Skip to main content

मंदिरे व आक्रमणे

लेखक रमेश भिडे यांनी मंगळवार, 05/04/2016 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
भारतावर मुस्लिमांचे आक्रमण झाले व मंदिरावर हल्ले होऊन मंदिर पाड़ण्याल्या सुरुवात झाली . मंदिर हे भारतीय श्रद्धा स्थानाचे केंद्र बिंदुच आहे. त्या मागे शास्त्रिय कारण ही आहे मात्र अशा आपल्या श्रद्धा स्थानांवर मुस्लिम टोळक्यानि नेहमीच हल्ले केले आता ही असे अतिरेकी करतच आहेत. यात आपल्या काही महत्वाच्या मंदिराना कायमच नुकसान सहन कराव लागल. सध्या जे काही मंदिर प्रवेशा बाबत सुरु आहे तेहि काही असच आहे मंदिरात प्रवेशा च्या नावाखाली जो गोंधळ घातला जात आहे तो चिड निर्माण करणारा आहे. याला कारण हे असले आंदोलन करणारे पुरोगामी. आंदोलन करणाऱ्या महिला या नेहमी मंदिरात जाणाऱ्या व खरोखर देवभक्ति असणाऱ्या अथवा संत मीरा सारख्या कृष्ण वेड्या किंवा पांडुरंग प्रेमी जनाबाई सारख्या असत्या तर त्याचा हट्ट प्रत्यक्ष देवाला ही पुरवावा लागला असता मात्र आंदोलन कोणत्या महिला करत आहेत ज्यांचा व देव धर्माचा काडिमात्र ही संबंध नाही ज्या समलैंगिगतेच्या समर्थनासाठी भर रसत्यात एकमेकिना चुम्बन करतात अशा महिलांना मंदिर प्रवेश हवा आहे हेतु यांचा हेतु स्पष्टच आहे प्रसिद्धि आणि भक्तिच वातावरण गढुळ करणे याला मंदिर प्रशासन आपल्या पद्धतीने विरोध करत ही आहे पन काही गोष्टींचा विचार मात्र गम्भीरतेने होणे अनिवार्य आहे मंदिर समित्यानि मंदिरा मधे काही नियम कड़क करण्याची गरज आहे. आज किती मंदिर समिति मधे धर्मशास्त्र जाननारे सभासद आहेत त्यांची संख्या अजिबात नाही असेच म्हणावे लागेल समिति मधे धर्मशास्त्राच् अध्ययन केलेले विद्वान असतील तर देवतेला अनुकूल असे नियम बनवता येतील तिथे असणाऱ्या पूजकांची शुद्धता देखील पाहणे अनिवार्य आहे , मूर्ति शास्त्रातील माहिती किती जनाना असते हे सगळ लक्षात घेण्याची वेळ आली आहे या साठी दक्षिण भारतातील मंदिरांचा आदर्श घ्यायला हवा . आपण जर देवकलेची शुद्धता ठेवली तर लाखो आक्रमण सहन करण्याची व परतून लावण्याची ताकद तो ईश्वर आपणास देईल या साठी आपण ही शुद्धता व पवित्रता याचं पालन करायला हव देव मूर्तिला स्पर्श करण्या आधी आपण खरोखर किती शुद्ध अवस्थेत आहोत याचा विचार प्रत्येकाने करावा मंदिर हे ऊर्जा स्थान आहे तिथे प्रवेश केला की आपोआप च ती ऊर्जा तुम्हाला भेटनार आहे त्या गाभार्यात प्रवेश पहिंजे हा हट्ट का ? आणि खर तर जे मनापासून देवाला मानतात ते असल्या मुर्ख पणाच्या मागण्या करणार ही नाहीत या मागण्या करणारे कोण आहेत हे सामान्य लोक ओळखून आहेत मात्र आता सर्वानी जागे होण्याची वेळ मात्र नक्कीच आली आहे साभार-© तीर्थराज पैठणकर गुरुजी .

वाचने 19970
प्रतिक्रिया 135

प्रतिक्रिया

In reply to by राही

मी तुम्हाला असे कुठेच् सुचवले नाही आहे की महिला समाजोपयोगी काम करतच नाही. त्या करतात व् अनेकदा पुरुषापेक्षा चांगले करून दाखवतात. माझा मुद्दा आहे हे जे आता शनिशिंगणापुरमधे ज्या महिला आंदोलन करत आहेत त्याबद्दल आहे. तुम्हाला पुढे एवरेस्टचे उदाहरण देखिल दिले. अन्ना हजारेचे उदाहरण एक जनरल गोष्ट म्हणुन तुम्ही घेतले पाहिजे. आज सरकार( त्यात आजी माजी दोन्ही आले, स्पष्ट करतो नाहीतर परत तुमचा गोंधळ उडायचा) कित्येक गावात हागनदारी मुक्त गाव, चराइबन्दी, सामजिक वनीकरण याचा प्रचार करते. यश किती मिळते त्यांना? पाच टक्के तरी आहे का? हे हजारेंनि सहज करून दाखवले. त्याचे फायदे त्यांनी लोकांना पटवून दिले. ते पुरुष आहेत म्हणुन त्यांचे उदाहरण नाही दिले.

In reply to by भंकस बाबा

अखेर शिंगणापूर ग्रामस्थांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शनिचौथर्‍यावर स्त्री-पुरुष असा भेदभाव न करता सर्वांना प्रवेश देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. सर्व संबंधित यासाठी अभिनंदनास पात्र आहेत. न्यायालयात लढणार्‍या विद्या बाळ आणि त्यांच्या सहकारी, सामाजिक दबाव आणणार्‍या तृप्ती देसाई आणि त्यांची संघटना, अनेक अप्रसिद्ध महिलागट यांनी हा प्रश्न लावून धरला. डोळस न्यायसंस्था, विवेकी सरकार आणि समजूतदारपणा दाखवणारे ग्रामस्थ यांमुळे तिढा समजुतीने सुटला. या सर्वांचे अभिनंदन.

In reply to by राही

त्रिवार अभिनंदन! आता शनीचा काही कोप-बीप होत नाही ह्या अंधश्रद्धेला सुरुंग लागून वर धाग्यात जी मुक्ताफळे उधळली आहेत त्याला सणसणीत चपराक बसेल.

In reply to by राही

राही, शिंगणापूरची प्रथा स्त्रियांवर अन्याय करण्यासाठी मुद्दाम तर उत्पन्न केली नव्हती ना? मग ती मोडल्याने काय मोठी समानता साधली जाणार आहे? आ.न., -गा.पै.

In reply to by भंकस बाबा

माझे म्हणने असे आहे की या महिलांनी गर्भलिंग परीक्षा, मुलींचे शाळेतील ड्रॉपआउट, त्यांचे कुपोषण, त्यांची परवड यासारख्या ज्वलन्त मुद्द्यावर काम करावे. त्यांच्या कामाने एकदा काय या महिलेंचि ओळख झाली तर कोणीही माईचा लाल त्यांना मंदिर प्रवेशापासून रोखु शकणार नाही.
अच्छा म्हणजे आंदोलन कोण करतयं त्याच्यावर ठरणार की अन्याय बंद करायचा की नाही!! म्हणजे मुळात अन्याय आहे हे मान्य आहे .. पण इगो दुखावतोय तो कोणितरी ऐरागैरा (/ऐरीगैरी??) येउन सांगतोय म्हणून :-))

In reply to by तर्राट जोकर

मंदिरप्रवेश टाळण्याचा नाही तर तो का करावा याची जनतेला माहिती करून देने आवश्यक आहे. तुम्ही व् मी बोलून हा प्रश्न सुटनारा नाही. जी लोक तिथे वर्षानुवर्षे रहातात ज्यात महिलादेखिल आहेत त्यांचे मत देखिल ग्राह्य धरले पाहिजे. पुष्कळ भक्ताची ही धारणा असते की शनिदेवाचा कोप झाला तर आपले आयुष्य बरबाद होईल. मझ्यासारख्या नास्तिक व् तुमच्यासारख्या विद्ववान माणसाने कितीही कंठशोष केला तरी त्यांना ते पटवून देने कठिन आहे. अगदी उद्या शनिमंदिर सर्वाना खुले केले व् गावातील काही जणांवर काही अरिष्ट आले ज्याचा प्रवेशाशी काही संबंध नाही, जर अशा लोकांनी हाय खाल्ली तर त्याला जबाबदार कोण? मंदिर प्रवेश बंदीपासून असा कोणताही फरक या पेज 3 महिलांना पडणार नाही आहे.

In reply to by राही

मांसाहारामुळे माणूस अपवित्र होतो काय?
आणि देव तर बिचारा काहीच खात नाही.
जडचेतनामध्येसुद्धा फरक ईश्वर का करेल?
आमचा देव करतो. पटत नसेल तर मुसलमान व्हा.

In reply to by काळा पहाड

तुमचा सल्ला मी का मानावा? आणि आता तर मुसलमान व्हा, पाकिस्तानात जा ह्या आज्ञा वापरून वापरून अर्थहीन झाल्या आहेत. दुसरे काहीतरी ज्वलज्जहाल आदेश/फर्माने काढा बुवा. आमचा देव फरक करत नाही. आणि मी हिंदु आहे. आता हे हिंदूंच्या देवाचे वागणे पटत नसेल तर बघा बुवा. मी काही आदेश देत नाही अमुक करा तमुक करा म्हणून.

In reply to by राही

तुम्ही हिंदू असाल तर एकच करा. मांसाहारी प्रसाद घेवून महाराष्ट्रातल्या दगडूशेठ, महालक्श्मी, कुठलाही गणपती, शंकर, दुर्गा, साईबाबा वगैरे मंदिरात देवाला दाखवून पहा. नै म्हणजे तिथे असलेले हिंदू लोक तुमच्याशी सुरवातीला ज्या वेळी वाद घालतील, त्यावेळी हाच प्रतिवाद करा. परतलात तर मग बोलू.

In reply to by काळा पहाड

हिंदूंच्या देवांना मांसाहारी नैवेद्याचे वावडे नसते ही माहिती एका कट्टर हिंदूला नक्कीच असायला हवी अशी माझी भाबडी आशा होती.

In reply to by काळा पहाड

देवी समोर बकरा मारतात तो चालतो का ? इथे लक्ष्मीच्या जत्रेत जवळपास २५ बकरी मारून पूर्ण गावाला " प्र सा द " म्हणून दिलेला आहे लोकांनी . मुद्दा काय आहे, तुमच चाललाय काय

रमेश भिडे, लेखात व्यक्त केलेल्या भावनेशी सहमत आहे. विषमता दूर करायला थुक्टीढोसईछाप ढोरोगाम्यांना मंदिरेच का सापडतात? देवाशी निगडीत जी काही पद्धती वा परंपरा आहे तिला स्त्रीपुरुष विषमतेच्या चष्म्यातून बघायचा अट्टाहास का? उद्या असाही आरोप करता येईल की, सगळ्या स्त्रियांनी पुरुषांविरुद्ध कट करून मुलं जन्माला घालायचं रहस्य दडवून ठेवलंय बघा ! आ.न., -गा.पै. विशेष सूचना : १. थुक्टीढोसई म्हणजे ढोस ढोस दारू ढोसून ठिकठिकाणी थुंकत जाणारी व्यक्ती. दहापैकी नऊ घोट गिळणार आणि एक घोट थुंकून दारू त्यागल्याचा आव आणणार. हिचा तृप्ती देसाई यांच्याशी काहीही संबंध नाही. २. ढोरोगामी म्हणजे ढोर आणि माणूस यांत धर्मामुळे फरक पडतो हे न जाणणारे. हे ढोराप्रमाणे निर्बुद्धपणे मार्गक्रमण करतात. यांचा स्वयंघोषित पुरोगाम्यांशी घनिष्ट संबंध आहे.

In reply to by गामा पैलवान

असे निंदाव्यंजक शब्द कुणाच्याही बाबतीत वापरू नयेत असे मत 'महत्त्वाची सूचना' धाग्यावर प्रगट झाले आहे.

In reply to by राही

त्यांचा आयडी उडाला तरी पुन्हा बाइज्जत बरी होतो.

In reply to by गामा पैलवान

अच्छा म्हणजे ह्या असल्या कॉमेंट लिहिताना तुम्ही थुक्टीढोसई झालेलात तर!! उत्तम शब्दच खुंटले! तरीही एक शेवटचा प्रयत्न, मुद्द्यावर बोला हो वैयक्तिक शेरेबाजी करून काही साध्यहोत नाही, वरतुन ज्या महान धर्माची आपण होलसेल डीलरशिप घेतल्यागत वागता आहात त्याला होलसेल मधे कमीपणा येतो!. असो!!

In reply to by नाना स्कॉच

स्कॉचनाना, माझी थुक्टीढोसई झाली म्हणता? १. मी दहापैकी नऊ घोट दारू गिळल्याचं दाखवा. २. मी दारूचा दहावा घोट थुंकल्याचं दाखवा. ३. मी दारूचा त्याग केल्याचा आव आणलेला दाखवा. वरील तिन्ही दावे सफल असतील तर आणि तरंच माझी थुक्टीढोसई झाल्याचं मान्य करेन. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माफ़ करा चुक झाली आपण महातप्त प्रकाशमान धर्मसूर्य आहात अन आपण नसता हिंदु धर्म रसातळाला जाईल. _______________/\__________________

In reply to by गामा पैलवान

हॅलो!! हां पोचलात न हरभर्याच्या झाडावर!! बरंय बरंय नीट बसा हं पड़ताल नाहीतर नेमक्या ऊंचीवरुन अन नेमकेच प्रकरण शेकेल! :D जरा सांभाळून बरंका हो धर्मयोद्धे!.

In reply to by नाना स्कॉच

स्कॉचनाना, हरभऱ्याच्या झाडावर चढून देखील आम्ही तुमच्या खुशालीचं कंत्राट भगवंतांच्या हवाली केलं आहे. हे तुम्हाला कळलं असेलंच! तसे तुम्ही हुशार आहात. बघितलंत? असा लीन भाव ठेवावा म्हणतो मी. बाकी चालू द्या. आ.न., -गा.पै.

लेख नक्की कशावर लिहायचा याचा लेखकाचाच गोंधळ उडालेला आहे,या लेखात मुस्लिमांना आणण्याचा काही एक संबंध नव्हता.मुस्लिम शासकांनी मंदीरे पाडली याला कोणताही पुरावा नाही,काही मंदिरात अमाप संपत्ती असायची ,ती लुटण्याच्या वळेस काही मंदीरांची मोडतोड मुस्लिम शासकांनी केली असेल, याचा अर्थ सगळे मुस्लिम शासनकर्ते हिंदूविरोधी होते असा होत नाही.मध्ययुगात मुस्लिम शासकांनी काही मंदिरे तोडलीही असतील,त्याचा दाखला देऊन सांप्रत काळच्या मुस्लिमांना टारगेट करणे योग्य नव्हे.

In reply to by गरिब चिमणा

त्यावेळेचा मुस्लिमही कुराणाचे पालन करत होता आणि आजचा मुस्लिम हि कुराणाच follow करतो .. इस्लाम मूर्तीपूजा मनात नाही .. म्हणून बहुतेक मंदिर मुस्लिम शासकानीच उद्धवस्त केली

In reply to by अमित_निंबाळकर

बहुतेक मंदिर मुस्लिम शासकानीच उद्धवस्त केली नक्की काय म्हणायचे आहे? खालच्या दोन पैकी काय? १. उद्धवस्त केलेल्यातली बहुतेक मंदिरं मुस्लिमांनी उद्धवस्त केली. २. व्यवस्थित असलेल्यांपैकी बहुतेक मंदिरं मुस्लिमांनी उद्धवस्त केली.

In reply to by अमित_निंबाळकर

धन्यवाद! बहुतेक म्हणजे किमान ५१% टक्के. व्यवस्थित असलेल्यांपैकी किमान ५१% मंदिरं मुस्लिमांनी उध्वस्त केली ह्याबद्दल कुठेतरी विदा आहे की हे आपले वैयक्तिक मत आहे? लक्षात घ्या. 'मुस्लिमांनी मंदिरांना हातसुदिक लावला नाय' असल्या भ्रमात मी नाही. मला सत्य जाणून घ्यायचे आहे.

In reply to by गरिब चिमणा

लेखात मुस्लिमांना आणण्याचा संबंध असा आहे की तेव्हा त्यांनी आक्रमणं केली त्यात लुटालुट करणे हा एक भाग होता, आता लुटालूट करण्यासाठी काही नतद्रष्ट हिंदू कायदेशीर आक्रमणं करत आहेत. असाच अर्थ असावा. खखो ते पैठणकर गुरुजी जाणे.

In reply to by बाळ सप्रे

=)). रच्याकने- सप्रेसाहेब, तोच मुद्दा, तोच काथ्याकूट. तुम्हाला परत परत करायची इच्छा आहे काय? ह. घ्या. :)

सगळी मंदीरं, चर्च, मशीदी इ पाडून, हवं तर वास्तुशास्त्रीयरीत्या चांगला नमुना असलेली मोजकी धर्मस्थानं अपवाद म्हणून टूरिस्टांसाठी प्रत्येकी दोन रुपये घेऊन मोकाट सोडून, उर्वरित ठिकाणी शाळा-काॅलेजं आणि हाॅस्पिटलं बांधली जावीत अशी कळकळीची इच्छा आहे. त्याचसोबत नवी धर्मस्थानं/श्रद्धास्थानं बांधण्यावर बंदी यायला हवी.

In reply to by वडापाव

वडापाव, नवी श्रद्धास्थानं बांधायला बंदी घालणं अयोग्य अन अशक्य आहे. जगात एव्हढी लोकसंख्या वाढली आहे. तरी लोकांनी पोरे काढायचा उद्योग थांबवला आहे का? आ.न., -गा.पै.

देवस्थानात तरी कोणता प्रामाणिकपणा राहिलाय. पैशाचा भष्ट्राचार, तिकीट फाडले तर २तासात दर्शन. देवस्थानांकडे एवढा पैसा आहे पण एकही देवस्थानाने दुष्काळासाठी, शेतकर्यांना मदत दिली नाही. सरकारने सर्व देवस्थाना जवळील पैसा सरकारी जमा करून समापयोगी वापरावा.

In reply to by तर्राट जोकर

तजो, शासननियुक्त पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमधला असीम भ्रष्टाचार तुमच्या कानी आला असेल अशी आशा आहे. शिरडीच्या संस्थानात भ्रष्टाचाराने परम पातळी गाठली आहे. याउलट शेगावचं देवस्थान भक्तांच्या ताब्यात असल्याने तिथली व्यवस्था अप्रतिम आहे. देवळांचा पैसा सरकारजमा झाला की भ्रष्टाचार फोफावतो. मग का द्यायचा पैसा? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

भ्रष्टाचारमुक्त असे शेगावचं देवस्थान हे एकमेव संस्थान असावं. तसेच प्रत्येक भ्रष्टाचारसंपृक्त देवस्थान हे सरकारनियुक्त समितीद्वारे चालवले जात नाही. माझा मुद्दा वेगळा आहे. देवस्थानातला पैसा जर सामाजिक कार्यासाठी वापरला जातो तर मग तीच सामाजिक कार्ये करण्यासाठी देवळांऐवजी पैसा सरकारकडे द्यावा. सरकारला मोप गरज आहे. दर सहा महिन्यांनी सर्विसटॅक्स वाढवण्याची गरज पडणार नाही. देवस्थानने आपल्याला मिळालेला पैसा आणि त्याच्या खर्चाचा ताळेबंद सादर करतात काय?

In reply to by तर्राट जोकर

सरकार गॅरंटी देईल का की हा पैसा मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध, कम्युनिस्ट आणि तत्सम अहिंदू लोकांसाठी वापरला जाणार नाही ते? मी देवस्थानला देणगी कन्हैया कुमारला शिक्षण घेता यावं म्हणून देत नाही. तेव्हा पहिल्यांदा ही सुचना मुसलमानांना करून बघा. मग पाहू.
देवस्थानने आपल्याला मिळालेला पैसा आणि त्याच्या खर्चाचा ताळेबंद सादर करतात काय?
पोप करतात काय ताळेबंद सादर? त्याचे भारतातले हस्तक? मशिदी करतात?

In reply to by काळा पहाड

सरकार गॅरंटी देत नाही मग सरकारला कर तरी कशाला देता? एवढा विश्वास आहे तर देवस्थानांनाच चालवू दे ना देश. हाय काय नाय काय.

In reply to by तर्राट जोकर

आज काय वीकडेजलाच काय हो? आम्ही सरकारला कर देतो तो तो भरावाच लागतो (कर्तव्य म्हणून) देतो. तसा कायदा आहे म्हणून देतो. सरकारनं ते पैसे नक्की कुठे खर्च करायचे हे सरकारनं ठरवण्यास आमची ना नाही. ते आम्हाला आधीच माहिती आहे. देवस्थानला देणगी देतो ते देवावरच्या प्रेमामुळे देतो. हिंदू धर्मावरच्या प्रेमामुळे देतो. इतर धर्म हिंदू धर्माचे शत्रू आहेत हे माहीत असल्यानं त्याच्या उत्थानासाठी देतो. ते आमचे खाजगी पैसे आहेत. जर आम्ही सेक्युलरच असतो तर सरकारलाच ते पैसे देणगी म्हणून दिले नसते का? राहता राहिला प्रश्न देश चालवण्याचा. देवस्थानांकडून देश चालवणं अपेक्षित नाही. देवस्थाने सुद्धा ते म्हणत नाहीत. तेव्हा तुमच्या सुपीक डोक्यात ही क्ल्पना कुठून आली हे माहिती नाही. पण माझा देणगीचा पैसा सरकारनं मुसलमानांना, कम्युनिस्टांना वगैरे वाटणं एक हिंदू म्हणून मला चालणार नाही. कर आणि देणगी या वेगळ्या गोष्टी आहेत. डोक्यात घुसलं का?

In reply to by काळा पहाड

आम्ही चोविस तास तारेत असतो, विकेण्ड्स पाळण्यासारखी क्षुद्रभक्ती आपण करत नाही. खालील प्रश्न डोक्यात (सुपिक) आलेत. देवस्थानला देणगी देतो ते देवावरच्या प्रेमामुळे देतो. >> देव तर चराचरात आहे ना? देवस्थानात तर बडवे, पुजारी, पुरोहित, ट्रस्टी असतात. हिंदू धर्मावरच्या प्रेमामुळे देतो. >> जो मंदिरात जात नाही, देणगी देत नाहीत त्याचे हिंदू धर्मावर प्रेम नसते? इतर धर्म हिंदू धर्माचे शत्रू आहेत हे माहीत असल्यानं त्याच्या उत्थानासाठी देतो. >> हे उत्थान नक्की काय असते आणी मंदिरात दान केल्याने कसे होते काही सांगू शकाल काय? भक्तांनी दिलेल्या देणगीचे काय होते हे विचारण्याचा हक्क एका हिंदूला आहे की नाही? ट्रस्टी स्वतःचे गल्ले भरतात का हे बघणे आवश्यक आहे की नाही?

In reply to by तर्राट जोकर

देव तर चराचरात आहे ना? देवस्थानात तर बडवे, पुजारी, पुरोहित, ट्रस्टी असतात.
जो मंदिरात जात नाही, देणगी देत नाहीत त्याचे हिंदू धर्मावर प्रेम नसते?
हे उत्थान नक्की काय असते आणी मंदिरात दान केल्याने कसे होते काही सांगू शकाल काय?
मला फालतू पांचट प्रश्नांना उत्तरं देत बसण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आणि वेळ तर त्याहूनही नाही. तेव्हा, नमस्कार!

In reply to by तर्राट जोकर

पहाडगुरुजीना क्लीन बोल्ड केले.

In reply to by नाना स्कॉच

ते माउंटन आहेत म्हणुन त्याना देवाकडे जावेच लागते. इफ मोहम्मद कान्ट गो टू माउंटन, माउंटन हॅस टु गो टु मुहोम्मद

In reply to by lgodbole

क्लीन बोल्ड वगैरे काही नाही. पण प्रश्न र्‍हिटॉरिकल आहेत. शिवाय त्यांचा मेन धाग्याशी काही संबंधच नाही. आणि त्यांची उत्तरे काय येणार हे त्यांना एक्स्पेक्टेड आहे त्यावर काथ्या कुटण्यासाठीच त्यांनी प्रश्न विचारले आहेत. तेव्हा उगीच फालतू डिस्कशन मध्ये घाळवण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. आणि उगीच चेस्ट पाऊंडींग ची सुद्धा गरज नाही. माझ्या पोस्टस छोट्या असल्या तरी त्या जळजळीत असतील याची काळजी मी घेतोच. सध्या वेळ नाही. तेव्हा भेटूच, मोगासाहेब. तोपर्यंत चालू दे.

In reply to by काळा पहाड

फाइन. तुम्ही धाग्याशी संबंधित नसलेल्या विषयाबद्दलच्या प्रतिसादावर प्रतिसाद केला. तुमच्या त्याच प्रतिसादावर आधारित प्रश्न आहेत. धाग्याशी संबंधित नसलेल्या बर्‍याच विषयांवर आपण इथे प्रतिसाद दिले आहेत. तेव्हा असोच.

देवाच्या नावावर तरी पैसा देतात आणि देवस्थाने ही सरकारच्याच ताब्यात आहेत .

100.. अता सत्कार करायचा पण कंटाळा आला अश्या धाग्यावर... कुणाकुणाचा करायचा?? रच्याकने सत्कार समितीला देणगी मिळेल का ??

तृप्ती देसाई २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत खडकवासला मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवार होती....असे (माधव?) भंडारी यांनी स्पष्ट केले. संदर्भ दैनिक लोकमत वृत्त भाजपात गटबाजीचे ‘कमळ’ First Published :06-April-2016 : 23:00:00 Last Updated at: 07-April-2016 : 00:05:08 दिनांक ७ एप्रिल २०१६ सायं १८.१३ मिनीटांनी जसे पाहीले.
या इलेक्शन कमिशनच्या खडकवासला उमेदवार २०१४ अफिडेवीट यादीत तृप्ती देसाईंचे नाव आढळले नाही. भंडारींनी मुद्दाम चुकीचे सांगितले असेही होणार नाही-कदाचित नाव वापस घेतले असेही काही असू शकेल, जर त्या विधानसभेला उभ्या टाकल्या असतील तर इलेक्शन कमिशनचा सुयोग्य दुवा कुणि शोधून देऊ शकेल का ? भंडारींना हिन्दी भाषी संकेत माहित असणार, सहसा हिन्दीभाषी आदरार्थी उल्लेखांबद्दल अधिक सजग असतात, कदाचित पत्रकाराने बातमीत उल्लेख नीट केला नसेल अशी शक्यता असू शकेल का ? बाकी प्रकरण सुरु झाले तेव्हा मंदिर समितीवरील बरेच लोक राष्ट्रवादी अथवा मनसे गटाचे होते आणि आंदोलक काँग्रेसच्या म्हणजे भाजपाला त्यांचा एक पाठीराखावर्ग सनातनी आहे हे ओळखून मुद्दाम कात्रीत पकडायचे - अर्थात कॉन्स्पीरसी थेअरीवर चिमुटभर मीठा पलिकडे विचार करु नये असेच वाटते.

In reply to by माहितगार

या इलेक्शन कमिशनच्या खडकवासला उमेदवार २०१४ अफिडेवीट यादीत तृप्ती देसाईंचे नाव आढळले नाही. भंडारींनी मुद्दाम चुकीचे सांगितले असेही होणार नाही-कदाचित नाव वापस घेतले असेही काही असू शकेल, जर त्या विधानसभेला उभ्या टाकल्या असतील तर इलेक्शन कमिशनचा सुयोग्य दुवा कुणि शोधून देऊ शकेल का ?
खालील दोन संकेतस्थळावर तृप्ती देसाईने २०१२ मधील पुणे महानगरपालिकेची निवडणुक काँग्रेसच्या तिकिटावर लढविल्याचे उल्लेख आहेत. http://archive.indianexpress.com/news/officials-say-polls-fair-candidat… https://www.hindujagruti.org/news/74813.html

In reply to by श्रीगुरुजी

योग्यबाजू आणि कायदा स्त्री प्रवेशाच्या बाजूने आहे तेव्हा आज ना उद्या त्यांना प्रवेश तसाही मिळणारच योग्यवेळी प्रसिद्धीत येऊन राजकीय प्रगती साधण्यात यश आहे आणि अशा पद्धतीने यश घेण्यात एक स्त्री मागे नाही हे ही नसे थोडके. अर्थात राजकीय पार्श्वभूमीच्या व्यक्तीने सामाजिक दृष्ट्या रास्त पुरोगामी भूमिका घेण्यात गैर काहीच नाही, पण जेव्हा राजकीय पार्श्वभूमी आहे तेव्हा ती जी काही आहे किंवा होती ती पारदर्शकपणे मांडली पाहीजे. पारदर्शकता हा कोणत्याही सामाजिक आंदोलनाचा आत्मा असावा. आंदोलनाची एकुण पद्धत तरुण राजकीय कार्यकर्ता स्टाईलच आहे त्यामुळे सामाजिक आंदोलनात सहसा दिसणार्‍या प्रबोधनाच्या स्टेप्स अगदीच वगळलेल्या दिसतात मुख्य म्हणजे आंदोलनाची नाळ सर्वसामान्य स्त्रीशी पुरेशी न जुळताच आंदोलन चालू आहे. मंदिर प्रवेशावरुन एवढे राजकारण रंगते आहे मिपावर एका अनाहितेचा एक धागा सुद्धा नाही. या धाग्यावर प्रतिसाद सुद्धा नाहीत, मिपा सोडून द्या वृत्तपत्रिय बातम्यांखाली चर्चा होतात त्यात महिलाही नाहीत आणि पुरुष पुरोगामीही नाहीत. छुटकु फुटकु बातम्या आहेत, एखाद नमनाला अग्रलेखही आहे पण सामाजिक आंदोलन म्हणून जसे जोमदार समर्थन दिसावयास हवे, लेखनात जोश हवा त्याचा सार्वत्रिक अभाव आहे. पंढरपुरात साने गुरुजी उपोषणास बसले तर प्र.के. अत्रे चौका चौकात चार चार माणसांसाठीसुद्धा एकसारख्या सभाच घेत आपली भूमिका मांडत सुटले पण मुख्य म्हणजे इतर पुढारी कायदा येईल थांबा म्हणत होते साने आणि प्रकेंनी कायद्याच्या पुढे समाज प्रबोधनाला महत्व दिले. या वेळी एक स्त्री राजकारणात जिंकणार हे नक्की, अनेकांचे समाजकारण दिखाऊ असते अजून एक समाजकारण दिखाऊ असल्याने फारसे बिघडत नाही, समाज प्रबोधनातून जेव्हढा फायदा व्हावयास हवा कदाचित तेवढा होऊ शकेल का? शेवटी मंदिर प्रवेशाचे आंदोलन प्रातिनिधीक असणार त्यातून एकुण स्त्री समतेची चळवळ किती पुढे जाते आहे या बद्दल साशंकता वाटते आहे.

In reply to by माहितगार

शेवटी मंदिर प्रवेशाचे आंदोलन प्रातिनिधिक असणार, हेच म्हणायचे आहे. ह्या मंदिर प्रवेशाला राष्ट्रवादी व् कॉंग्रेसच्या किती महिला आमदार व् खासदार हजेरी लावतात ते पाहू. विशेष करून शनिच्या चौथर्यावर! अगदी न्यायालयाने परवानगी देऊन देखिल वा कायदा बनून देखिल हा हक्क् बजावन्यास किती प्रतिसाद मिळेल? जाता जाता, या महिलातील काहिना कुठलेतरी टिकिट पक्के आहे. याचसाठी केला होता अट्टाहास!

व्वा छान! हिंदूराष्ट्र देवो भवः भारत माता कि जय : : : (मराठी नववर्षाच्या शुभेच्छा,प्रभू रामचंद्र कि जय,जय भवानी जय शिवाजी,जय भीम)

शनिचौथर्‍यावर महिलाप्रवेशाचा तिढा सामंजस्याने सुटला आहे. ग्रामस्थांनी स्त्री-पुरुष दोघांनाही चौथर्‍यावर प्रवेश असण्यास ना हरकत दाखवली आहे. सर्व संबंधितांचे अभिनंदन.

In reply to by राही

ग्रामस्थांनी स्त्री-पुरुष दोघांनाही चौथर्‍यावर प्रवेश असण्यास ना हरकत दाखवली आहे.
मी तर लोकसत्तामधे वाचलं की ग्रामस्थ शनिवारी ग्रामसभा घेणार आहेत या विषयावर. अजून विषय पूर्णपणे पचनी पडलेला नाही असे वाटते. सध्या तरी न्यायालयीन बडगा दाखवल्याने ऐकत आहेत एवढेच.