फक्त लढ म्हणा !!
शिकलेल्या पोरांमध्ये सगळ्यात जास्त वाईट परिस्थिती असते ती वीस ते पंचवीस वर्षाच्या पोरांची.
ह्या वयात पोरांची डिग्री पूर्ण झालेली असते पण अजुन नोकरी मिळालेली नसते. फक्त घरी बसता येत नाय म्हणून बिचारे पोस्ट ग्रेजुएशन किंवा तसलेच काही शिक्षण चालू ठेवतात. आता तर इंजीनियरिंग वाली पोरंपण दूसरीकडे नोकरी नाय म्हणून MPSC किंवा UPSC कडे जास्त वळायला लागलेत.
.
.
आजकाल वर्गात कायम टॉपर राहणारी चश्मिश पोरंपण ज्यांनी अभ्यास सोडून दूसरे काहीच केले नाही ती पोरंपण Army आणि Police च्या भरती मध्ये पळताना दिसतात. ज्यांची B.Sc, M.Sc झालेय ते दहावी-बारावीच्या पोरांला ट्यूशन शिकवतात. त्यांच्यापेक्षा जास्त हाल इंजीनियरिंग झालेल्या पोरांचे होतात. बापानी घरी पार ओढताण करुन,तेवढी कमाई पण नसताना लाखो खर्च करुन पोराची इंजीनियरिंग पूर्ण केलेली असते आणि हे कंपनीवाले काष्टीच्या बाजारात शेळ्या विकल्याप्रमाणे आठ-दहा हजार द्यायलापण नाक मुरडतात.
.
.
ह्या वयात जेवढि मनाची घालमेल होत असेलना तेवढी कधीच होत नाय. शिक्षण पूर्ण करून नोकरी नाय. घरी बापाला पैशे सुद्धा मागायची लाज वाटते. हे कमी म्हणून गावातले अडानी त्याला विचारणार,"व्हंय रं अजुन किती राह्यलेय तुझं शिक्षण?तुला नोकरी कधी लागणार?आयला तू तर साहेब व्हणार ब्वा." किती डोकं फिरत असेल अशे टोमणे मारल्यावर?आणि त्याच्यातुन जर असा दुष्काळ पडला तर विचारुच नका.
.
.
दहावी-बारावी बळचं काठावर पास झालेला एखादा आर्मीत भरती झालेला कुणी सुट्टीला आल्यावर त्याला ही पोरं म्हणतात,"मजा आहे ब्वा तुमची"काळीज तुटंत ही अगतिकता बघुन. शिकलेल्या पोरींचे तरी बर आहे नोकरीचे नाय जमलं कुठ तरी निदान लग्न तरी लावता येतं पण शिकलेली पोरं काय करणार?
.
.
कुठंच काय नाय जमलं तर मोबाइल शॉपी काढ,कसले पॉलिसी एजेंट हो,MIDCमध्ये कामाला जा,एखांद्याच्या हाताखाली कामाला जा किंवा तसलेच काही सटर फटर उद्योग करावे लागत्यात ह्या सुशिक्षित पोरांना.'आई जेवु घालीना आणि बाप भिक मागु देईना' पार अशी अवस्था होते त्यांची.
.
.
मला वाटते मानसिक पाठबळाची सगळ्यात जास्त गरज ह्याच वयात असते. त्यांना पालकांनी नक्कीच समजुन घेतले पाहिजे. सगळं काही ठीक होईल असा विश्वास त्यांना दिला पाहिजे. बाकी पोरांनीपण सरकारला,मंदीला,दुष्काळाला शिव्या देण्यापेक्षा ह्यातून कसा उपाय निघेल हे बघितले पाहिजे. एक ध्यानात ठेवा सगळं ठीक होईल पण फक्त तुम्ही खचुन जावु नका.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
या अवस्थेतून गेलोय. माझ्यामते
विश्वास नांगरे पाटील
भारतात श्रमांना मोल नाही
भारतात श्रमांना मोल नाही त्यामुळे अशा मानसिक समस्या उद्भवतात.+१०० "नोकरी एके नोकरी" या मानसिकतेला मागे टाकून पुढे जाणे हेच व्यक्तिगत हिताचे आणि देशहिताचेही आहे. पाश्चिमात्य देशांमधील सर्वसामान्य लोकांच्या सधनतेला जेवढा त्यांच्या मोठ्या आंतरराष्ट्रिय कंपन्यांनी हातभार लावला आहे तेवढाच (किंवा काकणभर जास्तच) हातभार तेथिल लहान उद्योगधंद्यांनी (स्मॉल एंटरप्रायजेस)* लावला आहे. यामध्ये छोटेमोठे कारगीर, छोटी दुकाने व इतर प्रकारचे लहान उद्योगधंदे येतात. हे एकांड्या शिलेदारालाही करता येते, ते करण्यासाठी फार मोठे भांडवल लागत नाही आणि नोकरीपेक्षा तुलनेने जास्त फायद्याचे ठरू शकते. पण, त्यासाठी लागणारी व्यक्तिगत मानसिक तयारी व सामाजिक समज (समाजात छोट्या /स्वतंत्र उद्योगाना समाजात दिला जाणारा मान) यात आपण कमी पडतो. त्यामुळे "केवळ नोकरी हेच ध्येय समोर ठेवणे आणि ती नसली तर वेळ फुकट घालवत बसणे" यापेक्षा वेगळा विचार मनातच येत नाही... आणि मग असे करून "दाक्षिण्यात्य आणि उत्तरेकडील लोक महाराष्ट्रात येऊन छोटे-मोठे उद्योग बळकावतात" असा पुकारा करण्यातही आपण पुढे असतो !!! :) ====== * हे स्मॉल एंटरप्रायजेस पाश्चिमात्य देशांत इतके प्रचलित आहेत व (आर्थिक व राजकिय दृष्ट्या) इतके महत्वाचे समजले जातात की जेव्हा जेव्हा अर्थव्यवस्था आणि करप्रणालीबद्दल चर्चा होते तेव्हा या स्मॉल अँड हाऊसहोल्ड एंटरप्रायजेसचा उल्लेख अमेरिकन राष्ट्रपतीलाही करावा लागतो.+१००
येस! +१००
फक्त लढ म्हणून वगैरे असं काही होत नसतं हो!
सध्या