उन जळत रणरणे, मृग़जळास लांबवी
सकल जनही त्रस्त ते, दु:ख दाटले मनी
जीव कसा तगमगे, जन गृहात कुंठती
वाटसरू कुणी नसे, वाट उरे एकली
ग्रीष्माने त्रासून हा, आसमंत पेटवी
सूर्यही बघ जळतसे, सागरास आटवी
अवेळ हीच साधूनी, आस तुझी का गमे?
तृष्णा ही मज गिळे, कंठ तुझा शुष्कवी
भेटीलाच माझिया, सांग कोण परी निघे?
ग्रीष्माला वारूनिया, कोण सखी अवतरे?
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1717
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!
छान
छान।
सुंदर कविता.... आवडली