Skip to main content

शृंगापत्ती

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 19/08/2016 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
शृंगापत्ती रुपाली पाटील* ( नाव बदललेले आहे) हि एक सॉफ्ट वेअर कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला आहे. तेथे असणाऱ्या सर्व सोयी सुविधा आणि मोकळॆ वातावरण याचा ती मनसोक्त उपभोग घेते. त्यात तिच्या बरोबर काम करणाऱ्या इतर मित्रमंडळी पैकी एका बरोबर तिचे धागे जुळले. एके दिवशी रुपाली आपली पाळी चुकली म्हणून माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली. त्याने तिला माझ्याकडे सोनोग्राफीसाठी पाठविले. अर्थात रुपाली गरोदर होतीच. तिला हा गर्भ नको होता. कारण ज्या मित्राबरोबर धागे जुळलेले होते तो तिच्या इतकाच पगार घेणारा होता. रुपालीचे विचार वेगळे होते. तिला सज्जड पगार घेणारा नवरा हवा होता. चार पैसे जास्त असले कि खरेदी खाणे पिणे पर्यटन यावर कसा सढळ हस्ते खर्च करता येतो. हा मित्र काही फार जास्त पगार मिळवत नव्हता. मग काय, बस, आपण फक्त चांगले मित्र राहूया असे रुपालीने त्याला सांगितले. अर्थात त्याला हे गरोदरपणाचे सांगायचं काही संबंधच नव्हता. माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली तिथे तिने रीतसर गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या. दुर्दैवाने पूर्ण गर्भपात झाला नाही आणि थोडेसा भाग आत राहिला होता हे सोनोग्राफीत समजून आले मग परत एक छोटीशी शल्यक्रिया आणि सर्व आलबेल झालं. सात आठ महिन्यांनी माझा हा मित्र त्याला मित्राच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण आले म्हणून गेला. स्वागत समारंभासाठी गेला. मित्राबरोबर गप्पा टप्पा झाल्या. कुणाची मुले काय करताहेत? एक कोण तरी आजोबा झाला होता त्याची म्हातारा म्हणून यथेच्छ टिंगल करून झाली. सून कुठली आहे तिचे घराणे, खानदान,, हनिमूनला कुठे जाणार इ सर्व चर्चा झाल्या आणि वधूवराना भेटायला हा स्टेज वर गेला. मुलाला अभिनंदन म्हणून हस्तांदोलन केले आणि वधूकडे वळून पहिले तर "रुपाली" . आमचा मित्र एकदम चमकला. त्याचा चेहरा उतरला. रुपालीने अर्थात ओळख दाखवली नाही. सासऱ्याचे "डॉक्टर मित्र" म्हणून नमस्कार चमत्कार झाले. आमच्या मित्राला तेथे असलेले सुग्रास स्नेहभोजन काही घशाखाली उतरेना. तेवढ्यात त्याला एक फोन आला. त्याची संधी घेऊन मित्रांमधून हा मला कॉल आहे मी निघतो म्हणाला. मित्रमंडळींनी नेहमीप्रमाणे हा "बायकांच्या घोळक्यात कृष्ण" असतो म्हणून थट्टा केली ती पण त्याला जीवावर आली. एकीकडे रुग्णांच्या गोपनीयतेची शपथ घेतलेली, दुसरीकडे मित्राला फसवले गेल्याची भावना या दोलायमान परिस्थितीत चार दिवस त्याने अस्वस्थतेत घालवले. बायकोशी बोलायचे तर बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही. पाचव्या दिवशी त्याने मला फोन केला आणि हि कहाणी सांगितली. (मी त्याच्या त्या मित्राला ओळखत नाही.) मी त्याला गीतेतील "कर्मण्येवाधीकारस्ते सारखे ज्ञानामृत पाजले. काही दिवसांनी त्याला या मित्राच्या घरी जाण्याचा प्रसंग आला तेंव्हा परत हीच कहाणी. सुनेच्या दृष्टीत त्याला न बोलून तिरस्कार दिसतो आणि सासू सारखी म्हणत होती "भावजी तुमचं लक्ष कुठाय" गेले नाही तर एक चांगला मित्र गमावण्याची शक्यता किंवा गेलो तर आपले "स्वागत" तेथे "नाही आले तर बरे"असे होणार हि बोच अशा शृंगापत्तीत तो आहे.

वाचने 92930
प्रतिक्रिया 413

प्रतिक्रिया

विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवणारी मुलगी सुन म्हणून किंवा मुलगा जावई म्हणून किती मिपासदस्य स्विकारतील? किंवा किती मिपासदस्य, जाणिवपूर्वक, पत्नी म्हणून किंवा पती म्हणून अशी मुलगी किंवा मुलगा स्विकारतील? असे उगीच, आजच्या काळातले अनैतिक, पण प्रामाणिक प्रश्न मनांत आले.

In reply to by प्रभाकर पेठकर

मला वाटते पेठकरकाका, हे प्रत्येकाच्या मनोवृत्तीवर अवलंबून आहे.ज्यांना मुलाच्या/ मुलीच्या/ जावयाच्या/ सुनेच्या विवाहपूर्व संबंधांशी निगडीत संसार करायचा आहे, ते नाहीच स्वीकारणार. पण जर ज्या क्षणापासून दोन जीव/ कुटुंबे लग्नाच्या बंधनाने एकत्र येतात, त्या क्षणापासून संसार सुरु करायचा हे ज्यांना समजते, त्यांना फारश्या अडचणी येणार नाहीत, आल्याच तरी सोडवतील.

In reply to by यशोधरा

पण यशोधरा, आपल्याकडे मुलाची-मुलीची चौकशी करण्याची पद्धत आजही आहे. जात-पात आजही पाहिली जाते. नवर्‍या मुलाच्या वडीलांची गुंडगिरीची, बेकायदेशीर दारू गाळण्याची, बाई ठेवलेली असण्याचा इतिहास असेल तर अशा घरात मुलगी आजही दिली जात नाही. तसेच आई कजाग आहे की सुस्वभावी आहे, तिच्याच कांही भानगडी कानावर आल्या तर अशा घरातही मुलगी द्यायचे धाडस कोणी करीत नाही हे वास्तव आहे. ज्या क्षणापासून दोन जीव/ कुटुंबे लग्नाच्या बंधनाने एकत्र येतात, त्या क्षणापासून संसार सुरु करायचा हे ज्यांना समजते ते वरील परिस्थितीत विचलीत होत नाहीत? हेच मुलाच्या लग्ना बाबतही असते. मला मान्य आहे की ज्यांना संसार करायचा असतो त्यांचे कॅरेक्टर महत्वाचे तरी पण कुठल्या संस्कारांच्या पार्श्वभूमीवर त्या मुलाचे/मुलीचे संगोपन झाले आहे हे ही पाहिलं जातंच नं. त्यात कांही अयोग्य आहे असेही मला वाटत नाही. गुन्हेगार व्यक्ती (कायद्याने किवा नैतिकतेने) आयुष्यात कधी बदलतच नाही असं मला अजीबात म्हणायचे नाहीये. पण अशा किती टक्के व्यक्ती पुढील आयुष्यात १८० डिग्री कोनात वळतात/वळू शकतात? आपण आपल्या मुलांबाबत अशी जोखिम उचलणार नाही. आता मुलांनी आपल्यासमोर नाईलाजच उभा केला तर आपण कांही करूच शकत नाही म्हणून स्विकारतो. बाकी संधी मिळाल्यास जात, धर्म, सामाजिक पार्श्वभूमी, सुसंस्कृतपणा इ.इ. सर्व पाहूनच लग्न केली जातात. दोन वेगळ्या धर्मांमध्येही लग्न होतात पण ती सहजतेने स्विकारली जात नाही. नाईलाजाने स्विकारली जातात. ज्या क्षणापासून दोन जीव/ कुटुंबे लग्नाच्या बंधनाने एकत्र येतात, त्या क्षणापासून संसार सुरु करायचा हे ज्यांना समजते तेही आपल्या मुलाला/मुलीला पाकिस्तानी जोडीदार स्विकारणार नाहीत. बाकी कोणी १८ वर्षावरील मुलाने मुलीने असा निर्णय घेतलाच तर आई-वडील काय करू शकणार? तरीपण मुलांशी कायमस्वरूपी संबंध तोडल्याच्या घटनाही आपण पाहतोच. त्यामुळे ज्या क्षणापासून दोन जीव/ कुटुंबे लग्नाच्या बंधनाने एकत्र येतात, त्या क्षणापासून संसार सुरु करायचा हे फार क्वचित आचरणात आणलेले दिसून येते बहुतांशी माणसं ही वरील विधान तात्विक दृष्ट्या मान्य करतात पण वास्तवात स्विकारत नाहीत असे माझे निरिक्षण आहे. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकरकाका, तुम्ही सफरचंदे आणि संत्री अशा तुलना करताय. खोटेपणा, गुंडगिरी, दुष्टपणा आणि गरोदरपण/ गर्भपात एकाच पारड्यात? गरोदर असणारी व्यक्ती सुसंस्कृत असू शकणार नाही, असं गृहीतक आहे का? पाकिस्तानी सून वा जावई चालणार नाही पण असं समजून चालू कुठं एखाद्या पाकिस्तानी व्यक्तीमुळे आपल्या मुलाला/ मुलीचे प्राण वाचतात, ते चालेल का? मी extreme उदाहरण घेतलंय पण मुद्दा लक्षात घ्यायला ते चालेल असे वाटते.

In reply to by यशोधरा

यशोधरा माझा प्रतिसाद हा 'ज्या क्षणापासून दोन जीव/ कुटुंबे लग्नाच्या बंधनाने एकत्र येतात, त्या क्षणापासून संसार सुरु करायचा' ह्या विधानाला खोडून काढण्यासाठी आहे. आपण, लग्न होतं त्या क्षणापासून नाही तर पार्श्वभुमीलाही तितकेच महत्त्व देतो. आणि ते रास्तच आहे असे मला वाटते. पैकी काळाच्या ओघात कांही संकल्पना धूसर झाल्या आहेत त्यामुळे शहरात तरी जातपात पाहिली जात नाही. गावाकडे अजूनही सैराट होऊन चालत नाही. पाकिस्तानी उदाहरणातही आपल्यात रोटी व्यवहार होणे शक्य आहे पण बेटी व्यवहार सहसा मान्य होत नाही. एखाद्या पाकिस्तान्यामुळे आपले प्राण वाचले म्हणून आपण लगेच बेटी व्यवहार करणार नाही (आणि तेही करणार नाहीत). सर्वसाधारण परिस्थिती आणि अपवादात्मक परीस्थिती ही वेगवेगळी असते. गेल्या ३५ वर्षात मस्कतमध्ये अनेक पाकिस्तानी आणि अरबी व्यक्तींशी आणि कुटुंबांशी माझा जवळून संपर्क आला आहे. दोन वेळा मी कराचीलाही जाऊन आलो आहे. तिथल्या दुकानदाराशी पाकिस्तानी आणि भारतिय लोकांबद्दल विस्तृत चर्चाही केली आहे. त्या वृद्ध पाकिस्तानी दुकानदाराचे एक वाक्य मला पटले आणि आजही स्मरणात आहे. 'जमीनपार लकिर मारनेसे इन्सान अलग नही होते'. ह्याचा अर्थ भारतिय आणि पाकिस्तानी कौम एकच आहे. हा आदर्शवाद मला भावला. पण जिथे आपण ९२ कुळी आणि ९६ कुळीत फरक करतो किंवा देशस्थ आणि दैवज्ञ मध्ये फरक करतो तिथे भारतिय आणि पाकिस्तानी लग्नसंबंध कसे स्विकारले जातील?

In reply to by प्रभाकर पेठकर

काका :) आपण बदल करणारच नाही म्हणता, मग कोण करणार बदल? आकाशवाणी तर नाही होणार! प्रत्येकानेच ठरवले तरच लहान मोठे बदल होतील ना? आणि पाकिस्तानी व्यक्तीने जीव वाचवला म्हणून लग्न करायचं, असा नाहीये हो! मुद्दा हा होता की पाकिस्तानी व्यक्तीकडून मदत घेतलेली चालू शकते तर कोणी लग्न केल्यास काय बिघडेल? असो. मला जे सांगायचंय ते सांगून झालेय. जमाना बदललाय, बदलतोय. बदलायला हवा.

In reply to by यशोधरा

मी आजच्या परिस्थितीचे वर्णन केले आहे. आपण बदल करणारच नाही म्हणता असे मी कुठे म्हंटले आहे? पाकिस्तानी व्यक्तीकडून मदत घेतलेली चालू शकते तर कोणी लग्न केल्यास काय बिघडेल? पुन्हा तोच मुद्दा उगाळण्यात काय हशील आहे? रोटी व्यवहार आणि बेटी व्यवहार ह्यावर ते भाष्य आहे. मदत घेऊच नये, संबंध ठेवूच नये असे मी कुठेही विधान केलेले नाही. आपला विषय बेटी व्यवहाराबद्द्ल आहे. त्या अनुषंगाने लिहीले आहे. ते वास्तव आहे. पण त्यात बदल होऊच नये, होणारच नाही असे कांही मी म्हंटलेले नाही. मूळ वादातील ज्या क्षणाला लग्न होते त्या क्षणापासून ह्या विषयाकडे पाहण्याचा आदर्शवाद तू मांडला होतास पण वास्तव विपरीत आहे हा माझा मुद्दा आहे. सर्व कुटुंबाची सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेतली जाते. आणि तेही फक्त भारतात नाही तर पाकिस्तानात, अरबस्थानात आणि जगाच्या इतर देशांमध्येही पाहिली जाते. कुठेही दोन टोकाच्या संस्कृतीतील लग्नसंबंध सहजासहजी मान्य होत नाहीत. अपवाद असतीलही पण ते अपवादच असतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकरकाका, तुम्ही सफरचंदे आणि संत्री अशा तुलना करताय. खोटेपणा, गुंडगिरी, दुष्टपणा आणि गरोदरपण/ गर्भपात एकाच पारड्यात? गरोदर असणारी व्यक्ती सुसंस्कृत असू शकणार नाही, असं गृहीतक आहे का? पाकिस्तानी सून वा जावई चालणार नाही पण असं समजून चालू कुठं एखाद्या पाकिस्तानी व्यक्तीमुळे आपल्या मुलाला/ मुलीचे प्राण वाचतात, ते चालेल का? मी extreme उदाहरण घेतलंय पण मुद्दा लक्षात घ्यायला ते चालेल असे वाटते.

In reply to by प्रभाकर पेठकर

माझ्या अपत्याने हिंदू, बौद्ध, जैन, शीख धर्मातील कुणाशीही विवाह केला तरी मला चालेल. पण मुस्लीम किंवा ख्रिस्ती व्यक्तीशी विवाह करण्यास संमती मी देणार नाही. जर दिली, तर आधी त्या व्यक्तीने हिंदू धर्म स्वीकारावा आणि मुले हिंदू असतील याची हमी द्यावी अशी अट घालीन. (माझी संमती विचारलीच नाही तर काय, हा वेगळा मुद्दा.)

In reply to by प्रभाकर पेठकर

विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवणारी मुलगी सुन म्हणून किंवा मुलगा जावई म्हणून किती मिपासदस्य स्विकारतील?
दुसर्‍याच्या मुलामुलींबद्दल सोडा काका. समजा कोणाला आपल्या मुला/मुली बद्दलच असे समजले की त्यांनी लग्नाआधी शरीरसंबंध ठेवले आहेत तर हे प्रामाणीक प्रश्न विचारले जातील का?

In reply to by प्रभाकर पेठकर

विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवणारी मुलगी सुन म्हणून किंवा मुलगा जावई म्हणून किती मिपासदस्य स्विकारतील? किंवा किती मिपासदस्य, जाणिवपूर्वक, पत्नी म्हणून किंवा पती म्हणून अशी मुलगी किंवा मुलगा स्विकारतील? असे उगीच, आजच्या काळातले अनैतिक, पण प्रामाणिक प्रश्न मनांत आले.
अगदी प्रामाणिक प्रश्न आहे काका!! पण अशा मुलीला/मुलाला ट्रीटमेंट देणारा/री डॉक्टर/रीण ते अनुभव चारचौघात मांडत असेल तर त्याच्याकडे/तिच्याकडे किती मिपाकर ट्रीटमेंट घेणं पसंत करतील हाही माझ्या भाबड्या मनाला पडलेला एक प्रश्न आहे.

In reply to by सूड

त्यांनी ओळख लपवली आहे, अशी माहिती तर अनेक लोक अनेक ठिकाणी मांडतात. त्यावरून त्रागा करायची गरज नाही. जोपर्यंत सदर कन्सल्टंट ही माहिती पक्षकाराच्या ओळखीसह मांडत नाही तोपर्यंत मला यात अनैतिक वाटत नाही

In reply to by आनन्दा

त्रागा म्हणालात म्हणून लिहीणं भाग पडलं!! मला कुठेही त्रागा दिसला नाही, आपणास दिसत असल्यास तुम्ही किंवा मी किंवा दोघांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. असो वाचनात आम्ही कमी पडत आहोत असं दिसतंय. इति लेखनसीमा.

In reply to by सूड

पण अशा मुलीला/मुलाला ट्रीटमेंट देणारा/री डॉक्टर/रीण ते अनुभव चारचौघात मांडत असेल तर त्याच्याकडे/तिच्याकडे किती मिपाकर ट्रीटमेंट घेणं पसंत करतील हाही माझ्या भाबड्या मनाला पडलेला एक प्रश्न आहे. सूड राव भाबडेपणाचा आव सोडा न पाहता आकसाने किंवा पूर्वग्रहाने आरोप करत आहात तर तो सिद्ध करून दाखवा हे मी आपल्याला आव्हान देतो. मी लिहिलेल्या या लेखात व्यावसायिक नीतिमत्तेचे कुठे उल्लंघन झाले आहे ते दाखवून द्या. कुणाचे नाव पत्ता किंवा वैयक्तिक माहिती कुणाला उघड झाली आहे ते दाखवा.

In reply to by सुबोध खरे

न पाहता आकसाने किंवा पूर्वग्रहाने आरोप करत आहात तर तो सिद्ध करून दाखवा हे मी आपल्याला आव्हान देतो. मी लिहिलेल्या या लेखात व्यावसायिक नीतिमत्तेचे कुठे उल्लंघन झाले आहे ते दाखवून द्या. कुणाचे नाव पत्ता किंवा वैयक्तिक माहिती कुणाला उघड झाली आहे ते दाखवा.
डॉक्टर ते तुमच्या मित्रासाठी होतं, जो तुम्हाला सांगतो आणि तिसर्‍याला बोलल्याची शक्यता नाकारता येत नाही आणि लहानपणी खेळायचो त्या कानगोष्टींप्रमाणे ही गोष्ट आणखी रंगत चार ठिकाणी पोचली असणार. आकस, पूर्वग्रह म्हणाल तर जसा लेख मला दिसतो तशी प्रतिक्रिया मी लिहीतो. अर्थात तो माझा दृष्टीकोन आहे, त्यामुळे सिद्ध वैगरे करुन दाखवायची इच्छा नाही. धन्यवाद.

In reply to by सूड

त्या कानगोष्टींप्रमाणे ही गोष्ट आणखी रंगत चार ठिकाणी पोचली असणार. यालाच पूर्वग्रह म्हणतात. व्यावसायिक नीतिमत्ता कशाला म्हणतात याचे एक उदाहरण- माझे वडील मुलुंडच्या "विरंगुळा" या वरिष्ठ नागरिकांच्या केंद्राचे सचिव होते. त्या केंद्राचे २५०० सदस्य आहेत. आमचे वडील १९६५ पासून मुलुंड पूर्व मध्ये राहत आहेत. त्यामुळे माझ्याकडे येणाऱ्या वरिष्ठ नागरिकांपैकी निदान निम्म्या लोकांना ते अतिशय चांगले ओळखतात. माझे वडील दवाखान्यात आले असता त्यांचे आपापसात नमस्कार चमत्कार होतात. परंतु आजतागायत मी त्यांना एकाही माणसाची वैद्यकीय माहिती सांगितली नाही आणि सांगतही नाही. त्या रुग्णाने स्वतः वडिलांना सांगितली तर तो त्यांचा प्रश्न आहे. असे असताना आपण कानगोष्टीमुळे ही "गोष्ट आणखी रंगत चार ठिकाणी पोचली असणार" असा गंभीर पण कोणताही ऐकीव अथवा प्रत्यक्ष पुरावा नसताना माझ्या मित्रावर गंभीर आरोप करता आहात. याला पूर्वग्रह म्हणायचे, आकस म्हणायचे कि पूर्ण अज्ञान हे आपणच ठरवा. व्यावसायिक नीतिमत्तेचे उल्लंघन झाले याचा कोणताही स्पष्ट किंवा अस्पष्ट पुरावा आपण दिलेला नाही.

In reply to by सुबोध खरे

आपण कानगोष्टीमुळे ही "गोष्ट आणखी रंगत चार ठिकाणी पोचली असणार" असा गंभीर पण कोणताही ऐकीव अथवा प्रत्यक्ष पुरावा नसताना
हा सबंध लेख!! जरी रंगवून सांगितलं नसेल, नाव बदललं असेल तरी ही गोष्ट मिपावाचकांपर्यंत पोचली.
व्यावसायिक नीतिमत्तेचे उल्लंघन झाले याचा कोणताही स्पष्ट किंवा अस्पष्ट पुरावा आपण दिलेला नाही.
तुम्हीच म्हटलंत ही गोष्ट तुमच्या मित्राने तुम्हाला सांगितली. एका डॉक्टरने दुसर्‍या डॉक्टरला कॉमन पेशंटच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी सांगणे हे व्यावसायिक नीतीमत्तेचे उल्लंघन नसेल तर मी माझे शब्द मागे घेतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवणारी मुलगी सुन म्हणून किंवा मुलगा जावई म्हणून किती मिपासदस्य स्विकारतील? >> ज्याचा त्याचा प्रश्न. बाकी, आजुन सुन वा जावई यायची वेळ आली नसल्याने पास. किंवा किती मिपासदस्य, जाणिवपूर्वक, पत्नी म्हणून किंवा पती म्हणून अशी मुलगी किंवा मुलगा स्विकारतील? >> लग्न ही नवी सुरुवात असल्याने भुतकाळ विसरौनी सुरुवात करावी ह्या मताचा मी आहे. सो ह्याच उत्तर येस असे आहे. अपेक्षा (दोघांकडुनही) ईतकीच की, नंतर विवाहबाह्य फंदात पडु नये ब्वा. (बाकी खुलता कळी सारखं प्रकरण असेल तर नको)

In reply to by प्रभाकर पेठकर

विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवणारी मुलगी सुन म्हणून किंवा मुलगा जावई म्हणून किती मिपासदस्य स्विकारतील?
मुळात हा सासू सासर्‍यांचा प्रश्न आहे काय? हा लग्न करणार्‍या जोडप्याचा प्रश्न आहे?

हा जो कोणी तथाकथित मित्राच्या मित्राचा मुलगा (मला हे लिहीताना चिऊचा काऊ तो माझा मामेभाऊ आठवलं!! =)) असो.) आहे तो एखादीच्या गर्भपाताला कारणीभूत झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात तुमचा मित्र कसा जुन्या विचारांचा होता आणि तुम्ही त्याला "पार्थास दाविले ते विश्वरुप" कसे दावलेत ते लिहीलेच आहे, त्यामुळे असले प्रश्न येत नाहीत. पुभाप्र.

In reply to by सूड

अर्थात तुमचा मित्र कसा जुन्या विचारांचा होता आणि तुम्ही त्याला "पार्थास दाविले ते विश्वरुप" कसे दावलेत ते लिहीलेच आहे, मानभावीपणा समजला. लेखाचा खोल अर्थ समजता आला नसेल तर जाऊ द्या. एखाद्या माणसाच्या परिस्थितीत तुम्हाला बदल घडवता आला नाही तर निदान त्याच्या वेदनेवर फुंकर घालायचा प्रयत्नाला तुम्ही विश्वरूप दर्शन म्हणता आहात. धन्यवाद.

साधारण 2 वर्षापूर्वी मी माझ्या एका मैत्रीणीविषयी एक पोस्ट लिहीली होती तिच्या आई वडीलांंचा घटस्फोट झालेला असल्याने तिच लग्न ठरत नाहीये त्यावेळी बहुतेक प्रतिसादांंचा सूर हा होता की लग्न ठरवताना मुलीची कौटुबिक पार्श्वभूमी अशी असताना नकार येत असेल तर त्यात काही अयोग्य नाही ,घटस्फोटीत आई वडीलाच्या मूलीशी लग्न करण्याची रिस्क कोण घेईल ? म्हणजे थोडक्यात काय वरवर सगळ चांंगलंं असल पाहीजे बास मग लग्नाआधी प्रेग्नंंट राहून गर्भपात केलेली मुलगी लग्नाला उभी राहते कारण तिच खानदान चांंगलंं आहे पण दुसरीकडे एक मुलगी लग्नासाठी अयोग्य ठरते कारण ती घटस्फोटीत आई बापाची मुलगी आहे ......

In reply to by _मनश्री_

साधारण 2 वर्षापूर्वी मी माझ्या एका मैत्रीणीविषयी एक पोस्ट लिहीली होती तिच्या आई वडीलांंचा घटस्फोट झालेला असल्याने तिच लग्न ठरत नाहीये त्यावेळी बहुतेक प्रतिसादांंचा सूर हा होता की लग्न ठरवताना मुलीची कौटुबिक पार्श्वभूमी अशी असताना नकार येत असेल तर त्यात काही अयोग्य नाही ,घटस्फोटीत आई वडीलाच्या मूलीशी लग्न करण्याची रिस्क कोण घेईल ? म्हणजे थोडक्यात काय वरवर सगळ चांंगलंं असल पाहीजे बास मग लग्नाआधी प्रेग्नंंट राहून गर्भपात केलेली मुलगी लग्नाला उभी राहते कारण तिच खानदान चांंगलंं आहे पण दुसरीकडे एक मुलगी लग्नासाठी अयोग्य ठरते कारण ती घटस्फोटीत आई बापाची मुलगी आहे ......


बाकी खरेकाका तुम्च्या मित्राचा "तो" मित्र जर पिपावर असेल तर मात्र काही खरे नाही. :)

In reply to by आनन्दा

खरेन्च्या मित्राचा मुलगा मिपावर असल्यास आणि तो खरेंना ओळखत असल्यास (त्यांच्या दॉ. मित्राचा मित्र म्हणून) तर जास्त डेन्जर आहे..

आजकाल मनात येणार्‍या भावनाही किंवा लागलेली टोचणीही मिपावर मनापासुन मांडु शकत नाही असच वाट्टय. घडलेल्या गोष्टी आपल्या विचाराप्रमाणे किंवा कलाने घडायला हव्या होत्या किंवा हव्यात हा अट्टाहास कशाला ? (हे म्हणजे असं झाल, लेख/कविता चांगला/ली आहे अजुन फुलवता आला असता/ती......ज्याने लिहीलाय त्याला योग्य वाटला म्हणुन तसा लिहीला त्यात मला वाट्ट्य म्हणुन कशाला फुलवायचा......भेंडी). एका पिढीचे अंतर विचारात घ्यावे लोकांनी.

एक रूपालीच्या पिढीची प्रतिनिधी म्हणून सांगते. १.लग्नाआधी दुसर्‍या मुलीशी संबंध असले, म्हणून माझ्या समोरच्या मुलाला मी स्वतः जज करणार नाही. त्याने मला प्रामाणिकपणे सर्व सांगितलं असेल, तर काय हरकत आहे? पण मी स्वतःच्या आई-बाबांना हे सगळं सांगणार नाही. कारण तो आम्हा दोघांमधला पर्सनल मॅटर असेल. त्याच्या आई-बाबांनाही माहिती नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. मागच्या पिढीला हे पचवणं कठीण जात असेल हाही मुद्दा आहेच. मग या वरच्या उदाहरणात असंच काही झालं नसेल कशावरून? तिने तिच्या नवर्‍याला विश्वासात घेतले नसेल कशावरून? फक्त ती मुलगी होती आणि तिने गर्भपात केला म्हणून आक्षेप आहे का? २.जास्त पैसे कमावणारा मुलगा पाहिजे असं तिचं वैयक्तिक मत असेल, तर मला त्यात काही गैर वाटत नाही. जर ही तिची अपेक्षा असेल तर लग्न ठरवताना तिने ते स्पष्ट सांगितलेही असेल. अशा गोष्टी स्पष्ट आणि राजरोस बोलल्या जातातच आणि त्यात जुन्या पिढीला भरपूर इंटरेस्ट असतो. त्यामुळे इथेही काही फसवणुकीचा भाग नाही. ३. त्या मुलीने त्या प्रियकरासोबत संबंध तोडले असंही तुम्ही नमूद केलंय. म्हणजे लग्न करून ती नंतर काही फसवणूक करतेय अशातला भाग नाही. मग नक्की फसवणूक कसली वाटतेय?

In reply to by पिशी अबोली

जनरेशन गॅप आहे हो.. पण राहून राहून एक प्रश्न मनात येतो - जर एखाद्या मुलाने अश्या प्रकारे गर्भधारणा झाल्यावर तिला गर्भपात करायला लावला तर त्या मुलाला तुम्ही काय म्हणाल? इथे तुम्ही म्हणजे केवळ तुम्ही नव्हे तर इन जनरल लोक काय म्हणतील असा प्रश्न आहे.

प्रतिक्रिया अपेक्षित लायनीने आल्यात. लेख वाचला तेव्हा एक जाणवले की
सुनेच्या दृष्टीत त्याला न बोलून तिरस्कार दिसतो आणि सासू सारखी म्हणत होती "भावजी तुमचं लक्ष कुठाय" गेले नाही तर एक चांगला मित्र गमावण्याची शक्यता किंवा गेलो तर आपले "स्वागत" तेथे "नाही आले तर बरे"असे होणार हि बोच अशा शृंगापत्तीत तो आहे.
हा डॉ खरे यांच्या मित्राचा प्रॉब्लेम आहे. माझा असा समज झाला की ती मुलगी जर खरेंच्या मित्राशी घरी आल्यावर व्यवस्थित वागली असती तर त्याला या सगळ्याचे एवढे टेन्शन झाले नसते. त्यानी त्या सुनेला किंवा तिच्या नवर्‍याला किंवा तिच्या प्रियकराला नीतिमत्तेबद्दल प्रवचन दिल्याचे कुठे दिसले नाही. दोन्ही डॉक्टरांच्या वयानुरुप त्यानी आपली मते लेखात आणि प्रतिक्रियातून व्यक्त केली आहेत. ते ठीक आहे. नाहीतर लेख टाकून पळून गेले म्हणायलाही लोक तयार असतात. मात्र डॉक्टरांच्या मित्राच्या ज्या प्रॉब्लेमबद्दल त्यानी लिहिले आहे त्याबद्दल ६०/६५ पैकी फक्त २/३ प्रतिक्रियांमधे थोडीफार चर्चा झाली आहे! =))

In reply to by पैसा

हे ठीक वाटतय. जर मुलीने सर्व बोलून नवर्‍याला विश्वासात घेतले असेल तर डॉक्टरना बघितल्यावर तिरस्कार करण्याची गरज नाही. तितक्याच आश्वासकपणे 'आमचं आम्ही जमवलय' हे डॉक्टरनाही सांगायला हरकत नाही. आणि जर डॉक्टर सांगतील या भितीने तिरस्कार असेल, तर डॉक्टरना लागलेली फसवणूक माहिती असल्याची टोचणीदेखिल रास्तच असेल.

In reply to by पैसा

सुनेच्या दृष्टीत त्याला न बोलून तिरस्कार दिसतो..... गेले नाही तर एक चांगला मित्र गमावण्याची शक्यता किंवा गेलो तर आपले "स्वागत" तेथे "नाही आले तर बरे"असे होणार हि बोच अशा शृंगापत्तीत तो आहे. ती मुलगी जर खरेंच्या मित्राशी घरी आल्यावर व्यवस्थित वागली असती तर त्याला या सगळ्याचे एवढे टेन्शन झाले नसते. ती व्यवस्थित वागत नाही कारण डॉक्टरांच्या मित्राच्या येण्याने आपले गुपीत उघड होण्याची भिती तिला वाटते आहे, असे मला वाटते. जर हेच कारण असेल तर तिने नवर्‍यापासून 'ती' घटना लपवून ठेवलेली आहे हे उघड आहे. त्यामुळे फसवणूकीचा मुद्दाच सिद्ध होतो. जर दोघांमध्ये ह्या विषयावर चर्चा होऊन 'आपण लग्न केल्यापासून आपला एकमेकांशी संबंध आहे गत आयुष्याशी आपला संबंध नाही' असे स्विकारलेले असेल तर डॉक्टरांच्या मित्राच्या येण्याने ती अस्वस्थ होणार नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

कदाचित सूनेला पूर्वीचे सगळे विसरायचे असावे. जे पूर्वी घडले त्याबद्दल अपराधीपणाची भावना असणेही शक्य आहे. बोल्डनेसच्या कल्पनांच्या नादात बऱ्याच वेळेस अशा चुका झाल्यावर मुलीं बदलतात. लग्न हा खरोखरच मुलीचा पुनर्जन्म असतो. पूर्वीचे सर्व विसरून नव्याने सर्व सुरवात करायची इच्छा असू शकते. डॉ. बद्दल राग नसला तरी ते उपस्थीत नसले तर बरे झाले असते असे वाटत असावे. तीच नापसंती डॉ. चे मन मोठी करून त्याला ते तिरस्कार समजताहेत. असेच असेल असे काही मला म्हणायचे नाही. फक्त माझे मत मांडले. जर असे काही असेल असे वाटत असेल तरच.... मी येऊ नये असे वाटते का हे डॉ. नी सुनेशी स्पष्ट बोलून विचारले पाहिजे. तसेच तिने येऊ नका असे स्पष्ट शब्दात सांगितले तर तसे करणे शक्य होणार नाही. उलट त्यामुळे घरातील सगळ्यांच्या मनात संशय निर्माण होण्याची भिती आहे हेही स्पष्ट केले पाहिजे. जव्हेरगंज स्टाईल ऑन (म्हणजे लग्न झाल्यापासून डॉ. घरी येण्याचे टाळताहेत. वगैरे वगैरे. ते तर गायकॉनॉलॉजिस्ट आहेत. वगैरे वगैरे. सूनबाई पेशंट होती का? वगैरे वगैरे.) जव्हेरगंज मोड ऑफ

In reply to by पैसा

अच्छा, ले केवळ डॉ खऱयांच्या डॉ मित्राच्या परसेप्शनबद्दलय होय! म्हणजे त्या मुलीच्या नजरेत तिरस्कार वगैरे नसण्याचीही शक्यता गृहीत धरायची का?

In reply to by उडन खटोला

ते लिहायचं कसं ते पण सांगा राव. मी चोप्य पस्ते केल तरी श्रीखंडातला श्र येतोय... :) तस्मात तुर्तास आमच्यासमोरील श्रुंगापत्ती ही आहे.. - श

तुमच्या मित्राच्या दृष्टिकोनातून, तो नकळत काही अप्रिय गोष्टींचा साक्षीदार झाला आहे. ज्यावेळी हि गोष्ट समजली त्यावेळेस लग्न थांबवणे त्याला अथवा सर्वानाच जमलं असतं असं नाही. कालाय तस्मे नमः म्हणून नव्या पिढीच्या गोष्टी सोडून द्याव्यात. घडायच्या त्या घटना घडून गेल्या म्हणून विचार करणे थांबवावे. मित्राचे महत्व जाणून आहेत तर आपल्या मैत्रीकडे लक्ष द्यावे.

काही लोकांचे प्रतिसाद आकसाने दिलेले आहेत किंवा स्कोअर सेटल करण्यासाठी आहेत असे वाटते. असो माझा स्त्रीरोग तज्ञ मित्र मराठी नाही तर गुजराती आहे आणि त्याचा मित्र कोणत्या प्रांतातील( मराठी गुजराती कि सिंधी इ) आहे हे मला माहित नाही किंवा मी त्याला पाहिलेला नाही. मला स्त्रीरोग तज्ञ मित्राने "जसे सांगितले तसेच लिहिलेले" आहे. यात "कोणाचेही नाव घेतलेले नाही" तेंव्हा यात "वैयक्तिक किंवा व्यवसायिक गोपनीयतेचा" कोणताही भंग होत नाही. लग्ना आधी गरोदर राहणाऱ्या मुली आम्ही (क्षकिरण तज्ञ आणि स्त्रीरोग तज्ञ) वर्षानुवर्षे पाहत आलो आहोत. गणेशोत्सव आणि गरबा या कालावधीत यात बऱ्याच प्रमाणात वाढ होते. तेंव्हा त्याबद्दल दोघांना अप्रूप किंवा वाईट वाटण्याचे काही कारण नाही. आम्ही समाजसुधारक नाही जे आहे जसे आहे तसे स्वीकारायचे हे व्यवसायात शिकवले जाते आणि कोणालाही एक रुग्ण/ व्यक्ती म्हणूनच वागणूक द्यायची असते. रुपाली जोवर तृतीय व्यक्ती होती तोवर तिच्याबद्दल बरे किंवा वाईट वाटण्याचे कारण नाहीच. पण जेंव्हा ती मित्राची सून म्हणून समोर आली तेंव्हा हा चमकला हि नैसर्गिक प्रतिक्रिया होती. नंतरही जे त्याला वाटले( रुपालीच्या डोळ्यात तिरस्कार) आणि त्याने मला जे सांगितले ते तसेच लिहिले आहे. त्याला काय वाटले हे त्याने बोलून दाखविले. ते बरोबर कि चूक हि कोणतीच टिप्पणी मी देऊ शकत नाही. रुपालीने काय करायला हवे होते कि नव्हते हे सांगणारा मी कोण? मी जजमेंटल झालो किंवा या धाग्याचे प्रयोजन काय हा विषय ज्याने त्याने आपल्या कुवतीप्रमाणे ठरवायचा आहे.

In reply to by सुबोध खरे

कमॉन डॉक्टर! कोणीही तुमच्या विचारांच्या विरुद्ध काही लिहिले की तुम्हाला त्यात आकस कसा दिसतो हो? जवळ जवळ दर वेळी तुम्हाला असेच म्हणताना बघते.. आश्चर्य वाटते..

In reply to by सुबोध खरे

1. काही लोकांचे प्रतिसाद आकसाने दिलेले आहेत किंवा स्कोअर सेटल करण्यासाठी आहेत असे वाटते. 2. मी जजमेंटल झालो किंवा या धाग्याचे प्रयोजन काय हा विषय ज्याने त्याने आपल्या कुवतीप्रमाणे ठरवायचा आहे.
This is not digestible, doc. Not worth reading YOU. Excuse me for writing in English, Marathi Keyboard not accessible.

अतिशय विलक्षण घटना. वैयक्तिक संबंध आणि व्यावसायिक संबंध हे परस्परविरोधी कसे असू शकतात याचं उत्तम उदाहरण. शक्ती या हिंदी सिनेमातही बापाची वर्दी आणि त्याचं बाप असणं यांचा संघर्ष दाखवला आहे. सर्वप्रथम तुमच्या मित्राचं अभिनंदन. त्याने आपली व्यावसायिक निष्ठा पुरेपूर पाळलेली आहे. त्यापोटी त्याला मानसिक घालमेलही सोसावी लागलेली आहे. मात्र लेखातल्या काही गोष्टी खटकल्या.
एकीकडे रुग्णांच्या गोपनीयतेची शपथ घेतलेली, दुसरीकडे मित्राला फसवले गेल्याची भावना
फसवलं जाणं हा फारच लोडेड शब्दप्रयोग आहे. जणू काही सर्व लग्नांच्या बाबतीत स्त्रीची योनिशुचिता ही वचन देऊन लग्नाच्या पदराबरोबर बांधलेली असते. आणि आधी गर्भपात झाला आहे म्हणजे काहीतरी 'डिफेक्टिव्ह माल' मिळाला आहे! गंमत म्हणजे तुमच्या मित्राने हा व्यवसाय स्वीकारला तेव्हा असले अनेक डिफेक्टिव्ह माल सुधारून देण्याचं कंत्राट घेतलं. त्यातून पैसे मिळवले, चरितार्थही चालवला. इतर तरुणींनाही त्याने गर्भपाताची औषधं दिली असतील तर यात काहीच अनैतिक नाही, हे त्याने मान्य केलेलं आहे. जर त्याला ही फसवणूक वाटत असेल तर अशी फसवणूक करून देण्यात त्यानेच हातभार लावलेला आहे. मग आता हे उमाळे का? म्हणजे हा धंदा गैर नाही म्हणून करायचा आणि पैसे मिळवायचे, आणि तरीही मूल्यं जपायची भावना ठेवायची हे एकाच वेळी केक खाणं आणि ठेवणं आहे. 'ही मुलगी माझ्याकडे काविळीचा रोग घेऊन आली होती, तिला मी बरी केली. पण हे तिच्या सासऱ्याला मी सांगू शकत नाही.' या परिस्थितीत जितकी बोच असावी तितकीच तुमच्या मित्राने ठेवावी.

In reply to by राजेश घासकडवी

सर्वप्रथम तुमच्या मित्राचं अभिनंदन. त्याने आपली व्यावसायिक निष्ठा पुरेपूर पाळलेली आहे.
असहमत आहे. लग्नाला गेल्यानंतर तिथे रूपाली भेटल्याची गोष्ट डॉ खर्‍यांना सांगायचं काही कारण नव्हतं. विशेषतः डॉ खरे रूपालीला ओळखत असताना ही घटना सांगणं चूक होतं.

In reply to by आदूबाळ

ओह, रुपालीला डॉक्टर खरे ओळखतात ही गोष्ट माझ्या ध्यानात आली नव्हती. तरीही डॉक्टर पेशंट प्रीव्हिलेज जर दोन्ही डॉक्टरांना लागू असेल तर त्यात नक्की काय हरकत आहे? केस स्टडीजबद्दल एकमेकांशी बोलणं अयोग्य आहे का? इथे मला एक तांत्रिक खुसपट दिसतं - ते म्हणजे खरेंचा मित्र खरेंकडे सायकिअॅट्रिस्ट म्हणून पाहात असेल तर सगळंच कोशर आहे.

In reply to by राजेश घासकडवी

म्हणजे हैसियत मामला म्हणा की, एक डॉक्टरकी हैसियतसे नही तो एक दोस्त की हैसियत से वगैरे. आदुबाळा तर प्रोफेशनल हैसियत सगळ्यात अव्वल म्हणतोय.

In reply to by अभ्या..

एकदम करेक्ट. हैसियतचा मामला. ... आणि प्रोफेशनल हैसियत सगळ्यात अव्वल असायलाच पाहिजे. बिकॉज दॅट डिफाईन्स यू अ‍ॅज अ प्रोफेशनल. बाकी डिग्र्या आणि सर्टिफिकिटांना अर्थ नसतो. त्याशिवाय त्या प्रोफेशनचा सभासद म्हणवून घेण्याची पात्रता नसावी. हे आपण काय विकतो त्याच्याशी संबंधित आहे. उदा० एखादा वकील फक्त कायद्याचं ज्ञान विकत नसून तो आपल्या अशिलाने दिलेल्या माहितीची गोपनीयता राहील हा विश्वासही विकत असतो. चितळे बंधू बाकरवडीचा दर्जा विकतात. उद्या दुकान बंद केल्यानंतर काका हलवाई बरोबर गलासभर बियर मारता मारता दुकानात आलेल्या जाड्या माणसाचा किस्सा सांगितला तर त्याचा प्रोफेशनल एथिक्सशी संबंध नाही. पण आपल्या अशिलाबद्दल एखादा वकील आपल्या दुसर्‍या वकील मित्राशी गॉसिप करायला लागला तर त्याचा जरूर संबंध आहे.

In reply to by आदूबाळ

गॉसिप एकाच केस दोन वकील हाताळत असतील तर त्यांच्यात केस बद्दल विचार विनिमय किंवा विचारांची देवाण घेवाण झालेली पण आपल्याला अमान्य आहे का? यात एका वकिलाला माहित नसलेली गोष्ट दुसऱ्या वकिलाला त्याने सांगितले तर लगेच गॉसिप. हां, त्या दुसऱ्या वकिलाचा त्या केसही संबंध नसेल तर गोष्ट वेगळी आहे.

In reply to by सुबोध खरे

राईट. सिनारियो बघू. व्यावसायिक नीतिमत्तेचं पालन झालेला सिनारियो: [मूळ लेखातून सुरू] रुपाली पाटील* ( नाव बदललेले आहे) ... आणि सर्व आलबेल झालं. [मूळ लेखातून समाप्त] इथे स्त्रीरोगतज्ञ मित्र आणि डॉ खरे यांच्यातला व्यावसायिक संबंध - या केसपुरता - संपला. पुढची घटना घडली आणि "एकीकडे रुग्णांच्या गोपनीयतेची शपथ घेतलेली, दुसरीकडे मित्राला फसवले गेल्याची भावना या दोलायमान परिस्थितीत चार दिवस त्याने अस्वस्थतेत घालवले" ही परिस्थिती आली. आपला मित्र डॉ खरे - जो या केसशी आधी रेडियॉलॉजिस्ट म्हणून संबंधित होता - त्याच्याकडे मन मोकळं करावं असं त्या मित्राच्या मनात आलं. पण मग त्या मित्राच्या लक्षात आलं, की आपली मनस्थिती, आपली दोलायमान परिस्थिती याचा रुपालीच्या वैद्यकीय फॅक्ट्सशी काहीच संबंध नाही. याचाच अर्थ, ही घटना डॉ खर्‍यांना सांगायचं कोणतंही वैद्यकीय (व्यावसायिक) कारण आपल्याकडे नाही. या परिस्थितीत आपण डॉ खर्‍यांना ही घटना सांगितली, तर हा व्यावसायिक नीतिमत्तेचा भंग होईल. तस्मात आपण सांगितली नाही पाहिजे. ___________________________ हे घडलं का? ही घटना डॉ खर्‍यांना सांगितली जाण्याचं कारण ते डॉक्टर आहेत हे नसून ते मित्र आहेत हे आहे. डॉ खरे रेडियोलॉजिस्ट असण्याऐवजी इस्त्रीवाले असते तरी मित्र या नात्याने ही घटना सांगितली गेली असतीच. ___________________________ तुमच्या प्रश्नाचं उत्तरः एकाच केस दोन वकील हाताळत असतील तर त्यांच्यात केस बद्दल विचार विनिमय किंवा विचारांची देवाण घेवाण अर्थातच मान्य आहे. पण त्या विचारविनिमय / देवाणघेवाण / माहितीचा संबंध (रिलेव्हन्स) "केस इन हँड" शी असावा. इन्कम टॅक्सची केस, आणि वकील अ वकील ब ला आपल्या अशिलाचा नवरा कसा बाहेरख्याली आहे हे सांगत असेल तर ते नक्कीच गॉसिप.

In reply to by सुबोध खरे

खरेसाहेब, मला तुमच्याविषयी अतीव आदर आहे. मिपावर "reasonable people" हा जो गट आहे त्यात तुमचं नाव वरच्या पाच नंबरांत असेल. त्याच नात्याने माझ्या मताचा उलगडा केला. तुमच्याकडून "ब्वॉर" या प्रतिसादाची अपेक्षा नव्हती. मी चुकत असेन (आणि ती शक्यता बरीच आहे) तर मला हक्काने उलगडून सांगा. माझी चूक मान्य करायला आणि सॉरी म्हणायला मला कधीच किंचितही लाज वाटलेली नाही. असो.

In reply to by मोदक

=))

In reply to by आदूबाळ

आदू बाळ साहेब आपण पहिल्या प्रतिसादापासून व्यायसायिक नीतिमत्तेबद्दल बोलत आहात. मुलगी लग्न गरोदर झाली हि गोष्ट चूक आहे कि तिने मित्राच्या मुलाबरोबर लग्न केले हि चूक झाली? पहिली गोष्ट तर मला माहित होतीच दुसरी गोष्ट त्यांनी कधीही कोण मित्र ते नाव न सांगता फक्त मला सांगितली. त्यांच्या स्वतः च्या विचारसरणी प्रमाणे विवाह पूर्व संबंध हे त्यांना अमान्य असावेत. यामुळे ते अपसेट झाले आणि त्यांनी मला त्याबद्दल फोन केला मी त्यांचे सांत्वन केले इतकी साधी सरळ गोष्ट असताना यात व्यावसायिक नीतीचा भंग कसा होतो हे समजत नाही. त्यांनी मला तिचे माझ्या मित्राच्या मुलाबरोबर लग्न झाले एवढीच माहिती दिली. तिचे लग्न होणारच होते आणि मला जर रुपालीची पुढची माहिती काढायचीच असेल तर ती मला सरकारी दप्तरात मिळणार नाही का? तुम्ही एवढे व्यावसायिक नीतीमत्तेबद्दल डांगोरा का पिटत आहेत ते समजले नाही. त्याचा भंग कसा होतो हे तुम्ही स्पष्टपणे सांगू शकत नाही. आणि शेवटी "पण मग त्या मित्राच्या लक्षात आलं, की आपली मनस्थिती, आपली दोलायमान परिस्थिती याचा रुपालीच्या वैद्यकीय फॅक्ट्सशी काहीच संबंध नाही" असे लिहिता. मित्राच्या दोलायमान परिस्थिती मूळच जर रुपालीचा गर्भपात आहे, जी गोष्ट मला नक्कीच माहित आहे. कारण गरोदर असताना आणि गर्भपात झाल्यावर मी तिची सोनोग्राफी केली आहे तर त्या दोन्हीचा संबंध नाही असे तुम्ही कसे म्हणू शकता? म्हणून मग वितंडवाद घाला ऐवजी मी "बरं" म्हणून सोडून दिले.

In reply to by सुबोध खरे

मी डॉक्टरच्या professional ethics बद्दल बोलतो आहे. तुमच्या मित्राने त्यांच्या नितीमूल्यांप्रमाणे अपसेट होणं स्वाभाविक आहे. पण त्यांनी तुम्हाला ही गोष्ट non-professional capacity मध्ये सांगायला नको होती - कारण ते professional ethics ची पायमल्ली करणारं आहे असं मी म्हणतो आहे. प्रत्येक व्यावसायिकासमोर त्याच्या व्यवसायिक capacityमध्ये अनेक अनैतिक गोष्टी येत असतात. (अनैतिक - बेकायदेशीर नव्हे.) नीतिमत्ता अंडरवेअरसारखी असते - प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न. जे पेशंटसाठी नैतिक ते डॉक्टरसाठी अनैतिक असू शकतं. डॉक्टरला एखादी गोष्ट अनैतिक वाटते म्हणून त्याने ती गावभर publicise करू नये. किंबहुना आपल्या चड्डीदोस्तालाही सांगू नये. अर्थात - तुम्हाला तुमच्या मित्राने फोन करून रूपालीचं लग्न आपल्या मित्राच्या मुलाशी झाल्याचं सांगणे यात काही गैर आहे असं वाटत नसेल तर माझा मुद्दा निव्वळ अरण्यरुदन समजा.

आणि थोडी Empathy असू द्यात लोकहो, नुस्तीच Sympathy नको. अशी परिस्थिती कुणाच्याही मुलीवर येऊ शकते. // ...( रुपालीच्या डोळ्यात तिरस्कार)... // नक्की तिरस्कार आहे की "Feeling of awkwardness" आहे ? तुमच्या मित्राने मुलीला तसं काहीही जाणवुन दिलं नाही म्हणजे झालं. Anyway, खरे काकांनी सर्व वाचकांवर सोडले आहे, तेव्हा आण़खीन चर्चेत कोणालाही रस नसावा. -श

रुपालीने काय करावं हा तिचा प्रश्न आहे. काही मत व्यक्त करण्या इतपत मुळातच माहिती आपल्या हातात नाही. पण तुमच्या मित्राची परिस्थिती समजु शकते. मागच्या पिढीच्या लोकांना काही गोष्टी पचवायला जड जातातच. पण मुळात तुमच्या हातात कधी काही कंट्रोल नसतोच, तेव्हा उगाच हळहळ करण्यात काय हशील? वर अनेकांनी म्हणल्याप्रमाणे मुलीने मुलाला आधीच सगळे नीट सांगितले असेलही. तेव्हा कुणी फसवलं गेलं असेलच असंही नाही. तेव्हा तुमच्या मित्राला काहीच विचार करण्याची गरज नाही. त्या मुलीच्या नजरेत तिरस्कार किंवा आणखी काही दिसत असेलही.. पण कदाचित त्या मुलीलाही तुमच्या मित्राच्या डोळ्यात तिरस्कार दिसत असेल.. मला वाटतं झाल्या प्रकरणाची ओळखही न दाखवुन मित्राला नेहमीसारखे भेटत रहाणे हेच सर्वांसाठी उत्तम असेल. आणि खरंच.. शृंगापत्ती म्हणजे काय? (ती शिंगे अडकल्याची एक गोष्ट आहे... तिच्याशी काही निगडीत आहे का?)

पटला नाही. १ . रुपालीने लgnaa आधी काय करायचे , हा तिचा प्र्श्न आहे. २. मेडिकल एथिक्स नुसार हे डॉक्टरला उघड न करण्याचे बंधन आहे. जर नॉन डिस्क्लोजरमुळे समोरच्या व्यक्तीला धोका असेल तरच डॉक्टर उघड करु शकतो. उदा. एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्ती स्टेटस दडवुन निगेटिव्ह व्यक्तीशी लग्न करत असेल तर डॉक्टर त्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी माहिती उघड करु शकतो. पण अ‍ॅबॉशन चा इतिहास असणे यात असे काही नसल्याने अशी माहिती उघड केल्यास डॉक्टरच गुन्हेगार ठरेल.