Skip to main content

डेविड हेडलीची साक्ष,JNU, आणि ढोंगी फेक्युलर

लेखक चेक आणि मेट यांनी गुरुवार, 11/02/2016 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, (पहिल्यांदाच लिहतोय त्यामुळे बारीकसारीक त्रुटींकडे दुर्लक्ष करा.) तर मुद्दा असा कि, डेविड हेडलीची साक्ष वगैरे घेण्याचं काम सुरू आहे,आणि त्याने एक मोठा खुलासा केला आहे कि इशरत जहां ही सुसाईड बाॅम्बरच होती.ती लष्कराची महिला आतंकवादी होती. तर इशरत प्रकरणावरून पूर्वी बराच वाद झाला होता,त्यामध्ये गुजरात पोलिस आणि मोदी,शहांच्या नावाने बरेच स्वयंघोषित सेक्युलर खडे फोडत होते.तथाकथित ढोंगी सेक्युलर म्हणत होते कि ती निर्दोष होती म्हणे!!! दुसरा मुद्दा असा कि JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटीमध्ये ते वामपंथी का काय ते विद्यार्थ्यांनी म्हणे काश्मिरच्या स्वातंत्र्याबद्दल कार्यक्रम घेतला आणि 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. तर मला असे म्हणायचे कि जे राष्ट्रीय संवेदनशील मुद्दे आहेत त्या मुद्यांना हात घालायची खाज या अति लिबरल विद्यार्थांना का सुटते म्हणे?? आता हे सगळं लिहल्यावर काहीजण मला मोदीभक्त म्हणतील.पण असो दुर्लक्ष करणे. तर हे दोन महत्वाचे मुद्दे मी मांडले आहेत,अजून अशा बर्याच गोष्टी सांगता येतील कि जिथे तथाकथित सेक्युलरांचा ढोंगीपणा उघडा पडतो. तिकडे हाफिज सईदने ट्वीट करून त्या JNU च्या पाकप्रेमींना पांठिबा दर्शविला आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मोदीसरकार नसते तर या सेक्युलरखाजाड्या मंडळींनी असे कार्यक्रम घेतले असते का?? (सेक्युलर आणि उदारमतवादी असणं हे चांगलंच आहे,पण ढोंगी सेक्यलरपणा हा देशासाठी विघातक आहे.काय म्हणता??)

वाचने 59636
प्रतिक्रिया 331

प्रतिक्रिया

In reply to by मालोजीराव

हेडली २६/११ ISI ने स्पाँन्सर केलं म्हणतोय. त्यात पाकिस्तानी अतिरेकी होते असही म्हणतोय. त्यावर पण अविश्वास ठेवायचा का? खोटं बोलून त्याला काय फायदा? तो एनीवे ३५ वर्ष तुरुंगात असणारे.

जाऊ द्या हो इशारत दशहतवादी होती हे मोदी विरोधी लोकांनाही माहित होते आणि ती नकटी सेस्टा कायतरीवाड तीलाही माहित होते. मुस्लीम मते मिळवण्यासाठीचा चुनावी जुमला होता. शहासाहेब लई हुशार ! त्यांनी केंद्र सरकारचे नियंत्रण असलेला रॉ चा अधिकारी साक्षीला ठेऊन तीला अल्लासदनी पाठवले. कारण ती येणार आहे हा संदेश रॉ चाच होता. कॉग्रेसचे हात दगडाखाली सापडले. मग त्यांनी ती हाकामारी सेस्टा तिलसवाढ उभी केली.

भाऊ तोरसेकरांच्या ब्लोग वरून साभार माफ़ीचा साक्षीदार होऊन डेव्हीड कोलमन हेडली काय सांगणार, त्याबददल कोणाला फ़ारशी उत्सुकता नव्हती. कारण जी माहिती आता बाहेर येत आहे, त्यात नवे असे काहीच नाही. प्रामुख्याने त्यात इशरत जहान या फ़िदायिन मुलीविषयीची माहिती नवी नाही. कारण जेव्हा हेडलीला अमेरिकेत अटक झाली व तिथेच त्याच्यावर खटला भरला गेला, तेव्हाच त्याची भारतीय अधिकार्‍यांनी जबानी घेतली होती. त्याविषयी तेव्हाही गवगवा झालेला होता. त्यात इशरत फ़िदायिन असल्याचे त्याने कबुल केल्याची माहिती उजेडात आलेली होती. मात्र त्याबद्दल इथलेच तात्कालीन युपीए सरकार गोपनीयता पाळत होते. इशरत पाकिस्तानची हस्तक असल्याची माहिती हाताशी असताना, तेव्हाचे मनमोहन सरकार व त्यातले गृहमंत्री लपवाछपवी कशाला करत होते, हा मुद्दा खरा चर्चेचा किंवा चिंताजनक आहे. कारण इशरत बिहारची बेटी म्हणून तेव्हा नितीशकुमार अश्रू ढाळत होते आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तिला मुलीसारखी ठरवून रडत होते. पवाराचेच दोन निकटवर्तिय इशरतच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून आकाशपाताळ एक करत होते. त्यांनी इशरतच्या कुटुंबाला लाखांचे चेक देण्यात पुढाकार घेतला होता. पण त्यालाही स्थानिक राजकारणातला उतावळेपणा म्हणता येईल. त्याकडे दुर्लक्ष अरता येईल. पण इशरत लष्करे तोयबाची हस्तक असल्याची माहिती भारत सरकारचे गृहमंत्री कशाला लपवत होते, हा गहन प्रश्न आहे. कोणाला आठवत नसेल, तर तेव्हाच्या गाजलेल्या बातम्या काढून तपासायला हरकत नाही. इशरतला निरपराध ठरवण्यासाठी तिच्या चकमकीत गुंतलेल्या अधिकार्‍यांना गजाआड टाकण्यासाठी आटापिटा चालला होता. त्याच्याही पुढे जाऊन भारतीय गुप्तचर खात्याच्या वरीष्ठ अधिकार्‍याना खुनी ठरवण्यासाठी सीबीआयला कामाला जुंपलेले होते. अशा सर्वांच्या अब्रुची लक्तरेच आता हेडली वेशीवर टांगतो आहे. आज अनेकांना नेहरू विद्यापिठात उजळमाथ्याने घातपाती जिहादी अफ़जल गुरूच्या उदात्तीकरणाचे नवल वाटते, त्याची सुरूवात इशरत चकमकीतून झाली हे विसरता कामा नये. इशरत तोयबाची हस्तक होती आणि तरीही तिला निरपराध ठरवून अधिकार्‍यांनाच गजाआड ढकलण्यात धन्यता मानली गेली. त्यासाठी जीतेंद्र आव्हाड पत्रकार परिषदा घेत होते आणि तीस्ता सेटलवाड न्यायालयीन आघाडी संभाळत होती. पण ते भारत सरकारचा घटक नव्हते आणि इशरत फ़िदायिन असेल, तर तिला शिक्षा देणे वा गुन्हेगार ठरवणे ही सरकारची जबाबदारी होती. पण ती पार पाडण्यापेक्षा भारत सरकारच आपल्या हाती आलेली हेडलीची जबानी लपवून आपल्या अधिकार्‍यांना गुन्हेगार ठरवण्याचे उद्योग करीत होती. ही बाब अतिशय गंभीर आहे. सेक्युलर वा पुरोगामी असण्यासाठी पाकिस्तानी हस्तक वा घातपातींना पाठीशी घालण्यापर्यंत तात्कालीन सेक्युलर सरकारने किती भयंकर निर्णय घेतले, त्याचा पर्दाफ़ाश हेडलीच्या साक्षीने झाला आहे. त्यात नवे काही नाही. पण हे आधीच हेडलीने सांगितले असताना तेव्हाच्या भारत सरकार वा सत्ताधार्‍यांनी देशाच्या सुरक्षेसाठी काय केले, हा गंभीर प्रश्न आहे. तेव्हाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे किंवा पंतप्रधान मनमोहन सिंग या विषयात काय करत होते? हेडलीची कबुली हाताशी असताना त्यांनी विचारणा झाली तरी इशरत दोषी असल्याची माहिती कशाला लपवली होती? ती लपवून आपण देशाचा घात करतोय, एवढेही त्यांच्या लक्षात आले नसेल काय? इशरतचे उदात्तीकरण थांबवून तिला गुन्हेगार ठरवणे दूर राहिले. उलट इशरतचा निकाल लावणार्‍या अधिकार्‍यांनाच आरोपी बनवण्यात तेव्हा सीबीआय गर्क होती. एकामागून एक अर्धा डझन अधिकारी त्यात गोवले गेले होते आणि दिर्घकाळ खितपत पडलेले होते. त्याचे कारण नरेंद्र मोदी इतकेच होते. मोदी या व्यक्तीला गुजरातमधून सत्ताभ्रष्ट करणे आणि भारतीय राजकारणातून उखडून टाकणे, यासाठी जे सेक्युलर कारस्थान बारा वर्षे शिजवले गेले, त्याचाच लाभ इशरतच्या उदात्तीकरणाला झालेला होता. त्यासाठी मग आयबीचे अधिकारी राजेंद्रकुमार यांनाही इशरत चकमकीत गुंतवण्यापर्यंत गृहखात्याने मजल मारली. थोडक्यात पाकिस्तानी हेरखात्याला हव्या असलेल्या गोष्टी भारताचेच गृहखाते करीत होते. हेडलीने तेव्हाच दिलेली कबुली कुठून तरी बाहेर आलेली होती. पण त्यामुळे इशरत प्रकरणात मोदींना सुटका मिळेल म्हणून तितकीच जबानी लपवण्यात धन्यता मानली गेली. हेडलीच्या कबुलीविषयी जी माहिती देण्यात आली, त्यातला इशरतविषयीचा भाग खोडून पाठवण्यात आला. जेणे करून इशरत फ़िदायिन आहे, याला दुजोरा मिळू नये. याचा अर्थ असा, की भारताचे तेव्हाचे गृहखाते एका तोयबा फ़िदायिनला संरक्षण देण्यासाठी झटत होते. दुसरीकडे नेहरू विद्यापिठ किंवा तत्सम सेक्युलर अड्ड्यांवर अफ़जल गुरू किंवा इशरत यांच्या उदात्तीकरणाच्या जोरदार मोहिमा चालविल्या जात होत्या. त्यासाठी माध्यमातील हस्तकही जुंपले होते. यातल्या अनेकांना आपण पाकिस्तानला व तिथल्या जिहादी घातपात्यांना अपरोक्ष मदत करतोय याचेही भान नव्हते. इशरतची हत्या अमानुष असल्याचा दावा करून आक्रोश करणार्‍यांना आता सत्य समोर आल्यावर आपली चुक कबुल करण्याची हिंमत आहे काय? तेव्हाच्या युपीए सरकारने तर इशरतसाठी आपल्या ज्येष्ठ गुप्तचर खात्यालाच खुनाच्या गुन्ह्यात गुंतवण्याचे प्रयास चालविले होते. इशरतचा खुन मोदींच्या माथी मारण्यासाठी हा सगळा खटाटोप चालू होता. त्यासाठी सेक्युलर ‘दूर’बुद्धी किती आश्चर्यकारक शोध लावत होती, त्याचे नमूने तात्कालीन लेख व बातमीदारीतही सापडू शकतील. मुद्दा इतकाच होता, की मोदींना संपवायला युपीए वा कॉग्रेस थेट तोयबा वा पाक घातपात्यांनाही हाताशी धरायला तयार होती. अर्थात आजही त्यात बदल झालेला नाही. भारत-पाक मैत्रीसाठी सत्तेवरून मोदींना हटवावे लागेल, असे आवाहन आजही मणिशंकर अय्यर पाकिस्तानात जाऊन करू शकतात. नेहरू विद्यापिठात अफ़जल गुरूचा उदो उदो चालतो. आणि सत्ता हातात असताना इशरतविषयी हेडलीने केलेला खुलासा लपवला जातो. हा सेक्युलर वा पुरोगामी राजकारणाचा खरा चेहरा आहे. देशाचे वा समाजाचे नुकसान वा हानी याच्याशी पुरोगामीत्वाला कशी फ़िकीर नाही, त्याची ग्वाही हेडली आपल्या साक्षीतून देतो आहे. त्यासाठी पाकिस्तानच्या नावाने बोटे मोडण्याची गरज नाही. आपल्यातले गद्दार उघड्या डोळ्यांनी ओळखण्याची गरज आहे. आपल्या साक्षीतून भारतात पाकिस्तानचे हस्तक कुठल्या मोक्याच्या जागी जाऊन बसले आहेत आणि किती सहजगत्या भारतीयांची दिशाभूल शत्रू करू शकतात, त्याचे पुरावेच हेडली सादर करतो आहे. ज्यांना हिंदूत्ववादी किंवा प्रतिगामी ठरवले आहे, त्यांना नामशेष करायला वा पराभूत करायला इथले पुरोगामी पाक वा देशाच्या अन्य कुठल्याही शत्रूशी हातमिळवणी करू शकतात, इतकाच हेडलीच्या साक्षीचा अर्थ आहे. इशरत जहानविषयी त्याचे वक्तव्य याचा सज्जड पुरावा आहे. कारण त्यात नवे काही नसून त्याविषयी तात्कालीन गृहमंत्री, व सरकारांनी काय कारवाई केली होती, त्याची चौकशी आवश्यक आहे. इशरतच्या समर्थनार्थ पुढे सरसावलेल्यांचे हेतू व त्यांच्या अन्य हालचालींची कसून तपासणी व्हायला हवी आहे. राष्ट्रीय एकात्मतेच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या व त्यासाठी कोट्यवधी रुपयांचे सरकारी अनुदान उधळणार्‍या नेहरू विद्यापिठातले विद्यार्थी राजरोस देशद्रोही अफ़जल गुरूचे उदात्तीकरण करतात. त्याचा अर्थ इतकाच होतो की पाकिस्तानला भारतविरोधी कारवाया करण्यासाठी बाहेरून हस्तक पाठवण्याची गरज नाही. पैसाही खर्चायची गरज नाही. सेक्युलर व पुरोगामी भुमिकेच्या नावाखाली भारतविरोधी कारवायांना भारत सरकारच अनुदान देवू शकते. कारण अशा केंद्रीय नेहरूवादी विद्यापिठांचा कब्जा प्राध्यापक वा बुद्धीमंत होऊन देशाच्या शत्रूंनी घेतलेला आहे. म्हणूनच हैद्राबाद विद्यापिठात याकुबच्या फ़ाशीचा निषेध करणार्‍या रोहितला हिरो बनवले जाते. संसदेवरील हल्ल्यातल्या अफ़जलला शहीद म्हणून पेश केले जाते. त्याला आक्षेप घेण्याला अविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी म्हटले जाते. तोयबाच्या हस्तकाला चकमकीत मारणे गुन्हा ठरवला जातो आणि संसदेच्या सुरक्षेत असलेल्या सैनिकांचा बळी घेणार्‍या अफ़जलला शहीद बनवला जातो. ह्या गोष्टी आपल्या समोर येतात, तेव्हा एकाच प्रश्नाचे उत्तर आपण शोधणे भाग असते, अन्य कुठलाही विषय वा प्रश्न दुय्यम होऊन जातात. तुमचा देश महत्वाचा की तुमची विचारसरणी? आमचे उत्तर सोपे सरळ आहे, इशरत जहानचे अच्छा, हिंदूस्तान हमारा

In reply to by सुबोध खरे

वाचतेय. काही पडलेले प्रश्न- १) ह्या चकमकीत भाग घेतलेले गुजरात पोलिसचे डी.पी.वंजारा गेले ८ वर्षे जेलमध्ये होते. दुसर्या एका खोट्या चकमकीसाठी तुरुंगात होते. २)ईशरत एल.ई.टी.साठी काम करत होती, ह्याचा कोणता पुरावा गुजरात पोलिस वा आय.बी.ने सादर केला? ३)२००९ साली अहमदाबाद नगर न्यायालयाने ही चकमक खोटी होती असे सांगितले होते. ४)२०१३ मध्ये सी.बी.आय.नेही हेच सांगितले. ५) हे विकिपिडिया वरून- Tamang's report said the Crime Branch police kidnapped Ishrat and the others from Mumbai on 12 June 2004 and brought them to Ahmedabad. The four were killed on the night of 14 June in police custody, but the police claimed that an "encounter" took place the next morning on the outskirts of Ahmedabad. Rigor mortis had set in between 11 pm and midnight the previous night, indicating that the police had later shot bullets into Ishrat's body to substantiate the encounter theory ६)जिवंत पकडून पुरावे दिले असते तर पाकिस्तानला उघडे पाडता आले नसते का? (जसे २६-११ मध्ये कसाबला पकडले होते) ७)On 21 November 2011, the SIT told the Gujarat High Court that the Ishrat Jahan encounter was not genuine. एस.आय.टी चे सदस्य, न्यायाधीश तमंग व तत्कालीन सी.बी.आय.अधिकारी कॉन्ग्रेससाठी काम करत होते असा दावा असेल तर विषयच संपला.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

Breaking News:: प्रदीर्घ विश्रातीनंतर माईसाहेबांचं पुनरागमन.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब, जर १२ तारखेला इशरतचं अपहरण झालं होतं, तर तिच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार का नोंदवली नाही? मी एके ठिकाणी वाचल्याप्रमाणे १३ तारखेला तिने घरी फोन लावला होता. आ.न., -गा.पै.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

असा आरोप आता विरोधी पक्ष असलेले काँग्रेसचे लोक करत आहेत. काँग्रेस सरकारमध्ये असताना CBI निःपक्षपाती होती आणि भाजप सरकार आल्यावर पक्षपाती झाली असं आपलं म्हणणं आहे का? तमंग हे मॅजिस्ट्रेट आहेत. त्यांच्या रिपोर्टमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की इशरत गरीब घरातली होती आणि ट्यूशन्स घेऊन घरखर्चाला हातभार लावत होती आणि जावेद शेख (जो या एन्काउंटरमध्ये मारला गेला)त्याच्याकडे ₹३००० एवढ्या पगारावर काम करत होती आणि ती निर्दोष आहे. एवढा महत्वाचा निर्णय एवढ्या तुटपुंज्या पुराव्यावर? इशरत कमीतकमी collateral damage आणि जास्तीतजास्त एक सुईसाईड बाँबर असू शकते. ती त्या लोकांबरोबर काय करत होती याचं उत्तर तिच्या घरातले लोक अजूनही देत नाहीयेत.

In reply to by बोका-ए-आझम

ती कामानिमित्त गेली होती असे वाचले होते. एन्काऊंटर करणारे वंजारा खोट्या चकमकीसाठी तुरुंगात जाउन आले आहेत त्याबद्दल काय मत आहे?ज्यांनी मारले त्यांनी पुरावा नको का द्यायला ?२००८ मध्ये रॉ चे माजी बी.रामन ह्यांनी लेख लिहिला होता ह्यावर-त्यांनीही हाच संशय व्यक्त केला होता. गुजरात पोलिसांचे वर्तन कमालीचे संशयास्पद असल्याचे मत त्यांनीही व्यक्त केले होते. ती काय करत होती,तक्रार का नोंदवली नाही.. हे दुय्यम आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

नानासाहेब, वंजारांना जामीन न मिळाल्याने ते तुरूंगात होते, खोटी चकमक सिद्ध झाल्याने नव्हे. कॉंग्रेसचे लक्ष मोदी होते, वंजारा नव्हे. त्यामुळे इशरत जहाचे निमित्त करून वंजारा व इतर अनेक अधिकार्‍यांना या खोट्या प्रकरणात काँग्रेसने अडकवले. त्यांच्या माध्यमातून शेवटी मोदी व शहांच्या आदेशानुसार ही खोटी चकमक घडवून आणली हे वंजारा व इतरांकडून वदवून घ्यायचे होते व ते वदवून शेवटी मोदींना यात अडकविण्याची योजना होती. त्यासाठी गुप्तचर खात्याच्या काही अधिकार्‍यांनाही अडकविण्यात आले. काँग्रेसच्या दुर्दैवाने मोदी किंवा शहा यात अडकले नाहीत कारण तसे काही पुरावेच नव्हते. भारताच्या दुर्दैवाने अतिरेक्यांना मदत करणारे सरकार सलग १० वर्षे सत्तेत होते. सत्तेवर राहण्यासाठी मुस्लिमांचे लांगूलचालन करणे, त्यासाठी अतिरेक्यांना समर्थन देणे व मोदींसारख्या विरोधकांना संपविण्यासाठी सरकारी तपास यंत्रणात भांडणे लावून देणे अशी नीच कृत्ये काँग्रेसने १० वर्षे केली.
ती काय करत होती,तक्रार का नोंदवली नाही.. हे दुय्यम आहे.
कसा काय दुय्यम? तोच तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. एक तरूण मुलगी आपल्या घरापासून इतक्या लांब दुसर्‍या राज्यात पहाटे ३ वाजता ३ तरूणांबरोबर (त्यातले २ पाकिस्तानी होते) कारमध्ये एकटी नक्की काय करत होती? नक्की कोणत्या कारणासाठी ती आपल्या घरापासून इतक्या दूर मध्यरात्री आली होती? तिच्याबरोबर असणारे ते दोन पाकिस्तानी नक्की कोण होते? हे सर्वजण गुजरातमध्ये नक्की काय करणार होते? ती बेपत्ता झाल्यावर अनेक दिवस तिच्या घरच्यांनी पोलिसांकडे तक्रार का नोंदविली नाही? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत आहेत व हेच सर्वात महत्त्वाचे प्रश्न आहेत. २००४ मध्ये ती मारली गेल्यावर लष्कर-ए-तोयबाच्या संकेतस्थळावर ती आमचीच अतिरेकी होती अशी कबुली दिली गेली होती. त्यांच्याच नवाझ टाइम्स या मुखपत्रातून देखील हीच कबुली दिली होती. २०१० मध्ये हेडलीने एनआयए ने केलेल्या चौकशीत अगदी हेच सांगितले होते आणि त्याने २०१६ मध्ये देखील हेच सांगितले आहे. लष्कर-ए-तोयबा व हेडलीची भूमिका याबाबतीत कायम सातत्याची राहिली आहे. २००४ पासून ते सातत्याने हेच सांगत आहेत. भारताच्या दुर्दैवाने अशा अतिरेक्यांचा उमाळा येणारे पक्ष व नेते भारतात आहेत. बाटला हाऊस चकमकीत एक वरीष्ठ पोलिस अधिकारी व अलिगढ मुस्लिम विद्यापीठात वास्तव्य करणारे २ अतिरेकी मारले गेल्यावर त्या अतिरेक्यांच्या मृत्युच्या बातमीने सोनिया गांधींच्या डोळ्यात अश्रू तरळले असे दस्तुरखुद्द सलमान खुर्शिद यांनी ऑन रेकॉर्ड सांगितले आहे. इशरत जहाच्या कुटुंबियांना आधी वसंत डावखरे व नंतर जितेंद्र आव्हाडने १ लाखाची मदत दिली. तिच्या नावाने शहीद इशरत जहा नाव दिलेली अ‍ॅम्ब्युलन्स काढली. तिचा भाऊ जितेंद्र आव्हाडच्याच कार्यालयात नोकरी करतो. "इशरत जहा निष्पाप होती व अतिरेकी हल्ले केल्याबद्दल मुस्लिमांना दोष देता येणार नाही" असे दस्तुरखुद्द शरद पवारांनी जाहीर सभेत सांगितले होते. जेएनयू मध्ये ज्या देशद्रोही घोषणा दिल्या गेल्या व त्यामुळे तिथल्या विद्यार्थी नेत्याला अटक झाल्यावर राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केली आहे. भारताचं दुर्दैव असे नेते व पक्ष भारतात आहेत.

In reply to by कपिलमुनी

Rahul Gandhi added his voice to the debate saying that while 'anti-India sentiment is unacceptable, debate is part of a democracy. He said: "While Anti-India sentiment is unquestionably unacceptable, the right to dissent & debate is an essential ingredient of democracy.
पप्पू अजून बरेच काही बोलला. त्याची खालील वाक्ये पहा. A youngster expressed himself and the government says he is an anti-national. The most anti-national people are the people who are suppressing the voice of this institution," Gandhi told students. म्हणजे पप्पूच्या मतानुसार "तो कन्हैय्या कुमार किंवा तो खलिद नावाचा विद्यार्थी आपले विचार प्रकट करीत होता व सरकारने त्याबद्दल त्याला देशद्रोही ठरविले आहे. खरे देशद्रोही ते आहेत जे या संस्थेतील विद्यार्थ्यांचा आवाज दडपून टाकत आहेत." याचा सरळ अर्थ असा होतो की ते घोषणा देणारे विद्यार्थी देशद्रोही नसून त्यांना अटक करणारे देशद्रोही आहेत. "They do not understand that by crushing you they are making you stronger," he added. ABVP workers showed black flags and raised slogans against Gandhi when he visited the campus. म्हणजे पप्पूच्या मतानुसार त्यांना दडपून टाकणे हे त्यांना अधिक बळकट करणारे आहेत. काही दिवसांपूर्वी हैद्राबाद विद्यापीठात रोहीत वेमुला व त्याच्या काही मित्रांनी अशी घोषणाबाजी केली होती की "तुम्ही जितके याकूब मेमन माराल, प्रत्येक घरातून याकूब मेमन पैदा होतील." रोहीत वेमुलाची ही वाक्ये आणि पप्पूची वरील वाक्ये एकसारखीचा आहेत. http://timesofindia.indiatimes.com/india/Rahul-Gandhi-visits-JNU-says-t… पप्पूची अजून काही मुक्ताफळे - When we fought the British, we fought them for our land and we fought them for our voice I came here to tell you, there are more than billion people in country who believe what you believe in & standing right behind you. The most important thing we have is the voice of our people." हा तर उघडउघड देशद्रोही विद्यार्थ्यांना पाठिंबा आहे. http://www.dnaindia.com/india/report-afzal-guru-row-rahul-gandhi-set-to…

In reply to by श्रीगुरुजी

जरा घटनाक्रम पाहूया. (१) ९ फेब्रुवारीला जेएनयू मध्ये विद्यार्थ्यांच्या एका गटाने आंदोलन व घोषणाबाजी केली. फाशी झालेला अतिरेकी अफझल गुरूच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. काश्मिरच्या स्वातंत्र्याच्या बाजूने घोषणा देण्यात आल्या. केरळ व बंगालमधील कोणाचीही मागणी नसताना 'केरळ मांगे आझादी', 'बंगाल मांगे आझादी' असल्या घोषणा देण्यात आल्या. अफझल गुरूच्या फाशीचा उल्लेख न्यायव्यवस्थेने केलेला खून असा करण्यात आला. भारताच्या बरबादीच्या घोषणा देण्यात आल्या. यांच्यात उजव्या कम्युनिस्ट पक्षाचे डी राजा यांच्या मुलीचाही समावेश होता असे बोलले जाते. केरळ, बंगाल, काश्मिर इ. चा उल्लेख असल्याने हे विद्यार्थी काश्मिरमधील फुटिरतावादी व कम्युनिस्ट यांच्याशी संबंधित असावे. (२) देशद्रोही घोषणा दिल्याबद्दल २-३ दिवसांनी विद्यार्थी संघटनेचा प्रमुख कन्हैया कुमार याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. नंतर अजून ७ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. (३) कम्युनिस्ट पक्ष व काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीचा अजिबात विरोध वा निषेध न करता त्यांना अटक करण्याचा निषेध केला. विद्याथ्यांऐवजी पोलिसांना व केंद्र सरकारलाच शिव्या घातल्या. (४) केजरीवाल व राहुल यांनी वरील विद्यार्थ्यांचा अगदी गुळमुळीत शब्दात सुद्धा निषेध केला नाही. नंतर गुळमुळीत शब्दात "भारतविरोधी भूमिका चालणार नाही", परंतु वैचारिक वादविवाद हा मूलभूत हक्क आहे" असे म्हणून विद्यार्थ्यांच्या अटकेचा निषेध केला. (५) हे स्पष्ट दिसत आहे की, (अ) केजरीवाल व राहुल यांना विद्यार्थ्यांनी काही चुकीचे केले आहे हे मान्यच नाही. अन्यथा त्यांनी विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीचा निसंदिग्ध शब्दात निषेध व विरोध केला असता. त्याबद्दल त्यांनी मौन पाळले आहे. (ब) देशद्रोही घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांच्या अटकेला त्यांच्या विरोध आहे. या विद्यार्थ्यांच्या देशद्रोह त्यांना देशद्रोह न वाटता the right to dissent & debate वाटतोय. या देशद्रोही विद्यार्थ्यांवर कारवाई करणारेच त्यांना देशद्रोही वाटत आहेत. (क) 'अ' व 'ब' वरून स्पष्ट दिसते की देशद्रोह्यांना या दोघांचा पाठिंबा आहे व देशद्रोह्यांविरूद्ध कोणतीही कायदेशीर करण्यास त्यांचा विरोध आहे. कॉंग्रेस हा सुरवातीपासून दहशतवादी, देशद्रोही यांचा भक्कम पाठिराखा आहे. आता त्यात केजरीवालही सामील झाले आहेत. असले नेते भारतात आहेत हेच भारताचं दुर्दैव!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्रत्येक राजनेता आपल्या संपविण्याचा प्रयत्न करतो, त्यात काही गैर नाही. प्रयत्न अयशस्वी झाल्यास गादी हातातून जाते. बाकी इशरत आतंकवादी होती हे १००% सत्य आहे.

In reply to by विवेकपटाईत

मी काही मोदीभक्त नाही, पण जर राहुल गांधीवर टीका केलि तर त्या व्यक्तीला भाजपाच्या टोळीतील लांडगा मानला जाते,पर्यायाने मोदीभक्त! असतील मोदी फेकू,पण त्यांच्या बोलण्यात कुठेही भारतद्वेष दिसत नाही. पण पप्पुचि भाषणे बघितली की त्याच्या व् कॉंग्रेसवाल्यांच्या अकलेची कीव कराविशि वाटते. पप्पू आज सरळसरळ राजकीय फायदा मिळवण्यासाठी जेएनयू मधील देशद्रोहयाचे समर्थन करत आहे. खरोकर हां माणूस जर पन्तप्रधान म्हणुन जर समोर आला तर जगासमोर एक मोठा विनोद म्हणुन भारताची प्रतिमा तयार होईल.

In reply to by भंकस बाबा

अजुन एक जोड़तो पुस्ती, हे सगळे करुन म्हणजे जेएनयु मधील विद्यार्थ्यांना (?) पाठिंबा देऊन तो छोटा भीम स्वतःची कबर खोदतोय. त्याला शिव्या दिल्यास लोक भाजपाई समजतात तर समजू दे बापडा! लोकांची लेवलच तितकी!! आपण आपल्या मनात नीरक्षीर (आमच्या बाबतीत नीरस्कॉच) असणे बरे! (स्कॉच भक्त) नाना

असो, पण देशात जे राष्ट्रविरोधी वातावरण आहे त्यामुळे लोकांचा उद्रेक बाहेर येऊ नये म्हणजे मिळवलं,लोक रस्त्यावर उतरले तर काय होईल? ISI चे एजंट काय सापडतात आणि ते इसिस चे नेटवर्क चालवाणारे काय सापडतात!! आता फक्त ABVP वाले उतरलेत. आणि लोक जेव्हा रस्त्यावर उतरतील त्यावेळीही मोदीविरोधक मोदींनाच जबाबदार धरतील. नालायकपणाला पण एक लिमिट असतं,मी स्वतः मोदींच्या धोरणांचा कधीकधी विरोध करतो,तोरसेकरांच्या ब्लाॅगखाली प्रतिसाद देतो पण माझे प्रतिसाद ते प्रकाशित करत नाहीत. म्हणून दांभिक सेक्युलरांनी थोडं आत्मपरिक्षण करणं गरजेचं आहे. या अशा वातावरणामुळे माझ्यासारख्या मोदीभक्त नसणार्यांना मोदीभक्त व्हावे का असे वाटत आहे. आणि यामध्ये मोंदींचा काय संबंध म्हणाल तर संबंध आहे. 282 जागा येवून पूर्ण बहुमत असणे आणि जागतिक राजकारणात त्यांची सुधारलेली प्रतिमा हे अजून काहींना पचत नाहीये. धन्यवाद (नाईलजाने झालेला मोदीभक्त)

याविषयावर शेखर गुप्ता यांचा हा लेख वाचनीय आहे. http://www.business-standard.com/article/opinion/shekhar-gupta-the-grea… इशरत जहान अतिरेकी होती यात काही संशय नसावा. मुख्य मुद्दा तिला मारण्याचा आहे. त्याला गुप्ता एन्काऊंटर न म्हणता कंट्रोल्ड किलिंग म्हणतात. भारताचं हे धोरण पंजाब, कश्मिरसकट अनेक ठिकाणी खूप वर्षापूर्वीपासून आहे. त्यांचा मुख्य मुद्दा हा की २००४साली, कॉंग्रेसचं सरकार आणि आयबी-चीफ असताना झालेली. ती अनेक वर्षांनंतर का बाहेर आली. याबाबत ते म्हणतात की जेव्हा मोदी हा कॉंग्रेसच्या सत्तेला धोका म्हणून पुढे आले तेव्हा याचं पद्धतशीरपणे राजकारण करण्यात आलं. हेडलीच्या पार्डन बद्दल त्याने सरकारशी केलेलं हे डील आहे असं काही लोक म्हणतायत. त्याला उत्तर ते असं देतात की अमेरिकेच्या कायद्यानुसार त्याने अमेरिकेतली शिक्षा (३५ वर्ष) भोगून झाल्याशिवाय त्याला एक्सट्रडाइट करता येतच नाही. सो भारताने ३५वर्ष थांबून त्याला इथे आणायचं का आत्ता त्याला माफी देऊन त्याच्याकडून २६/११बद्द्ल साक्ष देऊन घ्यायची असे पर्याय होते.

अवांतर: एका बाजूला एफ्टीआयाय/सेंसर बोर्ड/बीफ बॅन वगैरे असहिष्णुता आणि दुसर्‍याबाजूला राजकीय फायद्यासाठी अतिरेक्याला हिरो बनवणे, गुप्तहेर यंत्रणेला राजकारणात आणणे, अमाप भ्रष्टाचार, उद्योगप्तींना बोगस लोन्स देऊन सरकारी बँकांची वाट लावणे. माय चॉइस इज क्लीअर.

In reply to by इरसाल

ते कॉम्ग्रेसच्या भ्र्ष्टाचाराबद्दल बोलत आहेत. त्याबद्दल संभ्रम असण्याचे काही कारण दिसत नाही. युपीए २ वर खोर्‍याने भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.

भाऊ तोरसेकरांचा ब्लोग इशरत जहान अतिरेकी होती तर झालेले एन्काऊंटर हे योग्यच म्हणावे भलेहि बळजबरीने म्हणालो तरी चालेल, कसाबने बिर्याणी खाल्ली, इशरत जहानेपण खाल्ली असती. पण त्यावरुन सध्याचे पन्तप्रधान/गृहमंत्री यशस्वी / भले / निष्कलन्कित व तत्कालिन पन्तप्रधान/गृहमंत्री कलन्कित / बावळट / अयशस्वी असे म्हणणे चुकिचे. मुद्दा थोडा भरकटेल एक गोष्ट नमुद करावीशी वाट्ते. आरुशी तलवार हत्याकान्ड घटनेवर आधारित चित्र्पट "तलवार" पाहिला. एके ठिकानी तलवार यांच्या निकटच्या व्यक्तिने लिहिले कि ज्याना आरुशी तलवार हत्याकान्ड सम्बधीत कागदपत्रे वाचली नाहित त्यानी हा चित्र्पट नक्कि पहावा. "तलवार" चित्र्पट बनवताना या केसची कागदपत्रे संदर्भ पटकथेत वापरला असे वाचले. "तलवार" चित्र्पटात पाहिले स्वत:च्या फायदयासाठी सी बी आय अधिकारी खुनाचे कारण काय यावर पहिल्या अधिकार्याने केलेला तपास गुंडाळुन दुसर्या अधिकार्याने केलेला तपास पुढे रेटला जातो. या चित्र्पटात पाहिले कि अधिकारी स्वत:च्या फायद्यासाठी काय करु शकतात. कसे दुसर्या अधिकारयाला अडकवु शकतात. छ्ळु शकतात. इशरत जहान केसमध्ये तत्कालिन "पन्तप्रधान/गृहमंत्री" यांची भुमिका तपाविशी असे ज्यांना वाटते त्यांनी सांगावे कि तत्कालिन युती "राज्य" सरकारने शस्त्र बाळगणाऱ्या अभिनेत्याला "टाडा" न्यायालयातुन कसा जामीन मिळवुन दिला, हे सांगावे. जर सर्व आरोपी जेलमध्ये सड्त ठेवले असते तर एक चांगले उदाहरण झाले असते. देशविघातक काम तेव्हा झाले आणि आजही झाले आहे. सध्या " न्यायप्रविष्ट " हा शब्द अधिकारी / राजकारणी लोकाना उसन्ती घेण्यासाठी / मुखवटा बदलण्यासाठी केलेले "कवच" आहे. ++++++++++++++++++++++++++++ नेहरु विद्यापीठ "लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मोदीसरकार नसते तर या सेक्युलरखाजाड्या मंडळींनी असे कार्यक्रम घेतले असते का" कार्यक्रम घेतले असते का हे महत्वाचे नाही. नेहरु विद्यापीठात जे झाले त्यावरुन पाकिस्तान्यांची कशी जिरवता येइल असे काही तरी करावे, आयते निमित्त मिळाले आहे

In reply to by लिओ

तो अभिनेता निरागस बाळ होता असा टाहो एका वाघोबाने फोडला होता , म्हणुनच तो निर्दोष सुटला होता.

In reply to by मोगा

गल्लीतली कुत्री स्वतःला सिंह समजायला लागली आहेत. या जेएनयूच्या गद्दाराना धड़ा शिकवायला वाघोबाच् पाहिजे होते

In reply to by भंकस बाबा

स्वतःच्या स्वर्थासाठी कधी कुणाचे पोट फाडणे , तर कधी संजय निरागस हो ! असे सूर आळवणे ..... तुमच्या इतिहासातील सगळ्याच वाघोबानी हेच केले आहे... ते पोट फाडायला गेले की तुम्हाला ते शूर वाटतात व तह करायला गेले की तुम्हाला ते मुत्सद्दी वाटतात. तुमचे वाघोबा तुम्हाला लखलाभ ! ( लखोबा लाभ ! )

In reply to by मोगा

स्वतःच्या स्वर्थासाठी कधी कुणाचे पोट फाडणे
@मोगा, हा उल्लेख नेमका कुणाबद्दल आहे ? शिवाजी महाराजांबद्दल नसावा अशी अपेक्षा करतो पण त्यांचेच आपल्या रिकाम्या जागेत असेल तर शिवाजी महाराज स्वार्थी कसे होते हे दहा वाक्ये लिहून संदर्भासहीत स्पष्ट करु शकाल ? आपण शिवाजी महाराजांची रयतेप्रती निष्ठा व्यवस्थीत अभ्यासली आहे का ? आपल्या प्रत्येक कृतीतून रयतेप्रति निष्ठा ठेवणार्‍या एका राष्ट्रपुरुषास आपण स्वार्थी नमेके कोणत्या आधारावर ठरवू इच्छिता ?

In reply to by तर्राट जोकर

तजो, गणराज्य दिन म्हणून २६ जानेवारी निवडण्यामागे बराच गोलमाल आहे. २६ जानेवारी १९३० रोजी काँग्रेसने पूर्ण स्वराज्याचा ठराव पारित केला. म्हणून स्वातंत्र्योत्तर काळी २६ जानेवारी हा दिवस गणतंत्र दिवस म्हणून जाहीर झाला. आता भारतीय प्रजासत्ताकाचा ब्रिटीशांच्या उच्चाटनाशी काहीही संबंध नाही. मग दोहोंची मोळी कशाला बांधायची? ब्रिटीशांनंतर काँग्रेसच्या हातात सत्ता आली म्हणून काँग्रेसच्या तारखेला किती महत्त्व द्यायचं? २६ जानेवारीला विरोध म्हणजे प्रजासत्ताकास विरोध नव्हे. नेमका हाच दिवस ऑस्ट्रेलियामधल्या १७८८ सालच्या ब्रिटीश आगमनाचा दिवस म्हणून ऑस्ट्रेलिया दिन असा साजरा केला जातो. काय भानगड आहे? ब्रिटनच्या दोन्ही वसाहतींचा राष्ट्रीय दिन एकंच कसा काय? हा योगायोग खचितच नाही. यावरून जपान्यांनी ब्रिटिशांपुढे शरणागती पत्करल्याचा १५ ऑगस्ट १९४५ हा ब्रिटीशांचा विजयदिन भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून नक्की केला गेल्याची आठवण होणे अपरिहार्य आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

Mr. Sharma, who was quite categorical in declaring that he didn't believe in Constitution of India, told The Hindu: "The purpose of my life and that of millions of people like me who are present in this country, is to make this country a Hindu Rashtra. Nobody can stop this country from becoming a Hindu Rashtra". ह्याबद्दल काय?

In reply to by तर्राट जोकर

तजो, >> ह्याबद्दल काय? ह्यात काय सांगण्यासारखं आहे? ज्यांचा घटनेवर विश्वास नाही त्यांनी घटना सनदशीर मार्गाने बदलण्याचा प्रयत्न चालू ठेवलाय. आ.न., -गा.पै.

In reply to by तर्राट जोकर

"भारत कि बर्बादी तक जंग रहेगी" "पाकिस्तान झिंदाबाद" अफजल गुरू हुतात्मा होता वगैरे वगैरे ह्याबद्दल आपले म्हणणे काय सांगा? मग त्यावर बोलू.

In reply to by तर्राट जोकर

अडचणीच्या प्रश्नाला बगल देणारा प्रतिसाद
मलाही असचं काही म्हणायचंय! हिंदूराष्ट्र वगैरे कूचकामी मुद्दे आहेत,त्यांची मजल संविधानाच्या/संसदेच्या वर जाणार नाही. पण संसदेवर हल्ला करणार्यांवर प्रेम करणारे आणि देशविरोधी घोषणा देणारे यांच्याबद्दल तुम्ही मत मांडले नाही याचे आश्चर्य वाटले.

In reply to by गामा पैलवान

Bharat Rajput, district president, Hindu Mahasabha, Meerut, said, "We do not believe in the Constitution of India and have been protesting against it for the past 50 years. Secularism doesn't exist in India and that is why we mourn the Constitution. When India was divided, Pakistan was given the title of Islamic state then why was India not given the title of a Hindu Rashtra? It is this Constitution, which has failed to recognize India as a Hindu state that all of us are against."

In reply to by गामा पैलवान

भारतीय स्वातंत्र्याचा अन संघाचाही संबंध नाही. मग मंत्रीमंडळ त्यांचे लेक्चर ऐकुन का हलते ? काँग्रेसमुक्त लंडनात आता सुखात रहा !

आम्ही भारत पाक युद्ध / देशद्रोह वगैरे काय मानत नै . हस्तिनापुरनं इंद्रप्रस्थाला गिळायचं की यानी त्याना , हे त्यांचं त्यानी ठरवावं. अखंड हिंदुस्तान , अखंड पाकिस्तान , अखंड बुद्धस्थान ..... अखंड रिपब्लिकस्तान इ इ .... सोक्षमोक्ष लावा एकदाचा..... जनतेला त्रास कशापै ? हनुमंतप्पा काय नि कसाब काय नि मेमन काय ..... सगळे फुक्कट मेले.... आमची सर्वानाच सहानुभूती आहे.

In reply to by मोगा

हनुमंतप्पा काय नि कसाब काय नि मेमन काय ..... सगळे फुक्कट मेले.... आमची सर्वानाच सहानुभूती आहे.
हे प्रचंड खटकलं हनुमंतप्पा आणी कसाबला एकाच पारड्यात तोलनं . काय चाल्लय काय ? एक व्यक्ती जी की भारतीय सैन्यात जायची अवघड परीक्षा पास करून , त्याहीपेक्षा अवघड ट्रेनिंग घेऊन तुमच्या माझ्यासारख्या लोकांची रक्षा करण्यासाठी इतक्या प्रतिकूल परिस्थितीत तैनातीत होते ती व्यक्ती . अन् ज्या व्यक्तीने दुसऱ्या देशात जाऊन शेकडो निरपराध लोकांना काहीही कारण नसताना मारून टाकलं ज्याची ती व्यक्ती दुसरीकडे . अहो काय तुलना तरी होऊ शकते काय ? एका व्यक्तीचे निधन झाले. त्या व्यक्तीला मेल्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातात अन् एका व्यक्तीला शिस्तबद्ध रीतीने खटला चालवून फाशी दिली जाते , त्या व्यक्तीचा मृतदेह पण त्या देशाची सरकार घेत नाही . अशा दोन व्यक्तींची तुलना कशी काय करू शकता तुम्ही ? खरंच आता सांगणार तरी काय ? मोगासाहेब, तुम्हाला नेमकं अपेक्षित तरी काय आहे? भारतातच रहात असता का आपण ? जाऊद्या सभ्यतेच्या पडद्याआडून यापेक्षा जास्त नाही लिहीता येणार मला ! भारतात असे पण लोक आपले विचार पण मांडू शकतात यातच भारत किती सहिष्णु आहे ते दिसून येतेय.

In reply to by उगा काहितरीच

मोगाजी, तुम्ही हा प्रतिसाद देताना रागाचीच पातळी गाठलीत ते पण मोदी विरोध करायचा हे ठरवुन पुढच सगळ बोलतात (जे बोलतात ते बरोबर का चूक हे ही भान नसते, भान असते ते फक्त आपण बोलत आहोत ते मोदी विरोधी आहे का नाही याचे) तसाच निर्बुद्ध आणी अतिशय विकृत प्रतिसाद आहे हा तुम्ही कोणाचीही बाजु घ्या, कितीहि विचार करा पण निरागस लोकांवर क्रुरपणे गोळ्या चालवणारा आणी तुमच्या आमच्या सारख्या लोकांची सुरक्षेसाठी आणि देशासाठी अशक्य अवघड परिस्थीतीत लढणार्‍या जवानाची तुलना करणेहि अतिशय कोत्या मनोवृत्तीचे द्योतक आहे. भयंकर वाईट वाटले आपला प्रतिसाद वाचुन. तुम्हास तुमचे मत आहे, त्याचा आदरहि आहे, पण म्हणुन ईतरांचा विषेशतः जवानांच्या बलिदानाचा अनादर करु नये हि विनंती.

In reply to by मोगा

हनुमंतप्पा काय नि कसाब काय नि मेमन काय ..... सगळे फुक्कट मेले.... आमची सर्वानाच सहानुभूती आहे. या एका वाक्यातच विचारसरणीची प्रत कळून येते ! "पहिल्या शूर वीराने तुमच्या-आमच्या संरक्षणाचे काम करताना आपले बलिदान दिले आणि इतर दोन्हीं भेकडांच्या कारवायांत कर्मधर्मसंयोगाने तेथे हजर असतो तर तुम्ही-आम्ही कोणीही बळी पडू शकलो असतो"... इतकेही भान (सु?)शिक्षित म्हणवणार्‍याने ठेवले नाही तर अवस्था शोचनिय आहे आणि शुभेच्छांची नक्कीच गरज आहे ! :(

In reply to by मोगा

अफगाण ते शीलंका सर्व लोक एकाच प्रदेशाचेच आहेत. कुणीही युद्धात मरु नये. कोणच्ञाच देशाचा. आनंदात सर्व १०० वर्षे जगोत.

In reply to by मोगा

तुम्ही म्हणताल हो , "हे विश्वची माझे घर " वगैरे . आम्ही नाहीत ना तेवढे थोर. "आमच्या" (मानत असले तरच "आपल्या") देशात येऊन शेकडो लोकांचा बळी घेणाऱ्या व्यक्तीची तुलना आमच्या देशातल्या शहिदासोबत तुलना नाही चालत ना आम्हाला . हवे तर म्हणा आम्हाला संकुचित !

In reply to by मोगा

पाजी माणूस आहात. ज्याला शहीद आणि अतिरेकी यातील फरक कळत नसेल तर थू त्याच्या जिंदगानिवर, आयडिला पंख लागले तरी चालेल पण या माणसाचा निषेध करताना मी यापुढे तारतम्य बाळगणार नाही.

In reply to by भंकस बाबा

आम्हि एक दोन वेळा तसा प्रयत्न केला आहे पण्..असो...इग्नोर मारो..घाणित दगड माराल तर ति आपल्यावरच उडते.

In reply to by होबासराव

एक इंग्रजीत म्हण आहे डूकराबरोबर चिखलात कुस्ती खेळू नये. थोड्या वेळाने आपल्या लक्षात येते कि आपले कपडे घाण होतात आणि डुकराला तर मजा येते

In reply to by मोगा

पोकळ बांबुचे वगैरे वगैरे वगैरे ! लै काय काय डोक्यात आले होते पण ह्यांची तितकीही लायकी नाही

In reply to by मोगा

हनुमंतप्पा काय नि कसाब काय नि मेमन काय ..... सगळे फुक्कट मेले.... आमची सर्वानाच सहानुभूती आहे. मोगा जी १८००० फुटावर -५० से तापमानाला "दोन" तास राहून पहा. आणि मग अशी मुक्ता फळे उधळायचा विचार करा.

In reply to by मोगा

आम्ही भारत पाक युद्ध / देशद्रोह वगैरे काय मानत नै ....जनतेला त्रास कशापै ?...आमची सर्वानाच सहानुभूती आहे.
@ मोगा, राजकारण कदाचित विरोधीपक्षावर टिकाही करावी, तुम्हाला मोदी किंवा भाजपा आवडत नसेल तर तुम्ही त्यांच्यावर टिका करण्यास स्वतंत्र आहात. जनतेला होणार्‍या त्रासाची आपल्याला खरेच चिंता असेल तर आपण जनतेच्या सुरक्षिततेची काळजी घेऊ इच्छित देश या संकल्पनेच्या विरोधी असणार नाही. वसुधैव कुटूंबम सर्वांनाच हवे आहे, समानतेच्या तत्वावर सगळे विश्व एकत्र येण्यास तयार असेल, भारतीयांच्या लेजिटीमेट हितांची न्याय्य काळजी घेतली जाणार याची व्यवस्थित खात्री झाल्यास भारतीय नक्कीच एक पाऊल इतरांच्या पुढे टाकतील पण जो पर्यंत तशी खात्रि नाही तो पर्यंत भारतीयांच्या हिताची काळजी घेण्यास देश हि संकल्पना महत्वाची राहते, भारतीयांच्या लेजिटीमेट न्याय्य हिताची काळजी घेण्याच्या मध्ये जे अडथळे असतील ते देश विरोधी असू शकतील, त्यामुळे जनतेला त्रास देशविरोधी गतीविधींमधून होतो. २६/११ ला आपण व्हिटी स्टेशन वर कसाबच्या समोर असता तर ? आपण आपल्या विचारांचे असे प्रदर्शन करू शकला असता काय ? किंवा २६/११ला तुमच्या कुटुंबातील एखादी प्रिय व्यक्ती कसाबच्या गोळीचा शिकार झाली असती तरीही तुम्हि हेच लिहिले असते का ? या प्रश्नांचे उत्तर इथे कुणालाही आजीबात देऊ नका उत्तरे देण्याच्या फंदात पडू नका हे प्रश्न स्वतःच्या मनाला शांतपणे विचारा तेवढे पुरेसे असेल. देशवासीयांना सुखाची झोप मिळावी म्हणून देशाच्या सिमेवर स्वतःचा प्राण लावणारा हनुमंतप्पा आणि बाकी भारतीय सैनिक आणि कसाब यांची आपण केलेली तुलना अत्यंत बेजबाबदारपणाची नाही का हे एकदा स्वतःच्या विचारांमधील द्वेषभावना बाजूला ठेऊन रिव्हिजीट करावे.

अशा फुटकळ आणि फालतू प्रतिसादांना प्रतिवाद करून काय उपयोग. नसता शक्तिपात.. पप्पू च्या बौद्धिक दिवाळखोरी बद्दल नवीन काय बोलणार... आणि डावे ..त्यांचे तर सगळे तत्वज्ञानच वेगळे... आपल्या देशात लोकशाहीचा डोस जरा जास्तच झालाय असे खेदाने म्हणावेसे वाटते. आणि उरलेली कसर मीडिया भरून काढते.

या सर्व प्रकरणाची अजून एक बाजू आजच्या लोकसत्ता तील अग्रलेखात मांडली आहे. त्यातील खालील मुद्दा महत्वाचा वाटतो … http://www.loksatta.com/aghralekh-news/police-arrest-jnu-students-union-president-kanhaiya-kumar-3-1202472/ भारतविरोधी घोषणा दिल्या म्हणून या सर्व विद्यार्थ्यांवर सरकारने राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला. परंतु त्यातून केंद्रीय गृहमंत्र्यांचे अज्ञानच प्रगट झाले. याचे कारण १९६२ साली सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वाच्या निकालात राष्ट्रद्रोह म्हणजे राष्ट्रविरोधी कृती, केवळ शब्द नव्हेत असे नि:संदिग्धपणे स्पष्ट केले आहे. याचा अर्थ एखाद्याने देशाविरोधात भाषण केले, घोषणा दिल्या वा सरकारवर टोकाची टीका केली तर तो राष्ट्रद्रोह होत नाही. असे करणाऱ्याची कृतीदेखील तशी असावी लागते. पुढे २०११ साली एप्रिल महिन्यात विनायक सेन प्रकरणात ही बाब सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा स्पष्ट केली. नक्षलवादी तत्त्वज्ञान आणि नक्षलवादी यांच्याविषयी सहानुभूती बाळगली म्हणून सेन यांच्यावर सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. तो सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही आणि सेन यांना मुक्त करावे लागले. ‘आपण लोकशाही व्यवस्थेत राहतो. सेन हे नक्षलवादी तत्त्वज्ञानाचे समर्थक असतीलही, परंतु म्हणून ते देशद्रोही ठरत नाहीत’, असे सर्वोच्च न्यायालयाने त्या वेळी सरकारला सुनावले. त्याचमुळे याही वेळी विधिज्ञांनी सरकारला धोक्याचा इशारा दिला असून जेएनयूतील विद्यार्थ्यांची कृती देशद्रोह ठरत नाही, असे स्पष्ट केले आहे. सरकारने त्यांचे तरी ऐकावे.

In reply to by ओल्ड मोन्क

ओल्ड मोन्क, भारतविरोधी घोषणा देणे हे प्रक्षोभक भाषण करण्यासम आहे. त्या विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा आरोप लावता येत नसला तरी प्रक्षोभक भाषणासाठी अटक करता येईल. किंबहुना तशीच झालेली दिसतेय. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कलम १५३-A लागले आहे की नाही ते कन्फर्म करायला लागेल पण मुख्य कलम बहुतांशी कलम १२४-A आहे असे प्रथमदर्शनी वाटते

मित्रपक्ष पीडीपीचे म्हणणे एकंदरित असे आहे ह्या बाबतीत तेव्हा अफज़ल गुरुची फाशी म्हणजे विडंबना (travesty) आहे असे मानणाऱ्या पक्षा सोबत सरकार ने राहु नये असे एक भारतीय म्हणून मला वाटते, अन असेच झाले तर बीजेपी च्या जम्मू मधील हक्काच्या सीट्स सुद्धा जातील हे नमूद करावे वाटते. शिवाय आजचा गिरीश कुबेर ह्यांचा अग्रलेख वाचता, पीडीपी ला एक न्याय अन जेएनयु च्या पोरांना एक न्याय जर सरकार लावणार असेल तर ह्या कुबेरी हलकट वृत्तीला जाब विचारायचा नैतिक अधिकार मी गमावून बसेल ही भीती वाटते असो!

In reply to by नाना स्कॉच

स्वतःला भारताचा भाग न माणणारे तथाकथित काश्मिरवासीयांना/पक्षांना अफजल गुरूची फाशी ही विडंबना आहे हे वाटणे स्वाभिवकच आहे. आणि राहिला प्रश्न अशा पक्षाबरोबर सरकारने राहण्याचा,तर तो काश्मिरमध्ये पाय पसरण्याचा भाजपचा कूटनितीक डाव आहे.
पीडीपी ला एक न्याय अन जेएनयु च्या पोरांना एक न्याय जर सरकार लावणार असेल तर ह्या कुबेरी हलकट वृत्तीला जाब विचारायचा नैतिक अधिकार मी गमावून बसेल ही भीती वाटते
कलम 370 बद्दल आपले काय म्हणणे आहे? ते उठवण्याचा प्रयत्न याच सरकारने केला.पण तो होऊ दिला नाही.कोणी होऊ दिला नाही बरे??

In reply to by चेक आणि मेट

इतरांची ती शय्यासोबत आणि भाजपची कूटनिती ! पीडीपीचे धोरण आणि अफझलला सपोर्ट सर्वांना माहिती आहे. त्याबद्दल चकार शब्द न काढता इकडे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे दुटप्पी आहे. या विद्यार्थांना अटक झाली हे योग्य ! आणि शिक्षाही व्हायलाच हवी. फक्त भाजपाने नैतिकतेचे ढोंग बंद करावे .

In reply to by कपिलमुनी

या विद्यार्थांना अटक झाली हे योग्य ! आणि शिक्षाही व्हायलाच हवी.
याबद्दल धन्यवाद.
इतरांची ती शय्यासोबत आणि भाजपची कूटनिती ! फक्त भाजपाने नैतिकतेचे ढोंग बंद करावे .
सहमत.
त्याबद्दल चकार शब्द न काढता इकडे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे दुटप्पी आहे.
काश्मिरसारखा संवेदनशील मुद्दा आणि JNU या दोन प्रकरणांची तुलना योग्य नाही. त्यासाठी काश्मिरच्या मुद्द्याचा अभ्यास हवा.तो पूर्ण विषय संवेदनशील आहे.नकाशामध्ये दाखवण्यापुरताच काश्मिर भारताचा अविभाज्य भाग आहे.

In reply to by चेक आणि मेट

काश्मिरसारखा संवेदनशील मुद्दा आणि JNU या दोन प्रकरणांची तुलना योग्य नाही >> ज्या घोषणा पीडीपी काश्मिरात करते त्याच काश्मिरी पोरांनी जेएनयुत येऊन केल्यात... सोच वोही, जगह नई. त्यासाठी काश्मिरच्या मुद्द्याचा अभ्यास हवा.तो पूर्ण विषय संवेदनशील आहे. >> दाखवा अभ्यास. चांगली संधी आहे. नकाशामध्ये दाखवण्यापुरताच काश्मिर भारताचा अविभाज्य भाग आहे. >> नवीन माहिती बद्दल धन्यवाद.

In reply to by तर्राट जोकर

काश्मिरसारखा संवेदनशील मुद्दा आणि JNU या दोन प्रकरणांची तुलना योग्य नाही >> ज्या घोषणा पीडीपी काश्मिरात करते त्याच काश्मिरी पोरांनी जेएनयुत येऊन केल्यात... सोच वोही, जगह नई. त्यासाठी काश्मिरच्या मुद्द्याचा अभ्यास हवा.तो पूर्ण विषय संवेदनशील आहे. >> दाखवा अभ्यास. चांगली संधी आहे. नकाशामध्ये दाखवण्यापुरताच काश्मिर भारताचा अविभाज्य भाग आहे. >> नवीन माहिती बद्दल धन्यवाद.
फाट्यावर बाकि देशविरोधी घोषणाबाजी याबद्दल अजूनही तुम्ही तुमचे मत मांडले नाही,यातच सगळे आले. सोच वही आयडी दुसरा

In reply to by चेक आणि मेट

फाट्यावर >> चर्चेचा उत्कृष्ट दर्जा दाखवताय. बाकि देशविरोधी घोषणाबाजी याबद्दल अजूनही तुम्ही तुमचे मत मांडले नाही,यातच सगळे आले. >> देशभक्तीचे सर्टीफिकेट वाटायची जिम्मेदारी अंगावर घेऊ नये. सोच वही आयडी दुसरा >> तुमच्याबद्दलच्या नविन माहितीबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद!

In reply to by तर्राट जोकर

बाकि देशविरोधी घोषणाबाजी याबद्दल अजूनही तुम्ही तुमचे मत मांडले नाही

In reply to by चेक आणि मेट

आमचे मत फार सरळ आहे हो. देशविरोधी, घटनाविरोधी कार्यवाह्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी. कुठलाही भेदभाव असु नये. काडीसाठी तळमळताय? हे घ्या काड्या | | | | | | | | | | | ह्याप्पी?

In reply to by तर्राट जोकर

आमचे मत फार सरळ आहे हो. देशविरोधी, घटनाविरोधी कार्यवाह्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी. कुठलाही भेदभाव असु नये.

धन्यवाद


In reply to by चेक आणि मेट

काश्मिरसारखा संवेदनशील मुद्दा आणि JNU या दोन प्रकरणांची तुलना योग्य नाही

उत्तराची वाट बघतो. तुम्ही पलायन करणार नाही अशी आशा आहे.

In reply to by तर्राट जोकर

काश्मिरसारखा संवेदनशील मुद्दा :- तजो साहेब भारताचा जो पहिलेपासुन काश्मिर विषयि दृष्टिकोन आहे तो आपल्याला पटत नाहि का ? जेएनउ:- भारत तेरे तुकडे होंगे...इन्शाअल्लाह्...इन्शाअल्लाह ह्या घोषणेबद्द्ल काय वाटत. मला हे विचारावेसे वाटले. मि कुठल्याहि पक्षाचा बांधिल नाहि, पण मुद्दा नंबर १ ल्या ला मला भारत सरकार (शब्दशः) चे जे धोरण आहे ते योग्य वाटतेय, स्वप्न तर हे हि बघतो गिलगिट , बाल्टिस्तान सुद्धा पुन्हा आपले व्हावे. मुद्दा नंबर दोन ह्या घोषणा ज्यांनि दिल्या त्यांना योग्य ते शासन व्हावे.

In reply to by होबासराव

भारत सरकारचा दॄष्टिकोन योग्यच आहे. तो विषय नाही. भारताचे तुकडे करण्याच्या घोषणेबद्दल जेवढी चीड आहे तेवढीच त्या घोषणेला पाठिंबा देणार्‍या पीडीपीसोबत पाट लावणार्‍यांना समर्थन दिले जाते ह्याबद्दलही आहे.