मला आवडलेला शायर- राहत इंदोरी
रात्रीचा एक वाजला होता दिल्लीच्या जीयासराय मधील अष्टशीला निवासाच्या २ऱ्या तळावरील चवथ्या रूममध्ये मी, माझा रूम पार्टनर संतोष, आणि दोन ‘शेजारी’- बाजूचे ‘प्रधानजी’ आणि वरच्या रूममधला संदीप असे तिघे चकाट्या पिटत होतो (संतोष फक्त ऐकायचा).प्रधानजींनी संदीपची काहीतरी चिमटी काढली आणि संदीपने सहज उत्स्फूर्त आवाजात हे म्हणन सुरु केलं-
उसकी कत्थई आंखो मे है जंतर-मंतर सब,
चाकू-वाकू छुरीया-वूरीया खंजर-वंजर सब
जबसे तुम रुठी हो मुझसे रुठे रुठे से राहते है,
तकिया-वकीया चादर-वादर बिस्तर-विस्तर सब
मै कब डूबुंगा फिक्र किया करते है,
कश्ती-वश्ती, दर्या-वर्या लंगर-वंगर सब...
“वा वाह!!.....गजब” -मी
“जियो क्या बात है!”-प्रधानजी
भुवया उडवत संदीप जग जिंकल्याप्रमाणे खुश होत आमच्याकडे तिरप्या नजरेनं बघत-
“बस कुछ दिनो पेहलेही लिखी है”
“अर्रे वाह मजा आ गया, बहुत ही बढीया लिखा है”- मी अतिशय प्रभवित झालो होतो.
“सच मे बहुत हुनर है तुम मे....बहुत आगे जाओगे...इस सदी के श्रेष्ठ कावियो मे तुम्हारी गिनती होगी.....”- प्रधानजी
पुन्हा काही आह-वाह होत ती मैफिल संपन्न झाली, पण माझं मन मात्र त्या ‘कत्थई डोळ्या’तंन बाहेर नाही निघालं.
दोन दिवसांनी प्रधानजींना मी त्या कविते बद्दल विचारलं तेव्हा प्रधानजी काहीसे खेकसत-
“अर्रे काहे का कवी और काहे की कविता !.....इधर उधार से ढांप के लाता है वो..और अपनी बताकर सुनता है...आदत ही है उसकी...असली कविता तो किसी राहत इंदौरी की है”
“राहत इंदौरी!?...और ये आप को पता था?” कपाळावर आठ्या आणि डोळे बारीक करत मी म्हणालो.
“और नाही तो क्या?...आप भी ना..” पुढील अर्धे वाक्य न बोलता प्रधानजींच्या चेहऱ्यावरील भावांनी पूर्ण केले. मला माझ्या अज्ञानाची जाणीव करून देऊन ते दिव्यध्यान प्रधानजी पाताळात निघून गेले (जिना उतरून खाली चहा पिण्यासाठी गेले). त्याच संध्याकाळी ‘संदीपची डायरी’ उचलून आणली (त्याला न सांगता). बरच काही लिहून होते पण ते न वाचता फक्त ‘राहत’ वाचू लागलो मनाला स्पर्श करून जाणारी शायरी वाचण्याचा आनंद काही वेगळाच. गालिबची शायरी वाचली होती तेव्हा थोडी समजली थोडी समजावून घेतली, ‘बशीर बद्र’चे ‘कल्चर यकसा’ वाचले होते ते समजण्यास सहज वाटले, आता राहत इंदोरी वाचत होतो समजत होतो, जवळ जवळ डोळ्यांसमोर गझल ‘घडून’ राहिली होती-
दोस्ती जब किसी से की जाये,
दुष्मनो की भी राय ली जाये
इसी सोच मे हु डूबा हुआ,
यह नदी कैसे पार की जाये
मनातील भावना गझल मधे व्यक्त करतांना शायर फक्त स्वतःचीच भावना व्यक्त करत नाही तर ती भावना कधी ना कधी कुठे ना कुठे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनानुभवातील एक असते, बहुधा ज्यांनी ती अनुभवली असेल त्यांना त्या शेर/गझल चा भाव अधिक जवळचा वाटतो. कधी गझल मधला एखादा शेर सहजच आपल्याला आपल्या भवतालच्या परिस्थितीची जाणीव करून देतो-
अंधेरे चारों तरफ सांय-सांय करने लगे
चिराग हाथ उठाकर दुआए करने लगे,
तरक्की कर गए बीमारियों के सौदागर
ये सब मरीज है जो अब दवाए करने लगे,
झुलस रहे है यहा छांव बाटने वाले
वो धूप है कि शजर इलतिजाए करने लगे,
(शजर- वृक्ष)
राहतजींची सध्या सोप्या भाषेतली रचना वाचतांना माहित होते की रोजच्या बोलचालीतल्या वाक्यांमधेही गझल असते, फक्त त्या वाक्यांना व्यवस्थित मांडावे लागते.-
लोग हर मोड पे रुक-रुक के संभलते क्यो है,
इतना डरते है तो फिर घर से निकलते क्यो है
मोड होता है जवानी का संभलने के लिए,
और सब लोग यही आके फिसलते क्यो है
-सांभाळूनच चालावं लागतं नाही तर अपघात व्हायची शक्यता असते आणि तरुण वयात ‘अपघात’ होतात, प्रेमभंग होतो, मनातल्या काही इच्छा अपूर्णच राहून जातात. कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी विसरल्या जात नाही जणू काही शेतातली पाखरं, कितीही उडवा परत पिकांवर येऊन बसतात.-
अजनबी ख्वाहिशे सीने मे दबा भी न सकू
ऐसे जिद्दी है परिंदे के उडा भी न सकू
फूक डालुंगा किसी रोज ये दिल की दुनिया
ये तेरे खत तो नही है के जला भी न सकू
इक न इक रोज कही ढ़ूँढ ही लुंगा तुझको
ठोकरे जहर नही है के मै खा भी न सकू
कुणी प्रेमभंगामुळे इतकं निराश होतं की स्वतःच अस्तित्व मातीमोल समजू लागतं, जीवनाला वेगळाच आकार देऊ लागतं-
अपने होने का हम इस तरह पता देते थे
खाक मुट्ठी मे उठाते थे, उडा देते थे
अब मेरे हाल पे शर्मिंदा हुये है वो बुजुर्ग
जो मुझे फूलने-फलने की दुआ देते थे.
कुणी घर-गाव, आप्त-मित्र सगळं सोडून स्वतःची नवीन ओळख तयार करण्याचा प्रयत्न करतात पण एखाद्या कातरवेळी जुन्या कटू-गोड आठवणी परत ‘पिकांवर’ येतात-
शहरो-शहरो गाव का आंगन याद आया
झूठे दोस्त और सच्चा दुश्मन याद आया
पीली पीली फसले देख के खेतो मे
अपने घर का खाली बरतन याद आया
गिरजा में इक मोम की मरियम रखी थी
मां की गोद मे गुजरा बचपन याद आया
देख के रंगमहल की रंगीन दीवारे
मुझको अपना सूना आंगन याद आया
-हे कुठेतरी मनाला सलतच राहते पण जगरहाटी चालतच राहते, एका क्षणासाठी का होईना मन स्व:गत प्रश्न करतं -
ये जिन्दगी सवाल थी जवाब मांगने लगे
फरिश्ते आ के ख्वाब मे हिसाब मांगने लगे
दिखाई जाने क्या दिया है जुगनुओ को ख्वाब मे
खुली है जबसे आंख आफताब मांगने लगे
-जर प्रेम खरं असले की या प्रश्नांना मनाच्या हळव्या कोपऱ्यातून उत्तरेही येतात-
हरेक चहरे को जख्मो का आइना न कहो
ये जिन्दगी तो है रहमत इसे सजा न कहो
न जाने कौन सी मजबूरियो का कैदी हो
वो साथ छोड गया है तो बेवफा न कहो
ये और बात के दुशमन हुआ है आज मगर
वो मेरा दोस्त था कल तक उसे बुरा न कहो
-तरीही आपली आवडती व्यक्ती आपल्या सोबत नाही ही वेदना काही केल्या जात नाही, मग मन स्वत:ला समजवण्यासाठी नशिबाला दोष देतं-
पेशानियो पे लिखे मुकद्दर नही मिले
दस्तार कहा मिलेगे जहा सर नहीं मिले
(पेशानी-कपाळ, दस्तार- डोक्यावरची पगडी)
परदेस जा रहे हो तो सब देखते चलो,
मुमकिन है वापस आओ तो ये घर नही मिले
- जातांना जे सोडून गेलो होतो तेच ‘घर’ पुन्हा भेटत नाही, कितीहीदा परत आलो तरी ‘त्याच’ घरात परत येता येत नाही, प्रत्येक वेळेस काहींना काही बदल झालेला असतो...घर सुटले की सुरु होतो एक प्रवास, न संपणारा, स्थलांतर करीत राहणाऱ्या ‘जोग्या’ सारखी अवस्था-
तू शब्दो का दास रे जोगी
तेरा कहा विश्वास रे जोगी
इक दिन विष का प्याला पी जा
फिर न लगेगी प्यास रे जोगी
ये सांसो का का बन्दी जीवन
किसको आया रास रे जोगी
विधवा हो गई सारी नगरी
कौन चला वनवास रे जोगी
पुर आयी थी मन की नदिया
बह गए सारे एहसास रे जोगी
इक पल के सुख की क्या कीमत
दुख है बारह मास रे जोगी
बस्ती पीछा कब छोडेगी
लाख धरे सन्यास रे जोगी
-कितीही सोडण्याचा प्रयत्न केला तरी वस्तीचा मोह सुटत नाही, पण प्रवासही टळत नाही,....हातात येणारं सोडून पावले समोर चालतात, मन मागच्या वस्तीची आठवण धरून डोळे नवीन वस्तीच्या खाणाखुणांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करतात. ....प्रवास होतच राहतो....सगळं धरून........सगळं सोडून..........
०००
अखेर मिपाच्या भटकंती सदराला शोभतील अश्या राहतजींच्या गझल मधले दोन शेर-
सफर की हद है वहा तक कि कुछ निशान रहे
चले चलो के जहा तक ये आसमान रहे
ये क्या के उठाये कदम और आ गई मंजिल,
मजा तो जब है के पैरो मे कुछ थकान रहे.
०००
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(या धाग्यात दिलेले सगळे ‘शेर/काव्य’ राहत इंदोरी यांचे आहे, ते जसे आठवले तसे लिहण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा एक 'आस्वादात्मक लेख’ असून या धाग्याचा हेतू ‘राहत इंदोरी’ यांच्या लिखाणाचे 'रसग्रहण' एवढाच आहे.)
----------------------------------------------------------------------------------------
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आहा!!! सुरेख लिहलंय. लेख खूप
राहत
असेच म्हणतो.
फार आवडलंय.
सुरेख लिहलंय.
प्रचंड भारी दिसतोय प्रकार.
https://rekhta.org/poets
गझल आणि शायरी हे प्रकार कधी समजलेच नाहीत...पण...
मला आवडलेला शायर- राहत इंदोरी
वाह वाह वाह!
वाह!
भाऊ राहत इंदोरींच्या
लेख आवडला.
फारच सुंदर!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!
पुढचं लिहा. इथे कुणी तुम्हाला
अप्रतिम लिहिलंय.पहिला शेर तर
एक आदत सी बन गई है तू,
अहा!
सुंदर लेख !
आणिक एक
मानाचा मुजरा
फारच छान लिहिलंय.
@उडन खटोला-भौ ज्याचे क्रेडीट
भाई मेहफिल बनवतो आणि पुन्हा
धागा आवडला असे अनकॉमन एकेक शायर घ्यावेत
@उडन खटोला- नाssही उचलत बाबा
लै शाब्बास!
फारच