मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बेळगाव नक्की कुणाचे?

डॉ.प्रसाद दाढे · · काथ्याकूट
पुन्हा एकदा स॑युक्त महाराष्ट्राच्या चळवळीची 'निपाणी, कारवार, बेळगावसहित स॑युक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!' ही घोषणा गाजू लागली आहे. थोडी-फार कल्पना असली तरी माझ्या पिढीने 'ती' चळवळ पाहिलीच नाही अन त्याविषयी पूर्ण माहीतीही नाही. खर॑ तर सध्याची बरीचशी मराठी मुल॑ कॉन्व्हे॑ट कि॑वा सेमी-कॉन्व्हे॑ट्मध्ये जातात (कि॑वा गेलेली आहेत. उदाहरणच हवे असेल तर माझ्याबरोबर कार्यरत असलेले सत्तर ते ऐ॑शी टक्के मराठी डॉक्टर्स इ॑ग्लीश माध्यमातले आहेत व मराठी वर्तमानपत्रसुद्धा वाचत नाहीत). त्या॑ना स॑युक्त महाराष्ट्र कि॑वा मराठी अस्मिता वगैरे गोष्टी॑बद्दल काडीचे सोयरसुतक नाही. कटू असल॑ तरी सत्य आहे हे. अर्थात हा विषय वेगळा असला तरी अप्रत्यक्षरित्या स॑बधित आहेच. बेळगावमध्ये जर ७५ % टक्के मराठी भाषिक असतील व त्या॑ची महाराष्ट्रात सामील होण्याची खरोखरीच इच्छा असेल तर कर्नाटक नक्की का विरोध करीत आहे? काही सबळ कारण आहे की उगीच आपला इगो दाखवित आहेत? मधूनच हे आ॑दोलन डोके वर काढीत असते पण ते॑व्हा (म्हणजे आचार्य अत्रे वगैरे असता॑ना) जेव्हढा आवेश, जोर होता तेव्हढा दम वाटत नाही. मधल्यामधे एसट्या फक्त फुटतात.

वाचने 9016 वाचनखूण प्रतिक्रिया 26

अमोल केळकर Wed, 01/21/2009 - 17:31
मधूनच हे आ॑दोलन डोके वर काढीत असते निवडणुक जवळ आली म्हणायाची. मतदार यादीत नाव आहे का पहायला पाहिजे. -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

नितिन थत्ते Wed, 01/21/2009 - 17:37
त्या॑ना स॑युक्त महाराष्ट्र कि॑वा मराठी अस्मिता वगैरे गोष्टी॑बद्दल काडीचे सोयरसुतक नाही. कटू असल॑ तरी सत्य आहे हे. हा साक्षात्कार झाला हे बरे झाले. इश्शूचं म्हणाल तर माहिती हवी असेल तर काढता येते.

In reply to by वाहीदा

शंकरराव Wed, 01/21/2009 - 18:50
आक्काबाई तूझे म्हणने बरोबर आहे ultimately who cares आम्ही न भांडता असे म्हणातो बेळ्गाव हिदुस्थानात आहे शंकरराव बेळ्गावकर सभासद WHO (world of hindusthani origin) सभासद व्हा :-)

In reply to by शंकरराव

वाहीदा Wed, 01/21/2009 - 19:15
कसले सभासद ?? तुम्ही original बेळ्गावकर आहात की नाहीत याची तरी कोणाला पड्ली आहे ?? original कश्मीरी सांगुन सांगुन थकले तुमचे कोण ऐकणार आहे ?? असे नेट वर बरेच असतात आम्ही original सांगणारे who cares ?? ~ वाहीदा

In reply to by वाहीदा

शंकरराव Wed, 01/21/2009 - 19:42
आक्काबाई who cares चे सभासद व्हा असे म्हणतो आहे आम्ही ....आता कश्मीर विषय आलाच आहे तर आम्ही असेही न भांडता म्हणातो origin काश्मीरी बेळ्गाव अन काश्मीर हिदुस्थानात आहे hindusthani origin असले की सर्व त्यातच आले ..... अल्याड बेळ्गाव पल्याड काश्मीर कस... अंगाशी शंकरराव बेळ्गावकर via जम्मू सभासद WHO (world of hindusthani origin) सभासद व्हा :-)

In reply to by शंकरराव

वाहीदा गुरुवार, 01/22/2009 - 10:05
म्हणुनच मी तुमच्या या WHO (world of hindusthani origin) ची Care करत नाही कारण त्यानी original World Health Organisation ला धोका आहे. म्हणुनच मोदी ला अमेरीकेचा विजा नाकारला. तुम्हाला अंगाशी किती लावायचे अन किती झटकायचे ते आम्ही बघुन घेउ ...बाकी ईतर बघ्याची भुमीका नेहमी प्रमाणे घेतच आहेत बाकी भुकंणार्यां वर बन्दी नाही मोकाट ही रस्त्यात बरेच दिसतात आम्ही मात्र आमच्या वाक्यावर कायम ultimately who cares ~ वाहीदा

In reply to by वाहीदा

विसोबा खेचर Fri, 01/23/2009 - 08:29
बाकी भुकंणार्यां वर बन्दी नाही मोकाट ही रस्त्यात बरेच दिसतात लगेच हमरीतुमरीवर येऊन भांडणे करू नका आणि भाषा जपून वापरा! तात्या.

In reply to by शंकरराव

वाहीदा गुरुवार, 01/22/2009 - 10:39
म्हणुनच मी तुमच्या या WHO (world of hindusthani origin) ची Care करत नाही कारण त्यानी original World Health Organisation ला धोका आहे. म्हणुनच मोदी ला अमेरीकेचा विजा नाकारला. तुम्हाला अंगाशी किती लावायचे अन किती झटकायचे ते आम्ही बघुन घेउ ...बाकी ईतर बघ्याची भुमीका नेहमी प्रमाणे घेतच आहेत बाकी भुकंणार्यां वर बन्दी नाही मोकाट ही रस्त्यात बरेच दिसतात आम्ही मात्र आमच्या वाक्यावर कायम ultimately who cares ~ वाहीदा

In reply to by वाहीदा

शंकरराव गुरुवार, 01/22/2009 - 20:06
आक्काबाई तूला फकत सभासद व्हायला सांगितले ग... तूझी यादि तर वाढ्तच चाललीय !! बेळगाव...कश्मीर.. मोदि.. माझ ऍक ..भांडू नकोस जरा दमाने घे.. बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे.. कस .. बाकी तू Care कराची गरज नाही तिथे बरेच लायकीचे आहेत Care करायला तू फक्त तूझ्या मनातला केर साफ कर आता मोदि चा काय संबंध (world of hindusthani origin) मध्ये लाखाने मोदि आहेत... मोदि काय चीज आहे हे अमेरिकेच्या विजा वर नाही अवलंबून नाही का? राहिले WHO (world of hindusthani origin) चे .. त्याची नाव नोंद्णी अमेरिकन कायद्याने व्यवस्थित झाली आहे. अन तूझा म्हणन्याप्रमाणे WHO (world of hindusthani origin) Cares hindusthani origin असले की सर्व त्यातच आले ..... अल्याड बेळ्गाव पल्याड काश्मीर कस... अंगाशी शंकरराव बेळ्गावकर via जम्मू सभासद WHO (world of hindusthani origin) सभासद व्हा :-)

अवलिया Wed, 01/21/2009 - 18:06
सध्याची बरीचशी मराठी मुल॑ कॉन्व्हे॑ट कि॑वा सेमी-कॉन्व्हे॑ट्मध्ये जातात काय सांगता? असेल असेल ऽ.... तुमची माहिती म्हणजे नक्कीच खरी असेल. तुम्ही खोटे कशाला बोलाल... आम्ही थोडेच पेशंट तुमचे आत्ता... :) --अवलिया अवलियाची अनुदिनी

नितिन थत्ते Wed, 01/21/2009 - 18:18
कारण ही दोन्ही बाजूने राजकीय पोळी भाजण्याची चळवळ आहे. आजतागायत महाराष्ट्र, कर्नाटक आणि केंद्रात तीनही ठिकाणी एकाच वेळी बिगर काँग्रेस सरकार आले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सेना भाजप यांना नेहमीच हा मुद्दा फायद्याचा राहिला आहे. म्हणजे असे... आता कर्नाटकात भाजपचे सरकार आहे. तेव्हा महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी कर्नाटक सरकारला विनंती केली की हा प्रश्न लगेच सुटण्यासारखा आहे. पण आता ते म्हणतील की केंद्रात आमचे सरकार नाही आणि केन्द्राच्या परवानगीशिवाय काही होऊ शकणार नाही. जेव्हा महाराष्ट्रात आणि केंद्रात युतीचे सरकार होते तेव्हा कर्नाटकात काँग्रेसचे सरकार होते. तेव्हा कर्नाटक आडमुठेपणा करते असे म्हटले जाई. आता पुढच्या निवडणुकीनंतर केंद्र आणि महाराष्ट्रात युतीचे सरकार आले की हा प्रश्न चुटकीसरशी सुटेल अशी आशा करता येईल. कारण मग तीनही ठिकाणी एकाच पक्षाचे सरकार असेल. येथे काँग्रेसला महाराष्ट्राविषयी आकस आहे ही क्लिच ग्रुहीत धरली आहे.

In reply to by नितिन थत्ते

सुहास गुरुवार, 01/22/2009 - 05:31
आता पुढच्या निवडणुकीनंतर केंद्र आणि महाराष्ट्रात युतीचे सरकार आले की हा प्रश्न चुटकीसरशी सुटेल अशी आशा करता येईल. कारण मग तीनही ठिकाणी एकाच पक्षाचे सरकार असेल. हा गैरसमज आहे... कारण कोणत्याही पक्शाला हा प्रश्न सोडवायचा नाही... उदाहरणार्थ... १९९३ ते १९९८ सेना-भाजप सत्तेत होते आणि १९९६ साली थोड्या दिवसांकरता तरी भाजप... ज्या तातडीने त्या वेळी केन्द्र आणि राज्य सरकारांनी एनरोन परत आणला तेवढी तत्परता त्यांना सीमा प्रश्नाबद्द्ल दाखवता आली असती... एक महत्वाची गोश्ट, कन्नडिगांचा भाशिक अभिमान हा मराठी माणसांपेक्शा प्रखर आहे त्यामुळे तीनही ठिकाणी एकाच पक्षाचे सरकार असून ही फायदा नाही... .... (एक सीमावासीय) सुहास »

सुहास गुरुवार, 01/22/2009 - 05:27
आता पुढच्या निवडणुकीनंतर केंद्र आणि महाराष्ट्रात युतीचे सरकार आले की हा प्रश्न चुटकीसरशी सुटेल अशी आशा करता येईल. कारण मग तीनही ठिकाणी एकाच पक्षाचे सरकार असेल. हा गैरसमज आहे... कारण कोणत्याही पक्शाला हा प्रश्न सोडवायचा नाही... उदाहरणार्थ... १९९३ ते १९९८ सेना-भाजप सत्तेत होते आणि १९९६ साली थोड्या दिवसांकरता तरी भाजप... ज्या तातडीने त्या वेळी केन्द्र आणि राज्य सरकारांनी एनरोन परत आणला तेवढी तत्परता त्यांना सीमा प्रश्नाबद्द्ल दाखवता आली असती... एक महत्वाची गोश्ट, कन्नडिगांचा भाशिक अभिमान हा मराठी माणसांपेक्शा प्रखर आहे त्यामुळे तीनही ठिकाणी एकाच पक्षाचे सरकार असून ही फायदा नाही... .... (एक सीमावासीय) सुहास

विसोबा खेचर गुरुवार, 01/22/2009 - 08:31
बेळगावमध्ये जर ७५ % टक्के मराठी भाषिक असतील व त्या॑ची महाराष्ट्रात सामील होण्याची खरोखरीच इच्छा असेल तर कर्नाटक नक्की का विरोध करीत आहे? आमच्या मते बेळगाव हे प्रथम भारताचे आणि त्यानंतर महाराष्ट्राचेच! ७५% मराठी भाषिक असतांना त्यात कर्नाटकाचा काहीच संबंध नाही.. काही सबळ कारण आहे की उगीच आपला इगो दाखवित आहेत? येस्स. इगोच! दुसरं काय? मधूनच हे आ॑दोलन डोके वर काढीत असते पण ते॑व्हा (म्हणजे आचार्य अत्रे वगैरे असता॑ना) जेव्हढा आवेश, जोर होता तेव्हढा दम वाटत नाही. मधल्यामधे एसट्या फक्त फुटतात. सहमत आहे.. अवांतर - अहो पण पंढरीच्या विठोबालाही 'कानडाऊ विठ्ठलू' असं म्हटलंय त्याचं काय?! :) तात्या.

पाषाणभेद गुरुवार, 01/22/2009 - 10:42
बेळगाव हे महाराष्ट्राचेच आहे. प्रत्येक देश /मानव समूह हा आपले मूळ टिकवण्याचा प्रयत्न करत असते. तोच न्याय येते लावा ना! (हां , पण हाच न्याय कुणी कर्नाटकालापण लावू शकतो.) तेथे आंदोलन होते आहे. म्हणजे तेथून धूर निघतो आहे आणि जेथे धूर निघतो तेथे काहितरी जळते. एक ईंचपण जागा देत नाही ही आरेरावीची भाषा झाली. काहीतरी सलोखा त्यांनी केलाच पाहीजे. शेवटी प्र. के. अत्रेंची क्षमा मागून म्हणतो की, गेल्या दहा हजार वर्षांपुर्वी बेळगाव हे महाराष्ट्राचेच होते आणि पुढच्या दहा हजार वर्षांनंतरही बेळगाव हे महाराष्ट्राचेच राहणार! जय महाराष्ट्र -( महाराष्ट्रप्रेमी )पाषाणभेद

In reply to by पाषाणभेद

जनोबा रेगे गुरुवार, 01/22/2009 - 11:52
एक जोक आठवला: एकदा कानडी लोक॑ आचार्य अत्रे॑कडे जातात व म्हणतात,' बेळगाव कर्नाटकचेच कारण बेळ हा शब्द कानडी आहे', त्यावर अत्रे म्हणतात,' त्या हिशेबाने मग 'ल॑डन' भारतात हवे :)

डॉ.प्रसाद दाढे Fri, 01/23/2009 - 08:14
कर्नाटकची भूमिका कोणी सा॑गू शकेल का? बेळगाव कर्नाटकमध्ये ठेवल्याने त्या॑चा असा काय फायदा होणार आहे? महाजन आयोगाने असा काय अहवाल दिला व का दिला? वर ह्या विषयावर चर्चा सोडून बाकी वैयक्तिक भा॑डणेच चालू आहेत ती नको आहेत.

धनंजय Fri, 01/23/2009 - 08:54
बेळगाव जिल्हा महाराष्ट्राचा असो किंवा कर्नाटकाचा, तिथले शेतकरी म्हादेई नदीचे पाणी आडवून गोव्याला कोरडे करणार आणि दूधसागर सुकवणार. शेवटी या दोन मोठमोठ्या राज्यांच्या भांडणातही नुकसान गोव्याचेच व्हायचे आहे.