काही वर्षांपूर्वीची गोष्ट, दिल्लीच्या दत्त विनायक मंदिरात सत्यनारायणाची कथा सुरु होती. मंदिराच्या प्रांगणात एक ग्रहस्थ काही लोकांसोबत सत्यनारायण कथेचा माखौल उडवित होते. मी हि तिथे पोहचलो. थोड्यावेळातच लक्ष्यात आले, हे ग्रहस्थ नुकतेच पुण्याहून परतले आहे, आणि तिथल्या एका महाविद्वानाची मुक्ताफळे आपल्या तोंडाने फेकत आहे. मी हि त्या चर्चेत शामिल झालो. एखादी कथा हजारों वर्षांपासून जनमानसात रुजलेली आहे, तर निश्चितच त्या कथेत सामान्यांना भावणार काही तरी असणारच. सत्यनारायणाची कथा सामान्य माणसाला सत्यमार्गावर चालण्याची प्रेरणा तर देतेच शिवाय सामाजिक समरसतेचा संदेश हि देते. समाजातील सर्व वर्गांना हि कथा एक सूत्रात बांधते.
हिंदू धर्मात सदैव दोन प्रवाह राहिले आहे. एक प्रवाह स्वत:चे वर्चस्व स्थापित करण्यासाठी समाजात दुही माजविण्याचे कार्य करतो, ज्याला आपण आसुरी शक्ती म्हणू शकतो तर दुसरा प्रवाह समाजात सौख्य निर्माण करणारा अर्थात दैवीय शक्ती म्हणू शकतो. सत्यनारायण कथा सामान्य लोकांसाठी आहे. सत्यनारायणाची कथा लोकांना सत्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देते व समाजात सौख्य हि निर्माण करते. नवीन कामाची सुरुवात लोक सत्यनारायणाची कथा करून सुरु करतात. नवीन विवाहित जोडपे या कथेचे श्रवण करून आपला संसार सुरु करतात. सत्य आणि परस्पर विश्वास हे सुखी जीवनाचे सार आहे.
सत्यनारायण कथेतील पहिले पात्र एक दरिद्री ब्राम्हण आहे. हा ब्राम्हण दरिद्री का बरे असेल हा विचार मनात आलाच. जर ब्राम्हण जास्ती दक्षिणेच्या लालचाने पूर्व निश्चित यजमान सोडून दुसरी कडे जाईल तर काय होईल. त्याला पहिल्या यजमानाशी खोटे बोलावे लागेल. काही काळ ब्राम्हणाला जास्त दक्षिणा मिळेल. पण नंतर अधिकांश यजमान त्याला बोलावणे सोडून देतील. ब्राह्मण दरिद्री होईल. अश्याच एका दरिद्री ब्राम्हणाला नारद मुनींनी सत्याचरणाचा उपदेश केला. ब्राम्हणाची परिस्थिती बदलली. तो श्रीमंत आणि समृद्ध झाला.
दुसरे पात्र एक मोळीविक्या आहे अर्थात आजच्या पुरोगामी भाषेत म्हणायचे तर दलित समाजातला. तो ब्राम्हणाचा घरी येतो, कथा ऐकतो आणि प्रसाद हि भक्षण करतो. याचा अर्थ त्या काळी ब्राम्हणाच्या घरी हि दलिताचे स्वागत होत होते. दुसर्या शब्दांत सत्यनारायण कथेत अस्पृश्यतेचा निषेध केला आहे.
या कथेत अंगध्वज नावाचा राजा हि एक पात्र आहे. राजा म्हणजे क्षत्रिय. जंगलात गवळी समाजाचे लोक (वनवासी) सत्यनारायणाची कथा करीत आहे. राजा अंगध्वज त्यांच्या हातून प्रसाद स्वीकार करीत नाही. जातीपातीच्या भेदभावावर विश्वास ठेवणारा राजाच्या हातून प्रजेचे कल्याण संभव नाही. राजा प्रजेचा विश्वास गमावतो. परिणाम, राजाचे राज्य नष्ट होते. राजा अंगध्वजाला त्याची चूक उमगते. तो वनात राहणार्या गवळी लोकांसोबत सत्यनारायणाची पूजा करतो आणि त्यांच्या सोबत प्रसादाचे भक्षण करतो. अर्थात राजा अंगध्वज सामाजिक भेदभावाच्या नीतीचा त्याग करतो व जनतेचा विश्वास पुन: संपादित करतो. राजाने सामाजिक भेदभाव सोडून समस्त प्रजेशी भातृभाव ठेवला पाहिचे याचा बोध या कथेतून मिळतो.
या कथेत साधूवाणी (वैश्य समाजातला) हि एक पात्र आहे. हा व्यक्ती दिलेला शब्द न पाळणारा आणि सदैव खोटे बोलणारा आहे. हिंदीत एक म्हण आहे 'काठ कि हांडी बार बार नही चढती'. साधुवाणीला खोटे बोलण्यचे फळ भोगावे लागतात. कैद हि भोगावी लागते आणि व्यापारात नुकसान हि होते. शेवटी साधुवाणीला सत्य मार्गावर चालण्याचे महत्व कळते. वैश्याला (व्यापारीला) हि सत्य मार्गावर चालायला पाहिजे हा बोध या कथेतून मिळतो.
सारांश सत्यनारायणाच्या कथेत समाजातील सर्व वर्णांचे पात्र -ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, दलित आणि वनवासी आहेत. सामान्य माणसाला कळावे म्हणून कथेत अनेक चमत्कार हि आहेत. पण या चमत्कारांच्या मागचे कारण समजून सत्यनारायण कथेकडे बघितले तर कळेल हि कथा सर्वांनी सत्य धर्माचे आचरण करावे आणि जातिगत भेदभावाचा मार्ग सोडून बंधुभावाने राहण्याचा संदेश देते. त्या गृहस्थाना सत्यनारायण कथे कडे पाहण्याची वेगळी दृष्टी मिळाली. बिना वाचता, समजता पुरातन कथांचा विरोध करणे हि एक प्रकारचे अज्ञान आहे.
वाचने
7522
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त लिहिले आहे!
सहमत...
In reply to मस्त लिहिले आहे! by DEADPOOL
काका मिशनवर आहेत जणू...?
हो ना तजो!
In reply to काका मिशनवर आहेत जणू...? by तर्राट जोकर
काका मिशनवर आहेत जणू...?
In reply to काका मिशनवर आहेत जणू...? by तर्राट जोकर
काका अप्रतिम लेख लिहिला आहेत.
जातच का , धर्मबंधुत्वही हवे.
मुग्धे नक्की काय म्हणायचंय
In reply to जातच का , धर्मबंधुत्वही हवे. by mugdhagode
ओह साॅरी! मुग्धाताई म्हणतो!
In reply to मुग्धे नक्की काय म्हणायचंय by विजय पुरोहित
सत्यनारायण हजारोंवर्षांपासून
गावडे आणि प्रगो ककांच्या
सत्यनारायण कथेईतकाच भंपक लेख.
तुम्ही आसुरी शक्ती व जिहादी
In reply to सत्यनारायण कथेईतकाच भंपक लेख. by सतिश गावडे
आजच दुपारी माझ्या
In reply to तुम्ही आसुरी शक्ती व जिहादी by तर्राट जोकर
मला कसलाच उलगडा झाला नाही
In reply to आजच दुपारी माझ्या by सतिश गावडे
फार लोड घेऊ नका. सोडून द्या =
In reply to मला कसलाच उलगडा झाला नाही by तर्राट जोकर
तुम्ही तजोना न समजणारा
In reply to फार लोड घेऊ नका. सोडून द्या = by सतिश गावडे
तुम्हाला आमच्या दोघांमधे
In reply to तुम्ही तजोना न समजणारा by DEADPOOL
गावडेजी तुमच्याच भाषेत
In reply to सत्यनारायण कथेईतकाच भंपक लेख. by सतिश गावडे
अग्गोबै !
In reply to गावडेजी तुमच्याच भाषेत by विवेकपटाईत
ऋतं वदिष्यामि, सत्यम
In reply to गावडेजी तुमच्याच भाषेत by विवेकपटाईत
तीर्थ प्रसादाची सोय धागा
हसाव की रडाव.
हा बांग्लादेशच्या अधिकृत
In reply to हसाव की रडाव. by सतीश कुडतरकर
सामाजिक समरसतेची कथा
In reply to हा बांग्लादेशच्या अधिकृत by माहितगार
त्यामुळे तर काही भटजी मनास
In reply to सामाजिक समरसतेची कथा by सतीश कुडतरकर
@ त्यामुळे तर काही भटजी मनास
In reply to त्यामुळे तर काही भटजी मनास by वैभव जाधव
girhaik aslyavar maal vikla
In reply to त्यामुळे तर काही भटजी मनास by वैभव जाधव
>> girhaik aslyavar maal
In reply to girhaik aslyavar maal vikla by सतीश कुडतरकर
त्यामुळे तर काही भटजी..
In reply to त्यामुळे तर काही भटजी मनास by वैभव जाधव
अगदी त्रयस्थाच्या नजरेने या
In reply to त्यामुळे तर काही भटजी.. by माहितगार
"वाहतुकीला अडचण होणार नाही,
In reply to अगदी त्रयस्थाच्या नजरेने या by सतिश गावडे
एकंदरीत पुजेचा विधी पाहता
In reply to अगदी त्रयस्थाच्या नजरेने या by सतिश गावडे
सहमत
In reply to एकंदरीत पुजेचा विधी पाहता by प्रचेतस
:)
In reply to सहमत by नंदन
शक्य तेवढ्या जुन्या