Skip to main content

शिवराज्याभिषेकदिन.....

Published on गुरुवार, 02/06/2016
येत्या जेष्ठ शुद्ध त्रयोदशी ला अर्थातच १८ जुन दरवर्षीप्रमाणे स्वराज्य राजधानी किल्ले श्री रायगडावर श्रीशिवराज्याभिषेकदिन साजरा होणार आहे. त्यासाठी मी हि जाणार आहे. तर आपल्या मिपाकरांपैकी कोणी येणार आहेत काय? असल्यास भेटता येइल, यासाठी हा लेखन प्रपंच.......

वाचन संख्या 2794
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

हेच म्हणतो मी. रायगड गर्दीविना, म्हणजे अगदीच चुकार ५-१० लोक गडावर, असा बघीतला असल्याने भयंकर गर्दीच्या जत्रेला जाववत नाही, तस्मात आमचा पास. तुम्ही जा आणी आम्हाला फोटो शेअर करा.

In reply to by प्रचेतस

मलाही असं वाटतं, पण तो जो माहोल तयार होत असेल, जो ऐकलाय, फोटोतून पाहिलाय, तो विनागर्दीचा मिळायचाच नाही. त्यामुळे एकदा ते वातावरण अनुभवायला का होईना, जायचंय राज्याभिषेकाला.

In reply to by प्रचेतस

'सहन न होण्या'कडे कंपू चे लक्ष गेलेलं दिसत नाही. नेमकं काय होतं ओ गर्दी सहन होत नाही म्हणजे ? ;)

योग येतोय. या वर्षी माझ्या छकुलीसोबत जायचा विचार आहे. बघू या भेट झाली तर, आम्ही नीलमकडे थांबतो गडावर.

निर्विघ्न पार पडला . पावसानेही काही व्यत्यय आणला नाहीं. सहकुटुंब अनुभव घेतला. मुलीचे (४ वर्ष) ९ वारी, फेटा या पेहरावात सर्व शिवभक्तांनी आवर्जुन छायाचित्र घेतली , इतके की शेवटी तिला कडेवर घेऊन फिरावे लागले. पुढील वर्ष महत्त्वाचे जसे ५०० कोटी मुख्यमंत्री यांनी जाहीर केल्यावर परिस्थिति अजुन सुधारेल. समितीच्या कार्यकर्ता यांचे अनंत आभार!