आपल्या विद्वानाच्या नगरितले नेते कृषिमंत्री होते तेव्हाचि गोष्ट.
एकदा आपले माननीय नेते काही परदेशी सन्माननीय पाहुण्याना भारतातील शेतीशी आधारित जोडधंदे दाखवायला घेऊन गेले. शहराबाहेरील एका मोठ्याशा गोठ्यात शिरुन त्यांनी पाहुण्याना पशुधन दाखवायला सुरुवात केलि. समोर असलेल्या गवळिबुवाची अगदी आपला शाळकरी मित्र असल्याच्या थाटात चौकशी केली. गवळीबुवाच्या पायाला भलेमोठे प्लास्टर पाहून त्यांनी त्याचे कारण विचारले.
गवळीबुवानी सांगितले की दूध काढ़ताना गाईने लाथ मारली.
बस मग काय , कृषिमंत्र्याचे त्या गवळ्याचे बौद्धिक घेणे सुरु झाले.
"अरे त्या गाईला पहल्यान्दा थोपटायचे असते. मग तिच्या मानेखाली थोड़े खाजवायचे, तिच्या बरोबर बोलायचा प्रयत्न करायचा , असे करताना तिच्या पाठीवर थाप मारायची. थोडेसे तिचे कान खाजवायचे. असे केल्याने जनावर कह्यात येते. मग आरामात दूध काढायचे."
एवढे बोलून थांबतील तर ते कृषिमंत्री कसले. त्यांनी गवळ्याच्या हातातील बादली खेचून घेतली व् गवळीबुवा नाही नाही म्हणतांना दूध काढ़ायला बसले . परिणाम काय? एक सांणकन लाथ कृषिमंत्र्याना बसली.
एका पायाने लंगड़ी घालत खजिल स्वरात ते गवळ्याला बोलल," गड्या काहीतरी चुकले बग"
गवळी गालातल्या गालात हसत बोलला," तुम्ही समद बरोबर केले साहेब, फकस्त एकच चूक केलि , ते निवडल ते बैल होत राव!
वाचने
23553
प्रतिक्रिया
79
मिसळपाव
प्रतिक्रिया
ऑफिसमध्ये प्रमोशनसाठी मुलाखती
खबरदारी,
आगळीक,
आजचट्कायाप्पा वर आलेल.....
आजच कायप्पा वर आलेला.....
आजच कायप्पा वर आलेला.....
आजच कायप्पा वर आलेला.....
एक बाई एका म्हातारीला- "आग
गुरूजी : सुखकर्ता दु:खहर्ता