Skip to main content

आजकालचे ग्रामीण चित्रपट

लेखक आशु जोग यांनी रविवार, 03/07/2011 01:18 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही वर्षापासून मराठीमधे अनेक ग्रामीण चित्रपट येऊ लागले आहेत मराठीतले काही ठराविक कलाकार तर दिवसेंदिवस ग्रामीण चा रतिब घालू लागले आहेत. हे सर्व चित्रपट पाहताना नेहमी प्रश्न पडतो ग्रामीण म्हणजे नेमके काय ? खटकणारी गोष्ट म्हणजे यातील कलाकारांचे ग्रामीण बोलणे जे त्यांना जमत नाही धोतर टोपी घातली किंवा नऊवारी लुगडं नेसलं की जमलं ग्रामीण असा एक भ्रम दिसतो या कलाकारांचा. आणि मग ग्रामीण म्हणून जी भाषा बोलली जाते त्यामधे आत्ता, आत्ता ग बया, कंच, वाइच, व्हय व्हय या शब्दांची नुसती भरमार होत राहते शिवाय ग्रामीण म्हणून एक विचित्र हेल काढून आणि अंमळ ओरडून हे कलाकार बोलतात तो सगळाच प्रकार तापदायक होतो. कृत्रिमता असह्य होते. आपला अनुभव काय आहे याबद्दल !

वाचने 30758
प्रतिक्रिया 75

प्रतिक्रिया

In reply to by मैत्र

हो टिंग्यामधली भाषा जुन्नर्/मंचर भागात ऐकलेली आहे. त्यामुळे त्यातील संवाद चपखल वाटले. मला 'देऊळ' मधली गावाकडची भाषासुद्धा अस्सल वाटली होती, जरी ती सहसा चित्रपटांत गावाकडचे लोक बोलताना दाखवतात तशी नव्हती. हायवे वर असलेल्या गावांमधल्या बोलीभाषेत अनेक इंग्रजी, पॉप कल्चर मधले शब्द असतात. तसे बरोब्बर दाखवले आहेत त्यात.

मला वळू आवडतो… हा चित्रपट मी कधीही कितीही वेळा पाहू शकते. तो डायलॉग ``किती चटणी खाता…. उगा लोकाच्या चेष्टेला भर …`` *lol* तसाच देऊळ चा पहिला अर्धा भाग आवडतो. डायलॉग ``पिंकी पडली… पिंकी….`` आणि ``ये येडा फोफाटा`` *lol*

In reply to by स्वरालि

आपण कधी स्वतः खेड्यात राहिला आहात का नसला तर या चित्रपटावर अवलंबून राहू नका सदाशिवातल्या गिरीश उमेश कुलकर्ण्यांनी काढलेले चित्रपट म्हणजे ग्रामीण असा एक सोयीस्कर समज अनेकांचा झालेला दिसतोय पण हा शॉर्ट कट योग्य नाही

खटकणारी गोष्ट म्हणजे यातील कलाकारांचे ग्रामीण बोलणे जे त्यांना जमत नाही सहमत, फारच कमी कलाकारांना म्हणजे बहुतेक सद्ध्या भारत गणेशपुरेलाच वऱ्हाडी नीट बोलता येत असावी, बाकीचे उगाच वऱ्हाडीतसुद्धा ते उचक्या लागल्यागत की की की घुसडत असतात. असो