असेल तर काय करायचे ते करा" असे "अधिकृतरित्या" सांगणे होते." यात गैरसमजाला थारा नाही. जागतिक राजकारनावर या तांत्रिकतेने खूप फरक पडतो हे थोडा वेळ नाही मानले तर हा राजकारणी तांत्रिकतेचा भाग नाही "रोजच्या ओढाताणीत धक्काबुक्की करणे" आणि "घरात घूसून हातपाय तोडून व काहींना यमसदनाला पोचवणे" या दोघातला फरक आहे. यातून पुढे एस्कॅलेशन होत होत फुल स्केल युद्ध होऊ शकते... व त्या सगळ्याची जबाबदारी भारतामध्ये पंतप्रधानांवर पडते, त्यात कोणतीही सारवासारवी किंवा कारणे चालत नाहीत. याच कारणांसाठी... अ) १९६५ च्या युद्धाच्या आदेशाचे श्रेय योग्य रितीने श्री लाल बहादूर शास्त्रींना दिले जाते. आ) १९७१ च्या युद्धाच्या आदेशाचे श्रेय श्रीमती इंदिरा गांधींना दिले जाते. त्यावेळेस, वाजपेयींनी सर्वात पुढे राहून इंदिरा गांधींना दुर्गादेवीची उपमा दिली होती हे विसरता कामा नये. मात्र, इ) कारगिल युद्धाचे श्रेय "तेवढ्याच मोकळ्या मनाने" श्री वाजपेयींना दिले गेले असे दिसले नाही, आणि ई) आताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर, सद्याची राजकीय अवस्था पाहूनच असावे बहुतेक राजकीय गदारोळ टाळण्यासाठी, मोदींनी नाही तर भारताच्या DGMO नी पत्रकार परिषद घेऊन ती बातमी सांगितली. (आठवण असू द्या : अमेरिकेची दर लष्करी कारवाई व ओसामाच्या प्रकरणातही त्यांच्या प्रेसिडेंटने ती बातमी सर्वप्रथम सांगताना त्या प्रत्येक कारवाईचे श्रेय "माझ्या आदेशाने झालेल्या कारवाईने" अश्या अर्थांच्या शब्दांनी घेतले आहे.) असे असतानाही, "किमान पाकिस्तानला दाखविण्यासाठी तरी देशाची एकता स्पष्ट व्हावी इतकीही प्रगल्भता न दाखवता" केवळ राजकिय पोळी भाजण्यासाठी, (भारत सरकार नव्हे तर) भारताचे DGMO यांनी जे सांगितले आहे ते कसे विश्वासू नाही आणि त्या दाव्याचे पुरावे द्यावे" अश्या अर्थाची वक्तव्ये देऊन, वर आमचा सैन्यावर पूर्ण विश्वास आहे पण तरीही सरकारला दोष द्यायचा आहे असा जगावेगळा पवित्रा घेतला आहे. एकंदरीत, भारतात किती दुही आहे आणि तात्कालिक स्वार्थासाठी आम्ही शत्रूला मदत होईल असे वागायलाही कमी करणार नाही याचे पुरावे दिले आहे. याचा भारतिय सैन्याच्या मनोबलावर काय परिणाम होईल आणि याचा उपयोग पाकिस्तान सरकार, सैन्य आणि माध्यमे पुरेपूर करतील / करत आहेत याचे आपल्या राजकारण्यांना काही देणे घेणे पडलेले दिसत नाही. पाकिस्तानात याबद्दल आश्चर्ययुक्त (इतर वेळी ठीक आहे पण आताही तेच या अर्थाने) आनंद होत असेल हे नक्की. हे वरचे सर्व लिहिण्याची कारणे अशी आहेत... अर्थात, अशी कारवाई हे केवळ सैन्यबळावर शक्य नसते. अश्या कारवाईमुळे होणारे परिणाम (जगातल्या इतर देशांचा विरोध आणि ज्यावर हल्ला केला त्याला प्रतिहल्ला करण्यास दिलेले कारण) टाळण्यासाठी जागतिक पटलावर पार्श्वभूमी तयार करावी लागते... जी गेल्या दोन-अडिच वर्षात झाली आहे. मोदींच्या परदेश दौर्‍यांवर टीका करणार्‍यांची अडचण होणे आणि त्यामुळे धागा हायजॅक होणे हे टाळण्यासाठी हा मुद्दा मी मुद्दामहून टाळला होता ! जागतिक राजकारणात अथवा अर्थकारणात यशस्वी व्हायचे असले तर पुढची २५-३० वर्षे पाहून खेळ्या खेळाव्या लागतात. त्यामानाने गेल्या दोन-अडिच वर्षांत या सरकारने जागतिक स्तरावर मिळवलेल्या पतीमुळेच, माध्यमांतल्या बातम्यांवरून पूर्वी न दिसणारे खालील संकेत दिसत आहेत... (अ) भारताने आक्रमक कारवाई केली असली तरीसुद्धा कोणत्याही देशाने पाकिस्तानची बाजू घेतलेली नाही. अगदी चीनही स्पष्टपणे हल्ल्यांविरुद्ध बोललेला नाही. (आ) उलट, सर्व महत्वाच्या देशांची वक्तव्ये भारताच्या बाजूची आहेत. (इ) पाकिस्तानातले मुलकी सरकार सैन्यदलाला अतिरेक्यांना मदत करू नका असे म्हणण्याची धमक दाखवू लागले आहे. (इ) पाकिस्तानच्या लोकसभेत अतिरेक्यांच्या विरोधी स्पष्टपणे बोलले जात आहे. असो, त्याच त्याच मुद्द्यांवर खूप चर्वण झाले. समझदार को इशारा काफी है । परत परत तेच न विचारता / लिहिता, इतर काही वेगळा मुद्दा आला तरच लिहायला आवडेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रतिसाद उत्तमच आहे आणि पूर्ण सहमतही आहेच पण माझा मुद्दा वेगळा व एवढाच की भारतीय जनतेची तगमग ह्यासाठी होती की 'आपण फक्त हल्ले सहन करतोय व लष्कर गप्प, बंदुकीवर बंदूक ठेऊन बसलंय' अशी जी प्रतिमा होती, त्याच्या बद्दल वरचा माझा प्रतिसाद होता, आपण लिहिलेला प्रतिसाद सर्व बाजूने बिनतोड असला तरी माझ्या मुद्द्याशी सुसंगत वाटला नाही, प्रस्तुत स्ट्राईक वर इतर मोदी विरोधक काय म्हणतायत (ज्याच्याशी मी पूर्णपणे असहमत आहे) ते बिल माझ्यावर फाडले जात आहे असे दिसते.. तेही न झाले तर बरेच होईल, ;)

In reply to by संदीप डांगे

प्रस्तुत स्ट्राईक वर इतर मोदी विरोधक काय म्हणतायत (ज्याच्याशी मी पूर्णपणे असहमत आहे) ते बिल माझ्यावर फाडले जात आहे असे दिसते.. तेही न झाले तर बरेच होईल, ;) माझे लेखन नेहमीच व्यक्तीकेंद्रित नसून मुद्दाकेंद्रित असते. विष्लेषण सर्वसमावेशक व पूर्ण होण्यासाठी अनेकदा 'अगोदर पुढे आलेले' आणि 'न आलेले' असे दोन्ही प्रकारचे मुद्दे त्यात समाविष्ट करणे आवश्यक होते. त्यामुळे, प्रतिसादात मी जर/तर, जेव्हा/तेव्हा, जो/तो अशी वाक्यरचना नेहमी वापरतो. त्यामुळे, जो मुद्दा ज्याला लागू असेल त्यांच्या नावेच त्यातले बिल 'सकारण' फाडले जाते ('बिल फाडणे' हा वाक्पचार मला नवीन आहे, पण आवडला म्हणून वापरला आहे :) ) . तुम्ही जर एखाद्या गटांत नसाल, तर त्यावरची टिप्पणी तुम्ही स्वतःवर ओढून घेण्याची गरजच नाही :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

वोक्के सर, गॉट इट! मुद्दाकेंद्रित चा माझा अर्थ तुमच्या अर्थापेक्षा वेगळा आहे म्हणून गोंधळ झाला, प्रतिपक्षाने उपस्थित न केलेले व करणार नाही असे मुद्दे आपणच मांडून ते मुद्दे डिफेन्ड करणे हे माझ्यासाठी नवीन आहे, मी शक्यतो चर्चा भले मेगाबायटी झाली तरी चालेल पण असे करत नाही त्यामुळे तुमची मांडणी समजून घेण्यात माझीच चूक झाली, क्षमा असावी. धन्यवाद चांगल्या चर्चेबद्दल, विशेषतः गप्प बसून राहणे, रेटारेटी करणे आणि घरात घुसून मारणे ह्या तिघांतला फरक कळला!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

डॉक्टर साहेब बाडीस एकच पुरवणी अगोदरचे हल्ले आणि आताच यातील फरक सांगतो. अगोदरचे हल्ले हे पाठलाग या स्वरूपातील होते (hot persuit). म्हणजे एखादा दहशतवादी सीमेच्या आत घुसून घातपाती कारवाई करीत असताना त्याच्याशी सामना होतो. यावेळेस हा दहशतवादी पळून जाताना आपली सीमा ओलांडूनपरत पाकिस्तानात गेल्यावर त्याचा पाठलाग करून पाकिस्तानी हद्दीत त्याला कंठस्नान घातले जात असे. या हल्ल्याला सरकारची मूक संमती होती परंतु अशा प्रत्येक हल्ल्याच्या वेळेस सरकारची औपचारिक स्वरूपात परवानगी घेतलेली नसे. आताचा हल्ला हा फार वेगळ्या प्रमाणात होता. हा म्यानमारमध्ये केलेल्या हल्ल्यापेक्षा नक्कीच धाडसाचं आणि खतरनाक हि होता. याचे कारण या वेळेस आपले कमांडो पाकिस्तानात घुसले होते आणि तेथल्या लष्कराचा त्यांना नुसता पाठिंबाच नव्हता तर ते लष्कराच्या तावडीत सापडले असते तर पाक लष्कराने त्यांना हाल हाल करून ठार मारले असते. म्यानमारच्या हल्ल्याच्या वेळेस सार्वजनिक न्यासांवर ( कि मिपावरच) अनेक लोकांनी हिम्मत असेल तर पाकिस्तान बरोबर असे करून दाखवा असे हि बोलून दाखवले होते. या वेळेस आपल्या नकाशा दर्शक उपग्रह कार्टो सॅट २ बी याच्या प्रतिमांचा वापर करून( यात इसरोच्या शास्त्रज्ञांचे मोठे योगदान आहे) पाकिस्तानात असलेल्या दहशतवादी तळांचा अचूक ठावठिकाणा शोधण्यात आला. यानंतर एक आठवडाभर त्या तळावर हल्ला करायला जाण्यासाठी लष्कराची ठाणी टाळून जाण्याचे(आणि येण्याचे) सोपे मार्ग शोधून काढले. एवढा वेळ पाकिस्तानशी चर्चेचे गुऱ्हाळ चालू ठेवले आणि शेवटी ठरलेल्या वेळेस एकाच वेळेस सहा( कि सात) ठिकाणी ( ही ठिकाणे एकमेकांपासून २५० किमी दूर आहेत) हल्ला केला. पाकिस्तानलष्कराला याचा सुगावा सुद्धा लागला नाही त्यामुळे त्याचा प्रतिकार (जवळ जवळ) झालाच नाही. अत्याधुनिक शस्त्रे आणि अस्त्रे वापरून केलेला हा हल्ला एकमेवाद्वितीय असा होता. लष्कर असे हल्ले करायला अगोदरही तयार होते परंतु त्याची पार्श्वभूमी तयार नसेल किंवा राजकीय इच्छा शक्ती नव्हती म्हणून असे हल्ले(surgical strikes) पूर्वी झालेले नाही. (माझी माहिती माझ्या खात्रीच्या लष्करी स्रोतांकडून मिळालेली आहे.) श्री मोदींच्या कणखरणाबद्दल त्यांना मिळत असलेल्या प्रसिद्धी चा द्वेष वाटल्यामुळे श्री शरद पवार दर्पोक्ती करीत आहेत असे मी स्पष्टपणे म्हणतो. हा प्रश्न पक्षीय दृष्टिकोनातून पहिला गेला नसता तर बरे झाले असते. मोदीभक्तांनी इतका उदो उदो करायला नको होता किंवा त्याचा राजकीय फायदा उठवायचा प्रयत्न करायला नको होता. परंतु एकंदर श्री चिदंबरम, शरद पवार यांनी कोतेपणा दाखविला आणि श्री केजरीवाल किंवा राहुल गांधी यांच्या प्रगल्भ पणा बद्दल न बोललेलेच बरे. दुर्दैवाने मोदी द्वेषाची कावीळ झालेले लोक मिपावरही बेताल वक्तव्ये करीत आहेत.

In reply to by सुबोध खरे

बाकी प्रतिसादाशी सहमत, पण, दुर्दैवाने मोदी द्वेषाची कावीळ झालेले लोक मिपावरही बेताल वक्तव्ये करीत आहेत. ^^^ कोणी कुठे केलीयेत अशी वक्तव्य??