खान्ग्रेसीजन व त्यांचे समर्थक , मित्र यांनी विरोधक असूनही काही चांगल्या योजना चालू केल्या आहेत त्यातील काही आपल्यासाठी ..
जळजळ / मळमळ ओकू योजना
या योजनेअंतर्गत आपण निवडणुकीत हरल्यामुळे सरकारविरोधातील आपली होणारी जळजळ कुठेही ओकण्याची मुभा दिली जाईल. त्यासाठी सरकारविरोधात जास्तीत जास्त फालतू विधाने कशी करावी याचे खास प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातील. माननिय युवराजांच्या अभ्यासपूर्ण भाषणाच्या सीडी व केसेट सवलतीच्या दारात उपलब्ध .
संसद रोको कमअक्कल योजना :
या योजनेअंतर्गत कोणत्याही क्षुल्लक कारणावरून संसद बंद पाडण्यात येईल. संसद हे गदारोळाचेच ठिकाण असल्यामुळे जितका जास्त गोंधळ खान्ग्रेसी व अन्य विरोधक करतील तितका या योजनेचा लाभ देशातील सर्वसामान्य नागरिकास होईल हेच या योजनेचे खास वैशिठ्य . सर्वात जास्त गोंधळ घालनार्या व सर्वात मोठा आवाज करून कोकलनार्या सभासदास मनमोहन साहेबांबरोबर जेवण्याचा लाभ. काळे झ्हेंडे व फलक बनवणार्या लोकांना सवलतीत सूट.(!). संसद काय कारणास्तव बंद पाडावी यातील प्रथम ५ विजेत्यांना देश के जमाइ श्री वद्रा यांचे हस्ते एक काळा सूट मोफत . क्षुल्लक बातमीचे मोठे रूप कसे तयार करावे व प्रत्येक अधिवेशन कसे उधळावे यासाठी या योजनेअंतर्गत सभा घेतल्या जातील . खान्ग्रेसीनी लाभ उठवावा .
मृतक – जात योजना
यामधे आत्महत्या केलेल्या माणसाची खासकरून विद्यार्थ्याची जातपडताळणी होईल. विद्यार्थी जर दलित गैरहिंदू अथवा ‘पिछडे हुये समाज से ‘ असेल तर “ दलितांचा सरकार खून करत आहे “ वगैरे संदर्भहीन बरळण्यास मुभा . मेलेल्याची जात काढून त्यावर राजकारणी डावपेच आखणे हे या योजनेचे प्रमुख वैशिट्य. मात्र या योजनेअंतर्गत वरील तीन जातीचे लोक सोडल्यास कोणी आत्महत्या केली तर त्यांची नावे वगळण्यात येतील. सरकार जास्तीत जास्त दलित / मुस्लीम विरोधी कसे आहे हे फक्त त्या लोकांची मते मिळवण्यासाठी ही योजना चालू केली आहे. याउलट सरकारच कसे जातीपातीत भेदभाव करत आहे असे वैचारिक लेख लिहिणार्या “विचारवंतास “ या योजनेंतर्गत मम्मा मेडम नी वापरलेल्या जोड्यांपैकी एक चपलांची जोडी वापरण्यासाठी भेट . अ
असहीष्णूता वाढवा योजना .
कोणत्याची गैरहिंदू व्यक्तीवर जर हल्ला झ्हाला तर देशात असहीष्णूता वाढली आहे देश आता राहण्यालायक राहिला नाही असा प्रचार या योजनेअंतर्गत केला जाईल. देश शांततेत असून सर्व सुरळीत आहे हे पुढील पक्षाच्या पुढील वाटचालीस अत्यंत घातक आहे. तस्मात देशात किती अशांतता नांदत आहे असा योग्य प्रचार हिरीरीने यामध्ये केला जाईल. याची काही वैशिष्ट्ये
१. ह्या योजनेत गैरहिंदू व्यक्तीवरच हल्ला होणे आवश्यक आहे अन्यथा ती केवळ एक घटना असेल
२. दोन व्यक्तींमधील वैयक्तिक गोष्टींमुळे जरी काही घडले तरी ते सरकारच कसे घडवून आणत आहे याचा शोध घेतला जाईल.
३. या घटना राज्यात घडल्या तरीही अशा घटनांवर केंद्र सरकारची जबाबदारी राहील .
४. या योजनेंतर्गत पुरस्कार वगैरे परत करणाऱ्यास “ गांधी घराण्याचे निष्ठावान सेवाक “ असे प्रशस्तीपत्रक स्वतः म्याडम च्या सहीचे मिळेल अथवा ‘गांधी घराण्याच्या सेवेचे ठायी तत्पर “ असा बोर्ड स्वताच्या घराबाहेर लावण्याची परवानगी.
५. सर्वात महत्वाचे १९८४ दंगल , कश्मीरी पंडित हत्याकांड , २०१४ पूर्वी घडून गेलेल्या अनेक लहानमोठ्या जातीय दंगली हे यात गृहीत धरु नये. त्यावेळी कायम सहिष्णुता व शांतताच होती .
दहशतवादी पावन चिदंबरम योजना
कुठलाही दहशतवादी भाजपा चे सरकार असलेल्या राज्यात मारला गेला असल्यास असे करणे खुनाहून अधिक गंभीर आहे असा वेळोवेळी प्रचार केला जाईल. किंबहुना मेलेला दहशद्वादीच कसा न्हवता हे सिद्ध करण्यासाठी अनेक उपाय केले जातील. देशापेक्षा आपल्याला दहशतवाद्याच्या जीवावर मिळालेली मते जास्त महत्वाची हाच या योजनेचा पाया आहे .
सर्व खोटे योजना
यामध्ये सरकार मधील कोणीही काही विधान केले की तो खोटेच बोलत आहे असे ढोल बडवून सांगत सुटणे . तो खोटे कसे बोलत आहे याचे पुरावे देण्याचे कष्ट या योजनेंतर्गत करू नये. फक्त तो बोलतो ते खोटेच आहे असे सर्वांनी मानावे. हवेच असल्यास फारतर संसदेत एखादी केस टाकावी .
सर्वात महत्वाची योजना
मोदी विरोध योजना
ज्या व्यक्तीला १२ वर्ष कुरापती काढून त्रास देऊनही ते पंतप्रधान झ्हाले व त्यांच्यामुळेच सर्व विरोधक उघडे पडत आहेत हे समाज्ल्यामुळे फक्त त्यांच्यावर काहीही करून टीका करा असे याचे स्वरूप आहे. जास्तीत जास्त घाण टीका करणार्यास श्री युवराज यांचे जुपीटर च्या एस्केप वेलोसीटी चे तंत्र त्यांच्याकडूनच समजून घेण्याची संधी.
लोकसहभागातून चालणाऱ्या काही योजना : ( बुद्धीजीवी लोकांनी चालवलेले प्रचार )
१. आम्हाला मते मांडण्याचा अधिक्कर नाही असा आधीच निश्कर्ष काढून हाय हाय असे बरळत सुटणे
२. सरकारच्या कुठल्याही योजनेवर अथवा गोष्टींवर फक्त टीका करत सुटणे. सरकार ने ती गोष्ट मुद्दाम केली का , सरकार ती गोष्ट संपवण्यासाठी काय प्रयत्न करत आहे वगैरे माहिती न काढताच आमचा भ्रमनिरास झ्हाला असे सांगत सुटणे ( वास्तविक तुमचा भ्रमनिरास होणारच होता कारण भ्रमनिरास कधी होतो याचीच तुम्ही वाट बघत होता कारण तेच तुम्हाला हवे होते असो)
३. आपण सरकारवर टीका करतो म्हणजे आपण किती हुशार अभ्यासू असे मानून हुरळून जाणे (!) व बाकीचे भक्त ते मूर्ख असे समजत राहणे.
तर यावतिरिक्त “ मिडिया ला चारा योजना “ “काहीही करा पण मलाच हाना ही केज्रीवली योजना “ आपल्याकडे कोणतेही उपाय नसून व मूळ प्रश्नाचे कारणे वेगळी असूनही फक्त विरोध करण्यासाठी “हमे चाहिये आझ्हादी अथवा मूर्ख घोषणा योजना या व अशा अनेक योजना चालू आहेत . त्याविषयी नंतर कधीतरी . तूर्तास इतकेच पुरे .
रच्याकने : मी कोन्ग्रेस चा समर्थक असून मी त्यांनाच मत दिले होते पण ते विरोधक या नात्याने काही चांगले काम करत नाहीत म्हणून माझ्हा भ्रमनिरास झ्हाला . मग तरीही मी न्यूट्रल राहिलो तर हे लोक जास्तच चेकाळले. खान्ग्रेसी समर्थक कशालाही पाठींबा देऊ लागले . खान्ग्रेस ने या पिलावळी शांत करण्याबाबत काहीच केले नाही. यांच्या पिलावळीचा त्रास सोशल मेडिया वर इतका वाढला की सरकार विरोधात हे काहीही खोटेनाटे सांगत सुटले. माझ्यासारख्या न्युट्रल लोकांवर राहुल महानच आहेत हे मान्य करा असा अघोषित दबाव आनला जाऊ लागला
माझे कांग्रेस समर्थकांना इतकेच म्हणणे आहे की बाबांनो, चूकत नाही असा जगात कोणी माणूस नाही. आपली चूक असेल तर मन मोठं करुन मान्य करायला शिका. इथे कोणी टिका केली तर लगेच सरकार खान्ग्रेस सरकार २०१९ साली येणारच नाही असे नाही . अल्पमतात येऊन पडणार नाही. पाच वर्ष पुर्ण होतील. थोडा आत्मविश्वास ठेवा आणि दुर्लक्ष करायला शिका. बाकी मोदी ना प्रत्येक बाबतीत ओढणे उपयोगाचे नाही. देशाने भाजपाला पूर्ण बहुमत दिले आहे. त्याचा अपमान करु नका. जमिनीवर राहा. प्रगती करा. आपोआप लोक डोक्यावर घेतील. आधीच नाचायला लागलेत तर विसरु नका हा भारत आहे. :) :)
वाचने
2631
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
काहि जमलं नाहि बुवा
@अर्धवटराव
In reply to काहि जमलं नाहि बुवा by अर्धवटराव
नको
In reply to @अर्धवटराव by सुज्ञ
राहुल गांधी बालबुद्धीविकास
व्हॉटअप्सवर
हात चोळो आंदोलन - २०१४ चा
राहुल गांधी बालबुद्धीविकास योजना
तथ्यांचा काय संबंध?
In reply to राहुल गांधी बालबुद्धीविकास योजना by सुज्ञ
छान लिहिलय..
निषेढ,
कोणत्याच पक्षावर अगदी खालच्या
In reply to निषेढ, by भंकस बाबा
ऑन सिरियस नोट,
समोरचा जे स्पष्टीकरण देतो
डॉ. दोरूगडे यांच्या धाग्यावर
यात काय व्यक्तिगत आहे? मला तर
In reply to डॉ. दोरूगडे यांच्या धाग्यावर by श्रीगुरुजी
__/\__