प्रजासत्ताक दिन आणि सन्मान
आज प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री, पद्मभूषण, अशोकचक्र आणि यांसारखे पुरस्कार प्रदान करण्यात आले. नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बहुतेक सगळ्या शहिदांना मरणोत्तर अशोकचक्र देण्यात आले. पण शशांक शिंदे यांना मात्र यातून वगळण्यात का आले ? दुसरीकडे ऐश्वर्या राय, अक्षय कुमार यांना पद्मविभूषण देण्यात आले. या दोघांनी पद्मविभूषण मिळावे असे काय भरीव सामाजिक कार्य केले आहे ? निदान माझ्या तरी वाचनात नाही. ऐश्वर्या राय तर १) कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावणे, २) आयकर बुडवणे, ३) कमीत कमी कपडे घालून अंगप्रदर्शन करणे ४) कोटींच्या घरात पैसे घेऊन चित्रपट काढणे या व्यतिरीक्त काही करताना दिसत नाही. या लोकांना पद्मविभूषण देऊन सरकारने त्या पुरस्काराचा अपमान केला आहे. एकीकडे देशाकरता लढत वीरमरण पत्करणार्यांना आर्थिक मदत आणि शौर्य पुरस्कार प्राप्तीकरता सुद्धा लढावंच लागतं तर दुसरीकडे लायकी नसताना पुरस्कार मिळतो. सरकारने नेमका काय न्याय लावला हे पुरस्कार प्रदान करताना ? की अमरसिंगांनी त्यांचे वजन खर्ची घालून बच्चन कुटुंबातल्या सूनबाईंना हा पुरस्कार देववला ?
२६/११ नंतर मेणबत्त्या घेऊन शोक प्रकट करणार्या समस्तांना मला हे विचारावेसे वाटते की शशांक शिंदे यांना अशोकचक्र देण्याबाबत हे का नाही रस्त्यावर उतरत ? सहाजिकच आहे म्हणा, त्याकरता त्यांना कोणताही मोठेपणा मिळाला नसता, कोणतेही मिडीयावाले हे प्रसारण करण्याकरता आले नसते, आय लव्ह इंडीया वाले टीशर्ट छापून आणि मेणबत्त्या विकून तर स्वत:ची तुंबडी भरून झालेली आहे. बाकिच्यांचे काहीही होवो.
तुम्हाला काय वाटते ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तात्यालबा
सहमत की
पद्मश्री... पद्मभूषण... पद्मविभूषण... भारतरत्न
भारतरत्न
ह्या पुरस्कारातुन काय मिळते?
सहमत. आणि
अक्षय कुमारला पद्मश्नी !!
अक्षय
अन्याय अन्याय
लंबी