Skip to main content

होय , मधुमेह पूर्ण बरा होतो

लेखक विटेकर यांनी मंगळवार, 19/07/2016 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! २००६ साली, वयाच्या ३८ व्या वर्षी मला मधुमेहाचे निदान झाले! घरात परंपरा होतीच शिवाय स्थौल्य आणि बैठी जीवनशैली यामुळे हे अपेक्षित होते. फक्त फार लवकर ही ब्याद मागे लागली म्हणून किंचित वाईट वाट्ले. मूळात गोड खाण्याची आवड आणि व्यायामाचा आळस त्यामुळे साखर कमी जास्त होत राहीली ( कमी कधीच नव्हे , सतत जास्तच !) गेल्या ९ वर्षात अनेक चढ- उतार आले, तात्पुरता व्यायाम - पथ्य पाळले जाई, पुन्हा येरे माझ्या मागल्या ! यात नवीन काही नाही , बहुतेक मधुमेहींची हीच कहाणी असते. २०१२ पासून दरवर्षी नर्मदेवर जायला सुरुवात केली, या काळात खाण्याचे काही खरे नसे म्हणून गोळ्या घेत नसे ( हा ही एक मूर्खपणाच ! पण मूळात मधुमेह असताना देखील नर्मदेवर जाणे या मुख्य मूर्खपणापुढे तो किन्चित गौण!) आणि परत आल्यावर hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) आश्चर्यकारक रित्या कमी असे ! तेव्हा माझ्या लक्षात आले की , व्यायाम, खाणे पाळले तर आपली साखर मर्यादित राहू शकते (कारण तिथे रोजचे किमान २०-२५ किमी चालणे होई) आणि औषधे फारशी परिणामकारक नाहीत , उलट डोस वाढत जातात. २०१४- १५ मध्ये मला पायाला मुंग्या येणे, भेगा पडणे हा त्रास सुरु झाला होता. पोटाची तर कायमच बोन्ब असे ! मला हे पक्के माहीत होते की मधुमेह असाच वाढत जाणार आहे आणि डोस ही असाच वाढत जाणार आहे.. .. माझा आत्मविश्वास खचू लागला होता. अन्य मधुमेहीप्रमाणे मी ही सतत वेगेवेगळ्या प्याथी आणि औषधांच्या शोधात असे. त्यातून आयुर्वेदिक डो़क्टरांनी सांगितल्याप्रमाणे S - VYASA चा कोर्स ही केला. या सार्‍या उपायांनी साखर नियंत्रणात येई पण गोळ्या ( GLUCORYL M1 सकाळ / रात्री १-१-) सुटत नव्हत्या, गोळी अर्धी देखील होत नव्हती. सतत आंतरजालावर शोधत असे, त्यातच http://www.freedomfromdiabetes.org सापडले, ८ ऑगस्ट २०१५ रोजी पुण्याच्या अल्पबचत भवनला त्यान्चे अर्ध्या दिवसाचे सत्र होते. त्यांनी मधुमेह पूर्ण बरा होतो - कोणत्याही औषधाशिवाय - फक्त जीवन शैलीत सुयोग्य बदल करावा लागतो असे सांगितले , बरा होऊ शकतो असे सांगणारे बरेच होते पण औषधाशिवाय फक्त आहार, व्यायाम आणि मनःशांतीद्वारा हा प्रकार नवीन होता ! आणि माझा अनुभव ही काहीसा असाच होता. तसाच भारावून घरी आलो , विटूकाकूला सांगितले , आज पासून चहा बंद ! ( ८ औगस्ट २०१५ दूध घातलेला घरी प्यालेला शेवटचा चहा ! ) त्यांनी सांगितलेले सगळे नियम पाळायला सुरुवात केली, घरच्या घरी रोज तीन वेळा साखर चेक ( ग्लुकोमीटर द्वारे) करायला सुरुवात केली ... (वास्तविक त्यांनी त्यांच्या ईन्टेन्सिव प्रोग्राम ला प्रवेश घ्यायला सांगितले होते , ते मी केले नाही पण जीवन शैली करुन बघू जमते का म्हणून सुरुवात केली होती ) या नव्या आहारामुळे हायपो ( रक्तातील साखर कमी होणे ) होऊ लागला म्हणून १३ ऑगस्ट्ला सकाळची गोळी अर्धी केली , २० ला सकाळची बंद आणि रात्रीची अर्धी केली , २३ औगस्ट्ला रात्रीची गोळी बंद झाली. ( हा उद्योग माझा मीच केला, हा मूर्खपणा आहे , वैद्यकीय सल्ल्याशिवाय असे करणे धोकादायक आहे !) २३ ऑगस्ट २०१५ ला मी शेवटची GLUCORYL M1 घेतली. माझ्या दोन्ही गोळ्या पंधरा दिवसात बंद झाल्या या छोटेखानी विजयानंतर आता विश्वास बसल्याने आणि आत्मविश्वास वाढल्याने प्रोग्राम सुरु केला. एकून १३ चाचण्या करायला साण्गितल्या , बी १२ ,डी , लिवर फन्कशन इत्यादी इत्यादी बी १२ आणि डी खूपच कमी होते, hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) होती ८.६८ म्हणजे साधारण २५६ ! त्यांनी सांगितलेली पथ्ये आणि व्यायाम सांभाळताना , नोकरी , देश- परदेश प्रवास, शिवशक्ती संगम ची धावपळ आणि जाग्रणे हे सारे सुरु होते. पण पथ्य - व्यायमही सुरुच होता अगदी ऐन दिवाळीत सुद्धा ! २०१५ च्या दिवाळीत लाडवाचा एक कण देखील खाल्ला नाही ! दिवाळीनंतर म्हणजे प्रोग्राम सुरु केल्यावर १४ आठवड्यात hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) होती ५.९ आणि वजन १४ किलो कमी झाले होते ! त्यानंतर मार्च मध्ये पुन्हा तपासण्या केल्या , ब१२ / डी अतिउत्तम आणि hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) फक्त ६.० ( गोळ्या बंद करुन ही ) ५ जुलै ला hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा )- ६.१ डिसेंबरमधील तपासण्यानंतर थोडा सैलावलो - संक्रांतीला गुळाच्या पोळ्या आणि अनेक वर्षात पहिलयांदा वड्या आणि लाडू खाल्ले , बर्यापैकी गोड खाणे सुरु झाले, रोज साखर तपासत असे ! सकाळची साखर १०० ते ११० ला स्थिरावली होती. मार्चच्या तपासणी नंतर सुटलोच , ९ वर्षात पहिल्यंदा आंबे चेपले, किती खाल्ले ? पैशाचा हिशोब करायचा तर यावर्षी फक्त हापूसच १२,००० रुपायचे खाल्ले आम्ही चौघांनी ! अर्थात माझा वाटा सिंंहाचा होता. नौ वर्षाचा ब्याकलॉग भरुन काढायचा होता ! शिवाय घरचे रायवळ आणि रसाचे पायरी वेगेळे ! मे महिन्यातील सर्व लग्नात भरपेट जेऊन आहेर वसूल केले, सूट्टीत मुलांच्या बरोबर आईसक्रीमपण चेपले पण अगदी मर्यादेत ! जुलई मधले hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) ६.१ आल्यावर जी टी टी ( तुम्ही मधुमेही आहात की नाही हे ठरविणारी चाचणी) द्यायचे ठरवले त्यात मात्र नापास याचा अर्थ माझ्या प्यांक्रिया अजून पुरेसे इन्शुलिन पंप करत नाहीत , मी आय जी टी आहे. तो ट्प्पा आता पार पाडायचा आहे ! मधल्या काळात वजन पुन्हा ३ किलो वाढले आहे ! पण गोळ्या बंद्च आहेत अणि hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) नियंत्रणात आहे ! हा माझा फार मोठठा विजय आहे असे मला वाटते , गेल्या १० वर्षात माझ्या व्यक्तिगत आयुष्यात इतकी आनंदाची गोष्ट घडली नव्हती ! हा शरिरापेक्षा मनावर विजय आहे ! अधिक माहितीसाठी केव्हाही संपर्क करावा, वरती संकेतस्थळ दिले आहेच !

वाचने 129324
प्रतिक्रिया 173

प्रतिक्रिया

अरे व्वा.. वाचून आनंद झाला. अभिनंदन. प्रमोद त्रिपाठींबद्दल वाचले आहे, अनेक लोकांचे चांगले अनुभव प्रत्यक्ष पाहिले आहेत. आणखी एकदा अभिनंदन..!!!!

व्वा अभिनंदन ! वाचून आनंद झाला. तुमच्या जीवनशैलीविषयी (आधीच्या आणि आताच्या )जरा अजुन सविस्तर सांगू शकाल का?

In reply to by शि बि आय

काही विशेष नाही त्याबद्द्द्ल , अगदी सामान्यच होती ! अट्टल चाहाबाज असल्याने सुटीच्या दिवशी सहज १०-१२ कप दूध घातलेला साखर कमी असलेला चहा होई , सामान्य पणे आठवड्यतून ४ दिवस योगासने होत पण घाम काढणारा व्यायाम नसे , हालचाली मंद आणि सतत निरुत्साही वाटे ! तिन्ही त्रिकाळ पोट्भर जेवणे , सतत चरत राहणे , चमचमीत , मिसळीची अतीव आवड आणि घाबरत घाबरत गोड खाणे ! औषधाची मात्रा वर सांगितली आहेच ! व्यसन कुठलेच नाही/ नव्हते आणि जन्मापासून कधीही सामिष खाल्ले नाही/ खात नाही.

अभिनंदन आपले,आपल्या अनुभवाचा इतरांनाही फायदा देत आहात हे चांगले.संपुर्ण मधुमेहमुक्त आयुष्यासाठी शुभेच्छा.

आमच्या घरात प्रत्येक जनरेशन मध्ये मधुमेही आहेत. तुमचा हा लेख त्यांना वाचायला संगतो.

अभिनंदन काका ! तुमच्या आहारातील बदलाविषयी तपशीलवार सांगा.

अहो, तपशीलवार इथेच सांगा नो भो.सांगितलेली पथ्ये आणि व्यायाम, आहार कोणता करायचा ते. -दिलीप बिरुटे

मधुमेहाने होणारे त्रास जवळून पाहिले आहेत. त्या नरकयातनांपासून तुम्हाला मुक्ती मिळाली यासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा.

प्रयत्न करतोय, मोबाईल वरून चोपय पेस्ट होत नाहीये !

ऊतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही हे व्रत कसे करावे ? १. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ वर्ज्य करावेत २. बेकरी पदार्थ वर्ज्य ३. रोज सकाळी कडधान्यांची न्याहारी ( मोड आलेले मूग / मटकी/ हरभरे , त्याचे डोसे , आप्पे , उसळ, डाळ ढोकळा, मिसळ इत्यादी) धान्य घ्यायचे नाही म्हणजे पोहे उप्पीट इडली बंद ४. एक धान्य जेवण - दोन्ही जेवणात कोणतेही एकच धान्य घ्यावे . भाकरी/ हातासडीभात / खपली गव्हाची पोळी पैकी फक्त एक पदार्थ ५. जेवताना २५:२५:२५:२५ हे गुणोत्तर पाळावे २५%धान्य २५%डाळ २५%कच्चा भाजीपाला , दही नसलेली कोशिंबीर २५% शिजवलेली भाजी ६. रोज सकाळ संध्याकाळ चहाऐवजी स्मूदी ( स्मूदी? गुगलून पहावे , स्मूदी बनवण्याचा विडिओ पाठवला आहे) ६. पायऱ्या चढण्याचा व्यायाम anti gravity exercise न्याहारी आणि प्रत्येक जेवणानंतर ७. पुरेशी चिंतामुक्त झोप (७ ते ८ तास ) ८. रोज सकाळी घाम येईपर्यंत ४५ मिनिटे व्यायाम ९ . रोज ३ वेळा ग्लुकोमीटर द्वारे साखर तपासणी. फलश्रुती : ४ ते ६ आठवड्यात गोळ्या/ इन्शुलिन पूर्ण बंद रक्तदाब, गुडघेदुखी, पाठदुखी गायब वजन आटोक्यात आणि वय किमान दहा वर्षे कमी होणार उत्साह आणि ऊमेद वाढणार अधिक माहितीसाठी Www.freedomfromdiabetes.org

In reply to by विटेकर

माहितीबद्दल आभार. -दिलीप बिरुटे

In reply to by विटेकर

वय किमान दहा वर्षे वाढणार ...... असे हवे.

मधूमेहाच्या विळख्यातून सुटल्याबद्दल अभिनंदन. आणि दुसरे म्हणजे, तुमचे अनुभव इथे दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

In reply to by मुक्त विहारि

माहिती साठी धन्यवाद, आणि मधूमेहाच्या विळख्यातून सुटल्याबद्दल अभिनंदन विटेकर काका.

पाय मोडल्यावर दोन वर्षे घरीच होतो. माझी शुगर४३० झाली होती. अतिशय निराश होतो. पण पुन्हा जॉबात सेटल झाल्यावर रोजचे चार ते सात किमि चालणे ठेवणे. खाणॅ कंटृओळ केले तरी किमान गरजेचे तरी खाल्लेच पाहिजे. रमजानचे रोजे केले. अगदी कडक. इतर महिन्यात एकदाच जेवुन दीवस लीक्विड ज्युसवर घालवणे प्लॅन आहे. पण अजुन जमले नाही. शुगर गेली. गोळ्या बंद आहेत.

In reply to by चंपाबाई

अरे व्वा, छानच ! अभिनंदन !

In reply to by चंपाबाई

आयडी चंपाबाई स्त्रीलिंगी आणि प्रतिसादात "पाय मोडल्यावर दोन वर्षे घरीच होतो." होतो??? होतो म्हणजे पुलिंगी ना? या नानामाईच्या डुआयडीला पुलिंगी आणि स्त्रीलिंगी मधला फरक सुध्दा कळत नाही का? समजवा रे ह्याला (का हिला) कोणीतरी. मुवि, तुमच्या या धाग्यावर मी प्रतिसाद दिला नव्हता कारण मी याच संधीची वाट पहात होतो.

In reply to by भाते

ते जामोप्या आहेत, अन त्यांनी ते लपवायचा प्रयत्न कधीही केलेला नाहिये. हे तुम्हालाही ठाऊक आहे. तेव्हा जौद्या ना?

In reply to by चंपाबाई

रमजानचे रोजे केले. अगदी कडक.
मधुमेही व्यक्तींनी असा उपास केलेला चालतो का? धार्मिक बाब दूर ठेवु पण अश्या केलेल्या उपासाचा त्रासच अधिक होण्याची शक्यता जास्त नाही का?

In reply to by कानडाऊ योगेशु

दिवसातून एकदाच खावे ते सहादा खावे अशा प्रकारचे सल्ले सर्वत्र दिसतात.... यातले नेमके कोणते चांगले कोणते वाइट माहीत नाही. ज्याने त्याने आपली सहनशक्ती , आहाराची उपलब्धता , डेलि रुटिन इ वर निर्णय घ्यावेत. दिवसातुन एकदा किंवा दोनदाच खावे , ते आरोग्याला कदाचित जास्ती पोषक आहे, असे माझे मत आहे. हे माझ्यापुरते मर्यादित आहे.

In reply to by सुबोध खरे

सकाळीच फास्टिंग शुगर केली... १०३ आहे. ग्लायकोसिलेटेड एच बी ला स्याम्पल दिले आहे. रात्री रिपोर्ट येईल. यावर्शी रमजानच्या काळातच डिप्लोमाची परिक्षाही होती... थेअरी पेपर उपाशीपोटीच लिहिलेत.

In reply to by चंपाबाई

एच बी ला स्याम्पल दिले आहे
किती आली? मुद्दाम टोकत नाही, पण आपली साखर लपविण्याचा मधुमही लो़कांचा कल असतो. माझाही असायचा ! आणि आपली साखर काळजी करण्यासारखी नाही अशी ही समजूत घालण्याकडे कल असतो म्हनून विचारले इतकेच

In reply to by विटेकर

।एच बी ए वन सी ... ५.१ ब्लड शुगर .... ९३ ... ( एच बी वाले त्याच्या बरोबर करतात ती ) आमच्या ल्याबमध्ये शुगर १०३ होती. फास्टिंग

In reply to by कानडाऊ योगेशु

काही इतर काँप्लिकेशन्स नसतील तर योग्य ती काळजी घेऊन रमजानचे रोजे आणि इतर लोक आपापले कडकडीत उपासही ;) करता येतात मधुमेहींना. रमजानपूर्वी माझ्या सगळ्या रोझेदार मंडळीण्ची एक व्हिजीट असते माझ्याकडे डोस अ‍ॅडजस्ट करून घ्यायला. 'डायबेटीक्स अँड रमादान- प्रॅक्टीकल गाईडलाईन्स' नावाची छोटी पुस्तिका ' इंटरनॅशनल डायबेटीस फेडरेशन 'आणि ' डायबेटीस अँड रमादान इंटरनॅशनल अलायन्स' यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी डॉक्टर लोकांकरिता प्रसारित केली जाते. त्यात या विषयाबद्दल अगदी सांगोपांग माहिती दिलेली असते. जामोप्या स्वतः डॉक्टर आहेत त्यामुळॅ प्रश्नच नाही. इतर कुणी रोजे ठेवणार असेल तर यातले मुख्य मुद्दे मी एक स्वतंत्र धागा काढून लिहेन. ;)

In reply to by साती

पुढचे रोजे उन्हाळ्याकडे सरकणार आहेत.

डॉक्टर खरे सरांच्या प्रतिसादास उत्सुक आहे

सर्वप्रथम या कामगिरीबद्दल आपले अभिनंदन! आपल्याला सांगितलेली जीवनशैली टाईप टू डायबेटीसकरिता अत्यंत योग्य अशीच आहे. आणि तुम्ही ती मनापासून अवलंबिलीत म्हणून तुम्ही हे साध्य करू शकलात. आमच्या ओपिडीत आपल्यासारखी क्लिनीकल प्रोफाईल असणार्‍या प्रत्येक रूग्णाला हे समजावून देऊन आणि लिहून देऊनही याप्रकारे गोळीमुक्त होणारे रूग्ण शेकडा सहा ते सातच असतात. कारण सातत्य आणि प्रयत्नांचा अभाव. त्याबरोबरच आमचेही मोटिव्हेशन करण्यात कमी पडलेले प्रयत्न. मात्र जे असा सल्ला मनापासून ऐकतात आणि पाळतात ते नक्की दुवा देतात. मलाही एखादा पेशंट काही काळासाठी का होईना ओ एच ए मुक्त झाला की त्या पेशंट इतकाच आनंद होतो. पुढिल आयुष्यासाठी शुभेच्छा! (सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही टाईप टू डायबेटीस होण्याचा कार्यकारणभाव वैज्ञानिक दृष्ट्या समजून घेतला आहे आणि आय जी टी रेंजमध्ये तुम्ही आहात हे समजून घेतले आहे. हे आम्हाला रूग्णाला समजावून सांगताना दमछाक होते.)

In reply to by nanaba

इम्पेअर्ड ग्लुकोज टॉलरन्स. म्हणजे रक्तातील साखर सामान्यवेळी मधुमेहाच्या लेव्हलला नसते पण साखरेचा अतिरीक्त भडीमार होतो तेव्हा हे लोक ती साखर नॉर्मल लेव्हलला आणू शकत नाहीत. रक्तात मिसळलेल्या साखरेच्या प्रमाणात जितके इन्स्युलिन पँक्रियांनी स्रावित करायला हवे तितके होत नाही. याकरिता एक ठराविक मापाचे प्युअर ग्लुकोज पाण्यातून प्यायला देऊन मग अर्ध्या अर्ध्या तासाने रक्त आणि लघवीतले साखरेचे प्रमाण मोजण्यात येते.

In reply to by साती

ओजीटीटी ७५ मिली ग्लुकोस पाण्यातून ढवळून प्यायला देतात ( अंदाजे १५ चमचे आपली नेहमीची साखर ) दोन तासांनी रक्तशर्करा १४० च्या आत आल्यास आपण मधुमेही नाही असे म्हणता येते

साती ताईंच्या इतक्या सुंदर प्रतिसादानंतर आणखी मी काय लिहिणार आपली दिनचर्या मधुमेहीसाठी आदर्श अशी आहे. १. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ वर्ज्य करावेत २. बेकरी पदार्थ वर्ज्य ३. रोज सकाळी कडधान्यांची न्याहारी ( मोड आलेले मूग / मटकी/ हरभरे , त्याचे डोसे , आप्पे , उसळ, डाळ ढोकळा, मिसळ इत्यादी) धान्य घ्यायचे नाही म्हणजे पोहे उप्पीट इडली बंद ४. एक धान्य जेवण - दोन्ही जेवणात कोणतेही एकच धान्य घ्यावे . भाकरी/ हातासडीभात / खपली गव्हाची पोळी पैकी फक्त एक पदार्थ ५. जेवताना २५:२५:२५:२५ हे गुणोत्तर पाळावे २५%धान्य २५%डाळ २५%कच्चा भाजीपाला , दही नसलेली कोशिंबीर २५% शिजवलेली भाजी ६. रोज सकाळ संध्याकाळ चहाऐवजी स्मूदी ( स्मूदी? गुगलून पहावे , स्मूदी बनवण्याचा विडिओ पाठवला आहे) ६. पायऱ्या चढण्याचा व्यायाम anti gravity exercise न्याहारी आणि प्रत्येक जेवणानंतर ७. पुरेशी चिंतामुक्त झोप (७ ते ८ तास ) ८. रोज सकाळी घाम येईपर्यंत ४५ मिनिटे व्यायाम फक्त आपण लिहिलेली दिनचर्या पाळण्यासाठी केवळ तुमचेच नव्हे तर तुमच्या सौं. चेही अभिनंदन. कारण सहज सोपे मिळणारे पदार्थ पाव, बिस्किटे, दुधाचे पदार्थ सोडून प्रत्येक वेळेस काहीतरी आरोग्यकारक पदार्थ करून देण्यासाठी लागणारे कष्ट घेण्याची घरच्या गृहिणींची "तयारी" असावी लागते. शिवाय "पायऱ्या चढणे आणि ४५ मिनिटे घाम येईपर्यंत व्यायाम करणे" रोज हे करण्यासाठी किती जणांचा मनोनिग्रह असतो आणि असला तर किती दिवस टिकतो हा मूळ प्रश्न आहे. बऱ्याचशा मधुमेही रुग्णांची मनोवृत्ती आपण "खाण्यासाठी" जन्माला आलो आहे अशी असते. बटर चिकन आणि पनीर टिक्का खाल्यावर कॅलरी जास्त झाल्यामुळे "डाएट कोक" पिणारी पिढी आहे. आपल्या निग्रह आणि सातत्याबद्दल आपले अभिनंदन.

In reply to by nanaba

कोणतेच दूध आणि दूग्धजन्य पदार्थ चालणार नाहीत. फक्त नारळाचे दूध , सोयाबीनचे दूध, बदामाचे दूध चालेल. ( याचे मला आश्चर्य वाटते पण मी नियम पाळतो ) दूध नाही म्हणजे ताक - दही , तूप, लोणी, पनीर , कढी, खरवस काहीही नाही !

In reply to by सुबोध खरे

खरेच डॉक्टर , तिच्याशिवाय हे काही शक्य नव्हते ! ती माझ्यासाठी सावित्रीच आहे ! या प्रोग्रम साठी दोघांनी भाग घेणे जरुरी असते, नवरा रुग्ण असेल तर बायकोने आणि बायको रुग्ण असेल तर नवर्याने पण प्रोग्राम साठे प्रवेश घेणे जवळ जवळ अनिवार्य आहे ! समूह शिक्षणावर त्यांचा भर आहे , प्रत्येक रुग्णासाठी एक डॉक्टर आणि एक मेण्टर निर्धरित केलेला आसतो , त्यांच्या सतत संपर्कांमुळे आणि प्रोत्साहानामुळे मनोधैर्य टिकते आणि वाढते ! त्याशिवाय कायप्पा समूहावर खूप शेयरिन्ग होते , त्यामुळेही खूप उत्साह वाढतो. मी पण आता मेण्टर आहे ४ जणांचा !

डॉ त्रिपाठींच्या सल्ल्याचा आमच्या घरात पण फायदा झाला मधुमेह 10 वर्षे गोळ्या घेतल्यावर, आता बरा झाला हापूसची गोष्ट तुमच्यासारखीच 10 वर्षांनी भरपेट आंबे खाता आले त्यांनी सांगितलेली मुख्य सूत्रे मगणजे दुग्धजन्य पदार्थ, pricessed food पूर्ण बंद गहू खाल्ले तर खपली गहू। सिंहोर लोकवन इ पंजाबी वाण नाही ज्वारी ची भाकरी च खाणे उत्तम सकाळी हिरव्या पालेभाज्या ,सफरचंद, दुधी इ इ ची ग्रीन स्मूदी पिणे जेवल्यावर 1,5 तासाने जिने चढण्याचा व्यायाम करावा

सर्वप्रथम कडक जीवनशैली अवलंबून औषधे न वापरता डायबेटिस कंट्रोल मिळविल्याबद्दल अभिनंदन. * आता खरे साहेब व साती अक्कांच्या प्रतिसादानंतर माझा नेहेमीचा खडूस, व प्रदीर्घ प्रतिसाद. या प्रतिसादाचे कारण म्हणजे, "डॉ त्रिपाठींच्या सल्ल्याचा फायदा.. " हे वाक्य ३-४ प्रतिसादांत दिसले. आपल्याकडे प्रॉब्लेम असा असतो, की अमुक एका यशस्वी डॉ.चे औषध मी सुरू केले, की आपोआप बरा होणार. इथे मुळात त्यांचा सल्ला घेतला हे महत्वाचे नसून तो संपूर्णपणे आचरणात आणला हे जास्त महत्वाचे आहे, हे सर्व डायबेटिक रुग्णांनी लक्षात घेतले पाहिजे. (डिस्क्लेमर क्र. १. : मी डायबेटॉलॉजिस्ट नाही. सातीअक्का डायबेटीसच्या स्पेशलिस्ट आहेत.) (डिस्क्लेमर क्र २. : मी फक्त कडू सत्ये नोंदविणार आहे.) (डिस्क्लेमर क्र ३. : हा/ असा प्रतिसाद पूर्वी कुठेतरी दिला असावासा देजावू येतो आहे) डायबेटीस 'बरा' होण्यासाठी (होण्यासाठी म्हणण्यापेक्षा बरा 'राहण्यासाठी' हा योग्य शब्दप्रयोग होईल) आधी व्यायाम, मग पथ्य व शेवटी औषध असा सिक्वेन्स आहे. सर्व प्रकारचे डायबेटीस "बरे" होत नाहीत, अर्थात संपूर्ण औषध्/इन्श्युलिन मुक्ती मिळत नाही. जेवणात नक्की कोणते घटक किती प्रमाणात घ्यायचे, ते नीट समजून घेतले तर डायबेटीसवाल्याला अमुक वस्तू कधीच खाता येणार नाही असे होत नाही. म्हणजे २ चमचे आमरस खाल्ला, तर जेवणातून १ पोळी कट करता यायला हवी. किती कार्बोहायड्रेट खायचे ते मोजणे गरजेचे. ते कोणत्या प्रकारे खाल्लेत हे जरा कमी महत्वाचे. शेवटी, डायबेटीस 'कागदावर दिसतो' तोपर्यंतच त्याची ट्रीटमेंट करण्यात मजा आहे. आपल्याला डायबेटीस झाला, की सुरुवातीला आपण घाबरतो. जोरात पथ्य पाणी, वॉक इ. सुरू होते. २-३ वर्षांत, हळूहळू डायबेटीस 'मित्र' बनतो. अर्थात, आपल्या लक्षात येते, की व्यायाम ८-१५ दिवस 'चुकला' किंवा भरपूर कुपथ्य झालं. (काय करणार चुलत भाच्याचं लग्न होतं..) तरी आपल्याला 'त्रास' होत नाही. एकतर आधीच स्वतःला टोचून रक्तातली साखर तपासून घ्यायची जिवावर येते. वरतून लॅब टेस्ट करून घेणे हा डॉक्टरी भ्रष्टाचार, असे डोक्यात भिनलेले असते. तेव्हा, 'मला त्रास होत नाही' हा डायबेटीस "बरा" असण्याचा क्रायटेरिया तयार होतो. शुगर मॉनिटर होतच नाही. शिवाय तोपर्यंत अमुक एक 'योगासन' केल्याने, किंवा 'कारल्याचा/आणि कसला रस पिण्याने' किंवा अमुक पुड्या खाल्ल्याने वगैरे डायबेटीस बरा झाल्याच्या कथा ऐकिवा असतात, व कमी कष्टात डायबेटीस बरा करण्यासाठी त्या बिनकष्टाच्या उपायांचा वापर सुरू होतो. मित्रहो, डायबेटीस कागदावर दिसतो, (अर्थात लॅब रिपोर्टात दिसतो, तुम्हाला 'त्रास होत नाही') तोपर्यंतच त्याला आटोक्यात ठेवा. कारण, सातीअक्कांचे, डॉ. त्रिपाठींचे, नीट न ऐकता, डायबेटीस कंट्रोल हुकतो, तेव्हा मेडिकल ट्रीटमेंट संपून पेशंट आमच्यासारख्या सर्जनकडे पाठवावा लागतो. मग पायाच्या बोटाच्या जखमेसाठी एकतर पेशंट वर्षानुवर्षे न भरणार्‍या जखमा घेऊन फिरतो. आम्ही बोट, किंवा पाय कापायला सांगतो. किडन्या फेल होतात, आम्ही डायलिसिस्/किडनी ट्रान्स्प्लाण्ट सांगतो. डोळ्याचे पडदे जातात, आम्ही लेझरने रेटिना जाळून टाकतो.. डायबेटीसने गुण दाखवले की नो पॉझिटिव्ह ट्रीटमेंट. तेव्हा, लोकहो, विटेकर साहेबांच्या सखोल अभ्यास, अत्यंत रिव्होलुशनरी लाईफस्टाईल चेंज व चिकाटीवरून धडा घ्या, अन "पेशंट काही काळासाठी का होईना ओ एच ए मुक्त झाला की मला आनंद होतो" या डॉ. साती यांच्या वाक्याचा अर्थ समजवून घ्या, [*ओएचे=ओरल हायपोग्लायसेमिक एजंट=डायबेटीसचं औषध ;) ] डायबेटीस-मुक्त रहा, याच सर्वांना शुभेच्छा!

In reply to by आनंदी गोपाळ

आपला प्रतिसाद काहीवेळी मनाला बोचणारा असतो, पण हा प्रतिसाद खरोखरीच बरच मार्गदर्शन करणारा आहे. डोळे उघडले. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. नेहमी असेच नेटक्या शब्दात मार्गदर्शन करावे ही विनंती.

विटेकर काका मन:पूर्वक अभिनंदन. आपला अनुभव आणि इथल्या डॉक्टरांचं अनुमोदन यामुळे मधुमेहाकडे सकारत्मकपणे बघू शकतो हे प्रथमच जाणवले. माहितीतल्या ज्यांना कुणाला मधुमेहाचा त्रास/इतिहास आहे त्याना तुमचा अनुभव कळकळीने सांगेन. अनुभव शेअर करण्याबद्दल धन्यवाद.

पायर्‍या चढणे उतरणे व चालणे हे उत्तम वायाम आहेत. लिफ्टचा वापर कमी करावा. रिक्षा टाळावी

१. सर्वप्रथम श्री व सौ विटेकर यांचे हार्दीक अभिनंदन आणि दोघांनाही उत्तम व दीर्घ आयुरोग्यासाठी शुभेच्छा ! त्यांच्याइतका अभ्यास, चिकाटी आणि मेहनत घेणे सर्वसामान्यपणे दिसत नाही. २. त्याचबरोबर वर तीन डॉक्टरांनी दिलेले सल्ले व अनुभवही तितकेच महत्वाचे आहेत.

मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा! स्वतः धागाकर्त्याचा फर्स्टहॅन्ड अनुभव अधिक मिपावरील सर्वच ज्ञात डॉक्टर मंडळींचे प्रतिसाद, यामुळे सदर धागा वाखु म्हणून साठवण्यायोग्य झाला आहे. काही शंका - १) दुध आणि दुग्धजन्य पदार्थ पूर्णपणे व्यर्ज करण्यामागची कारणे काय? लोणी-तूप समजण्यासारखे आहे परंतु दही-ताक का व्यर्ज? शिवाय यामुळे कॅल्शियमची जी कमतरता भासेल ती कशी पूर्ण करता येईल? २) दोन्ही जेवणात एकच धान्य हेदेखिल नीटसे समजले नाही. समजा दोन पोळ्या आणि एक मूद भात असे घेतल्याने नक्की काय फरक पडू शकेल? ३) आहारात मांसाहाराचा उल्लेख नाही. परंतु, डाळी (प्रथिने) याऐवजी कधी-मधी मांसाहार घेण्यास हरकत नसावी अशी माझी समजूत आहे. ही समजूत योग्य आहे काय? ४) रोजचा पाऊण तास व्यायाम हे ठीकच. पण तो कोणत्या विशिष्ठ पद्धतीचा (पुश-अप्स, ट्रेड-मील इ.) असे काही आहे काय? ५) पथ्यात 'तीर्थ-प्राशनाचा' उल्लेख नाही तेव्हा ते पूर्णपणे व्यर्ज समजावे काय?

In reply to by सुनील

१) दुध आणि दुग्धजन्य पदार्थ पूर्णपणे व्यर्ज करण्यामागची कारणे काय? याचे मुख्य कारण म्हणजे फ्याट वाढू नये ! डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे पेशी ईन्शुलीन ला आत घेत नाहीत ! तसेच आपल्याला मिळणारे दूध अत्यन्तिक भेसळ्युक्त असते ! पण तरिही देशी गाईचे , घरीच काढलेले दूध ही वर्ज्य आहे. ( हे मला फारसे पटत नाही , आई खास देशी गाईचे तूप मला पाठवते , ते ही मला वर्ज्य आहे , कारण समजले नाही ) २) दोन्ही जेवणात एकच धान्य हेदेखिल नीटसे समजले नाही. अगदी सोप्पे ! साखर वढू नये म्हणून ! साखरेचा ईन्टेक कमी करायचा. धान्याचा जी आय सगळ्यात जास्त म्हणून कमीत कमी धान्य घ्यायचे ! ३) आहारात मांसाहाराचा उल्लेख नाही. परंतु, डाळी (प्रथिने) याऐवजी कधी-मधी मांसाहार घेण्यास हरकत नसावी अशी माझी समजूत आहे. ही समजूत योग्य आहे काय? रिवरसल होइइपर्यन्त मांसाहार नाही, नंतर ही मर्यादा आहेच ! ४) रोजचा पाऊण तास व्यायाम हे ठीकच. पण तो कोणत्या विशिष्ठ पद्धतीचा (पुश-अप्स, ट्रेड-मील इ.) असे काही आहे काय? आपल्या आवडीचा, पण घाम येणे अपेक्षित आहे , ठोके जलद व्हावेत ! ५) पथ्यात 'तीर्थ-प्राशनाचा' उल्लेख नाही तेव्हा ते पूर्णपणे व्यर्ज समजावे काय? होय पूर्ण वर्ज्य !

असे अनुभव लिहिण्याबद्दल अनेकानेक धन्यवाद.आनंदी गोपाळ यांनी बरोबर लिहिले आहे. या रुग्णांना काही खाल्ले तरी पोट भरल्याची भावना होतच नाही.त्यासाठी असे अन्नपदार्थ शोधावे लागतात जे पोट भरवतील पण साखर वाढवणार नाहीत. - पाव भाजी खा. पण यातली भाजी ही नेहमीची पावभाजी नसून दुधी,टिंडा,काकडी, कच्ची पपइची वापरायची.म्हणजे बटाट्याची काचय्रा भाजी करतो तशी या भाजांच्या काचय्रा करायच्या.पावात भाजी भरून खायची.करून पाहा. इतर लोकांनी ( रोगी नसलेल्यांनी ) चमचमीत आहार ाला एक दिवस सुट्टी देऊन मद्राशी भाज्या खाव्यात.कदान्न खावे.

माझ्या अंदाजाने माझ्या शरीरात डायबेटिक ट्रीगर होऊन आता चौदा वर्षे झाली. त्यात गेली १२ वर्षे मी गोळया घेत आहे. पण गोळ्या बंद कशासाठी करायच्या ते मला काही उमगलेले नाही.माझे वय आता ६३ आहे. जर माझा मधुमेह २८ व्या वर्षी चालू झाला असता तर गोळ्या बंद करण्याचे स्वपन मी पाहिले असते. विटेकर यानी दिलेल्या माहितीत बेकरी फूड न खाण्याचा सल्ला दिला आहे. तो माहित होण्यासाठी त्रिपाठीच का ? हे सारे माहिती जालावरही आहे. मैद्याचा ग्ल्यसेमिक इंडेक्स अति आहे. नुकत्याच केलेल्या तपासणीत माझे ग्लूकोसायलेटेड हिमोग्लोबिन ६.७ आहे. चौदा वर्षाच्या मधुमेहाच्या सहवासाच्या मानाचे ६.७ हा उत्तम कंट्रोल आहे असे डॉक्टरांचे मत आहे. वे त्याचे श्रेय कालच त्यानी मलाच दिले. ते म्हणाले तुमच्या या प्रवासात औषध हा एक लहानसा उपाय आहे. खरे व्यवस्थापन तुम्ही केले तरच. प्रतिसादात आगो यानी एक सूचक वाक्य टाकले आहे. डायबेटीस 'बरा' होण्यासाठी (होण्यासाठी म्हणण्यापेक्षा बरा 'राहण्यासाठी' हा योग्य शब्दप्रयोग होईल) आधी व्यायाम, मग पथ्य व शेवटी औषध असा सिक्वेन्स आहे. यातच खरी बात आहे. चालायचे नाही, पालेभाज्या कोशिंबीरी आवडत नाहीत, केळी आंबे , सिताफळे चिकू मजबूत खायचे, फक्त फलभाज्या हव्यात उसळी नकोत, सारखे सारखे बाहेर जाउन पावभाजी खायची व मुख्यतः कार्ली जांभूळ रस अलोव्हेरा मेथी यांचे प्रयोग करीत रहायचे यापासून मी लांब राहिलो आहे. सतत शरीर हालते ठेवून वा थोडे थोडे खाऊन स्वादुपिंडावरील भार कमी ठेवणे हा यातील खरा फंडा आहे. पण हा फंडा नोकरी करणार्‍या॑ माणसाला अंमलात आणणे कठीण आहे. साखर जास्त प्रमाणात रक्तात येणे याचा ताणाशी जवळचा संबंध आहे सबब नात्यात व ध्येयातही फार गुंतून रहाण्याचे टाळावे. ते मी करतो. संगीत, विनोद,गप्पा, निसर्गाची आवड याने ताण कमी होतो असा अनुभव आहे.

In reply to by चौकटराजा

चौरा सर, ६३ म्हणजे फार वय नव्हे ! अगदी यौ-वनात नसले तरीही वनात जावे असेही नाही ! आणि हल्ली आरोग्य सुविधामुळे आयुर्मान वाढले आहे ! ६.७ हा उत्तम कंट्रोल आहे , पण हा गोळ्या घेऊन आहे ! डायबेटीस च्या गोळ्यांचे साईड इफेक्टस आहेत म्हणून गोळ्या नकोत ! ( गोळ्यांपेक्षा इन्शुलीन बरे अशी माझी धारणा आहे , त्याचे दुष्परिणाम नाहीत ) एकदा त्यातील गंमत समजली की नोकरी करणार्‍या माणसालाही काही कठीण नाही ! उलट माझ्या रजा कमी झाल्या आहेत. ताणाचा मुद्दा अगदी बरोबर आहे , पण त्याचा नोकरीशी संबंध नाही ! ताण असतो तो आत , बाह्य परिस्थितीवर नाही असे मला वाटते .

डिसिप्लिईन नीट पाळता आली तर आश्चर्यकारक परिणाम दिसतात हे खरं आहे. अवांतरः सुरुवातीला/अधुन मधुन मनोनिग्रह कमि पडतो तेंव्हा जिभेचे चोचले पुरवत पथ्य पाळण्याचे हमखास टेक्नीक म्हणजे "जिभेला द्या, पोटाला देऊ नका". गुलाबजाम खावासा वाटतोय? रस पिळुन टाका आणि गुलाबजाम तोंडात टाका. डोळे मिटुन जिभेवर चव रुळु द्या. ५ मिनिटाने मन भरेल. देन स्पिट इट औट. (हा अन्नाचा अपमान आहे हे मान्य. पण पोटात जास्तिच्या कॅलरी ढकलुन त्या व्यायमाने कमि करणे म्हणजे देखील त्या कॅलरीज थुंकणे होय. अ‍ॅज गुड अ‍ॅज स्पिटींग)