डोंबिवलीच्या स्फोटाच्या निमित्ताने
नुकताच डोंबिवलीच्या एम आय डी सी च्या क्षेत्रातील एका कारखान्यात प्रचंड स्फोट होऊन डझनभर लोक मरण पावले आणि शेकडो जखमी झाले. शिवाय अनेक इमारतींना भेगा पडून मोठे नुकसान झाले आहे.
एकेकाळचे रम्य, सुसंस्कृत शहर आज रासायनिक ज्वालामुखीच्या जवळ जाऊन बसले आहे. खुद्द एम आय डी सीत पाहिले तर घरांच्या आसपास कारखाने आहेत का कारखान्यांच्या आसपास घरे आहेत ते कळत नाही. घातक रसायने, वायु वगैरे वापरले जातात अशा कारखान्यांकरता कडक नियम असतात. त्यांच्या आसपास पुरेशी मोकळी जागा, प्रशिक्षित कामगार असणे वगैरे. पण डोंबिवलीची एम आय डी सी केवळ पैसे खाऊन हवी ती कागदपत्रे बनवते. तपासणी करणे, नियमन करणे वगैरे कामे हा विभाग आजिबात करत नाही. छोटे मोठे स्फोट होतच असतात. ते झाले की आपले हप्ते वाढवून घेणे इतकेच काम हा विभाग करतो. असे ऐकून आहे.
ह्या मोठ्या स्फोटामुळे ह्यात काही बदल होईल का? भाजपाचे सरकार आल्यामुळे परिस्थिती सुधारेल का जैसे थे रहाणार?
मागे हिरवा पाऊस झाला तेव्हाही प्रदूषणाची थोडी चर्चा झाली होती. आताही होईल पण दीर्घकाळाकरता उपाय होईल का?
लोकांना घाणेरडा वास येणे ह्या गोष्टी तर रोजच्याच आहेत. त्याबद्दलही काही होताना दिसत नाही.
इथे कुणी डोंबिवलीकर आहेत का? त्यांचे काय अनुभव आणि मत?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पश्चाच्चिकित्सा
आपण प्रमाणपत्र प्राप्त
वेगळे मत
हे पटण्यासारखे आहे! एकंदरीत
मूळ प्रश्न
अशीच एक घटना आमच्या अम्बरनाथ मध्ये २००८ ला झाली
गुजराथ कनेक्शन!
आपल्याकडे काहीही शक्य आहे
मालकापैकी एकजण केमिकल
थोडी अधिक माहिती
ओ पैलवान,
सब गंदा है पर धंदा है ये..
दुर्दैवी
rahi +1
अगदी अगदी
औद्योगीक आस्थापना ( इस्टाब्लिशमेंट ) आणि फॅक्टरी अॅक्ट