जी गाणी आपण वारंवार ऐकतो किंवा जी गाणी वारंवार आपल्या कानावर आपसूकच पडतात त्या गाण्यांशी आपला गाण्यांचा पलिकडचा संबंध जोडला जातो असे मला वाटते. आपण ज्या परिस्थितीमध्ये ही गाणी ऐकतो त्या परिस्थितींशी आपली आठवणींच्या रुपाने नाळ जोडून ठेवण्याचं महत्त्वाचं काम ही गाणी करत असतात.
सहमत...लिहीलेले आवडले.
लक्ष्मी-प्यारेंचे बॉबी, पत्थर के सनम ची गाणी माझी आवडती आहेत.
तसेच मला खय्याम साहेब खुपच आवडते...त्यांची आवडती गाणी म्हणजे - ये मुलाकात एक बहाना है.., चांदनी रात मे एक बार तुम्हे देखा है, आणि बरीच गाणी.. अर्थात ही गाणी मला कधीच सुमार वाटली नाहीत.
खादाडमाऊ
'भावसरगम' ५-६ वेळा बघूनही माझी तहान भागत नाही तर दुकान चालविण्याची अफलातून हातोटी असणारा माझा मित्र पहिल्याच 'भावसरगम' ला एक साखरझोप काढतो आणि कदाचित साखरेचे भाव आणखी वाढले तर साठा करुन ठेवलेल्या साखरेचे सोने झाले आहे असे स्वप्नही पाहतो.
:-)
मस्त... :-)
पुढचा भाग लवकर येउदेत :-)
("भावसरगम" ची चाहती)स्मिता श्रीपाद
भावसरगम हा एक अनुभव आहे. पहिल्यांदा मी तो अनुभव माझ्या परममित्रासोबत म्हणजे श्रीपाद कुळकर्णी सोबत घेतला. माझे भावसरगमवर प्रेम जडण्याला कारणीभूत श्रीपाद आहे आणि त्याबद्दल मी त्याचा ऋणी आहे.
धन्यवाद, स्मिता!
--समीर
सुरेखच उतरले आहे!
ऐकलेली गाणी कशी का असेनात, ती त्या त्या काळातल्या घटना, परिस्थिती यांच्या सोबत आपल्या मनात खोलवर जतन होतात हे अगदी खरे. गाण्यामुळे आपण त्या मूड मधे जातो.
मला लहानपणी ऐकलेली सकाळी ६ ते ६.३० दरम्यान मुंबई ब वर लागणारी मराठी भक्तिगीते आठवतात. भीमसेनांचे 'राम रंगि रंगले' आजही ऐकले की जो मूड तयार होतो, त्याची मुळे त्या काळात आहेत, ती तिथवर घेऊन जातात.
मस्त लेखन!
अजूनही सकाळी ६ वाजताच्या आकाशवाणी जळगांववरच्या 'आराधना' कार्यक्रमाची गोडी आठवते. सुरेल भक्तीसंगीतात न्हाऊन निघतांना हळू-हळू साखरझोपेतून बाहेर येण्याचा तो अनुभव अवर्णनीय असायचा. धन्यवाद!
--समीर
समीरराव,
अगदी मनापासून केलेले अतिशय सुरेख लेखन.. गाणी आणि त्याबद्दलच्या आपल्या आठवणी खूप छान आहेत, बोलक्या आहेत!
औरभी आने दो बॉस! :)
शास्त्रीय संगीत ऐकायला आवडत असलं तरी त्यातले काही फारसे (तसं पाहिलं तर काहीच नाही) कळत नसल्याने अनावधानाने का असेना त्याकडे थोडं (म्हणजे अगदी खूप हे चाणाक्ष मिपाकरांच्या लक्षात आलं असेलच) दुर्लक्ष होतं.
कळले नाही तरी ऐकायला आवडणे हेच महत्वाचे! सबब, ऐकणे सुरू ठेवा. आमची म्हातारी पुरणपोळी कशी करते हे आजतागायत मी तरी कुठे जाणून घेतले आहे? तरीही तिच्या हातची पुरणपोळी मला आवडतेच ना?! :)
भावगीते, चित्रपट गीते सुरेखच असतात हे अगदी निर्विवाद परंतु आमच्या अभिजात संगीतातही छान छान साजूक सुंदर गानमिठाईचे डबे भरून ठेवले आहेत त्याचाही आस्वाद घेणे सुरूच ठेवा..! :)
आपला,
(गानप्रेमी) तात्या.
धन्यवाद, तात्या.
गाण्यांचं जग थोडं अजबच असतं; मला दीदींचं 'बसेरा' मधलं "जहॉं पे सवेरा हो, बसेरा वहीं हैं..." हे तरल गीत आवडतं पण कधी-कधी हिमेशचं "ऐ मेरी मेरी जोहरा जबीं..." हे पण आवडतं. :-) "बगळ्यांची माळ्फुले..." हे मी जितकं समरसून ऐकतो तितकंच समरसून मी "कोंबडी पळाली.." पण ऐकतो. बडी गंमत हैं साली!!! :-)
--समीर
अगदी खरे लिहीले आहे.
आता तम्मा तम्मा लोगे हे गाणे मला उगाचच माझ्या बालपणात घेऊन जाते. कारण शाळेत २री-३रीत असताना बाई वर्गाबाहेर पडल्या की आम्ही सर्व पोरं वर्गात जोरजोरात ओरडून गायचो. :) तसे 'रूप सुहाना लगता है', 'तू मिले दिल खिले',' काश कोई लडका मुझे प्यार करता ' इ. गाणी शाळेतल्या दिवसाची आठवण करून देतात कारण तेव्हा अर्थ कळत नसतानाही ही गाणी म्हणायचो.(आणि त्या 'रुप सुहाना लगता है' गाण्यात त्या हिरोने हिरोहिनच्या **मधे तलवारीचे टोक टेकवणे बघून तर गंमत वाटे)
७वीत असलेला 'बगळा' हा धडा आणि त्याच काळात विविधभारतीवर संध्याकाळच्या वेळेला ऐकलेले 'बगळ्यांची माळ फुले' हे गाणे कायमचे घर करून बसले. का काही माहीत नाही.
त्यामुळे तुमचा लेख पटला. :)
पुण्याचे पेशवे
Since 1984
तम्मा तम्मा लोगे हे गाणं मला देखील आवडायचं :-) माझ्या काकांनी (वय तम्माच्या वेळेस साधारण ५२) जेंव्हा हे गाणं ऐकलं तेव्हा ते वेडे झाले आणि पहाटे ६ वाजता ते त्यांच्या म्युझिक सिस्टीम वर मोठ्या आवाजात कुणाचीही तमा न बाळगता तम्मा तम्मा लावायचे. त्यांना असच वेड 'कजरा रे...' च्या वेळेस लागल्याचे स्मरते. :-) धन्यवाद.
--समीर
हल्लीची गाणी आवडतात, पण कुठल्या काळाशी नाते सांगत नाहीत, असे वाटते.
आणि कविता क्रुष्णमूर्ती, अलका याज्ञिक, सुरेश वाडकर, उदीत नारायण, गेला बाजार कुमार शानु, अशा गुणी गायकांना हल्लीच्या प्रीतम-रेशमिया मंडळींनी घरीच बसवले आहे.
अमितकुमारही मला प्रचंड आवडायचा. `बडे अच्छे लगते हैं' म्हणावं, तर त्यानंच! महंमद अझीजची आम्ही यथेच्छ टवाळी उडवायचो. पण तरीही त्याने गायलेल्या `तू मुझे कुबूल' ला सलामच आहे आपला!
बाकी, तुमच्यासारखे मळ्या-बिळ्यात व्हिडिओवर पिक्चर आम्हीपण बघितले आहेत.
गेला तो काळ!!
मलाही आवडायचा. "देखो देखा है ये मैने एक सपना..." खूप छान गायले होते त्याने. 'जीवा' मधलं "रोज रोज आँखों तले..." हे देखील खासच! मो. अझीज "तू मुझे कुबूल..." मध्ये तळपला होता. तसाच शब्बीर कुमार नावाचा बद्धकोष्ठी गायक 'बेताब' मध्ये तळपला होता. "बादल युं गरजता है..." असं ज्यावेळेस तो अगदी कळवळून म्हणायचा तेंव्हा और बहुत कुछ गरजता है की काय असं वाटून याने पटकन मोकळं व्हावं असं वाटायचं. :-) (विनोद तसा थोडा छपरी आणि थोडा बीभत्स आहे पण मोह आवरत नाहीये. क्षमस्व!) :-) धन्यवाद!
--समीर
लेख छान उतरला आहे. 'स्वर आले दुरूनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी' म्हणजे काय ते यावरून थोडेफार उमजावे. मागे रामदास यांनी 'बगळ्यांची माळ फुले'वर एक अप्रतिम लेख लिहिला होता, त्याची पुन्हा आठवण झाली.
थोडी गाणी इकडची तिकडे होतील पण बहुदा वेगळ्या वेगळ्या दशकातील संगीतावर वाढलेल्या प्रत्येकाचे हे मनोगत.
(सकाळपासुन रात्रीपर्यंत विविधभारतीच्या संगीतावर कान कोरलेला) सहज
प्रतिक्रिया
छान लेख..अजुन येउ द्या..
मस्त
गाणी
छान लिहिले आहे :-)
भावसरगम
छान सुरेल
अतिशय छान!
बरोबर!
समीरराव, अग
धन्यवाद, तात्या!
अगदी खरे
तम्मा तम्मा
खरे आहे!
अमित कुमार
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सुंदर लेख
धन्यवाद!